हेल्मेटसक्ती
अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.
"मी हेल्मेट वापरणार नाही" अशी प्रतिज्ञा करणार्यांनी स्वत:ला आत्तापर्यंत खूप खूप नशीबवान समजण्यास हरकत नाही.आणि "मी नेहमी हेल्मेट वापरतो पण त्याची लोकांवर सक्ती करू नका" असे म्हणणारे "आयजीच्या जीवावर बायजी उदार" चा प्रयोग करत आहेत.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hookah Bar Song :- { Khiladi 786 }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- China builds hydroelectric dam on Brahmaputra in Tibet, India fears flash floodsमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Tu Tu Tara... { बोल राधा बोल }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सहा वर्षांनंतरही तेच प्रश्न! गेली सहा वर्षे काय करत होता? वडाळ्यात बलात्कार झालेल्या 'त्या' चिमुरडीची अवस्था गंभीर :(स्पीड ब्रेकर्स न समजल्यामुळे किती अपघात घडतात याची जबाबदारी कोण घेतो ?बर्र चला ती सरकारची जबाबदारी. आपण मोदींचा राजीनामा मागू. पण स्पीडब्रेकर न समजल्याने होणारा अपघात थांबणार आहे का? हेल्मेट घातले असेल तर अपघाताची तीव्रता "जीवघेणा" वरून "गंभीर" पर्यंत जरी कमी झाली तरी हेल्मेटसक्तीचा उद्देश साध्य होणार नाही का?