राष्ट्रीय नास्तिक परिषद पुणे
Primary tabs
मिपाकरांच्या माहितीसाठी
अनेक नास्तिकवादींना या कार्यक्रमाची कल्पना जरूर असेल. पण अन्य शहरातील लोकांना माहितीसाठी गूगलवरून मराठी भाषांतर सादर केले आहे. चुकभूल माफ करणे..
ब्राइट्स सोसायटी
सोसायटी क्षेत्र क्रमांक: मेलनारा/185/2021/रोसगोड डीड 04-08-2024
P M:
९१-२२-२५३७ ७३९६
103, समोर. पंकर्स क्लिनिक गोखले रोडच्या बाजूला कावार्ड पथ. नापड्स
ठाणे (w)-100602, भारत
राष्ट्रीय नास्तिक परिषद पुणे
स्थळ काळे हॉल, गोखले इन्स्टिट्यूट, बीएमसीसी आरडी, एफसी कॅम्पस. डेक्कन जिमखारा, पुणे-411004
तारीख: रविवार, 18 डिसेंबर 2022
वेळ: सकाळी 9 ते संध्याकाळी 6
परिषदेचे वेळापत्रक:
सकाळचे सत्र
9:00-9:30- चहा आणि नाश्ता
9:30-9:40 शिवप्रसाद महाजन (ब्राइट्स सोसायटी) यांचे स्वागत भाषण 8:40-10:00 सोसायटीच्या मुख्य सदस्यांचा संक्षिप्त परिचय आणि पाहुण्यांसाठी स्मृतिचिन्ह सादरीकरण-कुमार नागे
भाषणे
10:00-10:20 प्रसन्न जोशी (साम टीव्ही) 10:20-10:40 अविनाश पाटील (MANS)
10:40-11:20 असीम सरोदे (संविधान आणि मानवाधिकार विश्लेषक).
11:20-11:35 उत्तम निरौला यांच्या हस्ते चार्वाक आणि मधुरजग पुरस्कार 11:35 12:15 नरेंद्र नायक (अध्यक्ष FIRA, मंगलोर)
१२:१५-१२:४५ उत्तम निरौला (सोच नेपाळचे कार्यकारी संचालक) १२:४५-१:०० प्रमोद सहस्रबुद्धे (ब्राइट्स सोसायटी) यांचे आभार
1:00-2:00 लंच ब्रेक
2:00-5:00 दुपारचे सत्र
ट्रॅक 1 (विश्वासाचा सिद्धांत) होस्ट: सुकृत कुलकर्णी
2:00-2:30 Speech by Aniket Sule
2:30-3:30 Thoughts by Abhijit Chanda, Ajit Abhyankar, Prajakta Atul, Vandana Shinde, Y N Walavalka 3:30-5:00-Audience open house and QnA with panel
ट्रॅक २ (विश्वासाचे व्यावहारिक परिणाम)
निमंत्रक: समीर शिंदे
2:00-2:30 अलका धुपकर यांचे भाषण 2:30-3:30 प्रदीप पाटील, विश्वंभर चौधरी, आनंद करंदीकर, जगदीश काबरे यांचे विचार
3:30-5:00-प्रेक्षकांसाठी खुले घर आणि पॅनेलसह QnA
5:00-5:30 विश्वंभर चौधरी यांची विधानसभा आणि सारांश
5:30 पुढे चहा आणि नाश्ता
टीप: वेळापत्रक समायोजित करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार आयोजकांनी राखून ठेवला आहे.
आपल्या पैकी कोणी सहभागी होतील तर त्यांनी अहवाल सादर करावा ही विनंती.
शुभेच्छा. आजच्याच लोकसत्ता वृत्तपत्राच्या लोकरंग पुरवणीत 'असला कुणी नास्तिक तर बिघडलं कुठं ? लेख आहे. वाचकांनी आनंद घ्यावा.
-दिलीप बिरुटे
असला कोणी आस्तिक तर बिघडलं कुठं? लेख आहे
अत्यंत पक्षपाती, एकतर्फी व असत्यकथन करणारा हा आहे.
उदाहरणार्थ ही वाक्ये -
धर्मप्रसारासाठी तलवार हाती धरा, खुशाल नरसंहार करा, असे मुळी कनवाळू देवाचे स्पष्ट आदेशच आहेत.कोणत्या देवाचे? हिंदू, बौद्ध, शीख, जैन या धर्मातील एकाही देवाने असा आदेश दिलेला नाही. फक्त एकाच पंथातील तथाकथित देवाने हा आदेश दिलाय. मग सरसकटीकरण का?
नास्तिक बिचारे मवाळ आणि पापभीरू असतात. त्यांनी कुणाला पाव देऊन, शाळा-दवाखान्याच्या व्यूहात भुलवून बाटवलेले नाही.हास्यास्पद दावा. चीन, कोरिया, बल्गेरिया, रूमेनिया अश्या साम्यवादी देशातील नास्तिक सत्ताधाऱ्यांनी किती कोटी माणसे मारली याची मोजदादच नाही. नास्तिक चळवळीतल्या एका आघाडीच्या दिवंगत नेत्याच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्युची कहाणी जनता विसरलेली नाही. जसे सर्वच आस्तिक पापभीरू, मवाळ असे नसतात तसेच सर्व नास्तिकही बिचारे मवाळ पापभीरू नसतात.
खरं तर आसपासच्या बहुसंख्य, आग्रही आस्तिक समाजात नास्तिकांची कुचंबणाच होत असते. घरगुती अथवा सार्वजनिक धार्मिक कार्यात त्यांना बऱ्याचदा मन मारून सामील व्हावे लागते. पण लक्षात कोण घेतो?नास्तिक सुद्धा आग्रही असतात. एका कार्यक्रमात तर पाहुण्यांनी साधे दीपप्रज्वलन केले म्हणून नास्तिकांनी टीका केली होती. पुण्यातील सरस्वती मंदिर शाळेने कोणत्या तरी समारंभापूर्वी सत्यनारायण पूजा करणार असे सांगितल्यानंतर ना. ग. गोरे व काही इतर नास्तिकांनी आंदोलन वगैरे केले होते. कोणत्याही सरकारी कार्यक्रमात किंवा मंत्री वगैरे असलेल्या कार्यक्रमात एखाद्या भगवा वेषधारी असला किंवा काही पूजा वगैरे धार्मिक कृत्य केले की लगेच यांचा विरोध असतो.
आता मला सांगा, ज्ञानाच्या या शाखेत, ‘मला सर्व सत्य समजलं आहे, सर्व ज्ञान झालं आहे,’ असं म्हणणारी उद्दाम; का ‘मला सर्व समजलेलं नाही’ असं म्हणणारी? अर्थातच अज्ञानाची शक्यता मान्य असणारी विनम्र आहे हे उघड आहे. मग सृष्टीच्या रीतीपासून ते समाजाच्या नीतीपर्यंत अंतिम सत्य गवसल्याचा दावा करणारे उर्मट? का हा दावा धाडसाचा आहे असं म्हणणारे?कोणते आस्तिक मला सर्व समजले आहे असा दावा करतात?
नास्तिकांना नीतिमूल्यांची चाड नसते असाही एक गोड गैरसमज आहे. नास्तिकता दुराचार शिकवत नाही. नास्तिकता हाच दुराचार अशी बहुतेक धर्मात मांडणी असते ती गोष्ट वेगळी. तशी ती परधर्म हा दुराचार अशीही असते. पण नास्तिकांची नीतिमूल्ये सद्सद्विवेकातून आणि कायद्यातून येतात.अत्यंत हास्यास्पद दावे. चतुर्थी किंवा अश्याच एखाद्या दिवशी मुद्दाम गोमांस चेपणारे, मद्यप्राशन करणारे नास्तिक आहेत. नास्तिकता हा दुराचार अशी मांडणी हिंदू धर्मात तरी नाही.
धर्म आणि धर्मग्रंथ आपल्याला असल्या भाकडकथांवर आंधळा विश्वास ठेवायला शिकवतात.स्वतः अनुभव घ्या असे हिंदूधर्म सांगतो.
खरं तर आपला देव वगळता जगातल्या इतर देवांवर आपली श्रद्धा नसतेच. म्हणजे अल्लाच्या बाबतीत हिंदू माणूस नास्तिक असतो आणि इन्का लोकांच्या देवाचा भारतातल्या सिरियन ख्रिश्चनांस पत्ता नसतो. इन्कांच्या देवाला तरी यांचा पत्ता आहे का ते त्यालाच ठाऊक! ‘इतर सर्व देवांवर आपण का बरं विश्वास ठेवत नाही?’आपल्या धर्माची तत्वे व या इतर धर्मांची तत्वे परस्परविरोधी असल्यावर इतर धर्मांवर कशी श्रद्धा ठेवणार?
तेव्हा असला कोणी नास्तिक तर बिघडलं कुठं? बरी असतात ही मंडळी!तेव्हा असला कोणी आस्तिक तर बिघडलं कुठं? ही मंडळी सुद्धा बरी असतात!
@श्रीगुरुजी, १००% सहमती
उभयपक्षांनी आपापली क्षेत्रं राखावीत असं ठरलं तरी प्रत्यक्षात धर्मशास्त्र आपली मर्यादा सोडून सतत सृष्टीची रीती (पाप वाढल्याने कोविड आला), नीती (गरोदरपणी ग्रहण पाळावे) वगैरेबाबत चोंबडेपणा करत असते
श्रीगुरूजी बरोबर सहमत आहे. लेखक व लेख दोन्ही एकांगी वाटतात
डाॅ सुबोध खरे यांच्या मतांशी सहमत आहे. नास्तिक काय किवां अस्तीक दोघेही आपापली मते मांडताना हिन्दु धरूमा व्यतिरिक्त इतर धर्मा बद्दल बोलतच नाहीत अथवा संभाळून बोलतात.
दोन्ही विचारधारा आपापला पंथ वाढवण्यासाठी प्रयत्नशील ,त्यामुळेच राजकीय पक्षां प्रमाणेच यांना जनाधार. काही कट्टर तर काही दलबदलू. काही मध्यमार्गीय.
गर्भवतीने ग्रहण पाळावे असे धर्मशास्त्र सांगते?
ग्रहण सगळ्यांनीच पाळावे, सगळ्यांनी 6 तास पाळावे, गर्भवतीने 3 तास पाळण्याची मुभा आहे असे माझे अल्प ज्ञान सांगते.
हिंदू धर्मशास्त्राने सगळ्या शरीर कष्टाच्या उपासनेमधून बाल, वृद्ध, गर्भार आणि आजारी लोकांना सवलत दिलेली आहे.
लोकांच्या अज्ञानातून एखादी घटना घडते आणि मीडियाच्या गोंधळात आपण सरसकट धर्माला नाव ठेवून मोकळे होतो
'भाव तेथे देव' असे म्हणतात. नास्तिक्य हा अभावाला पकडून ठेवण्याचा निर्णय असतो. पिंडे पिंडे मतिर्भिन्नः. असो.
आपल्या धर्माची तत्वे व या इतर धर्मांची तत्वे परस्परविरोधी असल्यावर इतर धर्मांवर कशी श्रद्धा ठेवणार?
तेव्हा असला कोणी नास्तिक तर बिघडलं कुठं? बरी असतात ही मंडळी!
तेव्हा असला कोणी आस्तिक तर बिघडलं कुठं? ही मंडळी सुद्धा बरी असतात!
१००%
प्रसन्न जोशी, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी ही नावे पाहूनच ह्या परिषदेचा अजेंडा काय असेल ह्याची पुरेशी कल्पना येते.
हेच म्हणतो.
अलका धुपकर, यनावाला, अजित अभ्यंकर हे सुद्धा आहेत. या परीषदेस राष्ट्रीय नास्तिक परीषद याऐवजी "राष्ट्रीय निधर्मांध परीषद" असे नाव चपखल ठरेल.
यनावाला यांबद्दल आदर आहे, कुणी वंदा अथवा निंदा, आपली नास्तिकमते ते ठामपणे मांडत असतात, बाकी उल्लेखित लोक मात्र जाम दांभिक आहेत.
यना वालावलकर आपलंही पहिलं प्रेम. सनातनी आणि पारंपरिक डोळ्यावर झापड़ लावलेल्या बुजगावण्यांचे प्रबोधन करण्याचे काम त्यांनी कायम केले. अर्थात या क्षेत्रातील सर्वच मंडळीबद्दल मला कायम आदर आहे.
-दिलीप बिरुटे
+१
+ १००
नास्तिक आणि लिब्रान्डु किंवा निधर्मांध यात मूलभूत फरक आहे.
नास्तिक असण्याबद्दल आक्षेप नाही.
पण आम्हीच सर्वात जास्त विज्ञानवादी किंवा सुधारणावादी असा दंभ घेऊन हि मंडळी वावरत असतात.
याशिवाय सर्वात भेकड आणि दांभिक अशी हि जमात आहे.
हिंदू बौद्ध जैन अशा चालीरीतींवर टीका करताना हे सर्वात पुढे असतात पण
मुसलमानाना काही बोलायचे तर यांची बोबडी वळते.
सुबोध खरे .... १००% अगदी अगदी ... हेच हेच बरेच माझ्यसारखे जवळ जवळ धर्मान्ध्ते पासुन दूर असणारे हिंदू म्हणत आहेत ... पण सरसकट असा काही बोलले कि संघोटे आणि मनुवादी असे बिरुद चिकटवले जाते
अगदी हेच लिहायला आलो होतो.
टंकनश्रम वाचले.
फक्त मतं उराशी बाळगून चालत नाही. आस्तिकांच्या मोठ्या सैन्याला एकट्याने भिडायचं असतं. या परिषदेच्या वक्त्यांनी त्यांच्या जीवनातील स्वतःवरचे प्रसंग सांगावेत. फक्त मतं नकोत. यावर चर्चा पुण्यातल्या चौका चौकांत होत असतील. सात फुलांवर होतात का माहिती नाही.
राष्ट्रीय नास्तिक परिषद ह्याचे उर्दू मध्ये भाषांतर करुन त्याची प्रसिध्दी केले तर काय होईल?
धाग्यावरील प्रतिसाद वाचल्यावर 'नास्तिक परिषद' योग्य मार्गावर चालली आहे, असे वाटले. परिषदेला अजुन फार काम करावे लागेल असे दिसते. आधुनिक विचार, विज्ञाननिष्ठा, बाळगणे आणि तो विचार नव्या पिढीला देणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते.
बाकी, २०१४ नंतर तर 'ही' बजबजपूरी फार वाढलेली दिसते, असे माझे व्यक्तिगत निरीक्षण आहे.
-दिलीप बिरुटे
या परीषदेत सहभागी होणाऱ्यांची नामावळी पाहिल्यानंतर या परीषदेचा खरा दुष्हेतू काय हे लक्षात आले होते. या परीषदेच्या समर्थकांचे प्रतिसाद वाचल्यानंतर याची खातरीच जाहली. फक्त एकच मुद्दा पटला नाही. या तथाकथित नास्तिक भोंदूंची बजबजपुरी २०१४ पूर्वी सुद्धा अशीच होती. लोकमत बदलण्यासाठी या परीषदेला खूपच परीश्रम करावे लागणार आहेत कारण जनता या भोंदूंना पूर्ण ओळखून आहे.
विरोधक परिषदेत जाऊन विरोध करणार की. इथेच पाट्या टाकण्यात धन्यता मानणार हे लौकरच कळेल
समर्थक, परीषदेत जाऊन समर्थक करणार का इथेच पाट्या टाकण्यात धन्यता मानणार, हे लौकरच कळेल.
नास्तिक समर्थकांचाच मेळावा आहे हो..
त्यापैकी कोणी इथे का पाट्या टाकेल ? त्यांचा व्यासपीठ आहे की त्यांना
येथेसुद्धा नास्तिक समर्थक आहेत की आणि ते येथे पाट्या टाकताहेत की. आपल्या व्यासपीठावर जाऊन बरळण्याऐवजी येथे ते का पाट्या टाकत आहेत?
भिन्न / विरोधी मतांच्या आदरासहित माझं निरीक्षणाधारित मत -
१.
भारतीय धर्म (सनातनी हिंदू, शीख, बौद्ध, जैन, लिंगायत इ) धारण करणारे आस्तिक हे त्यांचं आस्तिक्य इतरांवर लादण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते त्यांच्या आस्तिक्यचे नास्तिकांपुढे प्रदर्शन करत नाहीत. नास्तिकांना ते आस्तिक बनवण्याचा प्रयत्न करत नाहीत. नास्तिकांना आंधळे, गतानुगतिक, अंधश्रद्ध, बुजगावणे, डोळ्यांवर झापड लावलेले, बजबजपुरीवासी अशी किंवा अश्या प्रकारची इतर नकारार्थी विशेषणे लावत नाहीत. त्यांना "सुधारण्याचा" प्रयत्न करत नाहीत. सदर आस्तिकांचे आस्तिक्य हे व्यक्तिगत असते. त्यांच्या चर्चांमध्ये त्यांचे पूज्य स्थान हा विषय असतो. आणि तो कुणावर लादण्याचा प्रयत्न होत नाही.
खरंतर, त्यांच्यालेखी नास्तिक्य हे, नास्तिकांवर चर्चा करावी, इतके दखलपात्र नसते. भिन्न / विरोधी मतांच्या आदरासहित सदर आस्तिक्य हे अंगिकारलेले असते.
आस्तिक परिषद असे काही कुणी कुठे ऐकलेले / पाहिलेले आहे का?
---
२.
भारतीय नास्तिक्य हे आस्तिक्याच्या आधारावर अस्तित्वात असते. त्यांच्या चर्चांमध्ये इतरांचे आस्तिक्य हाच विषय असतो. आणि स्वतःचे नास्तिक्य इतरांवर लादण्याचा प्रयत्न होत असतो. आस्तिकांची मानहानी करणे, त्यांना न्यूनगंड देणे, त्यांच्या श्रद्धास्थानांची अवमानकारक हेटाळणी करणे हीच त्यांची साध्य आणि साधने असतात.
---
मागच्या आठ-नऊ वर्षांत वरील क्र २ च्या परिस्थिती काही सकारात्मक फरक पडेल असे वाटले होते. भारतीय धर्मीय आस्तिकांना सन्मानाने शिल्लक राहता येईल अशी परिस्थिती निर्माण होईल असे वाटले होते. पण तसे काही झालेले अजून तरी आढळून आलेले नाही.
पूर्ण सहयत!
या परीषदेसाठी राष्ट्रीय दांभिक परीषद, राष्ट्रीय भोंदू परीषद, राष्ट्रीय ढोंगी परीषद यापैकी एक नाव सुयोग्य ठरेल.
नास्तिकांना ते आस्तिक बनवण्याचा प्रयत्न करत नाहीत.
कार्यकारणभाव समजावून देऊ शकत नसल्याने ते असल्या फंदात पडत नाही, सरळ मॉर्निंग वॉकला विषय संपवून टाकतात. घरात एक व्यक्ती जरी आस्तिक असेल तर श्रावणात घरातील इतर नास्तिक व्यक्तींना घरात मांसाहार करू देत नाही.
हो, पण श्रावणात हॉटेल मधून मांस गायब करत नाहीत.
अरब देशातल्या रमजान सारखे.. तिथे म्हणे रमजान मध्ये दुपारी जेवणच मिळत नाही हॉटेलात.
हो, पण श्रावणात हॉटेल मधून मांस गायब करत नाहीत
एखादे वाक्य उचलून काहीही पर्याय सुचवणे सोडा, बाकीच्या प्रतिसादांचा संदर्भ समजून घेण्याची तसदी घ्या.
तुमचा प्रतिसाद दोन वाक्यांचा.
त्यातलं एक उचललं तर 'एखादं' होत का?
काहीही
कार्यकारणभाव समजावून देऊ शकत नसल्याने ते असल्या फंदात पडत नाही, सरळ मॉर्निंग वॉकला विषय संपवून टाकतात.हो का?
मग राष्ट्रीय नास्तिक परीषद, देवाला रिटायर करा या शीर्षकाचे अनेक परिसंवाद, यनावालांनी मिपावर पाडलेले डझनभर लेख व नंतर त्या लेखांचे पुस्तक, लोकसत्तात वाचकांच्या पत्रात लिहिलेली पत्र . . . विषय संपविण्यासाठी होते का? हे प्रकार मॉर्निंग वॉकलाच करायचे का?
तुम्ही नका लोड घेऊ.
निरूत्तर करणारा प्रतिसाद मिळाला की अशी निरर्थक वाक्ये सुचतात. बरोबर ना?
निरर्थक प्रतिसादांना निरुत्तर करण्यासाठी हीच वाक्ये योग्य आहेत.
निरर्थक ! ! ! तुमचा नॉटी संजय राऊत झालाय. ख्या ख्या ख्या . . .
मविआचा फुसका महामोर्चा प्रत्यक्षात अतिप्रचंड होता अशी पुडी सोडण्यासाठी नॉटीने महामोर्चाच्या नावाने ६ वर्षांपूर्वीच्या मराठा मोर्चाचे फोटो टाकले आणि ही थाप उघडकीला आल्यानंतरही नॉटी नाक वर करून थापेबाजीचे समर्थन करीत होता.
नास्तिकांची महती वर्णन करताना, ते आस्तिकांना जास्त समजविण्याच्या भानगडीत न पडता लगेच विषय संपवून टाकतात ही लोणकढी थाप मी लगेच ३-४ उदाहरणे देऊन उघडकीस पाडली. तरीसुद्धा या प्रतिसादाला निरर्थक प्रतिसाद म्हणणे हे, पडलो तरी नाक वर या नॉटी प्रवृत्तीचे अवलक्षण आहे.
असो. हलकेच घ्या आणि विनाकारण लोड घेऊ नका, कारण नास्तिक कधीही सुधारणार नाहीत.
नास्तिकांची महती वर्णन करताना, ते आस्तिकांना जास्त समजविण्याच्या भानगडीत न पडता लगेच विषय संपवून टाकतात ही लोणकढी थाप मी लगेच ३-४ उदाहरणे देऊन उघडकीस पाडली.
हे राम! म्हणूनच मी निरर्थक प्रतिसाद म्हटले होते. मी ठळक केलेल्या वाक्याचा संदर्भ तुम्हाला कळालच नाही. ज्याला कळला तो गप्प बसून आहे ,तुम्ही उगाच चोंबडेपणा करून स्वतःचे हसू करून घेतले, असो. नका लोड घेऊ.
बापरे, तोंडावर आपटून व हसू होऊनही अजूनही नॉटीपणा सुरूच आहे. आता मूळ नॉटी सुद्धा लाजेल. चालायचंच. नॉटीपणा असला की तोंडावर आपटूनही जितं मया असा जयघोष करावाच लागतो. नॉटी असल्याचे हे व्यवच्छेदक लक्षण आहे. चालू दे.
या सभेत कोण काय बोलले? किती सदस्य जमले होते?
पुढील काळात अस्तिकांना कसे नास्तिक करायला हवे? नास्तिकांचे अस्तित्व टिकवण्यासाठी उपाय योजना काय करावी?
लेख, मासिके, चर्चा, पुरस्कार परती, या शिवाय इतर जालिम उपाय करायला सामाजिक माध्यमातून भोळसट, मती भ्रम होऊ शकणारे शोधून त्यांना आपल्या बाजूला वळवाचे प्रयत्न कसे करता येतील? यावर चर्चा सत्रे करायला पैशाची तजवीज कशी करायची? नव्या विदेशी एनजीओ कडून अर्थिक मदतीवर बंदी घालण्यात आली तर त्याला कोर्टातून कसा लढा द्यायला हवा? वगैरे विचार मांडले होते का? ते समजून घ्यायला आवडेल.
नास्तिक परिषदेविषयी आपली उत्सुकता पाहून आपलं समाधान करण्याचा प्रयत्न करतो. आपण जे काही प्रश्न विचारले त्यावर चर्च झाली की नाही ते माहिती नाही पण आपले प्रश्न बिंदुगामी नक्की आहेत, यात काही वाद नाही. त्यावर सविस्तर कधीतरी एक विवेकवादी म्हणून कधीतरी त्यावर बोलता येईल. सध्या नास्तिक परिषद वृत्तांत.
संविधानाने कोणताच देव किंवा धर्म स्वीकारला नाही. संविधानात भारतीयत्वाच्या सांस्कृतिक सौंदर्याच्या खुणा आहेत. श्रद्धा जोपासण्याचे स्वातंत्र्य जसे व्यक्तिगत हक्कांचा भाग आहे, तसेच स्वतःला अमान्य असणाऱ्या श्रद्धा नाकारण्याचे स्वातंत्र्यही मान्य झाले पाहिजे. नास्तिक ईश्वरावर, धर्मावर सतत टीका करत असले तरी धर्मचिकित्सा मात्र तितके गंभीरपणे करतांना दिसत नाही. बहुतेक धर्मांधांचा धार्मिक अभिनिवेश हा त्यांना त्यांच्या धर्माच्या असलेल्या अज्ञानातून येतो. गंभीर धर्मचिकित्सा केल्यास धर्मातील परस्पर विसंगती पुढे आणता येतात. नास्तिक स्वतः धर्मापासून मुक्त होऊ शकत असले, तरी आजूबाजूच्या समाजासाठी ते नेहमीच शक्य नसते. अशावेळी गांधी, विनोबा यांचा मार्ग किंवा वारकरी परंपरा हेदेखील सुधारणावादी प्रवाहच आहेत हे लक्षात घेऊन काम करणे आवश्यक आहे- डॉ.विश्वंभर चौधरी.
कट्टरवादी हिंदूंनी, कट्टर मुस्लिमांनी व इतर कट्टर धर्मियांनी धर्मपालनाला कर्मकांडाशी जोडले आणि कर्मकांडांच्या दिखाऊपणाला राजकारणाशी जोडून धर्मतिरेक वाढवला. देव-धर्म कलुषित करून निर्बुध्दता जोपासली. विचार केला, तर जीवनात शुद्धता आणणे अजूनही शक्य आहे. साधनेचे सात्विकिकरण करण्यातून सुबुद्धता येईल आणि तेव्हाच इतरांच्या मतांचा आदर करण्याची परंपरा तयार होईल. वैज्ञानिक दृष्टिकोन जरी मूलभूत कर्तव्यांचा भाग आहे तरी वागणुकीच्या पातळीवर आणल्याशिवाय वैज्ञानिक दृष्टिकोन भारतीय समाजाच्या कायदेशीर जबाबदारीचा भाग होणार नाही. धार्मिक भावना दुखावल्या या कारणाखाली दाखल होणारे अनेक गुन्हे खोटे असतात व पोलिसांनाच न्यायाधीश होऊ देणारी प्रक्रिया बंद झाली पाहिजे. संविधानातील कलम २५(१)नुसार देव मानण्याचा हक्क आहे तसेच देव ही संकल्पना न मानता जगण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मत स्वातंत्र्याला नाकारणारी नैतिक राखणदारी भारताला मागासलेल्या विचारांचा देश ठेवेल,” असं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलं.
अलका धुपकर यांनी लोकशाहीला आणि विवेकाला धर्मांध संघटनांचा कसा विरोध आहे याबद्दल मत मांडले. पत्रकार प्रसन्न जोशी यानी नास्तिकांनी इतर समाजघटकांशी संवाद वाढवण्याबद्दल मार्दर्शन केले.
पहिल्या सत्राचे अध्यक्षीय भाषण काठमांडूहून आलेले ‘ह्यूमनिस्ट्स् इंटरनॅशनल’चे उत्तम निरौला यांनी केले. विचारवंत आणि विवेकवादी लोकांना होणाऱ्या त्रासाविरोधात जागतिक पातळीवर आवाज उठवला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. दुसऱ्या सत्रात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आणि उपस्थित श्रोते यांच्यात चर्चा आणि प्रश्नोत्तरे झाली. प्रामुख्याने शास्त्रज्ञ अनिकेत सुळे यांनी सोप्या भाषेत वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितला.
ब्राईट्स संघटना काय आहे? वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजाचे शैक्षणिक प्रबोधन करणे, बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकांमध्ये साहचर्य, सुसंवाद निर्माण करणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे इत्यादी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ब्राइटस् सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. ( वृत्तसौजन्य लोकसत्ता)
-दिलीप बिरुटे
भारतीय घटनेतील कलम २५(१) मूलभूत तत्व काय आहे पहा
त्यांना सरोदे महाशयांनी काय वळण दिलंय ते पहा.
संविधानातील कलम २५(१)नुसार देव मानण्याचा हक्क आहे तसेच देव ही संकल्पना न मानता जगण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मत स्वातंत्र्याला नाकारणारी नैतिक राखणदारी भारताला मागासलेल्या विचारांचा देश ठेवेल
Article 25 Constitution of India -
(1) Subject to public order, morality and health and to the other provisions of this Part, all persons are equally entitled to freedom of conscience and the right freely to profess, practise and propagate religion.
(2) Nothing in this article shall affect the operation of any existing law or prevent the State from making any law—
(a) regulating or restricting any economic, financial, political or other secular activity which may be associated with religious practice;
(b) providing for social welfare and reform or the throwing open of Hindu religious institutions of a public character to all classes and sections of Hindus.
Explanation I.—The wearing and carrying of kirpans shall be deemed to be included in the profession of the Sikh religion.
Explanation II.—In sub-clause (b) of clause (2), the reference to Hindus shall be construed as including a reference to persons professing the Sikh, Jaina or Buddhist religion, and the reference to Hindu religious institutions shall be construed accordingly.
येथे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे स्वा . सावरकरांचे अजरामर वाक्य नेहमी आठवते.
देवी सरस्वतीचे नग्न चित्र काढण्याबद्दल दातखीळ बसून गप्प असणारे निधर्मांध मात्र प्रेषित महंमदाच्या चित्र काढणाऱ्या चार्ल्स हेब्दोवर टीका करताना किंवा
याच घटनेतील "४४ वे तत्व" सरकारने समान नागरी कायदा आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे "The State shall endeavour to secure for citizens a uniform civil code throughout the territory of India.हे मात्र विसरतात.
आपण दुटप्पी आहोत हे सोयीस्कररीत्या विसरतात.
या बद्दल दोन वेगळे मुद्दे डोक्यात येतात
१) अंधश्रद्धा निर्मूलन ( सर्व देश आणि धर्म यातील )
२) नास्तिकतेचा हट्ट
यातील १) ला माझा तर कट्टर पाठिंबा आहे
पण २) बद्दल मात्र शंका आहे .. कारण त्यामागे काहीतरी अजेंडा असल्यासारखं वाटतो .. आणि अर्थातच सध्याच्या भारतात अश्या विचारमंथनावाचा दुरुपयोग केलं जाणार हे उघड आहे
टोकाची विधाने टोकाचा विरोध आणि पाठिंबा .....
अशा परिषदांमध्ये जे नास्तिक नाहीत त्यांना बोलाया बोलवतात का?
नसतील तर मग सगळेच एकतर्फी दिसतंय
असो ..
ज्या दिवशी अनिस सारखी संनस्था ज्या ताकदीने हिंदू धर्मातील वाईट प्रथांना "एक्सपोस" करेल त्याच ताकदीने इतर धर्मातील वाईट प्रथांना "एक्सपोस" करेल तेव्हाच ते खरे कार्य करणारे असे मी तरी मानतो. तो पर्यंत फक्त एका धर्मावर निशाणा साधणारे एकांगी असेच वाटत राहणार
ताकदीने हे अधोरेखित करू इच्छितो ....
आवडो ना आवडो भारतापासून ते कॅथॉलिक पगडा असलेले आयर्लंड/ मेक्सिको किंवा फिलिपीं , ते गन आणि गॉड वळला अमेरिका येथे धार्मिकतेचा पगडा आहे हे "कट्टर नास्तिकानी " समजवून घेतलं पाहिजे
त्याचा बरोबर आस्तिकांनी अप्पपल्या धर्मातील अन्धश्रद्धा आणि त्यातून होणारी पिळवणूक यावर स्वतःचा कार्य केले तर अनिस ची गरजच राहणार नाही
हे बरय राव, म्हणजे धागारुपी काडी घालुन इथे झुंजी तुम्हि लावायच्या अन वरतुन झुंजणार्या कोंबड्यांनाच विचारायचे त्या परीषदे बद्द्लचे अपडेट्स.
इधर ऐसाईच कोइ होने का बाबा आदम के जमाने में अबी नाम नयी याद आरे ला हय लेकिन वो बी ऐसाइच काडी वाला धागा डाल के भाग जात था.
काय ते जुने मिपा
काय त्या जुन्या आठवणि
कोणीतरी नास्तिक माणसाने किंवा अंधश्रद्धा निर्मुलनवाल्यांनी त्यांच्या नाडीपट्टीवर पाय दिला असावा. कोणीतरी परस्पर हिशेब चुकते करावे म्हणून त्यांनी नाडी सोडली, सॉरी काडी टाकली असावी असे वाटते.
-दिलीप बिरुटे
मनुवादी आणि भाजप विरोधी परिषद हे नाव दिले असते तरी चालले असते. चुकीचे नाव देऊन खर्या नास्तिकांचा अपमान करणे उचित नाही. (अर्थात चार्वाक आणि माल्या यांच्या मार्गावर चालणारे)
https://brightssociety.org/
झाकीर नाईकच्या एका युटुब विडिओ मध्ये एका नास्तिकाने झाकीर नायकाला नेहेमीसारखे काहीतरी बाळबोध प्रशन विचारला होता. झा.ना ने त्याला विचारले कि तू कुठल्या धर्माचा वगैरे आहे. प्रश्नकर्त्याने ऐटीत उत्तर दिले कि मी नास्तिक आहे. पुढे झा.ना ने चतुर उत्तर दिले.
म्हणजे तुम्ही अर्धे मुस्लीम अगोदरच आहात आता पूर्ण मुस्लीम व्हा.
कसे?
मुस्लीम प्रार्थनेच्या पूर्वार्धानुसार.. जगात कुठलाही देव नाही...
हा भाग तुम्हाला लागु होतो
उत्तरार्धानुसार... त्या एका अल्लाशिवाय...
हा भाग आत्मसात केला कि झालाकी मुस्लीम.
ह्या परिषदे मागचा अजेंडा सुध्दा असाच काहीसा वाटतो. ह्या परिषदेचे हिंदुधर्माव्यतिरिक्त असे किती सदस्य असावेत.
कारण विठ्ठलाला काळतोंड्या म्हणणार्याला सुध्दा हिंदु समाजाने वाळीत टाकल्याचे ऐकिवात नाही.
जग्गी वासुदेवांच्या म्हणण्यानुसार एका हिंदु घरात वेगवेगळ्या देवांना पूजणारे व नास्तिक असणारे सदस्य असतात व ते नेहेमीसारखेच राहतात.
माझे अनेक अहिंदू मित्र घरातील अन्य सदस्य आस्तिक असूनही नास्तिक आहेत आणि त्यातील काही अनिसचे कार्यकर्ते आहेत. ह्यातील बरेच अविवाहित आहेत, कारण ..... माहीतच असेल इथल्या अस्तिकांना.
हिंदु धर्माने नास्तिकतेला दर्शनाचा दर्जा देउन केव्हाच धर्माचा भाग बनवून पचवून टाकले आहे
परफेक्ट.
झाकीर नाईक चे गंडलेले लॉजिक तुम्ही कशाला मान्य करत आहात खरे ?
स्वामी गटाने काढला आहे. पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यास आव्हान दिलंय.
*****
(मोठ्यांचं प्रथम सोडवा. मुलांचं नंतर पाहू.)
बुद्धिजीवी लोकांत अस्तिक - नास्तिक शब्द योजना करून आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हा वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असावा.
नास्तिक शब्द आजकाल एक्स मुस्लिम चळवळीत फार वापरला जातो. मोमिन लोक सचवाला, समीर, ॲडम, मुन्नाभाईच्या युट्यूबवरील तासंतास चालणाऱ्या झकाझकीत धार्मिकतेचा पगडा किती पक्का आहे हे इतर हजारो ऐकणार्यांना सुनावतात.
आमच्या समाजात हे निधर्मी म्हणवणारे एक्स मुस्लिम धर्म आतून पोखरून नष्ट करू पहात आहेत...ही विदाकर सत्यता त्यांना भेडसावत आहे.
बुद्धिजीवी लोकांत अस्तिक - नास्तिक शब्द योजना करून आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हा वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असावा.
नास्तिक शब्द आजकाल एक्स मुस्लिम चळवळीत फार वापरला जातो. मोमिन लोक सचवाला, समीर, ॲडम, मुन्नाभाईच्या युट्यूबवरील तासंतास चालणाऱ्या झकाझकीत धार्मिकतेचा पगडा किती पक्का आहे हे इतर हजारो ऐकणार्यांना सुनावतात.
आमच्या समाजात हे निधर्मी म्हणवणारे एक्स मुस्लिम धर्म आतून पोखरून नष्ट करू पहात आहेत...ही विदाकर सत्यता त्यांना भेडसावत आहे.
नास्तिक चळवळीचं काम वाढलं पाहिजे, चळवळ चांगली आहे. पुढील वर्षी जर औरंगाबादला ही परिषद झाली तर सहभागी होईनच. आपल्यामुळेच या परिषदेची माहिती झाली मनापासून आभार.
-दिलीप बिरुटे
म्हणजेच आस्तिक वाद.
यांतून तीन संकल्पना निर्माण होतात.
१) आस्तिकवाद
२) आस्तिकवादास विरोध
३) "देव आहे!"? "बरं मग?"
नास्तिकवादी लोक क्रमांक (२) किंवा (३) असू शकतात.
**
मेंदूचा एवढा गैरवाजवी तल्लखपणा नसलेले प्राणी यातून मुक्त आहेत.
आस्तिकवाद्यांना विरोध नसावा पण जे अवडंबर आहे, ते त्याबाबत जागृती करीत असावे, विरोध करीत असावेत. अर्थात, कायद्यात जे बसते त्यांच्या सहमतीने. नवी दृष्टी, आधुनिक विचार आणि विज्ञान हाच धर्म याकडे नास्तिकवाद्यांचा फोकस असावा. 'देवाळु' लोकांना वाटतं की आमच्या विरोधातली ही मोहीम आहे आणि मग वैचारिक कुस्त्या सुरु होतात. नास्तिकवाद्यांच्या दृष्टीने देव नावाची काही गोष्टच नाही आणि असेल तर तो कल्पनेचा गोळा आहे, असे ते समजत असावेत. उदा. सात आंधळ्यांना हत्ती जाणवला तसा, ते वगळुन जगाकडे ते पाहत असावेत. त्यामुळे आपण म्हणता त्या प्रमाणे क्रमांक दोन आणि तीनचा संबंध नसावा, असे वाटते. उलट मेंदूचा वापर तल्लखपणे करणे नव्हे तर, योग्य पद्धतीने तिचा उपयोग करणारे यात असावेत असे वाटते, हा माझा केवळ अंदाज. नास्तिक परिषदेविषयीची चर्चा करुन वाचून उत्सुकता आणि ओढ वाढत चालली आहे.
-दिलीप बिरुटे
मन वढाळ वढाळ त्याचा थांग लागेना....
माझ्या मते नास्तिक वा आस्तिक असणे, किंवा यापैकी काहीही नसणे ही एक नितांत वैयक्तिक बाब आहे. आपल्या मताविरुद्ध वागणार्या लोकांची निंदा करणे वा त्यांना आपल्या कळपात ओढण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी परिषदा वा धार्मिक कार्यक्रम वगैरे आयोजित करणे हा एक आक्रामकपणा/धंदेवाईकपणा/दुकानदारी म्हटली पाहिजे. एका अर्थी जबरदस्ती धर्मांतरण करणे आणि असल्या परिषदा वगैरेत फारसा फरक नसावा.
मी स्वतः (आणि आम्ही सर्व भावंडेच काय, पण १८९६ साली जन्मलेले आमचे वडील आणि त्यांचे वडील सुद्धा) 'नास्तिक' (खरेतर या सर्व प्रकाराबद्दल एकूणातच उदासीन) असून देवपूजा, धार्मिक वा अशा परिषदा वगैरे कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमात उत्सुक नव्हतो, तसेच माझी बायको बरीच वर्षे श्रद्धाळू असूनही मला त्यात कधी वावगे वाटलेले नाही. तिला सोबत म्हणून मंदिरात मी जायचो, पण स्वतः आत न जाता बाहेर गाडीत बसून रहायचो. आताशा तिला पण ते निरर्थक वाटू लागलेले आहे.
... अर्थात अध्यात्मिक साधना, योग, ज्योतिषविद्या वगैरे अगदी वेगळ्या गोष्टी असून कोणत्याही धार्मिक श्रद्धेचा त्यांचेशी काही संबंध नाही. या आणि अशा काही गोष्टींमधेच काय, पण गीता, बायबल, कुराण, वेद-पुराणे वगैरेंमधे तथाकथित 'नास्तिक' व्यक्तींची रूचि आणि अभ्यास असू शकतो.
मला सुध्दा असेच वाटते. पण, नास्तिक - आस्तिक चर्चा करणे हा चांगला टाईमपास असतो हे सुध्दा नोंदले जावे.
आणि आणखी एक गोष्ट पटली नाही ती म्हणजे धंदेवाईक पणाची. नास्तिक परिषद धंदेवाईक आहे असे तर नाही वाटले. अगदी थोर्थोर नास्तिक dawkins म्हणला तरी काही विकतो असे वाटत नाही. त्यामुळे आस्तिक व नास्तिक दोघांचे उद्दिष्ट हे काही दुकानदारी नाही वाटत. जबरदस्ती धर्मांतरण वैगरे तर आजिबात नाही. तेव्हढे एक काहीही वाटले.
धंदेवाईकपणा, दुकानदारी म्हणजे आपल्या 'माला' चा प्रचार-प्रसार. त्यात पैशांची देवाणघेवाण वा मिळकत असलीच पाहिजे असे नाही. "कंपनी प्रचार के लिये ये २०० रुपये की चीज आप को फ्री मे दी जा रही है" ही जशी दुकानदारीच असते तसे काहीसे. 'धर्मांतरण' म्हणजे 'आपला' कंपू वाढवून मोठा करणे. त्या अर्थी 'विशाल भागवती जागरण' किंवा 'राष्ट्रीय नास्तिक परिषद' हे सारखेच, असा आशय आहे.
माझ्या बाबतीत नाडी ग्रंथांबद्दल असेच काही घडले.
>>>>माझ्या बाबतीत नाडी ग्रंथांबद्दल असेच काही घडले
आत्ताशी कुठे 'काथ्याकूट' मुख्य वळणावर उभा राहून गालातल्या गालात हसत आहे, असे वाटले. मस्त हं !
-दिलीप बिरुटे
अगदी खरे. एकदाची नाडी सुटली की हायसे वाटते.
मी नास्तिक आहे , मात्र मी काही या परिषदेला उपस्थित नव्हतो. पण परिषदेबद्दल थोडं नंतर आधी इथल्या काही रंजक प्रतिक्रियांची मला दखल घ्याविशी वाटते
१)
या परिषदेच्या निमित्ताने "असला कुणी नास्तिक तर बिघडलं कुठं" हा लेख लोकसत्तामध्ये प्रकाशित झाला , ज्याचा दुवा पहिल्या प्रतिक्रियेत डॉ बिरुटे सरांनी दिला आहे. मग या लेखातील मुद्द्यांवर प्रतिक्रिया आल्यात
जसे
"नास्तिक बिचारे मवाळ आणि पापभीरू असतात. त्यांनी कुणाला पाव देऊन, शाळा-दवाखान्याच्या व्यूहात भुलवून बाटवलेले नाही. "
या वाक्यावर आलेली ही प्रतिक्रिया :”हास्यास्पद दावा. चीन, कोरिया, बल्गेरिया, रूमेनिया अश्या साम्यवादी देशातील नास्तिक सत्ताधाऱ्यांनी किती कोटी माणसे मारली याची मोजदादच नाही”
माझा प्रतिसादः पण सदर लेखात एक वाक्य आहे "पोलपॉट, स्टॅलिन वगैरे नास्तिकांनी अत्याचार केले, पण त्यामागे नास्तिकत्वाचा प्रचार हे कारण नव्हते" , या वाक्याकडे दुर्लक्ष केलेले दिसते.
२)
लेखातील वाक्य : अर्थातच अज्ञानाची शक्यता मान्य असणारी विनम्र आहे हे उघड आहे. मग सृष्टीच्या रीतीपासून ते समाजाच्या नीतीपर्यंत अंतिम सत्य गवसल्याचा दावा करणारे उर्मट? का हा दावा धाडसाचा आहे असं म्हणणारे?
धाग्यावरील प्रतिसाद : कोणते आस्तिक मला सर्व समजले आहे असा दावा करतात?
माझा प्रतिसादः होय. अस्तिक असा दावा करतात , म्हणूनच "ईश्वराने विश्वाची निर्मिती केली वा ईश्वर विश्वाचे नियंत्रण करतो" वगैरे सिद्धांताच्या पुनरावलोकनाची गरज अस्तिकांना वाटत नाही. "ते तसेच आहे" हे त्यांनी मान्य केलेले आहे.
असो. आता पुढे ..
३)
धाग्यावरील प्रतिसाद : प्रसन्न जोशी, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी ही नावे पाहूनच ह्या परिषदेचा अजेंडा काय असेल ह्याची पुरेशी कल्पना येते.
माझा प्रतिसादः नास्तिक वा अस्तिक असणे हा व्यक्तिगत विश्वासाचा प्रश्न आहे. मुळात अस्तिक म्हणजे काय तर - हे विश्व ईश्वराने निर्मिलेले आहे व ईश्वराकडून विश्वाचे नियंत्रण होते वगैरे स्वरुपाच्या विश्वनिर्मितीच्या ढोबळ सिध्दांतावर विश्वास असणारा तो अस्तिक तर या सिद्धांतावर विश्वास नसणारा तो नास्तिक असे इतके साधे आहे. अस्तिक व नास्तिक यांचा राजकीय कल कोणताही असू शकतो. अस्तिक = अमुक एक राजकीय पक्षास वा विचारास पाठिंबा देणारा तर नास्तिक = तमुक राजकीय विचारास वा पक्षास पाठिंबा देणारा असे ते नसावे. त्यामुळे परिषदेला कुणाची उपस्थिती होती त्यावरुन परिषद राजकीय स्वरुपाची आणि विशिष्ट राजकीय उद्दिष्ट असलेली असावी हा निष्कर्ष पटत नाही. मुळात अस्तिकता वा नास्तिकता यांकडे राजकीय परिप्रेक्ष्यातुन बघण्याची गरज नाही. अर्थात परिषदेत जर असा उद्दिष्ट ठेवून जर खरेच काही कार्यक्रम पार पडला असेल तर ते योग्य नाही असेच मी म्हणेन पण केवळ उपस्थितांच्या यादीवरुन ते तसेच झालेले असेल असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरावे.
४)
धाग्यावरील काही प्रतिसादांत नास्तिकांकरिता निधर्मांध असा काहीसा हेटाळणीजनक उल्लेख करण्यात आलेला आहे.
माझा प्रतिसादः मुळात निधर्मांध असा कोणताही शब्द माझ्या माहितीनुसार मराठी शब्दकोषात नाही. धर्मांध हा शब्द धर्माचा अतिरेकी आग्रह धरणार्याकरिता वापरला जातो. त्यात मुख्यतः धर्माच्या अनुषंगाने येणार्या चालिरीती , लिखित वा अलिखित नीतिनियम यांचे कठोर पालन व इतरांनी त्याचे पालन करण्याचा आग्रह, दुसर्या धर्माबद्दल काहीशी कटूता वा वैरभाव वगैरे गोष्टी अभिप्रेत आहेत. असे व्यक्ती एकत्र येवून दबावगट निर्माण करत इतरांवर धार्मिक चालिरीतींचे पालन करण्याचा दबाव आणू बघतात तेव्हा ते समाजाच्या स्वास्थ्याला आणि प्रगतीला बाधा आणतात म्हणून धर्मांध असा त्यांचा नकारात्मक उल्लेख केला जातो.
निधर्मी व्यक्ती कोणताच धर्म पाळत नाही तेव्हा ते कोणत्या तत्वांच्या पालनाचा आंधळा आग्रह धरणार ? काही नास्तिक / निधर्मी व्यक्ती आपल्या जवळच्या व्यक्तींबाबत धार्मिक बाबींत आडकाठी करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही (उदा: एखाद्या नास्तिक पुरुषाने आपल्या पत्नीसही देवपुजेस मज्जाव करणे ई). अशा असहिष्णू नास्तिक व्यक्तीचा निषेध करण्यास नक्कीच हरकत नाही. पण म्हणून जसे सगळ्याच धार्मिक लोकांना धर्मांध म्हणणे अन्यायकारक ठरेल तसेच सर्व नास्तिक/निधर्मी लोकांची निधर्मांध म्हणून हेटाळणी करणे अयोग्य होईल.
अर्थात इथे "निधर्मांध = धर्मांध नसलेला" असा सकारात्मक अर्थ अभिप्रेत असेल तर मात्र स्वागत आहे :)
५)
आणखी एक प्रतिसाद : भारतीय धर्म (सनातनी हिंदू, शीख, बौद्ध, जैन, लिंगायत इ) धारण करणारे आस्तिक हे त्यांचं आस्तिक्य इतरांवर लादण्याचा प्रयत्न करत नाहीत
माझा प्रतिसादः एकुणच धर्मांबद्दल विशेष रुची नसल्याने कोणत्याही धर्माचा खोलवर अभ्यास केलेला नाही हे कबूल करुन माझ्या अल्पज्ञानानुसार जैन व बौद्ध हे निरिश्वरवादी धर्म आहेत हे मी नमूद करु इच्छितो म्हणजेच त्यांच्या तत्वज्ञानांत अस्तिक्य नाही मग नसलेले आस्तिक्य कुणावर कसे लादणार ? तरी माझ्या समजुतीत काही गैरसमज असल्यास कृपया निदर्शनास आणून द्यावे
६)
त्याच प्रतिसादात पुढे : आस्तिक परिषद असे काही कुणी कुठे ऐकलेले / पाहिलेले आहे का?
माझा प्रतिसादः धार्मिक परिषदा , कुंभमेळ्यासारखे मेळावे, धार्मिक सणानिमित्ताने साजरे झालेले उत्सव, जागरण गोंधळ, वारी ई ई सगळे अस्तिकांचे मेळावेच नाहीत काय ? अगदी "अस्तिक परिषद" असे नेमके नाव नसल्यामुळे बहुधा लक्षात आले नसावे, असो.
७)
या प्रतिसादातील पुढचा मुद्दा : भारतीय नास्तिक्य हे आस्तिक्याच्या आधारावर अस्तित्वात असते.
माझा प्रतिसाद : हा मुद्दा योग्यच म्हणायला हरकत नाही. म्हणजे नास्तिक या शब्दाला अस्तिक या शब्दामुळेच अर्थ प्राप्त होतो असे कुणी म्हणत असेल तर तांत्रिकदृष्ट्या ते योग्यच. म्हणजे असे की आजकाल सगळेजण भ्रमणध्वनी (मोबाईल फोन) वापरतात पण मग भ्रमणध्वनी न वापरणार्यांकरिता एखादी संज्ञा निर्माण झाली तर त्या संज्ञेला खरा अर्थ भ्रमणध्वनी वापरणार्यांमुळे प्राप्त झाला असा युक्तिवाद केल्यास तो तांत्रिकदृष्ट्या योग्यच म्हणता येईल. पण भ्रमणध्वनी अस्तित्वात येण्यापुर्वी सगळेच लोक भ्रमणध्वनी न वापरणारेच होते हे वास्तव कदाचित दुर्लक्षिले जाईल. तद्वतच ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत प्रचलित होण्यापुर्वी सगळे लोक नास्तिकच नव्हते काय ?
८)
आणखी प्रतिसाद : माझ्या मते नास्तिक वा आस्तिक असणे, किंवा यापैकी काहीही नसणे ही एक नितांत वैयक्तिक बाब आहे.
माझा प्रतिसादः पुर्ण सहमत
याच प्रतिसादातील पुढचा मुद्दा: आपल्या मताविरुद्ध वागणार्या लोकांची निंदा करणे वा त्यांना आपल्या कळपात ओढण्याचा प्रयत्न करणे, त्यासाठी परिषदा वा धार्मिक कार्यक्रम वगैरे आयोजित करणे हा एक आक्रामकपणा/धंदेवाईकपणा/दुकानदारी म्हटली पाहिजे. एका अर्थी जबरदस्ती धर्मांतरण करणे आणि असल्या परिषदा वगैरेत फारसा फरक नसावा.
माझा प्रतिसाद : अंशतः सहमत. म्हणजे कळपात ओढणे वा दुकानदारीचा उद्देश्य हा मुद्दा पटतो. पण त्यात गैर असे काहीच नाही. आणि जबरदस्ती धर्मांतरणशी त्याची तुलना गैरलागू व्हावी. निदान जबरदस्ती शब्द तर निश्चितच अयोग्य. तसे म्हंटले तर कोणत्याही विचाराचा प्रचार आणि प्रसार हा करावा लागतोच , तसा केल्याशिवाय तो जनमानसात पसरत नाही की रुजत नाही. मग ती स्वातंत्र्यासाठीची चळवळ असेल, इन्किलाब जिंदाबादचे नारे असतील किंवा शांततापुर्ण केलेला धर्मप्रसार असेल .. त्यात वावगे काही नाही. जर नास्तिक लोक नास्तिकतेचा प्रचार करु पहात असतील तर त्यात त्यांचा कुटील हेतु आहे असे नसते तर नास्तिकतेमुळे जीवन अधिक सुलभ होते असा त्यांचा वैयक्तिक अनुभवांवर आधारलेला विश्वास असू शकतो आणि त्यामुळे इतर लोकांनीही नास्तिक बनुन स्वतःचे जीवन अधिक सुखकर करावे या सदहेतुने हा प्रचार असतो . काही अपवाद असतीलही - कुणा एखाद्याचा काही वेगळा स्वार्थ असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण म्हणून सरसकटपणे अशी दुकानदारी (खरेतर प्रचार हा योग्य शब्द आहे - दुकानदारीला नकारात्मक छटा वाटते) वाईट म्हणता येणार नाही.
प्रचाराबद्दल आणखी खोलात जावून उहापोह करता येईल - मला असं वाटतं की नास्तिकतेचा प्रचार हा फारसा होतच नाही. किंबहुना नास्तिक विचारांची बहुतांशी गळचेपीच होते. ज्या संस्कारक्षम वयात एखाद्या व्यक्तीला म्हणजे एखाद्या मुलाला आपण अस्तिक असावे की नास्तिक हे ठरवायचे त्या वयापर्यंत नास्तिकतेची ओळखही नीटशी करुन दिली जात नाही. घरात , शाळेत सगळीकडे धार्मिक गोष्टी चालू असतात - तु ईश्वराची प्रार्थना कर कारण ईश्वराची प्रार्थना करणे हे सुसंस्कारित व्यक्तीचे लक्षण आहे. तु असे केल्यास तु गुड बॉय (वा गर्ल) म्हणून समजला जाशील अशा अर्थाच्या विचारांचा मारा कमीअधिक प्रमाणात सुरु असतो. फार काय , माझ्या शालेय इतिहासाच्या पुस्तकांत भगतसिंग हे क्रांतिकारी म्हणून परिचय दिला गेला होता पण भगतसिंग हे नास्तिक होते ही बाब नमूद केल्याचे आठवत नाही.
जरी तुम्ही (पालक) इंजिनिअर असाल तरी आणि तुमच्या मुलानेही इंजिनिअर व्हावे अशी तुमची इच्छा असेल तरी इंजिनिअरिंग हा करिअरचा एकमेव मार्ग आहे असे तुम्ही त्याला कधी सांगत नाही ना ? त्याचप्रमाणे अस्तिक पालकांनी संस्कारक्षम वयाच्या एका टप्प्यावर " 'हे जग ईश्वराने निर्माण केले आहे आणि ईश्वर ते चालवतो' अशा आशयाचा एक सिद्धांत आहे आणि आम्ही त्या सिद्धांतावर विश्वास ठेवतो , तु सुद्धा या सिद्धांतावर विश्वास ठेवावास असे आम्हाला वाटते पण तरी साधक बाधक विचार करुन अंतिमतः असा विश्वास ठेवायचा की नाही हे तुझे तुच ठरवायचे आहे"असे स्वच्छपणे आपल्या पाल्यास सांगण्यास व त्याचा मार्ग निवडण्याची मोकळीक त्याला देण्यास काय हरकत आहे ? फार काही नाही तर किमान "ईश्वर आहे" असे ठासून सांगण्यापेक्षा "ईश्वर आहे या सिध्दांतावर माझा विश्वास आहे" असे सांगणे अधिक योग्य होणार नाही का ?(अर्थात नास्तिक पालकांनीही अशाच प्रकारचे वर्तन आपल्या पाल्याशी करावे) [या मुद्द्याच्या अनुषंगाने - तळटीप १ ]
आता थोडं परिषदेबद्दल
मी परिषदेबद्दल वाचलं होतं पण परिषदेचा उद्देश्य नेमका लक्षात आला नाही. आणि अंगभूत आळशीपणामुळे केवळ उतुस्कतेपोटी परिषदेला जाण्याचे कष्टही काही घेतले नाहीत. पण या परिषदेला येणारे बहुतेक सर्व सदस्य हे नास्तिकच असतील तर त्यातुन नास्तिकतेचा प्रचार वा प्रसाराचे कार्य कसे काय पार पडेल ही मला एक शंका आहे ? पण अशा प्रचार वा प्रसाराच्या दिशा व मार्गाबद्दल विचारमंथन केले गेले असावे. पण त्यातून ठोस काही साध्य होईल का याबद्दल मी साशंक आहे.
दुसरे म्हणजे - कोणत्याही समविचारी गटांचा असा एक आधारगट निर्माण होतो तसे काहीसे असू शकते. म्हणजे काही नास्तिकांना आपल्या व्यक्तिगत जीवनात नास्तिक असल्यामुळे वा धार्मिक चालिरिती , कार्ये यांत सहभागी होण्याचे नाकारल्यामुळे विरोध/दबाव यांना सामोरे जावे लागू शकत असेल (खास करुन नास्तिक स्त्रियांना) तर त्यांना समविचारी लोकांकडून पाठिंबा मिळणे , वैचारिक पाठबळ मिळणे उपयुक्त ठरु शकते. मला स्वतःला धार्मिक कार्यांत वा उत्सवात सहभागी होण्याविषयी काही अपवादात्मक वेळी अनुभवलेला दबाव वगळता नास्तिक असल्याने फारसा त्रास सहन करावा लागला नाही. किंवा नास्तिकतेच्या मार्गावरुन उघडपणे चालताना काही प्रमाणात थोडी हेटाळणी वा निंदा यांना सामोरे जावे लागू शकते याची तयारी मी नेहमीच ठेवल्याने मी या गोष्टींचा त्रास करुन घेत नाही (पण तरी एक प्रसंग खाली लिहीत आहे- तळटीप २). त्यामुळे अशा आधारगटाची मला कधी गरज भासली नाही.
पण तरी पुन्हा संधी मिळाल्यास अशा परिषदेला नक्की जाईन. आणि जमल्यास माझे विचार तेथे मांडण्याचाही प्रयत्न करेन
मला वाटते अशा परिषदेला येताना नास्तिक सदस्यांना असे आवाहन करण्यात यावे की आपल्या बरोबर आपल्या निकटच्या एका तरी अस्तिक व्यक्तीस सोबत आणावे (अर्थात प्रेमळ आग्रह करुन- जबरदस्ती नसावी).
तळटीप १ - गिफ्टेड या सुंदर आणि ह्रुद्य चित्रपटातला एक छोटासा प्रसंग - लहानशी मेरी आणि तिचा मामा फ्रँक यांच्यातील एक छोटेसे दृश्य आवर्जुन बघा असे सुचवेन.
तळटीप २ - नास्तिक म्हणून कुचंबणा झाल्याचा प्रसंग - आम्ही पाच मित्र एकदा महाबळेश्वरला फिरायला जाताना वाईच्या गणपतीला गेलो. म्हणजे वाईच्या गणपतीचे दर्शन हे खरे तर ठरलेले नसतानाही इतर चौघे धार्मिक असून त्यांच्या मनात आल्याने वाईमध्ये वळलो. तेव्हा मी मंदिरात दर्शनाला न जाता बाहेर थांबलो यावरुन एका मित्राने टिप्पणी केली की "काय मासिक अडचण (मासिक पाळी) असल्याप्रमाणे बाजूला थांबला आहेस?" . तो माझा मित्रच असल्याने मी हसण्यावारी नेले आणि प्रसंग फारसा गंभीरही नव्हता पण तो इथे लिहिण्याचे कारण इतकेच की जसे नास्तिकांनी जर धार्मिक लोकांच्या श्रद्धांची हेटाळणी केली किंवा काही खोचक टिप्पणी केली तर धार्मिक लोकांना ते खटकते , त्यांच्या भावना दुखावतात त्याचप्रमाणे धार्मिक मंडळींनीही नास्तिकांची हेटाळणी करु नये.
असो. प्रतिसाद मोठा झाला आहेच, तरी सर्व मुद्द्यांना स्पर्श झाला असेल असे नाही. पुढे चर्चा चालू राहिल्यास आणखी मुद्दे मांडता येतील.
फक्त आस्तिक सदगदित होऊन तुमचं म्हणणं मान्य करतील अशी अपेक्षा ठेऊ नका. ते ज्या ईश्वराच्या अस्तित्वाचा दाखला देतात त्या ईश्वरानेच बहुदा निस्पृहतेचा वाण मागील बऱ्याच वर्षांपासून जन्माला घातला नसावा.
खरे तर गिरीश कुबेरांचाच लेख पुरेसा होता. पण मदर तेरेसांवरील लेख मागे घेतल्यामुळे त्यांच्या लिखाणातील शहाणपण संशयातीत असते.
मिपाकर आस्तिकांनी नास्तिक आणि निधर्मी यांची गल्लत का केली ते कळायला मार्ग नाही. निधर्मी अथवा पुरोगामी असण्याची आजकाल एक अग्निपरीक्षा असते - मुस्लिमांवर टीका करणे - ती टाळण्यासाठी नास्तिकतेचा मार्ग निवडला जातो असा समज असावा.
धन्यवाद सर
अशी अपेक्षा नाहीच पण फक्त मुद्देसूद चर्चा /वाद व्हावा ही माफक अपेक्षा. राजकीय परिप्रेक्ष्यातुन गुद्देसूद चर्चा नसावी :)
नाही ओ सर, लोकसत्तेतला सदर लेख डॉ. शंतनु अभ्यंकर यांचा पण लोकसत्तेत प्रसिद्ध झाल्यामुळे सरते शेवटी कुबेरांनाच शिव्या पडाव्यात हे मी समजू शकतो.. ते नाही का भारत पाकिस्तान क्रिकेटच्या निमित्ताने शाहिद आफ्रिदीच्या मातोश्रींची खूप आठवण केली जाते (मग भले आफ्रिदी सामन्यात असो वा नसो.. ) तसेच काहीसे. चालायचेच. कुबेरांच्या शैलीचा मी ही चाहता नाहीच
हा थोडा गंभीर मुद्दा.. मलाही नास्तिक हे निधर्मीच असावेत असे वाटते. तसं म्हंटलं तर नास्तिकांना धर्माची गरजच काय ? हे मान्य की ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांताशिवायही धर्माचे महत्व होते. माणसाच्या जगण्याला , वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि अगदी राजकीय देखील नीतिनियमांची चौकट देण्याचे काम धर्माने केले. आणि ही चौकट देण्याच्या कार्यामुळेच कदाचित जैन व बौद्ध यांसारख्या निरिश्वरवादी (वरील प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे माझ्या अल्पज्ञानानुसार - चुभूदेघे) धर्मांनाही महत्व प्राप्त झाले. पण आता काळ बदलला आहे. आता सर्वात प्रथम घटना, कायदे यांनी समाजजीवनाला , राज्यसंस्थेला कायदेशीर चौकट दिली आहे. अगदी कुटुंब व्यवस्थेसाठीही कायदे आहेत. मग एखाद्या बाबतीत काय चुक वा काय बरोबर, किंवा काय करायला हवे हे ठरवताना धार्मिक ग्रंथ नाही तर कायद्याची पुस्तके , नियम पुस्तिका यांचा आधार घ्यावा लागतो. मग असे असताना धर्माचे महत्व हे मुलतः ईश्वर उपासनेच्या निमित्ताने राहते. बाकी फक्त समजातील वा कुटुंबातील उत्सव व मनोरंजन. मग एखाद्या नास्तिकाने "मी अमूक धर्मातला नास्तिक" असा टॅग लावायला हवा काय ? मला तरी हे निरर्थक वाटते. पण ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणजे जैन , बौद्ध हे धर्म निरिश्वरवादी आहेत आणि हिंदू धर्म चार्वाक दर्शनाच्या निमित्ताने नास्तिकांना सामावून घेतो त्यामुळे या तीन धर्मात नास्तिकांची सोय होवून जाईलही पण तशी खरेच गरज आहे का ? मी परिषदेला गेलो असतो तर त्या निमित्ताने इतर नास्तिकांचे याबद्दलचे विचार जाणून घेता आले असते.
पुरोगामीबद्दल फारच बरेच हेटाळणीजनक उद्गार काढले जातात आणि हिंदू विरुद्ध मुस्लिम या मांडणीशी संबंध जोडलेला दिसतो.
पण निधर्मी व पुरोगामी या वेगळ्या बाबी आहेत
निधर्मी हे पुरोगामी असतील. पण सगळे पुरोगामी हे निधर्मी असतीलच असे नाही.
एकुणात निधर्मी हा शब्द काहीसा चुकीच्या अर्थाने वापरला जातो असे मला वाटते
"निधर्मी = सहिष्णू वृत्तीचा धार्मिक किंवा सर्व धर्म समभाव जपणारा व्यक्ती" असा अर्थ योग्य नाही. शब्दशः विचार केला तर निधर्मी = धर्म न मानणारा.
प्रत्येक पुरोगामी हा "धर्म न मानणारा" असा असेल असे नाही तर पुरोगामी हे बहुधा सर्व धर्म समभाव जपणारे व परिवर्तनशील आणि सुधारणावादी धार्मिक होत. जसे राजा राममोहन रॉय , स्वामी विवेकानंद. तर निधर्मी म्हणजे सरळ सरळ "मला धर्माची गरजच काय ?"असे म्हणणारे (माझ्यासारखे :) - इतर सगळे नास्तिकही निधर्मीच असावेत बहूधा असा माझा कयास आहे...
देशाचे कायदे आणि व्यवस्था धर्माधारित आहेत म्हणून.
आवडला.
-दिलीप बिरुटे
धन्यवाद डॉ बिरुटे सर
विचार केला पाहिजे.
तुम्ही ज्यांना प्रतिसाद दिले आहेत ते मूळ मुद्दे दखल घेण्यासारखेसुद्धा नव्हते कारण त्यांचा उद्देश परिषदेची किंवा परिषदेच्या हेतूंची चिकित्सा करण्याचा नव्हताच. मला नेहमीच एक खंत वाटते ती अशी -
खंत सुरु --
भारतीय लोक अध्यात्मात बरेच पारंगत आहेत आणि आस्तिक्याततर त्यांचा हात कुणीही धरू शकणार नाही. तरीही खूप वेळा नास्तिकांना त्यांच्या मुद्द्यांचा आणि विचारांचा प्रतिवाद करायला नेहमीच खूप उथळ मुद्दे उचलेले जातात. त्यामुळे हा वाद सध्याच्या भारतीय वातावरणात ९९ टक्के वेळेस अगदीच बेसिक आणि बोअरिंग होऊन जातो. शिवाय नास्तिकांना त्यांच्या वैचारिक पातळीवर/उंचीवर येऊन नास्तिकपक्षाच्या तोडीचा विचार आस्तिक देऊ शकत नाहीत. ते एकतर गुळमुळीत उत्तरे देतात किंवा छद्मविज्ञानाचा आधार तरी घेतात. त्यामुळे हा वाद/प्रकार मराठी संस्थळावर नेहमीच शिळ्य कढीला वादागणिक बेचव होणारा ऊत इतकाच उरला आहे.
खंत समाप्त --
काही मुद्दे मी सुचवू इच्छितो. त्यांना आस्तिक कोणत्या पातळीवर याचा प्रतिवाद करतात हे पाहणे रोचक ठरेल.
१. अधार्मिकता आणि नास्तिक्य : सुबत्ता असलेल्या समाजांत आणि विशेषतः स्त्रियाही स्वतंत्र आणि प्रगत आहेत अशा समाजांत अधार्मिकता नि:संशय वाढलेली दिसते. उदा. जर्मनीमध्ये जवळजवळ ४०/५० टक्के लोक अधार्मिक आहेत आणि मला वाटते पर्यायाने प्राथमिक पातळीवरचे नास्तिक किंवा अॅग्नोस्टिक आहेत. सांस्कृतिक नास्तिक असा प्रकार नसतो पण सांस्कृतिक धार्मिक पण नास्तिक असा प्रकार जरूर असतो. दुसरे उदाहरण म्हणजे दक्षिण कोरिया. आर्थिक. शैक्षणिक, सामाजिक प्रगतीप्रमाणे नास्तिक्याचे प्रमाणही वाढले आहे. माझ्या मते अधार्मिकीकरण हे नास्तिक्याकडे पडलेले सुरुवातीचे पाऊल आहे. खूप लोकांना त्यापलिकडे कट्टर नास्तिक व्हायची गरज वाटत नाही.
२. माझ्या मते श्रद्धा हा सुद्धा उत्क्रांतिजन्य मानसिकतेचाच भाग आहे. त्यामुळे संपूर्ण मानवजातीचे मुलभूत अस्तित्त्व आमूलाग्र बदलल्याशिवाय आस्तिक्य संपणे जवळ जवळ अशक्य आहे. श्रद्धा आणि सौंदर्यानुभव यांचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे श्रद्धेवर घाला घालणे आणि अश्रद्ध नास्तिकतेकडे वाटचाल करणे हे खूप अशक्य आहे.
३. अधार्मिकतेने प्रश्न सुटतात, नास्तिक्याने नाहीत - काही महत्त्वाचे भौतिक प्रश्न धर्म आणि धर्माचे अवडंबर यांनी तयार झालेले आहेत. उदा. इस्लामी मूलतत्त्ववाद. धर्माची ज्ञानाशी आणि सत्तेची सांगड आधुनिकीकरण आणि सुबत्तेने तुटते. त्यामुळे मानवी मनाच्या गरजांमध्ये श्रद्धेला खूप वरचे स्थान आहे. श्रद्धा आणि धर्म यांचा सांधा तुटणे चांगलेच आहे. परंतु श्रद्धा आणि मानवी मन यांचा सांधा तुटणे काही फारसे लाभदायक नाही.
४. मूलतत्त्ववादांमधला फरक - इस्लामी मूलतत्त्ववाद हा जैन मूलतत्त्ववादापेक्षा जास्त घातक आहे. उलट काही प्रसंगी जैन मूलतत्त्ववाद हा मानवजातीला, निसर्गाला उपकारक ठरू शकेल. तरीही कट्टर होणे वाईटच. कट्टर होणे म्हणजे रिजिड होणे. रिजिडिटी कधी चांगली असते?
५. मूलतत्त्वे आणि प्रॅक्टिस यांच्यातल्या तफावती - नास्तिकांना दोन पातळ्यांवर भांडावं लागतं. त्यांना मूलतत्त्वे कशी निरर्थक आहेत हेही पटवून द्यायला लागते आणि प्रॅक्टिस कशी चुकीची आहे हेही. हिंसेसाठी बदनाम झालेल्या गुजरात राज्यात अहिंसा हे मूलतत्व असणार्या जैन धर्माचा पगडा आहे!!
६. पंथांचे केंद्रीकरण/संस्थाकरण वाईट - भारतीय धार्मिक पंथांचे मुख्य प्रवाहाला जोडून घेण्याची धडपड, त्यांची उन्नयन करून घेण्याची लालसा घातक आहे. उदा. वारकरी पंथ. वारकरी पंथ स्वत:ला उन्नयन करून घेऊन अधिकाधिक रिजिड होत गेलेला आहे. त्यातली सोशल इक्विटी ही नावापुरतीच उरलेली आहे. वेश्येने अभंग रचण्याची मुभा देणारा आणि कालांतराने संतत्व देणारा हा पंथ आज 'स्त्रियांना चपलेची जागा द्यावी' (इंदुरीकर) इथवर येऊन पोचला आहे. त्यामुळे नास्तिकांनी अशा गोष्टींना टूल म्हणून वापरणे कितपत फायद्याचे आहे?
७. नास्तिकांनी नव्या परंपरा तयार केल्या पाहिजेत- अग्नि आणि पुरोहितांच्या साक्षीने लग्न नाही करायचे. ओक्के! मग त्याला पर्याय कोर्ट मॅरेज हे होऊ शकत नाही. नास्तिकांना अशा परंपरा तयार करता येतील का? त्यांचे सौंदर्यशास्त्र रचता येईल का? भारतीय नास्तिक याबाबतीत किती सृजनशीलता दाखवतात? एकाही नास्तिकाने याबाबतीत काही विशेष काम केले आहे हे मला तरी आठवत नाही. उलट ते १० रुपयांचा फॉर्म भरून आम्ही लग्न केले वगैरे नीरस गोष्टींनाच कौतुकाने सांगतात. त्यात काय बोडक्याचे कौतुक?
मंगल अष्टकांचे उदाहरण घ्या - गेय काव्याचा उपयोग करून लाखो लोकांची लग्ने होतात. इथे साहित्य, कला आणि देवाचा संगम झाला आहे. नास्तिकांना देव वगळून काही असं साहित्य प्रसवता येईल का? ही परंपरा मूळातच नष्ट करून काय विशेष फायदा आहे?
धन्यवाद हणमंतअण्णा जी. आणि तुमच्या प्रतिसादामुळे आता खर्या अर्थाने चर्चेला सुरुवात झाली.
बरोबर आहे. पण चर्चेच्या ठिकाणी दखल चर्चा करण्यापेक्षा गोंधळ करणार्याच्या हेतुने आलेल्यांकडे आधी लक्ष द्यावे लागते. एकतर त्यांच्या मुद्द्यांची (ते अदखलपात्र असलेत तरी) दखल घेवून त्यांना संयमाने पण ठामपणे उत्तर देवून शांत करणे किंवा हाताला धरुन बाहेर काढणे याशिवाय पर्याय नसतो. ..त्या शिवाय मुख्य चर्चा होवूच शकत नाही. हेच बघा ना धागा निघाल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर तुम्ही प्रतिसाद दिलात .. याचाच अर्थ आधीच्या गोंधळात तुम्ही तुमचे विचार मांडू इच्छित नव्हता असे दिसते.
असो.
तुम्ही मांडलेले विचार बरेच गहन आहेत. सगळ्याच मुद्द्यांवर नाही तरी काही मुद्यांवर माझ्या प्रतिक्रिया देत चर्चा सुरु ठेवतो.
प्राथमिक पातळीवरचे नास्तिक ही संज्ञा तितकीशी स्पष्ट होत नाहीये. कृपया उदाहरणासहित स्पष्ट कराल काय ?
सांस्कृतिक नास्तिक म्हणजे काय ?
सांस्कृतिक धार्मिक पण नास्तिक - म्हणजे कुटूंबात किंवा समाजजीवनात धार्मिक कार्यात वा उत्स्वात सहभागी होणारा पण मनाने नास्तिक असे काय ? धार्मिक सण वा उत्सव हे कुटुंबाला समाजाला एकत्र आणणारी असतात त्यामुळे हे साहजिकच असू शकते. चित्रपटात दाखवला जातो तसा एखादा कडव्या मनाचा नास्तिक बनण्याची गरज नाहीच. तसेही धार्मिक सण वा उत्सव यात खर्या अर्थाने धार्मिक विधीचा भाग अगदी थोडा असतो बाकी इतर अनेक गोष्टी असतात ज्यांचा अस्तिक वा नास्तिक असण्याशी संबंध नसतो तर फक्त मनाला आनंद देणार्या त्या बाबी असतात. उदा. दिवाळीचे उदाहरण घेतले तर लक्ष्मीपूजन वा दिवाळीतल्या इतर दिवशी केल्या गेलेल्या बाकी पुजा मिळून फारतर दोन-तीन तासाच्या होत असतील. पण दिवाळी निमित्ताने खरेदी, फराळ बनवले जाणे, मित्र आप्तेष्टांनी एकत्र येवून तो खाणे, फटाके वाजवणे (आता प्रदुषणाचा मुद्दा वेगळा- पण फटाके वाजवण्यात अनोखी गंमत आहे हे मान्यच) , रांगोळी काढणे , घराला रोषणाई करणे वगैरे अनेक गोष्टी आहेत ज्या मनाला आनंद देतात. मी नास्तिक असलो तरी यांतील बहुतेक गोष्टी मला आवडतात .. प्रत्यक्ष पुजेच्या वेळी मात्र माझी पत्नी पुजा करते तर मी जवळपास असतो आणि फोटोग्राफी करतो.
ज्या मनात "ईश्वर आहे व तो जगाचे नियंत्रण करतो" ही श्रद्धा अतिशय घट्टपणे रुजली आहे तेथून ती दूर करणे खूप जास्त कठीण असते, कारण श्रद्धा एकटी येत नाही ती सोबत आशा आणि भिती अशा भावनांनाही घेवून येते. आणि खासकरुन भितीच्या भावनेवर विजय मिळवणे हे कठीण असते. त्यामुळे बुद्धी आणि भावनेच्या संघर्षात बुद्धी भावनेपुढे पराजित होते.
मी व माझ्या पत्नीने "कॉसमॉस" नावाची हिंदी रुपांतरित एक माहितीपट वेबसिरीज आवडीने पाहिली. त्यात महास्फोट, विश्वाची निर्मिती, पृथ्वीचा इतिहास, डार्विनच्या सिध्दांतानुसार झालेली उत्क्रांती ई सर्व खूप विस्ताराने व छान पद्धतीने दाखवले आहे. माझ्या पत्नीलाही मालिका आवडली, आणि त्यातल्या कोणत्याच सिद्धांताबद्दल तिचा आक्षेपही नव्हता - किंवा तिला ते सर्व पटले होतेच. तेव्हा मी तिला विचारले की "या मालिकेत ईश्वराच्या अस्तित्वाचा उल्लेखही नाही. मग तरी अजून अस्तिक आहेस का ? असशील तर तु मालिका फक्त मनोरंजन म्हणून बघितलीस काय ?" यावर तिचे उत्तर की "दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत"
मला वाटते या विरोधाभासाचे उत्तर म्हणजे तुमचे वरील विधान होय. पण "घाला घालणे" हा शब्दप्रयोग नकारात्मक वाटतो. आणि श्रद्धा म्हणण्यापेक्षा कल्पनाविश्व म्हणणे अधिक योग्य होईल.. त्यामुळे श्रद्धेवर घाला घालणे असे म्हणण्यापेक्षा मी कल्पनाविश्वातुन बाहेर येणे असे म्हणेन. या कल्पनाविश्वात काही काळ रमणे हे मनाला समाधान देणारे असू शकते पण मनाचा 'डिफॉल्ट मोड' हा वास्तवाशी जुळलेला हवा, कल्पनेशी नको असे मला वाटते.
याचे दुसरे सोपे उदाहरण मी असे देईन की मी जेव्हा शोले चित्रपट (किंवा कोणताही चित्रपट) बघतो तेव्हा जय, वीरु, ठाकूर, गब्बर ई पात्रे मला त्यावेळी खरी - जिवंत वाटतात, मी काही वेळ त्यांच्या सुख दु:खाशी समरुप होतो. ठाकूरचे कुटूंबा मारले जाते तेव्हा मलाही दु:ख होते. एखाद्या प्रसंगात जय ने असे करायला पाहिजे होते , वीरु ने तसे करायला हवे होते वगैरे वाटते.. खरेतर हा सगळा केवळ एक खेळ आहे जो सलीम-जावेद आणि रमेश भाऊंनी आपल्यापुढे उभा केला आहे हे माहित असतेच पण तरीही या कल्पनेच्या भावविश्वात स्वतःला झोकून दिल्याशिवाय त्या चित्रपटाचा आनंद मी घेवू शकत नाही. चित्रपट संपल्यानंतरही काहीवेळ त्यातली पात्रं माझ्या मनात रुंजी घालतात. क्वचित एखाद्या चित्रपटातील एखादे पात्र मनात अगदी घर करते, पुन्हा पुन्हा आठवत रहाते. पण तरी ते सर्व केवळ कल्पनेचे विश्व. मनाच्या डिफॉल्ट मोडमध्ये त्याला स्थान नाही. एखाद्या पात्राने मांडलेले काही विचार अगदी छान असू शकतात आणि ते मी आठवून माझ्या आयुष्यात त्यावर अंमलही करु शकतो ...नव्हे ते माझ्या जीवनाचे तत्वज्ञानही बनू शकते पण त्याचे श्रेय त्या काल्पनिक पात्राला नाही तर ते पात्र चितारणार्या खर्याखुर्या लेखक-दिग्दर्शकाला नाही का ?
पण तुम्ही म्हणता तसे अश्रद्ध नास्तिकतेकडे वाटचाल करणे हे खूप अशक्य अवघड आहे.. फक्त मी आधीच्या प्र्तिसादात म्हंटले त्याप्रमाणे संस्कारक्षम वयात योग्य वेळी नास्तिकतेचा परिचय आणि निवडीचे स्वातंत्र्य मिळायला हवे. ज्या अस्तिकांना निदान समजत आहे की "बुद्धी आणि भावनेच्या संघर्षात माझ्या भावनांचे पारडे जड असल्याने मी नास्तिक होवू शकत नाहीये" त्यांनी निदान आपल्या मुलांना तरी "तुला अस्तिक व्हायेचे की नास्तिक याचा निर्णय तुच विचारांती घ्यायचा आहे" इतके स्वातंत्र्य अगदी नि:संदिग्धपणे द्यायला काय हरकत आहे ?
. सामान्य लोकांकरिता अस्तिकता आणि धार्मिकता या वेगळ्या गोष्टी नाहीतच. अस्तिकता हा धार्मिकतेचाच एक भाग आहे. अस्तिक राहून अधार्मिक असणे हे तत्वतः शक्य वाटत असले तरी वास्तववादी नाही. कारण अस्तिकतेचा सिद्धांत कोणत्या ना कोणत्या धर्मातुन येतो तो सिद्धांत मानायचा आणि धर्म नाकारायचा असे कसे होवू शकेल. मग त्याकरिता ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य करणारा पण इतर कोणतीही धार्मिक पथ्ये, नीति नियम न सांगणारा असा एक नवीनच धर्म वा पंथ निर्माण करावा लागेल. इतर कोणतेही नियम नकोत म्हणजे असा ईश्वर निराकारच असला पाहिजे, कारण त्याला आकार दिला की नियम आलेत.. म्हणजे गणपतीचा आकार असला की त्याला नैवेद्यात मोदक आवडतो.. शंकराचा आकार असला की त्याची आराधना सोमवारी करायला हवी वगैरे.. पण मग तो ईश्वर निराकार असायला पाहिजे हा देखील नियम. मुळात सगळाच डोलारा काल्पनिक पण त्यातले नियम मात्र वास्तवात येवून मानवापेक्षा वरचढ ठरु लागतात.
बहुतांशी असहमत. "आपल्या पाठिशी कुणीतरी आहे" ही भावना श्रद्धेतुन जन्म घेते आणि ती बहुतकरुन कमकुवत मनाला आधार देणारी आहे हे मान्य. आणि श्रद्धेचा संस्कार अशी भावना माणसाच्या मनात निर्माण करायचा प्रयत्न करतो हे खरे, पण त्याबरोबर इतर अनेक भावनाही जन्म घेतात. म्हणजे "देव सुद्धा माझ्या मदतीला नाही येत" आणि तत्सम भावना. देव आहे या श्रद्धेचा व्यत्यास "दानव आहे" असाही होतो. मग जादुदोणा, नजर लागणे , करणी वगैरे अंधश्रद्धांवरही सहजच विश्वास ठेवला जातो. माझी पत्नी रोज देवापुढे दिवा लावते आणि असे केल्याने "मनाला बरे वाटते".. इथपर्यंत ठीक आहे पण मग एखादे दिवशी घाई गडबडीत दिवा लावायचा राहून गेला आणि ती तशीच घराबाहेर पडली की "आज देवापुढे दिवाही नाही लावला" ही चुटपूट तिला दिवसभर त्रास देते. तिला नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवायचा असतो.. त्याने तिला बरे वाटणार म्हणून माझी अर्थातच काही हरकत नसते (किती तेल वाय गेले वगैरे फालतु शंका मी काढत नाही बरं) पण मग चुकून एखादे वेळा तो दिवा विझला की त्याने तिच्या मनाला होणारा त्रास मला बघवत नाही. मग सांगा श्रद्धा आणि मानवी मन यांचा सांधा तुटणे लाभदायक का ठरु नये ?
मुद्दा क्र ६ नीटसा कळाला नाही. नास्तिक कोणत्या गोष्टींना टूल म्हणून वापरत आहेत ?
पण सध्यातरी धार्मिक पद्धतीने लग्न वा कोर्ट मॅरेज असेच पर्याय कायद्यानुसार उपलब्ध आहे. तसेही लग्नाचे महत्व आता फारसे धार्मिक स्वरुपाचे राहिले नसून ते कौटुंबिक, सामाजिक व कायदेशीर आहे अन्यथा नास्तिकांसाठी लग्न काय आणि लिव्ह ईन काय सारखेच की. लग्नाकडे फक्त धार्मिक परिप्रेक्ष्यातुन पाहिले तर विवाहाविच्छेदाचा पर्याय राहणारच नाही (अपवाद मुस्लिम धर्म -त्यात तलाकची सोय आहे. इतर धर्मांत - जसे हिंदू , जैन, बौद्ध , ख्रिश्चन , शीख ई धर्मात विवाहविच्छेदाची सोय आहे असे ऐकण्यात नाही - चुभुदेघे)
नास्तिकांची संख्या ती किती ? नास्तिक व्यक्तीला नास्तिक जोडीदार मिळण्याची मारामारी आणि परंपरा कुठल्या तयार करणार .. उलट बहुधा नास्तिक लोकांना जोडीदाराच्या वा कुटूंबाच्या इच्छेखातर धार्मिक विधिवत लग्न करावे लागते.. मी ही तसेच केले :( असो. कोर्ट मॅरेज करणारे फक्त नास्तिकच असतात असे नाही.
अरसिक असणे आणि नास्तिक असणे या दोन वेगळ्या गोष्टी. फॉर्म भरुन लग्न केला ती झाली कायदेशीर औपचारिकता. पण लग्न केले, आयुष्याचा जोडीदार मिळाला या गोष्टीचा आनंद (झाला असल्यास) साजरा करण्यास ना कायद्याचा अडसर आहे ना नास्तिकतेचा.. जंगी पार्टी केली जावू शकते.. बाकी ज्याची त्याची आवड. कुणी अरसिक असल्यास त्यात नास्तिकतेचा काय दोष ? आणि विधिवत केलेला विवाह थाटामाटात झाला तरी त्यातल्या फक्त सात फेरे, मंगलाष्टक ई धार्मिक विधींचे श्रेय धर्माचे (ज्यांत आजकाल फारसा रसही कुणाला नसतो- पण औपचारिकता म्हणून केले जातात) बाकीचा थाटमाट, उंची कपडे, महागडा मेक अप, रोषणाई, भरगच्च जेवण, बूट चोरणे वगैरेंचा धर्माशी वा अस्तिकतेशी काय संबंध ? धार्मिक विधींत वधू-वरांचे आईवडील , मामा ईत्यादिंची उपस्थिती लग्नात अपेक्षित आहेत मग चुलत नणंदेच्या जाऊच्या भावाच्या सासर्यांना निमंत्रण देण्यात आणि स्थानिक आमदाराचा सत्कार करण्यात अस्तिकतेचा काय विषय ?
फार काय हळद लावणे देखील धार्मिक नाही.. लग्नात व लग्नानंतर वधू वरांनी छान दिसावे यासाठिची 'स्किन केअर' ट्रीटमेंट आहे ती. शेतात किंवा मनरेगात उन्हात काम करुन त्वचा रापली असल्याने नास्तिक असला तरी हळद लावायला हवी यामुळे मधुचंद्र रोमांचक होईल. एसीत बसून काम करणार्यांनी नाही लावली हळद तरी चालू शकेल :)