छत्रपती संभाजी महाराजांच्या सुटकेचे प्रयत्न झाले होते काय ?
नुकताच छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या तुळापुरला भेट देवून आलो. तसेच "छावा" कादंबरी आणि अजून एक चरित्र पण वाचून काढले. एका प्रश्नाचे अजून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी काही प्रयत्न केले होते की नाही या प्रश्नाचे. संभाजी महाराजांना कोकणात संगमेश्वरला मुघलांनी पकडले आणि तिथून तुळापुरला आणले. संगमेश्वर ते तुळापुर अंतर जवळ्जवळ ३०० कि.मी. आहे. त्यावेळची वहातुकीची साधने लक्षात घेता आणि बंदोबस्तात आणण्यासाठीचा खटाटोप बघता तुळापुरला महाराजांना आणण्यास बरेच दिवस लागले असतील. तर या दरम्यान संभाजीराजांना सोडविण्यासाठी मराठयांनी प्रयत्न केल्याचे उल्लेख असलेले कुठले पुस्तक/कागदपत्रे आहेत काय? संभाजी महाराजांना नेत असताना मराठ्यांनी मुघलांच्या सैन्यावर हल्ला करुन राजांची सुटका करायचा प्रयत्न केला होता काय? काय झाले त्या प्रयत्नांचे?
💬 प्रतिसाद
(160)
प
प्रचेतस
Wed, 12/09/2015 - 15:20
नवीन
ओके.
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Wed, 12/09/2015 - 17:13
नवीन
हे कुठल्या तत्कालीन पुराव्याच्या आधारे तुम्ही सांगत आहात, राजारामांना संभाजीराजांच्या विरोधकांनी नव्हे तर छत्रपतींच्या नंतर मुख्याधिकारी असणार्या शंभूपत्नी येसूबाई यांनी सिंहासनावर बसवले तेही अगदी संभाजीराजे यांना मोगलांनी पकडल्यावर ८ दिवसात म्हणजे ९ फेब १६६९ ला.
गोवा ,म्हैसूर,जंजिरा सह मोगलांच्या विरुध्द झालेल्या सर्व स्वर्यात आणि युद्धात सर्व सरदारांनी संभाजीराजांना पूर्ण साथ दिली.
- Log in or register to post comments
ध
धनावडे
Wed, 12/09/2015 - 21:33
नवीन
संदर्भ आठवत नाही पण पंतप्रतिनिधी हे पद त्यावेळी नव्हत कदाचित
- Log in or register to post comments
ध
धडपड्या
Wed, 12/09/2015 - 21:57
नवीन
जिजाई प्रकाशनची पुस्तके वापरता का काय, संदर्भासाठी?
- Log in or register to post comments
ध
धनावडे
Wed, 12/09/2015 - 23:38
नवीन
नाही हो। अस कोणत प्रकाशन आहे हेच आता कळल २००९-१०साली बाजीरावाच एक दोन खंड असणार चरित्र वाचला होत त्यात होता हा उल्लेख लेखक आठवत नाही
आणि तुमच्या माहिती साठी मी कोणतही ब्रिगेडी साहित्य वाचत नाही तुम्ही वाचत असाल
- Log in or register to post comments
ध
धनावडे
Wed, 12/09/2015 - 23:43
नवीन
आणि ते पुस्तक फार जुने होत कधी वाईला गेलात तर टिळक वाचनालयात जाउन शोध घ्या
- Log in or register to post comments
ध
धनावडे
Wed, 12/09/2015 - 23:48
नवीन
आणि त्यात काय कुणावर चिखलफेक केली नव्हती
माझ वाचन काही तुमच्या इतक नाही पण बाजीरावावर आजवर मी वाचलेल सुंदर पुस्तक होत ते
लेखक लक्षात नसल्यामुळे संदर्भ आठवत नाही म्हणटलेल
- Log in or register to post comments
ध
धनावडे
गुरुवार, 12/10/2015 - 00:11
नवीन
पंतप्रतिनिधी हे पद राजाराम महाराजानी जिंजीला असताना निर्माण केल
- Log in or register to post comments
ध
धडपड्या
गुरुवार, 12/10/2015 - 03:10
नवीन
अहो, माझा प्रतिसाद तुम्श्हाला नव्हता. तो फक्त तुमच्या नंतर दिला, म्हणून तुमच्या प्रतिसादाखाली आलाय. थंड घ्या. तुम्हाला दिलेला प्रतिसाद, असा दिसतो..
- Log in or register to post comments
त
तुडतुडी
Fri, 12/11/2015 - 08:19
नवीन
खूप छान . नास्तिकतेच ढोंग करणार्यांना मारलेली चपराक आवडली .
नवते झाले . आणि ह्याला फितुरी कारणीभूत नाही .
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4