Skip to main content

कथा

अपघात - एका नव्या ट्रकचा

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 04/07/2021 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज सुरेवारसिंग ट्रकलोड घेवून मध्यप्रदेशातल्या सतना या गावी जायचे होते. नवी मुंबई ते सतना या प्रवासासाठी त्याने मनाची तयारी काल दुपारीच केली होती. साधारण चार दिवसाचा एकूण प्रवास होणार होता. इकडून काहीतरी केमीकल फिल्टर प्लांटचे मशिनरी घेवून तिकडे एका फॅक्टरीत अनलोड करायचे अन तिकडून इंदूरपर्यंत अनलोड येवून इंदूर जवळच्या पिथमपूरहून बजाज टेंम्पोमधून सामान घेवून ते चाकणला उतरवून परत नवी मुंबई. त्याच्या अनुभवाने एखादा दिवस जास्तच लागणार होता हे त्याला जाणवले होते. घरी किरकोळ किराणा सामान अन मुलीसाठी खाऊ घेवून तो काल दुपारीच लवकर घरी आला होता. रात्री आराम करून तो सकाळी उठला.

आभाची सायकल फेरी

लेखक Bhakti यांनी शनिवार, 03/07/2021 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळच आकाश तांबूस झालं होत.पाखर घराकडे झेपावत असतांना त्यांचे पंख त्या तांबूस आकशात एखाद्या उडणाऱ्या सावलीसारखे भासत होते.इवलाश्या खिडकीतून आभा हे सगळ निरखून पाहत होती.शेवटच गणित सोडवून कधी सायकल घेऊन मस्त चक्कर मारायला जाते इतकी उताविळ ती झाली होती.झाल एकदाच गणित सोडवून स्वत:शीच बोलत आभा पटकन “आई मी येते चक्कर मारून”अस बोलून ती खाली पोहचली सुद्धा.सायकल सुसाट चालवत ती मुख्य रस्त्याला पोहचली.थोड अंतर गेलं कि उजव्या वळणावर वळाली. आता नवीनच ट्रक झाला होता.तशी इथे पूर्वी शेती होती.पण आता मोकळे प्लॉटस पाडून इथे विक्रीसाठी होते.

भारतीय टायटॅनिक - एस. एस. रामदास

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 27/06/2021 02:46 या दिवशी प्रकाशित केले.
१७ जुलै १९४७ या दिवशी एस. एस. रामदास ही बोट रेवसजवळच्या काशाच्या खडकाजवळ उलटली. या दुर्घटनेबाबत अनेक लोकांना म्हणावी तेव्हढी माहिती नाही. त्याबद्दल थोडंसं - एस. एस. रामदास ही बोट सिंदीया स्टीमशिप कंपनीच्या मालकीची होती. ही कंपनी मुंबई पासून गोव्यापर्यंत कोकणाच्या वेगवेगळ्या बंदरांपर्यंत प्रवासी वाहतूक करत असे. दुसरं महायुद्ध संपल्यावर ब्रिटीश - भारतीय नौदलाकडून घेतलेल्या ८ - १० अजस्त्र बोटी या सिंदीया स्टीमशीप कंपनीच्या मालकीच्या होत्या. यापैकीच एक म्हणजे एस. एस. रामदास. १९३६ साली बांधलेली ४०६ टन वजनाची ही बोट तीन मजली - तीन डेक असलेली - होती.

लेखक एस.बी यांनी शुक्रवार, 25/06/2021 02:33 या दिवशी प्रकाशित केले.

अनाकलनीय

लेखक Pradip kale यांनी बुधवार, 23/06/2021 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
सुरूवात कुठून करावी कळत नाहीये. परंतु हे सगळं जे माझ्या बाबतीत घडतयं याची नोंद हवी. त्यापेक्षाही महत्वाचं हे कुणाला तरी सांगायला हवं, पण ऐकल्यानंतर समोरच्याने समजून घेण्यापेक्षा वेड्यात काढण्याचीच शक्यता जास्त. म्हणून हे लिहुन ठेवायचं ठरवलं आहे. पण खरंच नक्की सांगायचं कुठुन; कारण याची सुरुवात कधी झाली ते माहीत नाही. की...? माझ्या बाबतीत असं घडतंय हे मला समजलं तेव्हापासून सांगु? खरंतर तुमचा विश्वास बसणार नाही, माझाच बसला नव्हता.पण शेवटी हे सगळं माझ्याच सोबत घडतंय, आणि पुन्हापुन्हा घडतंय.

"वैरी भेदला" या विनोदी वगनाट्याचे ई पुस्तकाचे आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशन

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 20/06/2021 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/vairi_bhedala_sachin_bora… येथील मुख्य पानावर "वैरी भेदला" हे विनोदी वगनाट्य असलेले माझे ई पुस्तक आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशीत झालेले आहे. सदर पुस्तक हार्डकॉपी स्वरूपात 2017 सालीच अमिगो पब्लिशरतर्फे प्रकाशीत झालेले होते.

पॅकेज असतं रे

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 17/06/2021 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
“समोशात साखर टाकली का रे?” पहिला घास घेताच निखिल ओरडला. “नाही साहेब बटाटे गोड आहेत. नवीन बटाटे पूर्ण तयार व्हायच्या आधीच मार्केटात येते. ते गोड राहते.” “पण समोशाची चव बिघडते ना.” अपरिपक्व बटाट्यामुळे त्याचा मूड गेला तशीही त्याला Too much Too early ची खूप चीड होती. समोशाची प्लेट तशीच ठेऊन तो अक्कलकोटकडे निघाला. तो अधूनमधून देवस्थानाला भेट देत असतो. देवाच्या पाया पडणे तर होतेच पण त्याचा विश्वास होता अशा ठिकाणी नवीन आवाज सापडतो, असा आवाज ज्यावर शहरातल्या सुगम संगीत विद्यालयाचे संस्कार नाही. गाताना उगाच ताना नाही की गरज नसताना उंचावलेला सूर नाही.

सेनापती, सावरकर आणि रसगोलक, अर्थात बॉम्ब

लेखक मनो यांनी सोमवार, 14/06/2021 02:52 या दिवशी प्रकाशित केले.
खरडफळ्यावर सेनापती बापट यांच्याविषयी विजय तेंडुलकरांनी लिहिलं होतं, त्याचा उल्लेख केला, आणि त्या निमित्तानं हे आठवलं ते एका धाग्यात टाकतो आहे. १९०७ सालच्या उन्हाळ्यात अचानक लाला लजपतराय याना अचानक हद्दपार करण्यात आले, त्यावेळी लोकमान्य टिळक सिंहगडावर होते. परत पुण्याला आल्यावर डोक्यावरची पगडी डाव्या हाताने खुंटाळ्यावर ठेवत आणि उजव्या हाताने अंगरख्याचे बंद सुटेनात म्हणून ते तोडून काढत खवलेल्या सिंहाप्रमाणे ते म्हणतात, "लालाजींसारखा देशभक्त हद्दपार होतो, आणि लॉर्ड मिंटो अजून कसा जगतो?" पण किंचित थांबून विवेकशक्तीने देश-काळपरिस्थितीचा मध्यबिंदू छेदून हलक्या स्वरात पुढे म्हणतात ...

आरसा (भाषांतर)

लेखक स्मिताके यांनी गुरुवार, 10/06/2021 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी मी या कथेवर आधारित एक शशक लिहिली होती. त्याच संपूर्ण कथेचं हे भाषांतर. मूळ कथा : The Mirror by Catulle Mendes *** आरसा त्या देशात मुळी आरसेच नव्हते. किती शोधले, तरी अगदी औषधाला सुद्धा सापडले नसते. राणीची आज्ञाच होती ना, "तोडून टाका ते आरसे. फोडून अगदी बारीक चुरा करून टाका. कोणाच्या घरात एक एवढासा तुकडा जरी सापडला तर याद राखा. घरातल्या सगळ्यांना हाल हाल करून मारून टाकीन." यापुढे कोणाची काय बिशाद, आरसे बाळगायची! कसली ही विचित्र आज्ञा! हं.. त्यामागे एक रहस्य दडलं होतं.. राणी अतिशय कुरूप होती. पाहणाऱ्याचा भीतीने थरकाप होईल, इतकी कुरूप.

एका आईचा सूडाग्नी (कथा परिचय : २)

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 10/06/2021 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
विदेशी कथा परिचयमाला भाग १ इथे ... युरोपमध्ये लघुकथांची परंपरा खूप जुनी आहे. एकोणिसाव्या शतकात तर ती अगदी बहरली होती. तेव्हाच्या कथालाटेत अनेक कथाकारांनी ताकदीचे लेखन केले. बिगर इंग्लिश लेखकांतले दोन नामवंत कथाकार म्हणजे फ्रान्सचे गी द मोपासां ( Maupassant) आणि रशियाचे चेकॉव्ह ( Chekhov). त्यांच्या एकाहून एक सरस कथांनी वाचकांच्या मनावर अधिराज्य केले.