राजकारण
ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग १)
Primary tabs
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने एकनाथ शिंदेंचे अभिनंदन केल्याने सेनेचे ३ वेळा निवडून आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे.
https://www.loksatta.com/pune/shivsena-shivajirao-adhalrao-patil-uddhav…
आज महाराष्ट्र विधानसभेच्या नवीन अध्यक्षांसाठी विधानसभेत निवडणूक होणार आहे व उद्या नवीन सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर निवडणूक होईल.
शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे.योग्य केलं. खासदार सेनेच्या जिवावर व्हायचं नी शुभेच्छा गद्….
शुभेच्छा देणे हा एक सोपस्कार आहे. लोकशाहीमधे विरोधी पक्ष हा शत्रू नसतो. तो सहकारी असतो.
अजितदादांनी , नाना पटोले नी , शरद पवारानी देखील नवीन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.
अढळराव पाटलांनी शुभेच्छा दिल्या यात त्यांच्या मनाचा मोठेपणाच दिसला.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस देवेंद्र फडणविसांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्याच की.
हे समजणे बिनडोकांच्या आवाक्यातले नाही.
त्यांची हकालपट्टी शिंदे गटात शामील झाल्यामुळे करण्यात आली अशी बातमी होती. डोकं असल्याचा दावा करनार्यांनी आधी बातमी वाचावी.
राज्यपाल पक्षपाती आहेत हे सर्वमान्य आहे पण सगळे संकेत पायदळी तुडवतील एवढे निर्लज्ज आहेत हे दिसून आले.
नियम दाखवत, न्यायालयात प्रकरण आहे सांगत जी विधानसभा अध्यक्ष निवडणूक थांबवली होती . तिला लगेच मान्यता दिली..
12 आमदार सुद्धा निवडतील ..
भाजप हा काँग्रेस पार्ट 2 आहे. केंद्रीय सत्तेचा , एजन्सी चा गैरवापर सरकारे पाडण्या साठी करणे यात दोन्ही पक्ष सेम आहेत
सगळे संकेत पायदळी तुडवतील एवढे निर्लज्ज आहेत हे दिसून आले.+१कालच शरद पवार बोलले की मी ईतक्या वेळा शपथ घेतली पण मला कुणी पेढा भरवला नाही. तटस्थ राज्यपाल पेढे भरवून आनंदं काय साजरे करतात. मज्जाय.
२०१९ ला ऊध्दव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेना स्मरून शपथ घेतली तर राज्यपालांनी आक्षेप घेतला होता. पण आता एकनाथ शिंदेंनी बाळासाहंबांना स्मरूनशपथ घेतली तर राज्यपालांना काहीही आक्षेप नव्हता. निर्लज्ज असावं पण ईतकं??
इतिहासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
मागे सावित्रीबाई फुलेंविषयी किळसवाणे हावभाव करून जे वक्तव्य केले होते तेव्हाच हा माणूस मनातून उतरला होता. आता त्यांच्या कोणत्याच कृतींचे आश्चर्य वाटत नाही.
+१
राज्यपाल कमी आणी भाजप कार्यकर्ता जास्त आहे हा माणूस.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे.
समोर अध्यक्ष राष्ट्रवादीतून आलेला. समोर बसलेल्या पहील्या नेत्यांची फळी राष्ट्रवादीतबन आलेल्यांची. मूळ भाजपेयी मात्र मागे. सतरंज्या ऊचलनार्यांनी सतरंज्याच ऊचलाव्यात असा दंडक घातलेला असू शकतो भाजपात. :)
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने एकनाथ शिंदेंचे अभिनंदन केल्याने सेनेचे ३ वेळा निवडून आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे.बातमी सामनात अनवधानाने छापली गेलीय असं पत्रक आताच शिवसेनेने काढलंय.सामनाचे संपादक प्रूफ रिडींग झोपेत करतात का?
यावरून एकूणच संपादकांचा दर्जा समजून येतो
मोदींची माझ्या डोळ्याला डोळा भिडविण्याची हिंमत नाही.: राहुल गांधी
एकाही बंडखोर आमदाराची माझ्या डोळ्याला डोळा भिडविण्याची हिंमत झाली नाही: आदित्य ठाकरे
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/aaditya-thackeray-…
मोदींची तुलना बंडंखोरांशी?
मला असे वाटते की श्रीगुरुजी यांनी आदित्य ठाकरेंची तुलना ही राजीव गांधींशी केली आहे .
राजीव गांधी चुकून टाईप झाले.
मला असे वाटते की श्रीगुरुजी यांनी आदित्य ठाकरेंची तुलना ही राहुल गांधींशी केली आहे .
हे कळण्याइतकी समज हवी ना.
दोन्ही ऊदाहरणे वेगळी आहेत त्यामुळे तूलनाही चुकीची. ऊगाच ओढून ताणून आदित्य ठाकरेंचे चारित्र्यहरण करन्याचा ठाकरेद्वेष्ट्यांचा डाव दिसतोय.
महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने फक्त १०७ आमदारांनी मतदान केले. नॉटी राऊत तर म्हणत होता की महावसुली आघाडीकडे संपूर्ण बहुमत आहे, काय झाले त्या बहुमताचे !
१०७ घरी बसवले ! ;))महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने फक्त १०७ आमदारांनी मतदान केले. नॉटी राऊत तर म्हणत होता की महावसुली आघाडीकडे संपूर्ण बहुमत आहे, काय झाले त्या बहुमताचे !
१०७ घरी बसवले ! ;))१०७ घरी बसवले ! ;))कुठल्या पक्षाचे.आजच्या विशेष अधिवेशनातील अजित पवारांचे भाषण अगदी झकास झाले. आदित्य ठाकरे, भाजप आमदार ,खासकरून गिरीष महाजनांची चांगलीच फिरकी घेतली. कुठेही सत्ता गेल्याची नाराजी दिसली नाही भाषणात. भाजप आमदारांचे चेहरे सुतक लागल्यासारखे दिसत होते. असो, अजित पवार माझ्या नावडत्या पक्षाचा आवडता नेता आहे.
सहमत, उद्धव ठाकरेंनीही आमदारकीचा राजीनामा न देता असंच भाषण करायला पाहिजे होत.
फडणवीसांनी असा दणका दिला की मुख्यमंत्रीपदाबरोबर आमदारकीही सोडावी लागली. नाहीतर म्हणे मविआ सरकार २५ वर्षे टिकणार होते आणि ठाकरे २०२४ मध्ये पंतप्रधान होणार होते. २०२२ मध्ये राष्ट्रपती सुद्धा सेनेचा होणार होता.
म्हणे मविआ सरकार २५ वर्षे टिकणार होते आणि ठाकरे २०२४ मध्ये पंतप्रधान होणार होते. २०२२ मध्ये राष्ट्रपती सुद्धा सेनेचा होणार होता.--
हि असली भाकिते राऊत कोणत्या आधारावर करत होता हे त्यालाच माहित.
पोकळ फुशारक्या मारणे १९६६ पासून आजतागायत सुरू आहे.
अगदी ! ;)
अश्या फुशारक्या मारनार्यांकडे विनवण्या करायला अटलबिहारी ते अमीत शहा का यायचे? :)
अडला हरी गाढवाचे पाय धरी
की भिक मिळावी म्हणून? :)
फडणवीसांनी असा दणका दिला की मुख्यमंत्रीपदाबरोबर आमदारकीही सोडावी लागली.त्या पेक्षा मोठा दणका अमीत शहानी फडणवीसना दिला. एकाच टरिम मध्ये मामू, ऊपमामू, विरोधीपक्षनेता. काय ती तडफड सत्ता मिळवण्याची.हो. राब राब राबले भाजपवाले. ना मजा कोण मारकाहेत तर एकनाथ शिंदे आणी राहूल नार्वेकर. सेनेच्या आमदारांनाही ”काही” तरी मिळाले. वर सुरूत, गुहाटी ची यात्रा. भाजप आमदारांना काय?? तर ऊचल सतरंज्या, बस मागच्या रांगेत. स्वाभिमान वगैरे भाजप आमदार गंगेत सोडून आले असावेत. :)
हायला
लै म्हणजे लैच जळजळ होते आहे!
इनो घ्या
पण ते सेना म्हणजे महाराष्ट्र म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांची कि श्री एकनाथ शिंदे यांची हे ठरलं काय?
जळजळ का होईल?? सेनेतून घाण गेलीय. पुढील निवडणूकीत दुसर्या फळीतील नेते पुढे येतील.
म्हणजे श्री उद्धव ठाकरे यांची कि श्री एकनाथ शिंदे यांची हे ठरलं काय?कायद्याप्रमाणे ठाकरेंची हवी पण आता देशात काय चाललंय ते आपण पाहतच आहोत.सेनेतून घाण गेलीय.
मग इतकी वर्षे हि घाण घेऊन सेना काय करत होती?
अरेरे
कायद्याप्रमाणे ठाकरेंची हवी
म्हणजे तुमच्या मताप्रमाणे ठाकरेंची सेना म्हणजे महाराष्ट्र का?
आपण म्हणजे अंधसैनिक याचे उत्तम उदाहरण आहे
घेऊन सेना काय करत होती?गद्दार हा गद्दारी करेपर्यंत कसा कळनार?
म्हणजे तुमच्या मताप्रमाणे ठाकरेंची सेना म्हणजे महाराष्ट्र का?सेना महाराष्ट्र हीत पाहते भाजपसारखी मुंबईतून अहमदाबादला कार्यालये नाही हलवत.मेट्रो कारशेड अरेतून कान्जुरला हलवते....
मेट्रो कारशेड आरेतून कान्जुरला हलवते....
पर्यावरण प्रेमींचे अभिनंदन. मागच्या वेळी माज दाखवनारे आता नमले हेही नसे थोडके
तुमच्या आवडी निवडी बद्दल वाद नाही परंतु एखाद्या माणसाला थोडा तरी विधीनिवेश असावा. सार्वजनीक क्षेत्रात काम करणार्याला तर तो असलाच पाहिजे या मताचा मी आहे. अजित पवार बघितले की मला आमच्या गावाकडची म्हण आठवते. म्हणतात ना "निर्लज्जम सदा सुखी" तसे हे साहेब आहेत. मागे पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नंतर लगेच थंडोबा होउन घरी परत गेले. यात आपण एक बिन भरवश्याचे माणुस म्हणुन ओळखले जाउ वगेरे काही वाटले नाही. लगेच आघाडी सरकार मधे उपमुख्यमंत्री झाले. अजुनही बर्याच गोष्टी आहेत.
त्यांच्या पुणे विभाग,आसपास त्यांचे उमेदवार आणतील. सत्तेत खुर्ची नसली तरी स्थान असणे उपयोगाचे असते. त्यांना त्यांची मर्यादा माहिती आहे. ठीक आहे.
त्यांना जे काम सोपवले होते ते त्यांनी पुर्णपणे व्यवस्थित पार पाडले. भाजपपक्ष नी फडणवीस सत्तेसाठी काहीही करू शकतात हे महाराष्ट्राला अजित पवारांनी दाखवून दिले.महाराष्ट्राच्या जनतेला भाजपने कसे फसवले हे देखील त्यांचया मुळेच दिसले. पहाटेच्या शपथवाधी नंतर दुसर्याच दिवशी सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स क्लिअर झाल्या. त्या विषयावर आता कोणताही भाजप नेता बोलत नाही.
Anil Gote : "दगलबाज, कपटी देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका"; अनिल गोटेंचं एकनाथ शिंदेंना पत्र
https://www.lokmat.com/maharashtra/anil-gote-letter-to-cm-eknath-shinde…
वैसे ये अनिल गोटे करते क्या है आजकल ....
https://www.ndtv.com/india-news/lashkar-terrorist-caught-was-jammu-bjps…
ह्यातून काही विचार डोक्यात येतात ते काही मांडत नाही.
पण टीव्ही वरती विखारी बोलणारे मुल्ला मौलवी आणले जातात, तेही सगळ्या चॅनेल वर एकच माणूस- ते आणि हि बातमी काहीतरी समान सूत्राने बांधली गेलीये असे काहीतरी वाटले.
आणि हो, कन्हैय्या लाल ह्यांना मारणाऱ्यांमधला एक आरोपी सुद्धा भाजपा मायनोरीटी सेल मधला होता. आता ह्यात भाजपाचा काही संबंध आहे असे मला बिलकूल सुचवायचे नाही. जे काही त्या व्यक्तीने केले ते स्वतःच्या धार्मिक विश्वासमुळेच असणार आहे. पण जर हाच व्यक्ती काँग्रेस किंवा आआप असला असता तर भाजप समर्थकांनी सगळीकडे बोभाटा केला असता हे पण नक्की.
सहमत आहे काॅमी. भाजपचेच लोक कसे सापडताहेत ह्यात? की राजस्थान जिंकण्यासाठी भाजप कडून ध्रूवीकरण केलं जातंय असं घडवून?? बरेच प्रश्न ऊपस्थीत होतात. सत्तेसाठी भाजपेयी काहीही करू शकतात हे आपण महाराष्ट्राच पाहीलंच. देशा समोर भाजप हे मोठं संकट ऊभं ठाकलंय.
खोट्या बातम्या आहेत.