राजकारण

तुमचा एक्सिट पोल अंदाज सांगा

Primary tabs

माझा अंदाज

महायुती अस्पष्ट बहुमत

मुंबई पुरते ठाकरे सेने ला यश मिळेल ( ११ पैकी ६-७ जागा शिंदे सेने विरुद्ध )
राज्यात ५१ लढती पैकी २०-२५
अजित पवार ह्यांची दाणादाण होणार व परत जाणार

दोन्ही राष्ट्रवादी एक होणार व कोणत्या तरी दुसऱ्या पार्टी ला बाहेरून सपोर्ट देणार

तुमचा अंदाज सांगा

मार्जिनल विजय,एकोबा कासरा सांभाळणार.
दादांची दाणादाण पण १२मतीत बुडता बुडता वाचणार. (बुडाले तर काका ४८ वर्षाचे नाहीतर ८४).

उबाठा ची नौका साधुवाण्याची होण्याची शक्यता.
ठाकरे राजकुमार तळ्यात मळ्यात.....

बघूयात.

यावेळेस मतदार राजा सुद्धा बुचकळ्यात आणी निराश वाटतोय. भक्त आपापल्या देवांनाच पावणार.

सगळ्यात शेवटी माझे मत वाया जाणार.

कोणीही आले तरी फार फरक पडणार नाही. दहा कमी पडले तर राज्यातच अण्तर्गत सौदा होईल. ३० कमी पडले तर लोढा/रहेजांतर्फे सौदा होईल. ५० कमी पडले तर अहमदाबादला अदानींच्या फार्महाउसवर 'चर्चा' होईल.

कोणीही आले तरी फार फरक पडणार नाही. दहा कमी पडले तर राज्यातच अण्तर्गत सौदा होईल. ३० कमी पडले तर लोढा/रहेजांतर्फे सौदा होईल. ५० कमी पडले तर अहमदाबादला अदानींच्या फार्महाउसवर 'चर्चा' होईल.
शक्यतो पहिले दोन पर्याय परवडतील. तिसरा पर्याय वापरावा लागला तर परत महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविल्याची चर्चा होईल. जो काही सौदा होईल तो महाराष्ट्रातच झाला पाहिजे. इथला पैसा इथेच वापरला गेला पाहिजे.

श्वेता२४

हल्ली तुमच्या 'ह्या॑चे' मत काय? ते सा॑गत नाही तुम्ही ;)

Vichar Manus

महायुती 180-190 जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवेल

श्रीगणेशा

काठावरचं बहुमत कोणालाही मिळू शकतं, महायुती किंवा मविआ. पण ते पाच वर्ष टिकवणं अवघड आहे. सत्तेसाठीची सर्कस सुरूच राहणार यात शंका नाही.

शाम भागवत

लोकांना सर्कसीचा कंटाळा आलाय. किंवा वातागले आहेत. त्यामुळे सर्कस पाच वर्षेतरी बंद पडेल असा कौल मिळेल असं वाटतंय.
असं असेल तर २०१९ साली सर्कस सुरू करणारा हिरो झिरो झालेला दिसेल.

अती झालं आणि हसू आलं अशी परिस्थिती आली की मतदार एका बाजूला व्यवस्थित बहुमताने कारभार करता येईल अशाप्रकारे मतदान करतात. उत्तर प्रदेशात १९९३ ते २००२ या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये नेहमी खंडित जनादेश येत होता त्यातून मग आमदार फोडाफोड, पैशाचा महापूर वाहणे असले घाणेरडे प्रकार होत असत. त्याला कंटाळलेल्या मतदाराने २००७ पासून प्रत्येक निवडणुकीत स्पष्ट जनादेश दिला आणि एक बाजूला व्यवस्थित बहुमत दिले. २००७ पूर्वी फार कमी लोक उत्तर प्रदेशात राजकीय स्थिरता येईल असे म्हणत होते. पण ते तसे झाले. केंद्रातही १९९६ आणि १९९८ मध्ये खंडित जनादेश होता त्यामुळे काय परिणाम झाले ते सगळ्यांनी बघितले. त्यानंतर १९९९ पासून एका बाजूला स्पष्ट जनादेश यायला लागला- असा जनादेश की दुसर्‍या बाजूला फोडाफोडी करून सत्तेत येणे सहजासहजी शक्य होणार नाही. महाराष्ट्रातही अती झालं आणि हसू आलं अशीच स्थिती आली आहे. त्यामुळे मतदार एका बाजूला स्पष्ट जनादेश देतील असे मलाही वाटते.

लोकसभा रिपीट होईल. लोकसभेलाही असेच मविआला हलक्यात घेण्यात आले होते पण मविआच्या शिलेदारानी मोदी सल्तनतीतील महाराष्ट्र जिंकायला आलेल्याना आसमान दाखवले. ह्यावेळीही मोदी सल्तनत जिंकेल असे खुश्मस्करे (आजच्या भाषेत गोदी मीडिया) सांगताहेत. खुश्मसकर्याना पाकिटे वेळच्या वेळी मिळण्याशी मतलब.
पण दोन दिवसाने निकाल दिसेल. मोदी सल्तनीतीतील अन्यायकारक कोतवालानी जरंगे पाटलांच्या गावावर केलेला हल्ला मराठे विसरले असतील असे म्हणणे भाबडेपणाचे ठरेल. मराठे आपला हिसका मतपेटीतून दाखवतील व मोदी सल्तानतीला आणखी जोरात दणका देतील.

लोकसभेला 'अब की बार फुसका बारच्या' ठरला. महायुतीने यावेळी विकासा-बिकासाला फाट्यावर मारुन 'बाटेंगे और जिंतेंगे' सॉरी 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा लावला. काही गोबरपंथी लोकांना ते चालतंही पण हा बारही तसा फूसकाच ठरला. कल चाचण्या महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूने असल्या तरी, महायुतीकडे लोकांनी मतदान करावे असे काही नाही असे वाटते. 'हरियाणा व लोकसभा' निवडणूकीत कल चाचणी विरुद्ध निकाल लागला. महाराष्ट्रातही तसेच होईल असा अंदाज आहे. महायुतीला लाडकी बहीण योजना किती तारेल त्याचबरोबर शेवटाच्या तासातील निर्णायक वाढलेले टक्केवारीतलं मतदान सद्य सरकार व्यवस्थेविरुद्ध जाईल का ? एकूणच महाविकास आघाडी सत्तेत येईल असे वाटते. शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

विवेकपटाईत

तुमचे आकलन सत्य आहे. बहुजन जनतेला गोबर गणेश समजून धर्म निरपेक्ष देशांत धर्माच्या आधारावर कायदे गेलेय. 1000 वर्ष जुन्या कागद पत्रांच्या आधारावर तुमची मालमत्ता वक्फ कब्जा करू शकतो असे कायदे बनले. बहुजन समाजाला जातीत विभाजित करून यादव+मुस्लिम गठजोड, मराठा + मुस्लिम गठजोड, पश्चमी उत्तर परदेशात मुस्लिम + जाट समीकरण, इत्यादि, करून चुनाव जिंकण्याचे षड्यंत्र सुरू झाले. पण या वेळी हरियाणा आणि महाराष्ट्राच्या जनतेने जातीला तिलांजली दिली. जनतेने हे ही दिसत होते आघाडी सरकारात अनेक विकासाचे प्रोजेक्टस बंद पाडले गेले होते. जनतेने विकाससाठी मत दिले. पैश्यांच्या आमिषाला लोक बळी पडले नाही. लोकसभेत केलेली चूक सुधारली. बाकी गूगल करून गेल्या दहा वर्षांतील विकासाचे आंकडे तपासू शकतात.

जनतेने विकाससाठी मत दिले. पैश्यांच्या आमिषाला लोक बळी पडले नाही.

=))

विधानसभेच्या निकालाने खुश राहा. इंजॉय करा.

लोकसभेच्या निवडणूकीत न दिसणारा विकास चार महिन्यात दिसला, हे भारीच होतं हं. ही निवडणूक पैशांची निवडणूक होती, असे वाटते. काही मतदार संघात तीन हजार प्रती माणूस मतदान दिले गेले असे म्हणतात. विरोधी पक्षांनीही वाटलेच असणार पण सत्ताधा-यांच्या तुलनेत ते कमीच पडले असतील असे वाटते. वाट्टेल ते करा पण निवडून आले पाहिजेत यासाठी केलेला आटापिटा. निवडणूक आयोगाने दिलेली सारखी दिसणारी चिन्हे. विरोधी पक्षांची अंतर्गत बंडाळी, नसणारा ताळमेळ. फूकटचा वाढलेला आत्मविश्वास. विरोधी पक्ष म्हणून निवडणूकीत न दिसणारी धार. आणि गोबरपंथींयांचा बटेंगे-बाटेंगे, हिंदू खतरेमे ही भिती दाखविणे वगैरे असं सगळं निवडणूकीत असतं. निवडणूका आता या दोन चार महिन्यात- दोन तीन दिवसांच्या प्रयत्नाने तात्काळ गोष्टीने जिंकता येतात. जाहीरनामे, सामाजिक जीवनमरणाचे प्रश्न या केवळ बाता असतात, हा नवा ट्रेंड या विधानसभा निवडणूकीने दिला असे वाटते.

-दिलीप बिरुटे

+१ त्यातही निवडणूक आयोगात आपली मांस घुसवली की बस्स मग. न्यायालयात कुणी गेलं की पंतप्रधान न्यायधिशाच्या घरी जाऊन आरती करतात, त्यामुळे न्याय मिळेलच ह्याची खात्रीही पटते.

+१ त्यातही निवडणूक आयोगात आपली माणसे घुसवली की बस्स मग. न्यायालयात कुणी गेलं की पंतप्रधान न्यायधिशाच्या घरी जाऊन आरती करतात, त्यामुळे न्याय मिळेलच ह्याची खात्रीही पटते.

सुबोध खरे

पाळणा हलत नाही
म्हणून

काही लोक पलंगाला दोष देतात

तसं आहे हे!

चालू द्या!

शाम भागवत

“मी सहसा अशा प्रकारच्या मेसेजपासून लांब राहतो. पण नाचता येईना अंगण वाकडे” या म्हणीची सुधारित आवृत्ती फारच भारी काढलीय. हसू आवरेना म्हणून दाद दिली.

बाकी नविन मुद्दा नसल्याने अगोदरचे मेसेज फक्त वरवर पाहिले.

विवेकपटाईत

लोकसभेत फक्त अर्धा टक्के मते कमी मिळाले होते. ते ही फाजील आत्मविश्वासामुळे. पवारांनी मराठ्यांच्या जातीचा उपयोग जराङे माध्यमातून केला. काठ की हांडी एकदाच चढते. विधानसभेत जराङे माध्यम फेल झाले. भाजप ने मेहनत घेऊन मतदान टक्का वाढविला. त्यामुळे ते जिंकले. बाकी गूगल करून देशाचा दहा वर्षाचा विकास तपासू शकता.

अंदाज सांगणं अवघड आहे.
मी भाजपा चा समर्थक आहे तरी पण एकवेळ उमेदवार कोण आहे हे पण पाहतो. आतापर्यंत ज्या कोणाला मतदान केलं त्या त्या वेळेस तो उमेदवार पराभूत झाला आहे पण तो पक्ष देशात / राज्यात सत्तेत आला आहे.
मागील लोकसभेच्या वेळेस माझ्या मतदारसंघात वर्षा गायकवाड (काँग्रेस) आणि श्री. उज्जल निकम (भाजपा) हे उमेदवार होते. वर्षा गायकवाड आणि त्यांच्या वडीलांनी अनेक वर्षे मतदारसंघाची सेवा केली त्यामुळे त्याला आता तरी थोडा आराम मिळावा, घराकडे लक्ष द्यायला वेळ मिळावा या उदात्त हेतूने त्यांना मत दिले नाही. पण जनता क्रुर आहे. जो काम करतो त्यालाच पुन्हा कामाला जुंपते त्यामुळे वर्षा गायकवाड निवडून आल्या आणि त्यांनी आरामात बसून खावे हे माझे स्वप्न भंग पावले.

ह्यावेळेस माझ्या मतदारसंघात महायुतीचे चे श्री. दिलीप भाऊसाहेब लांडे (धनुष्यबाण) हे उमेदवार होते. मात्र मी लहानचा मोठा झालो तेव्हापासून हाच उमेदवार वेगवेगळ्या पक्षातर्फे वेगवेगळ्या निवडणूकीत उमेदवार म्हणून उभा राहत आला आहे.
त्यांनी प्रत्येक पक्षाची आणि जनतेची वर्षानुवर्षे सेवा केली आहे त्यामुळे त्याला आता तरी थोडा आराम मिळावा, घराकडे लक्ष द्यायला वेळ मिळावा या उदात्त हेतूने मत दिले नाही. त्यांचे विरुद्ध काँग्रेसचे नसीम खान उभे आहेत. यांनी देखील वर्षानुवर्षे मतदारसंघाची सेवा केली आहे त्यामुळे त्यांनादेखील तोच नियम लावला. मात्र नसीम खान यांना विविध पक्षातर्फे सेवा करण्याचा अनुभव नाही. त्याबाबतीत दिलीप भाऊसाहेब लांडे उजवे ठरतात.
चांदिवलीत भाषण करताना या मतदारसंघात दोन लांडे उभे आहेत असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. (संदर्भ). मात्र काल मतदानास गेले असता तेथे अजून एक दिलीप लांडे निवडणूकीस उभे होते. मात्र त्यांचा वडीलांचे नाव भाऊसाहेब नव्हते.

मनसेचे श्री. महेंद्र भानुशाली हे मराठी बोलणारे व अनेक वर्षापासून मनसेचे सामान्य कार्यकर्ते देखील निवडणूकीस उभे होते. त्यामुळे सर्वात कमी वाईट पर्याय (किंवा कदचित योग्य पर्याय) म्हणून त्यांना मतदान केले.
श्री. महेंद्र भानुशाली यांचा उमेदवार यादीतील क्रमांक ३ होता. शिवाय कालची तारीख २०/११/२०२४ यातील अंकांची बेरीज पण ३ येते या अंदाजपंचे दाहोदरशे या सट्टा नियमाप्रमाणे मतदान केले.

संततीनियमनाची साधने वापरुन केलेल्या समागमासोबत कालच्या मतदानाची तुलना करता येईल. कर्त्यव्य केले पण त्यातून फलप्राप्ती होईल याची अपेक्षा नाही. चूकून साधने निष्प्रभ झाली आणि काही बरावाईट फळ मिळाले तर गोष्ट वेगळी.
असेही कर्म करत जा, फलाची चिंता करु नको असे आपल्याला शिकविले आहे मात्र फल मिळणारच नाहीतर तरीपण कर्म कर ही शिकवण आपल्याला निवडणूकांद्वारे मिळत असते.

आता अंदाजांकडे वळूया. (माझ्या अंदाजापेक्षा रस्त्याच्या कडेला बसलेल्या जोतिष्याच्या पोपटाचे अंदाज जास्त बरोबर असू शकतात ही शक्यता लक्षात घेऊन वाचावेत).

मतदान बुधवारी झाले. बुधवार किंवा बुधग्रह हा वारंवातीतेचा कारक आहे. यादिवशी केलेली कामे तडीस जात नाही असा माझा वैयक्तीक निष्कर्ष आहे. म्हणजे या दिवशी एखादे काम केले की ते पुन्हा एकदा करावे लागते. त्यामुळे राज्यात कोणालाही स्पष्ट बहूमत मिळेल असे वाटत नाही. प्रचंड मोडतोड होऊन एखादे सरकार बनेल किंवा बनलेले सरकार कोसळून परत एकदा निवडणूका लागू शकतात असा माझा अंदाज आहे. २३ तारखेला बघूया काय होते ते.

वरील प्रतिसाद वाचून इसापनितितील कथेप्रमाणे वाचकांचे मनोरंजन आणि प्रबोधन झाले असेल असे समजून प्रतिसाद पुर्ण करतो.

मी एक्झिट पोल घेतले नाहीत त्यामुळे मी अंदाज सांगणार नाही. (मी शेंगा खाल्ल्या नाहीत.... च्या धर्तीवर वाचावे).

इथल्या म्हणजे मिपावरील कोणीही एक्झिट पोल घेतले असतील असे वाटत नाही. मग नक्की कसले आकडे इथे सांगितले जात आहेत? धाग्याचे शीर्षकच आहे- "तुमचा एक्सिट पोल अंदाज सांगा" :)

हाहाहा. काल मतदान संपल्यावरही चाणक्यचा मला कॉल आला होता, कोण निवडून येईल ह्या कुणाल मत दिले असे थेट त्यानी विचारले. मी सांगितले. आणी लगेच फोन कट केला. धन्यवाद म्हणायचंही सौजन्य दाखवले नाही. पुढच्या वेळी करा फोन. सरळ वंचितला मत दिले म्हणून कळवेल.

आयुष्यभर कमळाला मत दिलेल्या वडिलाना तुतारी दाबा म्हणून कण्वेंस केलं, आयुष्यात पहिल्यांदा तुझ्यामुळे पवारांना मत देतोय बोलले. आणी टीव्हीवर युती जिंकेल म्हणून पोल वाले बोंबलू लागले, तुझ्यामुळे माझं मत वाया गेलं म्हणून माझ्यावर आगपाखड करण्यात आली. मत वाया जाणे हा काय प्रकार आहे?? :(

अकिलिज

मटक्याच्या नंबरवर किंवा लॉटरी वर लावलेले पैसे जसे नंबर लागला नाही तर वाया जातात, तसंच काहीसं. आमच्याही पिताश्रींचं असंच काहीसं आहे. गेल्या पिढीत हे जरा घट्ट बसलेलं आहे असं वाटतंय.

माझा गरीबाचा अंदाज :
युतीला आणि मविआला साधारण समसमान जागा मिळतील. १०-१२ चा फरक असेल. मग जिंकलेले उमेदवार किंवा अपक्ष ओढण्याची स्पर्धा होईल. त्यात फडणवीस आणि शिंदे खोकी पणाला लावतील. बंडखोरी करुन जिंकून आलेले परत घरबापसीसाठी वाजवून हिस्सा घेतील. ठाकरेंबरोबर गुळपिठ जमवणं इतरांना एकंदरीत अवघड जातं. काकांची हातोटी कितपत कामास येईल शंका आहे. त्यामुळे शेवट महायुतीत होण्याची शक्यता जास्त वाटतीय.
आणि काहीही घडू शकतं. अजित पवार कोलांट्याउड्या मारून काहीही करू शकतात.
आपण आपलं मनोरंजन चालू ठेवायचं. पांडुरंग आहे महाराष्ट्राच्या हिताची काळजी करायला. असं म्हणायचं.

शाम भागवत

पांडुरंग आहे महाराष्ट्राच्या हिताची काळजी करायला. असं म्हणायचं.

खरं आहे. यावेळेस पांडूरंगच धावून आला हेच दिसणार आहे.
पालघरचं मतदान किती वाढलंय ते बघा.
९-१० च्या सुमारास पंढरपूरला मतदान नेहमीपेक्षा १७ टक्के कमी झालेले दाखवलं जातं होतं. १२ वाजेपर्यंत ते -२ टक्के इतकं बदललं. नक्कीच कोणीतरी राजकारणाशी संबंध नसलेल्या लोकांचा विश्वास कमावलेल्या अधिकारी व्यक्तीने लक्ष घातल्याने, लोकं मतदान करायला दिवसाच्या शेवटी धावली असावीत. खरखोटं तिथलीच माणसं सांगू शकतील.

उद्या मुस्लीम व्होट बँकेवर उतारा मिळाल्याचं निवडणूक निकालातून दिसून येईल असं वाटतंय. बघूया काय होतंय.

आज २ दिवसांनी तुमचा “आज” उगवला? मधल्या काळात मुंद्रा पोर्टवर सापडलेल्या मालाची टेस्टिंग चालू होती का? :)