Welcome to misalpav.com
लेखक: शिवोऽहम् | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

निर्वाणषटकातल्या या श्लोकाचा पाठभेद असाही आहे का? "अहं निर्विकल्पो निराकाररुपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां, न चासंगतं नैव मुक्तिर्न मेय: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् "

ठाऊक नाहीये. सदा मे समत्वं जास्त सयुक्तिक वाटत असावं असं वाटतं. 'न चासंगतं नैव मुक्तिर्न मेय:' चा नक्की अर्थ काय?

"न चासंगतं नैव मुक्तिर्न मेयः"
श्लोकात "मी" असा आहे याचे वर्णन आहे. बाकी सगळीकडे पुल्लिंगी विशेषणे इ. आहेत, सबब असंगतं च्या ऐवजी असंगतः असे पाहिजे असे वाटते. शिवाय "नैव मुक्तिर्न मेयः" मधल्या 'मेय' चा अर्थ लागत नाही. संधी इ. असेल असेही वाटत नाही. अजून इकडेतिकडे पाहतो/विचारतो, पण सकृद्दर्शनी तरी हे चूक वाटतेय.

छान लेख .... लहानपणी राजीव गांधींची हत्या झाली होती तेव्हा एक अनामिक भय सार्‍या घरावर दाटून आले होते .. आईने लहानग्यांना कुशीत घेतले होते ..आणि सर्वांना मारणारा कोणी आपल्या जातीचा असेल तर पुढे काय ?? असा प्रश्न पडला होता ...भीतीचे ते सावट आठवला की अजूनही अंगावर काटा येतो ..

तुमचा आठवणींचा पसारा वाचतांना गालिच्याखाली सरकवून (न विसरलेले पण) सहजपणे न आठवणारे बरेच काही परत पुढे येत आहे... लिहीत रहा.

तुमचा आठवणींचा पसारा वाचतांना गालिच्याखाली सरकवून (न विसरलेले पण) सहजपणे न आठवणारे बरेच काही परत पुढे येत आहे... लिहीत रहा. असेच काहीसे म्हणायचे होते, ते इस्पिकचा एक्का ह्यांनी नेमक्या शब्दात व्यक्त केले आहे. स्वाती

या सगळ्या लिखाणाला कुठलं विशेषण वापरू तेच कळत नाही. यात सगळ्याच भावनांचा आपलासा वाटणारा असा पसारा आहे.

शिवोऽहम्, उत्कृष्ट लेखन आहे. आठवणी अडगळीतील असूनही धगधगत्या आहेत हे जाणवतेच. असेच आणखी वाचायला आवडेल. अवांतर : वर तुम्ही लिहीले आहे त्याप्रमाणे मी देखील "न चासंगतं नैव मुक्तिर्न मेय: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् " हेच सदैव वाचले आहे.

लेख फार वाचनीय आहे. 'history is bunk ' असे हेनरी फोर्ड म्हणाला होता. मी या वचनाशी सहमत नाही. आपल्या समोर प्रत्यक्ष घडणार्या गोष्टींचा अर्थ इतिहासाच्या ज्ञानामुळे आपल्याला जास्त लक्ख समजतो असे माझे मत आहे. गांधी वध, इंदिरा गांधींचे मरण आणि राजीव गांधी यांच्या हत्येच्या वेळी आपण कुठे होतो आणि काय करत होतो याची आठवण झाली. इंदिरा गांधींच्या वधा नंतर सापडेल त्या शिखाची हत्या करण्यात आली व त्या समुदायाचे होईल तेवढे नुकसान करण्यात आले. महाराष्ट्रात मात्र गांधी वधा नंतर एका विशिष्ट समाजाच्या लोन्कांच्या स्थावर संपत्तीचे नुकसान झाले आणि काही कुटुंबाना परागंदा व्हावे लागले होते परंतु त्यांना शारीरिक इजा केली गेल्याचे वाचनात नाही. याला 'सिल्वर लायनिंग टू ए डार्क क्लाउड' -असे म्हणावे काय ?

तशा तुरळक घटना घडल्या होत्या. माहितीतल्या एका कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे डोळे काढले होते, ते हिंदु महासभेशी निगडित होते असे मला समजले. त्यापुढे अनेक वर्षे जगले.

तुमच्या लिखाणाने अस्वस्थ दशकाची डायरी आठवली

तुम्हाला असं एका लाईनने जाता येणार नाहीच. बरेच फाटे फुटत आणार आहेत. तो सगळा काळ तुमच्याबरोबर परत जगत आहे. धार्मिक आणि जातीय दंगली सरकारतर्फे स्पॉन्सर्ड हे फार भयानक आहे. आणि स्वतःचा थोड्या काळासाठीचा स्वार्थ साधण्यासाठी राजकीय पुढारी भाडोत्री गुंडांकडून हे घडवून आणतात हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. शीख समाज या सगळ्यातून परत उभा राहिला आणि तोही फार कडवटपणा न ठेवता हा त्यांचा चांगुलपणा. म्हणूनच शीखांबद्दल सर्वांना प्रेमच वाटतं. निष्पाप नागरिकांना मारणे हे केव्हाही वाईटच पण आता नरेन्द्र मोदींना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणारे आपला हा नजीकच्या भूतकाळातला इतिहास निर्लज्जपणे विसरतात हे जास्त दु:खद आहे. सगळ्यांचेच हात काळे आहेत.