जनातलं, मनातलं

कुण्या एका निलीमाची गोष्ट

Primary tabs

आज निलीमाला अम्मळ उशीरानेच जाग आली. घड्याळाकडे पाहील तेंव्हा सकाळचे आठ वाजले होते. निलीमाला आश्चर्यच वाटल. आज कशी बर ईतकी झोप लागली आपल्याला. एरवी सकाळी ६ वाजता उठते मी पण आज जागच कशी बर आली नाही. आणि कसली ही विचीत्र झोप? अगदी सलग आणि शांत. पण का कोण जाणे आज अगदी उत्साही वाटतय. तस लवकर उठूनही फारसा फरक पडणार नव्हताच म्हणा. कारण तिची ब्रांच तशी घरा जवळच होती. अगदी हाकेच्या अंतरावरती. रीटायर्मेंट जवळ आली म्हणून वरिष्टांनी घराजवळची ब्रांच मुद्दाम दिलेली. आणी वेळही किती सोयीस्कर सकाळी १० ते संध्याकाळी ५. म्हणजे तसा बराच वेळ आहे की आपल्याला. एकाच माणसाच तर जेवण, त्याला कितीसा वेळ लागतो.

तशी निलीमा लहानपणापासून सोशिक आणि अगदी नाकासमोर चालणारी. आई-वडील, ती लहान असतानाच कूठल्यातरी अपघातात दगावलेले. तिला तसे ते फारसे आठवत ही नव्हते. पूढे तिचा कोणत्यातरी दूरच्या मावशीने साम्भाळ केला, म्हणून अनाथाश्रमात जाव लागल नाही इतकच. निलीमा वयात येताच मावशीनी तिच लग्न करून दिल. पण तिच्या नशीबात सुख सुख म्हणतात ते नव्हतच कधी. लग्नानंतर २ वर्षातच तिचा नवरा, दारू पिऊन पिऊन, लिवर खराब होऊन मेला. तेंव्हाही ती फारशी रडली नाही. मूल-बाळ नव्हतच आणि पून्हा लग्न करावस तिला वाटलच नाही. त्यामूळे तिच आपल अस कोणी नव्हत. नाही म्हणायला नोकरी होती बर्‍यापैकी. अगदी दोन वर्षापूर्वी 'व्ही आर एस' येऊन सुद्धा तिने ती स्वीकारली नव्हती. एकच वर्ष तर उरलय रिटायर्मेन्टला. आणि घरी बसून काय करायच हा प्रश्न आहेच. आणि श्रीक्रुष्ण सोसायटीमध्ये तिच स्वतःच अस घर होत. ईतकाच काय तो आधार.

कूकरच्या शिटीने तिची तंद्री भंगली. सकाळी मऊ भात आणि वरण खायची नेहेमीची सवय. पण आज का कोण जाणे भूकच नव्हती कशी. रात्री किती वाजता जेवलो हेही तिला आठवत नव्हत. नाहीतर दूपारी घरी येउन जेवू, उगाच डबा कशाला न्यायचा. तयारी करून ती पटकन घराबाहेर पडली. जिना उतरताना शेजारची सुमी तिला जवळ्जवळ आपटणारच होती. तिच लक्ष होत म्हणून बर. नाहीतर. कसल्या गडबडीत असतात ह्या पोरी कोण जाणे? निलीमा स्वतःशीच पूटपूटली.

रस्त्यावरही नेहेमीची वर्दळ नव्हती. आज कस अगदी उत्साही वाटतय. ब्रांचमध्येही निलीमाला फारश्या मैत्रीणी वगैरे नव्हत्याच. सगळ्या तरूण मूलीच. तिच्या बरोबरच्या अश्या कोणी नव्हत्या. आणि तिचा स्वभाव तसा फारसा कोणात मिसळण्याचा नव्हता. आपण बर की आपल काम बर असा. विचारात ती ब्रांचला कधी पोहोचली तिला कळलच नाही. दरवाज्यावरच्या सिक्युरीटीने तिला बघून न बघितल्या सारख केल. तिला रागच आला. नाहीतरी हे सिक्युरिटीवाले जरा आगाऊच असतात. आणि हवाय कशाला तो जूलूमाचा राम राम.

निलीमा आपल्या नेहेमीच्या जागेवर येऊन बसली. 'निलीमा देशमूख - ऑफीसर- डीपॉसीट्स' अशी पाटी होती टेबलावर ती तिने हलकीच पूसून घेतली. तिने पर्स बाजूला ठेवली आणि जरा हाश हूश करून टेबलावरचे अकाउंट ओपनींगचे फॉर्म चाळायला घेतले. काही फॉर्म मध्ये इन्ट्रोडक्शन नव्हते तर काही फॉर्म्स मध्ये नॉमीनेशन सुद्धा नव्हते. तिला त्या मनिषाचा रागच आला. मनिषा तिची असिष्टंट , नवीनच लागलेली. आज तिला झाडायचच म्हणून तिने पाहील तर मनिषा दिसली नाही. आजही दांडी मारलेली दिसतेय पोरीने. कठीणच आहे एकन्दरीत.

आज ब्रांच मध्ये फारशी गर्दी नव्हती. नाहीतरी महिन्याच्या मध्याला फारशी वर्दळ नसतेच. ब्रांचमधला स्टाफ घोळक्याघोळक्याने कसली तरी चर्चा करत होता. काय बोलताहेत कोण जाणे- राजकारण, सिनेमा, क्रिकेट का सा रे गा मा कोण जिन्कणार ह्यावर चर्चा. अचानक तिच लक्ष घड्याळाकडे गेल. दूपारचे १२-३० वाजलेले. चला आज लंच टाईमला कधी नव्हे ते घरी जाऊन येऊया. अस म्हणून ती जागेवरून उठली. का कोण जाणे आज कधी नाही तो तिला पेपर वाचावासा वाटला. खालच्या पेपर वाल्याकडे जाऊन ती पेपर चाळू लागली. उभ्या उभ्याच तिने मूख्य बातम्यांचे मथळे वाचून घेतले. आणि एका बातमीकडे तिची नजर खिळली.
' श्रीक्रुष्ण सोसायटीमध्ये रहाणार्‍या श्री. निलीमा देशमूख ह्यांची त्यांच्या रहात्या घरी गळा दाबून हत्या '
समाप्त

इनोबा म्हणे

रत्नाकर मतकरींची 'शाळा' वाचली आहे, त्यामुळे या कथेवर त्याचीच छाप जाणवली.असो.
प्रयत्न चांगला आहे. पुलेशु.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

अनिल हटेला

वाचायला सुरुवात केली आणी काय होणार ह्याची कल्पना आलेली..
छान लिहीलये...
येउ द्यात अजुनही...
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..