प्रत्येक नगरात एक भारतीय युद्ध नायकांचा स्मरणपथ आणि मैदान
Primary tabs
भारतीय योध्यांचे स्मरण असण्यासाठी प्रत्येक नगरात एक भारतीय युद्धवीरांचा स्मरणपथ आणि मैदान असावे यासाठी नगर नियोजन केले जावे. - असा कायदा व्हावा ही मागणी आहे. भारतीय युद्धवीरांचा सन्मान आणि स्मरण करण्यासाठी एक भव्य समर्पित असा किमान पाच किलोमिटर्सचा भव्य मार्ग असावा. याच्या दोन्ही बाजूंना भव्य वृक्ष असावेत. हा पथ एका किमान दहा एकर क्षेत्रफळ असलेल्या भारतीय युद्ध वीर स्मरण मैदानाला जाऊन मिळावा. हे मैदान मुलभूत सुविधायुक्त असावे. मैदानात स्थानिक वीरांचा फलक असावा.
युद्धातील वीरांनी भारताच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण बलिदान दिले आहे. प्रत्येक नगरात एक भारतीय युद्ध नायकांचा स्मरणपथ त्यांच्या शौर्याचे निरंतर स्मरण म्हणून काम करेल आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
ही जागा देण्यासाठी प्रस्तावित कायदा येत्या सरकारने केला पहिजे. कायद्यानुसार भारतातील भविष्यातील सर्व नगर नियोजन प्रकल्पांचा समावेश करणे आवश्यक आहे केले जावे. भारतीय युद्ध नायकांचा स्मरणपथ बनवतांना डिझाइन मार्गदर्शक तत्त्वे असावीत. ही तत्त्वे एकसमानता सुनिश्चित करतील. या किमान पाच किलोमिटर्सच्या मार्गामध्ये पुतळे, बसण्याच्या जागा, फलक किंवा योग्य चिन्हासह लँडस्केप केलेले क्षेत्र समाविष्ट केले जावे.
मैदानाचा आकार आणि इतर सुविधा सुविधा शहराचा आकार आणि लोकसंख्येच्या घनतेनुसार निर्धारित केल्या जातील. या जागेत खेळाचे मैदान, चालण्याचे मार्ग, सामुदायिक उद्याने किंवा कार्यप्रदर्शन क्षेत्रांचा समावेश असू शकतो.
केंद्र आणि राज्य सरकारे स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यासाठी आणि प्रारंभिक विकासासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी सहकार्य करतील.
स्वतंत्र खाते आणि नियोजित सरकारी अधिकारी लष्करी अधिकार्यांच्या सहभागासह या जागांच्या देखभाल आणि सतत विकासासाठी जबाबदार असतील.
हा प्रस्तावित कायदा देशभक्ती, सामुदायिक कल्याण आणि शाश्वत विकासाला चालना देईल अशी आशा आहे. भविष्यातील शहर नियोजनात युद्ध वीरांचे स्मारक आणि मोकळ्या जागा अनिवार्य करून, भारत आपल्या शौर्य स्मरणाचा वारसा आणि पाया तयार करू शकतो.
या प्रस्तावामध्ये काही तृटी आहेत का?
तुम्हाला अजून काही सुचते आहे का?
--
या विचाराचे कुणी व्यवस्थित प्रस्तावात रुपांतर करून देईल का?
कायद्यात रुपांतर होण्यासाठी हा प्रस्ताव कुणाला आणि कुठे आणि कसा पाठवला पाहिजे?
रोचक धागा आहे...
हा पैशांचा अपव्यय होईल असे मला वाटते, शिवाय टक्केवारीने राजकारणी पोसले जातील त्यापेक्षा ते पैसे सरळ दिवंगत सैनिकांच्या कुटूंबीयांच्या खात्यात जमा व्हावेत.
शहराच्या प्लॅनिंगमध्ये जे रस्ते बनणार आहेत त्यात एक रस्ता रुंदीने भव्य असून त्या दुतर्फा झाडे लावलेली असावीत आणि हा रस्ता एका मैदानाला जाऊन मिळावा. यात वेगळा रस्ता असावा वगैरे असा प्रस्ताव नाहीये. शहरातील रहदारीचा रस्ता चालेल पण त्यातला पाच किमी मार्ग हा स्मरणपथ म्हणून वेगळा असावा आणि हा एका मैदानाला मिळावा इतकाच प्रस्ताव आहे.
एक स्वतंत्र विषय आहे. त्यानुसार रस्ते,पुल,उड्डाण पुल,बाग,खेळाची मैदाने इत्यादी सर्व प्रकारचे नियोजन केले जाते.
युद्धविरांच्या स्मरणार्थ आणी सन्मानार्थ स्मरणपथ किंवा क्रीडांगण व्हावीत या साठी वेगळे असे काही कायदे, नियोजन करण्याची गरज नाही. शहर नियोजन आराखड्यात यांस प्राधान्य असावे.
पंचविसाव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तत्कालिन महाराष्ट्र सरकारने प्रत्येक हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या जन्मगावी एक हुतात्मा स्मारक उभारले. आज त्यातील काही प्रेक्षणीय तर काहींची दुरावस्था झाली आहे.
स्थानिक पातळीवर यावर काही प्रमाणात प्रयत्न केले जातात.
अमरेंद्र बाहुबली शी सहमत, हा पैशांचा अपव्यय ठरेल
संवेदनशील विषय.
सैनिक, नेते आणि मोठे लोक यांची स्मृती एखाद्या प्रतीकरुपात उरावी हा विचार देखील तसा रास्तच. पण मग त्यावर असे करता येईल की एका जागी मेमोरियल किंवा संग्रहालय उभारून त्यात अधिक अधिक पुतळे, माहिती, वस्तू वाढवत जाव्या. त्यातून पुढील पिढ्यांना नेहमी ही माहिती मिळवता येईल आणि सन्मान देखील जपला जाईल. वेगवेगळ्या जागी छोटी मोठी स्मारके झाली की त्यांचा मेंटेनन्स सतत करणे जमले पाहिजे. ते अनेकदा घडत नाही. मग सन्मान राहोच, अस्वच्छता, पडझड विटंबना होऊ शकते.
एरवी सार्वजनिक जागांना व्यक्तींची नावे देण्यापेक्षा त्या त्या जागांची मूळ रूढ नावे, परंपरा , दैवते, रंगसंगती किंवा नैसर्गिक वैशिष्ट्य यावरून नावे ही अधिक स्वाभाविक ठरतील.
उदा. काजूवाडी, धोबीतलाव, काळातलाव, त्रिकोणीबाग / गुलमोहर उद्यान, वरची आळी, डोंगरीपाडा.
स्मारके बनवावीत असा प्रस्ताव नाहीये! फक्त एक भारतीय युद्ध नायकांचा स्मरणपथ जो मैदानाला जाऊन मिळेल. स्मरणपथावर स्मरण म्हणून दुतर्फा झाडे असावीत. (त्यांना नावे ही नकोत.) फक्त हा स्मरणपथ भव्य असावा. इतकेच. हा शहरातलाच एक वापरातला रस्ता असल्यास चांगलेच.
सुशोभिकरण हा आपल्या देशात लग्नासारखा प्रकार आहे. ते होत असतांना आणि झाल्यानंतर काही दिवस सर्वच आनंदात असतात. “देश बदल रहा है” वाली गँग तर चांगलीच फॅार्मात असते.
पण जस जसे दिवस जातात तस तसे भेळपुरीच्या गाड्यांचा विळखा, पार्कींग अशा समस्या तयार होतात. काही ठिकाणी गर्दुले, तळीराम विसाव्यासाठी येतात आणि मग बरेच विधी पण करून जातात.
सुशोभिकरण ही बहुदा स्वतःहून कायम टिकणारी गोष्ट असते असे आपल्याकडे प्रशासनाला वाटत असते. त्यामुळे वाळलेली झाडं, तुटलेले कुंपण, कचरा आणि दुर्गंधी या क्रमाने स्मारके शेवटी खंडहर बनून जातात.
सहमत आहे, म्हणून स्मारक नकोच आहे!
वेगळे सुशोभिकरण असावे असे अपेक्षित नाही. पण झाडांची निगा राखणे, रस्ता भव्य असल्याने पदपथ निगा राखणे आणि मैदान 'मैदान राखणे' यासाठी वेगळी व्यव्स्था असावी आणि त्याचे पैसे वेगळे असावेत.
धुरंधर की XXXट राजकारणी प्रत्येक ठिकाणी राजकारण मधे आणतात.
या प्रतीसाद वाचल्यानंतर बघा कसे शड्डू ठोकून पुढे सरसवतील.
पोलीस, सैन्यदले, राजकारणी,समाजकारणी लोकं आपापल्या दैवतांची काळजी घेतात.
आज पोलीस लाईन मधे जाऊन बघा. दिवसरात्र खपणार्यांची राहाण्याची व्यवस्था किती दयनीय आहे.
माझे मत मेलेल्यांचे स्मारकां बरोबर जे जीवंत आहेत व दररोजच मरणाशी सामना करता आहेत अशा लोकांची काळजी घ्या.
परफेक्ट.
नवीन रचना उभारताना असलेल्या सार्वजनिक मुतार्या उडवून (कारण प्रत्येकाला त्या वैयक्तिक हव्या असतात पण आपल्या दुकानाजवळ, सोसायटीजवळ, एरीयात नको असतात) ग्रीन आयलंड उभे करणारे, दिखावु चकचकाट निर्मिणारे धोरण अजिबातच नको आहे.
याचा वेगळा विचार व्हायला हवा हे सहमत आहे. किंवा हा स्मरण पथ सर्वच बलिदानांसाठी स्मरणपथ म्हणून व्हावा असे म्हणणे ही वावगे नसावे.
कोणत्याही स्मारकांच्या मर्यादाही असतात. जे रोजचे असते त्याकडे लोकांचे दुर्लक्षही होत असताना दिसते. शिवाय हातात भगवद गीता घेऊन अंहिसेचा संदेश आणि अंहिसेचा संदेश देणार्याचे नाव घेऊन किंवा शांततेचे आश्वासन देऊन युद्धेही घडवली जातात. शांतता हवी असेल तर युद्धासाठी तयार असावे लागते हेही वास्तव असते. त्यामुळेच राष्ट्रभावना राष्ट्रप्रेमाची प्रेरणा आणि श्रद्धा सातत्याने जागती ठेवण्यासाठी स्मारके हवीत याबाबत दुमत नाही.
धागा लेख प्रस्ताव नितीन गडकरींना पाठवून भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यासाठी उत्तमच आहे. वरच्या प्रस्तावात वॉर मेमोरीअल, म्युझीअमचा, किल्ले यांचा उल्लेख कदाचित जोडता येईल.
पण अशी विशीष्ट स्मारके नसतानाही राष्ट्रप्रेमाची प्रेरणा, भावना आणि श्रद्धा जागवण्यासाठी प्रभावी गीतकार आणि नाट्यलेखकांचे मोठे योगदान असू शकते आणि प्रभावी गीते आणि नाट्य काळाच्या ओघात अधीक प्रभावी आणि प्रदिर्घ काळ टिकते.
पण सुरवातीसच म्हटल्याप्रमाणे केवळ अभिमान आणि स्मारके पुरेशी नाहीत. सोबतीला सबळ अर्थव्यवस्था, अद्ययावत आणि स्वावलंबी युद्धतंत्रज्ञान विकास, युद्धसामग्रींची उपलब्धता आणि सातत्याने प्रॅक्टीसमध्ये असलेले युद्धकौशल्य आणि देशासाठी मर मीटण्याची तयारी असलेले राष्ट्रप्रेमी चतूर नेतृत्व आणि जनतेचे मनोबल तेवढेच महत्वाचे असते.
कसे? कुणी आहे ओळखीचे? प्रस्ताव कसा असावा? त्याचा काही विहीत नमुना आहे का?
ही फक्त सरकारची जबाबदारी नाही. यात प्रत्येक भारतीय लहान मोठ्यांचा सहभाग आहे. पंजाब मधे हुसैनिवाला,जालियनवाला या ठिकाणी खुप छान व्यवस्थापन आहे व जन सहभाग देखील.
हुतात्मा झालेली व्यक्ती कुणा एकाची नसून ती देशाची आहे.
काय करावे..
राजकारण्यांनी राजकारण बाजुला ठेवावे.
ठेकेदाराकडून काम वाजवी पैशात व भक्कम व्हावे.
सरकारी यंत्रणेतील संबंधितानी य्योग्य ती काळजी घेऊन स्मारक बांधकाम ते रखरखाव निट ठेवावा.
सर्वसाधारण अगांतुकानी स्वच्छता राखण्यास हातभार लावावा.
स्मारके नेहमीच स्वच्छ,सुंदर आणी प्रेक्षणीय रहातील.
प्रत्येक नगरात एक मार्ग जो भव्य असेल असा भारतीय युद्धवीरांचा स्मरणपथ म्हणून राखला जावा. आणि हा स्मरणपथ - जो रोजच्या वापरातील एक रस्ताच असणार आहे- मैदानाला जाऊन मिळावा - इतकाच प्रस्ताव आहे. यात स्मारक आलेच कुठे?
विचार चांगला आहे ! हल्लीच एक माहितीपट पाहिला होता, त्या माहितीपटाच्या शेवटी सियाचिन योद्ध्यांच्या बलिदाना बद्धल असलेले स्मारक पाहण्यात आले होते. [ सियाचिन बेस कँप ]
तिथे ओळ लिहली होती,
When You Go Home Tell Them Of Us
And Say, For Your Tomorrow
We Gave Our Today.
या स्मारकाचे दृष्य आणि त्या स्मारकात दिसणारे शीडी वरुन वर चढत जाणारे जवान [ स्मारकाच भाग ] पाहुन अंगावर काटा आला होता.
माहितीपट इथे देऊन ठेवतो :- Siachen Glacier—A Triangular Wedge In The Pakistan, China Threat At The World's Third Pole In Ladakh
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Rema, Selena Gomez - Calm Down (Official Music Video)
आदरणीय मंत्री महोदय ,
प्रस्तावः प्रत्येक नगरात एक भारतीय युद्धवीरांचा स्मरणपथ आणि मैदान असावे यासाठी कायदा करावा.
भारतात प्रत्येक शहरातील एक रस्ता भारतीय सैनिक/पोलीस व इतर सर्व वीरांचे योध्यांचे स्मरण म्हणून स्मरण पथ आणि मैदान असावे. हा यासाठी नगर नियोजन केले जावे असा कायदा व्हावा असा प्रस्ताव मांडतो आहे.
भारतीय युद्धवीरांचा सन्मान आणि स्मरण करण्यासाठी एक भव्य समर्पित असा किमान पाच किलोमिटर्सचा भव्य मार्ग प्रत्येक शहरात असावा. याच्या दोन्ही बाजूंना भव्य वृक्ष असावेत. हा पथ एका किमान दहा एकर क्षेत्रफळ असलेल्या भारतीय वीरता स्मरण मैदानाला जाऊन मिळावा.
युद्धातील वीरांनी भारताच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण बलिदान दिले आहे. तसेच प्रत्येक पोलिसदालातील वीरांनीही आपल्या जीवाची बाजी लावली आहे. त्यामुळे प्रत्येक नगरात एक भारतीय युद्ध नायकांचा स्मरण पथ त्यांच्या शौर्याचे निरंतर स्मरण म्हणून काम करेल आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
ही जागा देण्यासाठी येत्या सरकारने कायदा केला पहिजे. कायद्यानुसार भारतातील भविष्यातील सर्व नगर नियोजन प्रकल्पांचा विचार करतांना या स्मरण पथाचा समावेश करणे आवश्यक केले जावे. भारतीय हा स्मरणपथ बनवतांना रुंदीची तसेच पदपथ कसा असावा याची मार्गदर्शक तत्त्वे असावीत. ही तत्त्वे देशभरात एक समानता सुनिश्चित करतील. या किमान पाच किलोमिटर्सच्या मार्गामध्ये फक्त मोठे वृक्ष असावेत. या वृक्षांना नावे देऊ नयेत. शिवाय कोणतेही स्मारक येथे असू नये. फक्त भव्य मार्ग आणि त्याच्या दुतर्फा वृक्ष इतकेच याचे स्वरूप असावे.
यामुळे स्मरणपथाचे नियोजन आणि व्यवस्था राखणे सोपे असेल. हा पथ वेगळाच उभारावा असा ही हा प्रस्ताव नाही. शहरातील एक रस्ता हा युद्धवीरांचा स्मरणपथ
रोजच्या उपयोगात असलेलाच असावा. पण हा भाग भव्य असावा आणि दुतर्फा एकसारखे वृक्ष असावेत.
मैदानाचा आकार आणि इतर सुविधा सुविधा शहराचा आकार आणि लोकसंख्येच्या घनतेनुसार निर्धारित केल्या जातील. या जागेत खेळाचे मैदान, चालण्याचे मार्ग, सामुदायिक उद्याने किंवा कार्यप्रदर्शन क्षेत्रांचा समावेश असू शकतो.
केंद्र आणि राज्य सरकारे स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यासाठी आणि प्रारंभिक विकासासाठी आर्थिक सहाय्य द्यावे.
एक स्वतंत्र खाते आणि नियोजित सरकारी अधिकारी लष्करी अधिकार्यांच्या सहभागासह या जागांच्या देखभाल आणि सतत विकासासाठी जबाबदार असतील असे पहावे. या पाच किलोमिटर्सच्या मार्गासाठी केंद्र सरकारचा वेगळा निधी असावा.
हा प्रस्तावित कायदा देशभक्ती, सामुदायिक कल्याण आणि शाश्वत विकासाला चालना देईल अशी आशा आहे. भविष्यातील शहर नियोजनात युद्ध वीरांचे स्मारक आणि मोकळ्या जागा अनिवार्य करून, भारत आपल्या शौर्य स्मरणाचा वारसा आणि पाया तयार करणे आवश्यक आहे.
काय नसावे
वेगळे स्मारक नसावे
पुतळे नसावेत
स्मारक इमारती आणि बांधकाम नसावे
अपेक्षित स्वरूप
पाच किमीचा दुभाजित मार्ग जो भव्य असेल. आणि त्याच्या दुतर्फा वृक्ष असतील या भागाचे नामकरण भारतीय युद्धवीरांचा स्मरणपथ असे केले जावे.
हा स्मरण पथ एका मैदानाला जाऊन मिळेल असे पाहिले जावे
हा पथ प्रत्येक नगरात असणे कायद्याने अनिवार्य केले जावे.
हा पदपथ भारतात सर्वत्र एकसारखा असेल.
या स्मरणपथाची व्यवस्था केंद्र सरकार आणि सैनिक बल यांच्या अखत्यारीत असावी.
आपला
जी माझी नाही परंतु अमलात आहे.
https://www.youtube.com/watch?v=SdxHraEHm04
खूप सुंदर कल्पना आहे : क्रांती स्मृतिवन
https://maps.app.goo.gl/oJMeczD53kc4Gw7Z9
संपूर्ण मुलाखत ऐका. अशा जागा सरकारने किंवा गावांनी उपलब्ध केल्या तर तिथे अशी वने उभारली की एकाच दगडात दोन्ही गोष्टी केल्या आहेतः
१. शिवाय तिथे शाळांचे वनभोजन सतत होतात.
२. अनेक क्रान्तिकारकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तिथे झाडे लावली आहेत, अनेक लोकांनी ही झाडे स्पॉन्सर केली आहेत.
३. तिथे या लोकांची माहिती मिळावी अशी छोटिशी लायब्ररी आहे, काहि कार्यक्रम करण्यासाठी हॉल आहे.
४. काळजी घ्यायला विद्यार्थी मदत करतात.
बघा विचार करून. पुतळे बितळे असली भानगड नाही.
यांचे काम आहे.
अर्थात तिथे सर्व क्रांतिकारकांच्या स्मृतीनिमित्त झाडे लावता येतात.
पण तुम्हाला जर नुसते एकच अजेंडा राबवायचा असेल तर मात्र तुमची आहे ती कल्पना तशीच ठेवा. चीन रशिया वगैरे मध्ये असलेच डिप्रेसिंग आर्किटेक्चर जागोजागी उभे आहे. त्यातून काहीही घंटा होत नाही, उलट लोकांमध्ये चीडच तयार होते.
रोजच्या वापरातला एक रस्ता - त्यातला पाच किमी भाग भव्य असावा, दुतर्फा वृक्ष असावेत व पदपथ असावेत याचे नाव स्मरणपथ असावे - हा एका मैदानाला जाऊन मिळावा - यात आर्किटेक्चर कुठे आले?
ज्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आहे त्यांचे स्मरण करण्यात कसला अजेंडा आला? यात डिप्रेसिंग आर्किटेक्चर काय आहे समजले नाही.
पैशाची नासाडी होणार.
त्यापेक्षा वाचनालये,संग्रहालय ह्यावर लक्ष देण्यात यावे.
हो बरोबर , लंपन या शीर्षकाची कादंबरी नाहीये, ती व्यक्तिरेखा आहे या ४ कादंबरीतील ,
गल्ली चुकलं काय वो पी.यल.?
व्हय
एकावेळी एकच टॅबमधे मिपा उघडा... =))