Skip to main content

साहित्यिक

प्रथम तुला वंदितो

लेखक अर्धवटराव यांनी गुरुवार, 04/03/2010 07:19 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. आम्हि अर्धवटराव. नावाप्रमाणेच आचार, विचार, उच्चार, आणि इतर बर्‍याच बाबतीत आम्हि अर्धा पेला भरलेला (कि रिकामा... काय ते असेल) आहोत. काहि बाबतीत मात्र आम्हि परिपूर्ण आहोत... पण त्यांचि आम्हाला अर्धवट माहिती आहे. तर सांगायचा मुद्दा हा कि अश्या आमच्या सारख्या मडक्यांचि ठण्ठण् कोणिही ऐकुन घेत नाहि. अश्या उदास अवस्थेत व्रुथा भुमीवर भटकत असता आम्हाला या मिसळेच्या हाटेलाचा पत्ता सापडला. बरेच दिवस हाटेलाबाहेर उभं राहुन आम्हि आत यावं का हा विचार केला. इथे कसली तालेवार मंडळी आहेत. कोणि संगीत कोळुन प्यालय तर कोणि सहित्य. कोणाला राजकारण आवडतय तर कोणाला समाजकारण.

भुर्जपत्र ते वेबपेज

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 03/03/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
भुर्जपत्र ते वेबपेज हा साहित्यप्रवास उलगडणारा कार्यक्रम नुकताच पुण्यात संमेलन पुर्व संमेलनात झाला. किरण ठाकुर यांनी प्रास्ताविक केले. डॊ सतिश देसाई यांनी एकुण कार्यक्रमाची रुपरेषा व संकल्पना सांगितली. परिसंवादाला प्रसिद्ध लेखक अनिल अवचट, मराठी अंकाचे ई संपादक व कवि महेश घाटपांडे, साहित्यक व समन्वयक मिलिंद जोशी, पत्रकारिता क्षेत्रातील माजी संपादिका साप्ताहिक सकाळ श्रीमती संध्या टांकसाळे, वृत्तपत्र विद्या विभागाच्या प्रमुख उज्वला बर्वे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी ब्लॊगर व स्टार माझाचे सहा. निर्माते प्रसन्न जोशी यांनी केले. अनिल अवचटांनी आपला संगणक प्रवास सांगितला.

ज्ञानेश्वरांनंतर आणखी एकासाठी भिंत चालली

लेखक नितीनमहाजन यांनी गुरुवार, 25/02/2010 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानात एकांतवासात असताना त्यांची काव्यप्रतिभा बहरली. त्या उर्मीतच त्यांना "कमला" सारखी खंडकाव्येही स्फुरली. या कविता शब्दबध्द करण्यासाठी त्यांनी बारीबाबाकडे कागद व टाकाची मागणी केली. त्या अक्कलशून्य, बिनडोक व उलट्या काळजाच्या बारीबाबाने ती मागणी मान्य केली नाही. सावरकरांची काव्यप्रतिभा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी त्यांच्या कोठडीच्या छोट्याशा गवाक्षातून दिसणार्‍या आकाशाला विनंती केली की तू माझ्यासाठी कागद व्हायला तयार आहेस का? त्या घमेंडखोर आकाशाने उत्तर दिले: तुझी लायकी आहे का माझ्याशी बरोबरी करायची?

बिल्डर कसे व्हावे ......

लेखक मंगेशपावसकर यांनी शनिवार, 20/02/2010 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
बिल्डर कसे व्हावे............. (व्यंग) नमस्कार !!........ आज आपणास मार्गदर्शन करणार आहे बिल्डर कसे व्हावे. काही जणांच्या मते बिल्डर बनणे हि फारच किचकट गोष्ट आहे . आम्ही म्हणतो कठीण आहे पण जर आपण इतर यशस्वी बिल्डर पाहिलेत व त्यांचा पायावर पाय ठेवून जर बांधकाम व्यवसायाची माहिती घेतलीत, तर नक्कीच हा व्यवसाय फलदायी व क्लेश रहित आहे. इथे आपणास मुद्देसूद व सकल मार्गदर्शन केले आहे, पण अर्थात हे आजकालच्या जगतातले शिक्षण आहे, व ते आजकालच्या प्रमाणेच अवलंबिले पाहिजे. बाकी आपल्या तोंडी गरज आहे ती फक्त अरेरावीच्या भाषेची.....

माय मराठी महोत्सव- निळू दामल्यांशी गप्पा

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शुक्रवार, 22/01/2010 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी ग्रंथप्रदर्शनात अक्षरधारा हे नाव आता इतके रुजलय कि ग्रंथप्रदर्शन म्हणले कि अक्षरधारा असे समीकरण रुजलय.अक्षरधारा तर्फे मराठी वाचकांसाठी सातत्याने काही उपक्रम राबवले जातात. त्यात वेगवेगळ्या साहित्यिकांशी गप्पा हा प्रमुख कार्यक्रम असतो. काल निळू दामल्यांची मुलाखतीचा कार्यक्रम पहायला/ ऐकायला टिळकरोडच्या मराठा चेंबर्सच्या सभागृहात गेलो.

सध्याचे वाचन ...

लेखक बट्ट्याबोळ यांनी मंगळवार, 19/01/2010 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच पुणे फेरी मधे काही पुस्तके विकत घेउन आलो. तु.मा.सा. इथे डाकवत आहे: १. चर्चबेल लेखकः ग्रेस ललित लघुनिबंध आहेत ग्रेस यांचे. सुंदर भाषा, कधी कधी दुर्बोध वाटणारे ग्रेस यातही तसाच वावर करतात. वाचताना त्यांच्या भावविश्वाची, विविध गोष्टींकडे बघण्याची त्यांची कवी-द्रुष्टी यांची अनुभुती येते. एका निळ्या जगात, जेथे आपण एकटे असतो, तेथे हे पुस्तक आपल्याला घेउन जाते. सुंदर लेखन !! जरूर वाचा. २. पांगिरा. विश्वास पाटिल यांची सुंदर कादंबरी. एका गावाची ही कथा आहे.

लेखन व लेखकाचे बाह्यरुप

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 19/01/2010 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
लेखन व लेखकाचे बाह्यरुप हा धागा केवळ मौजमजेखातर आहे. तत्राप यात काही वैज्ञानीक तथ्य असेल तर आपण सांगू शकतात. असे म्हणतात की आपण जे लिहीतो तसे आपले मन असते. आपल्या मनातले आहे ते कागदावर उमटते. थोडक्यात आपले लिखाण आपला स्वभाव, वागणूक दाखवते. या लेखनात कार्यालयात केले जाणारे लेखन, अनौपचारीक पत्रे येत नाहीत. जे ललीत आहे, जे लेखकाला आनंद देते व जे खरे आहे ते लेखन येथे अभिप्रेत आहे. थोडक्यात केले जाणारे लेखन लेखकाच्या मनाचा आरसा असते. अशाच प्रकारच्या मनाच्या आरशातून त्या लेखकाचे बाह्यरुप देखील आजमावता येईल का? बाह्यरुप म्हणजे तो लेखक/ लेखिका कसा / कशी आहे?

साधा माणूस या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी सोमवार, 18/01/2010 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, माझ्या साधा माणुस या काव्य संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याची छायाचित्रे देत आहे. या काव्य संग्रहाला विशेष प्रस्तावना ज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांची लाभली आहे, हे मी माझे परम भाग्य समजतो. या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये दूरदर्शनचे अभय मोकाशी, विख्यात कवी अशोक बागवे, अशोक लोटणकर, कवयत्री डॉ. अनुपमा उजगरे, साहित्य त्रैमासिकाच्या संपादिका सुहासिनी किर्तीकर इत्यादी. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या सोहळ्याची सांगता काव्य संध्येने झाली. गोखले यांची कविता हा त्यांचा उदगार आहे, माझ्या कवितेशी त्यांच्या कवितेची नाळ जुळते म्हणुन मी आलो.

हार्दिक निमंत्रण !

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 17/12/2009 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपा परिवार , नमस्कार ! वाचकहो , मिपावर वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या माझ्या कवितांना आपण यथोचित प्रतिसाद दिलात. याच कवितांचा काव्यसंग्रह "साधा माणूस" या नावानं वंदना प्रकाशनाच्यावतिने प्रकाशित होत आहे. हा प्रकाशनसोहळा कोकण मराठी साहित्य परिषद , गिरगाव शाखेच्या विद्यमाने गुरूवार दि.७ जानेवारी २०१०रोजी सायं. ६ वाजता मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉ. पुरंदरे सभागृह, गिरगाव येथे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक याच्याशुभहस्ते , पं यशवंत देव आणि ज्योतिर्भास्कर जयंत सळगावकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. .

पूर्व दिशेला अरूण पथावर..

लेखक प्राजु यांनी रविवार, 29/11/2009 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक धिंगाणा डॉट कॉम वर जाऊन आवाज चांदण्यांचे -२ या अल्बम मधली गाणी ऐकायचा मूड झाला. मनात आलं आणि मी चालू केली गाणी. ऐकता ऐकता, पूर्व दिशेला अरूण पथावर ध्वज सोन्याचा झळकत सुंदर .. पी. सावळाराम यांनी लिहिलेलं , हृदयनाथ मंगेशकरांचा संगित साज ल्यायलेलं , धर्मकन्या या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या आवाजातलं गाणं ऐकलं.. आणि मन जवळ जवळ २० वर्ष मागे गेलं. नक्की या गाण्यामुळे गेलं की, त्या गाण्याशी जोडलेल्या आठवणींमुळे हे सांगणं खरंच कठीण आहे. आठवणींच्या मळ्याचं एक बरं असतं, वेळी-अवेळी कधीही तिथे जा.. तिथे नेहमीच सुगी असते. दुष्काळ सहसा नसतोच.