हेल्मेटसक्ती
अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnershipस्वत:च्या सुरक्षिततेची सक्ती कशाला?कारण : दूरदर्शीपणा हा सर्वसाधारण माणसाचा गुणधर्म नाही. माणूस सर्वसाधारणपणे "सारासारविवेकबुद्धी" पेक्षा जास्त "तात्कालीक सोय आणि फायदा" यांना जास्त महत्व देतो. जनतेत तात्कालीक अप्रिय होऊ शकणारे पण दीर्घकालीक फायद्याचे कायदे जाणीवपूर्वक करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे ही सरकारची जबाबदारी असते (केवळ जनतेला खूष करणारे आणि / किंवा राजकारण्यांचे काम साधून घेणारे कायदे करणे नाही), हे भारतिय जनता जवळजवळ पूर्णपणे विसरली आहे असेच वारंवार दिसते. कायद्याने जनतेला सुजाण नागरीक बनवून जनतेचाच फायदा कसा होतो याचे उदाहरण म्हणून सिंगापूर आणि इतर अनेक कायद्याचे राज्य असलेल्या देशांतील यासंबंधाच्या परिस्थितीचा अभ्यास उपयोगी पडेल. आवांतर : "आमचा ९ वर्षाचा पोरगा वडापावच्या टपरीवर भांडी घासतो यात तुमच्या तिर्थरुपांचे काय जाते ?" असे विचारणार्यांनी बालकामगार प्रतिबंधक कायदा रद्द करावा यासाठी आंदोलन सुरू करायला हरकत नाही.