माणसे हिमालयात जाऊन ,भारावून का जातात हे तिथे गेल्याशिवाय समजणं अशक्य आहे.
आम्ही 13000 फुटांवर जिथे गेलो होतो तिथे शांडिल्य ऋषींनी तप केलं होतं. जवळच सौरकुंड नावाचं एक कुंड आहे .7000 फुटांवर मानवी वस्ती नाही. रस्ते इथेच थांबतात.आता अधिक वर जायचं तर पाय वाटांवरूनच जायचं, त्याही निसरड्या आणि खड्या!इथले धनगर या 'वरच्या पहाडात' सात महिने मुक्काम ठोकून असतात.बरोबर हिमालयन शेळ्या मेंढ्यांचे कळपच्या कळप आणि भरीला घोडे आणि खेचरं!