गुत्तुडा
"ए कटली रे कटली "
"ए मध्या .......... पकड पकड "
"मांजा पकड ... मी पतंग घेउन आलो "
"च्यायला ... टार्या लै गुतुडा झाला लका .. मांजा काय कामाचा नाय "
" आण रं इकडं .... गुतुडा आसला मुन काय आख्खा मांजा वाया घालितो का ? "
काही नात्यांचही असंच असतं , बरिच गुंतागुंत असते आणि आपण तो गुंता सोडवण्याबाबद बर्याचदा पॅसिव्ह किंवा निगेटिव्ह असतो. गोष्ट मनाला बोचत असते कुठे तरी. पण कधी इगो आडवा येतो, मी कमीपणा का घेऊ ? मी का गैरसमज दुर करावेत ? नाती नेहमी रक्ताचीच असावीत असंही नाही. इनफॅक्ट आपला नातेवाईकांशी हल्ली संबंध तरी कितीसा येतो हो ? कधी सुख-दु:खाच्या प्रसंगात तोंडदेखली चार हाय-बाय-कसंकाय ?
मिसळपाव