Skip to main content

सोराक

लेखक दिपक.कुवेत यांनी सोमवार, 06/10/2014 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
सोराक हि गोवन लोकांची एक पारंपारीक, साधी, सोपी ओला नारळ घालून केलेली एक लाल ग्रेव्हि आहे जी खासकरुन पावसाळ्यात करतात. कोसळणार्‍या पावसात जेव्हा ताजी मासळी मिळणं दुरापास्त असतं तेव्हा अश्या वेळी सुखी मासळी आणि जोडिला हे कालवण करतात. व्हेजवाले ह्यात त्यांच्या आवडिच्या भाज्या (उदा.

झक मारली का?

लेखक योगी९०० यांनी सोमवार, 06/10/2014 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच मा.रा.रा. शरदचंद्रजी पवारजी साहेब यांनी माजी मंत्री मधुकर चव्हाण यांच्यावर जाहीर सभेत टिका करताना खालील भाषण केले.. "उजनीच्या २१ टीएमसी पाण्याचा कांगावा करीत निवडणूक लढविणारे मधुकर चव्हाण इतके दिवस काय 'झक' मारीत होते का?" लगेच प्रसारमाध्यमांनी खालच्या पातळीवरची टिका, पवारांचा दर्जा घसरला असे बोलायला सुरूवात केली.

ते काळे अभद्र आभाळ …।

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 06/10/2014 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
[अशी म्हातारी माणसे दिसतात . आज सकाळीच बघितली जोडी . वाचनालयात आणि हळू हळू घराकडे परतताना .नव्वदीच्या तरुणाचे ते लुकलुकनारे डोळे बघून ,आणि त्या पंच्याशी वय असलेल्या गम्भीर स्त्री कडे जिच्या हातात एक पुस्तक होते पानगळ सुरु आहे ह्या पानावरून चालत असताना हे सुचून गेले ] तिचा नव्वद वर्षाचा नवरा तिच्या पंच्याशी वर्षाच्या खांद्यावर जेव्हा हात ठेऊन चालत असतो तेव्हा तो नसतोच नव्वद वर्षाचा त्याच्या अधू डोळ्यांना नाहीच दिसत तिचे थकून गेलेलं नि लोंबणारे, ओघळलेले शरीर ….

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

ओम भवती भिक्षांदेही

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : खालील लेख हा तद्दन पोरकटपणा असून त्यात कुठलीही वैचारीक मुल्ये नाहीत. खूप दिवसांनी "बाबां"कडे गेलो होतो.त्यावेळेचा किस्सा. सौदीला जाण्यापुर्वी बाबांनी. "धन्य ते संताजी धनाजी" अशी दीक्षा दिली होती.त्या दीक्षेचा थोडा-फार फायदा झाला आणि आम्ही "संताजी-धनाजी" यांच्या सहवासात वेळ काढायला लागलो.विचारांत आणि आचारात काही विशेष फरक पडला नाही.(असे आमची सौ. म्हणते...म्हणजे ते नक्कीच सत्य असेल...असे समजायला हरकत नाही.) आता बाबांना काहीतरी दक्षिणा द्यायलाच हवी.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १२

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 05/10/2014 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
९ सप्टेंबरला हर्शेल बेटावरुन आलेला मिशनरी फ्रेझर याची अ‍ॅमंडसेन आणि स्टेन यांच्याशी गाठ पडली. फ्रेझर मॅकेंझी नदीवर असलेल्या फोर्ट मॅकफर्सन इथे निघाला होता. त्याच्या जोडीला रॉक्सी हा एस्कीमोदेखील होता. किंग पॉईंटच्या पश्चिमेला चार मैलांवर एका तंबूत त्यांनी मुक्काम ठोकला होता. हर्शेल बेटाच्या परिसरात पाच जहाजं बर्फात अडकून पडलेली होती. त्याचबरोबर किंग पॉईंटच्या पूर्वेला आणखीन सहा जहाजं अडकल्याचंही त्याच्याकडून स्टेनला कळून आलं.

निवडणूक उमेद्वाराबाद्द्ल अपेक्षा

लेखक अत्रन्गि पाउस यांनी रविवार, 05/10/2014 18:42 या दिवशी प्रकाशित केले.
१. त्याला किमान लिहिता वाचता यावे २. एक तरी भाषा शुद्ध बोलता लिहिता यावी. ३. एखादी तरी परभाषा निदान समजावी ४. रोजचे वर्तमानपत्र वाचत असावा असे किमान शंका यावी असे वर्तन असावे. ५. एक तरी फोटो टिळाविरहित, पांढरे कपडे नसलेला, शर्टाचे वरचे बटण उघडे नसणारा आणि त्यातून सोन्यःची चेन न दाखवणारा असावा ६. आजूबाजूचे समर्थक वरील बाबींशी किमान संबधित असावेत

माझ ब्राम्हण असण

लेखक पिंपातला उंदीर यांनी रविवार, 05/10/2014 17:23 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व प्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो . ब्राम्हण म्हणून जन्माला आल्याचा मला काही अभिमान वैगेरे वाटत नाही आणि लाज तर मुळीच वाटत नाही . पुढे जे लिखाणात येणार आहे ते संपूर्ण पणे माझ्या अनुभवांवर आधारित आहे आणि त्याला माझ्या वैयक्तिक Sample Survey चा आधार आहे . म्हणजे मी केलेली विधान चूक पण असू शकतात . यात कुठलेही सरसकट करण नाहीये .

अश्वत्थामा-2

लेखक निलरंजन यांनी रविवार, 05/10/2014 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
अश्वत्थामाला घेऊन द्रोणाचार्य पांचाल राज्य सोडून हस्तिनापुरला आले तोपर्यंत पांडव माता कुंती सोबत वनवासातून राजमहालात पोहचले होते पंडुच्या अकस्मात निधनामुळे पितामह देवव्रत भीष्म पांडवाबद्दल जास्त प्रेमभाव बाळगून होते पण दुर्योधन आणि इतर भांवडे यामुळे पांडवाचा जास्त दुस्वास करू लागली होती त्यावेळी राजवाड्यातच कृपाचार्य सर्व राजपुत्रांना शिकवित असतं कृपाचार्यांनीच पितामह आणि द्रोणाचार्यांची भेट घडवून आणली द्रोणाचार्यांच्या विद्वत्तेवर प्रभावित होऊन त्यांना हस्तिनापुरच्या राजपुत्रांना शिकविण्याची विनंती केली द्रोणाचार्यांनी अट ठेवली की मी राजपुत्रांबरोबर अश्वत्थामालाही शिकवू इच्छितो आणि ती विनं