अहमदाबाद क्रॅश - बोईंग ७८७ ड्रीमलायनर - भंगलेलं स्वप्न.
Primary tabs
२४२ लोकांना घेऊन उड्डाण करणारे एअर इंडियाचे अहमदाबाद ते गॅटविक (लंडन) मार्गावर निघालेले बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान टेक ऑफ नंतर लगेचच शहरी वस्तीत कोसळले आहे. कोणतीही कारणमीमांसा होऊ शकायला थोडा वेळ लागेल. दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी हे उड्डाण झालं होतं.
इथे अपडेट करत राहता यावे म्हणून धागा.
कॅप्टन सुमित सब्रवाल कमांडर होते तर कॅप्टन क्लाइव्ह कुंदर हे को पायलट होते.
ड्रीम लायनर हे विमान (मॉडेल) तुलनेत नवीन आहे. त्यात अनेक आधुनिक सुविधा, विशेषतः हाय फाय म्हणता येतील अशा आहेत. वरवरचे उदाहरण म्हणजे खिडक्या बंद करण्याचे झाकण न वापरता बटण फिरवून काच काळी करत नेणे आणि गडद करणे.
अनेक इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवत नेल्या की त्या प्रमाणात अंतर्गत गुंतागुंत आणि सिस्टिम्स वाढतात. जितक्या सिस्टिम्स जास्त तितके मालफंक्शन होण्याचे अधिक पर्याय निर्माण होतात.
काहीही ठोस बोलण्यास अजून खूप माहिती येणे गरजेचे आहे. एअर इंडिया आणि बोईंग या दोघांनाही आता मोठ्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. अनेक देशांचे नागरिक त्या विमानात असल्याने त्या त्या देशांचा सहभाग अर्थातच होत जाणार.
त्या जीव गमावलेल्या लोकांच्या बाबतीत काय बोलावे ? क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. आणि मानवी वस्तीवर इतके मोठे विमान कोसळल्याने जमिनीवर देखील अतोनात नुकसान झाले आहे. डॉक्टर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर हे विमान कोसळल्याचं कळलं.
हे सर्व खूप दूरवर जाणार. ड्रीम लायनर हे एक स्वप्नच जणू होतं. त्याचं भवितव्य पण टांगणीला लागणार काही काळ तरी. जोवर पायलटची चूक होती असं सिद्ध केलं जात नाही तोवर.
अधिक अपडेट इथे करत राहू.
क्रॅश होतानाच्या शेवटच्या क्षणांचा जो व्हिडिओ सर्वत्र दिसतोय (AI वाला नाही किंवा जुना फेक नाही असे गृहीत धरून) त्यात कोणतीही आग किंवा मिसिंग पार्ट दिसत नाही. फ्लॅप्स, जे टेक ऑफच्या वेळी डिप्लॉय केले जातात तेही झालेले दिसत नाहीत.
आणखी एक लिहायचं राहून गेलं की ड्रीमलायनरचा हा पहिलाच "हल लॉस" - पूर्ण विमान नष्ट होण्याचा अपघात.
महत्वाचे निरीक्षण. त्याची संगती पुढे लागेलच. विमान साधारण सहाशे फूट उंचीवर पोचून मग खाली आलं आहे. व्हिडिओ ओरिजनल असेल तर या स्टेजला लँडिंग गियर (चाके असेम्ब्ली) वर आणि फ्लॅप्स खाली, असे दिसले पाहिजे. इथे उलट दिसते आहे. फ्लॅप्स वर आणि चाके खाली.
विमानाला वर नेण्यासाठी जी अधिक इंधन देणारी दांडी सरकतात ती काही वेळाने परत फिरून लॉक व्हावी असा काही घातपात केला असेल का? म्हणजे विमान उतरण्याच्या वेळी वेग कमी होऊन चाके उघडतात असं काही झालं असेल. या कार्यावळीत इतर काही इलेक्ट्रॉनिक सिस्टम घुसेल असं वाटतं नाही. समजा वैमानिकाच्या लक्षात आलं की हवे तेवढे इंधन पुरवले जात नाही तर तो काय करेल? आहे त्या उंचीलाच विमान ठेवून वळवून उतरेल आणि त्यासाठी चाके परत उघडून तयार ठेवेल.
नाही. तसे करता येणे फारच कठीण. जवळपास अशक्य. आणि इंधन बंद झालेले नाही.
कोणता व्हिडिओ नक्की?
तुम्ही केलेल्या वर्णनावरुन तो नेपाळ मधे झालेल्या अपघाताचा व्हिडिओ असावा असे वाटत आहे. तो व्हिडिओ सध्या फिरत आहे.
विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी पण होते अशी बातमी पाहिली.
अत्यंत दु:खद घटना. सर्व मृतांना श्रध्दांजली आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना.
नाही. नेपाळ वाला नाही. हा आजचाच आहे. मुख्य वर्तमानपत्रे आणि मिडियात आलाय. इथे टाकता येत नाहीये.
दुःखद घटना.
>>>इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवत नेल्या की त्या प्रमाणात अंतर्गत गुंतागुंत आणि सिस्टिम्स वाढतात. जितक्या सिस्टिम्स जास्त तितके मालफंक्शन होण्याचे अधिक पर्याय निर्माण होतात.>>
नेमकं. सुखसोयीच्या इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवू नयेत किंवा त्यांचे पॅनेल बोर्ड केबिनमध्ये नसावेत. बोइंगवाले यात शोध घेतीलच. मागच्या काही महिन्यांत बोईंगचे स्पेस स्टेशन शटल अडकले होते याची आठवण झाली.
फ्लाइट रडार २४ चेक केले असता टेक ऑफ च्या वेळी वेग कमी होता१२० किलो नॉट्स असावा. शेवटचा डाटा हा १७४ किलो नॉट्स आणि हाइट ६२५ फुट आहे.
६२५ म्हणजे समुद्र सपाटीपासून असते. त्यातून विमानतळाची १७४ वजा करा. जमिनीपासून तितकी. इंजिन बंद नसल्याचा पुरावा.
मानवी चुकीच्या कारणाने असे झाले तर अधिकच वाईट वाटते.
म्हणजे जे टाळणे हातात आहे मानवाच्या ते किमान टाळले पाहिजे.
11 A सीटचा चा प्रवासी वाचला. जो exit door च्या जवळ होता.त्याने तिथून उडी मारली.
*Emergency door!
दुःखद घटना. :(
विमानाचे वजन सर्वाधिक अलाउड टेक ऑफ वेट पेक्षा जास्त असेल आणि हवा अत्यंत गरम म्हणजे विरळ असेल तर टेक ऑफ घ्यायला बराच अंतर आणि वेळ लागू शकतो. (औरंगाबाद क्रॅश). त्यामुळे वर चढत जाण्याचा दर देखील खूप मंदावू शकतो. पण इथे विमान खाली खाली येताना दिसत आहे. त्यामुळे ही कारणमीमांसा तूर्त रद्द करावी लागेल.
विमानाचे उड्डाण झाल्यापासून काही सेकंदात ते कोसळले. उड्डाणापासून कोसळेपर्यंतचा सगळा प्रवास अहमदाबाद विमानतळावरील सीसीटीव्ही कॅमेर्यात टिपला गेला आहे. तो https://youtube.com/shorts/DEjkiah6_JY?si=CJTq6VCB2TwOARFX वर बघता येईल. न्यूज चॅनेलवर अधिक स्पष्ट व्हिडिओ दाखवत होते. तो युट्यूबवर मिळाला नाही. त्या विमानाच्या मागेच दुसरे इंडिगोचे विमान उड्डाण करणार होते. ते रनवेवर जात असतानाच मागे (इंडिगोच्या विमानाच्या वैमानिकासाठी पुढे) काळ्या धुराचे लोट दिसायला लागले. ते बघून त्याला केवढा धक्का बसला असेल. तसेच ध्यानीमनी नसताना अचानक अवाढव्य विमान अंगावर येताना समजा त्या मेडिकल कॉलेजमधील हॉस्टेलमधील कोणी बघितले असेल तर त्या व्यक्तीच्या काळजाचे पाणी पाणी झाले असेल :(
अपघातातील लोकांच्या कुटुंबियांना सावरण्याचे बळ मिळो.
या अपघातामुळे एअर ईंडीयाला मोठा तोटा तर होणारच आहे. जगभरातील लोकांना भारताच्या हवाई क्षेत्राविषयी आत्तापर्यंत विश्वास वाटत आला आहे. तो अबाधित रहावा व या अपघातामागे सुरक्षा व्यवस्था व देखभाल व्यवस्था यातील ढिसाळपणा समोर येऊ नये ही अपेक्षा.
बोईंगचे समभाग प्रिमार्केट ८% तर एअर ईंडियाचे ४% कोसळले.
वैमानिकाने may day call दिला होता असे वाचले.
याचा काय अर्थ असतो ?
मे डे, पॅन पॅन वगैरे..
या धाग्यात आहे.
धन्यवाद..
Ac बंद होते.
याच विमानातून एका प्रवाशाने दिल्ली ते अहमदाबाद प्रवास केला होता. त्यात सर्व एसी बंद होते तसेच टीवीसुद्धा. ती खरड त्याने x वर टाकली आहे. तर यावर झटपट दुरुस्ती करून लंडनला पाठवले. त्या दुरुस्तीचा परिणाम असावा. सगळी वीज खेचली गेली असावी आणि .....
हिच प्रार्थना.
विमान कोसळणे हे बघणेच इतके भयंकर असते की त्याचा मनावर खोलवर परिणाम होतो. इंडिगो पायलट आणी प्रवासी यांच्या मानसिक स्थितीची कल्पनाच करवत नाही.
एक जानेवारीत आठ्ठ्याहत्तर सम्राट कनिष्क चे कोसळणे जुहू बिचवरून प्रत्यक्ष बघीतले. त्यावेळेस महाराष्ट्र राज्य कर्मचारी संपावर होते. अत्यावश्यक सेवा सुचारू चालण्यासाठी सैन्याला बोलावले होते. मी के ई एम मधे कार्यरत होतो. अपघातानंतर सर्व प्रवाश्यांच्या मृतदेहाचे अवशेष याच हाॅस्पिटल मधे आणले होते. अतिशय विदारक परिस्थीती होती.
दुसरा अपघात जोधपूर मधे असताना प्रत्यक्ष बघीतला. विमानाला आग लागली, फ्युएल टॅक सारखी वस्तू खालून जाणार्या टि व्ही एस फिफ्टीवर कोसळली. वाहन आणी वाहन चालकाचा कोळसा झाला. आजही ते दृश्य आठवले की काटा येतो.
वैमानिक पण दगावला. ओळखू येत नव्हता.
बाप रे ...... !
एक जानेवारीत आठ्ठ्याहत्तर सम्राट कनिष्क चे कोसळणे जुहू बिचवरून प्रत्यक्ष बघीतले.
जुहू बीचवरून? कनिष्क विमान खलिस्तान अतिरेक्यांनी बाँबस्फोट करून १९८५ ला उडवले , आणि ते अटलांटिक महासागरात कोसळले होते.
भावना पोहचली!!
ते सम्राट अशोक विमान होते. मुंबई - दुबई.
हिच प्रार्थना.
विमान कोसळणे हे बघणेच इतके भयंकर असते की त्याचा मनावर खोलवर परिणाम होतो. इंडिगो पायलट आणी प्रवासी यांच्या मानसिक स्थितीची कल्पनाच करवत नाही.
एक जानेवारीत आठ्ठ्याहत्तर सम्राट कनिष्क चे कोसळणे जुहू बिचवरून प्रत्यक्ष बघीतले. त्यावेळेस महाराष्ट्र राज्य कर्मचारी संपावर होते. अत्यावश्यक सेवा सुचारू चालण्यासाठी सैन्याला बोलावले होते. मी के ई एम मधे कार्यरत होतो. अपघातानंतर सर्व प्रवाश्यांच्या मृतदेहाचे अवशेष याच हाॅस्पिटल मधे आणले होते. अतिशय विदारक परिस्थीती होती.
दुसरा अपघात जोधपूर मधे असताना प्रत्यक्ष बघीतला. विमानाला आग लागली, फ्युएल टॅक सारखी वस्तू खालून जाणार्या टि व्ही एस फिफ्टीवर कोसळली. वाहन आणी वाहन चालकाचा कोळसा झाला. आजही ते दृश्य आठवले की काटा येतो.
वैमानिक पण दगावला. ओळखू येत नव्हता.
अतिशय र्हदयद्रावक घटना. कालपासून जे जे व्हीडीयो पाहण्यात आले ते पाहुन अधिकच दु;खच केवळ. आयुष्याचा कोणताच प्रवास सुरक्षित नाही. घटना घडणार होती म्हणून घडली म्हणून सोडून देताही येईल पण तांत्रिक गोष्टींनी जी जीवीत हानी झाली ती कधीही भरुन निघणार नाही. आपण घटना यंव घडली आणि त्यंव घडली म्हणून उद्या कदाचित काही निष्कर्ष काढूही, त्यात सुधारणाही होईल पण अपघात थांबतील याची शास्वती अजिबातच वाटत नाही.
विमान उडतंय आणि काही क्षणात हळुहळु खाली येत शेपटीच्या बाजूने इमारतीला धडकते. आपण काही यातले जाणकार नाही, पण ज्या बातम्या येताहेत त्यात दोन्हीही इंजीन्स अचानक बंद पडली अशी स्थिती झाली. "मे डे" हा जीवघेणा शब्द बाहेर पडला तितकाच बाकी सर्वत्र शांतता. वस्तीगृहातील शिकाऊ डॉक्टरर्सना आपलाही जीव नाहक गमवावा लागला.
दूरचं उडान आहे म्हणून टँक भरलेले असेल आणि कदाचित त्याच्या स्फोटामुले इतकी जिवीत हानी झाली. भविष्यात इंधनविरहित इतक्या ताकदीच्या वीजेच्या ताकदीवर किंवा इंधन टाकी इतकी मजबूत की ती आदळली, स्फोट झाला तरी ती फूटू नये इतका काही बंदोबस्त झाल्याशिवाय अशा अपघातात होणारी जिवीत हानी कमी होणार नाही, हा विचार फारच तकलादू असू शकेल पण अशा अपघातातील हानी कमी करण्याचा विचार भविष्यात होऊ शकेल असे वाटते.
विमान अपघातातील मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली.
-दिलीप बिरुटे
बरीच अधिकची माहिती मिळते आहे. टेकऑफचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
टेक ऑफ व्यवस्थित झाला होता. तोपर्यंत इंजिन्स व्यवस्थित चालू होती.
नंतर लगेच इंजिनची पॉवर नाहीशी झाली असे म्हणावे तरी देखील एकदम दोन्ही इंजिने बंद पडणे हे या विमानाच्या बाबतीत केवळ तात्विक दृष्ट्याच शक्य आहे. प्रत्यक्षात ती शक्यता नगण्य. आणि एक इंजिन पूर्ण बंद पडले तरी उरलेल्या एका इंजिनावर विमान हवेत वर चढून योग्य उंची प्राप्त करून पुन्हा गोल फिरत लँड करू शकते. पायलटला ते ट्रेनिंग दिलेले असते. आणि एक इंजिनावर पूर्ण प्रवास देखील करता येईल अशीच रचना असते.
पक्षी आदळून किंवा अडकून दोन्ही इंजिने पूर्ण बंद होणे हे देखील फार दुर्मिळ. आणि तसे असते तर थोडा तरी धूर, काजळी, कदाचित आगीचा बारीकसा तरी लोळ असे दिसायला हवे. तसे काही दिसत नाही. पक्षीही बऱ्याच संख्येने आणि मोठाले असतील तरच दोन्ही इंजिने एकावेळी भरून जातील. पण पक्षीही दिसत नाहीत टेकऑफच्या वेळी.
दोन प्रकार असतात. लॉस ऑफ पॉवर आणि लॉस ऑफ लिफ्ट. पॉवर पूर्णपणे उपलब्ध असूनही लिफ्ट नाहीशी होऊ शकते. यासाठी दोन तीन शक्यता आहेत. त्यातलीच एक बाहेर येईल असे वाटते. थोडे नंतर सवडीने यावर लिहीन.
आपण या विषयातले जाणकार आहात त्यामुळे आपण जी शक्यता नगण्य म्हणत आहात तीच शक्यता अधिक आहे. आम्ही जाणकार नाही पण साधं लॉजीक असं आहे की, विमान उडालं आहे, आणि हळुहळु खाली येतंय याचा अर्थ त्याची पॉवर कमी झाली आहे. एक इंजीन चालू असतं तर, कदाचित वळण घेवून लँडींगला आलं असतं म्हणजे एकही इंजीन चालू नाही. एकही चालू नाही म्हणजे दोन्हीही बंद पडले उडण्याची क्षमता गमावली आहे. आपल्या यंत्र तंत्राच्या भाषेत लॉस ऑफ पॉवर हतबल ही स्थिती त्यामुळे जे तांत्रिक फेल्युअर झालं ते मशीनचं.
एकदा उडून ही स्थिती यावी हे जे जरा तर्कापलिकडे जातंय. उडतंय म्हणजे पॉवर सुरु होतं आणि हळुहळु खाली येतंय म्हणजे अचानक पॉवर लॉस हतबल स्थिती, हा यांत्रिक बिघाड सापडला पाहिजे. दुसरं यात पायलटचा दोष दिसत नाही. विमान वर उडते राहावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले असावे. आता लँडींग झालं तर धोका तितकाच होता म्हणून त्याचं प्राधान्य विमान वर उडवायला असणार पण दुर्दैवाने विमान उंच झेप घेऊ शकले नाही. आज उद्या विमान कंपन्यावर येणारं बालट, कंपन्यांचं नुकसान होऊ नये म्हणून पायलटवर खापर फोडतात काय इतकंच पाहणे बाकी आहे.
एक्सपर्ट लोकांनी तर्क पटणारा केला पाहिजे. इतकी माफक अपेक्षा.
-दिलीप बिरुटे
बरं झालं तुम्ही हा मुद्दा मांडलात. मी वर म्हटलंच आहे की लॉस ऑफ पॉवर आणि लॉस ऑफ लिफ्ट असे दोन वेगळे भाग आहेत. फुल पॉवर इंजिन चालू असतानाही लॉस ऑफ लिफ्ट होतो आणि विमान अगदी असेच खाली येते. यासाठी आपल्याला विमान कसे उडते याबद्दल माहिती घ्यायला हवी. तुमची शेवटची काही वाक्ये मला हे सर्व लिहिण्यापासून परावृत्त करत आहेत पण इतर सर्व (खवचट नसलेल्या) मिपाकरांच्या माहितीसाठी कदाचित हे उपयुक्त ठरेल म्हणून लिहीत आहे.
विमानाच्या पंखावर जी लिफ्ट (उचल) उत्पन्न होते त्यासाठी पंखाच्या वरून आणि खालून वेगवेगळ्या वेगाने आणि दाबाने वाहणारी हवा कारणीभूत असते. दाबात असा फरक निर्माण व्हावा अशी पंखांची रचना आणि आकार असतो (aerofoil).
आता असे पहा, की पंखाचा हवेच्या प्रवाहाशी एक कोन असतो. आणि तो वेगवेगळ्या वेळी बदलतो. टेक ऑफ घेताना आणि वर चढताना तो जास्त असतो. त्याला अँगल ऑफ अटॅक म्हणतात. तो जसा वाढत जातो तसा एका मर्यादेनंतर हवेचा अवरोध वाढायला लागतो. आणि लिफ्ट निर्माण करणारे प्रवाह बिघडू लागतात. अशा वेळी विमानाला वर वर जाणे अधिक अवघड होऊ लागते. मग पॉवर वाढवून ही स्थिती काहीशी नियंत्रणात आणता येते. पण.. फुल पॉवर असताना देखील अँगल ऑफ अटॅकची मर्यादा ओलांडली जाऊ लागली की विमानाच्या पंखावरची लिफ्ट नाहीशी होते.
एक लक्षात घ्या की विमानाचे इंजिन कारच्या इंजिनासारखे चाकांना संचालित करत नसून ते हवेला मागे आणि पर्यायाने विमानाला पुढे ढकलत असते. मात्र "लिफ्ट" उत्पन्न करण्याचे कार्य इंजिन करत नसून विशिष्ट वेगाने आणि विशिष्ट कोनात पुढे सरकणारे पंख करत असतात. त्यांचा अँगल ऑफ अटॅक मर्यादा ओलांडून गेला की इंजिने पूर्ण ताकदीने फुरफुर करत राहतील, हवा मागे फेकतील, पण लिफ्ट उत्पन्न होऊ शकणार नाही. या स्थितीला स्टॉल असे म्हणतात.
अहमदाबाद विमानाच्या बाबतीत टेक ऑफ पूर्ण वेगाने आणि व्यवस्थित झालेला आहे. इंजिन बंद किंवा कमी पॉवरने चालत असताना हे होणेच अशक्य आहे.
हवेत उचलले गेल्यावर ज्या पद्धतीने विमान खाली येत आहे (pancaking) त्यावरून हेच दिसते की लॉस ऑफ लिफ्ट आहे. लॉस ऑफ पॉवरमुळेही लॉस ऑफ लिफ्ट होऊ शकते, तेही एक वैध कारण आहे. पण या बाबतीत दोन्ही इंजिने एकदम बंद पडावीत आणि तीही टेक ऑफ ठीकठाक झालेला असताना त्यानंतर लगेच, हे अशक्य आहे.
आता नेमके झाले काय असावे हे नीट मांडायला वेळ लागेल. प्रयत्न करतो एका ब्रेकनंतर. यात लँडिंग गियर खालीच असणे हा मुख्य क्लू आहे. आणि फ्लॅप्स खाली नसणे हाही.
इंजिन बंद पडो, लिफ्ट जावो, आग लागो किंवा अन्य काही कारणाने विमान कोसळू लागो, यातील प्रत्येक केसमध्ये लँडिंग गियर विमानाच्या पोटातच असायला हवेत. पहिल्या सहा ते दहा सेकंदांत ते पोटात घेतले जातात आणि वस्तीत क्रॅश होणार म्हणून चाके पुन्हा बाहेर काढणे असे होत नसते. ती आतच ठेवली जातात.
हे लिहायला स्फूर्ती दिल्याबद्दल धन्यवाद. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून आपला आदर आहेच. बाकी स्वभाव म्हणाल तर मनुष्य म्हटला की बरे वाईट गुण आलेच.
असो. गंभीर धाग्यावर अवांतर टाळतो.
क्रॅश निश्चित झाल्यामुळे (मे डे शब्द वापरला गेला) बिचाऱ्या पायलट्सनी मरताना देखील प्रोसेस फॉलो करून इंजिने आयडल केली असणार. लँडिंग गियर वर का घेतला नाही माहीत नाही. पण जमिनीवर नुकसान कमीतकमी व्हावे यासाठी केल्या जाणाऱ्या गोष्टींत:
इंधन कमी करणे (जे करणे शक्य नव्हते, वेळ नव्हता)
वेग किमान ठेवणे : हे दिसते आहे.
पंख जमिनीला समांतर लेव्हलमधे ठेवणे. हेही केलेले आहे.
लँडिंग गियर राहून गेला असावा किंवा तेवढ्या वेळात रिट्रॅक्ट होऊ शकला नसावा.
मला स्वतःला ही शक्यता फार कमी वाटते की जमीनीवर लँडींग करावे वगैरे. पहिलं प्राधान्य झेप घेणे इतर प्राधान्याचा विचार फार कमी वेळा येत असावा. यावरुन आठवण झाली. लॉस ऑफ पॉवर आणि जमीनीवर लँडींगचा हा व्हीडीयो आपण पाहिलाच असेल असे वाटते.
-दिलीप बिरुटे
इंधन कमी करणे (जे करणे शक्य नव्हते, वेळ नव्हता)
समजा वेळ असता तर अशा परिस्थितीत इंधन कमी कोणत्या मार्गाने केले जात असते ? म्हणजे काय technique वापरली जात असते ?
कृपया खुलासा करावा ?
प्रत्यक्ष मृत्यूच्या जबड्यात असताना काही माणसे जे असामान्य धैर्य आणि हानी टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतात ही गोष्टच मला नेहमी भावूक करते.
मुख्यतः मोकळ्या भूभागावर किंवा पाण्यावर जाऊन गोल फिरत राहून इंधन जाळून संपवणे. लँडिंग वेट अचिव्ह करण्यासाठी. किंवा क्रॅश लँडिंगमध्ये हानी कमी करण्यासाठी.
इथपर्यंत आपली मतं बरोबर वाटत आहेत.
मुद्दा हाच आहे की, विमानाने टेक ऑफ पूर्ण वेगाने व्यवस्थित केलेला आहे, मग असे काय घडले की ते खाली खाली येत गेले. लॉस ऑफ लिफ्ट असो की लॉस ऑफ पॉवर असो, हे जे अचानक कसं घडलंय तेच अपघाताचे कारण की अन्य काही, तेच महत्वाचं आहे.
तपशीलवार निबंधाबद्दल आभारी आहे. लिहिते राहा. वाचतोय.
-दिलीप बिरुटे
या स्टेजला सर्वच गोष्टी अंदाज या कॅटेगरीत येतात. पण काही अंदाज सहज नाकारता येतात, इंजिन बिघाड किंवा तांत्रिक बिघाड हा या बाबतीत सकृत्दर्शनी शक्य दिसत नाही.
१. फ्लॅप्स वर
२. लँडिंग गियर खालती.
३. स्टॉल सदृश अटीट्युड (विमानाचे ओरिएंटेशन म्हणा)
४. यशस्वी टेक ऑफ
५. उड्डाणाच्या आधी फ्लॅप्स खाली करणे विसरावे हे विमान होऊ देणेच अशक्य अशी यंत्रणा (ड्रीमलाइनरची)
६. मोठ्या संख्येने पक्ष्यांचा अभाव (दोन्ही इंजिने तातडीने बंद पडण्याइतके मोठे पक्षी थव्याने असणे आवश्यक)
७. धूर, काजळी, आगीचा लोळ नसणे (पक्षी आत गेले की यातले काहीतरी होणार)
८. सर्वात महत्वाचे. टेक ऑफ घेताना सर्वात जास्त इंजिन पॉवर आणि लिफ्ट मिळण्यास सर्वाधिक अनुकूल स्थिती असते. त्यामुळे पंखाचा आकार काही प्रमाणात बदललेला नजरेला दिसतो. पुरेशी लिफ्ट मिळत असते तेव्हा पंखांची टोके वर वळतात. पंखात लवचिकता ठेवलेली असल्याने हे वाकणे स्पष्ट दिसते (स्नायू तटतटतात तसे). इथे लिफ्ट नसल्याचे दिसते आहे. पंख सरळ आणि पडके आहेत.
या सर्व मुद्द्यांमुळे ठळक शक्यता हीच उरते की लिफ्ट कमी पडली. का?
- उड्डाणाच्या नंतर लगेच फ्लॅप्स वर घेतले जाणे.
- उड्डाणाच्या नंतर लगेच चाके वर घेतली न जाणे.
या दोन्हींमुळे विमानाची लिफ्ट पुरती निकामी लेव्हलला येऊ शकते.
हे असे होण्यात कुठेतरी मानवी चूक वाटते. अंदाजच असला तरी तो सध्याच्या स्थितीत सर्वाधिक शक्यतावाला अंदाज आहे. पुढे तो चुकीचा ठरला तर करेक्शन करूच.
मानवी चुक असण्याचीच शक्यता जास्ती आहे. लँडिंग गियर वर घेण्या ऐवजी फ्लॅप्स वर घेतले असावेत का? अस होन्याची शक्यता अनुभवी पायलट कढुन अशक्य आहे
पण सांगता येत नाही.
सहज आठवले. पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणल्यावर त्याकाळी एक लॉजिकचा मुद्दा असा होता की मग पक्षी आपल्या घरट्यात कसे परत येतात?
बाकी स्वभाव म्हणाल तर मनुष्य म्हटला की बरे वाईट गुण आलेच. याच्याशी सहमत आहे
काही समविचारी विद्वान सहमती व्यक्त करताना देखील पुरेशी तुच्छता बाळगतात.त्याशिवाय त्यांना विद्वतेचा "फील" येत नाही. हे अनुभवल आहे
आणखी एक.
अमेरिकन बनावटीचे विमान असल्याने NTSB या चौकशीत सामील होणार. इतरही देशांच्या एजन्सीज येणार. विशेषतः ब्रिटिश. भारतीय लोकांच्या नंतर तिथले सर्वाधिक नागरिक प्रवाशांत होते
पॉवर होती पण लॉस ऑफ लिफ्ट.. एका अनुभवी वैमानिकाचा व्हिडियो पाहिला. सहवैमानिकाकडुन चूक झाली असावी असा त्याचा अंदाज आहे. 'गियर अप'च्या ऐवजी सहवैमानिकाने 'फ्लॅप रेझ' हॅंडल वापरले.
युट्युबर 'कॅप्टन स्टीव'
धन्यवाद.. ते वरील ज्येष्ठ सदस्यांना दाखवा.. :))
पायलट अनुभवी होते. कॅप्टन सुमित सभरवाल यांच्याकडे वृत्तपत्र बातम्यानुसार ८२०० तासांचा उड्डाणाचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. तर सहपायलट यांच्याकडे अकराशे तासांचा अनुभव होता. अवघ्या एका मिनिटात मे डे कॉल दिला पण त्या नंतर ते काहीही करु शकले नाहीत.
ज्या काही शक्यता येत आहेत त्यात, विमानाचे लॅंडीग गिअर आत घेतले गेले नाही. टेक ऑफ झाल्यानंतर पहिल्या पाच मिनिटे झाली तरी, दहा पंधरा सेकंदाच्या आत हे गीअर आत घेतल्या जातात पण हे आत घेतले गेले नाही, आता ही मानवी चूक की यंत्रांची चूक आणि ते यामुळेच झाले की अन्य काही अजून काही कळायला मार्ग नाही.
-दिलीप बिरुटे
पायलट अनुभवी होते खरे आहे.
लिहिते रहा
मारवा
आपण चर्चा करत आहोत.
एखादा मुद्दा पटला नाही तर खोडाला जात आहे. पण कुणी आपला मुद्दा मान्य न झाल्यास चिडण्याचे कारण नाही.
माझा मुद्दा असा_
दिल्लीवरून येताना एसी बंदच होते. इकडे विमानाने टेकऑफ केल्यावर एसी लगेचच चालू केले गेले असतील तर बरीच पावर खेचली गेली असेल. ती पावर फ्लॅप्स वळवण्यासही लागत असेल. म्हणजे तिथे प्रेफरन्स प्राधान्य देण्याची काही व्यवस्था असेल तर ती बंद पडली असेल. एंजिने फुल पावर/इंधन मिळूनही फ्लॅप्स वळून हवा खाली ढकलली न गेल्याने उंची दाखवणारे दर्शक उंची वाढत जात आहे/ नाही यामध्ये ' जात नाही' हे दाखवू लागल्यावर वैमानिकाने मदतीचा भोंगा वाजवला असणार.
विमान जमिनीवर उभे असताना फ्लॅप्स वळवण्यास फारशी शक्ती लागत नाही ( ते तपासले असणारच) पण विमान उचलताना मोठा हवेचा झोत खाली वळताना फ्लॅप्स बरीच वीज खेचतील. तर इकडे एसी बरेच तास बंद असल्याने आतील तापमान वाढलेले असणार व ते एकदम वीस अंशावर आणायला खूप वीज खाणार.
+१ सहमत. काही लोकांना वाटतं आपण एक्सपर्ट आहोत ना मग आपलेच प्रतिसाद लोकांनी वाचत जावेत. आणि वाहवा..! छान म्हणत जावे.
काळ बदलला आहे आधुनिक आणि अद्ययावत माहितीची नवनवीन साधने आलेली आहेत त्यामुळे विविध विषयांची आणि अद्ययावत माहिती कोणाकडेही असू शकते.
-दिलीप बिरुटे
अगदी बरोबर.
पण..
मुख्य उद्देश आणि उत्साह माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याचा आहे की पूर्ण परिश्रम एखाद्याला चूक ठरवण्यासाठी करायचे आहेत हे आधी ठरवून घेतल्यास ध्येय साध्य करणे सोपे होते. अर्थात हे तुम्हाला आम्ही काय सांगावे. जुने जाणते तुम्ही... :-)
शुभेच्छा.
फ्लॅप्सचे कार्य तुम्ही म्हणताय तसे चालत नाही. विमान टॅक्सी आऊट होण्यापूर्वीच हे सर्व सेट आणि लॉक झालेले असते. फ्लाईट चालू असताना अर्थातच ऐनवेळी फ्लॅप्स वरखाली करता येतातच. पण टेक ऑफ झाल्यावर अचानक वीज कमी पडली (हे मेकॅनिकल कंट्रोल हायड्रॉलिक पद्धतीने चालतात पण तरीही तात्विक दृष्ट्या वीज कमी पडलीच) तर ती फ्लॅप्स वर घेण्यास अटकाव करेल. इथे फ्लॅप्स खाली न करता टेक ऑफ घडणे हे अशक्य आहे. ७८७ ड्रीमलायनर मध्ये अशा वेळी प्रचंड वॉर्निंग अलार्म वाजणे आणि सर्वात धोक्याची मास्टर वॉर्निंग वाजून कॉकपिटमध्ये ठणाणा आवाज आणि लाईट फ्लॅश येत राहतात.
राहता राहिला टेक ऑफ नंतर फ्लॅप्स न चालण्याचा भाग (तुम्ही म्हणता तसे वीज खेचली गेल्याने.. तसे होत नसते, तरी पण..) तर अशा वेळी ऑलरेडी खाली असलेले फ्लॅप्स वर येण्यास अडचण होईल. पण फ्लॅप्स तर वर गेलेले दिसत आहेत. म्हणजे टेक ऑफ नंतर वेळेआधीच ते वर घेतले गेले असणे हीच एक शक्यता. शिवाय पॉझिटिव्ह रेट (वर जाण्याचा) ज्या क्षणी दिसतो त्या क्षणी चाके आत घेतली जातात. ती घेतली गेली नाहीत.
कोणाला वाटेल की टेक ऑफ होताच विमान परत खाली (उतरायला) येत आहे म्हणून चाके आत घेतली नसतील. तर तसे नसते. चाके आत घ्यावीच लागतात. अवरोध टाळण्यासाठी. अगदी क्रॅश होत असला तरी चाके बाहेर ठेवायची नसतात. Pancaking हा शब्द मी वर वापरला आहे त्याची माहिती बघा. फरक इतकाच की इथे मूव्हमेंट pancaking ची होती फक्त लँडिंग गियर आत घेतलेला नव्हता.
ठीक आहे.
कार्यप्रणाली जर अशी असेल तर मग दुसरे काही कारण असेल. फळ्यावरचे दर्शक काही वेगळीच धोकादायक सूचना देऊ लागल्याने मदतीचा भोंगा वाजवला असेल. पण कोणता दर्शक धोकादायक सूचना देतोय हे वाक्य वैमानिक बोलला ते ब्लॅक बॉक्सच सांगेल. आणि हेच बोइंग कंपनीला हवे असेल.
माझ्या मूळ मुद्द्याचा अर्धा भाग म्हणजे एसींनी वीज खेचली असेल तर किती? किती परिणामकारक ठरेल?
विमानाच्या सुरक्षित उड्डाणाच्या मध्ये अडथळा ठरेल अशी कोणतीही गोष्ट घडू न देण्याच्या दृष्टीनेच पूर्ण रचना असते. इतकी बेसिक साधी चूक सिस्टीम मधे राहून गेली तर अकरा वर्षे विना अपघात जात नाहीत.
खुपच दु:खद घटना ..... सगळे गेले ... किती दुर्दवी !!!
लवकरात लवकर दोषांची उकल होऊन डिझाईन / प्रोसेस मध्ये तातडीने सुधारण व्हावी ,,, पुन्हा असले क्लेशदायक वृत्त ऐकण्याची वेळ न येवो !
काल विमान अपघात झाला तेव्हा इथे वाचलेले पुर्वीचे काही लेख आठवले होते. भयंकर अपघात. कालपासुन काहीच सुचत नाहिये
विविध व्हिडिओ . टेक ऑफ पुर्वी काढलेले सेल्फी बघुन जीव तुटतोय.. एक साधा टर्ब्युलन्स जाणवला तरी जीव घशात येतो.. इथे विमान थेट खाली जाताना प्रवाशांचं काय झालं असेल या विचारनं थरकाप उडतोय.. मेडीकल कॉलेजच्या हॉस्टेल मधे जेवणाच्या ताटावर बसलेल्या डॉक्टरांचा तर काहीच संबंध नसताना त्यांना मृत्युला सामोरं जावं लागलं.. सुन्न झालंय डोकं कालपासुन. त्या मृताम्यांना शांती मिळो असं तरी कसं म्हणायचं ? सगळी स्वप्नं आणि जवळची मंडळी मागे सोडुन गेलेल्या जीवांना खरच शांती मिळेल ?
( या प्रसंगातही इथे वाद घालणारी लोकं कशाची बनली असतील ? वेळ काय आणि आपण कशावर वाद घालावा ? असो.. मानवीवृत्ती समजणं बुद्धीच्या पलिकडचे आहे )
फारच वाईट.
दोन आठवड्यापूर्वीच ३० मे ला असल्याच ७८७ ड्रीम्लायनरने (दिल्ली - झुरिक ए १५१) प्रवास केला तेंव्हा भीती नाही वाटली पण ही बातमी कळल्यावर जास्त भीती वाटली.
अर्थात आमच्यावेळी ही एसी चालु नसणे, स्क्रीन्स आणि त्याचे कंट्रोल पॅनल्स काम करत नसणे ह्या समस्या होत्याच.
एअर ईंडीयावाले इतर एअर लाईनपेक्षा दुप्पट लगेज घेऊ देतात हा मोह होता पण कदाचित हे सुध्दा कारण असु शकते दुर्घटनेला अशी शंका उगाच चाटून गेली.
शक्यता अगदीच नाकारता आली नसती एरवी. उन्हाळी हवेचे प्रचंड उच्च तापमान आणि त्यामुळे विरळ झालेली हवा. लिफ्ट पुरेशी मिळायला अधिक लांब अंतर लागते.
पण इथे टेक ऑफ योग्य जागी योग्य रित्या झाला आहे. वर चढत जाण्याचा दर केवळ कमी नसून ते खालीच येताना दिसत आहे. स्टॉल सदृश स्थितीही दिसून येत आहे. त्यामुळे परमिटेड लिमिटपेक्षा जास्त सामान घेऊन गरम वातावरणात उड्डाण हा औरंगाबाद क्रॅशच्या वेळचा सीन इथे नव्हता.
एक्स वर एकाने लिहिलेली पोस्ट आता पाहिली त्याचा सारांश
हा घातपात असावा. इंजिनल इंधन पुरवणारी यंत्रणा खराब केली असेल. त्यामुळे सुरुवातीला असलेल्या इंधनामुळे इंजीन व्यवस्थित चालू होऊन टेक ऑफ झाला पण नंतर पुरेसे इंधन न मिळाल्याने इंजिन बंद झाली.
मला तरी ही शक्याता बाळबोध वाटली पण यावर आपले काही मत @ गवि
अगदीच दूरस्थ शक्यता. इतक्या लगेच नसता झाला अपघात. आणि घातपात करायचा झाला तर विमानाच्या सिस्टीम मधे "टायमर"वाला बिघाड करणे एखाद दुसऱ्या व्यक्तीला खूपच अवघड.
हीहीही
टाकी ऑफ केली तरी कार्बुरेटर मधल्या तेलावर तीन किलोमीटर स्प्लेंडर हाणली ह्या लेवलची शक्यता आहे.
अगदी अगदी
त्याने हीच अनॉलॉजी पण पोस्ट मधे दिली आहे.
या घटनेनंतर बऱ्याच जणांच्या सिबिल स्कोअरने ( विश्वसनिअतेने)आपटी खाल्ली असेल.
गवि तुम्ही लॉस ऑफ लिफ्ट विषयी बरेच लिहिले,ते समजले ,बरे झाले.नाहीतर त्या X वरच्या मुलाच्या पोस्ट/व्हिडिओ मुळे मलाही लॉस ऑफ पॉवर च अपघाताच्या जवळ जाणारे कारण वाटतं होतं.खरे कारण समोर येईलच.
वाहिन्यांवरच्या बातम्यांच्या चित्रफिती पाहून किती भयानक झालंय हे कळतंय. नुसता काळा कोळसा दिसतोय सगळीकडे.
एक निरीक्षण नोंदवतो. बर्यापैकी युरोपियन देशांमध्ये विमानतळ हे गावापासून बाहेर आणि विमानतळाच्या बाजूला लोकवस्ती नाही असे पाहण्यात आहे. भारतातच काय लोकांना विमानतळाजवळ मालमत्ता घ्यायचा चस्का आहे.
धावपट्टीपुढे मोकळी जागा किंवा जंगल असते तर कदाचित इतका मोठा अपघात घडला नसता. थोड्या थोडक्या नुकसानीवर भागले असते अशी भाबडी आशा.
https://www.youtube.com/watch?v=z7EZkungFEE
लॅण्डींग गेअर ऐवजी चूकून फ्लॅप वर झाल्याची शक्यता दिसतेय. अर्थात हे अनुमान आहे.
गवि, पण अशी चुकी होऊ शकते ही शक्यता गॄहीत धरली गेली नाहीये कां ?
अनुभवी वैमानिकांना हाच संशय आहे. पण फ्लॅपवर झाल्यावर मुख्य वैमानिकाला कळले असणार.. की ४/५ सेकंदात सगळे बदलु शकते?
ब्रेकऐवजी चुकुन अॅक्सिलरेटरवर पाय पडतो.. असे काहीसे आहे का?
Dear Colleagues,
This is a very difficult moment. What occurred yesterday was inexplicable, and we are in shock and mourning. To lose a single person we know is a tragedy, but for so many deaths to occur at once is incomprehensible. This is one of the darkest days in the Tata Group’s history. Words are no consolation right now, but my thoughts are with the families and loved ones of the people who died and were injured in the crash. We are here for them.
I want to say that, like you, we want to understand what happened. We don’t know right now, but we will. You know that in the past 24 hours, investigative teams from India, UK, and the US have arrived in Ahmedabad to investigate the crash. They have our full cooperation, and we will be completely transparent about the findings. We owe it to the families and loved ones, to our pilots and crew, and to you. The Tata Group takes its responsibility to society seriously, and that includes being open about what occurred yesterday.
Right now, our very human instinct is to look for explanations that make sense of the calamity. There is plenty of speculation all around us. Some of it may be right, some of it may be wrong. I want to urge patience. We witnessed an enormous loss of life yesterday. Why this routine flight turned into a calamity is something trained investigators will help us understand when their work is complete. Once we have verified facts, we will be transparent in our communication about how this tragedy took place.
As a Group trusted by so many, when we took over Air India, ensuring the safety of its passengers was our first and foremost priority. There was no compromising on it.
None of this matters to the people who suffered devastating losses yesterday. At this time, we can only assure them of our full support. We will pull together as a Group and find ways to help them.
We built this Group on trust and care. It is a difficult moment, but we will not retreat from our responsibilities, from doing what is right. We will carry this loss. We will not forget.
Sincerely,
Chandra
वजन जास्ती झालं का हा एक मुद्दा बऱ्याच वैमानिकांनी उपस्थित केलाय.
म्हणजे अगदी मूलभूत प्रश्न झाला.
विमानाचं वजन करता येतं का?
हे समजते ,पण कसे करतात, काय उपकरणे वापरतात. प्रत्येक उड्डाणा आगोदर हे अनिवार्य आहे का? का प्रवासी संख्या व त्यांचे सामान,केबीन क्रू व इतर सामान याचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जातो? गवी भाऊ यावर प्रकाश टाकू शकतील.
लोड टेबल बनवताना या विषयाबद्दल थोडीफार माहीती कळाली होती,आता विसरलो.
प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी काढलेली छायाचित्रे, कुटूंबाच्या अपेक्षांसहित प्रवास करणारे प्रवासी, इच्छित स्थळी जाणारे, वाट पाहणारे प्रवासी, त्या सर्व बातम्या वर्णने वेदनादायक आहेत. विमान कोसळले तेथील डॉक्टर्स त्यांचे कुटुंबीय त्या सर्वांच्या भावनाही तितक्याच दु:ख पिळवटून टाकणा-या आहेत.
कालच्या भीषण अपघातानंतरन सरकार बोईंग ड्रीमलायनर ७८७-८ ताफ्यांचे उड्डाण स्थगित करण्याचा विचार करीत आहे. इंजिनची ताकद कमी का झाली त्याचा शोध घेण्यात येत आहे. अपघातग्रस्त एअर इंडियांचे ड्रीमलायनर विमान अमेरिकेच्या बोईंग कंपनीने बनवलेले असल्यामुळे आंतरराष्ट्रीय नियमांनुसार प्रतिष्ठीत तपास संस्था नॅशनल ट्रान्सपोर्ट्शन सेफ्टी बोर्ड तपासणी पथक पोहचले आहे. विमान उडण्यापूर्वी सर्व सीस्टीम तपासल्या जाते तरीही असे काहीच मिनिटात असे काय घडले त्याचा तपास ही संस्था करणार आहे.
तपास यंत्रणेचे प्रमुख ग्रेग फिथ यांच्या मतानुसार टेकऑफचं कॉन्फिगर केले गेले असावे का ? विमान जड आणि वेग हळु असतांना विमान वर उचलण्यासाठी जी ताकद लागते ती पंखाचा भाग खाली करुन मिळवली जाते ती स्थिती योग्य असूनही का मिळाली नाही ? हायड्रॉलिक प्रणाली, लँडिग गियर यातली नेमकी काय समस्या होती याचा आणि इतरही अभ्यास ते करणार आहेत. पिच टीट्यूड अर्थात विमानाचा पुढील भाग वर जरी दिसत असला तरी विमान खाली खाली का येत गेले याचा अर्थ अपूरी ताकद मिळत गेल्यामुळे तसे घडले असावे असे निरिक्षण त्यांनी नोंदवले आहे. पायलट विमान वर उचलण्याचा प्रयत्न करत होता परंतु उंची गाठण्यासाठी ते कमी उंचावर येत गेले त्यामुळे ते वर उचलले गेले नाही. विमान उंच उडवणे आणि पुढे ढकलणे व्हीडीयो पाहता पूर्ण प्रयत्न केल्याचे दिसते असेही ते म्हणाले.
अपघात घडला आता यापुढे असे अपघात घडू नयेत यासाठी काय बदल करता येतील ते अशा चुका शोधण्यातून व्हावेत. विमान प्रवास अधिक सुखाचा होत जावा याशिवाय अधिक अपेक्षा त्या करु शकतील.
-दिलीप बिरुटे
समजा प्रत्येक प्रवासी ऐंशी किलो वजनाचा आहे असे धरू, आणि १५+७ किलो वजन नेत असेल तर २५० प्रवाशांचे वजन अंदाजे २५० गुणिले शंभर पंचवीस हजार किलो होईल.
विमान धावपट्टीवर जाण्यापूर्वी एका वजन काट्यावरून गेल्यास विमानाचे वजन नोंद करता येईल.
एअर इंडिया २३*२ + ७ असे नेऊ देते
अगदी कमी धरले तरचा हिशोब घेतला.पण सर्वच प्रवासी पन्नास किलो एवढं नेतील तर खूपच होईल. आणि पूर्वी कधी विमानाचे पूर्ण वजन किती असे यांची नोंद तपासायला हवी.
--------------------
11A सीटवरचा प्रवासी बाहेर पडून दूर पळाला आणि वाचला . पण विमान एका पाच मजली इमारतीवर पडले तर कसे काय पळाला? ही 11A seat शेपटात असते काय? विमानाचे नाक वर होते आणि शेपूट खाली होते ते जमिनीला टेकले का? आता या सीटवर बसण्यासाठी प्राधान्य मागू लागले तर याचा नंबर १३ करतील बहुतेक. (परदेशांत १३ संख्या वर्ज्य असते).
तज्ञांच्या विश्लेषणानुसार- व्हिडियोत रॅट(रॅम एयर टर्बाईन) बाहेर आलेला दिसत आहे. दोन्ही ईन्जिन्स बंद पडल्यावरच हा रॅट बाहेर येतो असे म्हंटले जाते. दोन्ही इंजिन्स बंद का पडली? दोन्ही इंजिन्सना लागणारा इंधन पुरवठा बंद झाला. इंधन पुरवठा बंद का झाला?
पटणारी एक थियरी-विमानात आधीपासुनच ईलेक्ट्रिकल समस्या असावी. विमान टेक-ऑफ घेण्याआधी ते तीन तास उन्हात होते(३८ डिग्री). विमान पूर्णपणे भरलेले होते(शक्यता आहे). Fuel Supply Controller कडुन इंधन पुरवठा थांबवण्याचा आदेश गेला. तो का गेला? उष्ण्ता, पूर्ण भरलेले विमान, टेक ऑफ झाल्या झाल्याच काही यंत्रणा 'रेसेट' झाल्या असाव्यात त्यामुळे Fuel Supply Controller कडुन इंधन पुरवठा थांबवला गेला. दोन्ही इंजिन्स बंद पडली मग रॅट बाहेर आला.
https://en.wikipedia.org/wiki/Ram_air_turbine
https://en.wikipedia.org/wiki/Ram_air_turbine
रॅम एअर टरबाईन डीप्लॉय झालेले व्हिडिओत स्पष्ट दिसत नाही. धूसर उभी दांडी हे नोज व्हील किंवा अन्य काही असू शकते. किंवा आर्टिफॅक्ट. ते खाली आले असे स्पष्ट दिसले किंवा ब्लॅक बॉक्समध्ये कळले तर पुढे बोलता येईल.
"In the middle of the circle, you see kind of a protrusion on the belly of the aircraft... just underneath that you see a little grey dot... that little grey dot is the RAT.”
A survivor in seat 11A, near an emergency exit, also reported hearing “a loud bang” and seeing lights flicker before the crash, consistent with RAT deployment
https://www.cnbctv18.com/business/aviation/former-us-navy-pilot-now-poi…
हो. ही शक्यता आता ठळक झाली आहे.
हो. रॅम एअर टरबाईन डीप्लॉय झाल्याचे अधिक स्पष्ट दिसणारा व्हिडिओ आता उपलब्ध आहे. गच्चीतून घेतलेल्या व्हिडिओची खराब कॉपी आतापर्यंत फिरत होती. त्याची मूळ प्रत आता बघायला मिळत असल्याने ते नक्कीच RAT असावे असे म्हणता येईल. शिवाय त्या क्लिपमध्ये आवाजही आहे. इतर क्लिप या क्लिपवरून पुन्हा रेकॉर्ड करण्यात आलेल्या असल्याने त्यात मूळ आवाज नव्हते. या नवीन मूळ क्लिप नुसार RAT चा "भ्रूम"सदृश आवाज ऐकू येतो आहे.
हे रॅम एअर टरबाईन इंजिन फेल्युअर (सर्व इंजिने) किंवा इलेक्ट्रिक/ हायड्रॉलिक यंत्रणा बंद पडली की खाली येते.
टेक ऑफ पर्यंत सर्व चांगले होते पण नंतर या तिन्हीपैकी एक यंत्रणा बंद पडली असे दिसते आहे. वर प्रा डॉ यांनी म्हटलेल्या तांत्रिक बिघडाच्या शक्यतेत यामुळे काहीशी भर पडली आहे. हे फेल्युअर कोणाच्या चुकीने झाले का हे ब्लॅक बॉक्समध्ये कळेलच.
आपण भारतीय लोक निवाडा देण्यात फार पुढे असतो(JUDGEMENTAL).
एखाद्या विषयात आपल्याला ज्ञान आहे कि नाही, आपला त्या विषयाचा अभ्यास किती आहे, ज्ञान असले तरी आपल्याकडे पुरेशी माहीती आहे कि नाही हा विचार ना करता त्यावर आपले विशेष मत ठोकून द्यायचे.
ऑपरेशन सिंदूर नि आता अहमदाबाद विमान अपघात यात हे प्रकर्षाने जाणवते आहे.
ऑपरेशन सिंदूर मध्ये मोदींनी लष्कर जिंकत असताना एकदम शस्त्रसंधी कशी केली. कारण मुळात हिम्मत नाही पासून बिहारच्या निवडणुकांवर डोळा आहे पर्यंत
आता विमानात काही तरी घातपात किंवा सायबर हल्ला पासून तुर्की कंपनीच्या कर्म चार्याने घातपात केल्या पर्यंत सर्व तर्हेची षडयंत्र असल्याची गृहीतके मोठ्या हिरीरीने पुढे आणली जात आहेत.
अर्थात शेवटी एखाद्याचे असे ठोकून दिलेले गृहीतक बरोबर येईल आणि तो मोठ्या विजयी मुद्रेने तुम्हाला सांगेल कि बघा मी पहिल्यांदाच म्हणत होतो. मग आपण उंदीर मारण्याच्या खात्यात असलो तरी चालेल कि आपल्याला विमान मुळात उडते का आणि कसे याची सुतराम माहिती नसली तरी चालेल.
हि शक्यता गृहीत धरून.
गवि साहेब तुम्ही दुर्लक्ष करा आणि आपले विश्लेषण चालू ठेवा. कारण आपल्या विश्लषणातून आमच्या सारख्या या विषयात जुजबी माहिती असलेल्या अनेक लोकांना बरीच माहिती मिळू शकेल
>>>आमच्या सारख्या या विषयात जुजबी माहिती असलेल्या...
डॉक्टर साहेब, हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे. हे म्हणजे एखाद्या श्रीमंत माणसाने आम्ही काय बॉ.. 'गरीब माणसं' अशा पद्धतीचं वाक्य वाटलं. चराचर सृष्टीचं ज्ञान असलेल्या माणसाने 'जुजबी' माहिती आहे असे म्हणने पटले नाही. आत्ता पर्यंत आपण जे जगाला सॉरी मिपाला जे ( दिव्य ) ज्ञान दिले आहे त्याला 'उपमा' नाही. 'अवघाची संसार सुखाचा करीन' हे आपलं ध्येय आहे.
महाभारतातला संजय आणि आपण दिव्यदृष्टी असलेली माणसं नुसता कटाक्ष टाकला की सगळे गुंतागुंतीचे विषय क्षणात मोकळे होऊन जातात.
आपणास जुजबी माहिती असते असे कृपया म्हणू नये, माझा मुड ऑफ़ होतो.. :(
-दिलीप बिरुटे
( डॉ.खरे साहेबाचा फॅन ) :)
बिरुटे सर
एखाद्या विषयात महारथ मिळवायची असेल तर त्यात किमान १० हजार तास घालवायला लागतात असे आम्हाला शिकवले आहे.
मी दोन वर्षे विक्रांत या विमानवाहू जहाजावर मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून तैनात होतोय यानंतर साडे चार वर्षे गोव्यातील नौदलाच्या हंस या तळाशी संलग्न रुग्णालयात "डॉक्टर" म्हणून काम करत होतो असे असले तरी प्रत्यक्ष विमानाचं संरचना आणि त्याचे कार्य याची माहिती फार तर जुजबीच राहील नव्हे का?
अर्वाचीन गद्य वाङ्मयाचा इतिहास किंवा कोसला कादंबरीतील सौंदर्य स्थळे यात पी एच डी केलं असतं तर मला संपूर्ण ज्ञान आलं असतं.
मग ड्रीम लायनारच कशाला मी फ ३५, चँगडू J २०, चेंगडू J ३६, सुखोई ५७ यांच्या एव्हियॉनिक्स आणि ल्युनबर्गर लेन्स वर विशेष टिप्पणी करू शकलो असतो.
पाहू या
आपल्या सारखा कोणी गाईड मिळाला तर अशाच एखाद्या विषयात AI चा वापर करून दोन चार महिन्यात पी एच डी मिळवता येईल का असा विचार चालू आहे ?
'यु-ट्युब'स्थित पत्रकार/तज्ञ/आजी/माजी पायलट ज्या बोइंगवरील माहितीपटाचा हवाला देत आहेत तो माहितीपट नेटफ्लिक्सवर पाहिला. सुरक्षा आणि दर्जा ह्याबाबत बोइंग ९०च्या दशकापर्यंत अग्रगण्य होती. If it's Boeing, I'm not going. असे म्हंटले जायचे. २०००च्या दशकापासुन एयरबसच्या विमानांचा खप वाढला आणि स्पर्धेत टिकण्यासाठी बोइंगचे धोरण मग फक्त नफा आणि लवकरात लवकर विमानांची डिलिवरी हे झाले. कंपनीचे मुख्यालय एव्हरेटमधुन शिकागोला हलवण्यात आले.व्यवस्थापनात सैन्याचे माजी अधिकारी आले, वॉल स्ट्रीटवर लक्ष आणि फक्त नफा.. हे धोरण ठरले. मग बोइंग-७३७ मॅक्सचे दोन मोठे अपघात झाले आणि सगळी ७३७-मॅ़क्सच्या उड्डाणांवर जगभर बंदी आली.
७८७-ड्रीमलायनरचा गेल्या १४ वर्षातला पहिला अपघात. पण दोन्ही इंजिन्स एकाच्वेळी अकार्यरत कशी काय झाली? हे अजूनही कोडे आहे.
इंधनाच्या नळीचा गळा आवळला गेला बहुतेक.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, एयर इंंडियातील वरिष्ठ अधिकारी आणि केंद्रसरकारने नेमलेली अशी सर्वांची मिळून चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. समिती पुढील तीन महिने या घटनेचा तपास करुन अहवाल सादर करणार आहे. तीन महिन्यानंतर अपघाताची कारणे समजतील असे वाटते.
-दिलीप बिरुटे
माहितीपूर्ण प्रतिसाद !
लिहिते रहा
वाचतोय
_मारवा
पण आता ताक फुंकून पित आहेत. एअर इंडियाची बरीच विमाने आजारी झाली आहेत. तपासण्या ,तपासण्या आणि उशीर आणि नंतर सेवा रद्दच.
पण आता ताक फुंकून पित आहेत
हे नैसर्गिक नव्हे का?
अपघात विमानांच्या प्रणालीत काही चूक राहून गेली असेल त्यामुळे आहे कि वैमानिकाच्या चुकीमुळे आहे कि विमानाच्या नियतकालिक तपासणी आणि दुरुस्ती मध्ये आहे हे नक्की होईपर्यंत कोणताही धोका पत्करणे चूकच ठरेल.
मोटार गाड्यांच्या ब्रेक किंवा इंजिन किंवा तत्सम गाड्यांमध्ये दोष आढळल्यास हजारो लाखो गाडयांना परत बोलावून ती प्रणाली बदलली जाते किंवा दुरुस्त केली जातेच.
आपण वापरत असलेल्या मोबाईल मध्ये काही सॉफ्टवेअर मध्ये glich किंवा बग आल्यास सिक्युरिटी पॅच पाठवला जातोच कि.
सध्या तरी, दोन्ही इंजिने एकाच वेळी बंद कशी झाली (तीही टेक ऑफ व्यवस्थित झालेला असताना), हा एकच मुख्य प्रश्न आहे. ब्लॅक बॉक्समधून बहुधा उत्तर मिळेल. म्हणजे बंद पडली होती की नाही हे तर मिळेलच, पण नेमके का ?, याबद्दल काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष क्लूज मिळतील.
असं ऐकून आहे की....
कारच्या इंधन टाकीत साखर टाकली की चालू झालेली कार लगेच आचके देऊ लागते.
म्हणजे काही घातपात झाला का आतल्या माणसांचे लक्ष नसताना .किंवा असं काही करताच येत नाही विमानाच्या इंधन टाकीत. सगळं बंदिस्त असते.
गविजींकडून आणखी अपडेटसच्या प्रतीक्षेत. हा धागा रोज वाचतोय.
आले होते. त्यात ए ए आय बी चा रिपोर्टचा हवाला देऊन असे सांगितले आहे की पायलटच्या सीटचा बोल्ट फेल झाल्यामुळे विमानाने टेक ऑफ घेताच त्याची खुर्ची मागे ओढली गेली व त्यामुळे थ्रस्ट लिव्हर पाहिजे त्याच्या ऊलट दिशेला म्हणजे मागे खेचली गेली. परिणामी थ्रस्ट गेला व विमान वर उडू शकले नाही. कोपायलटने ती लिव्हर पुढे करण्यासाठी ताकद लावली पण पायलटचे वजन व 'मेक्॑निकल फोर्स' मुळे काही होऊ शकले नाही.
ए ए एफ बी एव्हिएशन अॅक्सीडेंट इन्व्हेस्टीगेशन ब्युरो
इतर कुठेच असे काही वाचनात आले नाही, त्यामुळे कितपत विश्वासार्ह आहे ते माहित नाही.
असे होणे शक्य नाही.
एक इंजिन रनवे वरच अंशतः किंवा पूर्ण बंद झालं असावं. कारण लिफ्ट ऑफ (हवेत उचलले जाणे) यासाठी नेहमीपेक्षा अधिक अंतर लागले आहे. हे अंतर पूर्ण वजनासहित लागणाऱ्या अंतरापेक्षाही जास्त आहे. म्हणजे एकाच इंजिनावर टेक ऑफ झाला असावा. दुसरे इंजिन टेक ऑफ होताच बंद पडले आणि त्या उसळीच्या जडत्वावर विमान आणखी थोडे वर पोचून मग खाली आले. असे सध्या सर्वाधिक शक्य वाटू लागले आहे. दोन्ही इंजिने बंद पडल्यावर विमानाची चाके वर उचलणारी यंत्रणा देखील अर्थात बंद पडते. रॅम एअर टरबाईनमध्ये जेमतेम काही अत्यावश्यक उपकरणे आणि कंट्रोल चालू ठेवण्याइतकी पॉवर असते. चाके आत घेणे त्यात अंतर्भूत नसते.
टेकऑफ़ला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला हे त्या अपघाताचे कारण नाही होऊ शकत असे वाटते. विमान धावपट्टीवर धावते उड़ते तेव्हा हवेचा दाब विमानाचे वजन आणि वर उडण्यासाठीची स्थिती याचं धावपट्टीवर धावण्याचं अचूक कॅल्क्यूलेशन असतं तेव्हाच ते वर उड़ते.
विमान धावपट्टीवर धावले योग्य क्षणी ६२५ फूट उंचीवर पोहोचते आणि १७४ नॉट्सचा कमाल वेग गाठते, याचा अर्थ या क्षणापर्यन्त दोन्ही इंजिन्स काम करीत आहेत आणि आत्ता ते वेगाने खाली उतरण्यास सुरुवात सुरुवात करते, इथे दोन्हीही इंजिन्सन काम करीत नाहीत विमानाचं नाक वर आहे पण विमान झेप घेत नाही.
विमानतळावरुन विमानाने टेक ऑफ केल्यानंतर ८ मिनिटा अगोदर सर्व अलबेल होते आणि नंतर विमान कोसळले.
-दिलीप बिरूटे