जे न देखे रवी...

गुरू आतला

Primary tabs

नसे भोवती छत्रछाया वडील
गुरू आतला सावली ती वसे
नसे सोबती पितृमाया वडील
गुरू लाभला प्रेम पाठी तसे

उरी पोकळी पोरकी राहिलेली
भरूनी जिवाला मनी पाविले
नदी कोरडी आटली वाहिलेली
भिजूनी किनारा तृषा भागिले

नसे पाहिले धैर्यशाली वडील
गुरू राखला हात माथी असे
नसे जाहले आप्तवाली वडील
गुरू जागला साथ जन्मा जसे

मने कोवळी कोंडली घुस्मटून
करी मोकळा बंध जे राहिले
फुले पाकळी सांडली कुस्करून
सुवासास वेचू गुरू वाहिले

उत्तम गुरू मिळायला भाग्य लागते.

कारण, काही गुरू हे "आपण गुरू आहात.." ह्याच लायकीचे असतात.

रोहन जगताप

अगदी बरोबर आहे. बाकी प्रत्येक माणसाच्या आत एक गुरू असतो. वरील कविता ही त्या गुरूला वाहिलेली आहे. ‘कळते पण वळत नाही’ असे आपण म्हणतो. त्यातले जे कळतेपण आहे, तोच आपल्यातील गुरू आहे. पण त्याकडे लक्ष न दिल्याने कळूनही वळत नाही.

माझे एक मार्गदर्शक होते..

त्यांनी एक गोष्ट सांगितली आणि आज देखील ती गोष्ट मी पाळतो.

रात्री झोपण्यापूर्वी , स्वतः साठी १० मिनिटे काढायची आणि त्या १० मिनिटांत, आज दिवसभरात केलेल्या सर्व गोष्टी आठवायच्या.

झोपेतील, अर्धजागृत अवस्थेत, मेंदु कुठल्या गोष्टी चुकीच्या केल्या आणि त्यावरची उपाय योजना शोधून काढतो आणि ही निरंतर चाललेली साधना आहे.

काही उपाय लगेच मिळतात तर काहींना प्रत्यक्षांत यायला , बेंझीन काळ लागतो. (Benzene Time, हा माझ्या मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचा आवडता शब्द.)

Benzene Time बद्दल माहिती हवी असेल तर, खालील लिंक बघा..

https://www.acs.org/molecule-of-the-week/archive/b/benzene.html#:~:text….

रामचंद्र

मातृतत्त्वाच्या उल्लेखावाचून काव्य अपूर्ण वाटते...

रोहन जगताप

मानवी आयुष्यात केवळ वडीलांचीच असे नव्हे, पण वडीलकीची अशी एक पोकळी असते. कोणीतरी आपल्याला सांभाळून घ्यावे, मार्गदर्शन करावे, दिशा दाखवावी अशी प्रत्येकाची कळत-नकळत इच्छा असते. परंतु अनेकदा ही पोकळी भरून येत नाही. अशावेळी माणसाच्या आतील गुरूच ही पोकळी भरून काढण्यास सक्षम असतो अशा अर्थाने वरील कविता लिहिलेली आहे. तरी कवितेच्या पहिल्या कडव्यात पुढील प्रमाणे बदल केल्यास कदाचित कविता आपल्याला परिपूर्ण वाटेल अशी आशा आहे.

नसे भोवती छत्रछाया वडील
गुरू आतला सावली ती वसे
नसे सोबती पितृमाया वडील
गुरू लाभला माय पाठी तसे

रामचंद्र

छत्रछाया वडिलांची आणि पाठीशी माया आईची... आता पूर्णत्व लाभले असे वाटते.

त्यावर कवीचे स्पष्टीकरण कवितेचा आयाम बदलून पूर्णत्वास नेते.

कविता आवडली.

चौथा कोनाडा

सुंदर रचना ! गुरुचे महत्व कालातीत आहे !

म्हणुनच म्हटले आहे :
गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा:,
गुरु साक्षात परम ब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नम:।

गुरू म्हणजे परम !

रोहन जगताप

मनःपूर्वक आभार! मानवी जीवनास जसा गुरूचाच आधारस्तंभ असतो इतके त्याचे महत्त्व आहे.