Skip to main content

लेख

" अचानक"

लेखक कैलास गायकवाड यांनी शुक्रवार, 30/08/2013 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
मी रात्री अमुक करत होतो.टी.व्ही.वर अमकं-ढमकं लागलं होतं. अमकं -ढमकं ऐन रंगात आलं होतं... आणि अचानक लाईट गेले . असं काही वाचलं की माझं डोकंच सणकतं. अचानक लाईट गेली म्हणजे काय्?लाईट काय पूर्वकल्पना देवून जाते?की शनवारी मी ८.३२ ला जाणार आहे.मग लिहीणारा ''अचानक'' शब्द वगळून लिहेल की रात्री ८.३२ ला टाटा म्हणून लाईट गेली. आपल्या भाषेच्या अशा काही गमती जमती मजेशीर वाटतात...मात्र काही वेळा काही प्रकार वाचून डोकं ठणकायला लागतं .( मघाशी सणकलं होतं....आता ठणकलं ) उदा...--- घरी आल्या आल्या मी अंगातला शर्ट काढून हँगरला लावला. ( शर्ट अंगात असतो की अंग शर्टात ? ) --- पायात चप्पल घातली .

४ निमिष, ३९ क्षण - अग्निसराव

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 28/08/2013 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या संस्थेत (कंपनी) अग्निसराव (फायर ड्रील) नुकताच पार पडला, त्यातील एकूणच अनुभव इथे मांडत आहे. लेख मुद्दामच पूर्ण मराठीत लिहित आहे, काही शब्दांना कंसात पर्यायी आंग्ल शब्द लिहिले आहेत. या लेखातील नावे / व्यक्ती काल्पनिक आहेत, कुणाचा संदर्भ जुळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.   आमच्या संस्थेत सहामाही अग्निसराव असतो, या सरावात मी एक सहायक/अधीक्षक (फायर वॉर्डन) म्हणून काम करतो. मागल्या वर्षी देखील मी हे काम केले होते.

जोवरी हे जग, जोवरी भाषण - २ : पार्श्वभूमी

लेखक तिरकीट यांनी रविवार, 25/08/2013 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
गीतरामायणाची मूळ संकल्पना सीताकांत लाड यांची. १९५५ साली पुणे आकाशवाणीमध्ये सहनिर्देषक म्हणून काम करत असलेल्या लाड यांनी ही कल्पना गदिमांना बोलून दाखवली. गीतकार म्हणून ग. दि. माडगुळकर आणी संगीतकार म्हणून सुधीर फडके या द्वयीची निवड करण्यात आली. तिघांच्या चर्चेतून 'गीतरामायण' हे शीर्षक ठरले. गुढीपाडव्याला सुरुवात करून आठवड्याला १ याप्रमाणे ५२ गीते पुणे आकाशवाणी वरून सादर करण्याचे ठरले.

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१)

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 23/08/2013 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१) 

४ आकड्यांचा प्रवास...

लेखक नि-अ-पाटणकर यांनी शुक्रवार, 23/08/2013 07:35 या दिवशी प्रकाशित केले.
४ आकड्यांचा प्रवास... ऱेल्वेचा प्रवास हा माझा तसा आवडता प्रवास. तशी कारण बरीच आहेत तिथे मिळणारी मोकळीक, झोपायला मिळणारा बर्थ वगैरे वगैरे. काही छोटे त्रास पण आहेत पण त्यात माझ्या कुंडलीचा दोष आहे रेल्वेचा नाही. काही गोष्टी नेहमी ठरलेल्या असतात, मी आज पर्यंत शेकडो वेळा प्रवास केला असेल पण कधीही सुरवातीपासून म्हणजे बुकिंग केलेल्या दिवसापासून मला कन्फर्म सीट मिळालेली नाही, अगदी २ - ३ महिने आधी बुकिंग केले तरीहि माझा नंबर वेटिंगमध्येच येतो. मग त्यादिवशी आधी तो चार्ट शोधा, चार्ट नाही सापडला तर तो TC शोधा, आपल्या बोगी पासून आपण १० डब्बे लांब आहे म्हणून पळापळ करा.

क्लोंडायक (Klondike) गोल्ड रश - भाग ११

लेखक किलमाऊस्की यांनी गुरुवार, 22/08/2013 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखमालिकेतील हा शेवटचा भाग. त्यानिमित्ताने थॊडंसं मनातलं.... क्लोंडायक गोल्ड रशची गोष्ट मी जेव्हा ऐकली त्यानंतर कित्येक दिवस या गोष्टीने मला वेड लावलं होतं. मिसळपाववर ही गोष्ट लिहायला घेतल्यावर तर मीच या प्रवासाचा भाग बनत गेले. कित्येकदा स्टँपेडर बनून मी कल्पनेतच गर्दीच्या जहाजात घुसण्याचा प्रयत्न केला, तर कधी व्हाईट पास, गोल्डन स्टेअर्स पार केल्यात. सोनं न मिळाल्यावर स्टँपेडर्स इतकीच निराशा मी अनुभवली. मीही अनेकदा या सफरीवर सोनं मिळण्याची स्वप्न पाहीली. सध्या सिअ‍ॅट्लमधेच असल्याने अनेकदा गोल्डरशच्या खाणाखुणा शोधण्याचा वेड्यासारखा प्रयत्न केला.

डस्ट इन द विंड

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 21/08/2013 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
काही माणसांची एखादी सवय, एखादा विचार मनात कायमचं घर करून राहतो. या व्यक्तीचंही असंच होतं. 'होतं' म्हणताना वाईट वाटतंय, कारण त्याचं जाणं अगदीच अनपेक्षित होतं. आमच्या बाजूच्या कॉलनीत हा भाजीवाला गेले अनेक महिने भाजीची गाडी लावायचा. जाहिरातींवर कोट्यावधी खर्च करूनही मोठाल्या दुकानात चार दोन टकलीच फिरकतात अशा काळात याच्या भाजीच्या गाडीवर संध्याकाळी तो असेस्तोवर सतत गर्दी असायची. सेल, डिस्काउंट ही गर्दीची कारणं नव्हती. त्याचे युएसपी होते, त्याचा हसरा चेहरा, अगत्य, आपुलकी, आणि त्याने जपलेलं एक सात्विक माणूसपण.

यात्रा जत्रा काल आणि आज

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी सोमवार, 19/08/2013 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
जम्मू मधील सैन्य छावणीत (Caluchak) एक रात्र राहण्याचा योग २००२ साली आला होता. तेथील सर्व धर्म पार्थना स्थळ विशेष लक्षात राहिले ते तेथे भेटलेल्या एका धर्मगुरू मुळे. आज उत्तराखंड मधील आपत्ती नंतर त्यांची पुन्हा आठवण झाली. आमच्या अमरनाथ यात्रेला शुभेच्या देताना त्यांनी जे प्रबोधन केले तसे प्रबोधन भारतातील कोणी धर्मगुरू करेल का? काय सांगितले होते त्या अवलियाने ? भारत हा यात्रेकरूंचा देश आहे , प्रसार माध्यमे जेव्हा उपलब्ध नव्हती तेव्हा या यात्रांना खूप महत्व होते. या यात्रा म्हणजे समाज जोडण्याचे एक महत्वाचे साधन होते. संत महंतांनी संपूर्ण देशाची परिक्रमा करून का देश जोडला होता.

कपिल व गांगुलीने निवडलेले एकदिवसीय क्रिकेटचे भारताचे सर्वकालीन सर्वोत्तम संघ

लेखक श्रीगुरुजी यांनी शनिवार, 17/08/2013 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
भारताचा महान अष्टपैलू खेळाडू कपिलदेव याने नुकताच त्याच्या मतानुसार एक-दिवसीय क्रिकेटमधील भारतातील सर्वकालीन सर्वोत्तम १२ खेळाडूंचा संघ निवडला. त्याच्या सर्वकालीन सर्वोत्तम एकदिवसीय संघात खालील खेळाडू आहेत. धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सचिन, सेहवाग, गांगुली, कोहली, अझरूद्दीन, युवराज सिंग, झहीर खान, श्रीनाथ, हरभजन, कुंबळे, रविंद्र जडेजा (१२ वा खेळाडू) त्याच्यापाठोपाठ गांगुलीने देखील स्वत:च्या मताने भारताचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघ निवडला.