काथ्याकूट

लव्ह जिहाद, एक उच्चवर्णीय फँटसी !

Primary tabs

गेली अनेक वर्षे या संकल्पनेने धुमाकूळ घातला आहे. वास्तविक पहाता असले काहीही अस्तित्वात नाही, पण तरीही शिकले सवरलेले लोक तावातावाने हा विषय मांडतात त्याचा थोडासा मागोवा.

या विषयी एक दरपत्रक व्हायरल झाले होते. ते खोटे दरपत्रकही ज्याने लिहिले त्याचा जात्याभिमान त्याला लपवता आला नाही. चातुर्वर्ण्याप्रमाणे त्याने विविध वर्णाचे दर ठरवले, जास्त दर कोणाचा हे सांगणे नलगे.

महाराष्ट्रात एका शहरात असा आंतरधर्मीय विवाह दोन्ही कुटूंबांच्या सहमतीने झाला होता. तेव्हाही रिकामटेकड्या मध्यमवयीन उच्चवर्णीय व्हॅट्स अ‍ॅप अंकल्स नी ती पत्रिका व्हायरल केली व दोन्ही कुटुंबांना मनस्ताप झाला.

नुकतेच उत्तरेत एका अक्षरशः भीक मागून जगणार्‍या महिलेने एका मुस्लिमाशी प्रेम विवाह केला व धर्म बदलला. तिच्या डोक्यावर छप्पर आले, दोन घास मिळू लागले ही खरे तर चांगली गोष्ट, पण विहिंप वाल्याने तक्रार केली व आता एफ आय आर वगैरे सुरू आहे. लव्ह जिहाद च्या संशयावरून आत टाकलेल्या एका मुलीचे तर मिस कॅरेज झाले.

स्वरा भास्कर ( कट्टर हिंदुत्ववादी दिवसभर तिला ट्रोल करतात ) ने एका मुस्लिमाशी लग्न केले. करो बापडी, पण स्वतःला साध्वी म्हनून घेणार्‍या एका भाजप नेत्रीने ट्विटर वर इतकी गरळ ओकली की तिला साध्वी तरी का म्हणावे असा प्रश्न पडला.

या लव्ह जिहाद कल्पने मध्ये आमच्या मुलींना अक्कल नसते, हे गृहितक अध्याहृत आहे.

केरला स्टोरी च्या निमित्तने या विषयावर पुन्हा एकदा सोमी वर थयथयाट सुरू झाला यात आश्चर्य ते काय ?

कॉमी

लव जिहाद असतो असे म्हणणाऱ्यांना काही प्रश्न -

१. लव जिहाद म्हणजे काय ? निकष काय आहेत ? (आय ए एस अधिकाऱ्यांचा घटस्फोट झाला तरी लव जिहाद असतो, केवळ मुस्लिम गुन्हेगार असला की इतर काही धार्मिक कारण समोर नसताना लव जिहाद म्हणले जाते, म्हणून प्रश्न विचारणे गरजेचे.)

२. ह्या निकषाप्रमाणे किती गुन्हे झाले आहेत ? आकडेवारी हवी, स्वतंत्र उदाहरणे नकोत. हे गुन्हे एकूण स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांपैकी किती प्रमाणात आहे ?

चौकस२१२

धर्मांतर हा मुख्य हेतू आणि त्यासाठी वापरल्याजाणारी अनेक शस्त्रानपकी एक शस्त्र म्हणजे लग्न / मैत्री आणि यातून धर्मांतर ...
किंवा अगदी खरे प्रेमात पडून लग्नाचे वेळीस मात्र "तू माझाच धर्म स्वीकार हि सक्ती करणे "

पण तुम्हाला जर फसवून / अमिश दाखवून केलेले धर्मांतर हे होते हेच मान्य नसेल आणि हिंदूंचे असे धर्मांतर केले जाते हे पण अजिबात मान्य दिसत नाहोये / नसेल तर कशाला वेळ घालव्यायाचा...
तुमचा मूळ हेतू हे सर्व अस्वीकर करणायचा आहे हे दिसतंय ...

( कृपया जे काय लिहायचे ना ते उघड प्रतिसादात लिहा ती खरडवही कि काय किंवा व्यनि पाठवू नका गरज नाही

कॉमी

१. स्त्रियांना फसवून लग्न करण्याचे गुन्हे होतात त्यातून मुस्लिम पुरुषांनी केलेला गुन्हा वेगळे काढायचे काय कारण ?
२. असे किती वेळा घडले ? विदा काय ?

आणि तुम्हाला पण चर्चा न करता तुमचेच पालुपद आळवायचे असेल तर तुमचा प्रतिसाद दुर्लक्षित होईल. त्यामुळे तुम्ही उगाच माझा हेतू काय वैगरे फालतुगिरी न करता तुमचा वेळ वाचवाच.

चौकस२१२

स्त्रियांना फसवून लग्न करण्याचे गुन्हे होतात त्यातून मुस्लिम पुरुषांनी केलेला गुन्हा वेगळे काढायचे काय कारण ?

फसवणूक करून लग्न करणे हे चुकीचेच आहे पण त्याचा वापर धर्मांतरासाठी केला गेला असेल तर त्याला अजून एक कंगोरा येतो...
तो तुम्ही दुर्लक्ष करा हवे तर सोयीस्कर रित्या ... इतरांना तो दिसतो
म्हणलना ला "लंबे रेसका घोडा आहे ..."
" धर्मांतर करा" "जग पादाक्रांत करा" हे जगातील २ अब्राहमीक धर्मांचे ब्रिदवाकायचआहे जणू
मग त्यासाठी प्रेम वापरा , धाक वापरा, बाकी संपत्ती वापरा ... टूल किट मध्ये अनेक टूल आहेत

आणि जर धर्मानंतर हा हेतू नस्ता तर फ़िलपिन पासून नार्वे पर्यंत इतक्या वेगवेगळ्या वर्णाचे लोक एकाच धर्माचे कसे झाले असते?

तुम्ही हिंदू बहुसंख्यांक प्रदेशात राहात असावा म्हणून ते जाणवत नसेल, पण एकदा हिंदू अल्पसंख्यांक होऊन बघा मग कळेल " जेहोवा विटनेस" वाले दारावर येऊन अतिशय हुशारीने कसे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात ते ( हे लेकाचे गीतेतील काही गोष्टी सांगून तुम्हाला सांगतील कि बघा येशूला शरण जा )
तुम्हाला झळ लागलेली दिसत नाहीये .. त्यामुळे आकडेवारी आकडेवारी चालू आहे

चौकस२१२

Source ? कसला पाहिजे ? "जेहोवा विटनेस" वाले दारावर येऊन अतिशय हुशारीने कसे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात याचा ?

उनाड

ते तर इस्कॉन वालेही करतात

सुबोध खरे

१. स्त्रियांना फसवून लग्न करण्याचे गुन्हे होतात त्यातून मुस्लिम पुरुषांनी केलेला गुन्हा वेगळे काढायचे काय कारण ?

मूळ हेतू.

खून आणि सदोष मनुष्यवध यातील मूलभूत फरक जो आहे तोच.

पहिल्यात त्या माणसाचा वध करणे हाच मूळ हेतू असतो (murder).

तर

दुसऱ्यात त्या माणसाला इजा करणे हा हेतू असतो किंवा निष्काळजी पणाने मृत्यू होतो परंतु वध करणे हा हेतू नसतो. (culpable homicide not amounting to murder).

हिंदू ख्रिश्चन किंवा अन्यधर्मीय मुलीला फसवून किंवा धाक दाखवून इस्लाम मध्ये धर्मांतरं करणे या हेतूने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी विवाह करणे ( आणि नंतर तिला तलाक देऊन सोडून देणे) अथवा हे आपले आद्य धर्मकर्तव्य आहे असे समजणे आणि त्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नसणे अथवा उलट अभिमान बाळगणे

म्हणजे लव्ह जिहाद.

याचे प्रमाण आंतरधर्मीय विवाहात नगण्य आहे परंतु त्यामागचा मूळ हेतू हा अत्यंत जघन्य आहे.

त्यामागे स्त्रियांच्या बद्दल कस्पटासमान वागवण्याची मानसिक वृत्ती हि नीच आहे.

भारतात रोज अधिकृत आकड्यांप्रमाणे (२०२१) रोज ८६ बलात्कार होतात ( वर्षाला साधारण ३२,०००)

पण निर्भया बलात्कार प्रकरण हे एवढं प्रचंड का गाजलं?

तर त्यात ज्या निर्घृणतेने त्या मुलीवर बलात्कार आणि त्यानंतर अत्यंत वाईट तर्हेने शारीरिक अत्याचार केला गेला त्यामुळे माणसे संतापाने पेटून उठली.

आज लव्ह जिहाद हा विषय परत ऐरणीवर आला कारण ज्या तऱ्हेने या गोष्टी घडत गेल्या आणि पुरोगामी लोकांनी त्या लपवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला यामुळे लोकांच्या मनात संताप आहे.

आता उनाड यांच्या पुरोगामी गृहीतकाप्रमाणे हा बलात्कार एक उच्चवर्णीय फँटसी वगैरे नाही होत का?

उच्चवर्णीय फॅन्टसी असेल तर त्यात ख्रिश्चन मुलींचा लव्ह जिहाद व्हायला नको

https://www.deccanherald.com/national/love-jihad-campaigns-by-religious…

केरळच्या कम्युनिस्ट मुख्यमंत्री श्री अच्युतानंदन यांनी २०१० मध्ये हा विषय काढला होता.

https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/kerala-cm…

वस्तुस्थिती नाकारणे हा अत्यंत वाईट पुरोगामी दळभद्रीपणा आहे.

उनाड

आपले विधान सिद्ध करण्यासाठी ख्रिस्चन व कम्युनिस्ट लोकांची साक्ष घ्यावी लागते यातच काय ते आले.

१ लव्ह जिहाद असे काही नाही असे केम्द्र सरकार ने लिहून दिले होते.
२ मोठा गाजावाजा करून महाराष्ट्र सरकार ने समिती स्थापन केली, तीन महिन्यात एकही तक्रार आली नाही.

महिला बद्दल चा कळवळा बलात्कार्‍याना पेढे भरवले तेव्हाही दिसला असता तर बरे झाले असते.

सुबोध खरे

आपली जळजळ आणि समर्थन करण्याचा केविलवाणा प्रयत्न समजून येतो आहे

आपल्याला शुभेच्छा

श्रीगुरुजी

यांच्या थापा उघडकीस येऊन तोंडावर आपटून सुद्धा पुन्हा पुन्हा त्याच थापा पुढे रेटणे सुरू आहे.

श्रीगुरुजी

धाग्यात लिहिलंय की "लव्ह जिहाद ही एक उच्चवर्णीय फँटसी आहे".

आधी या दाव्यासमर्थनार्थ पुरावे व विदा द्यावा. अन्यथा माफी मागून दावा मागे घ्यावा.

साहना

लव्ह जिहाद प्रत्यक्षांत सेक्स जिहाद आहे कारण इथे लव्ह चा काहीही संबंध नाही. मुद्देसूद उत्तर खालील प्रकारे आहे आणि माझे वैयक्तीक मत आहे.

१. लव जिहाद म्हणजे काय ? निकष काय आहेत ?

- पती मुस्लिम आणि पत्नी बिगर मुस्लिम.
- सर्वसाधारण स्थितीत ह्यांची जोडी जमणे अशक्य असले पाहिजे. (म्हणजे सेलेब्रिटी, श्रीमंत व्यक्ती इत्यादी ह्यातून बाहेर पडतात कारण धर्म बाहेर लग्न करणे इथे सामान्य बाब असते)
- पती काही तरी खोटे बोलून बिगर मुस्लिम मुलीला पटवतो.
* खोटे पणाची काही उदाहरणे
* आपला धर्म, आर्थिक स्थिती ,शिक्षण लपवणे .
* आपली इतर लग्ने किंवा रखेल असेल ती लपवणे.
- बिगर मुस्लिम मुलगी मुस्लिम बनते.
- ह्यानंतर मुलीला सत्य कळते पण वेळ निघून गेलेली असते.
- त्या लग्नातून बाहेर पडण्याची धडपड केली तर इस्लामिक कायदा किंवा हिंसेचा वापर.
- कधी कधी लग्न सुद्धा होत नाही पण सेक्स केले जाते (खोटे बोलून).
- mms बनवून ब्लॅकमेलिंग केले जाते.

२. ह्या निकषाप्रमाणे किती गुन्हे झाले आहेत ?

उत्तर प्रदेश मध्ये २०२० मध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा निर्माण झाला त्यातील निकष माझ्या निकषापेक्षाही जास्त संकुचित होते आणि मागील ३ वर्षात तिथे ५०० केसेस रजिस्टर झाल्याचे कळते. आता उत्तर प्रदेश सारख्या भागांत बहुसंख्य गुन्हे नोंदवले सुद्धा जात नसतील. पण तरी सुद्धा हा आकडा बरोबर आहे असे धरल्यास ५०० केसेस माझ्या मते खूप आहेत. प्रत्यक्ष आकडा खूप मोठा असू शकतो.

> हे गुन्हे एकूण स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांपैकी किती प्रमाणात आहे ?

माझ्या मते हा प्रश्न निरर्थक आहे. विविध प्रकारचे अत्याचार विविध प्रमाणात होत असले तरी सामाजिक मताच्या दृष्टिकोनातून काही गुन्हे जास्त महत्वाचे ठरतात. उदाहरणार्थ देशांत असंख्य बलात्कार झाले असले तरी निर्भया कांड हे सामाजिक मताच्या दृष्टिकोनातून सर्वांत मोठे ठरले.

ह्या शिवाय हिंदू जनतेने कॉमन सेन्स वापरणे जास्त गरजेचे. बहुतेक वेळा मोठे शिक्षण घेऊन मत व्यक्त करण्यार्या इरफान हबीब किंवा रोमिला थापर ह्यांच्या पेक्षा आपल्या अशिक्षित आजीचे इतिहासाचे मर्मज्ञान जास्त चांगले असते. इस्लाम धर्मांत स्त्रियांचे स्थान जनावराच्या प्रमाणे आहे. विशेषतः काफ़िरांच्या स्त्रिया ह्या वेश्येप्रमाणे भोगायच्याच असताति हि इस्लामिक मानसिकता आहे. हे माझे मत नसून त्यांचा धर्मच सांगतो.

आता आपला शेजारी हा लैगिक लंपट आहे अशी शंका सुद्धा आल्यास आपण आपल्या घरातील बायकामुलांना त्याच्यापासून सावध राहण्याचा इशारा नाही देणार का ? विषाची परीक्षा घ्यायची तरी कश्याला ? त्यामुळे आकडेवारी काहीही असली तरी आपल्या हिंदू मुलींना सावध करणे हा आपला अधिकार आहेच.

आणि समजा लव्ह जिहाद खोटा आहे तर मग कायदा करायला विरोध का ?

माझ्या मते कायद्याचे निकष खालील प्रकारे असतील.

* प्रौढ व्यक्तींना वाट्टेल त्याच्याशी लग्न करण्याचा अधिकार असला पाहिजे.
* लग्नानंतर धर्मांतर सुद्धा करणे प्रौढ व्यक्तींचा अधिकार आहे.
* हे सर्व दोन्ही व्यक्ती स्वखुशीने करत आहेत हे सिद्ध केले पाहिजे.
* ह्या दरम्यान कुठल्याही पार्टीने खोटेपणा केला, धर्म लपवला किंवा आपली इतर लग्ने लपवली तर त्यासाठी कठोर शिक्षा असली पाहिजे.

---

हिंदू मुली ह्या मूर्ख आहेत असा लव्ह जिहाद चा अर्थ होत नाही. फ्रॉड करणाऱ्या व्यक्ती नेहमीच आपल्या समूहांत एकतेने राहतात. माझ्या माहितीतील ग्रूमिंग गॅंग मध्ये फार तर ५ लोक असतील. पण एकता असलेले ५ लोक, एकी नसलेल्या १ लाख लोकांवर भारी पडतात आणि हे फक्त लव्ह जिहाद ला लागू होत नाही तर क्रेडिट कार्ड फ्रॉड, टेली मार्केटिंग फ्रॉड, भुरट्या चोऱ्या इत्यादी अनेक ठिकाणी हाच रुल लागू होतो.

इथे कठोर कायदे आणि त्यांची अंबलबजावणी हे महत्वाचे आहे (आपल्या देशांत कठीण आहे) आणि त्याहून महत्वाचे म्हणजे आपल्या लोकांचे प्रबोधन. ह्या शिवाय प्रबोधन हा आमचा अधिकार सुद्धा आहे. लव्ह जिहाद खोटे आहे तरीसुद्धा प्रबोधन करण्यात काय गैर आहे ?

उनाड

तिथल्या पोलीस यंत्रणेत असलेला सिस्टीमॅटिक बायस लक्षात घेता या बहुतांश केसेस खोट्या आहेत. मिसकॅरेज झालेल्या मुलीची केस तिथलीच, शिवाय तरुण मुलाने पोलीस स्टेशन मधल्या प्लॅस्टिक नळाला गळफास घेऊन 'आत्महत्या' केलेली केसही तिथलीच. सर्व मुस्लीम क्रूर असतात असे नव्हे, नात्यातील एखादी मुलगी मुस्लिम मुलाशी लग्न करू इच्छीत असेल तर तिला हजारदा विचार करायला सांगेन. पण 'लव्ह जिहाद' अशी फार मोठी कॉन्स्पिरेसी आहे हे मात्र उच्चवर्णीय हिंदुंची फेंटसी वा फोबियाच आहे.

उनाड

* प्रौढ व्यक्तींना वाट्टेल त्याच्याशी लग्न करण्याचा अधिकार असला पाहिजे.
* लग्नानंतर धर्मांतर सुद्धा करणे प्रौढ व्यक्तींचा अधिकार आहे.
* हे सर्व दोन्ही व्यक्ती स्वखुशीने करत आहेत हे सिद्ध केले पाहिजे.
* ह्या दरम्यान कुठल्याही पार्टीने खोटेपणा केला, धर्म लपवला किंवा आपली इतर लग्ने लपवली तर त्यासाठी कठोर शिक्षा असली पाहिजे.

https://www.bbc.com/hindi/india-65511298?xtor=AL-73-%5Bpartner%5D-%5Bbb…

हे सर्व पाळूनही रिकामटेकडे विहिंप वाले सोडत नाहीत !

विवेकपटाईत

जो पर्यंत माझ्या घरी आग लागणार नाही मी सत्य स्वीकार करणार नाही. झोपून राहणार.

चौकस२१२

नुकतेच उत्तरेत एका अक्षरशः भीक मागून जगणार्‍या महिलेने एका मुस्लिमाशी प्रेम विवाह केला व धर्म बदलला.
प्रश्न अंतर्धर्मीय प्रेमविवाह करण्याचा नाहीये तर त्यानंतर चे सक्तीचे धर्मांतर हा आहे पण आपण काही हा मुद्दा लक्षात घेण्याचं मनस्थितीत दिसत नाहीत
या उदाहरणात मुलगी गरिबी होती मग मदत जर या तरुणाला करयाची तर करडे कि लग्न ,, पण धर्मांतर का ?

सुबोध खरे

प्रेम ला सुद्धा अटी लागू असतात हे माहिती नव्हतं का?

धर्म बदलणार असलीस तरच माझं प्रेम आहे नाही तर नाही.

बाकी चालू द्या

चलत मुसाफिर

Group A, Indic religions: हिंदू, शीख, बौद्ध, जैन
Group B, Non indic religions: इस्लाम, ख्रिश्चानिटी, जुडाइजम व इतर

Group Aमधून B मधे धर्म परिवर्तन करण्यास कायद्याने पूर्ण बंदी आणावी. मग लव्ह जिहादच काय, इतर सर्व जिहादाचाही नायनाट होईल.

इस्लामी देशात मुसलमानाने धर्म सोडला तर तडकाफडकी देहांताची शिक्षा असते. 'पाकिस्तानी मुसलमान धर्म बदलून हिंदू/ शीख/ जैन झाला' अशी बातमी आजतागायत कुणी वाचलेली नाही.

जोपर्यंत हे धर्मांध इस्लामी देश समूळ सेक्युलर होत नाहीत, तोपर्यत हिंदूंना सेक्युलरिझमचे डोस पाजणे बंद करा.

लव जिहाद तर लव जिहाद. पण जर हिंदू स्त्री शी मुसलमानाने प्रेमाने विवाह केला आहे तर त्याला पुढे अनेक विवाह करता येणार नाही असा बदल जरी त्यांच्या बाजुच्या कायद्यात करता आला तर पुष्कळ आहे.
तो झाकीर नाईक तर स्त्री व पुरुष गाडीची दोन चाके असतात. लग्नानंतर दोन्ही चाके एकाच प्रकारची असणे गरजेचे असते. त्यामुळे स्त्रीचे धर्मांतरण आवश्यक ठरते असे तारे तोडत असतो. त्यातही मुसल्मानाचे चाक म्हणजे गाडीचे प्रॉपर चाक व हिंदू स्त्री म्हणजे सायकलचे चाक अशी मुद्दामुन अ‍ॅनॉलॉजी लावतो.

आग्या१९९०

Group Aमधून B मधे धर्म परिवर्तन करण्यास कायद्याने पूर्ण बंदी आणावी. मग लव्ह जिहादच काय, इतर सर्व जिहादाचाही नायनाट होईल.

ग्रुप B मधून A मधे धर्म परिवर्तन करण्यासही कायद्याने बंदी
असावी का?
एखादयाला आपल्या धर्मातील तत्वे पसंत नसतील आणि दुसरा धर्म स्वीकारण्याची ईच्छा असेल तर कायाद्याने अडवता येईल का?

चलत मुसाफिर

तसा कायदा भारतात नसल्यामुळे सध्या अडवता येणार नाही

उनाड

हिंदु पारसी व जुडाईझम मध्ये इन कमिंग अशक्य आहे.
एखाद्या मुस्लिमाने हिंदू धर्म स्वीकारलाच तर त्याला कोणती जात देणार ?

चलत मुसाफिर

तुम्ही उगा नसता लोड घेऊ नका. हिंदू समाज काय ते बघून घेईल.

तुम्ही तुमच्या या बांगा अधोगामी धर्मीयांसमोर जाऊन द्या. कुराण, अपॉस्टसी, ब्लास्फेमी, चार लग्ने, हलाला वगैरे विषयांवर. जगलावाचलात तर तुमचे थरारक अनुभव मिपावर लिहा, वाचायला आवडेल.

श्रीगुरुजी

१) एखाद्या अमुस्लिमाने मुस्लिम व्हायचे ठरविले तर तो सुन्नी, शिया, अहमदी, कुर्दिश, बहाई, हिजरा इ. पैकी काय होईल?

२) एखाद्याने मुस्लिम होताना शिया किंवा अहमदी किंवा सुन्नी ऐवजी इतर कोणताही मुस्लिम व्हायचे ठरविले तर ते शक्य होईल का?

३) मुस्लिम झाल्यावर कुरेशी हे आडनाव मिळू शकेल का?

४) धर्म बदलून एखादा शिया होऊन कुरेशी आडनाव मिळवू शकेल का?

उनाड

१) एखाद्या अमुस्लिमाने मुस्लिम व्हायचे ठरविले तर तो सुन्नी, शिया, अहमदी, कुर्दिश, बहाई, हिजरा इ. पैकी काय होईल?
तो आपला पंथ निवडू शकतो, इन फॅक्त, शिया सुन्नी होऊ शकतात व उलटही होऊ शकते.
२) एखाद्याने मुस्लिम होताना शिया किंवा अहमदी किंवा सुन्नी ऐवजी इतर कोणताही मुस्लिम व्हायचे ठरविले तर ते शक्य होईल का?
हो.
३) मुस्लिम झाल्यावर कुरेशी हे आडनाव मिळू शकेल का?
नाही, पण इथे काय संबंध ?
४) धर्म बदलून एखादा शिया होऊन कुरेशी आडनाव मिळवू शकेल का?
नाही, पण इथे काय संबंध ?

श्रीगुरुजी

या उत्तरांवरून हे स्पष्ट झालंय की इस्लामविषयी आपल्याला कणभरही माहिती नाही. तस्मात् लव्ह जिहादविषयी कोठून ज्ञान मिळणार?

उनाड

मुळात हे प्रश्न गैरलागू आहेत. इस्लाम हा तुमचा आदर्श आहे का? त्याची का उठाठेव ?
बरं ते जाऊ द्या, सोपा प्रश्न, एका दलिताने कंटाळून मुस्लिम व्हायचा निर्णय घेतला, ते शक्य आहे ? ख्रिस्चन व्ह्यायचा निर्णय घेतला, शक्य आहे ? ब्राह्मण व्ह्यायचा निर्णय घेतला, शक्य आहे ?

श्रीगुरुजी

दलित धर्म बदलून मुस्लिम किंवा ख्रिश्चन झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. दलित मुलीने ब्राह्मणाशी लग्न केले तर ती ब्राह्मण बनते. परंतु भारतीय घटना कोणत्याही धर्माच्या पुरूषाला जात बदलू देत नाही.

पण एखाद्या हिजराने सुन्नी व्हायचे ठरविले तर ते शक्य आहे का? एखाद्या अहमदीने कुरेशी आडनाव घेणे शक्य आहे का? एखाद्या अहिंदूने धर्म बदलून हिजरा किंवा अहमदी बनणे शक्य नाही किंवा एखादा अहिंदू मॉर्मन किंवा असिरिअन ख्रिश्चन बनणे शक्य नाही.

कॉमी

सुन्नी म्हणजे पहिल्या चारी खलिफांना मानणारे इतकेच तर आहे ना ? शिया म्हणजे हसन हा पहिला इमाम आहे आणि आधीचे तीन खलिफा मान्य नाहीत. मग शिया सुन्नी होण्यास किंवा सुन्नी शिया होण्यास काय अडचण आहे ?

बाकी दावे माहीत नाहीत पण मॉर्मन लोक घरोघरी जाऊन बुक ऑफ मॉर्मन वाटत असतात. त्यामुळे मॉर्मन होता येत नाही हे पण खरे नसावे. (ह्यावर बुक ऑफ मॉर्मन म्हणून एक उत्तम संगीतिका आहे मॉर्मन प्रचारकांची थट्टा करणारी म्हणून माहितीये)

उनाड

१) एखाद्या अमुस्लिमाने मुस्लिम व्हायचे ठरविले तर तो सुन्नी, शिया, अहमदी, कुर्दिश, बहाई, हिजरा इ. पैकी काय होईल?
तो आपला पंथ निवडू शकतो, इन फॅक्त, शिया सुन्नी होऊ शकतात व उलटही होऊ शकते.
२) एखाद्याने मुस्लिम होताना शिया किंवा अहमदी किंवा सुन्नी ऐवजी इतर कोणताही मुस्लिम व्हायचे ठरविले तर ते शक्य होईल का?
हो.
३) मुस्लिम झाल्यावर कुरेशी हे आडनाव मिळू शकेल का?
नाही, पण इथे काय संबंध ?
४) धर्म बदलून एखादा शिया होऊन कुरेशी आडनाव मिळवू शकेल का?
नाही, पण इथे काय संबंध ?

तर्कवादी

Group Aमधून B मधे धर्म परिवर्तन करण्यास कायद्याने पूर्ण बंदी आणावी.

हे घटनाबाह्य ठरेल.
भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला हवा तो धर्म आचरण्याची मुभा दिली आहे. फक्त सक्तीचे वा प्रलोभन दाखवून केले गेलेले धर्मांतर नसावे.

इस्लामी देशात मुसलमानाने धर्म सोडला तर तडकाफडकी देहांताची शिक्षा असते. 'पाकिस्तानी मुसलमान धर्म बदलून हिंदू/ शीख/ जैन झाला' अशी बातमी आजतागायत कुणी वाचलेली नाही.

पाकिस्तानचा आदर्श समोर ठेवून भारताची राज्यघटना पुनश्च लिहावी असे आपणास वाटते काय ?

अवांतर : अझरबैजान हे मुस्लिम बहूल (९७% लोकसंख्या) असलेले राष्ट्र घटनात्मक पातळीवर धर्मनिरपेक्ष आहे.

चौकस२१२

र्म परिवर्तन करण्यास कायद्याने पूर्ण बंदी आणावी.

अरारारारा आता बघा मेणबत्ती घेऊन मोर्चा काढणारे कसे तुमच्या मागे लागतील ..
पहिला फलक असेल " आकडेवारी द्या असे किती हिंदू शीख जैन धर्मांतरित झाले:
दुसरी पाटी असेल: "मूलभूत हक्कांची पायमल्ली... "
आणि अर्थातच पुढील घोषणा " घर वापसी चालते तर धर्मांतर का नाही - घर्वप्सी हे गेलेल्याने परत येणे असे आहे ,, नसलेल्याला येन केन प्रक्रारे धर्म बदलायला लावणे असे नाही ,, हे अर्थातच हे पुरोगामी विसरतात "

चलत मुसाफिर

अशा मेणबत्ती महाभागांकडे दुर्लक्ष करावे. इस्लामी धोक्यावर उपाययोजना हा आपला कळीचा मुद्दा नजरेआड होऊ देता कामाचे नाही. तिथे मेणबत्तीचा वापर निराळ्या प्रकारे करावा लागला तर डगमगू नये.

कॉमी

धर्मांतरावर बंदी आणा वैगरे सगळ्या fantasy आहेत. असल्या fantasy मध्ये रमायचे असेल तर रमत रहा.

हिंदूंना बॉक्स मध्ये ठेऊन इतर विश्वासोबत संपर्क तोडून द्यावा अशी मागणी झाली धर्मांतर रोखण्यासाठी तरी आश्चर्य वाटणार नाही. म्हणजे जेहोवा विटनेस पण नाही आणि धर्मांतर करवून का होईना खायला देणारे मिशनरी पण नाही. सगळा प्रॉब्लेमच संपला.

चलत मुसाफिर

हे कडक धर्मांतरविरोधी नियम इस्लाममध्ये का आहेत आणि मुसलमान समाजात त्यांना सर्वमान्यता का आहे यावर जरा टिप्पणी करा पाहू.

कॉमी

इस्लाम फारच आदर्शवत दिसतो तुम्हाला. इस्लाम धर्म मध्ययुगीन काळातला अधोगमी धर्म आहे. तुम्हाला त्या धर्माचे अनुकरण करायचे आहे, मला नाही.

चलत मुसाफिर

आम्हाला इस्लामचे अनुकरण नव्हे तर कायमचा बंदोबस्त करायचा आहे. आता या पाहू सोबत :-)

चलत मुसाफिर

जर तुमच्या मते इस्लाम धर्म अधोगामी का काय तो असेल, तर हिंदूंच्या मानगुटीवर का बसताय? हे सगळे ज्ञान वाटायला जामा मशिदीत जा की. हातीपायी धड परत आलात तर तुम्हाला ताबडतोब एक दहीमिसळपाव पार्टी माझ्यातर्फे. :-)

कॉमी

तुम्ही पण सुप्रीम कोर्टासमोर उपोषणाला बसा धर्मपरिवर्तन बंदी कायद्यासाठी. दोघे एकत्र जाऊ नंतर दहीमिसल खायला.

चलत मुसाफिर

न मागता सल्ला देणारे तुमच्यासारखे परोपकारी विरळाच.

कॉमी

नाही नाही, विरळ नाही, तुमचा सल्ला आधी वर आहे, तुमचे अनुकरण केले बस.

सुबोध खरे

सुप्रीम कोर्टासमोर उपोषणाला बसा धर्मपरिवर्तन बंदी कायद्यासाठी

त्याबद्दल न्यायालय किंवा सरकार काहीच करणार नाही परंतु शांतताप्रेमी एखादे वेळेस "सर तन से जुदा" करतील.

आणि जामा मशिदीत शुक्रवारी तसे केलेत तर नक्कीच "सर तन से जुदा" करतील

बाकी चालू द्या

श्रीगुरुजी

इस्लाम धर्म मध्ययुगीन काळातला अधोगमी धर्म आहे.

+ ७८६

म्हणून तर या मध्ययुगीन काळातील अधोगामी अघोरपंथात कोणालाही जाण्यास बंदी असावी, या मध्ययुगीन काळातील अधोगामी अघोर पंथानुयायांचे फाजिल लाड करण्यास बंदी असावी आणि या मध्ययुगीन काळातील अधोगामी अघोर पंथातून कोणास सुटका हवी असेल तर त्यांना पाठिंबा व मदत द्यावी.

चलत मुसाफिर

एकेकाळी राम मंदिर, कलम 370चा अंत, भाजपला पूर्ण बहुमत, काँग्रेस- शिवसेना युती, त्रिपुरा- बंगालमधून कम्युनिस्टांची हकालपट्टी वगैरेसुद्धा fantasyच होत्या हे विसरू नका :-)

अशा धाग्याना अनुल्लेखाने मारावे.
शेजारी आग लागली म्हणुन गंमत बघणार असाल तर ती आग आपल्या घरादाराचा कधी घास घेईल समजणार नाही ईतके लक्षात घेतले पाहीजे.

चलत मुसाफिर

चोरून घुसणाऱ्या अशा वैचारिक रोहिंग्या जिहादींना प्रत्येक चोरखिंडीत गाठून उघडे पाडले पाहिजे. मोकळे रान देणे बरोबर नाही. ही चर्चा अनेकजण वाचत असतात. तातडीने प्रतिवाद झाला नाही तर समाज गैरसमज करून घेतो आणि जागोजागी छुपे पाकिस्तान उगवतात. हा शेकडो वर्षांचा इतिहास आहे.

चौथा कोनाडा

1919 साली जगातील धर्मांध कट्टर मुसलमानांनी तुर्कस्थानातील जागतिक इस्लामी खलिफाच्या समर्थनार्थ 'खिलाफत' नावाचे आंदोलन आरंभिले.
खिलाफत आंदोलनाचे ध्येय होते इस्लामी राज्याचे रक्षण आणि निर्मिती. अश्या या आंदोलनाला गांधींनी पाठिंबा दिला आणि काँग्रेसला ही द्यायला लावला, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितलं की खिलाफत ही आफत आहे. भारतीय जनतेची हिंदुसमाजाची दुर्दशा होऊ नये, देशाचे तुकडे पडू नयेत, जातिभेद जातिद्वेष नष्ट आहेत, जन्मावर आधारित उच्चनीचता नष्ट होऊन समाजात समानता यावी यासाठी समाजचिंतक सावरकरांनी सत्य घटनेवर आधारित ही कादंबरी लिहिली

एकुण ३८ भाग आहेत.

आग्या१९९०

त्यांच्या पत्नीने लिहिलेले पुस्तक लवकरच प्रदर्शित होत आहे. आता भारतरत्न मिळणे फार दूर नाही.

कपिलमुनी

उद्या भारतीय मूळ हिंदू असलेल्या पण पिढ्यान् पिढ्या मुसलमान असलेल्या लोकांना हिंदू व्हायचे असल्यास कोण हिंदू करून घेणार ?

मग त्यांची जात कोणती लावायची ? चातुर्वर्ण्यात कुठल्या वर्णात स्थान द्यायचे ?

आपले असलेले दलीत बौद्ध झाले तरी यांचे सोवळे सुटेना . असल्या संकुचित वृत्तीमुळे हिंदू धर्माची अधोगती झाली आहे.

इतर धर्म जर प्रसार करत असतील तर कालानुरूप बदल घडवून हिंदू धर्म कसा प्रसार करायचं हे बाजूला ..

अरण्यरुदन करण्यात फक्त पुढे असे धर्म पंडितांचे झाले आहे

चलत मुसाफिर

बौद्ध धर्म हा भारतीय आहे. इस्लाम non indic आहे.

मूळ वर्णव्यवस्था ही जन्माधारित अजिबात नव्हती. सध्याची जातिव्यवस्था हा सनातन धर्मातील वर्णाश्रमाचा पूर्ण विपर्यास आहे.

हिंदु धर्माने कधीही धर्मपरिवर्तन मोहिमा काढलेल्या नाहीत, उलट विविध जनसमूहांना त्यांच्या धार्मिक विश्वासांसह सामावून घेतलेले आहे. शिवपूजक आणि विष्णुपूजक हे शेकडों वर्षांपूर्वी सरळसरळ वेगळे धर्म होते. आता एकाच कुटुंबात एक व्यक्ती शिवपूजक, दुसरी विष्णुपूजक, तिसरी उभयपूजक व चौथी नास्तिक असू शकते. इस्लामला (सध्या तरी) हे असले काही मान्य नाही.

कॉमी

मूळ वर्णव्यवस्था ही जन्माधारित अजिबात नव्हती.

पुरावा ?

चलत मुसाफिर

ऋषी विश्वामित्र ते ऋषी वाल्मीकि, भरपूर पुरावे आहेत. सवडीने वाचा, घाई नाही.

मूळ मुद्दा वेगळा आहे. चर्चा भलतीकडे नेण्याचे हे डाव आता लोक ओळखतात.

कॉमी

विश्वामित्र ऋषींनी काय लिहिले ?
शंबुक वध लिहिणारे वाल्मिकी का ?

मुद्दा वेगळा कसा ? कपिल मुनींच्या प्रश्नावर तुम्ही उत्तर दिले त्यातला सेंट्रल मुद्दा आहे हा.

सुबोध खरे

पिढ्यान् पिढ्या मुसलमान असलेल्या लोकांना हिंदू व्हायचे असल्यास कोण हिंदू करून घेणार ?

आर्य समाज त्यांना हिंदू करून घेतो.

बाकी जात लावणे हे भारतीय कायद्यात आवश्यक नाही.

"केवळ हिंदू, जात नाही" असे लिहिलेले चालते. आमच्या वर्गातील ९६ कुळीने आपल्या पुणे विद्यापीठाच्या अर्जात तसे लिहिलेले मी स्वतः पाहिलेले आहे.

( अर्थात आपल्याला जातीवर आधारित आरक्षण हवे असले तर कठीण आहे)

श्रीगुरुजी

ज्याला इस्लाम, इस्लाममधील विविध जाती व पंथ, इस्लामी कट्टरतावाद, लव्ह जिहाद इ. विषयी शष्प ज्ञान नाही त्याला हे अजमेर प्रकरण वाचायला सांगून उपयोग काय? त्याला ते समजणार नाही आणि त्यात काही चूकही वाटणार नाही.

उनाड

इस्लाम बद्दल इतके ऑब्सेसिव्ह होण्यापेक्षा वेद, उपनिषदे, प्रस्थानत्रयी, षडदर्शने , मीमांस वगैरेंचा अभ्यास केला अस्ता तर बरे झाले असते.

श्रीगुरुजी

मी इस्लाम किंवा इतल कोणत्याही धर्माबद्दल ऑब्सेसिव्ह नाही. माझा हिंदू व इतर धर्मांचा थोडाफार अभ्यास आहे. लव्ह जिहाद वगैरे अस्तित्वात नाही असे असत्य दावे करणाऱ्यांविरूद्ध मी लिहितो. हिंदू धर्माला घातक असणाऱ्या गोष्टींचे जे समर्थन करतात त्यांचा मी विरोध करतो. ज्याला मुस्लिम धर्माची, त्यातील जातींची व पंथाची, विचारसरणीची कणभरही माहिती नाही त्याने असे असत्य दावे केले तर मी खोडून काढतो.

असो. आपण मुस्लिमातील सर्व जाती-पंथ, चालीरीती, प्रपोगंडा, ब्रेनवॉशिंग, क्रोर्य, फसवणूक इ. विषयी माहिती मिळवावी असे सुचवितो.

आंद्रे वडापाव

मी काय म्हणतो .. मी मिपावरी या विषयी अनेक तावातावाने पाडलेले लेख. प्रतिसाद पाहतो. शक्यतो मी दूर राहतो.
पण आज एक शंका विचारतो.. या विषयातील तज्ञाने विदा पूर्वक माहिती द्यावी.
लव जिहाद हा फक्त भिन्न लिंगी व्यक्ती मध्ये होतो. का.
समजा दोन स्त्रिया आहेत (एक हिंदू एक मुस्लिम) त्यांनी लग्न केले, नंतर हिंदू स्त्री ने इस्लाम स्वीकारला तर हे प्रकरण लव जिहाद प्रकरणात गणले जाईल का ?

श्रीगुरुजी

इस्लामला समलिंगी विवाह मान्य नाही. तस्मात् असला प्रकार होणे अशक्य. मुळात खूप लहान वयात मुलीचे लग्न लावून देत असल्याने व धर्माचा मुलींवर सुद्धा प्रचंड पगडा असल्याने अशी जोडी जमणे अत्यंत दुर्मिळ. अजून एक म्हणजे सर्व इस्लामी देशात समलैंगिक विवाहास कायदेशीर बंदी आहे.

अर्थात समलैंगिक संबंध असणाऱ्यांची संख्या (म्हणजे गे किंवा बायसेक्शुअल)) सौदी अरेबियात खूप मोठी आहे. विशेषतः अगदी लहान मुलांबरोबर गे प्रकारचे संबंध ठेवणाऱ्या अरबांची संख्या मोठा आहे. टर्की तर गे लोकांची राजधानी म्हणता येईल. एकीकडे आपण कट्टर धार्मिक आहोत याचे सतत जाहीर प्रदर्शन करायचे, इस्लामला समलैंगिक संबंध मान्य नाहीत म्हणून याविरुद्ध अत्यंत कठोर शिक्षा द्यायची पण त्याचवेळी लहान मुलांशी अनैसर्गिक संबंध ठेवायचे असा ढोंगीपणा येथे दिसतो.

आंद्रे वडापाव

अरेच्चा मला वाटलेले की हा धागा भारताविषयी (भारताच्या काँटेक्ष्ट मध्ये) आहे..
इथ तर सौदी तुर्क आणि इस्लामिक जग असा गोल्पोस्त शिफ्ट झाला.. असो
विदा पूर्वक प्रतिसादाच्या प्रतिक्षेत...

कॉमी

छे विदा बिदा काय विचारायचं नाय इथे. विदा विचारणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करायचं उलट, कारण विदा विचरण्यामागे त्यांचा अजेंडा असतो. बिना विदा श्रद्धापूर्वक आमचे मत मानले पाहिजे नाहीतर तुम्ही अजेंडा वाले आहात. पुरावे द्या असे ओरडणारे लोकं ओरडतील ओरडतील आणि नंतर गप्प बसतील. आपण आपली श्रद्धा सोडायची नाई, चील मारायचे.

श्रीगुरुजी

अनेकांनी विदा देऊनही त्याचा येथे काय संबंध असे धागाकर्ता विचारतोय.

हे वाचावे.

थोडा शोध घेतला तर टर्की गे लोकांबद्दल हजारो संकेतस्थळे दिसतील.

आंद्रे वडापाव

L

Bhakti

उच्चभ्रू , आपल्याला दिसणारे सिनेस्टार बिनधास्त आंतरधर्मीय विवाह करतातच की.लव्ह जिहाद म्हणजे धर्मांतर करण्यासाठी आटापिटा,ब्रेन वॉश हे सरळसरळ आहे की.

सुबोध खरे

कोणत्याही दोन भिन्न धर्मियांनी विवाह केल्यास त्यांना धर्मांतर करण्यापूर्वी २ वर्षे थांबावे लागेल(cooling period) असा कायदा आणल्यास निदान लव्ह जिहादला बऱ्यापैकी आळा बसेल असे वाटते.

जसे घटस्फोटासाठी ६ महिने थांबणे आवश्यक असते तसे किंवा सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्याच खात्याशी संबंधित खाजगी नोकरी स्विकारण्याच्या अगोदर २ ते ५ वर्षे वाट पाहणे आवश्यक असते.

असा कायदा आणणे सहज शक्य आहे. अर्थात शांतताप्रेमी त्याला जोरदार विरोध करतीलच.

उनाड

धर्मांतराला व्होकल विरोध करणारे बहुसंख्य लोक ब्राह्मण (किंवा स्यूडो ब्राह्मण) असतात. त्यांचा विरोध मुख्यत्वे दोन कारणाने असतो, एकतर धर्मांतर झाले तर देवळात येणारी संख्या कमी होईल व आपले तूप कमी होईल , दुसरे म्हणजे आपली पायरी ओळखून असलेले दलित दुसर्‍या धर्मात गेले की बरोबरीला येऊन बसतात.

चलत मुसाफिर

माझ्याबद्दल छटाकाची माहिती नसतानाही तुम्ही ज्या खात्रीने विधाने करीत आहात ते वाचून मौज वाटली.

Bhakti

काहीही...
धर्मांतर झालेल्या स्त्रियांनी मरण यातना सहन कराव्यात आम्ही आपलं चातुर्वर्ण्यच तुणतुणं वाजवत नाही.
Shame Shame

Bhakti

*चातुर्वर्ण्यच तुणतुणं वाजवत राहू

आंद्रे वडापाव

तर धर्मांतर न झालेल्या (हिंदू ) , किती टक्के विवाहित स्त्रियांना,
लग्नानंतर मरण यातना सहन कराव्यात लागत नाही ?
काही विदा आहे की नुसतं तुणतुणं....

Bhakti

माझ्या धर्माने अशा स्त्रियांना अशा लग्नातून बाहेर पडण्यासाठी मुभा दिलीये.
हट्.. परत वड्याचं तेल वांग्यावर बाई.
(बोलण्यात काही अर्थ नाही)

आंद्रे वडापाव

माझ्या धर्माने अशा स्त्रियांना अशा लग्नातून बाहेर पडण्यासाठी मुभा दिलीये.

बरं मग दुसऱ्या धर्मितील स्त्रियांना लग्नातून बाहेर पडण्यासाठी मुभा दिली नसते का ?

बोल्याण्यात अर्थ हा, विदा देवून मुद्दा सांगणारा असेल तर असतो.

डोक्यावर पडलेली कोणतीही व्यक्ती , सरसकट काहीही ठोsकुन
मोकळी होते..

अथांग आकाश

भक्तीताई you too? Shame Shame
एकतरी सन्माननीय मिपा लेखक या फालतु धाग्यावर व्यक्त झाला आहे का? याचा थोडा विचार करा!
0

उनाड

एकाही मुद्याला कुणी स्पर्श केला नाही

आंद्रे वडापाव

एकाही मुद्याला कुणी स्पर्श केला नाही

आणि कोणी करणार ही नाही. इथे..
कारण व्हॉटसअप वरील वाचन करून , विचार कक्षा रुंदावल्या जाण्याला एक लिमिट आहे... त्यात मुद्देसूद प्रतिवाद सोडा...
सायबर पाठशाळेतुन जे आणि जेवढ पढवले जाते.. ते आणि तेवढाच गाळ इथ तरंगनार..

उनाड

जे जे आपणासी ठावे।
ते ते इतरांसी सांगावे।।
शहाणे करून सोडावे ।
सकल जन ।।

या उक्तीप्रमाणे मी इथे लिहिले आहे

श्रीगुरुजी

या धाग्यात कोणता मुद्दा किंवा कोणते मुद्दे आहेत ते सांगावे. ते सांगितल्यानंतर प्रतिवाद करता येईल.

समजा या धाग्यात एखादा मुद्दा सापडला तर त्या मुद्द्यासमर्थनार्थ पुरावे आणि विदा आहे का ते तपासावे. नसल्यास इतरांना विदा मागत फिरण्याऐवजी धागाकर्त्याला विदा मागावा.

उनाड

१ केंद्र सरकार ने लव्ह जिहाद नावाचे काही नाही असे लेखी उत्तर दिले आहे.
२ मोठा गाजावाजा करून महाराश्ट्र सरकार ने आंतर धर्मीय ( आधी आंतर जातीय ही होते) विवाहाच्या तक्रारीसाठी समीती स्थापन केली, तीन महिन्यात एकही तक्रार आली नाही.

श्रीगुरुजी

धाग्यात लिहिलंय की "लव्ह जिहाद ही एक उच्चवर्णीय फँटसी आहे". या दाव्यासमर्थनार्थ पुरावे व विदा द्यावा. अन्यथा दावा मागे घ्यावा.

श्रीगुरुजी

आपण केलेल्या दाव्यासमर्थनार्थ पुराव्यांची व विदाची प्रतीक्षा करतोय.

आंद्रे वडापाव

फँटसी काहीही असू शकते.. त्याला पुरावे लागत नाही.. अच्चे दिन आयेंगे...
१५ लाख अकाऊंट वर देऊ..शेवटी कल्पनाविलासच तो
आणि भक्त चाहता वर्ग ते डोळे मिटून मानतो.. कारण त्यांनी मेंदू बाजूला काढून ठेवलेला असतो. आणि त्यांच्याबद्दल काहीच तक्रार नाही,
पण
ज्यांना वाटतं आपण आपली स्वतची बुद्धी वापरून चिंतन मंथन वैगरे करून मत बनवतो.. त्यांनी
लव जिहाद ही फँटसी/कल्पनाविलास नसून ..
फॅक्ट /वस्तुस्थिती आहे असे सप्रमाण सिद्ध करायला हवं...
असं साधं सोपं धागाकर्त्याचे म्हणणे असावे...

श्रीगुरुजी

१५ लाख देणार असे पसरविणे हीच एक फँटसी होती कारण देणार असे सांगितल्याचा शष्प पुरावा नव्हता. म्हणजेच १५ लाख देणार असे विरोधकांनी सांगणे हाच कल्पनाविलास होता.

श्रीराममंदिर निर्माण, ३७० कलम कचऱ्यात फेकणे, तोंडी घटस्फोट बंदी, पाकिस्तानात घुसून हल्ले, चीनला तोडीस तोड उत्तर इ. अच्छे दिन आहेत. म्हणजेच ही फँटसी नसून वस्तुस्थिती आहे.

आणि भक्त चाहता वर्ग ते डोळे मिटून मानतो.. कारण त्यांनी मेंदू बाजूला काढून ठेवलेला असतो.

बरोब्बर. मोदींच्या नावाने विरोधकांनी पसरविलेले खोटे आरोप खरे आहेत असे कॉंग्रेस भक्त चाहता वर्ग डोळे मिटून मानतो, कारण त्यांनी मेंदू बाजूला काढून ठेवलेला आहे.

ज्यांना वाटतं आपण आपली स्वतची बुद्धी वापरून चिंतन मंथन वैगरे करून मत बनवतो.. त्यांनी
लव जिहाद ही फँटसी/कल्पनाविलास नसून .. फॅक्ट /वस्तुस्थिती आहे असे सप्रमाण सिद्ध करायला हवं...
असं साधं सोपं धागाकर्त्याचे म्हणणे असावे.

आपण धागा नीट न वाचताच उड्या मारीत आहात.

मुळात या धाग्यात कोणताही मुद्दा नसून, "लव्ह जिहाद ही फक्त एक उच्चवर्णीय फँटसी आहे" हा पूर्ण असत्य व एकमेव दावा आहे. याव्यतिरिक्त धाग्यात काहीही नाही. धागाकर्त्याने या एकमेव दाव्यासमर्थनार्थ शष्प पुरावा आणि विदा दिला नाही आणि इतरांना विदा मागत सुटलाय कारण हा दावाच मुळात बोगस आहे.

मला एका प्रतिसादासंदर्भात विदा मागण्यात आला आणि माझ्यावर उपरोधिक लिहिले गेले. मी तातडीने विदा दिल्यानंतर विदा मागणारा परत या धाग्यावर फिरकलाच नाही.

लव्ह जिहाद ही कटु वस्तुस्थिती अनेकांनी पुराव्यासहीत समोर आणली आहे. परंतु धागाकर्त्याचा मूळ उद्देश ब्राह्मणद्वेष ओकणे एवढाच आहे व तो शेवटी उघडही झाला आहे.

आपण धागा पुनश्च वाचावा व धागाकर्त्याने केलेल्या एकमेव असत्य दाव्याचे पुरावे व विदा मागावा आणि नंतर इतरांवर आगपाखड करीत त्यांच्याकडे विदा मागावा.

उनाड

इंग्रजीत सांगाअयचे तर

The burden of proof lies with someone who is making a claim, and is not upon anyone else to disprove.

'लव्ह जिहाद' आहे , असा दावा जे करतात त्यांच्यावरच ते सिद्ध करायची जबाबदारी असते.

श्रीगुरुजी

लव्ह जिहाद ही एक एक उच्चवर्णीय फँटसी आहे. असे काही अस्तित्वात नाही.

हा आपलाच दावा आहे की अजून कोणाचा आहे?

Then the burden of proof lies with you because you made this claim, and is not upon anyone else to disprove.

तस्मात् आपण केलेल्या दाव्यासमर्थनार्थ पुरावे व विदा द्यावा. अन्यथा दावा मागे घ्यावा.

उनाड

१ लव्ह जिहाद नावाचे काही अस्तित्वात नाही.
२ तरीही हा बागुलबुवा सतत सोमी वर फिरत ठेवणारे बहुसंख्य लोक उच्चवर्णीय असतात.

आग्या१९९०

१ लव्ह जिहाद नावाचे काही अस्तित्वात नाही.

भारत सरकारने लव्ह जिहादची एकही केस नोंदवली गेली नाही असे संसदेत सांगितले आहे. त्यामुळे केरळमध्ये असा प्रकार झाला हे खोटे ठरते.

आंद्रे वडापाव

This story is from February 05, 2020
INDIA
‘Love jihad’ not defined under laws, no case reported: Government
TNN | Feb 5, 2020, 03:01 IST

NEW DELHI: The home ministry on Tuesday said the term ‘love jihad’ — popularly used to describe cases of allegedly forced inter-faith marriages — was not defined under existing laws and no such case had been reported by any central agencies.

In reply to a question by LS MP Behanan Benny asking if the government was aware of Kerala HC’s observation that there was no case of ‘love jihad’ in the state, junior home minister G Kishan Reddy referred to Article 25 of the Constitution, which provides for freedom to profess, practice and propagate religion subject to public order, morality and health.

श्रीगुरुजी

सायबर कायदा येण्यापूर्वी आंतरजाल, सामाजिक माध्यमे यांचा वापर करून केलेले गुन्हे फसवणूक, कलम ४२० या कलमांखाली नोंदले जायचे. कालांतराने सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार उघडकीस आल्यानंतर अधिकृत सायबर कायदा अस्तित्वात आला.

लव्ह जिहाद या प्रकारचे गुन्हे पूर्वी बहुतांशी बाहेर येतच नव्हते कारण लग्नात झालेल्या फसवणुकीविरूद्ध क्वचितच मुलगी तक्रार करायची. एखादीने तक्रार केली तरी मुस्लिमाने हिंदू असल्याचे नाटक करून हिंदू मुलीचे धर्मांतर करून लग्न करणे याविरूद्ध कायदाच नव्हता. मुस्लिमाचे आधीच लग्न झाले असले तरी मुस्लिमांना चार लग्ने करण्याची अनुमती असल्याने हा याविरूद्ध सुद्धा गुन्हा नोंदविणे शक्य नव्हते. तस्मात् २०१९ पर्यंत या गुन्ह्याविरूद्ध तक्रार आढळणे अवघड आहे.

सुदैवाने मागील २-३ वर्षात हरयाणा, हिमालय प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश अश्या काही राज्यांमध्ये लव्ह जिहाद या विशिष्ट गुन्ह्याविरूद्ध कायदा केलेला आहे व त्या कायद्यानुसार शेकडो गुन्हे दाखल झाले आहेत. कालांतराने या गुन्ह्याविरूद्ध सर्व राज्यात व केंद्रात कायदा येईल.

चौकस२१२

चला नाही ना असे काही अस्तित्वात .. मग चला दुपारच्या नमाजाला

श्रीगुरुजी

कोणतेही पुरावे आणि विदा न देता परत परत तेच तुणतुणं.

आधी पुरावे आणि विदा दाखवा. नाहीतर खोटे आरोप मागे घ्या.

चौकस२१२

आणि सर्वात मोठा मुद्दा हा फक्त लव्ह जिहाद नाही तर एकूणच अमिश दाखवून धर्मांतर हा आहे
प्रत्येक वेळी ते सिद्ध करणे हि अवघड असते त्यामुळे या लिबरल नंदूचे फावते

चौकस२१२

तरीही हा बागुलबुवा सतत सोमी वर फिरत ठेवणारे बहुसंख्य लोक उच्चवर्णीय असतात.
हो ना हिंदू उच्चरवर्णीय हलकटच हो उगाचच पानिपतला जाऊन युद्ध करा बसलाय पुड्या सोडतात आणि १ लाख बागंडी फुटायला कारणीभूत होतात ... असो
पण मग मग तालिबान ने अफगाणिस्तानांत बामियान चे बुद्ध पाडले तेवहा केले ते काय , उरसाचा प्रसाद वाटला होता बुद्ध धर्मावरील प्रेम म्हणून ?
https://www.youtube.com/watch?v=dBk5-zRUuNQ
https://www.youtube.com/watch?v=r_1kQXeaOk4
https://www.youtube.com/watch?v=1Xkfwqkw_YE

श्रीगुरुजी

आता या माणसाचा मुखवटा पूर्ण उतरून खरा चेहरा उघडा पडलाय. लव्ह जिहाद हा धाग्याचा विषय केवळ ढोंग होते. खरा विषय ब्राह्मणद्वेष आहे. आव्हाड, मिटकरी, कोकाटे वगैरे जातीद्वेष्टे ट्विटरवर सातत्याने याच स्वरूपाचे ब्राह्मणद्वेषी लिहीत असतात. हीच गरळ ओकण्यासाठी याने हा धागा काढला आणि शेवटी ब्राह्मणद्वेषाची गरळ ओकलीच.

Trump

आता या माणसाचा मुखवटा पूर्ण उतरून खरा चेहरा उघडा पडलाय. लव्ह जिहाद हा धाग्याचा विषय केवळ ढोंग होते. खरा विषय ब्राह्मणद्वेष आहे. आव्हाड, मिटकरी, कोकाटे वगैरे जातीद्वेष्टे ट्विटरवर सातत्याने याच स्वरूपाचे ब्राह्मणद्वेषी लिहीत असतात. हीच गरळ ओकण्यासाठी याने हा धागा काढला आणि शेवटी ब्राह्मणद्वेषाची गरळ ओकलीच.

+१
त्या माणसाने सगळ्या सुशिक्षित आणि हिंदु लोकांवर गरळ ओकली आहे.

भीमराव

मिसळपाववर सुरुवातीला ज्यावेळी मी सदस्य झालो त्यावेळी मी सेक्युलर विचारसरणीचा होतो‌. अंगात किडा म्हणून म्हणा किंवा सेक्युलर पणाची हद्द म्हणा पण मी कुराण वाचलं. त्यानंतर मला दहशतवाद (याला खरंतर कुराणवाद म्हणायला हवं - तुम्ही नुसते देवाला मानणारे असला तरी माझ्या पुस्तकातल्या देवाला का मानत नाही म्हणून जीव घ्यायचा अधिकार देणाराला दुसरं काय म्हणणार), लव जिहाद, सक्तीची धर्मांतरे, काश्मीर किंवा इतर ठिकाणी होणाऱ्या धार्मिक हकालपट्टीची मुळे कुराणातच आढळून आली. त्यानंतर मी इस्लाम पुरता माझा पुरोगामी विचार सोडून दिला. हिंदू धर्मात लाख त्रुटी असतील पण एक गोष्ट चांगली आहे, हिंदू धर्म प्रवाही आहे. इथं नवा विचार मान्य आहे, धर्म सुधारणा मान्य आहे, धर्मावर, देवावर प्रश्नचिन्ह मान्य आहे. तुमचं नास्तिक असनं मान्य आहे, एकेश्वरवाद अनेकेश्वरवाद, सगळं मान्य आहे. तुम्हाला हिंदू व्हायला वेगळा विधी नाही, तुम्ही ज्या दिवशी स्वतःला हिंदू समजायला सुरू करावं, हिंदू पद्धतीने (कोणत्याही- शैव वैष्णव, वारकरी, दत्त, शाक्त, मराठी, उत्तर भारतीय, अगदी कोणत्याही) त्या दिवसापासून तुम्ही हिंदू (कर्नाटक राज्यात हिंदू सिद्दी आहेत). उद्या तुम्ही स्वतः एखाद्या पंथाची स्थापना करु शकता. तुम्ही मुसलमान झाला तर त्या धर्मात राहुन दुसरा पंथ काढला तर मान कापुन टाकतील. लव जिहाद चं असं आहे, मुसलमानांची कुराण आणि हदिस आदेशानुसार पद्धत आहे की तुम्ही ज्या देशात राहता तो देश मुसलमान करने हि तुमची नैतीक जबाबदारी समजावी, तुम्ही अल्पसंख्याक असाल तर लोकसंख्या वाढवावी (शक्य त्या प्रत्येक पद्धतीने) आणि बहुसंख्य व्हावे. बहुसंख्य झाला की देश कब्जा करावा आणि इस्लाम ची व्याप्ती वाढवावी. त्यासाठी मग लव जिहाद करा, किंवा कापाकापी करा.

भीमराव, बर झालं हे लिहिलं तुम्ही. एक वेळ मिस्लिम लोक कुराण मध्ये हे असल काही आहे हे मान्य करतील परंतु ज्या हिंदूचा कुराणाचा अभ्यास आहे असे लोक कधीही मान्य करणार नाहीत. जे लोक धर्मासाठी आपल्या आणि अन्य धर्मीयांचा जीव घेऊ शकतात त्यांच्यासाठी लव जिहाद म्हणजे फारच किरकोळ आहे.

Trump

भीमराव, बर झालं हे लिहिलं तुम्ही. एक वेळ मिस्लिम लोक कुराण मध्ये हे असल काही आहे हे मान्य करतील परंतु ज्या हिंदूचा कुराणाचा अभ्यास आहे असे लोक कधीही मान्य करणार नाहीत.

सहमत. मुस्लीम हा एकाच वेळी सेक्युलर / सर्वधर्मप्रेमी / सर्वधर्मसमानता वाला असुच शकत नाही - असे एका तबलिगी जमातमधील अनुयायाने सांगितले होते.

वडगावकर

अगदी सहमत भीमराव... अनेक विचारी व्यक्ती इस्लाम सोडत आहेत (एक्स-मुस्लिम) त्यातला एक एक्स मुस्लिम साहिल अनेक लिब्रान्डु आणी स्युडो शेखूलर लोकांच्या अध्ययना साठी खाली लिंक देतोय )
https://www.youtube.com/channel/UCjk7V7Rw2jJSflLXYxBOY0g

(आता माझा स्वतः चा अनुभव , २००७ साली मी सौदी अरेबियात , अल-जुबेल सिटी , एक केरळी , एक कोकणी आणी एक पेशावरी अश्या तीन लोकांनी ईस्लाम मध्ये ओढण्याचा दोन मार्गानी प्रयत्न केला होता- अतिशय मिठास वाणी आणी हिंदू धर्मा बद्दल बुद्दिभेद , त्यातल्या कोकणी इसमाने मला कुराणाची मराठी प्रत दिली होती , समग्र वाचन केलं, सुराः अत-तौबा श्लोक -५ अनेक वेळा वाचून काढला )[मग जेव्हा निषिद्ध महिने लोटतील तेव्हा त्या अनेकेश्वरवादींना ठार करा, जेथे सापडतील तेथे त्यांची नाकेबंदी करा व प्रत्येक पातळीवर त्यांचा समाचार घेण्यासाठी सज्ज रहा. मग जर त्यांनी पश्चात्ताप केला व नमाज कायम केली आणि जकात दिली तर त्यांना सोडून द्या. अल्लाह क्षमाशील आणि दया दाखविणारा आहे.]
  

आंद्रे वडापाव

मतदारांनी मजाक माजाक मे खरंच बजरंग बली चे नावं घेवून बटण दाबले की काय... भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही...
त्याचबोबरीने लव्ह जिहाद ही पळवून लावली....

आंद्रे वडापाव

मतदारांनी मजाक माजाक मे खरंच बजरंग बली चे नावं घेवून बटण दाबले की काय... भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही...
त्याचबोबरीने लव्ह जिहाद ही पळवून लावली....

bhoot

कपिलमुनी

महाराष्ट्र आणि मध्या प्रदेश रडीचा डाव खेळून सत्ता मिळवली आहे.
ते काढल्यास हाती कटोरा राहतो

चौकस२१२

"बहुसंख्य व्हावे. बहुसंख्य झाला की देश कब्जा करावा "
जी लोक स्वतःला पुरोगामी म्हणत सतत " हे आणि ते बामणांचे कारस्थान असा कंठशोष करीत असतात " त्यांना हे समाजत नाही कि जिहादी हातात तलवार घेऊन आले तर ते हे बघणार कि समोरचा जोशी आहे पाटील आहे कि काम्बळे ? त्यांच्या दृष्टीने हे सर्व काफीरच कि

श्रीगुरुजी

अखिला प्रकरणात हेच झाले.

आईवडील पुरोगामी साम्यवादी विचारांचे. त्यामुळे मुलीला धर्म, देव, अध्यात्म यापासून कटाक्षाने दूर ठेवले. मेंदूत कदाचित अध्यात्मासाठी एखादा कोपरा ठेवलेला असावा जो या मुलीच्या मेंदूत रिकामाच राहिला. शिक्षणासाठी वसतिगृहात गेल्यानंतर बरोबर कट्टर धार्मिक मुस्लिम मुलगी होती. तिचा भाऊ वारंवार भेटायला यायचा. बहीणभावाने योजनापूर्वक मेंदूच्या रिकाम्या जागेत मुस्लिम तत्वज्ञान भरले. मुलीने धर्मांतर करून बरोबर राहणाऱ्या मुस्लिम मुलीच्या भावाशी लग्न केले आणि पुरोगामी नास्तिक साम्यवादी आईवडीलांचे डोळे खाडकन उघडले. मग लग्नाविरूद्ध न्यायालयात गेले. पण उपयोग झाला नाही.

काय मिळविले यापुरोगामी आईवडीलांनी नास्तिक तत्वज्ञान मुलीच्या मेंदूत भरून?

उनाड

हा विषय सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता. एकाद्या व्यक्तीने सर्व विचार करून स्वखुषीने धर्म सोडायचा निर्णय घेतला तर प्रोब्लेम काय आहे ? जे बरे वाईट परिणाम असतील ते ती भोगेल ना ? या न्यायाने आंबेडकरांनी केलेले धर्मांतरही चूक होते का?

श्रीगुरुजी

लव्ह जिहाद हे उच्चवर्णीयांचा कल्पनाविलास आहे या दाव्याचे पुरावे व विदा कोठे आहे? नसेल देता येत तर दावा मागे घेऊन माफी मागा.

चौकस२१२

या न्यायाने आंबेडकरांनी केलेले धर्मांतरही चूक होते का?
उनाड महोदय , आंबेडकरांचा विषयच काढला आहेत तर हे घ्या
१) आंबेडकरणसारख्या विचारवंताने स्वतः काही सामाजिक बदल घडावा म्हणून केलेले धर्मांतर आणि वेगवेगळ्या आमिषाने केले गेलेलं धर्मांतर यांची कशी बरोबरी करता?
२) आंबेडकरांना पाहिजे असते तर त्यांनीं ख्रिस्ती किंवा इस्लाम चा स्वीकार सहज केला असता .. त्यांनी तसे केले नाही! का ? कधी विचार केलाय ?

Trump

+१
त्याबरोबरच धागाकर्त्याने श्री आंबेडकर यांचे ईसाई आणि मुस्लीम रिलीजनबद्दलचे विचार वाचले तर बरे होईल.

Marathi_Mulgi

या न्यायाने आंबेडकरांनी केलेले धर्मांतरही चूक होते का?
>>>
फॉर लार्ज पार्ट ऑफ हिज लाईफ आंबेडकर हिंदू होते. त्यांनी हिंदूंमध्ये सुधारणा व्हावी, दलितांना माणुसकीची वागणूक मिळावी म्हणून अफाट प्रयत्न केले. त्यानंतरही जेव्हा मंदिर प्रवेशासारख्या गोष्टींसाठी दलित बांधवांची अडवणूक होताना दिसली तेव्हा त्यांनी धर्म बदलणार असे जाहीर केले. त्यासाठी त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला. त्यात त्यांना जो करुणामयी धर्म वाटला तो त्यांनी जाहीररित्या स्वीकारला. त्यासाठी त्यांनी काही नियम बनवले. या दरम्यान कित्येक व्यक्ती व संस्थांनी पुर्नविचार करण्यासाठी त्यांची भेट घेतली. त्यांना ते भेटले व त्यांचे विचार त्यांनी ऐकून घेतले.

आंबेडकरांसारख्या सुविद्य, काही तपे समाजकारण केलेल्या व्यक्तीने स्वेच्छेने केलेले धर्मांतर व अब्राहमीक धर्मात नॉन-अब्राहमीक जोडीदार मान्य नाही म्हणून सक्तीने करावे लागलेले धर्मांतर यातला फरक समजत नसेल तर कठीण आहे.

आंद्रे वडापाव

"लव्ह जिहाद" या शब्दांची व्युत्पत्ती कोणी केली, हे तपासून पाहिलं तर केरळ मधील क्रिश्चन धर्मगुरूंनी केली ( क्रिश्चन मुली आणि मुस्लिम मुलगा) संदर्भाने....

पण चाणाक्ष वाचकांना माहिती असेलच, सर्वोच्च नेते आणि त्यांचे भक्त चाहते यांनी नेहमीपरमाणेच , दुसऱ्याचे ढापून
चोरण्याचे पिढ्यानपिढ्या ची परंपरागत जन्मजात सवय दाखवून दिली...

सुखी

वर तर उनाड म्हणत आहेत की हा शब्द उच्चवर्णीय लोकांचा कांगावा आहे म्हणून... अर्थात पुरावे काही देत नाहीयेत यामुळे ते धादांत खोटे असायची शक्यता जास्त.

पण तुम्ही ही व्युत्पत्ती सांगितली, त्यावरून हे लक्षात येतं की भारतातले क्रिश्चन जागे झाले पण अजून हिंदू(?) जागे झाले नाहीत तर उच्च नीच वर्णीय कांगावे हेच खेळण्यात मग्न आहेत

श्रीगुरुजी

उच्चवर्णीय, ख्रिश्चन धर्मगुरु, मोदींचे समर्थक यापैकी नक्की कोणाचा हा कल्पनाविलास आहे हे समजत नाही.

उनाड

कोणत्याही धर्माच्या धर्मगुरूंना आपले बकरे इतर धर्मात जाऊ नये असे वाटत असतेच. हा कल्पना विलास ख्रिस्ती धर्मगुरूंनी सुरू केला व मग (काही) हिंदुनी उचलला असे म्हणता येइल. लव्ह जिहाद विरोधी मोर्चे कोणत्या संघटना काधत आहेत हे पाहिले तरी पुरे.

श्रीगुरुजी

लव्ह जिहाद हे उच्चवर्णीयांचा कल्पनाविलास आहे या दाव्याचे पुरावे व विदा कोठे आहे? नसेल देता येत तर दावा मागे घेऊन माफी मागा.

श्रीगुरुजी

वर तर उनाड म्हणत आहेत की हा शब्द उच्चवर्णीय लोकांचा कांगावा आहे म्हणून... अर्थात पुरावे काही देत नाहीयेत यामुळे ते धादांत खोटे असायची शक्यता जास्त.

धादांत खोटंच आहे ते. उच्चवर्णीय (म्हणजे ब्राह्मण) द्वेष हे यामागील प्रमुख कारण आहे।

चौकस२१२

आंद्रे ...चला हे तर मान्य केलंत कि ख्रिस्ती लोकांना सुद्धा इस्लामी धर्मांतरबद्दल नाराजी होती .. मग ती हिंदूंना असली तर काय चुकलं?
आणि हिंदूंना म्हणजे सर्व हिंदूंना जातीचा संबंध नाही

शलभ

आमच्या घरी एक मावशी होत्या कामाला. लग्नाआधी हिन्दू नंतर मुस्लीम. त्यांची सून आलेली एक-दोन वेळा. तीची पण सेम केस. लग्नाआधी हिन्दू नंतर मुस्लीम. दोघीही घरकाम करायच्या. लव जिहाद चा सिन होता का ते माहीत नाही.

भीमराव

बकरे? मुळात हिंदूंना धर्मगुरू आहे का? शंकराचार्य म्हणाल तर त्यांना कोणी धर्मप्रमुख मानत नाही. पंथप्रमुख किंवा संप्रदाय प्रमुख खुप आहेत. इथं आहेत त्यांच्या कडे निट लक्ष नाही त्यामुळे आपले बकरे कमी होतात म्हणून धर्मगुरू नि कांगावा सुरू केला हा युक्तिवाद काही पटत नाही बुवा. धर्मावर नंतर येऊ आधी मुस्लिम पर्सनल लॉ काय आहे ते समजून घेतलं तरी तुम्हाला पडलेल्या निम्म्या कोड्याचं उत्तर तिथंच सापडतंय बघा.

श्रीगुरुजी

याच माणसाने खालील तारे तोडले आहेत.

- धर्मांतराला व्होकल विरोध करणारे बहुसंख्य लोक ब्राह्मण (किंवा स्यूडो ब्राह्मण) असतात. त्यांचा विरोध मुख्यत्वे दोन कारणाने असतो, एकतर धर्मांतर झाले तर देवळात येणारी संख्या कमी होईल व आपले तूप कमी होईल , दुसरे म्हणजे आपली पायरी ओळखून असलेले दलित दुसर्‍या धर्मात गेले की बरोबरीला येऊन बसतात. -

आफले बकरे कमी होतील म्हणून धर्मगुरूंनी कांगावा सुरू केला, धर्मांतर झाले तर आपले तूप कमी होईल म्हणून ब्राह्मणांनी विरोध व कल्पनाविलास सुरू केला असले तारे तोडलेत. बरं, याविषयीचे पुरावे व विदा शून्य. अनेकदा मागूनही पुरावे व विदा देत नाही कारण मुळातच सर्व खोटारडेपणा आहे. हा खोटारडा व ब्राह्मणद्वेषी आहे हे अनेकदा चघड होऊनही काही जण याची हिरिरीने पाठराखण करताहेत. धन्य आहे.

वडगावकर

सुरा : अल-निसा , आयत :२५
आणि तुमच्यापैकी जर एखाद्याची इतकी ऐपत नसेल की त्यांचा सद्वर्तनी मुसलमान स्त्रियांशी विवाह होईल तर त्याने तुमच्या त्या दासींपैकी एखादीशी विवाह करावा ज्या युद्धामध्ये तुमच्या ताब्यात आल्या असतील व त्या श्रद्धावंत असतील. परंतु जर तुम्ही संयम पाळाल तर हे तुमच्यासाठी उत्तम आहे, आणि अल्लाह क्षमा करणारा व परम कृपाळू आहे.

श्रीगुरुजी

उनाड,

लव्ह जिहाद हे उच्चवर्णीयांचा कल्पनाविलास आहे या दाव्याचे पुरावे व विदा कोठे आहे? नसेल देता येत तर दावा मागे घेऊन माफी मागा.

याविषयी अनेकदा विचारले आहे, परंतु कोणतेही पुरावे आणि विदा न देता ब्राह्मणमत्सरी पिचकाऱ्या का सुरू आहेत?

वारंवार ब्राह्मणद्वेषाची गुळणी थुंकण्याऐवजी पुरावे आणि विदा दिला पाहिजे.

नगरी

अरे खड्ड्यात गेले ते विदा , कायदे आणि पुरावे.
ज्याची जळती त्याला कळती .
माझ्या शेजारी, माझा घनीष्ट मित्र, कनिष्ट मध्यम वर्गीय , त्याची बायको मुसलमानाबरोबर पळून गेली.
दिल्ली गेट ला जिथे मी पहाटे रोज चहा पितो त्याची बायकोही पळाली.
हे खूप systematic चालले आहे.

तर्कवादी

१)

माझ्या शेजारी, माझा घनीष्ट मित्र, कनिष्ट मध्यम वर्गीय , त्याची बायको मुसलमानाबरोबर पळून गेली.

एखाद्या पुरुषाची बायको परपुरुषासोबत पळून गेली दी दु:खाची बाब आहे. पण तो परपुरुष मुस्लिम असल्याने दु:खं होतंय का ? तो हिंदू असता तर आनंद झाला असता का तुमच्या मित्राला ?

२)

हे खूप systematic चालले आहे.

हं... केरळ स्टोरी चित्रपट आधी आला असता तर या बायका पळून गेल्या नसत्या. नाही का ?
पण "लव्ह जिहाद" या संकल्पनेबद्दल तर गेले किमान २-३ वर्षांपासून लिहिलं / चर्चिलं जात आहे विविध ठिकाणी , या बायकांच्या वाचनात आलं नसेल का ? की या घटना जास्त जुन्या आहेत ? जास्त जुन्या असतील तर पुढे या बायकांचं आपापल्या प्रियकरासोबत सहजीवन (लग्न करुन वा न करता.. जे काही असेल ते) कसं होतं/आहे ? आतापर्यंत तलाक झालेत की फ्रीजमध्ये गेल्यात या बायका ?

आंद्रे वडापाव

बायका सांभाळायला त्या काय मेंढरं आहेत का ? :)
बाकी काही प्रतिसाद वाचून असं वाटलं की
"आपल्याला कोणी फसवतोय भुलवतोय याची बायकांना काही म्हणजे काssही आयडिया नसते ... जी काय अक्कल असते ना भलं बुर ओळखायची .. ती या प्रतिसादकर्त्या पुरुषांनाच असते"...

चौकस२१२

लव जिहाद सुधा जाऊद्या .. जे मुसलमान साधारण पणे फार धार्मिकते कडे झुकणार नाहीत त्यांना आणि त्यातील तरुणांना "धार्मिकशिक्षणात जास्त गुंतवणूक करून जास्त कडवे बनवण्याचा पण कार्यक्रम असतो
मी स्वतः बघितले आहे
निम शहरी आणि छोट्या गावातून पूर्वी तरी तसा एकोपा असायचा , म्हणजे दिवाळीत गावातील अब्दुल चाचा हि पण उद्योग म्हणून फटाके विकण्याचे काम करणार, पशिचम महाराष्ट्रात जसे खाटीक कुरेशी तसेच मुसलमान बागवान .. मग ते हिंदू संस्थंना पण भाजी पुरवणार , हिंदू संस्था पण डोळे झाकून त्याच्या कडून घेणार इत्यादी ..
असच एका निमशहरी वातवरणात एक चाचा यांची ३ तरुण मुले गाड्या भाड्याने देण्याचा वयवसाय करायाचे, अर्थातच त्यांचे बहुतेक गिर्हाईक हिंदू, शिवाय ३-४ दिवसांची सहल असली कि हिंदू कुटुंबांबरोबर राहावे ला गे .. लहानपणी चाचांचा एक मुलगा नेहमी आमच्या सहलीत ड्राइवर म्हणून असायचा.. तो अगदी टापटीप ऱ्हायचा , त्याचे टोपण नाव राजकुमार, धर्म कोणता हे कळणार पण नाही त्याचं पेहरावावरून ... बरेच वर्षांनी गावी गेलो आणि दुपारी त्याला फोन करून बोलवले म्हणले उद्या आपल्याला फिरायला दोन दिवस जायचे आहे,, दुसर्या दिवशी मी वेळेवर बाहेर अंगनात वाट बघत होतो .... बराच वेळ झाला राजकुमार काही दिसला नाही ... बाबानं विचारला तर ते म्हनाले कि असेल आलेला , टपरी वर गेला असेल .. म्हणून मी फिरत टपरी वर गेलो...; तर एक पूर्ण पठाणी वेष धारण केलेला , लांब दाढी वैगरे "राजकुमार" समोर.... मला आश्चर्य वाटलं.. .. दोन दिवसाच्या सहलीत त्याने बरेच काही भोळे पणा ने सांगून टाकले .. म्हणाला आमच्या समाजातील काही लोक आले त्यांनी मला मलेशियात धार्मिक शिक्षणासाठी पाठवले ३ महिने राहिलो ... माझ्या बरोबरीच्या काहींनी तिकडे लग्न पण जुळवली ... इत्यादी .. नंतर जवळचं दोन तीन गावामधून त्याने काही समाजाची नवीन झालेली वसतिगृहे / मशिदी दाखवल्या. एवढे पैसे आले कुठून? हा भाग काह केरळ किंवा गोवा नाही कि जेथून बरेच लोक गल्फ ला जाऊन गावी पॆसे पाठवतात ...
मुद्दा काय कि हा वहाबी पणा नेण्याचा एक व्यस्थित कार्यक्रम आहे .. या आधी पूर्व आशिया तील देश कसे अरबी पद्धती स्वीकारू लागले आहेत ते लिहिले आहेच.. एकूण काय पण स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेणाऱ्या हिंदू "ब्लीडींग हार्ट " वाल्यांना हे काही मुद्डमून लक्षात घ्यायचं नाहीये ....

Trump

सदर धागा हा हिंदुना दुखवण्यासाठी आणि आगपाखड करण्यासाठी तयार केला आहे. धागाकर्त्याचे बरेचसे प्रतिसाद विनाकारण वादविवाद सुरु करणे आणि मुळ मुद्याला उत्तर न देणे, अशा प्रकारचे आहेत.
त्यामुळे ह्या धाग्यातुन काहीही भरीव साध्य होणार नाही.
--
सबब हा धागा वाचनमात्र करण्यात यावा हि मिपा प्रशासनाला नम्र विनंती.
(हा धागा हटवल्यास धागाकर्त्याला उत्तरांसाठ्याची प्रतिसादांना इतर अभ्यासु लोक मुकतील, त्यामुळे हा धागा तसाच ठेवावा)

आग्या१९९०

जी काय अक्कल असते ना भलं बुर ओळखायची .. ती या प्रतिसादकर्त्या पुरुषांनाच असते"...

शंकाच नाही.
साम्यवादी संस्कार केलेल्या आपल्या मुलीच्या मेंदूतील अध्यात्माचा कोपरा रिकामा राहिल्याने इस्लामिक तत्वज्ञान घुसवायला सोपे जाते. त्यामुळे लव्ह जिहाद, धर्म परिवर्तन,आयसिस प्रवास सुरळीत होतो. मुलाच्या मेंदूच्या धार्मिकतेचा कोपरा रिकामा रहात नसावा,त्यामुळे त्याचे इस्लामीकरण करता येत नाही.

सहज ओळखीतील लोकांना, लव्ह जिहाद ह्या थापा आहेत असे म्हटले तर काहीजण खवळून उठले. खवळलेले १००% उच्चवर्णीय होते. विदा मागू नये.

श्रीगुरुजी

विदा मागू नये.

कारण आम्ही बिनबुडाच्या थापा मारतो. विदा असलाच तर आम्ही देणार ना? ना आमच्याकडे विदा ना पुरावे, पण थापा मात्र भरपूर आहेत बुवा.

आग्या१९९०

पण थापा मात्र भरपूर आहेत बुवा.
ते विश्वगुरूंचे अधिकारक्षेत्र आहे.

आंद्रे वडापाव

चित्रपटातील हिरोईन देवोलिना भट्टाचार्जी ने गेल्या वर्षी तिचा बॉयफ्रेंड शाहनवाज शेखशी लग्न केलं. दोघांचाही संसार आनंदी चाललेला दिसतोय.

db

चौथा कोनाडा

असंबद्ध प्रतिसाद !
उगाच टीआरपी मिळवण्यासाठी खपाऊ फोटो.

या आधी कित्येक नटनट्या - हाय प्रोफाइल लोकांचे आंतरजातीय विवाह हे या जगाने पाहिलेत.
केरळ कहाणीत दाखवलेला लव्ह जिहाद हा वेगळा प्रकार आहे. धर्मांतर करण्यासाठीचे आणखी एक साधन !

श्रीगुरुजी

बरोबर. लग्न नुकतंच झालंय. लग्नानंतर पहिल्या वर्षात सर्वच जण नंदनवनात विहार करीत असतात.

आंद्रे वडापाव

हा विवाह लव्ह-जिहाद कशावरून नाही म्हणे ?

या आधी कित्येक नटनट्या - हाय प्रोफाइल लोकांचे आंतरजातीय विवाह हे या जगाने पाहिलेत.

आणि ते विवाह लव्ह-जिहाद कशावरून नाही म्हणे ?

आंद्रे वडापाव

हा विवाह लव्ह-जिहाद कशावरून नाही म्हणे ?

श्रीगुरुजी

नसणार, कारण लव्ह जिहाद उच्चवर्णीयांचा कल्पनाविलास आहे ना.

आंद्रे वडापाव

तुम्हाला मान्य आहे तर मग ! की हा उच्चवर्णीयांचा कल्पनाविलास आहे ते.

सुखीमाणूस

लव्ह जिहाद ही उच्चवर्णीयांची fantasy असा फक्त विचार न करता ह्या प्रश्नाच्या सामाजिक बाजू पण विचारात घेतल्या पाहिजेत.
हिंदू धर्मात मुलगा हवा या हट्टाने मुलीच्या जन्माला आडकाठी केली जाते. त्यामुळे हिंदू मुलांच्या लग्नासाठी वधू मिळणे अवघड होते.
त्यातून मुस्लिम मुलं जर हिंदू मुली लग्नासाठी गळाला लावायला लागले तर हिंदू अस्वस्थ होणारच.
आजकालच्या शिकलेल्या मुली स्वतःचा स्वार्थ समजणाऱ्या असतात. त्यांचे विचार पक्के असतात. अश्या मुली लव जिहादला बळी पडणे शक्य नाही. उलट अश्या मुलीनी जर मुसलमानांशी लग्न केले तर मुलीचं वठणीवर येतील. किंवा मुसलमान मुलाला त्राही भगवान करून सोडतील.

एक स्त्री म्हणून मला तरी मुसलमान पुरुष जोडीदार म्हणून निवडताना बरेच धोके दिसतात. बुरख्याची सक्ती होणे. सवत येऊ शकणे. कधीही तलाक ला सामोरे जावे लागणे. धार्मिक कट्टरतेला सामोरे जावे लागणे. इत्यादी. हिंदू धर्मियाशी विवाह केला तरी काही धोके असतीलच पण कायद्याने मी जास्त सुरक्षित असेन.
एक आरक्षण असलेल्या जातींमधली हिंदू मुलगी जर लग्न करून मुस्लिम झाली तर तिच्या मुलांना आरक्षणाचे फायदे मिळणार नाहीत. आरक्षित जातींमधील मुलींना हिंदू राहणे व आरक्षित जातींमधील नवरा शोधणे जास्त फायद्याचे आहे.
ज्या दिशेने भारताचे राजकारण चालले आहे त्यात भारतात मुसलमानांना आरक्षण किंवा धर्म बदलून मुसलमान झालेल्या आरक्षित जातीतील हिंदूंना त्यांचे जातीनिहाय आरक्षण मिळेल अशी व्यवस्था होणे शक्य आहे. पण मग अश्या वेळी मुसलमान धर्म सेक्युलर कसा ठरेल?

लव्ह जिहाद ही fantasy नसून समाज जागृती आहे. जसे स्त्रीमुक्ती चळवळीमुळे हिंदू स्त्रियांचे आयुष्य सुधारले तसे लव्ह जिहाद विरुद्ध जागृती करण्याचा चळवळीमुळे होत आहे. खूप घरातून पालक व मुलं यांमध्ये सुसंवाद नसतो. मुलंमुली चुकीच्या गोष्टींकडे ओढली जातात.
सैराट पिक्चर ने नाही का समाजातील काही प्रकारच्या समस्यांवर प्रकाश टाकला. तसेच काम kerala files हा movie करतो आहे. ख्रिस्ती व मुस्लिम लोक धर्मांतर करण्यासाठी हिंदू धर्मियांना विविध प्रकारे भुलवतात त्यामुळे हिंदू धर्म (अथवा जीवनपद्धती) हा शोषीत धर्म आहे. त्याच्या अनुयायांनी स्वतःच्या धर्माचे रक्षण करणे व त्यासाठी जागृती करणे अत्यावश्यक आहे.
अल्पसंख्य म्हणून मुस्लिम v ख्रिस्ती धर्माच्या लोकांना विशिष्ट सवलती मिळतात. हे धर्म खूप देशात पसरलेले आहेत व त्यांना भरपूर आर्थिक पाठबळ आहे. कुठलाही धर्म परिपूर्ण नाही. सगळ्या स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली आहे. हिंदू धर्म जीवनपद्धती भारतात उगम पावली आणि फक्त इथेच आहे. बाहेर उगम पावलेले आणि प्रसारासाठी आलेले धर्म टिकवण्यासाठी इथले लोक इतका आटापिटा का करतात हेच समजत नाही?