बात निकलेगी तो फिर... (भावानुवाद)
मूळ गीताच्या चालीवर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे -
नको इतकी अशी रंगेल उगा चर्चा ही
लोक "अकारण अबोला कशास?" पुसतील
"कसली चिंता तुला वाटे" असे विचारतील
दावतील अंगुली पाहून त्या केसांस खुल्या
आणि उलटून बघतील काळास सरल्या
कांकणांना बघुन होतील आरोप किती
कापरे हातही ठरतील गुन्हेगार किती
लोक निष्ठूर हे सुनवतील खड्या बोलांनी
माझ्या विषयास छेडतील विषय फिरवूनी
लावुनी घेऊ नको मनाला जरासेही तू प्रिये
तुझ्या चेहऱ्याची चलबिचल टिपून घेतील ते
साहुनी घे परि, पलटून प्रश्न मांडू नको
माझ्या नावाला त्यांच्यासमोरी घेऊ नको
नको इतकी अशी रंगेल उगा चर्चा ही
मूळ कविता - "बात निकलेगी तो फिर.."
मूळ कवी - कफील
मिसळपाव