Skip to main content

मसाला भरलेली (Stuffed) सिमला मिरची

लेखक प्रमोदताम्बे .......................................... यांनी गुरुवार, 05/02/2015 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
मसाला भरलेली (Stuffed) सिमला मिरची साहित्य : ८-१० अख्या मोठ्या ढोबळी सिमला मिरच्या, एक वाटी बेसन पीठ , एक वाटी ओल्या नारळाचा चव , पाव वाटी पांढरे तीळ , अर्धी वाटी शेंडाण्याचे कूट, एक टेबलस्पून गोडा मसाला,एक चमचा प्रत्येकी धने व जिरे पावडर, चवीनुसार ३-४ हिरव्या मिरच्या व मीठ ,बचकभार कोथिंबीर,फोडणीसाठी तेल,मोहरी,हळद,जिरे,हिंग कृती : प्रथम सिमला मिरचीची देठे कापून काढून तेथून आतील बिया वगैरे काढून टाकून मिरच्या पोकळ करून ठेवा.

दहशतवाद म्हणजे काय?

लेखक भावना कल्लोळ यांनी गुरुवार, 05/02/2015 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
तर दहशतवाद काय असतो हे समजुन घेण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते. उदा. एक नवरा असतो आणि त्यांची एकुलती एक बायको असते. (सगळ्याची एकुलती एक बायको आणि एकुलता एक नवरा असतो, हा अपवाद असतात काही ज्याच्या काही उपशाखा असतात ज्या अनधिकृत असतात). तर असो. भावना म्हटले कि अवांतर आलेच. तर फेब्रुवारी आला आहे, प्रेमाचा महिना आहे, बायकोला कचेरीत काही काम नसते, नवऱ्याच्या सोबत घालवलेले काही प्रेमळ क्षण आठवून नवऱ्याशी काही प्रेमयुक्त गुंज मनीचे करण्यासाठी ती नवऱ्याच्या कचेरीत त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क न करता त्यांच्या कचेरीच्या दुरध्वनीवर संपर्क करते. अनायासे नवऱ्याची जेवणाची वेळ झालेली असते.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २९

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 05/02/2015 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. काकू हे सर्व लांबुनच पहात होती. आणि जसे आंम्ही तिला दिसलो..तशी ती आंम्हाला..."चाला रे पोरांनो...जेवताय ना.??? कि आज मलाहि उपाशीच ठेवणार आहात?" असं म्हणाली. आणि रात्रीच्या त्या अंधारात आंम्हाला आमच्या खर्‍या-मायेचं पुन्हा एकदा दर्शन झालं..! पुढे चालू.... ======================= त्या रात्री.. मला झोप अशी नीट येतच नव्हती. मनात एकच विचार येत होता. माणूस.. हा, आधी सदाचारी असल्याचा दिसतो,आणि मग.. धर्म त्यामागून डोकावल्यासारखं का वाटतं?

आई ....

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 05/02/2015 16:04 या दिवशी प्रकाशित केले.
तळ्याचे नीर दर्पण | विखुरले नभांकण | वाळलेले नक्षीपर्ण | तरंगीत || ढळलेली सांजसंध्या | निजलेले सूर्यपक्षी | स्वप्नफ़ुले जागलेली | सुगंधीत || धरणीची ग्लान झोप | तार्‍यांचे सूरेल गीत | उसवले श्वासधागे | अंतरात || छतावर रातवैरी | तेवलेला ह्रदयदीप | शब्दांध झाली आसवे | आठवात || -- शब्दमेघ
काव्यरस

वावर

लेखक ऊध्दव गावंडे यांनी गुरुवार, 05/02/2015 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
जीवं रमला गमला ऊभ्या पीकातं रंगला बोंड फुललं खुललं हासूहोटातं उललं तुरं सजली धजली भळं पाहूनं लाजली मनं भरलं भुललं हुळ्ळा खायाले झुरलं असं साजरं वावरं कोनी लावो ना नजरं शब्दार्थः बोंडःकपाशी चे बोंड भळः ज्वारी ची ताटं हुळूळा ः हूरडा वावर ः शेत

चार पाच वर्षा पूर्वी मी काही लिहिलं होत.

लेखक पिनुराव यांनी गुरुवार, 05/02/2015 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
वास्तविकता आणि स्विकार या दोन गोष्टींनी परिवर्तनाची सुरूवात होते. ‘परिवर्तन’ म्हणजे ‘बदल’, मग तो आपल्या स्वभावात असो किंवा आपल्या सभोवतालच्या परिस्थितीत असो. तुमच्या जीवनात वेळ बदललेली असणे म्हणजेच तुमच्या परिस्थितीत परिवर्तन होणे आणि हे शक्य आहे केवळ या दोन गोष्टींच्या मदतीने. तुम्ही ज्या ठिकणी उभे आहात त्याच ठिकणी विचार करायला सुरूवात करा, मी काय कारत आहे? कशासाठी करत आहे ? आपल्या सभोवती कशी परिस्थीती आहे. मग ति परिस्थिती आर्थिक असो मानसिक असो नाते संबंधा विषयी असो सामाजिक संबंधाविषयी असो किंवा तुमच्या स्वत:विषयी काही समस्या असो.

थरार लिंगाण्याचा !!

लेखक सह्यमित्र यांनी गुरुवार, 05/02/2015 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे जिल्ह्याच्या नैऋत्येला असलेला वेल्हे तालुका दुर्गम म्हणून प्रसिद्ध आहे. ह्या तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या कुशीत छोटी छोटी गावे अतिशय दुर्गम ठिकाणी वसलेली आहेत. उंच सखल डोंगर दऱ्या, मुसळधार पाउस, सोसाट्याचा वारा, अभावानेच असणारे गाडी रस्ते, शिक्षण, आरोग्य आदी मुलाभूत सोयींचा अभाव अशा परिस्थितीत येथील गावकरी राहत असतात. भात, वरई , नाचणी हि येथील प्रमुख पिके पण त्यासाठी देखील भरपूर मेहनत आणि निसर्गाची लहर हे घटक आहेतच. परिस्थिती आता बदलत आहे पण अजूनही येथील जीवन खडतर आहेच. तोरणा ते रायगड ह्या भ्रमंतीत हा भाग अगदी जवळून बघता येतो.

सबप्राईम क्रायसीस्,दलाल स्ट्रिट आणी........

लेखक जेपी यांनी गुरुवार, 05/02/2015 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
सबप्राईम क्रायसीस- साल होत २००५ साहेब दुसर्‍यांदा सिएम झाले.पण पुन्हा सिएम होण सोप नव्ह्त.स्पर्धा तिव्र होती,साहजीकच सायबांना भक्कम किमंत मोजावी लागली.साहेब त्याला गुतंवणुक समजुन कशी वसुल करता येईल याचा विचार करु लागले. थोड्याच काळात एक एक सरकारी कार्यालय गावात येऊ लागत.त्या सोबतच नव्या माणसांची गावात भर पडु लागली. नव्या लोकांसाठी जागेची मागणी वाढु लागली.गावा तस लहान त्यामुळे फारशी जागा नव्हती.त्यामुळे २००८ येता येता गाव आडवतिडव पसरु लागल. साल २००९, २६/११ घडल आणी सायबांच पद गेल.गावात निराशा पसरली.पण साहेब धोरणी होते आणी त्यांची गुंतवणुक अजुन वसुल झाली नव्ह्ती.त्यांनी आणखीन गु

मन

लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 05/02/2015 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
मन... मनाचे पाखरु घाले गवसणी नभी कधी बनुन कोकरु दूर पळे रानोमाळी मन विशाल सागर कुशी घेई नदी नाले मन सशाच्या दिलाचे दडू बसे बिळामधे मन कधी असे वारु कधी प्रेमाचा सागरु कधी मर्द त्याला म्हणु कधी कलिकेचा वेणु मन पियानोची धुन मन मुरलिची तान मन गंभीर आरोह मन सतारीच गान मन वेल हसणारी मन नदी पळणारी मन पर्वत शिखरी मन पाताळही ढुंडी मन... मनाची कविता प्रत्येकाच्या मनि फुले त्याच्या सुवासाच्या संगे जीव प्रत्येकाचा डोले मन हिशोबी काळाचे नफा तोटा मोजू पाहे मन पल्याड काळचे काळजाला भिडू पाहे ----------------

कर्त्याचे उत्तरदायित्व

लेखक नरेंद्र गोळे यांनी गुरुवार, 05/02/2015 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
पंतप्रधान महोदय, सादर प्रणाम, (हे पत्र २०१२ साली, तत्कालीन पंतप्रधान श्री.मनमोहनसिंग ह्यांना उद्देशून लिहिलेले असले तरी आजही ते संदर्भहीन झाले आहे असे नाही. वाचून सांगा की, याबाबत आपण काय म्हणता?) स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आज पासष्ट वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरी अजूनही, भारतात कर्त्यास त्याचे उचित उत्तरदायित्व सुपूर्त करण्यात आलेले नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मी हे का म्हणत आहे ते आधी स्पष्ट करतो. भारतातील सर्वात प्रमुख व्यवसाय शेतीचा आहे असे मानले जाते. सरकार नागरिकांकडून कर प्राप्त करून त्याचे बळावर शासन-व्यवहार चालवत असते. थेट कराचा मुख्य हिस्सा प्राप्ती कर समजला जातो.