संक्रांत
संक्रांत
आणखीन एक वर्ष सरले.
थंडी घेऊनच नवीन वर्ष अवतरले.
गार हवेची शाल लपेटून माणसाचे मन सुखावले.
गार झुळकेने पतंग प्रेमी आनंदले.
तीळ - गुळाच्या गोड वासानी पोटच भरले.
संक्रांतीचे दागिने घडले.
नवीन नवरीला त्याचेच अप्रूप झाले.
जावईबुवा हलव्याचा हार आणि नारळ मिळणार म्हणून खुश झाले.
फोटो काढले , आधी हलव्याच्या दागिन्यांचे आणि मग मुलगी -जावयाचे.
आणखीन एक सण पार पडला म्हणून सासूबाईनी हुश्य म्हटले.
संक्रांतीचा सण आला आणि गेला.
दरवर्षीच येतो आणि जातो.
पतंग उडवले जातात आणि कापले पण जातात.
पतंग कधी कागदाचे असतात तर कधी स्वप्नांचे .
कधी तरी माणसावर संक्रांत कोसळते.
काव्यरस
मिसळपाव
.
साहित्य: