Welcome to misalpav.com
लेखक: प्यारे१ | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

चार पुस्तके लिहिल्याने अमुक दैवत मोठे होते हा शोध लावल्याबद्दल अभिनंदन म्हशे =)) म्हणजे देव मोठा करायचा तर तेसुद्धा माणसानंच करायचं म्हण की. आव आणायचा भक्तीचा पण करायची ईश्वरनिंदा हे कै खर्‍या भक्ताला शोभत नाही. दत्तभक्तांना चालत असेल तर माहिती नाही बॉ.

>>चार पुस्तके लिहिल्याने अमुक दैवत मोठे होते हा शोध लावल्याबद्दल अभिनंदन म्हशे नायतर काय !! बरं का म्हैसबाई, तुम्ही एकदा काय लिहायचं ते ठरवाच!! एका धाग्यावर देव सगळीकडे असतो म्हणता इकडे दोन देवांमध्ये भेदभाव? बाकी दत्तमहाराजांप्रमाणे खंडेरायाबद्दल कोणी पुस्तके लिहीली आहेत का हा प्रश्न विचारुन आपण पुन्हा एकदा आपल्या आयडीला जागल्या आहात हेवेसांनल.

=)) अहो म्हैसतै तुम्हाला जसा दत्त दैवत आहे असं वाटतंय तसा बाकीच्यांना खंडोबा हे दैवत का वाटू नये? खंडोबावर पण ग्रंथ आहेत. महाराष्ट्राची चार दैवते हे ग. ह. खर्‍यांचे किंवा दक्षिणेचा लोकदेव खंडोबा हे ढेर्‍यांचे ही पुस्तके वाचा जरा. मग सगळे रेफरन्स मिळतील. बाकी माझं जाऊदे, मी देव वैग्रे काही मानत नै. पण दुसर्‍या देवांवर टिका करतांना आपण आपलेही भान सोडत आहोत हे जरा ध्यानात ठेवा म्हणजे झालं.

प्यारे , batman माझ्या प्रतिसादामध्ये मी कोणाचा वैयक्तिक उल्लेख केला नहिये. पिलियन रायडर ने batman चा नाव त्यांच्या प्रतिसादात घातल्यामुळे साहजिक रोख batman कडे गेला

चार पुस्तके लिहिल्याने अमुक दैवत मोठे होते हा शोध लावल्याबद्दल अभिनंदन म्हशे
मी काय म्हणतेय ते तुला समजतंय का? पुस्तके वाचल्याने दत्त अस्तित्वाचा अनुभव येतो असा म्हणलाय मि… आधी नित काय लिहिलंय ते वाच अन मग खरड .
महाराष्ट्राची चार दैवते हे ग. ह. खर्‍यांचे किंवा दक्षिणेचा लोकदेव खंडोबा हे ढेर्‍यांचे ही पुस्तके वाचा जरा
हि फक्त माहिती अहे. एखादी गोष्ट सांगावी तशी …. त्याने खंडोबाचा साक्षात्कार झालाय का आजपर्यंत कुणाला? अहो सगळ्या महाराष्ट्राच काय ? माझाही कुलदैवत पालीचा खंडोबा आहे . आणि खंडोबाची बहिण मानली गेलेली इंजाबाई कुलदेवी आहे . वर्षानुवर्षे आम्ही सुधा खंडोबाची भक्ती केलीये ……. आमच्या देव्हार्यात खंडोबाचे टाक आहेत . केवळ लहानपणापासून हे आपला कुलदैवत आहे हे मनावर ठसाव्ल्यामुळे ……. आणि संपूर्ण महाराष्ट्राचीही हीच धारणा असेल तुम्ही नीट बघितलं तर खंडोबाच्या बाबतीत नुसतीच कर्मकांड , जत्रा उरूस वगेरे आहेत. महाराष्ट्राच कुलदैवत असला भक्ती अशी नहिच.

म्हशे, तुला माहिती नाही म्हणून खंडोबाची प्रचीती कुणाला येत नाही असे धडधडीत खोटे विधान कसे करू धजावलीस? सांप्रदायिक झापड सोडून अन्य देवतेकडे बघायची कुवत नसेल तर फायदा काय? खंडोबाचे भक्त तुला ठाऊक नसतील म्हणून काय झालं? अशी मुक्ताफळे उधळण्याचा अधिकार तुला कोणी दिला?

असं कसं ? देव नसतो आणि त्याची प्रचिती येऊच शकत नाही असे विधान विज्ञानवादी करतात ते चालतं आणि म्हशीचं बोलणं नाही चालत ! दिस इज नोत फेअर... आयटेल्यु संपादित

मा.श्री. ज्यांनी हा प्रतिसाद संपादित केला त्यांसः फेअर आणि ब्रौन यांमधील मजेने केलेली कोटी समजली नसेल तर संपादित करणे हे उत्तर नव्हे.

@त्याने खंडोबाचा साक्षात्कार झालाय का आजपर्यंत कुणाला?>>> =)) मला...मला झालाय

खंडो"बा

चा साक्षात्कार! येथे असंख्य धाग्यांवर खंडन करत फिरतो नाही का तो खंडो'बा! समांतर- चक्क आपण ज्याच्याशी भांडतोय..तोच हा आपला खंडोबा'चा नवा अवतार...ही साधी अनूभूती दत्तसांप्रदायिक आध्यात्मिक म्हैशीस(अजूनपर्यंत) येऊ नये,याचं आंम्हास लै लै आश्चर्य वाटतं! http://www.sherv.net/cm/emo/laughing/yellow-laughing-smiley-emoticon.gif

हो पण त्यावेळेस म्हणे दत्त महाराज खंडोबाला भेटायला आले होते.. सहज ! त्यांनी कमंडलूतील पाणी फेकले. त्या थेंबांचे भुंगे झाले आणि पुढचं घडलं. आमच्या आगामी दत्त वर्सेस्स खंडॉबा या पुस्तकात सर्व दिले आहे. आगाऊ मागणी खरडीत करावी,.

हो. जेजुरीच्या खंडोबाची, वेरूळच्या कैलासनाथाची, भुलेश्वरच्या महादेवाची पण अशीच काहीशी गोष्ट आहे. =))

व्हाया मुलखेड मार्गे ;) आहे ते! इसमें कौनसी बडी बात हो गयी जी? अजी गॉड तो गॉड होते है जी! और वैसे भी मिपा पे अवांतर तो यु एस पी है ना जी? -विनय पाठक मोड चलो दिल्ली!

थांबा थांबा बॅटमन.. "देव नसतो आणि त्याची प्रचिती येऊच शकत नाही" असे विधान तुम्ही करता आहात असा सरळसरळ आरोप मारकुटे तुमच्यावर करताहेत.. तुम्हाला हे मान्य आहे का? बॅटमन.. उत्तर द्या... हो किंवा नाही .. प्यारे.. तुम्ही थांबा.. तुम्हाला मी नंतर वेळ देणार आहे. बॅटमन तुम्ही उत्तर द्या.. वाचकांचा कौल बघूया.. "दत्तकथांना भाकड म्हणावे की नाही" १ टक्का "माहीत नाही" असं म्हणताहेत ९९ टक्के "हे थांबवा" असं म्हणताहेत.. ब्रेकनंतर मी थेट प्यारे यांच्याकडे जाणार आहे.. तोपर्यंत ..

स्कोर सेटलींग म्हणायचं हा नवा पलायनवाद आहे! कथा बोगस आहे कारण वर्णन केलेल्या गोष्टी वास्तविक नाहीत. आणि कथेचा अर्थ काहीही काढा; हे कन्क्लूजन :
विचारांची क्लॅरिटी असेल तर भगवंत स्वतः घरी येतात असा बोध ह्या कथेमधून घेता येतो.
बेसलेस आहे कारण कुणाच्या घरी कुणी येत नाही. मुळात दत्त असं कुणी नाहीच तर येणार कोण? लेखात शेवटी तर भलताच यू टर्न मारला आहे:
जास्त डिटेल्स नकोत पण जेव्हा सगळं अत्यंत शांत असतं तेव्हा दत्ताचं दर्शन झालं असं म्हणायचं.
शांतता आरती पूर्वी होतीच! आरती नंतरची आणि पूर्वीची शांतता एकच आहे. तस्मात आरती व्यर्थ आहे. ________________________ याव्यतिरिक्त लेखकानं प्रतिसादात पूर्वप्रकाशित लेखाचा संदर्भ दिलायं ते लेखन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या लेखावरची सहजची ही कमेंट :
स्पष्ट मत - सगळा शब्दछल आहे. लिहणारे पण तेच, अर्थ समजवणारे पण तेच. पुन्हा जुने शब्द / मत खोडून कालानुरुप नवे मत सांगणारे पण तेच. कित्येक शतकानुशतके ह्या अश्या मांडण्या करुन विशिष्ट लोकांची पोटे भरली, पण अजुन पुरे झाले नाही आहे असेच दिसते.
सगळं सांगून जाते त्यामुळे या लेखालाही लागू आहे! (संपादित)

तुम्ही थकाल पण काही उप्योग होणार नाई. जाऊ द्या बसा निवांत मजा पहात... माणसानं स्वतःला सुधारावं दुसर्‍याला सुधरण्याच्या भानगडीत पडू नै ! काही उपेग होत नै... लै आले गेले... कुनी सुधरलं नाई... हे नाही तर ते चालूच आहे घ्या मळा थोडी मारा फक्की आन मजा घ्या

आरती नंतरची आणि पूर्वीची शांतता एकच आहे. तस्मात आरती व्यर्थ आहे.> जन्मण्यापूर्वीची आणि मेल्यानंतरची अवस्था एकच आहे. तस्मात जगणं व्यर्थ आहे! :D

आश नाझ्ग दुर्बातुलुक, आश नाझ्ग गिम्बातुल, आश नाझ्ग थ्राकातुलुक, अघ बुर्झुम ईशी क्रिम्पातुल!!!! हे काय आहे? आणि तुझ्यासाठी "नाका वलच्या लागाला औशध कॉय.." हे गाणं म्हणु का?

हे काय आहे?
लॉर्ड ऑफ द रिंग्ज नामक प्रकार ठाऊक असेलच. त्यातल्या त्या सॉरॉननिर्मित रिंगवरचे एल्व्हिश लिपीतले आणि मॉर्डॉरच्या ब्लॅक स्पीच मधले इन्स्क्रिप्शन आहे. त्याचा अर्थ "One ring to rule them all, one ring to find them, one ring to unite them all and in the darkness bind them" असा होतो.
आणि तुझ्यासाठी "नाका वलच्या लागाला औशध कॉय.." हे गाणं म्हणु का?
स्वतःसाठी म्हणा खरे तर ;)

अखिल विश्वात एक शक्ती भरून राहिली आहे, मग तिला निसर्ग, प्रकृती, चेतना, प्राण, देव, ईश्वर काहीही म्हणा; इथपर्यंत ठीक आहे. पण पुढे या शक्तीला दिलेले सगुणस्वरूप ही निव्वळ मानवाची कल्पना आणि निर्मिती आहे. मानवाने आपल्या सुखासाठी, स्वास्थ्यासाठी, मानसिक स्थैर्यासाठी अनेक संकल्पना आणि रचनांची निर्मिती केली. त्यातल्या काही ऐहिक तर काही तात्त्विक. घरे ,रस्ते, वीज, पाणी, संगणक, अणुविज्ञान, टेलिफोन, स्तोत्रे, आरत्या, माहात्म्ये, चरित्रे, मंत्र, तंत्र, तर्क,न्याय हे सर्व मानवनिर्मित आहे. (जरी यातली काही वेदांगे आहेत आणि वेद अपौरुषेय मानले तरी). आता यातल्या काहींच्या अतिरेकाचे काही हानिकारक परिणाम झाले, साइड-ईफेक्ट्स झाले, हेही मान्य व्हावे. जसे, पर्यावरणाची हानी, ग्लोबल वॉर्मिंग, अणुयुद्धे, नरसंहार, आत्यंतिक सुखलोलुपतेमुळे शारीरिक आणि मानसिक सौख्याचा विनाश वगैरे. याचे एक कारण सुचते, ते असे की ही सर्व मानवनिर्मित संसाधने (अथवा साधने म्हणू) कशी वापरायची तेही मानवानेच ठरवले. (दुसरे कोण ठरवणार? मानवनिर्मित ईश्वर तर 'मानवनिर्मित अणुबाँब मानवावरच टाक', अशी आज्ञा करीत नसणार? आता 'ईश्वरानेच तशी बुद्धी मानवाला दिली' असे म्हटले तर वादच खुंटला.) या साधनांचा योग्य वापर करण्यात मानवाची बुद्धी कमी पडली/पडते, म्हणून हे श्रद्धेचे, अंधश्रद्धेचे, भोंदू बाबांचे, जपतप-अनुष्ठानाचे, निष्क्रियतेचे, जबाबदारी झटकण्याचे प्रश्न निर्माण होतात. समजा आरंभी देवाने ही सृष्टी निर्माण केली असे मानले तरी पुढची जबाबदारी मानवावरच आहे. "....पुरोवाच प्रजापति:, अनेन प्रसविष्यध्वम, एष वोsस्त्विष्टकामधुक" असे त्यानेच म्हणून ठेवले आहे. अगदी कर्मफल आणि पुनर्जन्म मानला तरी या जन्मात आपली बुद्धी वापरून योग्य आचरण करण्याची जबाबदारी केवळ मानवाची आहे. ती देवावर ढकलून उपयोगाचे नाही. चित्त एकाग्र आणि विकाररहित राखू शकल्यास अधिक सूक्ष्म आकलन होऊ शकते, निर्णयक्षमता वाढते हे आपण अनुभवतो. त्यासाठी काही मार्ग सांगितले आहेत. पण ही अधिकची आकलनशक्ती, ज्ञान का मिळवायचे, हे मानवाने ठरवायचे आहे. आजपर्यंत मानव प्रत्येक गोष्ट त्याच्या आदिम प्रेरणेनुसार केवळ स्वान्तसुखाय करीत आलेला आहे. देव पाहिजे, कशासाठी तर मानवाच्या सुखासाठी. पर्यावरण जपले पाहिजे, मानवाच्या हितासाठी. गाय उपयुक्त पशू आहे,कारण ती आपल्यासाठी दूध देते (तिच्या वासरांसाठी नव्हे). अशा तर्‍हेने हे विश्व मानवकेंद्रित आहे असे धरूनच मानव वागतो. सर्व सृष्टी जणू मानवाने स्वतःसाठी वेठीला धरली आहे. त्यात 'देव' ही कल्पनासुद्धा आलीच.

प्रतिसाद आवडला. मात्र आपण म्हणता तसं हा एक सर्वंकष मानवजातीचा जबाबदारीचा भाग झाला. मात्र साधारणतः दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सगळ्या जगाशी घेणंदेणं नसतंच. आपल्या रुटीनमध्ये आवश्यक घ टकांचा विचार करुन त्या अनु षंगानं जर आपण आ धीच श्रद्धापूर्वक एखादी उपासना करत असू तर अशा प्रकारच्या विचाराचा उपयोग व्हावा असं मत आहे. आजदेखील (किंबहुना हल्ली जास्त) अनेकानेक लोक सगुणोपासनेमध्ये आपली मनःशांती शोधतात. दत्त जयंती साजरी होते हे वास्तव आहे. जर ती तशी होत असेल तर एखाद्या देवळात जाऊन 'बंद करा हे सगळं, दत्त वगैरे काही नाहीये, उगाच वेळ काढताय कशाला' म्हणून उपयोग नाही ना? श्रद्धा आहे तर तिचा फोकस अशा पद्धतीनं ठेवल्यास जास्त उपयोग होईल असं सांगणं जास्त समावेशक नाही का? बाकी वर लेखात म्हटल्याप्रमाणं समीकरण सोडवण्यासाठीचा क्ष नंतर विसर्जीत करावा नि गोडबोलेंना दिलेल्या प्रतिसादात रिझल्ट मिळाल्यावर सिस्टीम देखील सोडून द्यावी ह्याकडं कुणाचं लक्ष गेलं नाहीये का? असो!

रिज़ल्ट काय हवा ह्याविषयीच तर भ्रांती आहे. अख्खी गीता स्थितधी: होण्यासाठी उपाय सांगते. किंबहुना तेच लक्ष्य आहे असेही सांगते. कारण बुद्धी स्थिर झाली की कर्माकर्माचा विवेक होऊ शकतो. पण आपण तर कर्म काय असावे हे आपल्या तुटपुंज्या आणि अस्थिर बुद्धीच्या साहाय्याने आधीच ठरवू पहातो आणि तदनुसार कृती व्हावी म्हणून प्रार्थना/जप/अनुष्ठान.......इ. करतो. लक्ष्य कोणते असावे हे जाणण्यासाठी या साधनांचा उपयोग झाला तर ते योग्य ठरेल. पण आपण इतके दुटप्पी की लक्ष्य अपूर्ण अशा मानवी बुद्धीने (आधी) ठरवतो आणि ते गाठण्यासाठी देवाची मदत मागतो. आणि रिज़ल्ट मिळाल्यावर सिस्टिम सोडून द्यावी असे नाही. कारण रिज़ल्ट तात्पुरता असू शकतो त्यामुळे सिस्टिमला रोज घासूनपुसून लख्ख ठेवणे जरूरीचे असते. ऐहिक यश हवे असेल तर ते कितीही मिळाले तरी कमी पडते. 'हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते'. सिस्टिम सोडली म्हणजे शिस्त मोडली. अमुक एक गोष्ट मिळाली,आता समाधान झाले, असे असते का? शाश्वत समाधानाचा मार्ग वेगळा आहे, तो या (अनुष्ठानादि) अंगांनी बहुधा सापडत नाही. मुंगी होऊन मुंगीच्या मार्गाने किंवा पक्षी होऊन आकाशमार्गाने फळाप्रत जावे हे काही एका टप्प्यापर्यंत ठीक. मुद्दलात जे दिसते तेच आणि तिथेच फळ असते का, की तिथे पोचल्यावर भ्रमनिरास होणार असतो? आपण ठरवलेल्या आणि अंदाजलेल्या फळाप्रत पोचण्यात इतकी शक्ती खर्च होते की पुन्हा मागे वळून दुसरा मार्गही अनुसरता येत नाही. हे असे होते याचे कारण आपण फळ ठरवलेले असते. आपण साध्यावर लक्ष्य केंद्रित करतो, साधनावर नाही. म्हणून साधनशुचिता(सुद्धा) महत्त्वाची.

रिझल्ट काय ? आत्यंतिक शांती, तृप्ती, समाधान नि आनंद. कुठल्याही व्यक्ती, वस्तू अथवा परिस्थिती असण्या अथवा नसण्यानं न बदलणारा आनंद. स्वत: स्वतःशी प्रामाणिक राहून तो शोधायचा. शोधायचं कुणाकडं? त्याचेही क्रायटेरिया ठरलेत. आहे. सगळं आहे. जुन्या पुस्तकांमध्ये (ग्रंथ) आहे. आपलं लक्ष नसतं. स्थितप्रज्ञ कोणास म्हणावे? आहे की! त्याच्याकडेच जावं? तो नसेल तर तसं बनण्याचा प्रयत्न करता करता वाट सापडते. भक्त कोण? यो मद्भक्त स मे प्रियः - कोण? अनपेक्ष, शुचि दक्ष, उद-आसीन, गतव्यथा, सर्वारम्भ परित्यागी. जो हर्षाच्या, शोकाच्या लाटेत वाहत नाही, ज्याच्या कांक्षा नसतात. शुभ अशुभाच्या संकल्पना स्वच्छ आहेत तो. मार्ग वेगळे असले तर साधन सुद्धा सांभाळावं लागतंच. फरगेट सिस्टीम म्हणताना रिझल्ट मिळाल्यावर ती सोडायचीये. आधी नाही. नंतर देखील सोडायची, मोडायची नाहीच.