Skip to main content

बुधवारची कविता : (खवट)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी गुरुवार, 10/12/2009 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
नियमाप्रमाणे या बुधवारी रात्री देखील आम्ही 'साप्ताहिक सांकृतीक कार्यक्रमास' बसलो. थोडेसे कडक धोरण अवलंबल्याने उतरायला वेळ लागला त्यामुळे हि कविता सेवेत रुजू करण्यास उशीर झाला. त्याबद्द्ल मी आपला दिलगीर आहे. आणि हां बदलीन... असो. आमची प्रेरणा ग्लास जरा मी हाती घ्यावा.. पिता पिता काव्य नवे तेव्हाच पडावे .. पिता पिता सोबत होते तिची नि माझी पेग काही जरा बरा चिवडाही मिळावा.. पिता पिता एकदाही पुढे तुझा प्रतिसाद न यावा इतकी का जळजळ व्हावी ..पिता पिता चुकून जुळती कधीमधी मते आपली आठवही त्याचा न उरावा..
काव्यरस

मी पण पळालो...

लेखक विमुक्त यांनी गुरुवार, 10/12/2009 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे मँरेथॉनच्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास लकडीपुलावर प्रचंड गर्दी होती... बरेचजण आमच्या सारखेच पहिल्यांदा मँरेथॉन मधे भाग घेत होते... सगळे चेहरे आनंदी आणि उत्साही होते... वातावरण एकदम वेगळच भारावलेलं होतं... एका शब्दात सांगायच झालं तर प्रचंड "युफोरिया" होता वातावरणात... खालच्या नदी शेजारच्या रस्त्यावर बरेचजण warmup साठी पळत होते... "पश्या, warmup साठी नको पळायला... आत्ताच दमलो तर मेन रेस राहून जाईल" रव्या "हो बे... रेसच्या वेळेस सुरुवातीला हळू पळूत म्हणजे warmup होवून जाईल..." मी पुणे मँरेथॉनच्या आदल्या दिवशी रव्याला फोन केला तर म्हणाला... "नको बे... मी नाही पळत...

घोसाळ्याची भजी

लेखक श्रद्धा. यांनी गुरुवार, 10/12/2009 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्य :- घोसाळे.... गोल काप केलेले अथवा फिंगरचिप्स प्रमाणे, डळीचे पीठ, चवीप्रमाणे मीठ, तिखट, हिंग,ओवा,थोडी चिरलेली कोथिंबीर, तळायला तेल. कृती :- प्रथम डाळीच्या पिठात मीठ, तिखट, ओवा, हिंग, घालुन घ्यावा. मग तेल गरम करुन १ मोठा चमचा तेलाचे मोहन त्या पिठात घालावे. पीठात कोथिंबीर घालुन पाणि घालुन सारखे करुन घ्यावे. पीठ फार पातळ अथवा फार घट्ट असु नये. त्यातच घोसाळ्याचे काप घालुन भजी तळुन घ्यावीत..गरम गरम खायला घ्यावीत...

मसाले भात

लेखक श्रद्धा. यांनी गुरुवार, 10/12/2009 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :- २ वाट्या बासमती तांदुळ, १/२ वाटी कोथिंबीर, ३-४ मिरी, ४-५ लवंगा,२/३ तमालपत्री, १०/१२ काजू तुकडे, चिरलेला कोबी १ वाटी ,गाजराचे तुकडे एक वाटी, मोठे २ चमचे गोडा मसाला, चवीपुरते मीठ, २ मोठे चमचे तेल, १ मोठा चमचा तुप, राई, जीरे, हळद, हिंग,आले १ इंच उकललेले पाणी तांदळाच्या अडीचपट कृती :- तांदूळ धुवून १५ मिनीटे निथळत ठेवा.

<सवयीने मंद >

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 10/12/2009 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरीत होऊन लढवावे असे सध्या तुरळकच आढळते तरी ही आमची प्रेरणा ही (सवयीने मंद) होळीची याद देऊन जाणारे विविध नावांचे विरविरीत धागे... काही खुळे, आणि दिशाहीन मठ्ठ काही नेहमी व्यस्त काही सुस्त तेच वळण तेथेच नेणारे फक्त कधी रोडावलेले, निष्कारण थंडावलेले अतीसामान्य कवितेचे जंत ... तरीही एकूणएक कवीता वाचणारा रटाळलेला विचारवंत ... पोळीची साद घालून जाणारे विविध आचार्‍यांचे सुनसान धाबे... काही बळेबळे, आणि चववीहीन घट्ट काही स्वस्त काही फस्त काही जेवण तेच ;तेच वाढणारे रीक्त चवीचे तेच मीठ पीठ अन मसाले कधी शिजलेले , अर्धवट भिजलेले ,

सात ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 10/12/2009 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
************************************************ या विषयावर आजपर्यंत खुप जणांनी लिहीलेय, खुप सुंदर लिहीलेय. त्या सात महावीरांची आठवण आजही आपल्याला निष्ठेचे महत्व शिकवते.
काव्यरस

रात्र मिलनाची ... !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 10/12/2009 10:51 या दिवशी प्रकाशित केले.
मंद वार्‍यात,धूंद तार्‍यात, लाजत रात्र आली चांदण्यांचे तबक हाती, उधळीत रात्र आली ! मंदावला भास्कर.., चांदणे सावळे निळावले स्पर्षाने शशिकराच्या, बघ गरती रात्र झाली ! शृंगारात विरघळे, अस्तमानाचे गीत फिके लाजलेली रातराणी..., फुलवीत रात्र आली ! लज्जेने धरले हळुवार, दाती शेव अंधाराचे गुंफीत गीत मिलनाचे.., आतूर रात्र झाली ! नको रे सख्या हे असे, अता दुरावे अंतरीचे रुणझुणते सुर समीराचे, धुंदीत रात्र आली ! चल मिळून तनुत, आगळा देहराग आळवू मिटले अंतर सगळे...,अन गंधीत रात्र झाली ! विशाल.
काव्यरस

"ने मजसी ने" ची शताब्दी

लेखक विकास यांनी गुरुवार, 10/12/2009 04:03 या दिवशी प्रकाशित केले.
आज लोकसत्तेतील लताच्या मुलाखतीत म्हणल्याप्रमाणे उद्या उद्या (१० डिसेंबर, २००९) ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहीलेल्या "ने मजसी ने परत मातृभूमीला" या काव्यास शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. हे वाचकांपर्यंत पोचवल्याबद्दल लोकसत्तेचे आभार! याबाबत कधीच ऐकलेले नव्हते तसेच जालावर देखील माहीती मिळाली नाही. कुणास अधिक माहीती असल्यास अवश्य सांगा. तर्काने विचार केल्यावर इतके नक्की लक्षात आले की ही कविता १९०९ मधे लिहीली असावी.

शिरपूरचा पार

लेखक हर्षद आनंदी यांनी बुधवार, 09/12/2009 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
"च्यामारी ह्या म्हातार्‍याच्या, हातात घावुदे एकदा... नरडंच आवळतू साल्याचं", हणम्या स्टेशनमास्तरच्या केबीन मधुन बाहेर येता येता करवादला. त्याची धुसफूस ऐकुन तिथेच बसलेल्या दोघा-तिघांनी दात विचकले. नान्याच्या पाठीत धपाटा घालुन तो तिथेच एका दगडावर बसला, बाजुला तोंडातील तंबाकुची पींक टाकुन, तो परत चालु झाला. नान्याच्या पाठीच धीरडं झालेले बघुन बघ्यांची चांगलीच करमणुक झाली. हणम्या जाम तापला होता, तापणार नाय तर काय हो? एकतर जवान गडी, चार महिन्यांपलिकडेतर हळद लागली, आठ्वड्याला दोन रोज ह्याची मुंबई ड्युटी, म्हनजे हा आपला चार रोज तिकडंच की!