काथ्याकूट

ताज्या घडामोडी-मार्च २०२४

Primary tabs

गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला.
जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या.
जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले.
https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trum…
https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trum…

चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-…

महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशनचे संस्थापक बहुदा.
Lieutenant Colonel (retired) Jayant Rao Chitale on Thursday clarified he has formed a 'Hindustan suicide squad' and not a 'Hindu suicide squad' dismissing reports that his outfit has links with the Shiv Sena.
इकडे मात्र हसू आवरेना
"I have been requesting the government for the last three years to form this suicide squad," he said. "I have sent letters to the Prime Minister Atal Bihari Vajpayee, President Abdul Kalam and the army chief about the formation of these suicide squads, but there was no response. So, I started the training programme."
म्हणजे वाजपेयी/कलाम आत्मघातकी पथकासाठी मान्यता देतील अशी जयंतरावांची अपेक्षा होती. असो.

https://m.rediff.com/news/2002/nov/14fird.htm

श्रीगुरुजी

२००२ मधील शिळी बातमी आहे. या प्रकारात पुढे काय झाले ते माहिती नाही.

या बातमीतील खालील ओळी रोचक आहेत.

Media reports had said the 'suicide squad' drew its inspiration from the recent call of the Sena chief to form 'Hindu suicide squads' to tackle terrorism in India.

स्वतः व स्वत:चे कुटुंब घरात आरामात बसणार आणि बाहेर पाऊल ठेवणार नाही आणि इतरांनी सर्व काही करायचं!

रामचंद्र

अरुण भाटिया, अविनाश धर्माधिकारी, खैरनार, किरण बेदी ही मंडळी प्रसिद्धीच्या झोतात होती त्याच काळात चितळेसाहेब पुण्यात रान उठवू पहात होते. मात्र पुणेकरांनी त्यांना फारसा प्रतिसाद दिला नाही. भिडेगुरुजींना जशी सांगलीची भूमी 'लाभली' तशी व्यवहारी पुण्यात कर्नलसाहेबांना काही अनुभूती आली नाही. त्यांची 'योजना' यशस्वी झाली असती तर खरोखरच भारताचा इतिहासच बदलला असता. असो.

२००५/६ मध्ये सोहरबुद्दिन,कौसरबी आणि तुलसीराम प्रजापती ह्याना खोट्या चकमकीत मारल्याच्या प्रकरणातअमित शहा ह्यांना क्लीन चीट देणारे न्यायाधीश मदन गोसावी सध्या कुठे आहेत हे जाणुन घेण्यासाठी इंटरनेटवर शोधले. आता हे गोसावी संत साहित्याचे अभ्यासक झाले आहेत. आता त्यांचा उल्लेख ह.भ.प. मदन महाराज गोसावी असा होतो. अपेक्षेप्रमाणे ते सत्ताधार्यांच्या आसपासही अधुन मधुन फिरकत असतात.
https://www.youtube.com/watch?v=hficKtnREaE

अमित शहा आणि त्यानंतर अनेक पोलिस अधिकार्यांना न्यायाधीश गोसावी ह्यांनी क्लीन चीट दिली होती.
https://indianexpress.com/article/cities/ahmedabad/sohrabuddin-encounte…

२००५ साली सोहरबुद्दिन मेला होता तर केंद्रातील काँग्रेस सरकारने चौकशी करून अमित शहांना जेल मध्ये पाठवायला पाहिजे होते. नऊ वर्ष काही कमी काळ नाही. कमीत कमी खालच्या न्यायालयात तरी गुन्हा सिद्ध व्हायला पाहिजे होता.

तकालिन सरकारचा उद्देश विरोधकांना जेलमध्ये घालणे, जुन्या केसेस उकरुन ई.डी./आयकर खात्याची भीती दाखवणे हा नव्हता. २००५ साली सोहराबुद्दिनचे एन्काउंटर झाले, आणि नंतर लगेच त्याच्या पत्नीला जाळुन मारण्यात आले. तिचा मृतदेहही सापडला नाही. एक वर्शाने तुलसीराम प्रजापती ह्यालाही चकमकीत मारण्यात आले.असो.
ह्या न्यायाधीश यशवंत वर्माच्या घरी १५ कोटीची रोकड सापडली आहे. ई.डी./आयकर खात्याचे अधिकारी सध्या दुबई/सिंगापूर्/युरोप फिरायला गेले आहेत का ? कारण निवडणुकपूर्व काळात ह्यांना २५-३० वर्षे जुन्या फायली काढुन त्याचा राजकीय पक्षांना हिशोब विचारण्यासाठी वेळ होता. इकडे तर घबाड सापडलय. पण काहीच हालचाल दिसत नाही. हे न्यायाधीश जेथे राहतात त्या भागात सुऱक्षा असते, सी सी टी.व्ही कॅमेरेही असतात. गेल्या १/२ महिन्यातले फूटेज तपासले तर किती जणांनी न्यायाधीशांना माल आणुन दिला हे कळेल. 'ना खाउंगा ना खाने दूंगा ' म्हणणार्यानी आतातरी पुढाकार घ्यायची किमान हिंमत दाखवावी. ट्रम्पसमोर नुसतेच हसणे,मिठ्या मारणे एकवेळ क्षम्य, कारण अमेरिका देश खूप बलवान आहे. पण निदान अशा ठिकाणी तरी हिंमत दाखवा.

श्रीगुरुजी

कसं पाठविणार? काही सबळ पुरावे हवे ना? सगळेच असत्य आरोप.

मोदींना गुजरात दंगलीत गुंतविण्यासाठी जिवापाड प्रयत्न केले. परंतु ते जमलं नाही. नंतर इशरत जहां प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न झाला. इशरत जहाच्या घरी जाऊन जित्याने तिच्या कुटुंबाला १ लाख रूपयांची मदत दिली. एका अँब्युलन्सला शहीद इशरत जहा असे नाव दिले. औरंग्याच्या पित्त्यांना पाकिस्तानी अतिरेकीच जवळचे वाटतात.

नंतर सोहराबुद्दिन प्रकरणात. मोदी नाही तर निदान त्यांचा सहकारी अमित शहांना तरी अडकवू म्हणून शहांना अडकविण्याचा प्रयत्न झाला. तो प्रयत्नही फसला. नंतर न्यायमूर्ती लोयांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर त्यावरही संशयाचे वादळ उठवून शहांना पुन्हा एकदा अडकविण्याचा प्रयत्न झाला. परंतु तो सुद्धा अपयशी ठरला.

जसे कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह, दयानंद पांडे अश्या ८-९ जणांना, मूळ गुन्हेगारांना सोडून, मालेगाव प्रकरणात सक्तीचे अढकविण्यात आले होते, अगदी तसेच मोदी-शहांना अडकविण्याचे असंख्य प्रयत्न झाले. अनेक असत्य प्रकरणे निर्माण करून असत्य पुरावे निर्माण केले गेले. परंतु ते या सर्व देशद्रोह्यांना पुरून उरले.

"नंतर सोहराबुद्दिन प्रकरणात. मोदी नाही तर निदान त्यांचा सहकारी अमित शहांना तरी अडकवू म्हणून शहांना अडकविण्याचा प्रयत्न झाला"
सोहराबुद्दीन कोण होता माहित आहे का ? जरा गुजरातमधील ज्येष्ट नागरिकांशी(निवृत्त सरकारी अधिकार्यांशी) गप्पा मारुन बघा. सगळे डीटेल्स कळतील. हा गुजरात/राजस्थानमधील गुंड.मार्बल व्यावसायिकांकडुन खंडणी गोळा करुन ती सत्ताधार्यांना पोचवायची कामे करायचा.
हरेन पंड्या ह्या भाजपाच्या मंत्र्याची २००३ साली हत्या का झाली होती? कोणी केली होती? हत्या करण्यार्याची हत्या मग पोलिसांतर्फे एन्काउंटर का करण्यात आले.? हे सगळे कोणी केले? पाकिस्तान? काँग्रेस? हरेन पंड्या ह्या मंत्र्याला मारुन पाकिस्तानला काय मिळणार होते? हरेन पंड्या कोणाच्या विरोधात अय्यर आयोगासमोर साक्ष देणार होते?

रामचंद्र

या संदर्भात राणा अयूब यांचं पुस्तक भलतंच सनसनाटी आहे.

पुस्तकातील कोणती घटना खोटी आहे हे म्हणण्याची हिंम्मत अजून झाली नाही.८०च्या दशकापासुन गुजरात्यांची डोकी भडकावण्याचे काम सुरू होते. त्याचा तो परिणाम होता. "मुसलमानाच्या दुकानातून सामान घेउ नका" हे वाक्य गुजरातमध्येच ३/४ वेळा मी ऐकलेले आहे.

माई, डोके भडकावून आपली पोळी शेकणे, सत्ता मिळवणे नी भ्रष्टाचार करणे हाच काय तो भाजपचा एककलमी कार्यक्रम आहे, नैतिकतेचं आव आणणाऱ्या संघ सारख्या संघटना असल्या लोकाना पाठिंबा देतात! कुणे एकेकाळी संघात जाऊन कुठलातरी वर्ग पूर्ण केला होता ह्याची आता लाज वाटते!

श्रीगुरुजी

गल्लीगल्लीत कुत्री भुंकत असतात. अश्या किती कुत्र्यांना हाड् म्हणायचं? एकदा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर अशी लाखो पुस्तके आली तरी सूज्ञ दुर्लक्ष करतात. पवारांनी ९-१० वर्षांपूर्वी लिहिलेल्या आत्मचरित्रात सोनिया गांधींवर टीका केली होती. परंतु आजतागायत सोनिया गांधींनी त्यावर अवाक्षर प्रतिक्रिया न देता अनुल्लेखाने मारले.

पुस्तक लेखिका किंवा पुस्तकावर विश्वास ठेवणारे न्यायालयात का जात नाहीत?

न्यायालयात न्याय मिळतोच असे नाही, न्यायालय जो निर्णय देईल त्याला न्याय म्हणायचे असते. - असे डॉ. सुबोध खरेनी मिपावरच लिहिले होते.

श्रीगुरुजी

सोहराबुद्दीन कोण होता माहित आहे का

त्याच्या एनकाऊंटरमागे अमित शाह असते तर जास्त आनंद झाला असता.

हरेन पंड्यांच्या हत्येनंतरही मोदींना अडकविण्याचा प्रयत्न झाला होता, कारण गुजरात दंगलीमागे मोदी असल्याचे कोणतेही पुरावे मिळू शकले नव्हते. अर्थात या प्रकरणातही मोदी अग्निपरीक्षा उत्तीर्ण झाले.

गुजरात दंगल, हरेन पंड्या, इशरत जहा, सोहराबुद्दिन, ती गुजरातमधील पाळत ठेवण्यात आलेली मुलगी, न्यायमूर्ती लोया अश्या अनेक प्रकरणात जाणूनबुजून मोदी-शाहंना अडकविण्याचा आटोकाट प्रयत्न सोनिया गांधी सरकारने केला. परंतु प्रत्येक वेळी ते अग्निपरीक्षा उत्तीर्ण झाले.

मध्यंतरी उभाटा सरकार सत्तेत आल्यावर तरी न्यायमूर्ती लोयांच्या मृत्यूची चौकशी करायला पाहिजे होती. कारण लोयांचा मृत्यू महाराष्ट्रातच झाला आहे.

श्रीगुरुजी

तेव्हा टकल्याने एक पुस्तक लिहून सर्वोच्च न्यायालयात लोयांच्या मृत्युसाठी शाहंना दोषी धरावे यासाठी दाद मागितली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सर्व पुरावे, डॉक्टरांची साक्ष, ४ सहकारी न्यायाधीशांची साक्ष, शवविच्छेदनाचा अहवाल, त्यांच्या आजारांचा इतिहास अश्या सर्व गोष्टी तपासून लोयांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा निर्णय दिला आहे.

कौसरबीवर बलात्कार करुन तिला जाळण्याचे आदेश कुणी दिले? ती जीवंत असती तर कोण अडचणीत येणार होते?तिच्या नावावर गुन्हे नव्हते. हरेन पंड्या ह्यांना ठार मारुन कुणाला राजकीय फायदा होणार होता? हरेन पंड्या कुणाला अडचणीत आणु पाहत होते? ह्या प्रश्नांची उत्तरे खरे तर सर्वाना माहित आहेत.
ईशरत जहाचे एन्काउंटर फेक होते हे सर्वानाच माहित आहे. एल ई टी/पाकिस्तान हे शब्द घुसडले की काहीही खपवता येते.
आधी गुजरात्यांच्या डोक्यात धर्माचे खूळ घातले. उत्तर प्रदेशच्या लोकांची डोकी फिरवणे तुलनेने सोपे होते. आता लक्ष महाराष्ट्रावर आहे.

श्रीगुरुजी

हरेन पंड्या ह्यांना ठार मारुन कुणाला राजकीय फायदा होणार होता?

पाकिस्तानचा म्हणजे पर्यायाने कॉंग्रेसचा.

ईशरत जहाचे एन्काउंटर फेक होते हे सर्वानाच माहित आहे.

इशरत आपली हस्तक होती हे लष्करेतोयबानेच आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले होते.

आधी गुजरात्यांच्या डोक्यात धर्माचे खूळ घातले.

चालायला, बोलायला यायच्या आधीपासून गुजराती डोक्यात व्यवसाय, पैसे कमावणे, समभाग वगैरे शिकतात. असले व्यवहारी धर्म वगैरे खूळ डोक्यात घेत नाहीत. आपला लाभ असल्याशिवाय ते काहीही करीत नाहीत.

इशरत जहा, सोहराबुद्दिन, हरेन पंड्या यांच्या मृत्युसंबंधी अजूनही मनात शंका असतील तर न्यायालयात जाऊ शकता.

आणि अशा पाकिस्तानच्या पंतप्रधानांना केक भरवायला पंतप्रधान गेले.
cake
न खाउंगा ना खाने दूंगा असे म्हणायचे आणि न्यायाधीशांच्या घरात कोट्यावधीची रोकड.
साधन शुचितेच्या गप्पा संघाने मारायच्या आणि ह्यांच्या मंत्र्यांची अंतर्वस्त्रे फाटलेली. ती महिला कस्तीपटू ओरडुन सांगते, त्या मंत्री ब्रीजभूषण सिंगवर लैंगिक शोषणाचा सरळ आरोप करते . ह्या ब्रीज्भूषण सिंगवर ३० हुन अधिक गुन्हे. हा माणुस स्व्तःच टीव्हीवर सांगतो की त्याने खून केला आहे.
गोरक्षणाच्या नावाखाली बोंब मारायची आणि ह्यांचेच समर्थक भारतातुन बीफ निर्यात करणार. मेक-इन-इन्डिया म्हणायचे आणि ट्रम्प जे बरळेल त्याला 'येस सर' म्हणायचे.
सगळीकडेच ढोंगबाजी.

+१ माई!
पण २०१४ साली आमच्या डोक्यात “अच्छे दिन” घुसले होते अच्छे दिन तर आले नाहीत पण बुरे दिन मात्र सुरू झाले!
हिरा मिळवायच्या नादात मनमोहनसिंह ह्यांच्यासारखे अस्सल सोने. मात्र गमावले! आता पदरी कोळसा घेऊन फिरतोय!
आता ह्यांनी यंत्रणा सडवलीय, निवडणूक आयोग ह्यांच्या ताब्यात आहे, ६ महिन्यात अचानक ४० लाख मतदार वाढतात, ईव्हीएम बनवणाऱ्या कंपनीत कमळाच्या बिल्ल्याचे डायरेक्टर आहेत, म्हणून सर्वांना सारखेच १ लाख १५ हजार मते पडतात, नी मुस्लिम लोकसंख्येपेक्षा जास्ती मते mim पक्षाला पडतात! आता ह्यांना हटवणे भारतीयांच्या दृष्टीने फार कठीण आहे! गोबरयुग गं गोबरयुग!

मोदींना विरोध करायला कितीतरी चांगले मुद्दे मिळतील. पण काँग्रेस सारखे पक्ष आणि त्यांच्या समर्थकांनी अतिशय चुकीचे मुद्दे निवडले आणि अजूनही निवडत आहेत. लष्करेतोयबा सारख्या आतंकवादी संघटनेने आपल्या वेब साईट वर नाव प्रसिद्ध केलेली महिला आतंकवादी इशरत जहाँ सारख्याला समर्थन करून फार फार तर आव्हाडांसारख्यांना फायदा झाला असेल. बाकी कितीतरी मते कमी झालेली असतील. राफेल डील ला, राम मंदिर, ३७० कलम अशा कितीतरी गोष्टींना विरोध करून काँग्रेसने आपल्याच पायावर दगड मारून घेतलेला आहे

श्रीगुरुजी

बाडिस.

कालौघात केव्हाच बंद झालेल्या इशरत जहा, सोहराबुद्दिन, राफेल वगैरे निरर्थक मुद्दे तेव्हाही निरर्थक ठरले आणि आजही निरर्थक आहेत. विशेषतः या सर्व आरोपांसाठी मोदी-शाहंनी अग्निपरीक्षा देऊन त्यातून ते झळाळून बाहेर आले आहेत. परंतु मूर्ख विरोधक अजूनही ते मुद्दे सोडण्यास तयार नाहीत.

श्रीगुरुजी

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या ११७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माझी संस्थेच्या अध्यक्षपदी पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा एकमताने निवड झाली याबद्दल संस्थेच्या सर्व सन्माननीय सभासदांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. संस्थेच्या इतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे देखील हार्दिक अभिनंदन !— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 23, 2025

अवघे चौऱ्याऐशी वयमान! यावच्चंद्रदिवाकरौ आसन सोडणार नाही.

+१
ह्यांनी आपले शिष्य श्री नरेंद्र मोदी ह्यांचा आदर्श घ्यावा! ते ७५ पूर्ण झाले की रिटायर्ड होणार आहेत गेला बाजार मनोहर पर्रीकर ह्यांचा तरी आदर्श घ्यावा, आपण आजारी आहोत म्हणून त्यांनी पैड सोडले पण आजारपणातच बाटल्या वगैरे घेऊन विधानसभेत गेले नाही!

+१
ह्यांनी आपले शिष्य श्री नरेंद्र मोदी ह्यांचा आदर्श घ्यावा! ते ७५ पूर्ण झाले की रिटायर्ड होणार आहेत गेला बाजार मनोहर पर्रीकर ह्यांचा तरी आदर्श घ्यावा, आपण आजारी आहोत म्हणून त्यांनी पद सोडले पण आजारपणातच बाटल्या वगैरे घेऊन विधानसभेत गेले नाही!

उत्तम निर्णय.
देर आये दुरुस्त आये. सौदी अरेबिया,मलेशिया वगैरे देशांनी जानेवारीपासूनच अँन्टी डंपिंग शुल्क चीनला लावायला सुरुवात केली होती.

श्रीगुरुजी

माईडे,

स्टारलिंक, टेस्ला भारतात यायला अनुमती दिली आहे या फेकाफेकीचे पुरावे कधी देणार?

आग्या१९९०

उत्तम निर्णय.
देर आये दुरुस्त आये.
सरकारने कांद्यावरील २०% निर्यात शुक्ल काढून टाकले. गेले दीड वर्ष कांदा उत्पादकांना सरकारने जेरीस आणले होते. देशाला कांदा खाणारा अर्थमंत्री हवाय, डोक्यात कांदे असलेला नको.

कुणाल कामराच प्रकरण ताणायची काहीही गरज नव्हतं. आता तर तो स्टुडिओ पण पाडणार आहेत. सत्ता आहे म्हणून किती मजुराडे पणा.

श्रीगुरुजी

- आणिबाणी लादून सर्व देशाचे कारागृह करणारे,
- किशोरकुमारच्या गीतांना आकाशवाणीवर प्रतिबंध घालणारे,
- हृदयनाथ मंगेशकरांची आकाशवाणीतून हकालपट्टी करणारे,
- ऑंधी व किस्सा कुर्सी का चित्रपटावर बंदी आणणारे,
- मांग भरो सजना चित्रपटातून शत्रुघ्न सिन्हाची दृश्ये काढून टाकणारे,
- झी स्टुडिओची तोडफोड करणारे,
- 'सोबत' साप्ताहिकाच्या कार्यालयाची तोडफोड करणारे,
- निखिल वागळेला बदडायला गुंड पाठविणारे,
- मुका व्यंगचित्र छापल्याने सामना कार्यालयाची तोडफोड करणारे,
- बाळ ठाकरेंचे थंड स्वागत अशी बातमी देणाऱ्या बातमीदाराला मरेस्तोवर मारणारे,
- व्यंगचित्र समुहात टाकणाऱ्या अनंत करमुसेला १०-१२ माणसे पाठवून घरी उचलून आणून रात्रभर बदडणारे,
- व्यंगचित्र समुहात टाकणाऱ्या नौदल अधिकाऱ्याला डोळा फुटेस्तोवर मारणारे,
- असंतांचे संत अग्रलेख मागे घेऊन क्षमा मागणारे,
- कविता प्रसिद्ध करणाऱ्या एका सामान्य महिलेचा विनयभंग करून ४० दिवस तुरूंगात डांबणारे,
- २ ओळींचे ट्विट करणाऱ्याला ४० दिवस तुरूंगात डांबणारे,
.
.
.

आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी टाहो फोडत आहेत.

सामान्य माणसांनी असल्या तोडफोडीच समर्थन नाही केलं पाहिजे. आज कामरा उद्या मिसळ पाव वरती टिका केली म्हणूनही तोडफोड केली जाऊ शकते.

आता कुणाल कामरा घटनेची प्रत हातात घेउन दाखवतोय. २०१९ पर्यंत आपली मीडिया शिवसेनेचा उल्लेख 'कम्युनल पार्टी' म्हणून करायची. १९९२ च्या दंगलीचा उल्लेख २०१९ पर्यंत यायचा. शिवसेनेची कॉन्ग्रेसबरोबर युती झाली आणि हे सगळे उल्लेख गायब झाले. म्हणजे आपली मीडियाही खर्या अर्थाने सेक्युलर नाही. किरीट सोमैय्यांच्या गाडीवर दगडफेक करणारे उद्धवसेनेचे होते ना?

सध्या मिडिया पूर्ण पने भाजपच्या आधीन आहे. त्यामुळे त्यांना सोयीच्या बातम्या फक्त दाखवल्या जात आहेत.

रात्रीचे चांदणे ह्यांचा काल भाजप समर्थनाकडे असतो, त्यांनीच
हे सत्य सांगितले असल्याने मिडिया भाजपच्या ताटाखालचे मांजर झालाय हे कळते!

माईडे मीडिया जाऊदे खड्ड्यात, खुद्द श्रीगुरुजी शिवसेनेला गुंड लोकांचा पक्ष वगैरे म्हणायचे! पण भाजप सोबत त्यातले ६० टक्के लोक आले तर आता खोटी शिवसेना गुरुजींच्या मते साधू संतांचा पक्ष झाला असावा नाही?

श्रीगुरुजी

कोणीही केलेल्या कोणत्याही मारहाणीचे, मुस्कटदाबीचे, दढपशाहीचे, तोडफोडीचे मी समर्थन करीत नाही।

ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार राजधानी दिल्लीतील निझामुद्दीन येथून मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत सौगात ए मोदी या कीटचे वाटप करण्यास सुरूवात होणार आहे.

https://marathi.abplive.com/news/politics/bjp-distributes-32-lakh-sauga…

महाराष्ट्रात 'सागुती ए देवेंद्र' कीट देण्यात यावे. मट्ण खीमा-४ पाव-खजूर-काजू
महिलांना देण्यात येणाऱ्या कीटमध्ये सूटचे कापड असणार असून पुरुषांच्या कीटमध्ये कुर्ता-पायजमाचा कपडा असेल. .
आणि ह्याचा खर्च ?एज्युकेशन सेस सारखा, सौगात ए सेस?

सरकारी तिजोरीतून 'ह्या लोकांचे' लाड कशासाठी? असा प्रश्न भाजपवालेच तर विचारत होते ना? म्हणून २०१८ साली मोदी सरकारने हज सबसीडी बंद केली होती.
https://timesofindia.indiatimes.com/india/haj-subsidy-ends-funds-to-go-…

श्रीगुरुजी

सरकारी तिजोरी या लोकांवर उधळून टाकलेल्यांना हा प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही.

आग्या१९९०

मुळात हा अधिकार कोणालाच नाही. नवीन लोकशाहीत जनतेला अधिकार नाहीत.

स्वधर्म

सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, असलाच पाहिजे. अपवाद फक्त राष्ट्रीय सुरक्षेबाबत असेल तरच सरकार उत्तर द्यायचे नाकारू शकते.

श्रीगुरुजी

जर सरकारी योजना किंवा निर्णय असेल तर सरकारला प्रश्न विचारण्याचा सर्वांना अधिकार आहे.

स्वधर्म

खरोखर भाजप बोलते एक आणि वागते दुसरेच.

हे लोकानी कधीच ओळखले आहे, त्यामुळेच भाजपला मते मिळत नाही, निवडणूक आयोग नी इव्हियन बनवणाऱ्या कंपनीतील कमळाच्या बिल्ल्यावाले डायरेक्टर भाजपला जिंकवतात.

श्रीगुरुजी

माईडे,

तुला आणि तुझ्या 'ह्यां'ना पण किट मिळणार बरं का. 'ह्यां'च्या किटात धोतरजोडी, बाह्यांचे दोन बनियन, गांधी टोपी, कवळी साफ करण्यासाठी ब्रश आणि पावडर असेल. तुझ्या किटात गर्भरेशमी नऊवारी, पावडर, स्नो असेल.

श्रीगुरुजी

शिवसेनेच्या शाखेत सतरंजी उचलणाऱ्यांना अर्धा शिळा वडापाव. यापेक्षा जास्त काही नाही.

श्रीगुरुजी

आदूबाळला वाचविण्यासाठी जाणूनबुजून वाघ्याकडे 'दिशा' वळवली असेल का?

आग्या१९९०

मतदार यादी आणि EVM मशीनमध्ये आता गडबड करणे कठीण जाणार ह्याची जाणीव असल्याने ठराविक समाजाचे तुष्टीकरण करण्याची पाळी आली आहे.

श्रीगुरुजी

म्हणजे यापुढे (नेहमीप्रमाणे) हरल्यानंतर मतदार यादी, मतयंत्र इ. च्या नावाने गळा काढणार नाही तर.

आग्या१९९०

म्हणजे यापुढे (नेहमीप्रमाणे) हरल्यानंतर मतदार यादी, मतयंत्र इ. च्या नावाने गळा काढणार नाही तर.
कठीण जाणार असे म्हटले, प्रयत्न करणारच नाही असे म्हटले नाही. तुष्टीकरण हा सुरक्षीत पर्याय हाताशी ठेवला. जित्याची खोड जाणार आहे का?

श्रीगुरुजी

म्हणजे रडारड सुरूच राहणार. वाटल़च होतं. पादऱ्याला पावट्याचं निमित्त.

आग्या१९९०

वाढीव मतदारांची यादी जाहीर केल्यास खरं ते कळेल. उगाच टाळाटाळ करत आहेत काय?

आग्या१९९०

निवडणूक रोख्याबाबतही असाच वेळ घालवला होता, शेवटी अवैध ठरवले गेले, भले त्याला वरातीमागून घोडे म्हणा. खोटेपणा उघडकीस आला सरकारचा.

मतदार यादी आणि EVM मशीनमध्ये आता गडबड करणे कठीण जाणार ह्याची जाणीव असल्याने ठराविक समाजाचे तुष्टीकरण करण्याची पाळी आली आहे. +१
ह्याचमुळे निवडणूक आयोग महापालिकांच्या निवडणुकाही घेत नाहीये, कारण सर्वजण सतर्क झालेत, आयोगाला आता भाजपला जिंकवता येणार नाही!

श्रीगुरुजी

विधावसभेचा उपाध्यक्ष निवडला, पण विरोधी पक्षनेता म्हणून नेमणूक न केल्याने एका अत्यंत उर्मट व उन्मत्त माणसाचा भयंकर चडफडाट होतोय. बघून मजा येतीये. आठाला विरोधी पक्षनेता करण्याच्या बदल्यात काही तरी डील ठरत असावे. त्यामुळे विरोधी पक्षनेता पद अजूनही भरले नसावे.

भास्कर जाधवांची दहशत आहे, एका फटक्यात १२ घरी बसवले होते, ह्यामुळे सत्ताधाऱ्यांची घाबरगुंडी उडालीय!

एकदा पाठिंबा मिळतोय असे दिसले की अनेक कलाकार वाटेल ते बोलायला लागतात. सध्याचे ताजे उदाहरण म्हणजे कुणाल कामरा. दिल तो पागल है मधील गाण्याच्या चालीवर केलेले त्याचे विडंबन छान होते.आता सुधा मुर्तींवर कामराने टीपणी केली आहे. "जे श्रीमंत असतात ते आपण मध्यम वर्गीय असल्याचा अभिनय करत असतात. ह्यातील सर्वप्रथम नाव आहे सूधा मूर्ती.त्यांनी त्यांच्या साधेपणावर ५० पुस्तके लिहिली आहेत."
आता हा विनोद आहे की जळफळाट ते कळायला मार्ग नाही. त्यानंतर आनंद महिंद्र ह्यांच्यावरही कामरा बोलला आहे-
"Anand Mahindra tweets about everything—thermodynamics, marine biology, radioactivity—except how to improve his own cars," Kamra joked.

He further poked fun at Mahindra's enthusiasm for AI, suggesting that people invite him to conferences sarcastically, but Mahindra takes them seriously.

कामराच्या विनोदाची पातळी यथातथाच असते पण टाळ्या पडतात.'चला हवा येउ द्या'पेक्षा कामरा अनेक पटीने बरा.
कामराच्या बोलण्यात विनोदापेक्षा व्यक्तिगत टीकाच जास्त असते असे दिसते.

https://www.deccanherald.com/india/wrote-50-books-on-her-simplicity-kun…
https://www.storyboard18.com/brand-makers/kunal-kamras-controversial-ja…

कामरा हा ह्या क्षेत्रातला जुना खेळाडू आहे, त्याने अनेक वेळा अनेक लोकांवर टीका केलीय, नी अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे, पण सध्या भाजपची सत्ता मी कायदा सुव्यवस्थेची अवस्था पाहता त्या स्टूडियोवर हल्ला झाला ह्यात काहीही आश्चर्य नाही.

आग्या१९९०

कुणाल कामराला फार गंभीरपणे घ्यायची गरज नव्हती, परंतु उडता तीर पकडायला गेले आणि अंगाशी आले.

श्रीगुरुजी

सरकार ने माझी निवड केली नाही, तरी मी महाराष्ट्राच्या मनातील विरोधी पक्षनेता आहे.- भास्कर जाधव, शिवसेना नेते-आमदार@_BhaskarJadhav pic.twitter.com/nI38zkWiw2— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) March 26, 2025

अजून हसतोय. आदूबाळसाठी भास्क्याचा गेम केला.

श्रीगुरुजी

आम्ही फक्त गंमत बघतो. चडफडाट पाहून मजा येते. मग मस्त वडापाव खातो (ताजा बरंका. शेणक्यांना फेकतात तसला शिळा अर्धा वडापाव नाही.).

आग्या१९९०

'सौगात ए मोदी' किटचा चडफडाट सतरंजीखाली लपवता का? की होतच नाही.

श्रीगुरुजी

इतके घायकुतीला येऊ नका तुमच्यासारख्यांसाठी सुद्धा एक आगळेवेगळे किट आहे. त्यात हिरवी लुंगी, बाह्यांचे बनियन, जाळीदार टोपी, केसांना व दाढीला लावायला मेंदी अश्या दैनंदिन उपयोगाच्या वस्तू आहेत.

हे मात्र खरे आहे. मात्र ह्या 'ब' संघाशी भाजपाने २५ वर्षे युती केली होती हेही तेवढेच खरे आहे. बाळासाहेबांनी वाट्टेल तशी भडकाउ विधाने करावीत आणि भाजपा नेत्यांनी "आम्ही ऐकले नाही" असे सोंग करावे. हे अनेक वर्षे चालु होते. निम्नमध्यम तरूणांमध्ये शिवसेना लोकप्रिय असल्याने अशा विधानांना 'ठाकरी शैली/ज्वलंत हिंदुत्व' वगैरे म्हणण्याची पद्धत पडली.

सुबोध खरे

ज्या सेनेच्या जीवावर मोठे झाले तिलाच नावे ठेवू लागले!

हायला

भुजबळ बुवा तुम्हाला विनोद छान करता यायला लागले कि.

अजून येऊ द्या

भुजबळ बुवा तुम्हाला विनोद छान करता यायला लागले कि

.
छान विनोद करता यायला लागले म्हणजे? पहिल्यापासूनचे ते विनोदी आहेत.

सत्य गोष्टीला विनोद म्हटले म्हणजे वास्तविकता बदलत नाही. उगाच का मातोश्रीवर युती करा म्हणून पाय धरायचे?

सर्वच ठाकरे स्वत ला राजा सारखे समजतात. ह्यामुळेच गदारी करून का होईना उभाटा जेव्हा मुखमंत्री होते तेंव्हा त्यांना मंत्रालयात जाऊ वाटत नव्हते. सगळ्यांनी मातोश्री वरच यावे हा हट्टासाठच त्यांना भोवला. जो पर्यंत भाजपावले मातोश्रीवर जात होते तो पर्यंत सेनेच बर चालल होत. सध्या राऊत सोडून कोणीही मातोश्रीवर जात असेल वाटत नाही.

ठाकरे स्वतःला काहीही समजो, पण मातोश्रीवर ठाकरेंच्या पाया पडून युती करा म्हणणारे का जायचे? :)

सुबोध खरे

हा विनोद तितका चांगला नव्हता.

आता जास्त चांगला पाठवा बरं

राकेश खेडकर आणी त्याची पत्नी गौरी. काही महिन्यांपुर्वीच बेंग़ळुरुत स्थायिक झाले होते. तो आय.टीत. हिताची कंसल्टिंग कम्पनीत. ती नोकरीच्या शोधात होती. दोघे आत्ते-मामे भावंडे. वय ३६ आणि ३२. तिने मुंबईतील नोकरी सोडली होती. बेंगळुरुत नोकरी मिळत नसल्याने तिची चिडचिड. ४ दिवसापुर्वी रागाच्या भरात,भांडणात तिने त्याला सुरी फेकुन मारली. त्याच सुरीने त्याने मग तीन वार करुन तिला संपवले आणि सूटकेसमध्ये मृतदेह ठेउन तो सातार्याच्या दिशेने कारने निघाला. "मी तिला मारले आहे आणि मी आत्महत्या करणार आहे' असे वडिलांना सांगितले. सुदैवाने पोलिसांनी शोधले तेव्हा तो बेशुद्धावस्थेत होता पण आता ठीक आहे. ह्याच्या वडिलांची प्रतिक्रिया थोडी अनपेक्षित होती- "सून म्हणजे भाची वेडी होती. आणि खूप भांडायची' असे ते म्हणाले. आता अधिक तपास सुरू आहे.

कुणाल कामरा परवाच सुधा मुर्तींची थट्टा करताना म्हणाला होता- "त्या आपल्या साधेपणाचे प्रदर्शन करत असतात". पतीपेक्षा जास्त पगाराची नोकरी असताना ती सोडुन मुलांचा सांभाळ करण्यासाठी सुधा मूर्ती घरी राहिल्या व कंपनीसाठी स्वत:चे दागिने विकुन पैसा दिला.
सहनशीलता,संयम, सोशिकपणा हे शब्द आता फक्त कागदावरच राहिले आहेत.
https://www.loksatta.com/desh-videsh/bengaluru-murder-case-rakesh-khede…

सर्वच राजकीय पक्ष द्वेषमूलक विचार पसरवत आहेत.
गाळलेल्या जागा भरा.
१) ------- पक्ष मुस्लिमांचा द्वेष करायला सांगतो.
२) -------- पक्ष अमराठी लोकांचा द्वेष करायला सांगतो.
३) ----- पक्ष बिगर मराठा,प्रामुख्याने ब्राम्हणांचा द्वेष करायला सांगतो.

श्रीगुरुजी

१) कोणताच नाही
२) कोणताच नाही
३) भाजप वगळता इतर सर्व पक्ष

श्रीगुरुजी

१) कोणताच नाही
२) कोणताच नाही
३) भाजप वगळता इतर सर्व पक्ष

आंद्रे वडापाव

मग् भाजप वगळताचे जे पक्ष आहेत त्यांचा पाठिंबा भाजपने का घ्यावा मग् ?
भाजप ब्राम्हण-शत्रू पक्ष आहे का ?

३५-४० वर्षापुर्वी बलुचिस्तानातुन काही शिया लोक कल्याण-आंबिवली परिसरात स्थायिक झाले. २००० नंतर चोर्या व लहान मोठे गुन्हे करायला सुरुवात झाली. महाराष्ट्राची पोलिस व्यवस्था देशातल्या सर्वात भ्रष्ट व्यवस्थेपैकी असल्याने, ह्या लोकांचे बळ वाढले आणि त्यांनी देशातील ईतर राज्यांमध्येही गुन्हे करायला सुरुवात केली. पुर्वी दगडी चाळीत जायला आपले पोलिस 'घाबरत' तसेच ह्या लोकांच्या वस्तीत जायला पोलिस घाबरायचे. !
नुकतेच चेन्नई पोलिसांनी ह्या ईराणी टोळीच्या म्होरक्याचे चेन्नईत एन्काउंटर केले . आणि गेले १५-२० वर्षे 'न सापडणार्या' गुन्हेगाराचे एन्काउंटर झाले हे कळल्यावर महाराष्ट्र पोलिसांची,ग्रुहखात्याची मान शरमेने खाली गेली असेल.
फ्लाईटने मोठ्या शहरांत जायचे, बाईक घेउन मग मॉर्निग वॉक्,कामाला जाणार्या स्त्रियांचे दागिने,ईतर माल हिसकावुन घायचा. आणि त्याच दिवशी परतीच्या फ्लाईटने मुंबईत परतायचे.स्थानिक पोलिस गुन्हेगार स्थानिक असणार म्हणून शहरात आजुबाजुला शोधत बसणार. चेन्नईत मात्र डाळ शिजली नाही. सीसीटीव्ही फूटेजचा पोलिसानी बारकाईने अभ्यास केला आणि लक्षात आले की बाईकवरचा एक गुन्हेगाराचे जरा वेगळ्या प्रकारचे बूट आहेत. परतीची फ्लाईट पकडताना कपडे बदलले होते पण बूट तेच होते. रेल्वे/बस स्थानके आणि विमान्तळ येथे मोठ्या प्रमाणावर पाळत ठेवली आणि ह्या दोघांना मुंबईची फ्लाईट पकडताना पोलिसांनी धरले. चौकशीसाठी मग नेताना एकाने बाईकमधुन रिवॉल्वर काढुन हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात ईराणी टोळीचा सूत्रधार ठार झाला.

https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/irani-basti-a-chain-thi…
https://www.youtube.com/watch?v=dTP1GCO4W4c

आग्या१९९०

राजस्थानमध्ये ईद साजरी करणाऱ्या समुदायावर हिंदूंनी पुष्पवृष्टी केली.