Skip to main content

कविता

गंध तुझे

लेखक सार्थबोध यांनी शुक्रवार, 26/12/2014 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
ये जरा भेटायला, घे ओंजळीतले फुल माझे गंध सेवण्या तयाचा, काय सांग जाते तुझे ll १ ll कळ्या पाकळ्या लाजतील, येता तुझ्या हातावरी मृदू पाकळ्या केसरांस, जरा जडू दे गंध तुझे ll २ ll या किनारी वाळूवरी, पुसती जरी साऱ्या खुणा तू अशी साथ असता, पौर्णिमेचा रंग सजे ll ३ ll सखे ग सहवास तुझा, रंगतो निळया लाटांपरी पुन्हा होईल भेट तोवरी, लाट वाहील काय ओझे ll ४ ll - सार्थबोध http://www.saarthbodh.com/2014/08/blog-post.html

ओळखा पाहू ?

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 25/12/2014 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
टक्कल डोक्याला चष्मा डोळ्यांना बाळ माझा होईना मोठा. जिथे जातो तिथे पडतो आधार ताईचा वाटतो घ्यावा. मी कोण?

होउ दे श्वास मोकळा

लेखक टवाळ कार्टा यांनी बुधवार, 24/12/2014 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिपावर गुर्जींचा (इथे दोन्ही कानांच्या पाळ्यांना हात लावण्यात आलेला आहे याची ज्याची त्याने नोंद घ्यावी) प्रभाव जास्तच झाल्याने ह्या ईडंबणावर त्यांची छाप दिसू शकते (दिसेलच ;) )...हे ईडंबण गुर्जींना अर्पण...जिल्बी मात्र मीच पाडली बर्का ;) आम्ची पेर्णा http://www.misalpav.com/node/29809 ------------------------------------------------------------------------------- जगने न तुज्य(कृपे)विना , का रडवतो तू मला, गेला कोंडून तू मजला, जणू श्वास माझा गेला, ये ना परत दाराकडे, कुंथणे आता मुश्किल झाले, नाक माझे हिरमुसले, कससचं म्हणुन बसून राहिले, "ब"

कस्तूरी!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 22/12/2014 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
लहरत लहरत आली बहरत साद मिळाली प्रेमाची मंद धुंद ही गो...ड सुगंधी कस्तुरि पहिल्या प्रेमाची हाय तिचा तो चेहेरा मोहक डोळे धुं....दं शराबी हो तन ही नाजुक ,नाजुक काया कांती त्यात गुलाबी हो हातावरची मउ-मेहेंदि ती जितक्या नाजुक रेषा हो मनावरी ती भिनता होते मोहक मोहक स्पर्शा हो! संवादी ते शब्द असे की श्रवणाने ऐकावे हो शब्द शब्द ही शीतल छाया शांत मना निजवावे हो.....! भोग नव्हे तो योग सुगंधी नशिबाच्या पलिकडला हो जगता जगता हाती आला नशिबाही तो हुकला हो! एक सुगंधा आली बहरत सुगं.........ध देऊन गेली हो चार दिसांची अल्लड सोबत जगणे जगणे झाली हो ======================= . अतृप्त..
काव्यरस

माणुसकीचा येता गहिवर

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी सोमवार, 22/12/2014 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
माणुसकीचा येता गहिवर आठवा त्यांचे अत्याचार लुटलेली माताभगिनींची अब्रू अन् स्वाहा केलेले घरदार युद्धामध्ये सातत्याने खाल्ली माती झाली हार मग सोडले जिहादी पिल्लू अन् सुरु जाहले अत्याचार ठेउनी जा तुमच्या बायकापोरी ध्वनीक्षेपकांचे आठवा चित्कार भोसकलेले कोवळे जीव अन् माजवलेला हाहा:कार काश्मीरी शालीवर पडली आमच्याच रक्ताची लाली फार काश्मीरी जनता जाहली पाकी गोळ्यांची शिकार समाधान होईना तयांचे बॉम्बस्फोटांनी केले बेजार अश्राप कोवळ्या जीवांनी गमावले आई-बाप अन् मित्रही फार शरीरात आजही काचा शस्त्रक्रियांनी आजही बेजार तुमच्या फुकाच्य
काव्यरस

अकारण

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 17/12/2014 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
पेशावर येथील १६ डिसेंबर २०१४ रोजी शाळेतील मुलांवर झालेल्या प्राणघातक अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध...

एकटा

लेखक Yash यांनी मंगळवार, 16/12/2014 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
बघतो आहे वाट ती आता तरी येईल, आलीच अगदी वेळेवर तरी पुढे काय होईल... तिचे ते डोळे अन् ती मोहक अदा, ते रेशमी केस पाहून झालोय मी फिदा... तिच जागा आणि वेळ पाळण्याचा विक्रम मी रचला, "पेहली नझर का प्यार" वर विश्वास माझा बसला... इतकं सगळं झालं तरी बोलणं काही होत नाही, समोर जरी आली तरी लक्ष मात्र देत नाही.. सरली अशीच दोन वर्षे आता तरी बोलावं, थेट समोर जाउन आता प्रपोजच करावं... मग विचार केला की कसे तिचे मन वळवू, समोर जाऊन बोलण्यापेक्षा पत्रानेच कळवू... एक छान पत्रं मी लिहिले अन् हिमतीने नेउन दिले, न वाचताच तिने ते फाडून फेकूनही दिले... ती निघून गेली अन् डोळ्यासमोर अंधारी पसरली, पाहिलेली लाखो स्व

धुकं

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 16/12/2014 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
धुक्यात उमटली चित्रे काही त्यास समजलो जीवन नाती. धुक्यातली नाती धुक्यात विरली जीवन यात्री उदास एकाकी.

हिशोब..

लेखक चुकलामाकला यांनी गुरुवार, 11/12/2014 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी जन्मांचा विचार केला ,तुझी धाव पण वर्षांपुरती कसे निभावू नाते अपुले ,परतुनी आले अर्ध्यावरती … किती विनवण्या, किती अबोले, एका छोट्या पत्रासाठी हट्ट पुरवी तू अखेरीस पण पत्ता दुसरा पत्रावरती… शब्द असे तू उधळीत जाशी, जशी फुले वा माणिक मोती फसवे तरीही वेचीत गेले, माया केली अर्थांवरती … उगाच वेडा जीव लावला ,अशी कशी मी विसरून गेले , कितीही गुणले शून्याला तरी हाती अपुल्या शून्यच उरती...
काव्यरस