Skip to main content

पुस्तक परिचय – आग्र्याहून सुटका भाग १

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 16/03/2015 19:48 या दिवशी प्रकाशित केले.

पुस्तक परिचय – आग्र्याहून सुटका भाग १

लेखकः डॉ अजित प. जोशी, शिवप्रताप प्रकाशन,188/2 शनिवार पेठ, पुणे, किंमत रु. 300

शिवरायांचा आठवावा प्रताप !

आज शिवजयंती निमित्ताने शिवाजीरायांच्या एका महत्वाच्या जीवनप्रसंगावर आधारित पुस्तकाचा परिचय करून देत आहे. 1 वरील चित्रात दाखवलेल्या ऐसपैस बुट्टी-पेटाऱ्यात, शेजारी टोकऱ्यात ढिगाने रचलेल्या लाडू, बर्फी, जिलेबी, इमरतीसारख्या ठिसूळ व नरम मिठायांना 60 -70 किलो वजनांपर्यंत रचून भरता येणार का हे ठरवावे लागेल.

कविता- मेसेज...

लेखक प्रितम तोरवने यांनी सोमवार, 16/03/2015 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
मेसेज किती दिवस झाले तुझा काही मेसेज नाही, मला आहे माहीती तुझा मेसेजपेक अजून संपलेला नाही जरी तुझा मेसेजपेक संपलेला असायचा , तरी दुसऱ्याच्या मोबाईल वरून का असेना तुझा मेसेज यायचा , जेव्हा हि वाजते मेसेज ची ringtone , तुझाच मेसेज असावा म्हणून लगेचच चेच्क करतो मी माझा cellphone. काही चुकले का माझे कि नवीन मित्र झाले तुझे सांग ना काय आहे माझा गुन्हा , मी तर मित्र तुझा जुना ……. -कवि -प्रितम दादाजी तोरवणे

मालती-माधव...एक लघुकथा...इथेच पूर्ण केली आहे.

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 16/03/2015 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मालती-माधव... भाटगरच्या त्या अथांग जलाशयाच्या काठावर मी माझ्या गाडीला टेकून उभी होते. थोड्या अंतरावर एका सिमेंटच्या बाकावर एक वृद्ध स्त्री म्हणजे माझी मालतीआजी डोळे मिटून मागे टेकून बसली होती. तिच्या अंगावर उगाळलेल्या चंदनाच्या रंगाची साडी होती. तिने डोक्यावरुन पदर घेतला होता. त्या साडीचे मरुन रंगाचे काठ मागेच असलेल्या लालचुटूक रंगाच्या फुलांना फिके पाडत होते. आजवर मी तिला याच रंगाच्या साडीत पाहिले होते. पण त्याने काय फरक पडला असता ? तिच्या खानदानी सौंदर्याचा प्रभाव समोरच्यावर सहज पडत असे. मालतीआजी जर कधी बोलली तर मात्र तिच्या विद्वत्तेचा अंदाज समोरच्याला येत असे. पण असे प्रसंग विरळाच.

ग्लोबल हॅपीनेस इंडेक्स

लेखक पुष्कर विजयकुमार जोशी यांनी सोमवार, 16/03/2015 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
"ए बारक्या, ते तेल बाटलीत काढून ठेव, उद्या लागेल", दिवसभर जीलेब्यांचे घन काढून थकलेला राक्या बोलला. रात्रीचा थंड वाऱ्यात त्याला आत्ताच पेंगायला होत होतं. दिवसभराच्या वाहतुकीनंतर शांत झालेला रस्ता. राक्याच्या गाडीच्या बाजूलाच पान टपरी, तिथे २-३ लोक सिगारेटी ओढत बसलेले. पान टपरीवाला थोडा रसिक पट्टीतला असावा, त्याच्या टपरीवर नुस्रत चे गाणे चालूए… वोह हटा रहे है पर्दाह, सर-ए-बाम चुपके चुपके… एका उंची दुचाकीवरून एक मुलगा उतरतो, "एक माईल्ड भाऊ" त्याचा फोन वाजतो. "हं बोला सर" इकडे राक्याची आवरा-आवर चालू आहे.

भजन - भक्तीचा डिज्जे (विडंबन - फेविकॉल से)

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 16/03/2015 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
काव्याची मूळ प्रेरणा ही डीज्जे बिज्जे विषय चालू केले, तर त्यावर एक भजन कम गाणं सुचलंय. बघा कसं वाटतं. चाल तीच; चिपकाले फेविकॉलसे वाली. हसत घ्या. संदर्भ लागण्यासाठी मूळ ओळी कंसात दिल्या आहेत. रस्त्यावर ज्या त्या बघा मंडप उभारले (अंगडाईया...) रुपात देणगीच्या किती पैसे काढले (उह आह...) आता आला तो दिवस (मै तो चलू...) फेडू सारे हो नवस (की मच जाए...) भक्तांच्या भेटीला बाप्पा बघा आले (होश वाले भी...) आले आले रे.....
काव्यरस

भ्रष्ट झाला कोळसा

लेखक चुकलामाकला यांनी सोमवार, 16/03/2015 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा सद्य परिस्थिती आणि अर्थातच श्रीगुरुजी यांचा लेख स्पर्श 'हाता'चा विखारी भ्रष्ट झाला कोळसा फ़ेकता तो कृष्ण पैसा शुभ्र झाला कोळसा भूक अन आक्रोश सारा मूक गर्भी दडपला वंचितांच्या वेदनेने अश्म झाला कोळसा संपली ती युगप्रतीक्षा खोदुनी वर काढला पाहुनी प्रेते सभोती भस्म झाला कोळसा क्रांतीच्या का वल्गना करिती फुकाचे धनिक हे पोचता त्यांच्या खिशातच थंड झाला कोळसा आजवरी मनमोहनाला आदराने वंदिले काजळी त्याच्याही हाता, खिन्न झाला कोळसा जाळण्या होळी खलांची फिरुनी जमवा लाकडे पेटण्याच्या सोहळ्याला सज्ज झाला को

काठी

लेखक शिवोऽहम् यांनी सोमवार, 16/03/2015 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी दिवेलागणीच्या वेळी शीळ घालत अंगणात रिंगणं घालत बसलो होतो. आधी काठीनं टायर पळवत नेत होतो तेव्हा कान धरून अनीलदादानी घरी आणलं. पण एका जागी किती वेळ बसणार? म्हणुन ही रिंगणं. पण त्यातही खुस्पटं काढेलच कोणीतरी! काय तर म्हणे संध्याकाळी शिट्ट्या मारू नका. का? तर ती राक्षसांची वेळ! जणु काही माझी शिट्टी ऐकली की येतात ते लगोलग. काहीही करा, आहेच काहीतरी उपदेश. कडी वाजवु नको-भांडणं होतात, पायावर पाय टाकुन झोपु नको-आईबापाला त्रास होईल, पालथी मांडी घालु नको-काय माहित काय होईल. हे सगळं कसं लक्षात ठेवायचं कुणास ठाउक. वर आजी म्हणते की भांडणं व्हायला कारण स्वभाव आहेत, दुसरं काही नाही.

गर्भपातल्या रानी .....!

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 16/03/2015 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
गर्भपातल्या रानी .....!

गारपीटीच्या अंगसंगाने
गर्भपातल्या रानी
अश्रू होऊन हवेत विरले
पाटामधले पाणी

एका एका झाडावरती
पक्षी हजारो होते
क्षणात पडले सड्याप्रमाणे
सरली सारी कहाणी

हातामधला हात सुटूनी
घरटे विच्छिन्न झाले
बुंध्याभवती जमीन नहाली
रक्ताळल्या पिलांनी

ऊस झोपला, कापूस निजला
खुरटून गेल्या बागा
जगण्या-मरण्यामधले अंतर
उरले नसल्यावाणी

शाबूत उरल्या धान्यवखारी
बंगले, महालमाडया