अरे या ना रे
अरे या ना रे
कि जीव गेला
कि जग गेलं, झोपा रे
अरे या ना रे
की थकली रे, ही जिंदगी , झोपा रे
ना सांज ना सकाळ,
सगळा अंधारच अंधार
आहे हुंकारांचं जंजाळ, झोपा रे
मोठा ना बारका, ना लंबू ना छोटा
मसणात जाऊन आता काढायच्यात झोपा
ना अंधरुन ना रजाई
ना उतरण ना चढाई
आहे देवदूतांची अंगाई, झोपा रे
जळतच गेली जळत जळत गेली
दिव्यांनी जळतच गेली ही जिंदगी
नाही विझली नाही विझली
हवेनेही नाही विझली ही जिंदगी
एक फुंकर मारली
सगळा धूर ऊडून गेला
तो श्वास होता, एक ध्यास होता
जो घेऊन गेला, सत्यानाश होता
मायेच्या काळजाचा एक नाद होता
अरे या ना रे
============================
सौजन्य:
काव्यरस
मिसळपाव
“फक्त येते ती आईची आठवण.वाटतं आई असती तर….”
कसलाही विचार न करता मी फळाकडे आकर्षित होत असतो.एखाद्या अननसाच्या तुकड्याला चाऊन खाताना कदाचीत त्यातून निघणार्या गोड स्वादिष्ठ रसाची चिकट धार माझ्या हनुवटीवरून ओघळत असताना वाटणारा आनंद त्याचं कारण असावं.एखाद्या पूर्ण पिकलेल्या लालसर-पिवळसर देवगडच्या हापूस आंब्याल्या पाहून, त्याला नाकाकडे घेऊन,त्याच्या वासाचा दीर्घ श्वास घेऊन,अधीर झाल्याने,त्या आंब्याच्या कापून शिरा न काढता तो तसाच चोखून खाताना,घळघळून निघालेला अमृततुल