Welcome to misalpav.com
लेखक: मुक्त विहारि | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

दोष माझा आहे... मी खूप दिवसांनी सुट्टीवर येत आहे... माझ्या मनांत होते... मी स्पा जवळ फक्त विषय काढला.. ठि़काण, वेळ आणि दिवस ,,, हे सगळे मी ठरवले आहे.. दोष द्यायचाच असेल तर मला द्या...

मी हे याचसाठी म्हणालो कारण, २५ तारखेला ठाण्यात आमरस-पुरीचा कट्टा करायचं खुद्द रामदास काकांनी ठरवलंय. त्यासंबधी सगळी जुळवा जुळव चालूय. आणि या कट्ट्याची कल्पना स्पासहीत आणखी काही मिपाकरांना दिलेली आहे. वेळ आणि जागा नक्की झाल्यानंतर धागा काढायचं ठरलं होतं. असो. कट्ट्याला शुभेच्छा!!

मध्यवर्ती मुंबईकरांनो.... कितीही कट्टे करा पण ठिकाण स्टेशनजवळ ठेवा. आम्हा खाचीकोपऱ्यातल्या मुंबईकरांची सोय बघा, अशी नम्र विनंती आहे.

ठाणे मध्यवर्ती मुंबैत येतं अशी मध्यंतरी ज्ञानात भर पडली होती, आता डोंबिवली पण यायला लागलं का?

ते वाक्य "....२५ तारखेला ठाण्यात आमरस-पुरीचा कट्टा करायचं..." या वाक्यावर लिहिले आहे. आणि सूड, शब्द जपून वापर... ठाणे मध्यवर्ती मुंबैत येत नाही, ठाणे हेच मध्यवर्ती मुंबै आहे.

या मेल्या स्पावड्याने राजकारण केलंन..!!
मा/श्री किसनजी शिंदे साहेबांना माझ्या (न) केलेल्या राजकारणामुळे जो त्रास झाला, याबाबत त्यांची मी जाहीर क्षमा मागतो, ते मोठ्या अंत:करणाने मला क्षमा करतीलच,यात शंकाच नाही .
५ तारखेला ठाण्यात आमरस-पुरीचा कट्टा करायचं खुद्द रामदास काकांनी ठरवलंय. त्यासंबधी सगळी जुळवा जुळव चालूय. आणि या कट्ट्याची कल्पना स्पासहीत आणखी काही मिपाकरांना दिलेली आहे. वेळ आणि जागा नक्की झाल्यानंतर धागा काढायचं ठरलं होतं.
यावरून तरी किसनजीना कल्पना यायला हवी होती कि, मुंबईच्या मध्यवर्ती भागात एवढा महाकट्टा आयोजित केलेला असताना म्या पामर डोंबिवली सारख्या खेड्यात कट्टा करण्याचा विचार तरी करू धजेन काय हॅ हॅ.. असो मुवि काका येथे येणार असून त्यांना मिपाकरांना भेटायची प्रचंड इच्छा आहे, त्यातूनच त्यांनी कट्ट्याचा प्रस्ताव मांडला. त्यांना मी ह्या प्रकारची पूर्ण कल्पना दिली कि म्हटलं अहो. डोंबिवली ठाण्यापासून तब्बल १७ किमी एवढ्या प्रचंड अंतरावर आहे, आणि मुंबईपासून तर अतिभयंकर ४८ किमी. कोणी येथे येणं कसं शक्य आहे? तुम्ही सरळ इथल्याच मेम्ब्रांना व्यनी करा , विषय संपवा. पण त्यांच्या उत्सुकतेने घात केला :D असो .. किसनजी शिंदे साहेबांची मी परत माफी मागतो. यापुढे त्यांना असा पत्रास होणार नाही, सदर घोषणेतून आमचे नाव वगळलेले आहे,सबब आम्हास कुठलाही व्यनी,करू नये मुवि काका , आपण भेटूच :) अवांतर : यापुढे उत्तर ,दक्षिण, पूर्व , पश्चिम, आग्नेय, वायव्य अशा मुंबईच्या दश दिशा , आणि मध्य (ठाणे) येथे आयोजित होणार्या सर्व कट्ट्याना आमच्या अनंत शुभेच्छा - खेडवळ स्पा

हम्म्म. बाकी आमच्या पुण्याचे कट्टे असे गाजावाजा करून ठरवत नसल्याने अशी ऐनवेळी तोंडघशी पडायची वेळ येत नाही.

चालायचंच , मुवि काकांना आला असेल आता अनुभव परत अशी चूक नाही करणार ते

सत्य सांगितल्यावर मीठ मिरच्यांचा मार खावा लागतो बरेचदा.

ओके हं बाळ, तुला बक्षीस देऊ हं आपण. तोंडघशी न पडण्याची इतकी मोठी achievement केल्याबद्दल. (तिऱ्हाईतांच्या कृतींनुसार आपल्या आयुष्यातले निर्णय न बदलणारा) विमे

मा श्री किसनचन्द्र साहेब (मिपाचे तरुण सळसळते आणि धमन्या फोडून ओसंडून वाहू पाहणारे रक्त इ इ ), राजकारण वगैरे असे घाणेरडे आरोप जाहीरपणे करण्यापूर्वी फोन उचलून एकदा बोलायची तसदी घेतली असतीत तर बरे झाले असते. कट्टा आहे की सरकारनामाची स्क्रिप्ट ??
२५ तारखेला ठाण्यात आमरस-पुरीचा कट्टा करायचं खुद्द रामदास काकांनी ठरवलंय
चाय से ज्यादा केटली गरम ???

बोलले असतील हो !! काय येवढं मनाला लावून घ्यायचं. आणि समजा बोललाच असेल मुद्दाम, पण आपण राजकारण केलेलं नाही तर मग असल्या प्रतिसादांकडे लक्ष का दया? लोक काय सतरा तोंडांनी बोलणार.* *मला माहितीये असले समजुतदारपणाचे प्रतिसाद शोभत नाहीत माझ्याकडून तरी जे वाटलं ते लिहिलं.

थट्टे ने बोलले असतील हो !! काय येवढं मनाला लावून घ्यायचं.
ठीक आहे, तू म्हणतोस तशी शक्यता आहे. मला थट्टेचा सूर कळला नसेल नीट.
आणि समजा बोललाच असेल मुद्दाम, पण आपण राजकारण केलेलं नाही तर मग असल्या प्रतिसादांकडे लक्ष का दया? लोक काय सतरा तोंडांनी बोलणार.*
असा पण तो आरोप माझ्यावर नव्हता रे. नाहीतर इतकेच बोलून थांबलो असतो का ?
मला माहितीये असले समजुतदारपणाचे प्रतिसाद शोभत नाहीत माझ्याकडून तरी जे वाटलं ते लिहिलं.
काय दिवस आलेत बघ रे ;-) पुण्याला जाऊन भलताच सुधारालास म्हणायचे. आजचा सुविचार :- यौवनं धनसंपत्ती प्रभुत्वमविवेकीता । एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ।।

>>यौवनं धनसंपत्ती प्रभुत्वमविवेकीता । एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम् ।। याचा अर्थ पण सांगा आमच्यासारख्या संस्कृत कळत नसणार्‍यांसाठी. ;)

असो, माझा वरील प्रतिसाद कृपया वैयक्तिक मानु नये. कारण मी त्यातुन फक्त सर्वसामान्य मिपाकरांच्या मनातील भावनांना शब्दरुप द्यायचा प्रयत्न माझ्या अल्पमतिनुसार केला आहे. चुभुद्याघ्या.

आणि मी तर ह्या वेळी जमल्यास (इंतर व्ह्यू आणि त्या अनुषंगाने येणारी इतर झंझटे नसतील तर) सगळ्या कट्ट्यांना हजेरी लावणार.. बायको गेली तेल लावत..

शुभेच्छा!! आम्हाला अटेंड करता येणार नाहीत असे कट्टे करायचं सगळ्या मुंबैकरांनी/ ठाणेकरांनी ठरवलंच असेल तर काय करणार. :)