काथ्याकूट

हिंदू बहुसंख्य देशात अल्पसंख्याकांच्या कडे एवढी संपत्ती कशी ??

Primary tabs

हिंदू बहुसंख्य देशात अल्पसंख्याकांच्या कडे एवढी संपत्ती कशी ??

धर्म - एकूण लोकसंख्येपैकी प्रमाण
मुस्लिम धर्मीय - 9.8%
ख्रिस्त धर्मीय - 2.3%
जैन धर्मीय - 0.4%
पारशी धर्मीय - 0.006%

इंडिया - Gross Domestic Product - ₹270 लाख कोटी

धर्म प्रमुख उद्योग समूह revenue

पारशी - टाटा उद्योग समूह - ₹12 लाख कोटी

जैन - अडाणी उद्योग समूह - ₹2.6 लाख कोटी

मुस्लिम - विप्रो उद्योग समूह - ₹1 लाख कोटी

Rank Name Net worth (USD) Company Sources of wealth Religion

1 Mukesh Ambani 83.4 billion Reliance Industries Petrochemicals, telecom, retail ????
2 Gautam Adani 47.2 billion Adani Group Commodities, ports, power Jain
3 Shiv Nadar 25.6 billion HCL Technologies IT services and consulting ????
4 Cyrus Poonawalla 22.6 billion Serum Institute of India Vaccines Parsi
5 Lakshmi Mittal 17.7 billion ArcelorMittal Steel Jain
6 Savitri Jindal 17.5 billion JSW Group Steel, energy, cement and infrastructure Jain
7 Dilip Shanghvi 15.6 billion Sun Pharmaceutical Industries Pharmaceuticals Jain
8 Radhakishan Damani 15.3 billion Avenue Supermarts, DMartInvestments, retail Jain
9 Kumar Mangalam Birla 14.2 billion Aditya Birla GroupTextiles, telecom, cement Jain
10 Uday Kotak 12.9 billion Kotak Mahindra Bank Banking Jain
11 Azim Premji 9.2 billion Wipro Group IT services and consulting Muslim

विशेष सूचना -
अवांतर आणि वायफळ चर्चा करू नये हि नम्र विनंती.
जात आणि धर्म विषयि वादग्रस्त बोलणे टाळावे.
साभार - https://en.wikipedia.org/wiki/Main_Page.

अहिरावण

अवांतर आणि वायफळ चर्चा करू नये हि नम्र विनंती.

अख्खा धागाच अवांतर आणि वायफळ आहे, त्यावर काय घंटा चर्चा करणार?

आर्यना, अरे पिढ्यान पिढ्या व्यापार करणारीच मंडळी ती. आपल्या खापर पणजोबानी व्यापार सुरु केला असता, व्यापारानिमित्त मुलाना भारतभर-जगभर पाठवले असते तर आपणही १-२ बी एच केच्या पलिकडे जाउन विचार केला असता. जैन्,पारशी हे तर व्यापारात मुरलेले लोक.स्वातंत्र्य्पुर्व काळात ह्याच मंडळीनी ब्रिटिशांशी सहकार्य करुन आपला व्यापार वाढवला होता.

धन्यवाद माईसाहेब कुरसूंदीकर. प्रतिसादा बद्दल . ब्रिटिशांशी सहकार्य खुपच महत्वचा मुद्दा.

हिंदू/ मराठी समाजात एक विकृती आढळते. आपल्या धर्माचा किंवा भाषेचा माणूस असेल तर त्याच्या कडे खरेदी तो टाळतो.
म्हणून महाराष्ट्रातील बर्याच गावात मारवाडी किराणा दूकानदार सापडतोच. पुण्यात तर ९५ टक्के किराणा दुकानं मला मारवाडींची दिसली.

dadabhau

मारवाडींची नव्हे...मारवाड्यांची.....धुडे नव्हे धुळे !!! बाकी चालू द्या.

माहितगार

धागा लेखक आणि प्रतिसादकर्ते दोन्हीतही बर्‍यापैकी गैरसमज दिसताहेत जमल्यास वेगळा धागा लेख लिहीन.

अहिरावण

अर्थातच ! तुम्ही "माहितगार" आहातच.

अहिरावण

इंडिया - Gross Domestic Product - ₹270 लाख कोटी

धर्म प्रमुख उद्योग समूह revenue

पारशी - टाटा उद्योग समूह - ₹12 लाख कोटी

जैन - अडाणी उद्योग समूह - ₹2.6 लाख कोटी

मुस्लिम - विप्रो उद्योग समूह - ₹1 लाख कोटी

जीडीपी ची तुलना मार्केट कॅपशी??? अहाहा ! याला म्हणतात समाजवादी बुद्धी !!!

अहिरावण

तुलना तुमची चुकली आहे

चौकस२१२

Birla = जैन? मग बिर्लांनी हिंदू मंदिरे कशी बांधली ?

अहिरावण

जैन, बौध्द, हिंदू एकमेकांना सहाय्य करु असे होते, आहेत, असतील

घाण मध्ययुगात झाली

चौकस२१२

हो याची प्रचिती बाली मधील एका हिंदू मंदिरात आली.... मुखय मंदिराच्या प्रांगणात अजून ४ मंदिरे होती बाहेरून बांधणी / रचना सारखीच पण त्यातील एक बालीच्या बुद्धांचे होते ! ( वर्णाने ते चिनी- हांन वंशाचे दिसले , बाली वंशाचे नव्हेत - वर्ण म्हणजे येथे इंग्रजी तील "रेस" या अर्थी, कारण इंडोनेशियन भाषेत वर्ण चा अर्थ रंग असा होतो म्हणून उल्लेख केला सुक्ष्म फरक )

कॉमी

काहीही भंकस.
टाटा ग्रुपचे संस्थापक आणि चालक पारशी आहेत म्हणजे ती कंपनी पारशी होत नाही. पबलिक लिस्टेड कंपनी आहे ती. इतर कंपन्यांचे तसेच.

हे पारशी ऊद्योजक लोक इंग्रंजांसोबत मस्त मिळून मिसळून रहायचे. बरेच ऊद्योग धंदे ऊभे केले ह्यांनी, देश एका बाजूला स्वातंत्र्यासाठी लढत असतना ह्यांचं काहीतरी वेगळंच चालू होतं. अफूत चीनची एक पिढी नासवण्यात टाटा ऊद्योगसमुहाचा हात होता म्हणे.

अहिरावण

हो ना ! देश कधीतरी स्वतंत्र होईल तर पोलाद लागेल म्हणून स्टील फॅक्टरी काढली. देश लढत आहे पण स्वातंत्र्य मिळाल्यावर ज्या गोष्टी लागतील त्या आधीच तयारीला लागले होते पारशी. इंग्रजांशी मिळून मिसळून रहात त्यांची व्यापार पद्धत, लिमिटेड कंपनी, शेआर्स, संस्था समजून घेतलं. आज मुंबईत ज्या अनेक नावाजलेल्या संस्था आहेत त्या पारशांनीच स्थापन केल्या आहेत. आणि अफुचे काय हो.. आख्खी इस्ट ईंडीया कंपनी अफु आणि नीळ यावर तर चालायची. १९२० ला नार्कोटीक्स मुळे अफुवर बंदी घातली आणि अनेक देशांच्या सैन्याचा तो अधिकृत पैसे कमव्ण्याचा धंदा झाला. व्यापारी बाहेर पडले. अमेरीका अफगाणमधे आणि रशिया अफगाणमदे का गेली? अफुसाठी. हॉग्कॉग अफुचे मोठे केंद्र. असो तो वेगळा विषय

पारशी वेडे याबाबत सहमत.

मिळून मिसळून राहुन ह्यानी किती नि काय काय कमवले. दुख ह्याचे आहे कि देशाचा विचार करुन महाराष्ट्र ने (Maharashtra) काय मिळवले.

अहिरावण

बहुतांश उद्योग महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र अग्रेसर आहे

अतीशय मूर्खपणा असलेला धागा . कुठून तरी थोडी आणी नेमकी माहिती उचलायची आणी चालू करायची वायफळ चर्चा . ELECTION चे नवीन तर्कट चालू झाले आहे आजकाल. अशा लोकांपासून सावध.

इंग्रजांचाही गोदरेजवर विश्वास होता. कुलूप आणि चावी बनवताना त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आणि गोदरेजच्या नावानं भक्कम तिजोरी बनवायला सुरुवात केली. त्यामुळे त्यावेळी भारतावर राज्य करणारे इंग्रजही फॅन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोदरेज कंपनीच्या तिजोरीवरही ब्रिटिशांचा पूर्ण विश्वास होता. १९११ मध्ये किंग जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांनी दिल्ली भेटीदरम्यान आपल्या मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी गोदरेजच्या तिजोरीची निवड केली. देशात स्वदेशी चळवळ जोरात सुरू असताना कंपनीचे संस्थापक अर्देशर गोदरेज हेही त्याच्याशी जोडले गेले होते.