Welcome to misalpav.com
लेखक: प्यारे१ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर तुम्ही दत्त कृपेचा कधी अनुभव घेतला आहे का? घेतला नसेल तर कोणत्या आधारावर दत्त हि काल्पनिक गोष्ट आहे, भाकडकथा, ह्याव अन त्याव बोलताय तुम्ही? संपादित. कृपया व्यक्तिगत रोख टाळावा.

मला कुरुंदवाड येथे जन्मण्याचे आणि वाढण्याचे भाग्य लाभले आहे.

एव्हढ्या सगळ्या प्रतिसादांमध्ये 'श्रीसत्तसंप्रदायाचा इतिहास' या श्री. रा. चिं. धेरे यांच्या ग्रंथाचा उल्लेख कोणीच कसा केला नाही?

डुलक्या नव्हेत, घाईगडबड. मिपावर प्रकाशनानंतर स्वसंपादनाची सोय नाही म्हणून चुकांची संख्या मिपावर जास्त दिसते. (यात जाणूनबुजून शुद्धलेखन उलटेपालटे केल्यामुळे झालेल्या चुका धरलेल्या नाहीत. मिपावर ते 'अलौड' आहे.) तसेही प्रतिसादाच्या शीर्षकात 'ढेरे' असेच टंकले आहे त्यामुळे निदान ढेरे शब्द माहीत आहे असे निदान करता येण्याजोगे होते. कळफलकावर एस आणि डी ही अक्षरे शेजारी आहेत त्यामुळे बरेच वेळा अशी गडबड होते आणि पूर्वावलोकनात सुधारली जाते. या वेळी पूर्वावलोकन झाले नाही हे खरे.

या जगात काय म्हटलय त्यापेक्षा कोणी म्हटलयं याला जास्त महत्व आहे !! मूळ लेख ओघवता, रसाळ वाणीचा ठरतो तर तशाच गोष्टी सांगितलेल्या एका प्रतिसादावर "प्रश्न" पडतात !!

तू आयुष्याला स्पर्शून जाणारे अत्यंत वॅलिड प्रश्न मांडलेत !
असं नसतं हे कोणाला जरी पटवलं समजा, किंवा त्यांच्या कृपेने काही पीडाबिडा दूर होत नाही असा खाडकन थंड पाण्याचा सपकारा तोंडावर मारुन घेतला तरी जागं होऊन काय करायचं ? या पीडांना पर्याय काय ?
सामना चित्रपटात निळू फुले श्रीराम लागूंना म्हणतो : "दारू हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नाही मास्तर"!
तर काहीतरी (तुलनेत) "रॅशनल थिंकिंग"मधून या पीडा सोडवणे, त्यांना तोंड देणे, किंवा या पीडा महणजे वास्तविक पीडाच नव्हेत असं काहीतरी मानणे..म्हणजे आरुनफिरुन त्या पीडांपासून आभासी सुटका असंच ना.. वास्तविक सश्रद्ध असो, अश्रद्ध असो वा अंधश्रद्ध.. तो पीडांना तोंड देतच असतो आणि त्या भोगतच असतो.. कारण त्याला इलाज नसतो.. बायपास नसतो.
प्रत्येक प्रश्न सोडवता येत नसला तरी आहे त्या परिस्थितीचा स्विकार करता येतो. दॅटस अ ग्रेट अंडरस्टँडींग अँड रिलीफ.
मग दत्त किंवा तत्सम मार्गाने जर काहीजणांना ऑपॉप मनःशांती मिळत असेल तर मिळेना.. त्यांना त्या मार्गापासून स्ट्रिप ऑफ करुन दुसरा पर्याय काय देऊ शकतो. आणि तो देणारे आपण कोण?
जर हा व्यक्तिगत प्रश्न असता तर माझ्या हरकतीला विचारतो कोण? असे विचार जनमानसावर दूरगामी परिणाम करतात. कांट यू सी धीस? ही भंपक स्टोरी किती युगं चाललीये? ही निरर्थक गुंगी किती लोकांना भ्रमात घेऊन गेलीये.
आपण सगळेच भ्रमात जगतोय. कोणाचा भ्रम दत्त तर कोणाचा भ्रम तर्क तर कोणाचा भ्रम निसर्ग अन कोणाचा भ्रम विज्ञान किंवा आणखी काही.
जर सगळाच भ्रम असेल तर प्रश्नच मिटला. मग दत्त हा नवा भ्रम कशाला? त्यानी नवा कहार ओढवतो. मंदिरं, मशीदी, चर्चेस, गुरुद्वारं....हे पाडा ते बांधा. ही याची वोट बँक ती त्याची वोट बँक. आहे त्या तापात आणखी नवा ताप!
शेवटी उपयुक्तता महत्वाची. विज्ञानाने तरी आपण उपयुक्ततेशिवाय काय मिळवतो? तसंच उपयुक्तता म्हणून पहा याकडेही.
विज्ञानाची तुलना भाकडतेशी निदान तुझ्यासारखानं तरी करु नाही. तो मानवी बुद्धीमत्तेचा उपमर्द आहे.
काही जणांना दत्त किंवा तत्सम गोष्टींमुळे आनंद, सुख, समाधान मिळत असेल तर त्यांच्याविषयी तुच्छता, राग किंवा तिटकारा वाटण्याऐवजी मला त्यांचा हेवाच वाटतो..
मला दया येते! अजूनही जर देव आकाशात आहे इतका बालीश गैरसमज घेऊन लोक जगत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे पण वरच्या ओळी पुन्हा उधृत करतो : जर हा व्यक्तिगत प्रश्न असता तर माझ्या हरकतीला विचारतो कोण? असे विचार जनमानसावर दूरगामी परिणाम करतात. कांट यू सी धीस? ही भंपक स्टोरी किती युगं चाललीये? ही निरर्थक गुंगी किती लोकांना भ्रमात घेऊन गेलीये. इट इज अ शिअर वेस्ट ऑफ ह्युमन लाईफ, पब्लिक वेल्थ अँड टाईम.
श्रद्धा किंवा अंधश्रद्धा यांत फरक करणं किंवा त्या समजावून दूर करणं अशक्य आहे.. आणि त्याहूनही जास्त अनावश्यक आहे.. कोणाचा बळी दिला किंवा मारहाण केली तर खून आणि इजा यांच्या सांप्रत कलमांखाली शिक्षा करावी बस्स..तोसवर ज्याला जे करायचे ते करु दे.
तू प्रतिसाद शांतपणे वाचलास तर लक्षात येईल की द डॅमेज इज नॉट अ‍ॅज ग्रॉस अ‍ॅज अ पर्सनल अ‍ॅसॉल्ट. इट इज वेरी सटल अँड डिपली पॉयझनस फॉर द जनरेशन्स टू कम अँड फॉर द नेशन अ‍ॅज अ होल. कारण एकदा अशा भाकड कथांचा संस्कार झाला की वस्तुनिष्ठ दृष्टीकोन हरवतो, तो व्यक्तिगत होतो आणि कार्यकारणाचा शोध घेण्याची वृती (वैज्ञानिक दृष्टीकोन) संपते.
काही निर्मूलन वगैरे करायला जाऊ नये असं व्यक्तिगत मत आहे.
जर एक दाभोलकर इतक्या फंडामेंटल गोष्टीसाठी स्वतःचं आयुष्य वेचू शकतो तर माझ्या दृष्टीनं मी घालवत असलेला वेळ आणि पत्करत असलेला जनक्षोभ अत्यंत नगण्य आहे.

हे बघा.. माझीही ह्या बाबतची मतं (चक्क) तुमच्या सारखीच आहेत. पण..पण.. दुसर्‍याच्या आयुष्य जगण्याच्या पद्धतीला असं डायरेक्ट भंगारात काढु नये असं माझं मत आहे. तुम्ही त्या जागी जाऊन, त्यांच्या विचारसरणीमुळे मिळणार आधार अनुभवु नाही शकत. माणुस म्हणुन त्यांना तो महत्वाचा आहे.. तुम्ही बुद्धीवादी आहात, सगळेच नसतात.. जो तो आपापल्या परीने आपले आयुष्या सार्थकी लावण्याचा यत्न करत असतो. त्यामुळे वन कॅन नॉट से दॅट इट इज अ शिअर वेस्ट ऑफ ह्युमन लाईफ, पब्लिक वेल्थ अँड टाईम. बरं.. दाभोळकर बळी देणे, भानामती, करणी इ एका माणसाच्या श्रद्धेमुळे जेव्हा दुसर्‍याच्या आयुष्याला धक्का बसतो अशा प्रथांविरुद्धा लढत होते. आरती करणे, देव आहे असं मानणे, तारणहार आहे असे समजुन निर्धास्त रहाणे अशा श्रद्धेने कुणाचं काय वाईट केलय? उलट खोट्या समजुतीने का होईना, कुणाचा तरी धाक असल्या सारखी वागत अस्तील माणसं तर काय प्रॉब्लेम आहे? अर्थात ह्या सिस्टिमचेही दोष आहेत.. पण दुर्लक्षण्याजोगे आहेत..
प्रत्येक प्रश्न सोडवता येत नसला तरी आहे त्या परिस्थितीचा स्विकार करता येतो. दॅटस अ ग्रेट अंडरस्टँडींग अँड रिलीफ.
तुम्हाला हा रिलीफ वाटतो.. सगळ्यांनाच नाही.. "जे तुम्हाला वाटतं, पटतं.. तेच सगळ्यांना वाटेल्..पटेल असं नाही" हे समजुन घ्या आधी.. जसे सगळ्यांचे स्वभाव, बुद्धिमत्ता, विचारसरणी इ वेग्वेगळे आहेत्..तसेच प्रत्येकाचा रिलीफ शोधण्याचा मार्गही वेगवेगळा आहे..

"जे तुम्हाला वाटतं, पटतं.. तेच सगळ्यांना वाटेल्..पटेल असं नाही" हे समजुन घ्या आधी.. जसे सगळ्यांचे स्वभाव, बुद्धिमत्ता, विचारसरणी इ वेग्वेगळे आहेत्..तसेच प्रत्येकाचा रिलीफ शोधण्याचा मार्गही वेगवेगळा आहे..
कुडंट अग्री मोर. अन प्रत्येक गोष्टीवर मतप्रदर्शनाआधी पूर्वानुभव गरजेचा असता तर गुप्तरोगतज्ञ आणि मनोविकारतज्ञांची अवस्था अवघडच झाली असती.

पुर्वानुभव असला नसला तरी एकवेळ ठिके.. पण समोरच्याचा मार्ग चुकच आहे असं छातीठोकपणे म्हणणं मात्र चुक.. त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकतच नाही ना.. मुळात तुमची स्वतःची विचारसरणी सोडुन, कोर्‍या मनाने तुम्ही त्याचं ऐकुच शकत नाही.

पण
मुळात तुमची स्वतःची विचारसरणी सोडुन, कोर्‍या मनाने तुम्ही त्याचं ऐकुच शकत नाही.
हे सर्व लोकांच्या बाबतीत बरोबर नाही.

मला वाटतं की तुम्ही दुसर्‍याच समजुन घेण्याची तयारी निश्चित दाखवु शकता.. कदाचित तुम्हाला ते विचार पटुन तुम्ही नवा विचार अंगीकारु शकता.. पण.. जुन्या विचाराचा काहीतरी रेसिड्युअल असणारच की.. पाटी कोरी कशी होईल? तुलना होईलच.. म्हणुन तसं लिहीलय मी..

अर्थातच. काहीतरी रेसिड्युअल असणारच. मुद्दा तो नाहीये. रेसिड्युअल असो वा नसो, समजून घेण्यात त्याचा काय प्रभाव पडतो हे महत्त्वाचं. उदा. अदरवाईज सनातनी विचारांचे लोक काही बाबतींत लिबरल असतात. जिथे लिबरल असतात त्या मुद्द्यांबाबत त्यांचा सनातनी रेसिड्युअल आड येत नाही.

हे.. हे असले भक्त संतांचे नाव खराब करतात! बिचारे प्यारेकाका नम्रतेनी आणि प्रेमानी समजूतदार उत्तरे देतायत, तर तुम्ही येउन समोरच्या लोकांना अश्या धमक्या द्या! हात ले श्पायलू!! :P

देव ही मानवी कल्पना आहे या विधानाचा कुणीही प्रतिवाद करुन दाखवावा *ok* आणि एकदा त्या कल्पनेचा निरास झाला की लेखाचा डोलारा कोसळला! कारण दत्तच नाही म्हटल्यावर लेखातल्या एकाही वाक्याला अर्थ उरत नाही. मग
"ह्या दत्तांच्या कृपेने माझी संसारविषयक म्हणजे एकंदर प्रपंचाची 'काय होईल नि कसं होईल'ची चिंता दूर झाली आहे"
हा भोळसटपणा संपला. समाजाचा दृष्टीकोन वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक व्ह्यायला सुरुवात झाली! अँड दॅट्स द पर्पज ऑफ माय रायटिंग.

सर एकदा लेख परत वाचणार का? पूर्ण? शांतपणं? लेख वाचल्यावर माझे काही प्रतिसाद पण वाचा. बघा तर प्रयत्न करुन. जमेल. काही मुद्दे सुटलेत तुमचे. स्कोअर सेटलिंग करु की नंतर! घाई आहे काय ? सध्या काही मार्च एन्ड नाहीये.

मूळ मुद्दा कोणि किती शांतपणे लेख वाचला हा नाहिच आहे. मूळ मुद्दा असा कि "मी" विश्वकल्याणासाठी जो जनक्षोभ ओठावुन घेतो त्याचं कौतुक नाहि तुला, शिवाय "माझ्या" मुद्द्यांचं कोणि खंडण करु शकत नाहि या माझ्या अहंकाराचं सुख तुम्हाला का बोचतय ? "मी" मानवी मनाविषयी जी नवीन संशोधनं मांडली आहेत त्यामागे माझं लॉजीक नसुन माझ्या धारणा आहेत. आता या धारणा जोवर तुम्ही अंगीकारत नाहि तोवर तुम्ही धारणारहित कसे व्हाल?

>>>>द डॅमेज इज नॉट अ‍ॅज ग्रॉस अ‍ॅज अ पर्सनल अ‍ॅसॉल्ट. इट इज वेरी सटल अँड डिपली पॉयझनस फॉर द जनरेशन्स टू कम अँड फॉर द नेशन अ‍ॅज अ होल. ऊप्स! हे फारच गंभीर झालं की. मी एवढा मोठा गुन्हा केलाय? आत्मु स्मायलीवाले बाबा, डोळे विस्फारल्याची स्मायली द्या हो.

मी एवढा मोठा गुन्हा केलाय? महाराजा.. कर्माचा परिणाम कितीही गंभीर असला तरिही गुन्हाची पातळी ठरवताना हेतु ( इंन्टेश्न ) महत्वाचे धरले जाते . तस्मात, काळजी काय कु करनेका? लोगा आयेंगे , बोलेंगे, ध्यानच नै देनेका ! आपुन अप्ना काम करनेका ! अहो या देशात इतके महात्मा झाले म्हणून आम्ही सुधारलो का ? पावलापुरता प्रकाश हे तत्व ध्याने ठेवावे .. बाकी कुत्ता जाने चमडा जाने ! पुरोगामी अथवा नास्तिक अस्ण्याचा अतिरेक हे पण एक अंधश्रद्धाच नाही का ? आणि त्याही पेक्षा "मीच शाणा बाकी सबलोग यडे है " ही तर विकृत श्रद्धा आहे !

काका, सरांना काळजी आहे ती लोकांची. पुढच्या पिढ्यांची नि एकंदरच देशाची. म्हणून राहावलं नाही. 'निवडणुकोत्तर' केजरीवालांची आठवण आली. बाकी एका लेखाचा परिणाम एवढा दूरगामी नि खोल असेल तर क्या केहने! ( थोडा विनोद बरं का : जल्ला आमचा वर्षाचा बाल्या आमचं ऐकत नाय! बाकी लोकं काय ऐकणारेत? ;) )

वाह प्यारे, आज बरेच दिवसांनी मिपावर आल्याचं चीज केलं ह्या लेखानं. धन्स्! आता जेव्हा जेव्हा दत्ताची आरती म्हणेन / ऐकेन तेव्हा तेव्हा हे नक्की आठवेल.

गुप्तरोगतज्ञ आणि मनोविकारतज्ञांची अवस्था अवघडच झाली असती.
गुप्तरोग, मनोविकार, आणि दत्त ह्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करताय ह्यातच तुमची विचारसरणी कळून येते. ह्या रोगांची लक्षणे डॉक्टरांना डोळ्याला दिसतात , ऐकू येतात , स्पर्शाने जाणवतात . हे रोग म्हणजे काही अनुभवण्याच्या गोष्टी नहियेत. तुम्हाला स्वताला ह्या रोगांचा अनुभव नसला तरी डॉक्टरांच्या सांगण्यावर तुम्ही विश्वास ठेवता ना . का मला स्वताला तो रोग झाल्याशिवाय मी तो काल्पनिक आहे असाच समजणार असा हट्ट धरून बसता ??? ईश्वर मात्र तुम्हाला स्वताला अनुभव घेवूनच जाणवेल . आणि जर तुमची त्या दृष्टीने प्रयत्न करायची तयारी नसेल तर दत्त हि काल्पनिक गोष्ट आहे वगेरे म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही

गुप्तरोगतज्ञ आणि मनोविकारतज्ञांची अवस्था अवघडच झाली असती.
गुप्तरोग, मनोविकार, आणि दत्त ह्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करताय ह्यातच तुमची विचारसरणी कळून येते. ह्या रोगांची लक्षणे डॉक्टरांना डोळ्याला दिसतात , ऐकू येतात , स्पर्शाने जाणवतात . हे रोग म्हणजे काही अनुभवण्याच्या गोष्टी नहियेत. तुम्हाला स्वताला ह्या रोगांचा अनुभव नसला तरी डॉक्टरांच्या सांगण्यावर तुम्ही विश्वास ठेवता ना . का मला स्वताला तो रोग झाल्याशिवाय मी तो काल्पनिक आहे असाच समजणार असा हट्ट धरून बसता ??? ईश्वर मात्र तुम्हाला स्वताला अनुभव घेवूनच जाणवेल . आणि जर तुमची त्या दृष्टीने प्रयत्न करायची तयारी नसेल तर दत्त हि काल्पनिक गोष्ट आहे वगेरे म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही

दत्त काय किंवा अजून कुठला देव काय, तो आहे किंवा नाही याबद्दल मी काहीच विधान केलेले नाही. तसे एखादे विधान असल्यास दाखवून द्यावे. तो असला काय नि नसला काय, मला फरक पडत नाही. आणि मला काय बोलायचा अधिकार आहे हे तुम्ही सांगायची गरज नाही. बाकी रोगाबद्दलचे हंबरणे अस्थानी आणि बादरायण आहे ते एक असोच. पण आता अजून एक प्रश्न येतो, की त्या सर्वशक्तिमान वगैरे वगैरे ईश्वराची भक्ती करणार्‍या तुम्ही, आमच्या सारख्या महामूर्ख लोकांबरोबर वादाच्या घाणीत का लोळताय? तुमच्या भगवंताने परमिशन दिलीय का सोयीस्करपणे शिव्या घालायची?

आमच्या सारख्या महामूर्ख लोकांबरोबर वादाच्या घाणीत का लोळताय?
कारण तुम्ही माझ्या अराध्याबद्दल वाटेल ते बद्बद्ताय म्हणून . तुम्ही म्हणताय कुठला देव आहे कि नाहीये ह्त्याच्याने तुम्हाला काही फरक पडत नाही . मग तुम्हाला फरक पडत नसेल तर मी आहे म्हणल्यावर तुम्हाला एवढा राग यायचा काय कारण आहे? तुमचा त्याच्यावर विश्वास नसेल तर द्या न सोडून . दत्त महाराजांबद्दल तुम्ही चुकीचे विचार पसरवत आहात म्हणून

मग तुम्हाला फरक पडत नसेल तर मी आहे म्हणल्यावर तुम्हाला एवढा राग यायचा काय कारण आहे? तुमचा त्याच्यावर विश्वास नसेल तर द्या न सोडून .
आमच्या धारणेचा तर्कशुद्ध प्रतिवाद करता येत नसेल तर तुम्हाला राग यायचं कारण काय आहे?
दत्त महाराजांबद्दल तुम्ही चुकीचे विचार पसरवत आहात म्हणून
यात नक्की काय चूक आहे ते सांगा, मग पाहू. दत्त/शंकर/विष्णू हे फक्त लेबल समजा.

बाई, मला एक कळत नाही तुमचं.. मी अत्यंत कुतुहलाने हा प्रश्न विचारतेय. तुम्ही धार्मिक / अध्यात्मिक / अस्तिक वगैरे वाटता. कुणी देवादिकांविरुद्ध बोलले की तुम्ही हिरीरीने वाद घालायला येता. पण मुळात प्रश्न असा की तुम्हाला फरक का पडतो लोकांच्या बोलण्याचा? बॅट्या काहीही बोलेल, जर तुमचा विश्वास आहे देवावर तर बॅट्या काय कुणाच्याही बोलण्याने काय फरक पडणारे? शिवाय वर एकदा तुम्हीच लिहीलय की अनुभव / प्रचिती आल्याशिवाय कळणार नाही. मग ज्यांना अशी प्रचिती येईल ते ठेवतील देवावर विश्वास, नाही येणार ते नाही ठेवणार.. तुम्ही का त्रास करुन घेताय? मी मागेही एकदा तुम्हाला सांगितलं होतं, काय मत बनवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुमचा प्रतिसाद असाही लिहिता येईल ना:-
तुम्ही म्हणताय कुठला देव आहे कि नाहीये ह्त्याच्याने तुम्हाला काही फरक पडत नाही . मग तुम्हाला फरक पडत नसेल तर मी नाही म्हणल्यावर तुम्हाला एवढा राग यायचा काय कारण आहे? तुमचा त्याच्यावर विश्वास असेल तर द्या न (बाकीच्यांच बोलणं) सोडून .
देव खरच आहे की नुसतीच कल्पना आहे हा मोठा विषय झाला.. पण तोवर देव न मानणारे असतीलच..ते टीका करतीलच, तुम्ही जमल्यास मनावर घेणं सोडुन द्या..

असं होतं (आणि ते अनुसयेला समजलं नव्हतं.. आणि म्हणुन दत्त महाराज तिचे गुरु झाले..).. मग तरीही आणखीन हे कशासाठी?
ह्या प्रश्नच अर्थ समजला नहि. कृपया उलगडून सांगितला तर उत्तर देत येईल .
दत्ता सारखा पुत्र (म्हणजे कथे नुसार साक्षात ब्रह्मा, विष्णु आणि महेश) असताना, आधिक तोच गुरु झालेला असताना सुनेसाठी दागिने जमवणे अशा गोष्टींची गरज काय?
आपल्या मुलाने लग्न करण , सुनेसाठी दागिने जमवणं हे तीने एका आईच्या भूमिकेतून केला आहे . कारण ती पतिव्रता वगेरे असली तरी सत्याची जाणीव तिला नवती . ती अज्ञानीच होती असा मी आधीच एका प्रतिसादात म्हणलाय. दत्त पुराणात म्हणल्याप्रमाणे दत्त महाराज किशोरवयीन झाल्यावर अनुसया त्यांना लग्नाचा आग्रह करू लागली तेव्हा दत्तांनी त्याला नकार देवून अनुसयेला सत्याची जाणीव करून दिलीये . तेव्हा हे दागिने वगेरे जमवणं आधी . आणि दत्तांनी आपल्या आईचा गुरु बनण हे नंतर असा क्रम आहे
सामान्य माणसांच जाउ द्या..पण देवादिकांनाही हे मोह का असतिल? आपण शरीर नाहिच आहोत तर ह्या नश्वर शरीराला सजवण्याचे डोहाळे का लागावे?
ह्याचा हि अर्थ समजला नाही . इथे दत्त महाराज कुठे स्वताच्या शरीराला सजवण्याच्या मागे लागले आहेत?

पिलीयन रायडर बाई तुम्ही एकीकडे म्हणताय कि काय मत बनवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे . अहो मी पण माझी मतच मांडते आहे न . ब्याट्या म्हणतोय देव नाहीये आणि मी म्हणतेय अहे. एवढाच फक्त चाललाय न . ब्याट्याने माझ्या म्हणण्याला दुजोरा द्यावा किवा त्याने माझी मतं मान्य करावीत वगेरे असं मी कुठे म्हणलय? उलट माझ्यासारख्या लोकांमुळे भोन्दुबबांच फावत वगेरे म्हणून तोच माझ्याशी वाद घालतोय . मी फक्त मला असलेली माहिती इथे देत आहे . आणि ब्याट्याला काही बोलल्यामुळे तुम्हाला मला प्रतिसाद द्यावासा वाटत असेल तर दत्त महारानांना काही बोललं तर मला प्रतिसाद द्यावासा वाटला ह्यात मी चुकीची कशी ठरतेय ?
तुम्ही धार्मिक / अध्यात्मिक / अस्तिक वगैरे वाटता
खरं आहे ते. मी तशी आहे . कारण मी स्वतः अनुभव घेतला आहे . जोपर्यंत मला अनुभव नवता तेव्हा माझी मतं सुधा बॅटमॅन सारखीच होति. वेळ आल्यावर जसा मला समजलं तसाच त्यालाही समजेल एवढाच म्हणलाय न मी . जोपर्यंत त्याची वेळ येत नाही तोपर्यंत त्याने आंधळेपणाने देव आहे म्हन्नार्यांवर किवा नाही म्हन्नार्यांवर विश्वास ठेवावा असा मी म्हणताच नहिये.जोपर्यंत आपण स्वतः ती अनुभवत नाही तोपर्यंत ती आहे किवा नाही हे आपण खात्रीने सांगूच शकत नाही न . आणि मत मांडण्याच म्हणाल तर एखाद्या काल्पनिक, गोष्टील्या किवा सध्या सुध्या गोष्टींवर तुम्ही काहीही मतं मांडू शकता . पण देव , धर्म ह्याच्यावर मतं मांडताना भान ठेवायला नको का? कारण ह्या गोष्टी खूप sensitive अस्तत. तसं नसतं तर देव धर्मावरून दंगली वगेरे झाल्या असत्या का?

पण देव , धर्म ह्याच्यावर मतं मांडताना भान ठेवायला नको का? कारण ह्या गोष्टी खूप sensitive अस्तत. तसं नसतं तर देव धर्मावरून दंगली वगेरे झाल्या असत्या का?
देवधर्मावरून भावना भडकवणारे अन दंगली करणारे एकजात गाढव आहेत. (सॉरी गाढवांनो तुमचा अपमान करण्याचा हेतू नव्हता पण भाषेचे लिमिटेशन दुसरे काही नाही.) अन मी देव नाहीये वगैए काहीच विधान केलेले नाही. हा गैरसमज दूर करावा. अन भोंदूबाबांचं फावतं ते देव अस्तित्वात आहे म्हणण्याने नव्हे तर त्याच्याशी संबंधित भाकडकथांनाही तितकेच महत्त्व देण्याने.

>>>>अन भोंदूबाबांचं फावतं ते देव अस्तित्वात आहे म्हणण्याने नव्हे तर त्याच्याशी संबंधित भाकडकथांनाही तितकेच महत्त्व देण्याने. बरोबर आहे. ह्याबरोबर सत्ता, संपत्ती, यश, किर्ती, प्रतिष्ठा ह्यांच्या खर्‍या नि खोट्या हव्यासापायी सगळ्या (धर्माला नि देवाला सुद्धा) वेठीला धरलं जातं. दुर्दैवानं सगळ्याच संप्रदाय प्रमुखांनी देवाचं मार्केटिंग 'सिन्स बिगिनिंग' केलेलं आहे. बाकी देवानं काही करणं म्हणजे कुणा अतिमानवी व्यक्तिनं काही हस्तक्षेप करणं अशी अपेक्षा असेल तर ती चुकीची आहे एवढंच सांगू शकतो. :) बाकी कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न. मात्र एखाद्याची तहान भागवायचीच असेल तर ओंजळभर पाणी मिळेलच ह्याची खात्री आहेच्च. इत्यलम!

पण देव , धर्म ह्याच्यावर मतं मांडताना भान ठेवायला नको का? कारण ह्या गोष्टी खूप sensitive अस्तत
बाकी काय ओ म्हैसतै, बहुसंख्य महाराष्ट्रवासीयांचे कुलदैवत खंडोबा असताना त्याला थिल्लर म्हणताना तुमचे हे भान कुठे गेले होते हो?

हा प्वाइंट तर मी विसरलोच होतो वल्लीशेठ, आठवण करून दिल्याबद्दल आभार. म्हशे, खंडोबाबद्दल काहीबाही बरळताना ही अक्कल कुठे गेली होती हे सांग मग पाहू तुझी दत्तभक्ती अस्सल की बेगडी ते.

बाकी काय ओ म्हैसतै, बहुसंख्य महाराष्ट्रवासीयांचे कुलदैवत खंडोबा असताना त्याला थिल्लर म्हणताना तुमचे हे भान कुठे गेले होते हो?
म्हशे, खंडोबाबद्दल काहीबाही बरळताना ही अक्कल कुठे गेली होती हे सांग मग पाहू तुझी दत्तभक्ती अस्सल की बेगडी ते.
१० वेळा माझा खंडोबाच्या लेखावरचा प्रतिसाद वाचा . मी खंडोबाला थिल्लर म्हणलाय कि ५ बायकांशी लग्न करण्या मागच्या उद्देशाला थिल्लर म्हणलाय ते पुन्हा नित वाचा . तसाच मी असाही विचारला होता कि खंडोबा हे दैवत आहे ह्याचा referance द्य. आजपर्यंत खंडोबा कुणाला प्रसन्न झालाय ,त्याने भक्तांना दर्शन दिलाय असा आजपर्यंत कधी कुणी सांगितलाय का? किवा दत्तांवर जसे अनेक ग्रंथ आहेत . अनेक लीलाचरित्र आहेत , स्तोत्र आहेत आणि त्याचा दत्त अस्तित्वाचा अनुभव दत्ताभाक्तान्म्ना प्रत्यक्ष येतो तसा अनुभव खंडोबा भक्तांना आलाय का? वैरागी दत्त कुठे आणि दुसर्या स्त्रीच्या मोहात पडून म्हाळसाइ ला फसवून घर सोडून जाणारा खंडोबा कुठे? बाकी तुम्हाला खंडोबा बद्दल काय माहिती आहे ते सांगा अधि. कारण फक्त विरोधाला विरोध करणारा हा प्रश्न आहे असा मला वाटतंय