Skip to main content

देणाऱ्याने देत जावे.....

लेखक _मनश्री_ यांनी शनिवार, 04/10/2014 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
देणाऱ्याने देत घेणाऱ्याने घेत रहावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे . देण्याचा आनंद हा घेण्याच्या आनंदापेक्षा खूप मोठा असतो . २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर हा आठवडा जगात joy of giving week म्हणून साजरा केला जातो . भारतात हा आठवडा 'दान उत्सव' या नावाने साजरा केला जातो . प्रत्येक जण यथाशक्ती सहभाग घेतो ... देण्याच्या वृत्तीचे अनमोल, दैवी मूल्य आहे. सर्व धर्मग्रंथ ह्या वृत्तीला, कृत्याला अव्वल दर्जा देतात. हा एक मोठ्यातला मोठा संस्कार जोपासला गेला पाहिजे. निसर्गाकडून हीच शिकवण आपल्याला मिळते. ही देण्याची वृत्ती मात्र सहजपणे आढळत नाही. देणं म्हणजे केवळ आर्थिक दान असा गैरसमज नसावा.

भाजपला मत देण्याअगोदर

लेखक सागरलहरी यांनी शनिवार, 04/10/2014 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
भाजपला मत देण्याअगोदर या प्रश्नाची उत्तरे भाजपाने, त्यांच्या समर्थकांनी अथवा कोणीही द्यावीत ..?? वरील पैकी मी कोणीही या सदरात येतो व कोणीही उत्तरे दिल्यास हवीत म्हणून मी माझ्या अल्प बुद्धी प्रमाणे ती देत आहे. १) महाराष्ट्रात सुद्धा मोदींच्या नावेच मते का मागता .. >> मोदी हे देशव्यापी नेतृत्व आहे. राज्य भाजपा ही अखिल भारतीय स्तरावरील पक्षाची शाखा आहे. न चालणारा माल दुसरीकडून कच्च्या ब्रांड खाली विकायला काढलेली स्वतंत्र सिस्टर कन्सर्न नव्हे.

शाकाहारी थाळी

लेखक जेपी यांनी शनिवार, 04/10/2014 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
सादर करीत आहे एक शाकाहारी थाळी thaaLI thaali डाव्याबाजुला

प्रवाही

लेखक आतिवास यांनी शनिवार, 04/10/2014 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
पानगळीचा रेटा सोसून काही मागे उभेच आहे; पाचोळ्यातून हलके हलके जीवनरसही वहात आहे; जे झाले, ते गेले आता, मागे वळून पाहता काही नाही; तरी पाखरे सुरेल गाती जगणे होता पुरे प्रवाही!

अवजारांप्रति कृतज्ञता

लेखक जागु यांनी शनिवार, 04/10/2014 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
खालील लेख दिनांक ३ ऑक्टोबर २०१४ रोजी लोकसत्ता-वास्तुरंग पुरवणी मध्ये प्रकाशीत झाला आहे. http://www.loksatta.com/vasturang-news/dasra-1008880/ --------------------------------------------------------------------------------- दसरा म्हणजे मांगल्याचा दिवस. ह्या दिवशी विशेषकरून यंत्रे हत्यारांची पूजा केली जाते. अशीच पूजा शेतकरी कुटुंबे आपल्या शेतीच्या अवजारांची करतात. वर्षभर शेती-मळ्यांसाठी राबणार्‍या अवजारांना दसर्‍याच्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केले जाते. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी रांगोळी काढून पाटावर अवजारे ठेवली जातात.

शेख चिल्ली !

लेखक माहितगार यांनी शनिवार, 04/10/2014 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
कुणीही अजाणता अथवा बावळटपणे स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागत असेल तर सहसा ज्या चित्राची पटकन आठवण येते त्यातील एक म्हणजे शेख चिल्ली झाडाच्या फांदीवर उलटा बसून झाडाची फांदी कापतोय, झाडाची फांदी कापून झाली की तो आपोआप झाडावरून फांदी सहीत खाली पडणार हे सुज्ञांच्या लक्षात येतच. या शेख चिल्लीच्या इतर बर्‍याच कथा असल्या तरीही या धाग्याचा उद्देश अजाणता अथवा अज्ञानातून स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागणे, बोलणे, तर्क मांडणे या संदर्भाने आहे. स्वतःच्याच हिताच्या विरूद्ध वागणे, बोलणे, (उणीवयूक्त) तर्क मांडणे/अनुसरणे, अशी उदाहरणे आपण बर्‍याचदा अनुभवत असतो अशा उदाहरणांची दखल घेणे हा धाग्याचा उद्देश आहे.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ११

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 04/10/2014 07:17 या दिवशी प्रकाशित केले.
केप कॉलबॉर्न इथे पोहोचल्यावर अ‍ॅमंडसेनने सुटकेचा नि:श्वास टाकला! तो म्हणतो, "इथून पुढे जाताना सतत पाण्याची खोली मोजण्याची आवश्यकता नव्हती! आमच्या जहाजापेक्षा कितीतरी मोठी जहाजं इथपर्यंत येऊन परत गेली होती! जॉन रे, कॉलीन्सन, मॅक्क्युलर आणि इतरांच्या मेहनतीतून तयार झालेले अनेक नकाशे आता आम्हाला उपलब्ध होते! अज्ञात सागरातून मार्ग काढण्याची यापुढे आवश्यकता नव्हती!" शिडाच्या उपकरणाची दुरुस्ती केल्यावर उरलेला दिवसभर त्यांनी तिथे आराम केला.

बोटावर न मोजता येतील इतके दिवस असतात ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी शनिवार, 04/10/2014 04:43 या दिवशी प्रकाशित केले.
बोटावर मोजतां येतील इतकेच दिवस उरलेले दहावे बोट करंगळी ती मोडली की त्या रात्री त्याची पोर जाणार असते तिची चालू असते लगबग आणि वेगाने सुरु होते आवराआवरी . सगळ्याच ब्यागा भरून ठेवते नि उरते शेवटची छोटी ब्याग मोजके सामान ध्यानाची माळ काही पुस्तके .. ती डॉलरचा हिशेब करीत असते रुपयात नि घेत रहाते महाग महाग वस्तू नको तितक्या उदा.

अश्वत्थामा

लेखक निलरंजन यांनी शुक्रवार, 03/10/2014 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
अश्वत्थामा ... अंगिरा गोत्रात उत्पन्न भारद्वाज ॠषिंचे पौत्र अर्थात नातू व द्रोणाचार्य या दिव्य अयोनिज ऋषिंचा पुञ द्रोणाचार्यांनी वडिलांच्या आदेशानुसार धर्मपारायण, सुशील ,तपस्वी अश्या कृपी या कृपाचार्यांच्या बहिणीशी विवाह केला, या दिव्य दांपत्याला शंकराच्या घोर तपश्चर्येच्या नंतर दिव्य तेजस्वी असा अश्वत्थामा हा पुञ झाला जो जन्माला आल्या आल्या होते उच्चस्वारात घोड्या समान किंचाळला त्याचा स्वर दिशदिशांत घुमला और संपूर्ण नभोमंडल व्यापले तेव्हाच आकाशवाणी झाली कि हया बालकाचे नाव अश्वत्थामा होईल - पुत्र जन्मानंतर द्रोणाचार्य प्रसन्न झाले आणि ब्राह्मणांना सहस्त्र गायी व धनदान केले द्रोणाचार्यांकडे