Skip to main content

राजकारण

या पाच गोष्टी कायम कराव्यात

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 08/09/2015 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल. 2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील. 3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4.

हरल्या आशांनी बघतो, तू मंत्री आगळा नाही

लेखक माहितगार यांनी सोमवार, 07/09/2015 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा आणि प्रेरणा जणू खिशांत नागर मर्जी, जग माझिया वाणीवरती पण अवखळ नागरवासी, मज संत म्हणाले नाही ....... किती काळ उलटला मंत्र्या, नित नवीन म्हणशी तूही ....... जरी रूप पालटले तुही, तू मंत्री आगळा नाही मी परतून आलो तरीही, माझे ना सरले काही दमलो मी घेऊन माला, मज संत म्हटले नाही ....... समजता मोल खातीचे आलेला परतून जाई .......

सच्चे वरण

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 06/09/2015 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.

माज्या हातावरली चिम्नी

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 06/09/2015 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
धन्याम्होरं ती लांब उडून जायची त्यो जाताच माज्या हातावर बसायची.. शेतावर फक्त तीच माजाशी बोलायची पावसात माज्या हाताआड हळूच लपायची.. आता लपण्याची गरजच राहिली नाय हातावरली जागा आजबी रिकामी हाय.. धनीनेबी चिम्नीवानिच मला रामराम ठोकला बायकापोरास्नी माग ठेऊन निगुन गेला.. मोठ्या गाडीतनं त्यो लोकनेता आला जाताना गाडीत दारुची बाटली उघडला.. सात दिवसानंतर छोटं धनी आलं ट्र्ाक्टरवर बसुन माझ्याकडं पाहून हसलं.. हातावरचं पाव्हण आता बिगीबिगी येईल.. पर धनीला परत कोणं आणिलं?

नात्यातले लुकडे जाडे

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 03/09/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

लेखक इस्पिक राजा यांनी गुरुवार, 03/09/2015 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील.

अजब महाभारत

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 29/08/2015 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, सध्या मिपावर महाभारताविषयी पुन्हा एकदा चर्चा घडून येत आहे. मी गेल्या दोन-तीन वर्षात महाभारतावर जे (सचित्र) लेख लिहिले, त्यांचे दुवे (विशेषतः मिपाच्या नवीन सदस्यांसाठी) देतो आहे. 'अजब महाभारत' हे शीर्षक माझ्या लेखात मांडल्या गेलेल्या आगळ्या-वेगळ्या दृष्टीकोनाला अनुलक्षून दिले आहे. वाचा आणि सांगा तुम्हाला काय वाटले ते. १. कुणी घडवून आणले 'महाभारत'? (महाभारत भाग १) २. मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २) ३.

अस्तित्वकण

लेखक अर्थहीन यांनी मंगळवार, 18/08/2015 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच ब्राम्हवृंद, घासुन-पुसून पुरंदरेंच्या पुरस्काराला सपोर्ट करतायत... बरेच मराठे, चिडून-दाबून पुरंदरे या व्यकती/जातीला विरोध करतायत... उर्वरित महाराष्ट्र 'आम्हाला काही घेणं देणं नाही' या तिरहाईत नजरेने या दोघांच्या (टिपिकल) महाराष्ट्रीय भांडनाकडं ‘साहजिक’ पाहतोय... "अरविंद केजरीवाल ऑनलाइन सेना" दिवसभर "वुई वांट मोदी एज अवर पीम" ला शिव्या देण्यात गर्कय... उभे केलेले कारखाने बंद पाडून तिकडं उस्मानाबादेत मोठमोठे साहेब मोठमोठे मोर्चे काढ़तायत... इकडे शेतकरी नेहमी सारखी पावसाची वाट बघतोय, तिकडे मोदी नेहमीसारखं परदेश दौऱ्यावऱ सेल्फ़ी काढतोय... राहुल नितीश लालू नेमाडे आव्हाड राधे माँ भागवत

पशु-पक्षीभूषण

लेखक तिमा यांनी मंगळवार, 18/08/2015 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
जशी मानवी बहुजनसमाजात जागृती झाली तशी ती, पशु-पक्षी समाजातही होऊ लागली. आधुनिक युगांत तर, शहरांत रहाणार्‍या पशु-पक्ष्यांना मानवी गाणी, साहित्य हेही समजू लागले आणि त्यांत आवड-निवडही निर्माण झाली. त्यांनीही जनसभा घेऊन आपापल्या मागण्या मांडायला सुरवात केली आणि मानवी साहित्यसंमेलनासारखेच ठरावही पास केले. अशाच एका सभेचा हा इतिवृत्तांत. सर्वप्रथम सभाध्यक्षांनी सर्वांचे स्वागत केले आणि आपल्या दोन तासांच्या भाषणाने पशु-पक्ष्यांना झोपेला आणले. नंतर सर्व औपचारिक विधी संपल्यावर , ठरावांसाठी मुद्दे मांडण्याचा प्रस्ताव मांडला गेला. कावळ्यांनी सर्वप्रथम , एका तळयांत होती' या गाण्याविषयी आक्षेप नोंदवला.

अगदी खर्री लोकशाही

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 05/08/2015 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
“लोकशाही म्हणजे रे काय, भाऊ?” “अरे, लोकशाहीवर अनेक ग्रंथ लिहिले गेलेले आहेत, अनेक छोटी मोठी पुस्तकं लिहिली गेली आहेत, अनेक चर्चा-वाद झाले आहेत. त्यातून काही माहिती मिळेल ती मिळेल. पण तुला थोडक्यात सांगतो. लोकांनी केलेलं, लोकांसाठी केलेलं, लोकांचं राज्य ती लोकशाही. ती आपल्या भारत देशात आहे, ती अमेरिकेत आहे, ती युरोपात आहे, ती अनेक पश्चिमी देशात आहे. तिलाच लोकशाही म्हणतात!” “मग ही लोकशाही निरनिराळ्या प्रकारची असते का रे भाऊ?” “हो, अगदी बरोबर.