Welcome to misalpav.com

मानव आणि रोबोट

लेखक: भागो | प्रसिद्ध:
ही कथा पाचहजार वर्षांपूर्वी मीच लिहिलेल्या ‘रोबोट: कथा आणि व्यथा’ ह्या कथा संग्रहातून घेतली आहे. हा कथासंग्रह पाचव्या मितीत( Fifth Dimension) असल्यामुळे वाचकांना तो डाउनलोड करणे शक्य नाही. मीच इथे लिहित जाईन. रोबोही आता पाचव्या मितीत निघून गेले आहेत. तर मानव हे रोबोटपासून उत्क्रांत झाले ह्या रोबोर्वीन नावाच्या शास्त्रज्ञाच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. मानवाचे प्रोग्रामिंग त्याच्या जन्मापासूनसुरु होते. आधी नातेवाइक, मग शाळा, नंतर समाज हे महत्कार्य करत असतात. खर तर लहान मुले ही आइन्स्टाइन पेक्षा महान शास्त्रज्ञ, शेक्सपिअरपेक्षा महान लेखक असतात. त्यांचा सगळीकडे मुक्त संचार असतो.


Thrills on wheels

लेखक: मालविका | प्रसिद्ध:
Thrills on wheels (Thane - Statue of Unity - Thane) पहिला टप्पा प्रवासाचा पहिला टप्पा अर्थात चॅलेंज होत ते म्हणजे चिपळूण - ठाणे प्रवास. याआधी फक्त शेजारच्या सीट वर बसून प्रवास केलेला. आता स्वतः गाडी चालवत जायचं होत. जमेल की नाही? नाही जमलं तर काय? अशी घालमेल चालू होती. गाडी मध्येच पंक्चर झाली तर? निदान थिअरी तरी माहिती आहे. प्रॅक्टिकलची कधी वेळ आली नाही त्यामुळे जरा धाकधूक होती. परत एकदा रिविजन करून घेतली. घरातल्या मोठ्यांना नमस्कार करून ७ वाजता निघालो. तशी या रस्त्याला गर्दी कमी होती त्यामुळे तिथे कुठेच काही त्रास झाला नाही. खेड क्रॉस करून कशेडी घाट लागला.


औरंगाबाद जिल्ह्यातल्या वस्तीशाळेवरचा अनुभव

लेखक: मार्गी | प्रसिद्ध:
✪ शाळा सोडून जाणा-या शिक्षिकेद्वारे विद्यार्थ्यांसाठी आकाश दर्शनाचं आयोजन ✪ ८० हून अधिक मुलं, ३५ हून अधिक पालक, शिक्षक व ग्रामस्थांचा सहभाग ✪ बलून प्रज्वलनाद्वारे सत्राची सुरुवात! ✪ औरंगाबादच्या लाडसावंगीजवळ गवळीमाथा येथील सुंदर आकाश ✪ ग्रह, तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ आणि "शाळा चांदोबा गुरुजींची" ✪ धुमकेतू बघण्याचा दुर्मिळ अनुभव आणि डोळ्यांची तपासणी! ✪ समंजस ग्रामस्थांचा आणि उत्साही विद्यार्थ्यांचा सहभाग ✪ विद्यार्थी नव्हे, ही तर सावित्रीची लेकरं! ✪ अंधारलेलं आकाश पण अनेक उजळलेल्या चांदण्या सर्वांना नमस्कार. औरंगाबादमध्ये काल दि.


शशक--दरोडा

लेखक: राजेंद्र मेहेंदळे | प्रसिद्ध:
रात्रीचे २ वाजलेत. गपागप डोळे मिटतायत. कडक एक्स्प्रेसो प्यायला हवी. समोरच्या काळ्या स्क्रीनवर वायरशार्कचे लॉग्स धडाधड सरकत चालले आहेत. दुनियाभरचे पब्लिक आय पी स्कॅन करतोय. बरेच दिवस झाले कुठे काही क्रॅक मिळत नाहीये. लोक हुशार झालेत की माझी टूल्स बोथट झालेत? अरेच्या!! एका सर्व्हरचे होम पेज उघडते आहे. पण एच टी टी पी, आर डी पी, एफ टी पी काहीच चालत नाहीये. आले लक्षात. व्ही पी एन क्लायंटवरून सोर्स आय पी बदलून बघतो. दोन तास खटपट केल्यावर क्रॅक सापडत गेला. आता फक्त थोडेच क्षण आणि कदाचित त्यानंतर.... दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरमध्ये हेड लाईन--कॉसमॉस बँकेचा सर्व्हर हॅक होऊन ९४ कोटी लुटले.


वास्तुशांती ते मनःशांती

लेखक: देवू | प्रसिद्ध:
मित्राने त्याच्या गावी बऱ्याचदा येण्याचा आग्रह केला होता. एकतर त्याचे गाव बरेच दूर होते आणि हातात असलेल्या कामामुळे दोन ते तीन दिवस सुट्टी काढून जाण्याचा योग येत नव्हता. यावेळेस त्याच्या घराची वास्तुशांती असल्याने त्याचे आमंत्रण स्वीकारले. त्यानिमित्ताने ग्रामीण जीवन प्रत्यक्ष जवळून बघण्याचा अनुभव घ्यायला मिळणार होता. हातातील कामे थोडे जास्त वेळ काम करून पूर्ण केली. सकाळची सहाची बस पकडली आणि दुपारी दोन वाजता मित्राच्या गावी पोहोचलो. बस स्टॅन्ड पासून त्याचे घर चालत फार तर दहा मिनिटाच्या अंतरावर होते, तरीही मित्राने मला घ्यायला गाडी पाठवली होती.


ती व तो 2023

लेखक: भागो | प्रसिद्ध:
तो बहुराष्ट्रीय कंपनीत मनेजर होता तर ती एका राष्ट्रीय कंपनीत संगणकाशी छेडछाड करणारी होती. त्याचे लठ्ठ पॅकेज होते. फ्लॅट होता. लांबलचक गाडी होती. हुशार शोफर होता. अजून काय पाहिजे? तर सांगायचा मुद्दा असा की उणीव होती फक्त एक श्रीमती की कलावती की सेवा करे जो पति की ज़रुरत है ज़रुरत है ज़रुरत है. सेवा करे जो पति की? म्हणजे तिला काय तुम्ही नोकरांनी समजता? काय हे प्रतिगामी विचार! पण एकूण पॅकेज भारदस्त असल्यामुळे प्रतिगामी विचार चालवून घ्यायचे. ती!! तिचे “पॅकेज” “उंच, स्लिम आणि सौंदर्यपूर्ण” होते. त्या दोघांची भेट अश्याच कुठल्यातरी सेमिनार प्रसंगी झाली. कुठला सेमिनार? ते महत्वाचे नाही.


हिमाचल प्रदेश :कांगडा व चंबा सहल : भाग ७: डलहौसी परिसर

लेखक: गोरगावलेकर | प्रसिद्ध:
भाग ६ येथे वाचा काल अंधार पडल्यावर आम्ही डलहौसीला येऊन पोहचलो होतो. समुद्रसपाटीपासून साधारण ६५०० फूट उंचीवरील हे ठिकाण. सध्या अतिशय थंड तरीही खूपच आल्हाददायक वातावरण. ब्रिटिश वास्तुकला, सुंदर चर्च, पाइन्स ,देवदार, ओक, रोडोडेंड्रॉन. अशा अनेक वेगवेगळ्या वनस्पती असलेली दाट झाडी तसेच धौलाधर पर्वतरांगेतील उत्तुंग शिखरे हे येथील प्रमुख आकर्षण. १८४५ च्या अँग्लो-शीख युद्धानंतर पंजाबचे राज्यकर्ते युध्दाच्या खर्चाची नुकसानभरपाई ब्रिटिशांना देण्याबद्दल बांधील होते.


कळतं रे पण..

लेखक: प्राची अश्विनी | प्रसिद्ध:
कळतं मला पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, पहिलं पाऊल टाकायचं, दोघांकडून राहून गेलंय. कळतं आता तुझंमाझं उरलं नाही वेडं वय. येताजाता उचकी लागेल अशी आता कुठली सय? कळतं की भरतीनंतर ओहोटी ही येणारच, किती कुणी जवळ येवो दूर तर जाणारच.. तरीही, उठता उठताच आधी पहिला फोनकडे जातो हात, तुझ्या मेसेजशिवाय होते दिवसाची सुरुवात. स्टेटस, डीपी, पोस्ट, फोटो कुठंतरी तर भेटशील खरं? पण डिलिटलेल्या नंबरवर कसं कुणी दिसणार बरं? कधीतरी तर वाजेल रिंग समजावतं एक मन चोवीस तास उगाचंच हाताजवळ असतो फोन! ... सोडायचं म्हटलं तरी सवयी सुटता सुटत नाहीत; जीर्ण शीर्ण झाल्या तरी काही गाठी तुटत नाहीत..


शंभर अदाणी हवे आहेत…

लेखक: सुधीर मुतालीक | प्रसिद्ध:
...आमच्या शेतकऱ्यांना सरकारचा इथला एखादा निर्णय अमान्य असेल तर आमचे शेतकरी आणि आमचे सरकार काय करायचे ते बघून घेतील. शेतकऱ्यांना अगदी एखादे सरकार पसंत नसेल तर त्यांना ते सरकार खाली खेचायचा देखील नैतिक अधिकार आहे. पण इथल्या शेतकरी आंदोलनामध्ये काड्या घालणारे, ते भडकाविणारे आपल्या देशा बाहेरचे खलनायक होते हे अलीकडे लक्षात आले :टुल किट गॅंग ! महामारी नंतर तर आर्थिक दृष्ट्या सावरलेला भारत हा जगाच्या पाठीवरचा एकमेव बडा देश आहे. केवळ सावरलेलाच नाही तर आर्थिकदृष्ट्या उत्तम स्थिती असणारा आणि प्रगती करत असणारा.