Skip to main content

मराठी चित्रपटाने गाठलेल्या नव्या उंचीने पडलेले काही प्रश्न

लेखक अमृतांजन यांनी रविवार, 03/01/2010 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
१. ज्यांनी खास मराठी चित्रपटाच्या गाण्यांसाठी कर्दळी आणि झेंडूच्या बागांची जोपासना केली होती त्यांनी काय करावे? २. मराठी नटीच्या अगम्य आणि विनोदी अशा वेषभुषेत पटाइत असलेल्या ड्रेस सप्लायरने त्या ड्रेसच्या स्टॉकचे काय करावे? ३. सजणी- दिवाणी असे यमक जुळवून गाण्यांची रचना करणारे गीतकारांनी काय करावे? ४. लेन्सला एकाच वेळी चार-चार किंवा षटकोनी चित्र दिसेल असे एक लेन्सचे सप्लायर ह्यांनी काय करावे? ५. बेंळगाव मधे धंदा व्हावा म्हणून कानडी हेलमधे बोलण्यासाठी संवाद लिहिणाऱ्या लेखकांनी काय करावे? ६.

"अशा" चित्रपटांची "ऐशी-तैशी"...

लेखक निमिष सोनार यांनी रविवार, 03/01/2010 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
"सून-मुलगा अति नालायक-वाईट आणि आई-वडील-नणंद ही देवत्त्वापेक्षाही आदर्श माणसं" अशा धर्तीचे मराठी चित्रपट बंद होत आहेत, मराठी निर्माते-लेखक-दिग्दर्शक प्रगल्भ होत आहेत असे वाटायला लागले असतांनाच .... "स्वातंत्र्याची ऐशी तैशी" हा चित्रपट आला. अन वाटलं... कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहाणार. नाण्याच्या एकाच बाजू साठी बनवले जाणारे चित्रपट असतात. नाण्याला दुसरी बाजू असते हेच मुळी त्यांना मान्य नसतं. मराठी निर्माते-लेखक-दिग्दर्शक यांना पक्के माहिती आहे की, मराठी चित्रपट (बक्कळ पैसा मिळवून देणाऱ्या मल्टीप्लेक्स सह) चालण्याचे एकमेव हक्काचे ठीकाण- पुणे.

“हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)

लेखक II विकास II यांनी रविवार, 03/01/2010 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
“महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकारणी उत्तरेकडील अवकृपा होऊ नये म्हणून “हिंदी-राष्ट्रभाषा एके हिंदी-राष्ट्रभाषा” ह्याच पाढ्याची घोकंपट्टी करीत बसले आहेत.

अश्वत्थ

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 03/01/2010 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
अश्वत्थ अश्वत्थाच्या अखंड सळसळी मधे अजुन एक पान गळून पडले आहे अश्वत्थ तसाच सळसळतो आहे अखंड हसतो आहे. पान गळून जाण्याचा कधी होतो उत्सव तर कधी आक्रोश ... अश्वत्थाला त्याचे काहीच नसते जशी पाने गळतात ... तसेच धुमारेही फुटत राहतात ... .... अश्वत्थाला त्याचेही काही नसते हां ...

द्विधा

लेखक गिरिजा यांनी शनिवार, 02/01/2010 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
(काल्पनिक) "मग आता तुझं शिक्षण संपल्यावर काय करणार तू?" "काय म्हणजे काय? करेन जॉब नाहीतर पुढे शिकेन अजून.." "काय पण म्हणजे?" "बघू गं.. हे होऊ देत आधी.. तोवर ठरवेन मी.." ------------------------------------------------------------------------------------------------ "जॉब ना.. मला काही फरक पडत नाही फारसा.. पुण्यात मिळालं काय किंवा बाहेर जावं लागलं काय.. माझी तयारी आहे.. जोवर भारत सोडवा लागत नाहीये" "हम्म.. मला माहितीये.. तुला पुण्याबाहेरचा का चालणारे ते.." "अस्सं?" "हम्म.. म्हणजे मग आत्याची भुणभुण नाही तुझ्यामागे लग्न कर लग्न कर.." "हा! well.. that is like an additional thing..

पूर्वीगत पण आता कोणी हिणवत नाही

लेखक चेतन यांनी शनिवार, 02/01/2010 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
अभ्यंकर गुर्जींचा कच्चा आणी पक्का माल वाचुन थोडासा टाइमपास करावासा वाटला पूर्वीगत पण आता कोणी हिणवत नाही पूर्वीगत पण त्याचे काही वाटत नाही B) खरेच का पण आपण कंपुत सामिल झालो अजून का लेखास प्रतिसाद मिळत नाही :?
काव्यरस

नटरंग डोस्क्यामंदी झिंग

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी शनिवार, 02/01/2010 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
( वि. सु. चित्रपट परिक्षण लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे मंडळी काही चुकल माकल तर माफ करा तस बघायला गेल तर हे आमच पहिलेच व्हर्जिनल लिखाण आहे सुज्ञ मिपाकरांनी ओळखलच ;) असेल समजुन घ्या मायबाप वाचकहो) नमस्कार मंडळी काल फर्स्ट डे फर्स्ट शो नटरंग हा सिनेमा पाहिला खरच केवळ अप्रतिम सिनेमा आहे नटरंग
कागल गावचा गुणा ऐका त्याची कहाणी ! हा हाSSSSS रांगडा ज्याचा बाज आगळहुत पाणी ! हा हाSSSSS पैलवानी तोरा त्याचा रुबाब राज्यावाणी ! हा हाSSSSS कौतिक सांगु किती पठ्या बहुगुणी !

व्यथा

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 02/01/2010 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
पुसाच्या थंडीनं कहर मांडला तवा मास्तर मालकाची माडी चढला . तवा मालकाच्या सोबत बसल्याली फारेनर पाहुणी विलायती गरमी गिलासात वतत हुती. या मास्तर , हे मास्तर आमच्या साळंचे. यांचा लई जीव पोरांवर आणि आमचा जीव त्यांच्या आयांवर मालक बोलले फारेनराला.आणि खिंकाळले जोरात. पुसाच्या थंडीत आंग आखडून मास्तर बसला . तवा मालक म्हणलं घ्या मास्तर गिलासात गरमी भरून. सलगीचं घोडं दामटत मास्तर म्हणलं चार हिरव्या नोटा भेटल्या तर..... दोनाचे चार करीन म्हणतो धावीचे वर्ग. आनी, थोडा सोडा घाला की मालक. लई सवकलास की मास्तरा. थोडी गिलासातली बरुबरी दिली तर सोडा मागतोस व्हय.? मालक गिरमटून बोललं तवा,दोन पाहुणं चार हिरव्या नोटा चु
काव्यरस

काही कविता.

लेखक रामदास यांनी शनिवार, 02/01/2010 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
असा नको अवेळी वारा पदराचा. झाकले इंगळ राखेखाली . मन माझे. +++++ माझी फितूर पानं गुलाम तुमची झाली . हुकुम आमचा झाला बाजी तुमची झाली. अवघड खेळ आहे बुवा. ++++++= आळंबीचं पांढरं रान माजलं आहे तिथे माझं प्रेम तुझी वाट बघत उभं होतं . आता, शोधाशोध निरर्थक आहे. उपेक्षेच्या उंबर्‍यावर मनाचा चुडा फोडून मी जगण्याचे गाव सोडले आहे. +++ ते म्हणाले, हा वेडा आणि ती वेडी पण.. मी खोल खोल डोहात तू काठावर कोरडी. ++++ नव्या वर्षाची सुरुवात करू या.