Skip to main content

India Deserves Better - ६. हसदेव अरण्य, कोळसा खाण, पर्यावरणाचा ह्रास आणि अदानी.

लेखक गणेशा यांनी रविवार, 13/10/2019 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
नोटः शेती आणि समस्या या विषयावर लिहिताना, शेतकर्‍यांच्या बेसिक प्रश्नांनाही सरकार विरोधी अजेंडा, शहरी लोकांच्या करावर चाललेला बाजार अश्या आशयाच्या टीका थोड्याफार प्रमाणात ऐकाव्या लागल्या, परंतु त्यामुळेच शहरी नागरीकाची माणसिकता आणि व्यथा यावर लिहायला घेतले होते, आजपर्यंत मध्यमवर्गीय नोकरदार आणि शहरी नागरीक यांच्या वर जास्त काही लिहिले गेले आहे असे माझ्या वाचनात कधी आले नाही.

कानोसा पाकिस्तानचा १ - दि १२ ऑक्टोबर २०१९

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 13/10/2019 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, भारतीय राजकारणात अनेक बदल होत आहेत. त्याचे पडसाद शेजारी पाकिस्तानवर पडणे अटळ आहे. म्हणून तिथे भारताबद्दल काय बोलले जाते, त्यांच्या अतर्गत घटनांचा आपल्या रजकारणावर काही प्रभाव पडतो का? यावर टीव्ही माध्यमातील चर्चेच्या अनुरोधाने काही लिखाण सादर.

निनावी कथा

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 11/10/2019 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
सुशांतला कॉलेजला पाठवण्याच्या तयारीनंतर निरजचे ऑफिसला जाण्याआधीचे शोधाशोधीचे सत्र संपवून दोघांना अनुराधाने गाडीत बसवून 'टाटा' केला आणि मग निवांतपणे ती टिव्ही लावून बसली. बातम्यांवर नेहमीचे राजकारणी पडसाद उमटत होते. या अश्या बातम्या सुरु झाल्या की तिला जबरदस्त कंटाळा येत असे. काही तरी सोबत राहिलं म्हणून तिने रेडिओ असल्यासारखा बाजूला टीव्ही चालूच राहू दिला आणि मघाशीच्या शोधाशोध सत्रात पसरलेले घर आवरण्याचा प्रपंच सुरू केला. सर्दीकरता काढलेल्या टॅब्लेटसची स्ट्रीप आवरताना तिला माईची आठवण आली. आज माई इथे असती तर नक्की म्हणाली असती, 'अगं शिंकल्यावर माणसाने घराबाहेर पडू नये. सांग सुशांताला....

आणि आषाढी पावली...

लेखक महामाया यांनी गुरुवार, 10/10/2019 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षी आषाढी एकादशीला मी नागपूरला होतो...रात्र सरता सरता आलेला अनुभव आषाढी पावल्याची पावती होता...तो इथे देत आहे... रवींद्र दत्तात्रय तेलंग काही प्रसंग आठवणीत घर करून जातात. 12 जुलैला आषाढ़ी एकादशी होती...उपासाचा दिवस...मी नागपुरहून शिवनाथ एक्सप्रेसनी बिलासपुरला परत येत होतो. त्रिमूर्तिनगरहून आम्ही रात्री 11 वाजता निघालो...गाडी 11.55 ची होती. इतवारी स्टेशनावर पार्किंगला ही गर्दी...स्टेशनाच्या दारापर्यंत पोचायला वीस मिनिटे लागली. कोच नंबर होता एस-9. बर्थ 65, 68. दाेन्ही लोअर बर्थ होत्या.

अना ..... अर्थात क्रोएशियन समाज ..!!!!!!!

लेखक स्मिता दत्ता यांनी गुरुवार, 10/10/2019 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठून समुद्रावर फिरायला गेलो. तिकडे तुरळक लोक जॉगिंगला आलेले. बरेचसे लोक कुत्र्यांना फिरवायला घेऊन आलेले. कुत्र्यांना फिरवणारे सर्रास सगळीकडे दिसतात. एकूणच युरोपात कुत्री, मांजर पाळण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यांची कुत्री पण शिस्तीची असतात. उगाच कुणाच्या अंगावर धावून जात नाहीत आणि उगाच भुंकत हि नाहीत. कितीतरी कुत्री मोकळीच निवांत चाललेली. मागून त्यांचे मालक येत होते. नेहमीचे लोकं आणि त्यांची कुत्रीही गप्पा मारताना दिसत होते. रस्त्यावर कुठेही कुत्र्याची घाण दिसत नाही. जबर दंड असतो त्यासाठी.

सरकारचे डोकं नक्की ठिकाणावर आहे काय ?

लेखक खिलजि यांनी बुधवार, 09/10/2019 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारचे डोकं नक्की ठिकाणावर आहे काय ? अरे देवेंद्रा , तुला झालंय तरी काय चुलीत गेली प्रगती सारी ठेव ती मेट्रो तुझ्याच दारी मुक्यांचा जीव तुला खाऊ वाटला काय सुधीर राव आहेत कुठं ?

हस्तर परीक्षण वार बुधवारी वारला

लेखक हस्तर यांनी बुधवार, 09/10/2019 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
२ऑक्टो अर्थात गांधी जयंती ला खास वार चित्रपट प्रदर्शित केला गेला होता बुधवार आम्ही पण पण बघतील मग वार तुम्ही बघितला असेल तर कोणी पण मदत करू शकत नाही आणि तिकीट बुक केली असेल तर आत्ताच रिफंड मागा १) टायगर श्रॉफ ह्याने एक मोठी कमी भरून काढली आहे ,अभिनयाची ची नाही तर आयटम बॉय ची त्याचा अभिनय बघून म्हणाल टायगर सोड ,चित्रपट करणे नाही तर श्वास घेणे २) जेव्हा जेव्हा टायगर चे डायलॉग सुरु होतात तुम्ही उभे राहणार टाळी किंवा शिटी वाजवायला नाही तर समोरच्या माणसाला गप्प करायला जो शिव्या द्याल उभा राहिलेला असणार आहे ३) वार मूवी बघताना तुम्ही चित्रपट समरस व्हाल डोके ह्रितिक आणि काळीज टायग

आमार कोलकाता - भाग ४

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 09/10/2019 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
८५ अँमहर्स्ट स्ट्रीट, कोलकाता  चित्रसौजन्य - राजा राममोहन रॉय मेमोरियल, कोलकाता. जुन्या कोलकात्यातील एक महालसदृश्य इमारत. जॉर्जियन वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना असलेल्या शहरातील थोडक्याच इमारतींपैकी एक. फ्रान्सिस मेंडीस नामक श्रीमंत कलाप्रिय माणूस इमारतीचा मूळ मालक. १८१४ साली रंगपूरहून (सध्या बांग्लादेशात असलेले शहर) आलेल्या एका भारतीय व्यक्तीने १३००० रुपयांचा घसघशीत मोबदला देऊन फ्रान्सिसकडून हे घर विकत घेतले आणि तिथे कायमचे राहायला येण्याचे ठरवले.