Skip to main content

आस्वाद

विठू सांगे...

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 18/07/2008 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
आषाढाचा मास । दर्शनाची आस । होती तुझे भास । पांडुरंगा । । साठवावे नेत्री । भक्तीचिया गात्री । दिवसा नि रात्री । रूप तुझे । । खोवलेला शिरी । तुरा हा मंजिरी । वसतो पंढरी । विठू राया । । भिवरेच्या तिरी । उभा विटेवरी । कर कटेवरी । ठेवोनिया । । काळा नि सावळा । प्रेमाचा पुतळा । मनाचा निर्मळा । पांडुरंग । । नामयाचा घास । घेऊनिया खास । जागवली आस । भक्तीयोगे । । घेऊनी वळण । दळितो दळण । करितो राखण । जनाईचे । । तुकोबाचा भार । घेई शिरावर । परि गुन्हेगार । आवलीचा । । काय त्या म्हणावं ? देव की मानव । कोणाला कळाव ?

कार्यालय

लेखक विनोद इन्गळे यांनी बुधवार, 16/07/2008 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
इथे पहायला मिळतात नमुने एकाहून एक भारी फरार झाले अधिकारी मोकाट कर्मचारी कुणालाही राहिल नाही कुणाचही भय काम कोणी करत नाही तरी कार्यालय

मिसळ

लेखक गणा मास्तर यांनी मंगळवार, 15/07/2008 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो. misal

एप्रिल फळ (९)

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 14/07/2008 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
या पूर्वीचे दुवे http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५) ; http://misalpav.com/node/1480 एप्रिल फळ (६) h

"चला, गाणं शिकुया, समजून घेउया!" - भाग १

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 11/07/2008 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, शीर्षक वाचून दचकलात ना? :) पण घाबरू नका, मी काही इथे आपल्याला गाणं शिकवण्याकरता आलेलो नाहीये कारण मी स्वत:च अजून एक विद्यार्थी आहे. आणि म्हणूनच माझ्या लेखाचं शीर्षक मी, 'चला गाणं शिकवतो, समजावतो!' असं न देता 'चला, गाणं शिकुया, समजून घेऊया!' असं दिलं आहे! :) असो..! एक गोष्ट नमूद करू इच्छितो ती अशी की इथे मी गाण्यातल्या काव्याविषयी, त्याच्या चाली/संगीताविषयी न बोलता ते गाणं कश्या रितीने गायलं गेलं आहे या विषयावर बहुत करून बोलणार आहे. प्रत्येक गाण्याला एक गायकी असते. मी त्या गायकीविषयी बोलणार आहे.

छंदोमयीतील भावनर्तन!

लेखक अशोक गोडबोले यांनी शुक्रवार, 11/07/2008 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
'वादळवेल' या कुसुमाग्रजांच्या कविता छंदोमयी या काव्यसंग्रहात १९८२ मध्ये प्रसिद्ध झाल्या. यातील ८१ कविता नाशिकच्या परिसरातील पुण्यसलिला गोदावरीला त्यांनी अर्पण केल्या आहेत. रचनेच्या दृष्टीने या संग्रहात वैविध्यपूर्णता आली आहे, पण विषयाच्या दृष्टीने मात्र आधीच्या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या वळणापेक्षा वेगळे वळण या कवितेने घेतले आहे अस मात्र दिसत नाही असे डॉ उषा देशमुख ह्यांनी म्हटले आहे. परंतु माझ्या मते येथे आत्ममग्न वृत्तीचे वेगळेपण ठळकपणे जाणवते. कसाला लागला आहे येथे अंतस्थ वीणेचा विषण्ण सूर! आकाश व माती यांच्या नात्याचा शोध हा कुसुमाग्रजांच्या काव्यप्रतिभेला लागलेला छंद.

एप्रिल फळ (८)

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 11/07/2008 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
या पूर्वीचे दुवे http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५) ; http://misalpav.com/node/1480 एप्रिल फळ (६)

उगीच अबोला ---

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 10/07/2008 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
उगीच अबोला उगीच भांडणे अशीच गेली संध्याकाळ वाळूवरती रेघा मारीत उगीच दवडला आपुला वेळ दोनच घटकेचे हे यौवन त्यातही आपुले केवळ दो क्षण सखे भांडणे हवीत थोडी प्रेमाची पण केवळ दो क्षण सखे नदी ती पाहतेस ना ओढीने बघ वहात जाते सागराच्या कुशीत शिरूनी शांत होउनी मिसळून जाते एकरूपता अशी पाहीजे दोन जीवांची दोन मनांची भेटही आपुली अशीच व्हावी असेल जरी ती दोन क्षणांची
Taxonomy upgrade extras

अखेर धमाल्याचं 'वाजवा रे वाजवा' वाजलं! :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 08/07/2008 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी, आज सकाळीच शिवाजीनगर स्टेशण (भें.. शुलेची ऐशीतैशी!) व परिसरात 'मुंबईहून कुणीतरी बडी असामी येणार आहे बॉ!' अशी लोकांची चर्चा चालली होती. कारण डॉक्टर दाढे आणि पेठकर आपापल्या गाड्या घेऊन महामहीम तात्यासाहेब अभ्यंकरांना प्रेमाने उतरवून घ्यायला आले होते. हां, आता आपण आपलं स्वत:ला महामहीम वगैरे म्हणून घ्यायचं, अहो पण कसला आलाय डोंबलाचा महामहीम? या दीडदमडीच्या तात्याला त्या शिवाजीनगगर फलाटावरचं कुत्रंदेखील ओळखत नव्हतं! :) तर ते असो.. ! ठरल्याप्रमाणे पेठकरशेठ, तात्या अन् डॉ प्रसाद दाढे काटा किर्र् मध्ये मिसळ खायला गेले. मिसळ बाकी खरोखरंच फसकिल्लास होती.