Welcome to misalpav.com

सलमानचा जामिन !

लेखक: चिनार | प्रसिद्ध:
उच्च न्यायालयाला योग्य वाटत असेल तर त्यांनी सलमानला जामिन जरूर द्यावा. नंतर त्याची निर्दोष सुटका सुद्धा करावी. फक्त जामिनाच्या किंवा सुटकेच्या निर्णयाला खालील पुरवणी जोडावी १. विनापरवाना (without license) गाडी चालवणाऱ्या चालकावर इथून पुढे कोणतीही कारवाई करू नये. कारण -- अपघात करण्याचा त्यांचा हेतू नसतो. २. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर इथून पुढे कोणतीही कारवाई करू नये. कारण -- प्रत्येक नियमाला अपवाद असलाच पाहिजे. ३. मद्य पिऊन गाडी चालवताना एखादा अपघात झालाच तर केवळ ताकीद देऊन सोडून द्यावे. कारण -- इतर वेळी त्यांचे समाजातील वर्तन चांगले असते. ४.


१० हजार एकर जमीन बांगलादेशला दिली

लेखक: आशु जोग | प्रसिद्ध:
भारत-बांगलादेश यांच्यामधील जमीन देवाण घेवाणीचे विधेयक सर्व संमतीने पास झाले. सरकारला यासाठी सर्व विरोधी पक्षांनीही सहकार्य केले. या विधेयकाबाबत काही मतभेदाचे मुद्दे होते. बांगलादेशला जमीन देण्याला भारतातील काही गटांचा विरोध होता. त्यांना ही एक प्रकारची माघार वाटत होती. आजच्या पास झालेल्या विधेयकामुळे भारताकडून बांगलादेशला १० हजार एकरचा भूभाग मिळेल तर बांगलादेशकडून भारताला ५१० एकरचा प्रदेश मिळेल. हेतु हा आहे की यामुळे दोन्ही देशांच्या सीमा मानवनिर्मित न राहता नदी, पर्वत अशा नैसर्गिक घटकांच्या सहाय्याने बनतील असा अंदाज आहे. ज्यामुळे सीमांचे रक्षण करणे सोपे होइल.


रविंद्र पाटील : नाव ओळखीचं वाटतंय ???

लेखक: नीलमोहर | प्रसिद्ध:
रविंद्र पाटील या नावाला स्वतंत्र ओळख नाही पण 'सलमान खान' हा संदर्भ दिला की त्यांची ओळख पटू शकेल. रविंद्र पाटील हे सलमानचा अंगरक्षक म्हणून नेमलेले पोलिस काँस्टेबल होते, होते म्हटले कारण आता ते या जगात नाहीत. पैसा आणि अधिकार या दोहोंच्या ताकदीने मिळून एका निष्पाप प्रामाणिक माणसाचा कसा बळी घेतला त्याचीच ही कहाणी. गेले काही दिवस लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न बनलेल्या चि.कु.सलमान खान खटल्याबाबत माहिती करून घेतांना काही धागे मिळाले.


रतीब

लेखक: रातराणी | प्रसिद्ध:
उन्हाळ्याची सुट्टी लागल्यापासून शांताच एक काम हलक झाल होत, ते म्हणजे चंद्रीला चरायला नेण. दिगूने मोठ्या उत्साहाने ते काम अंगावर घेतलं होत. रोज दुपारी त्याचा मित्रांबरोबर कधी विटी दाण्डुचा डाव रंगत होता तर कधी पत्त्याचा. खेळ संपले की मग कैर्या, चिंचा पाडण, त्या मीठ लावून खाण आणि मग विहिरीत डुंबत बसण असा त्याचा उद्योग सुरु असे. संध्याकाळ झाली कि तो चंद्रीला घरी घेऊन येई. तोपर्यंत शांता कधी घर सारवून घेई, तर कधी दळण नीट करून ठेवायची. कधी बायका वाळवण करायला बोलवायच्या मग त्यांना जाऊन मदत करायची. आजही असाच दिगू चंद्रीला रानाकड घेऊन गेला. त्याच्या पाठोपाठ शांता धुण घेऊन गेली होती.


पुस्तक परिचय : हसरी किडनी अर्थात ‘अठरा अक्षौहिणी’

लेखक: पारुबाई | प्रसिद्ध:
पद्मजा फाटक या लेखिका म्हणून आणि एके काळी दूरदर्शनवर सुंदर माझे घर सादर करणाऱ्या म्हणून बऱ्याच जणांना आठवत असतील. त्यांना वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी अचानकपणे ग्लुमेरेलो नेफ्रायटीस नावाच्या एका असाध्य रोगाला सामोरे जावे लागले. या आजारामध्ये किडन्या पूर्णपणे निकामी होतात. डायलिसीसवर किंवा किडन्या पुनर्रोपण करून आयुष्य वाढवता येते. पण ते असते सर्वसाधारणपणे २-३ वर्षाचे. अश्या अचानक उद्भवलेल्या जीवघेण्या आजाराशी त्यांनी १० वर्षे सर्व शक्तीनिशी झुंज दिली. या झुंजीची कहाणी त्यांनी ‘हसरी किडनी अर्थात अठरा अक्षौहिणी’ या पुस्तकात शब्दबद्ध केली आहे.


'' अरे, ऐकतोस ना रे...''

लेखक: संकेत२५ | प्रसिद्ध:
एखाद्या स्वप्नवतं दुनयेत गाढ असता अचानकपणे जाग यावी अन ते स्वप्नचं कोलमडून जावे तसंच काहीसं आयुष्यात कधी घडतं . आयुष्यातले ' रंग ' एकाकी बदलतात.. अन होत्याच न्हवतं होवून जातं. 'क्षणा' चा हि विलंब न लागता... अशीच एक रविवारची रात्र ,हास्य आनंदा कडून वेद्नेकडे झुकलेली ... रात्रीचे साधारण सव्वा आठ होत आले होते .. पनवेल स्थानकाहून ठाण्यासाठी आम्ही लोकल पकडली अन सीट वर निवांत बसते झालो. . रेल्वे रुळावरून लोकलं अगदी धीम्या गतीनं पुढे सरत होती. डब्यात कमी अधिक रेलचेल होती. हळू आवजात कुणा एकेकाची, आप आपसात कुजबुज चाललेली . कुणी मोबाईल मध्ये डोकावलं होतं.


मनकवडा डॉक्टर …

लेखक: पगला गजोधर | प्रसिद्ध:
कल्पना करा, संध्याकाळच्या वेळेस आपण आपल्या घरात असताना, अचानक सर्व शहरातली लाईट गेली, आणि आपल्याकडे एकदम बुक्क अंधार झाला तर, अंधाराला डोळे सरवयापर्यंत, मनावर कशी एकप्रकारची अनामिक भीती एकटेपणाची काळोखी पसरते. आता त्या काही क्षणांच्या अनुभवावर अंध व्यक्तींचा जीवनातील काळोखीवर खर्‍या अर्थाने विचार करून, अंध बांधवांच्या दु:क्खाची भयाणता, डोळस व्यक्ती कल्पना करू शकते. स्पर्श आणि आवाज यांच्या माध्यमातूनच अंधांचा जगाशी संपर्क येतो.


"नोकरी" - एक चित्रपट

लेखक: वटवट | प्रसिद्ध:
(प्रस्तुत प्रसंग आणि सर्व पात्रे ही पूर्णपणे काल्पनिक आहेत. त्याचा कोणत्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसा आढळून आल्यास तो एकमात्र योगायोग समजावा)…. "नोकरी" रात्रीच्या चांदण्यांचा एक लूक घेतल्यानंतर, सगळ्यात सुरुवातीला कॅमेरा एका झोपडपट्टीवरून फिरतो… फिरत फिरत तो एका अरुंद अश्या बोळातून पुढच्या दिशेने जाऊ लागतो. जाताना आजूबाजूची दृश्ये खूप बोलकी असतात. एक गलितगात्र म्हातारा (वयोवृद्ध नाही…. म्हाताराच) खोकत असतो, दारात येउन. त्याच्या हातात एक तांब्या असतो, पण त्यात पाणी नसतं…( अरेरे….


कृष्णधवल छायाचित्रे......मिपा स्पर्धा-१०

लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:
मिपा कृष्णधवल छायाचित्र स्पर्धा. Simple, Free Image and File Hosting at MediaFire १९३० साली रंगीत फिल्म्स कोडॅकने व इतर कंपन्यांनी बाजारात आणल्या आणि छायाचित्रांच्या जगात खळबळ माजली. शेवटी शेवटी १९७० साली तर कृष्णधवल छायाचित्रे का काढावीत असाही प्रश्न विचारला जाऊ लागला. कृष्णधवल हा इतिहास आहे. निसर्गात काळ्या पांढऱ्यात काहीही नसते.