Skip to main content

कविता

दर्शनता!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 05/11/2014 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
दर्शनतेचा प्रत्यय यावा अशी लेखणी चालावी, सहजाच्या अलगद वार्‍याने रूपातुनं ती बोलावी. सांगायाचे जे जे असते शब्दातुनं ते समजावे, काव्य जरी ते ना ठरले तरी अर्थातुन ते तोलावे. विषय शब्द तो साचा साधा प्रतिमांची बळंजोरी नको, माळेची गुंफण असू दे ती करं-कचलेली दोरी नको. कुणी म्हणो तिज काव्य/मुक्तिका कुणी म्हणो तिज रचना ही, कुणी म्हणो तिज शेरं-शायरी कुणी म्हणो तिज काहिही! काव्याचे हे मर्म असे की भिडल्या वाचुन मुक्ति नव्हे! भिडण्यास्तव ते करता यावे अशी कोणती युक्ति नव्हे!!! काव्याच्या या शाळेमधला कायमचा मी विद्यार्थी, कळले इतुके जितुकी झाली शाळा माझी त्या अर्थी. धडा कधी हा संपत नाही कैसे
काव्यरस

बरळप्रहरी..

लेखक गवि यांनी बुधवार, 05/11/2014 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
हातात आहे ग्लास आणि सर्वकाही सत्य आहे बहरत्या या बरळप्रहरी सर्वकाही शक्य आहे फेसाळती शाम-ए-गझल अन बेगडीसा सूर आहे आज सच्ची काहीबाही वाहवाही शक्य आहे अधभरा अन अधरिकामा जीवनाचा जाम आहे याच प्रहरी भाडखाऊ फलसफाही शक्य आहे और जामे-आरजू गर मुठ्ठिमध्ये घट्ट आहे बाकी सारे मिथ्य कहेना या प्रवाही शक्य आहे यकृताच्या गाळणीला कुछ पलांचे काम आहे याचवेळी काव्य काही अर्थवाही शक्य आहे

शब्द

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 05/11/2014 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या बोलण्यातले शब्द तोंडून बाहेर पडताच गोठून गेले... माझ्या कानात अजून ते गुंजतात अगदी झाडावरल्या ताज्या गुलाबासारखे... मला नकळत माझा त्यांना स्पर्श होतो तू जवळ असतांना तुझा हात हाती असतो तसा

चांदणी

लेखक सुर्या गार्डी यांनी मंगळवार, 04/11/2014 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच.. चंद्रकोरीच्या मिठीत मिलनाची आस असायचीच... बघेल सारं जग आपल्याकडे याची तमा कशाला बाळगायची... चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच... रोज रात्री चांदणी चोरुन चांदोबाला पहायची... चंदाराजाचं लक्ष्य नाही म्हणून सारखीच रुसायची... तरीही चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच... रुसता रुसता एखादी मधूनच चमकायची अन् चांदोबाचं लक्ष्य स्वतःकडे वेधायची... कारण चांदणीला चंद्राची ओढ लागायचीच...
काव्यरस

आजोबा...!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 03/11/2014 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
आजोबा जर कागद असते तर त्यानं त्यांची नाव केली असती आजोबा जर डोंगर असते तर त्याने खोल उडी घेतली असती आजोबा अंगणात उभे असले की त्याला चक्क झाड वाटतात हाताच्या फांदीला लोंबकाळलं की आजोबा चक्क झोका होतात झोका घेताना तो कधीच घाबरत नाही डोळे मिचकावून बघितले की भीती कसली वाटत नाही …. आजोबा काही काम करताना करतो त्यांचं लक्ष विचलित घुसळतो अंग नि अंग हलकेच घुसतो मिठीत .... आजोबांना वाटून जाते तो .म्हणजे .. मी आहे ...? का … मी म्हणजे…. तो आहे .....?? मग फुटून जातो मायेचा पाझर आजोबांच्या काळजातून .... आणि आजोबा बघू लागतात मायेच्या पाझरणा-या झ-याला आपल्याच रक्तातून …!! प्रकाश

गजरा

लेखक सुर्या गार्डी यांनी रविवार, 02/11/2014 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
नाजूक रेशीमगाठीनी फुला फुलां ना गुंफिले होते तुझ्यासाठीच फुलांनी आयुष्य वेचिले होते ।। ठाऊक त्यांना आयुष्य त्यांचे क्षण भंगूर होते परी केसांवरी तुझ्या झुलायचे भाग्य थोर होते ।। भाग्य कुणाचे कुणी जाणिले,ललाटावर लिहीलेले तुझ्यासवे फिरायचे ते दिवस फुलांच्या गजर्‍याचे होते । नशीबाने ना साथ दिली फुल होऊनी फुलण्याची गजर्‍यात गुंफूनी झुलण्याची केसांवरी तुझ्या झुलूनी सौदर्य तुझं खूलवायची । नशिबाला ही ते उशीरा कळले फुल होउनी फुलायचे होते गजर्‍यात गुंफूनी झुलायचे होते आयूष्यच माझे गजर्‍यात गुंफायचे होते ।। »» सु

तसे देव मोकळेच असतात..!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 28/10/2014 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या देव एकटेच असतात काल सहज त्याची आठवण आली तिला आणि ती अशी येथे दूर ...दूरदेशी आणले तिने जुजबी देव नाही असे नाही लंगडा बाळकृष्ण एकटाच घरी सोबत विठ्ठल रुखमाई आणि शंकराची पिंड त्याच्या समोर नंदी तेवढीच एकमेकाची एकमेकाला सोबत नाही असे नाही रात्रीच्या अंधारात त्याना दिसणार मात्र काहीच नाही कालच कशी कुणास ठाऊक आभाळातील ढग बघून तीही उदास ,खिन्न आणि आली आठवण देवाची दिसून गेले उदास देवघर किती दिवस प्रसाद सोडा किती महिन्यात त्याना कोणी आंघोळ देखील घातली नाही कसे करमत असेन त्यांना..?

मित्रा

लेखक तुषार जोशी यांनी गुरुवार, 23/10/2014 13:16 या दिवशी प्रकाशित केले.

मित्रा
.
मित्रा मी पहिला श्वास घेतला
तेच महानगरात
आणि.. तू पहिला श्वास घेतलास
गावात... शेतात.
मग मी कधीतरी शब्दांच्या प्रेमात पडलो
तसाच तू ही या शब्दांच्या प्रेमात पडलास
आता मी माझ्या शब्दांमधे
महानगर ओततोय 
आणि तू गाव ओढे आणि शेते.
मी कधीतरी एखादी 
रानाची, पानाची शेताची कविता लिहेनही
पण तिच्यात तितका दम नसेल
तो उत्कटपणा नसेल जो तुझ्या कवितेत सापडेल
तू ही कधी शहर लिहिलेस
तर तितके खोल उतरणार नाही.
पण मला तुझ्या रानातल्या कविता हव्या आहेत
मला कदाचित कधीच न मिळणारे काही अनुभव
मी तुझ्या शब्दांच्या सफारीत अनुभवेन

ज्याचे त्याला कळले

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 19/10/2014 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
शिलेदार धारातीर्थी बालेकिल्ले ढळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले तरातरा निघालेले पुन्हा मागे वळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले बेघर होतील आता जे पंधरा वर्ष रुळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले पीळ बघूया जाईल का सुंभ मात्र जळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले शुभ्र कपड्यांमागचे रंग खरे उजळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले आहे नव्याची आशा संकट परी ना टळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले मतदाराचे कौतुक की कर्तव्य त्याला कळले कोण किती पाण्यात आहे ज्याचे त्याला कळले - अ ज ओक

प्रेमही जरुरीपुरतंच करावं...

लेखक अजब यांनी गुरुवार, 16/10/2014 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमही जरुरीपुरतंच करावं... सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून जास्त करत गेल्यास त्यची सवय होते आणि ती वाढत वाढत जाऊन शेवटी त्याचं व्यसन होतं... व्यसन कोणतंही वाईटच... आधी ज्या गोष्टीचं व्यसन, त्याची तल्लफ येते, मग हळूहळू त्याची अधिकाधिक मात्रा आवश्यक वाटते न मिळाल्यास विथड्रॉवल सिम्प्टम्स आणि सर्वांत भयानक म्हणजे एका व्यसनासोबत अनेक व्यसनांची आधी चटक आणि मग सोबत... प्रेमही जरुरीपुरतंच करावं... सोयीचं आहे, आवडीचं आहे म्हणून आहारी जाऊ नये...