Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न झाले होते काय ?

ब
बबन ताम्बे
Mon, 09/22/2014 - 16:31
🗣 160 प्रतिसाद
नुकताच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या तुळापुरला भेट देवून आलो. तसेच "छावा" कादंबरी आणि अजून एक चरित्र पण वाचून काढले. एका प्रश्नाचे अजून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी काही प्रयत्न केले होते की नाही या प्रश्नाचे. संभाजी महाराजांना कोकणात संगमेश्वरला मुघलांनी पकडले आणि तिथून तुळापुरला आणले. संगमेश्वर ते तुळापुर अंतर जवळ्जवळ ३०० कि.मी. आहे. त्यावेळची वहातुकीची साधने लक्षात घेता आणि बंदोबस्तात आणण्यासाठीचा खटाटोप बघता तुळापुरला महाराजांना आणण्यास बरेच दिवस लागले असतील. तर या दरम्यान संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी प्रयत्न केल्याचे उल्लेख असलेले कुठले पुस्तक/कागदपत्रे आहेत काय? संभाजी महाराजांना नेत असताना मराठ्यांनी मुघलांच्या सैन्यावर हल्ला करुन राजांची सुटका करायचा प्रयत्न केला होता काय? काय झाले त्या प्रयत्नांचे?

प्रतिक्रिया द्या
99132 वाचन

💬 प्रतिसाद (160)
श
श्रीगुरुजी गुरुवार, 09/25/2014 - 09:02 नवीन
>>> शिवरायांच्या नावे पक्ष चालवणारे दांडगाई दंगेधोपे खंडण्या उकळत नाहीत असा समज झाला आहे काय? शिवचरित्र सांगुन पोट भरणे गैर नसावे, पण खोटे शिवचरित्र सांगून फसवणे गैर आहे. ते सांगतात ते शिवचरीत्र खोटे हे कोणी ठरविले? ब्रिगेडींनी की काँ-राकाँच्या पुढार्‍यांनी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 09:26 नवीन
त्यांनीच स्वतःच खोटे ठरवले. शिवराज्याभिषेकाच्या वेळी रामदास स्वामी अचानक प्रकट होतात आणि राजांना आशिर्वाद देतात हा प्रसंग एका नाटकात एका पोटार्थीने दाखवला होता,अशी कोणतीच घटना इतिहासात घडली नसताना दाखवण्याचे प्रयोजन काय हे पोटार्थी सांगत नाहीत. अर्थात महाराजांच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला मुस्लिमविरोधी बनवण्याचा हा खटाटोप होता व त्याचा सोशिओपॉलिटीकल लाभ उठवायचा यांचा प्रयत्न नेहमीच चालू असतो .अशा पोटार्थींच्या भाकडकथांना इतिहास मानणारे खरे मुर्ख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मृत्युन्जय गुरुवार, 09/25/2014 - 13:08 नवीन
एका नाटकात नाटक म्हणजे काय असते ते माहिती आहे ना तुम्हाला नेफळे? नसेल तर आधी ते माहिती करुन घ्या. काही पोटार्थी तर सध्या पिसाळा आणि गण्या हरामी नव्हते हे सिद्ध करण्याच्या मागे लागले आहेत. त्यांच्याइतके दुर्दैवी पोटार्थी तेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 14:02 नवीन
ऐतिहासिक विषयातले नाटक आणि काल्पनिक विषयावरचे नाटक यातला फरक समजतो का मृत्युंजय? उद्या मी समर्थांवर नाटक लिहिले आणि त्यात समर्थांना मुस्लिम साधू म्हणुन दाखवले तर 'आर्टीस्ट लिबर्टीच्या' नावाखाली मला सूट देणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय गुरुवार, 09/25/2014 - 14:38 नवीन
घाशीराम कोतवला नाटक आठवतं का नेफळे साहेब? सिनेमॅटिक लिबर्टी हा प्रकार कळतो का आपल्याला? जवळ जवळ सग्ळ्या ऐतिहासिक / पौराणिक नाटकात / चित्रपटात ती घेतली जातेच. बाकी भवानी तलवारीबद्दल आपले काय मत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 14:47 नवीन
सिनेमॅटीक लिबर्टी घ्यायला प्रत्येकालाच सूट आहे, परंतु ऐतिहासिक विषयात जास्त लिबर्टी नको. उदा:- अफजलखानाचा वध या प्रसंगात खानाचे शिवाजींशी झालेले संभाषणाचा पुरावा नाही ,परंतु प्रसंगानुरुप संवाद घातले तर ठीक आहे. शिवराज्याभिषेकात रामदास स्वामी उपस्थीत असल्याचा एकही पुरावा नाही. त्यामुळे ती घटना घुसडणे ही इतिहासाची मोडतोड आहे व अशी मोडतोड करण्यासाठी काही धार्मिक संघटनाही तथाकथीत इतिहासकारांना(?) फूस लावत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
न
नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 14:56 नवीन
भवानी तलवारीविषयी काय मत आहे
हा गैरसमज हिंदुत्ववाद्यांनी पसरवलेला आहे. अशा कुठल्याही घटनेची नोंद नाही. नैतिकता निर्भयता निती या तत्वाने सामान्य माणुसही सर्वाच्च पदी पोचतो याचे शिवाजी उदाहरण आहे, परंतु सगळे समर्थकृपेने आणि देवांच्या कृपेने घडले , त्यामुळेच राजे स्वराज्य निर्मिती करु शकले ,असा समज पसरवून राजांच्या अंगभुत गुणांचे महत्व कमी करण्याचा व पर्यायाने प्रयत्नवादा वर विश्वास असणार्याचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न पोटार्थींकडून केला गेला असण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
म
मृत्युन्जय Fri, 09/26/2014 - 07:34 नवीन
आजचे पोटार्थी स्वतःच्या मतानुसार नसती लिबर्टी घेउन प्रसंगांचे निराळेच अर्थ लावुन नविन इतिहास लिहुन पिसाळ आणी गण्यासारख्या हराम्यांना निर्दोष ठरवण्याच्या भानगडीत आहेत हे तुम्हाल खुपत नाहिसे दिसते. ज्याने स्वतःच्या बहिणीला आणी मेव्हण्याला विकले तो कसला आलाय निर्दोष म्हणा. त्याची लायकी दिसतेच, अश्या लोकांना काय म्हणतात ते ही सगळ्यांना माहिती आहेच. असो. समर्थ रामदास महाराजांचे गुरु असल्याने त्यांचे आशिर्वाद नेहमीच महाराजांच्या पाठीशी होते. ते राज्यरोहणाप्रसंगी उपस्थित होते की नव्हते ते गौण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Fri, 09/26/2014 - 08:51 नवीन
समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते
इतिहासात याला कोणताही भक्कम आधार नाही, शिव समर्थ भेट 1673ला झाल्याचा एक पुरावा आहे, परंतु तो समकालीन नाही ,पेशवेकालीन आहे. त्यामुळे समर्थ शिवाजींचे गुरु नव्हते असा निष्कर्ष काढता येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Fri, 09/26/2014 - 08:57 नवीन
चूक, मुळात शिवकालीन पुरावेच कमी आहेत. त्यामुळे निष्कर्ष आणि संदर्भ केवळ नंतर उपलब्ध झालेल्या बखरीतुन आणि दस्तावेजातुनच मिळु शकतात. जर तत्कालीन दस्तावेजच फक्त मान्य करायचे झाले तर बर्‍याच हिंदु राजांचे अस्तित्वच नाकारायला लागेल आणि खुद्द महाराजांबद्दल फार कमी माहिती मिळते. आणि मग त्या प्रवाहात तुम्हाला बर्‍याच सरदारांचे अस्तित्व किंवा त्यांच्या कर्तुत्वाकडे डोळेझाक करावी लागेल. तथाकथित इतिहास मोडतोडक तसे करताना दिसत नाहित. स्वतःला पाहिजे तेवढेच निष्कर्ष काढणे याला सिलेक्टिव्ह रीडिंग म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
आ
आबा Wed, 12/09/2015 - 11:42 नवीन
http://misalpav.com/comment/778384#comment-778384
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
पैसा गुरुवार, 09/25/2014 - 13:13 नवीन
जल्लां काय कल्लां नाय. रामदासस्वामींना नमस्कार केला म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमविरोधी कसे ठरतात? खर्र सांगा. तुम्ही आयुष्यात कधीच कोणत्या देवळात गेला नाहीत का एखाद्या देवाला नमस्कार केला नाही. बरोबर ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
प
पिंपातला उंदीर गुरुवार, 09/25/2014 - 14:09 नवीन
काथ्याकुटात एका पार्टी ने दुसऱ्या पार्टी चे विरुद्ध मत मेगा बायटि चर्चे नंतर सपशेल मान्य केले असा दाखला मिपा च्या इतिहासात आहे का यावर कोणि इतिहास संशोधक संशोधन करेल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
न
नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 14:12 नवीन
हेच की महाराज फक्त हिंदू संतांचे आशिर्वाद घ्यायचे असे दाखवणे, वास्तवात रामदासांच्या धार्मिक भूमिकेशी शिवाजींना काही देणं घेणं नव्हतं. शिवाजी हे राजकीय व्यक्तीमत्व होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 09/26/2014 - 09:04 नवीन
कोण म्हणतोय असं की महाराज फक्त हिंदूना नमस्कार करत म्हणून? महाराजांनी कित्येक मशिदी दर्ग्यांना नेमणुका दिल्याचे पुरावे आहेत. अफझल्याच्या दर्ग्याला सुद्धा सगळी व्यवस्था लावून दिली होती. ते कोण नाकारतोय का? मग तुम्हीच असे एकांगी का विचार करताय? बादवे, मोगलाई हा शब्द वाचून अगदी काळजात कालवाकालव झाली हो! ते एक असोच. निदान तुम्हा लोकांच्या फुसक्या भांडणातून त्या महान छत्रपतींना तरी वगळा हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 09/26/2014 - 09:14 नवीन
निदान तुम्हा लोकांच्या फुसक्या भांडणातून त्या महान छत्रपतींना तरी वगळा हो! महान लोकांच्याबद्दल गदारोळ करूनच महान फायदे उपटता येतात ना ?! फुसक्या लोकांबद्दल केलेल्या गदारोळाला कोण काय महत्व देणार, आणि मग फायदा कसा होणार ?! :) :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मृत्युन्जय Fri, 09/26/2014 - 09:09 नवीन
महाराजांनी समर्थ रामदासांना नमस्कार केला म्हणजे ते मुस्लिम्द्वेष्टे कसे झाले ब्वॉ. म्हणजे उद्या आम्ही देहु ला जाउन डोके टेकवुन आलो की धर्मांध झालो की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Fri, 09/26/2014 - 10:07 नवीन
राजे मुस्लिम राजवटी विरुद्ध लढले, म्हणुन ते मुस्लिम विरोधक कसे ठरतात? स्वराज्य संस्थापक राजे होते, हिंदवी स्वराज्य हा कल्पनाविलास कुणाचा ब्वॉ? मुंबईतल्या परप्रांतियांना विरोध बहुतांशी मराठी माणसे करतात, बहुसंख्य परप्रांतिय हिंदु आहेत, याचा अर्थ मराठी माणुस हिंदूद्वेष्टा ठरतो काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Fri, 09/26/2014 - 10:09 नवीन
तुम्ही तुमचीच वाक्ये प्रश्नरुपात का टाकता आहात? नाही म्हणजे असे मी तरी कुठे लिहिलेले दिसत नाही म्हणुन विचारले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
इ
इरसाल Fri, 09/26/2014 - 11:10 नवीन
अस हेकलिंग करुन मी घाबरणार नाही. मिपावरील सन्मान्य धुरंदर हे मान्य करतील की शिवरायांनी ज्याची बोटे तोडली तो कोन होता, ज्याचा कोथळा काढला तो कोण होता, ज्याच्या मागे हात धुवुन लागले तो कोण होता,मग ते त्यांच्या विरुध्ध नव्हते असे कसे म्हणता तुम्ही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
न
नानासाहेब नेफळे Fri, 09/26/2014 - 11:54 नवीन
शिवाजी राजे एक धर्मनिरपेक्ष व्यक्तीमत्व होते ,ते फक्त दुजर्नांच्या विरोधात होते, कुठल्या धर्माच्या नाही. महाराजांना सर्वधर्मसमभाव असलेले स्वराज्य अपेक्षीत होते ,ते त्यांनी स्थापन केले, परंतु काही इतिहासकार(?) त्यांनी फक्त हिंदवी स्वराज्य स्थापन केले असा दावा करतात, जो अर्थात चूक आहे. राजेंनी मुस्लिम राज्यकर्त्यांना पराजीत केले, म्हणुन ते मुस्लीम धर्माच्या विरोधात होते असा दावा करणारे लोक चंद्रराव मोरे खंडोजी खोपडे आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी इत्यादी हिंदूंची राजेँनी केलेली खांडोळी पद्धतशीरपणे लपवून ठेवतात, या न्यायाने राजे हिंदुविरोधी ठरतात काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
अ
अनुप ढेरे Fri, 09/26/2014 - 12:05 नवीन
मुस्लीम धर्माच्या विरोधात होते असा दावा करणारे लोक चंद्रराव मोरे खंडोजी खोपडे आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी इत्यादी हिंदूंची राजेँनी केलेली खांडोळी पद्धतशीरपणे लपवून ठेवतात,
जर बाबासाहेब पुरंदर्‍यांबद्दल म्हणत असाल तर त्यांनी त्यांच्या शिवचरित्रामध्ये व्यवस्थित उल्लेख केलेला आहे या लोकांचा. त्यांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते हेही लिहिलं आहे. शिवाजींनी कधीही कुठल्याही इतरधर्मिय प्रार्थना स्थळाला धक्का पोचवला नाही हेही स्वच्छ लिहिलं आहे. केवळ जात बघून एखाद्या इतिहास अभ्यासकाला शिव्या घालणार्‍या बिर्गेडी लोकांना हे समजणार कसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
प
पैसा Fri, 09/26/2014 - 14:32 नवीन
गई भैंस पानी में! इरसालभौ, सन्माणणीय णेफळे यांणी डोळ्यावर चष्मा लावल्याणे तुमचा उपहास त्यांच्या डोक्यावरूण णिघूण गेला आहे हे जाहीर करण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
ब
बबन ताम्बे Fri, 09/26/2014 - 16:25 नवीन
यात काय सापडते का बघा. http://www.scribd.com/doc/24975847/Letter-to-King-Jai-Singh-by-Shivaji-Maharaj
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
व
विनोद१८ गुरुवार, 09/25/2014 - 17:33 नवीन
हे सांगशील का ?? ते तसे दाखविणारा तो पोटार्थी कोण ?? त्याने (पोटार्थी) ते तसे दाखविण्याचे प्रयोजन काय ? असा प्रश्ण तुला पडला, म्हणजेच तु त्या नाटकावर इतक्या बारकाइने सांगोपांग विचार करू शकतोस याचे मला आश्चर्य नाही वाटले पण चकीत मात्र झालो. बरे तो प्रसंग दाखविल्यामुळे महाराजांच्या सेकुलर प्रतिमेला धक्का बसला, अगदी तुलासुद्धा बसला असे तुझ्या प्रतिक्रियेवरुन जाणवले. तर अशा पोटार्थ्याने लिहीलेल्या व भाकडकथांनी सजविलेल्या नाटकांना तु मात्र न चुकता हजेरी का लावतोस हे सांग आधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 19:03 नवीन
देशात घटनेचं राज्य आहे, कुण्याही फडतुस पोटभरुने सुपार्या घेऊन इतिहासाची मोडतोड करावी वा तसे आपल्या कलाकृतीतून दाखवायला ही मोगलाई नाही, त्यामुळे मी नाटक का बघितले हा प्रश्न गौण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८
न
नानासाहेब नेफळे गुरुवार, 09/25/2014 - 19:20 नवीन
ता .क .-ब्रिगेडींनी इतिहासाची केलेली मोडतोड हा ही पोटार्थी व राजकीय हेतुन प्रेरित प्रकार आहे, त्याचाही निषेध केला पाहीजे .परंतु या देशात इतिहासाचा वापर करुन धार्मिक वा जातीय सलोखा बिघडवण्याचे काम ज्या लोकांनी इमानेइतबारे केले, त्यांनीच पेरलेले काटे आज त्यांच्या पायात रुतत आहेत. ब्रिगेडींचा विखार हे त्यांना प्रत्युत्तर आहे, अर्थात त्यांचा मार्ग हा योग्य मार्ग नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
म
मृत्युन्जय Fri, 09/26/2014 - 07:40 नवीन
महाराष्ट्रात इतिहासाचा वापर करुन या देशात धार्म्मिक अथवा जातीय सलोखा बिघडवला फक्त बीग्रेडींनी. इतर कोणीही कधीही इतिहासाचा वापर इतर लोकांच्या द्वेषाखातर केलेला नाही. शिवाय इतर कोणीही इतरांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी देवांच्या मुर्ती फोडण्याची कामे केलेली नाहित. स्वातंत्र्यपुर्व काळात मुस्लिम धर्मांधांनी हिंदुंची देवळे फोडली त्याबद्द्ल मी काही बोलत नाही. अफजलखान आणि शाइस्तेखानाने ते पवित्र काम भोसले, मोरे इत्यादी मराठी सरदारांच्या साक्षीनेच केले. मराठी माणूसच जिथे गद्दार झाला होता तिथे त्या धर्मांधांना काय शिव्या घालायच्या म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
व
विनोद१८ Fri, 09/26/2014 - 03:35 नवीन
..म्हंजे नेमके काय रे नान्या ?? मी हे नवीनच काहीतरी प्रकरण वाचतोय आज, तु मिपाकरांचे याविषयीचे कुतुहल वाढ्विलेस हे नक्की. केवळ तुझ्यामुळेच आज आम्हा मिपाकरांना या विषयीची अधिक ज्ञानप्राप्ती होइल म्हणजेच आमचे याविषयीचे अज्ञान दूर होइल असे मी छातीठोकपणे समजु शकतो काय, नान्या. ?? तेव्हा याविषयी अधिक सविस्तर टंकण्याचे कष्ट यापुढच्या तुझ्या प्रतिसादात घे. आता आपण आपल्या मुळ मुद्द्यावर येउया. त्या कुणा एका फडतूस पोट्भरु व सुपार्या घेणार्या व इतिहासाची मोड्तोड करणार्या माणसाने लिहीलेल्या व तु ते तुझ्या घटनादत्त अधिकारात पाहिलेल्या नाटकाचे नाव रे काय ?? तुझ्यासारखेच मीसुद्धा ते माझ्या घटनादत्त अधिकारात पुन्हा पुन्हा पाहीन म्हणतो, ते तु मला सांगशील काय रे नान्या ?? बरे तुझ्या प्रतिसादातल्या १९वा शब्द नक्की 'मोगलाई' असा वाचावा कि 'मोदीशाही' ??? नान्या, तुझ्यासारख्या विद्वानाने एक भाकड नाटक वारंवार पाहणे हा प्रश्न गौण कसा काय ?? मला वाटते मी विचारलेल्या प्रश्णांना मुद्द्यापासुन न भरकटता उत्तरे द्यावीस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
क
काळा पहाड गुरुवार, 09/25/2014 - 09:52 नवीन
ते सांगतात ते शिवचरीत्र खोटे हे कोणी ठरविले? ब्रिगेडींनी की काँ-राकाँच्या पुढार्‍यांनी?
थोडक्यात, मुसलमानांच्या पाटाचं पाणी नानेखानांच्या आडात आलंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मृत्युन्जय गुरुवार, 09/25/2014 - 12:43 नवीन
:) . अल्लाह मार डाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
व
विजुभाऊ गुरुवार, 09/25/2014 - 07:56 नवीन
तत्वाशी प्रामाणिक तर हिटलर सुद्धा होताच की. तत्व चुकीचे होते ही गोष्ट वेगळी.
त्याच्या तत्वात चूक काय होते. तो प्रखर राष्ट्रवादी होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
अ
अनुप ढेरे गुरुवार, 09/25/2014 - 08:16 नवीन
वरील प्रतिसाद काडी आहे असं वाटतय. लोकहो, फसू नका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
स
सुनील गुरुवार, 09/25/2014 - 08:40 नवीन
जसे सर्व मराठे १ मर्दच असतात तसेच सर्व राष्टवादी प्रखरच असतात काय? १ हा जातीवाचक शब्द नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
मृत्युन्जय गुरुवार, 09/25/2014 - 12:44 नवीन
म्हणजे हिटलर राष्ट्रवादीचा होता की काय? तरीच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
द
दुश्यन्त Tue, 09/23/2014 - 13:19 नवीन
गफलत झाली माफ करा मात्र नजरकैदेत असल्या तरी ते आणि त्यांचे समर्थक संभाजी राजाविरुद्ध कारस्थाने करत होतेच. सोयराबाई संभाजी हयात असतानाच गेल्या तेव्हा त्यांचा प्रश्न येत नाही हे मान्य मात्र त्यांचा म्हणजे राजारामांचा गट अस्तित्वात होताच. संभाजी राजांना अटक झाल्यावर लगेच राजाराम यांचे मंचकारोहण झाले. संभाजी राजे यांना अटक झाली फेब्रुवारी मध्ये (१ फेब १६८९ ) आणि मुघल त्यांना कोकणातून घेवून पुण्याजवळ तुळापुर येथे त्यांची निर्घृण हत्या झाली ११ मार्च १६८९ मध्ये एवढ्या काळात मराठ्यान्नी त्यांना सोडवण्याचा एकही मोठा प्रयत्न केला नाही याचे समाधानकारक कारण मिळत नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 09/23/2014 - 13:39 नवीन
संंभाजीराजेंच्या दुर्दैवी हत्येनंतर स्वत: येसूबाईंनी राजाराम महाराजांस नजरकैदेतून मुक्त करून मराठी साम्राज्याचा छत्रपती म्हणून अभिषेक करवला. इतकेच नव्हे तर रायगड मुघलांच्या ताब्यात जात असताना राजारामांस वाघदरवाजातून पळून जाण्यास मदत केली व् स्वत: युवराज शाहूंसह मुघलांच्या स्वाधीन झाल्या. औरंगजेबाची अफाट फौज, खुद्द राजधानी रायगडला पडलेले वेढे अशी कठीण अवस्था असल्यानेच संभाजी राजांना कुणी सोडवू शकले नाही।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
म
मंदार दिलीप जोशी Tue, 09/23/2014 - 14:40 नवीन
औरंगजेबाची अफाट फौज, खुद्द राजधानी रायगडला पडलेले वेढे अशी कठीण अवस्था असल्यानेच संभाजी राजांना कुणी सोडवू शकले नाही। अनुमोदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सुहास झेले Tue, 09/23/2014 - 19:13 नवीन
नशीब कोणी अजून असे बोलले नाही, की राजाराम महाराजांनी घडवून आणले वगैरे वगैरे.... हल्ली इतिहास रचणारे चिक्कार इतिहासकर आहेत रे वल्ली.... ;-) ५० पानांचे शिवचरित्र आल्याचे वाचले होते, ज्यास पुरस्कारही (?) मिळाला होता... आता बोल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मृत्युन्जय Wed, 09/24/2014 - 07:23 नवीन
रायगडाला मुघलांच्या स्वाधीन करणारा सुर्याजी पिसाळच ना? त्याच्यावरुनच देशद्रोह्याला सुर्याजी पिसाळ म्हणण्याची पद्धत पडली ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मनीषा गुरुवार, 09/25/2014 - 13:45 नवीन
हो बरोबर सूर्याजी पिसाळ ... रायगडाचा किल्लेदार होता तो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मनीषा गुरुवार, 09/25/2014 - 13:43 नवीन
संंभाजीराजेंच्या दुर्दैवी हत्येनंतर स्वत: येसूबाईंनी राजाराम महाराजांस नजरकैदेतून मुक्त करून मराठी साम्राज्याचा छत्रपती म्हणून अभिषेक करवला ?? पण मी तर वाचले आहे की संभाजी राजांबरोबर येसुबाई आणि शाहु पण औरंगजेबाच्या कैदेत होते . कारण त्यांच्या ( येसुबाईंच्या) माहेरी काही कार्यानिमित्त गेले असताना त्यांच्या (येसुबाईंच्या) सख्ख्या भावानेच दगा केला होता . आणि सोयराबाई नजरकैदेत होत्या पण राजाराम नसावेत बहुदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
पैसा गुरुवार, 09/25/2014 - 15:23 नवीन
महाराणी येसूबाईंनी संभाजी राजांच्या हत्येच्या आधीच राजारामाला मंचकारोहण करून सुखरूप रायगडाबाहेर काढला होता. आणि स्वतः मात्र शाहूसह रायगडावरच राहिल्या होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
म
मनीषा Fri, 09/26/2014 - 07:43 नवीन
नक्की? मग त्या रायगडावर का राहील्या असतील? आणि संभाजीच्या मृत्यु आधीच राजारामाला राज्याभिषेक ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 09/26/2014 - 08:02 नवीन
इथेच कुठेतरी जेधे शकावलीचा उल्लेख आहे. त्याप्रमाणे संभाजीराजे सुटून येऊ शक्त नाहीत हे स्पष्ट झाल्यावरच राजारामाला संभाजीराजे हयात असतानाच मंचकारोहण केले. मंचकारोहण हे बहुतेक पूर्ण राज्याभिषेक नसावा, युवराज म्हणून नियुक्ती असे काहीसे असावे असे वाटते. येसूबाई गडावरच राहण्याचे सयुक्तिक कारण असे दिसते की जवळपासच्या इतर सर्व गडांनाच वेढे पडले होते, त्यामुळे रायगड हाच त्यातल्या त्यात सुरक्षित होता. आणि जर फितुरी झाली नसती तर गड आणखी कित्येक दिवस, महिने लढवता आला असता. राजाराम जिंजीकडे जाणार हे ठरले होते. त्यामुळे कोणीतरी जबाबदार माणसाने मराठी प्रदेशात रहाणे आवश्यक होते. तो निर्णय येसूबाईंचाच होता. त्यांना स्वतंत्र शिक्का सुरुवातीपासून होता आणि त्या अनेकदा कारभारही पहात होत्या असे उल्लेख आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
म
मनो Fri, 09/26/2014 - 23:38 नवीन
शकावलीतला उल्लेख असा आहे फालगुण शुध ३ राजारामास रायेगडचा किलेदार चांगोजी काटकर व येसजी कंक याणी माघ वद्य ३० अदबखानाहून काडून बाहेर आणून मंचकी बैसावले याचा अर्थ असा कि कैदेतून सुटका करून आदराने एका आसनावर बसवले. तो काही राज्याभिषेक नव्हे, फक्त एक मान्यता अथवा आदराने मुक्तता अश्या अर्थाने ते घेतले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रचेतस Sat, 09/27/2014 - 03:13 नवीन
मंचकारोहण म्हणजे विधिवत राज्याभिषेक न करता सिंहासनी बसवणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो
प
पैसा Tue, 09/23/2014 - 13:40 नवीन
राजाराम सुद्धा रायगडावर होते. त्याना येसूबाईंनी शिताफीने बाहेर काढले आणि मग ते जीव वाचवण्यासाठी दक्षिणेकडे गेले. मंचकारोहण हे येसूबाईंच्या धोरणीपणामुळेच घडल. एवढेच नव्हे तर राजारामाला पळायला अवधी मिळावा म्हणून येसूबाई रायगडावरच राहिल्या. जेणेकरून मोगलांचे लक्ष तिकडेच राहिले. आता संभाजीराजांना सोडवायचे प्रयत्न झाले नाहीत असे हे सगळे बोलणारी मंडळी अप्रत्यक्षरीत्या येसूबाईंना जबाबदार धरत आहेत आणि राजारामावर आरोप ठेवत आहेत असे तुम्हाला वाटत नाही? हंबीरराव मोहिते संभाजीराजांच्या आधीच गेले. त्यांच्यासारखा पराक्रमी सरदार त्यावेळेस कोणीच नव्हता. शिवाय ४० दिवस आता आपल्याला खूप वाटतात. पण त्या काळाचा विचार करता बातमी सगळ्या लोकांपर्यंत पोचेपर्यंतच संभाजीराजांना औरंगजेबाच्या ताब्यात दिले गेले. त्यामुळे इतर कोणालाही काही हालचाल करायला उसंत मिळाली नसावी. शिवाय औरंगझेबाचे सरदार महत्त्वाच्या किल्ल्यांना वेढे घालून बसले होतेच. त्यामुळे हल्ले करण्यासाठी जास्तीचे खडे सैन्यही उपलब्ध नसावे अशी शक्यता दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
क
कवितानागेश Tue, 09/23/2014 - 13:48 नवीन
शिवाय ४० दिवस आता आपल्याला खूप वाटतात. पण त्या काळाचा विचार करता बातमी सगळ्या लोकांपर्यंत पोचेपर्यंतच संभाजीराजांना औरंगजेबाच्या ताब्यात दिले गेले. >> हे अगदी पटतंय. बातमी पोचली तरी, ती बातमी खरी आहे की नाही, खरंच राजे पकडले गेले आहेत, की नुसतीच आवई उठवली आहे, याची खतरजमा होईपर्यंत कदाचित वेळ निघून गेलेली असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ख
खटपट्या Tue, 09/23/2014 - 19:50 नवीन
विश्वास पाटीलांच्या पुस्तकात असेही लिहिलेय कि धूर्त औरंगजेबाला मराठे उठाव करतील हे माहित होते. म्हणून त्याने बाकीच्या किल्ल्यांचा बंदोबस्त केलाच पण संभाजी महाराजांना जेथे कैदेत ठेवले होते त्याच्या आजूबाजूच्या गावामधील सर्व पुरुष मंडळीना हग्या मार दिला. बैल, घोडे जप्त केले. आणि जनता उठाव करणार नाही याचा पक्का बंदोबस्त केला. संगमेश्वरहून कैद केल्यानंतर संभाजी महाराजांना नेहमी बुरखा घालून झाकूनच नेले गेले. जेणे करून कैदी कोण आहे याचा वाटेतल्या लोकांना थांगपत्ता लागू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा