Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हेल्मेटसक्ती

प
प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 11/13/2014 - 05:01
🗣 360 प्रतिसाद
अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.

प्रतिक्रिया द्या
136542 वाचन

💬 प्रतिसाद (360)
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 11/13/2014 - 13:40 नवीन
@कोणालाही दुचाकीवरुन जाताना अपघात झाला तर सरकार उपचाराची फुकट व्यवस्था करत नाही. कोणी मेले तर भरपाई देत नाही. मग सरकारला काय अधिकार आहे हेल्मेट सक्ती करायला? ज्या देशात कल्याणकारी योजना आहेत आणि वैद्यकीय उपचार सरकारची जबाबदारी आहे तिथे अशी सक्ती समजु शकतो, भारत सरकार कुठल्या अधिकारात हे सांगते आहे? - हेल्मेट न घालता एखाद्याने दुसर्‍याला इजा केली ( अपघात करुन ) तरी सरकार काही वेगळी जबाबदारी घेत नाही. - हेल्मेट न घातल्या मुळे कोणी कायमचा अपंग झाला, तर सरकार पेन्शन वगैरे देत नाही. हेल्मेट घातले असले तरी देत नाही. - हेल्मेट घातले कींवा नाही ह्याने सरकार वर कुठलाही वेगळा बोजा पडत नाही. - विमा कंपनी हेल्मेट घालत नसाल तर जास्त प्रिमियम मागू शकते, पण भारत सरकार कुठलाही नैतिक अधिकार नाही सक्ती करायचा.>>>>>>> क्या बात! *HAPPY* पुण्यात सर्वात पहिल्यांदा झालेली हेल्मेट्सक्ती अठवली..आणि नंतर यात कुणाकुणाचे हितसंबंध गुंतलेले होते..हे ही कळलं..(आणि अनेकांनी हतातला सगळा पैसा हेल्मेटात घालून..रस्त्यारस्त्यावर लावलेले हेल्मेट्चे स्टॉल्सही अठवले..आमच्या इथल्या एका रिक्षावाल्यानी रिक्षा विकून अठवडाभर त्या पैशात हा धंदा केला..आणि नंतर एकाला दोन रिक्षा घेतल्या..भजिवाले/बेकर्‍या/दुग्धालयं...इथेही तेंव्हा हेल्मेट विक्री चालायची..हे ही अठवलं...तोच चावट्पणा सध्यःकाली सुरु आहे..अर्थातच काहि दिवसात हे सर्व उजेडात येइलच. आणि अत्ता लोकांना कचकाऊन हेल्मेट खरेदी करायला लावणारे नंतर किमान २/३ वर्ष तरी त्याच्या अंमलबजावणी करण्याच्या योजना राबवतात का? हे ही पहाणं उद्बोधक ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
H
hitesh गुरुवार, 11/13/2014 - 22:15 नवीन
सरकार औषधपाण्याची व्यवस्था करुन बसलेलेच असते. स्डोकं फुटलं तर दीनानाथ ला जाण्याऐवजी ससुनला जायला कुणी अडवलेलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रसाद१९७१ Fri, 11/14/2014 - 06:28 नवीन
ठीक आहे, सरकार ने सांगावे की हेल्मेट घातले नसल्यामुळे डोक्याला इजा झाली तर फुकट उपचार ( ससून मधे सुद्धा ) मिळणार नाहीत. काही हरकत नाही. मी वीमा कंपनीचे उदाहरण दिलेच होते. आणी रस्त्यावर प्रत्येक दिवशी होणार्‍या शेकडो अपघातांपैकी कीती सरकारी दवाखान्यात जातात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Fri, 11/14/2014 - 07:28 नवीन
विमा कंपनी ही चारिटी कंपनी नाही. त्यांचे नियम वेगळे असतात. लोकांच्या चुकीने जरी अनारोग्य निर्माण झाले तरी सरकार उपचार करतेच. ते त्यांचे कर्तव्य आहे. सरकारी दवाखान्यात येऊ नका असे सरकार सांगत नाही. लोकाणॅअ‍ॅ शक्ञ असल्ञास जावे उपचार जरी खाजगी घेअतले तरी पोलिस केस , कोर्ट ही व्यवस्था सरकारीच असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ट
टवाळ कार्टा Fri, 11/14/2014 - 07:57 नवीन
लोकांच्या चुकीने जरी अनारोग्य निर्माण झाले तरी सरकार उपचार करतेच. ते त्यांचे कर्तव्य आहे.
व्वा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
च
चिगो Sat, 11/22/2014 - 11:12 नवीन
भारी लॉजिक, हो.. ह्या हिशोबानी चोरीमारी (खाजगी मालमत्तेची), खून (वैयक्तिक वैरातून झालेला), लुबाडणूक (ज्यात सरकारला तोटा नाही) किंवा कुठलाही गुन्हा ज्यात सरकारी मालमत्ता, कर्मचारी, व्यवस्था हीला नुकसान होतं नाही, त्यात सरकारने लक्ष द्यायची गरज नाही. कारण की असल्या कुठल्याही गोष्टीत सरकार भरपाई देत नाही.. वर इए साहेबांनी बोलल्याप्रमाणे, "तत्कालीन फायदा" ह्यावरच लक्ष ठेवून माणुस वागतो, म्हणून कायद्याचा बडगा उगारावा लागतो.. iRobot चित्रपटातलं वाक्य आठवलं, " You humans are like children. You must be protected from yourselves.." बाकी चालु द्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ह
हुकुमीएक्का गुरुवार, 11/13/2014 - 18:17 नवीन
       माझ्या मते हेल्मेट सक्ती हवी परंतू अश्या ठिकाणी जिथे वाहनचालक ६० पेक्षा जास्त वेगाने चालवू शकेल. पुण्यातील काही रस्त्यांवर एव्हडी गर्दी असते तिथे २०-२५ पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवताच येत नाही. उदा. सिंहगड रस्ता (सं. ७ नंतर), लक्ष्मी रस्ता (सं. ६ नंतर).        जिथे वाहनचालकाला गाडी पाय टेकवतच चालवावी लागते तिथे हेल्मेट कशाला.? ठो दे ठो करायला ?? *lol* की Kiss of Helmet करायला?? *kiss3*        हेल्मेट फक्त Highway ला ठेवा ना जिथे लोकं ६० च्या खाली येतच नाहीत. कमी रहदारीच्या रस्त्यावर हेल्मेट कशाला ?? एक गोष्ट प्रकर्शाने पहायला मिळते ती म्हणजे Scarf घातलेल्या एकाही महिलेला पोलीस आडवत नाहीत. आडवतात ते फक्त पुरुषांना. ( एखाद्या महिलेला आडवतील आणि 'समज' देऊन सुटका.) *unknw*
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 11/13/2014 - 18:41 नवीन
@ठो दे ठो करायला ?? >>> Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का
H
hitesh गुरुवार, 11/13/2014 - 22:18 नवीन
फक्त हायवेवरच सक्ती कशी करणार ? घारापासुन हायवेवर जायला आधी काही अंतर गल्लीबोळातुनच जाणार ना ? का घर हायवेवरच आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का
ह
हुकुमीएक्का Fri, 11/14/2014 - 17:53 नवीन
    तस नाही. मी म्हणतोय हेल्मेट 'घातलेच' पाहिजे असा नियम शहरात नको. हेल्मेट सोबत ठेवा पण Highway लाच सक्ती ठेवा. आजकल गाडीला हेल्मेट लावायची सोय पण असतेच की. माझं म्हणणे असे आहे शहरात हेल्मेट घालूनच गाडी चालवा असे नको. किंवा जिथून Highway सुरू होतो अश्या ठिकाणी हेल्मेट सक्ती करा. टोल नाक्यावर Checking करा. किती Traffic Police स्वत: हेल्मेट घालून गाडी चालवतात?? नियम सगळयांना सारखा. आणि RTO कडून अश्या प्रकारची कुठलीही बातमी अजून पेपरात आली नाहीये. मला वाटतं या वेळेस या वाहतूक पोलिसांना सरकार कडून दिवाळी बोनस मिळाला नसावा कारण आता "BJP" आहे ना. *i-m_so_happy* म्हणून नियमाच्या नावाखाली नागरिकांकडून वसूली.     रस्त्यावरून जाणार्‍या लोकांनी आधी हेल्मेट घातलं पाहिजे. आपण पेपरात वाचतोच की पादचार्‍याला पीएमटी/टँकर/कार/etc ने उडवले. त्यांना तरी भरपाई मिळते का कधी?? फक्त अज्ञात वाहनाने उडवले एव्हडेच कळते. असो एकच प्रश्न आहे. जर हेल्मेट घातलेला माणूस गाडीवरून फेकला गेला आणि त्याचे डोके शाबूत राहिले परंतू एखादे वाहन त्याच्या अंगावरून गेले आणि त्याचा मृत्यू झाला. तर त्याला सरकार कडून नुकसान भरपाई मिळेल का.?? की मग सरकार यापूढे 'चिलखत' घाला असा नवीन नियम आणणारे?? *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
ध
धर्मराजमुटके Fri, 11/14/2014 - 17:59 नवीन
किती Traffic Police स्वत: हेल्मेट घालून गाडी चालवतात??
याची कारणे खालीलप्रमाणे असू शकतात. १. हेल्मेट न घालणार्‍यांचे डोके लोखंडाचे / दगडाचे असू शकते त्यामुळे त्याला मार लागू शकत नाही. २. हेल्मेट न घालणार्‍यांना डोकेच नसू शकते. ३. हेल्मेट न घालणार्‍यांना डोके असू शकते पण मेंदू दुसर्‍याच ठिकाणी असू शकतो त्यामुळे त्यांना काळजीचे कारण नसावे. ४. आपण नियम बनवले आहेत त्यामुळे आपला अपघात झाला तरी आपल्या डोक्याला इजा होणारच नाही असा ठाम आत्मविश्वास असावा. वरीलपैकी कोणते कारण पटते काय ते बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का
ह
हुकुमीएक्का Fri, 11/14/2014 - 18:03 नवीन
मला वाटते जर Traffice Police हेल्मेट घालायला लागले तर तेही हेल्मेट विक्रेत्याकडून फुकट घेऊन घालतील. म्हणजे त्यालाही दंड की "काय रे Un-Authorized Company ची हेल्मेट विकतो?? ते पण रस्त्यावर अतिक्रमण करून?? चल केस करतो नाही तर आमच्या सर्व कर्मचार्‍यांना एक एक हेल्मेट दे तपासायला" . . . म्हणजे त्या विक्रेत्याच्या पोटावर पाय. *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ख
खटपट्या Sat, 11/15/2014 - 21:21 नवीन
असंच असणार !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का
H
hitesh Sat, 11/15/2014 - 22:45 नवीन
हेल्मेट घातल्याने डोके वाचले , तर हेल्मेटचे काम तिथे सफल झाले. अंगावरुन गाडी गेली तर बिचार्‍या हेल्मेटने / सरकारने काय करावे ? हेल्मेट सक्ती का आहे ? कारण हेल्मेट आहे किंवा नाही यावर जगणे मरणे एखाद्या केसमध्ये ठरु शकते. निर्णायक असु शाकते. पण गाडी अंगावरुन गेली तर माणुस मरणारच ! चिलखत असले तरी नसले तरी. त्यामुळे त्याचे कंपल्शन जस्टिफाय होउ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का
आ
आशु जोग गुरुवार, 11/13/2014 - 18:50 नवीन
म्हणे हेल्मेट घातल्याने पुणेकरांचा इगो दुखावतो
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग गुरुवार, 11/13/2014 - 18:51 नवीन
म्हणे हेल्मेट घातल्याने पुणेकरांचा इगो दुखावतो Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग
आ
आशु जोग गुरुवार, 11/13/2014 - 18:51 नवीन
https://www.youtube.com/watch?v=fLru603UAjI
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग
श
श्रीगुरुजी गुरुवार, 11/13/2014 - 19:09 नवीन
कोणी कितीही सक्ती केली, दंड केला, कायदा आणला, खोटा कळवळा आणून आमच्या सुरक्षिततेचा आव आणला तरी मी हेल्मेट वापरणार नाही हे निश्चित. एकवेळ पोलिसांना चुकविण्यासाठी गल्लीबोळातून जाऊ पण हेल्मेट सक्ती केली म्हणून मी कदापि हेल्मेट वापरणार नाही. आधी खड्डे बुजवा, रस्ते रूंद करा, वाहतूकीचे नियम पाळण्याची सक्ती करा, रस्त्यावर पुरेशी प्रकाशयोजना करा, वरखाली असलेली ड्रेनेजची झाकणे रस्त्याच्या पातळीत आणा आणि मग हेल्मेट सक्ती करा. जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही तोपर्यंत हेल्मेट परिधान करणे नाही.
  • Log in or register to post comments
H
hitesh गुरुवार, 11/13/2014 - 22:20 नवीन
समान नागरी कायद्याच्या नावाने ओरडणारे गुर्जी जे नागरी कायदे समानच आहेत ते मात्र पाळत नाहीत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे Fri, 02/05/2016 - 12:08 नवीन
तुमच्या एखाद्या गड्याने म्हणु देत की "मुसलमान हेल्मेट घालणार नाहीत कारण ते इस्लामच्या विरूद्ध आहे", गुर्जी सार्‍या गावाला हेल्मेट घालून मोर्चा काढतेत की नाही बघाच... घोषणा ही तयार होईल, "इस देश में रहना होगा तो हेल्मेट पेहनके चलना होगा," =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
थ
थॉर माणूस Fri, 11/14/2014 - 04:36 नवीन
त्यापेक्षा आपण असं करुयात का? सगळे पुणेकर मिळून "किमान वाहतूक नियम" अशी एक यादी करूयात, आणि निदान ते तरी आम्ही पाळू शकतो हे सरकारला सिद्ध करून दाखवूयात. म्हणजे काय होईल की पुणेकरांची नियम पाळत रस्त्यांवर गाडी चालवण्याची कुवत आहे हे सिद्ध होईल, मग आपण चांगल्या रस्त्यांची मागणी अधिक जोमाने करू शकूच आणि आपोआपच आपल्या हेल्मेट सक्ती विरुद्धच्या आंदोलनाला वजन सुद्धा प्राप्त होईल नै का? अन्यथा तसेही आपल्या सोईचे नियम तेवढे लागू करण्यात आपण अनुभवी दिसताच आहात. त्यामुळे मग आहे तसेच वागत रहा, नियम असला काय नसला काय. अनेक नियम मोडतो त्यात हा अजुन एक...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 11/14/2014 - 10:03 नवीन
>>> अन्यथा तसेही आपल्या सोईचे नियम तेवढे लागू करण्यात आपण अनुभवी दिसताच आहात. त्यामुळे मग आहे तसेच वागत रहा, नियम असला काय नसला काय. अनेक नियम मोडतो त्यात हा अजुन एक... सोयीच्या नियमांचा प्रश्नच नाही इथे. एखाद्या घराचे छप्पर गळत असेल तर छप्पर वॉटरप्रूफ करून गळती थांबविणे यालाच प्राधान्य असले पाहिजे. छप्परदुरुस्ती न करता घरातल्या घरात छत्री किंवा रेनकोट वापरण्याची सक्ती केली तर ते जसे हास्यास्पद होईल, तसेच अपघातांची मुख्य कारणे दूर न करता हेल्मेटसक्ती करणे हे हास्यास्पद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: थॉर माणूस
S
sagarpdy Fri, 02/05/2016 - 12:31 नवीन
वा! म्हणजे अपघातांची कारणे आहेत तोपर्यंत हेल्मेट वापरायचं नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
र
रामपुरी गुरुवार, 11/13/2014 - 22:24 नवीन
फाल्तू गोष्टीवर लै चर्चा झालेली दिसतीये. पुण्यात सक्ती झाल्यावरच एवढी बोंबाबोंब का? बाकिच्या शहरात तर कधीपासूनच आहे. कि सगळे हेल्मेट कारखानदार फक्त पुणेकरांच्या खिशावर डोळा ठेऊन आहेत असा पुणेकरांचा समज आहे? बाकी वाहतूक नियमांसाठी पुणेकरांच्या ..डीवर हंटरच पाहीजे यावर दुमत असण्याचे कारण नाही.
  • Log in or register to post comments
श
शिद गुरुवार, 11/13/2014 - 23:20 नवीन
१००! बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 11/14/2014 - 03:43 नवीन
'स्वच्छ भारत'च्या धर्तीवर नरेण्द्र-देवेंद्र जोडगोळी राज्यात 'सुरक्षित महाराष्ट्र/पुणे'मोहिम राबवतील ही अपेक्षा.मग मराठी अभिनेते(भरत जाधव्,मकरंद अनास्पुरे) बाईकवर बसण्याआधी हेल्मेट घालतानाचे फोटो... मग हेल्मेटला विरोध करणारे मग नक्की हेल्मेट घालतील.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Fri, 11/14/2014 - 04:33 नवीन
अपघात झाला तर हेल्मेट असेल किंवा नसेल तरी तुमच्या नशीबात जे होणार आहे ते होतेच. माझे दोन भाऊ मागच्या वर्षी हेल्मेट असून सुद्धा अपघातात गेले. (दोन बाईकची समोरासमोर टक्कर झाली, दोन्ही बाईकवरचे हेल्मेट घातलेले स्वार जागीच गेले. मागे बसलेले दोन्ही सुद्धा गेले..). तेव्हापासून दुचाकी चालवण्यापासून दुरच असतो. जवळच्या जवळ किंवा उपनगरात दुचाकी वापरावी व हमरस्त्यावर चारचाकी (किंवा सरकारी बस) वापरावी. (हे म्हणजे ब्रेड नाही मिळत तर केक खा असे म्हणण्यासारखे आहे पण दुचाकी चालवण्यार्‍यांच्या बेशिस्तीमुळे असे म्हणावेसे वाटते. हायवेवर मध्येच लेन तोडणे, उगाच दोन गाड्यांमधून जाणे, कट मारणे, उजव्यालेनमध्ये उगाचच गाडी हळू चालवणे या प्रकारांमुळे चारचाकीवाल्यांना फारच काळजीपुर्वक गाडी चालवावी लागते.). यामुळे हायवे/एक्स्प्रेस वे अशा रस्त्यावर दुचाकी चालवण्यास बंदी असावी असे वाटले. जास्तीत जास्त अपघात हे दुचाकीमुळेच होतात. मागेच नाशीक-मुंबई रस्त्यावर नीता होल्वोच्या मध्ये एक दुचाकी आली आणि तिला वाचवण्याच्या नादात वोल्वो दुसर्‍या लेनमध्ये घुसली आणि तिने एका इनोव्हाचा (आत बसलेल्यांसकट) चुराडा केला.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 11/14/2014 - 04:52 नवीन
(दोन बाईकची समोरासमोर टक्कर झाली, दोन्ही बाईकवरचे हेल्मेट घातलेले स्वार जागीच गेले. मागे बसलेले दोन्ही सुद्धा गेले..)
समोरासमोर टक्कर होण्याअगोदर त्यांनी एकमेकांना पाहिले नव्हते? सगळे ४ जण जाण्यासाठी बाईकचा स्पीड कमीतकमी किती हवा?
दुचाकी चालवण्यार्‍यांच्या बेशिस्तीमुळे असे म्हणावेसे वाटते. हायवेवर मध्येच लेन तोडणे, उगाच दोन गाड्यांमधून जाणे, कट मारणे, उजव्यालेनमध्ये उगाचच गाडी हळू चालवणे या प्रकारांमुळे चारचाकीवाल्यांना फारच काळजीपुर्वक गाडी चालवावी लागते.)
बेशिस्त कुणाचीही असू शकते...लेन तोडणे, कट मारणे हे प्रकार बाईकवाले"च" जास्त करतात कारण ४ चाकी पेक्षा बाईकवर असे करणे सोपे असते...पण स्वताचा मुलगा/मुलगी २चाकी कशी चालवतो याची खातरजमा करणे माझ्यामते प्रत्येक पालकाला शक्य असते...वाहतुकीचे नियम माहीत असल्याशिवाय हातात बाईक घेउन देउच नये आणि चारचाकीवाले सुध्धा समोरच्या बाईक/४चाकी पासून फक्त २ फूट अंतर ठेऊन चालवतात ते सुध्धा ५०+ च्या स्पीडला...अशांचे प्रमाणसुध्धा लक्षणियरीत्या वाढलेले आहे :(
हायवे/एक्स्प्रेस वे अशा रस्त्यावर दुचाकी चालवण्यास बंदी असावी असे वाटले.
सहमत...किंवा सेपरेट लेन असावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
य
योगी९०० Fri, 11/14/2014 - 05:04 नवीन
समोरासमोर टक्कर होण्याअगोदर त्यांनी एकमेकांना पाहिले नव्हते? सगळे ४ जण जाण्यासाठी बाईकचा स्पीड कमीतकमी किती हवा? माझे भाऊ त्यांच्याच लेन मध्ये चालले होते. समोरून येण्यार्‍याने ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात अचानक मध्ये बाईक आणली. दोघांनाही सावरायला वेळ मिळाला नसावा. साधारण ८० चा वेग असावा. बातमी येथे वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 11/14/2014 - 05:13 नवीन
झाले ते वाईट झाले...आणि मी आणखी काही लिहित नाही...पण मनात १ प्रश्न आलाय...व्यनी करु की नको ते तुम्हीच सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
य
यसवायजी Fri, 11/14/2014 - 05:14 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
द
देशपांडे विनायक Fri, 11/14/2014 - 05:56 नवीन
कायदा करण्याने काही लोक समाधान पावतात कायदा राबवण्याने काही लोक समाधान पावतात कायदा न राबवण्याने काही लोक समाधान पावतात पण राज्यकर्ते सर्वाना समाधान देऊ इच्छितात कारण ते कायद्याच्या वर आहेत
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Fri, 11/14/2014 - 06:12 नवीन
हेल्मेट घातल्या मुळे डोके वाचले पण कायमचे अपंगत्व आले (हात, पाय, कंबर मोडुन ) तर सरकार काही देणार आहे का? अश्या केसेस मधे त्या माणसाला मेलो असतो तर बरे झाले असते असे वाटेल.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Fri, 11/14/2014 - 07:43 नवीन
मुळात आपण दुचाकी चालवत आहोत आणि आपली चुक असो वा नसो, आपल्यालाच जास्त भोगावे लागणार आहे ही जाणिव जरी आली तरी बर्‍याच प्रमाणात अपघात कमी होतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
व
विजुभाऊ Fri, 11/14/2014 - 08:23 नवीन
प्रसाद१९७१ - Fri, 14/11/2014 - 10:42 हेल्मेट घातल्या मुळे डोके वाचले पण कायमचे अपंगत्व आले (हात, पाय, कंबर मोडुन ) तर सरकार काही देणार आहे का? अश्या केसेस मधे त्या माणसाला मेलो असतो तर बरे झाले असते असे वाटेल. अरे बापरे........ एखाद्या मुद्द्याचा विरोध करण्यासाठी कायकाय तर्कटे चालवतील लोक सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 11/14/2014 - 09:30 नवीन
अरे बापरे........ एखाद्या मुद्द्याचा विरोध करण्यासाठी कायकाय तर्कटे चालवतील लोक सांगता येत नाही. कारण, मुद्दा जिंकणे महत्वाचे... खरेखोटे जाऊ दे तेल लावत *dash1*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
व
वेल्लाभट Fri, 11/14/2014 - 06:43 नवीन
हा धागा शंभरी मारणार याची खात्री शीर्षक बघूनच झाली होती. वेल डन लेखक व प्रतिसादक. असाच सपोर्ट देत चला. लोल
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 11/14/2014 - 07:39 नवीन
हेल्मेट न घालता अपघात झाला, आणि माणुस गेला तर विमा कंपणीने त्याचे नावाचे पैसे न देण्याचा निर्णय घ्या. आपोपा विमा कंपणीच्या नावाने कोणॅए बोलणाअर नाही, आणि हेल्मेट पण घातले जाईन. माणुस न जाता, काही हात पाय मोडला तरी मेडिक्लेम मिळणार नाही असा हि निर्णय घेण्यात यावा. म्हणजे ज्यांना हेल्मेट घालायचे नाही, त्यांनी त्या विमा कंपणीकडे जावु नये , त्यांना तशी सक्ती कोणॅए करु नये ही विनंती . बघा सगळॅ सरळ होतील
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 11/14/2014 - 07:56 नवीन
- सर्व जगात हेल्मेटची सक्ती आहे मग भारतात ती केली तर कोठे बिघडले ?. एक खासदार. आपले कायदे आपण इतर देशांकडे पाहून करायचे नसतात. ते आपल्या परिस्थीतीला साजेसे करायचे असतात. " नो मॅन्स, लॅन्ड मधे कोणत्याही वहानाचा वेग तीव्र असतो. सबब तिथे हेल्मेट सक्ती करणे एकवेळ क्रमप्राप्त आहे.महापालिका ग्रामपंचायती ई च्या हदीतील रस्ते त्यांची रुदी त्यातून अफाट वेगाने वहान चालवले जाण्याची शक्यता याचा विचार झाला पाहिजे. दुसरे असे की चालविणारा व मागे बसलेला या दोघात मागे बसणार्‍याने प्राधान्याने हेल्मेट घालणे हे सक्तीचे असले पाहिजे.कारण त्याचे स्वरूप हे थर्ड पार्टी इन्शुअरन्स सारखे आहे. हेलेमेट हा एक संरक्षक विमा आहे. तो मी एकटा असताना उतरवायचा की नाही याचे स्वातंत्र्य मला हवे. पण्॑ मागे बसलेल्याने आग्रह धरल्यास चालक म्हणून मी हेलमेट घालणे एकवेळ सक्तीचे असले तरी चालेल. पुणेकरांबाबत हा आक्षेप घेतला जातो की हे अतिशहाणे लोक आहेत. यांचाच फक्त सक्तीला विरोध का ? इंग्रजांचे अनेक देशांवर राज्य होते पण ते खटकले टि़ळकाना, बोसांना व गांधीना म्हणून त्याना आपण अतिशहाणे ठरवायचे का ? उलट अशी शक्यता आपण का गृहित धरत नाही की पुणेकरांचे आंदोलन हे इतर देशातील नागरिकाना प्रेरणा देणारे ठरून तेथील सक्ती नाहीशी होईल. दुसरे असे की मरण फक्त मेंदूला मार बसल्यानेच येते असे काही वैद्यक सांगत नाही. अपघात होताना " मेंदू कोठेय बरे त्याचा पहिला समाचार घेते असे काही नियती म्हणत नाही. मल्टीपल इन्जुरी तून शॉक हे मरणाचे एक कारण असू शकते की नाही ? दुसरे असे की अपघातांचे बद्द्ल माझे असे निरिक्षण आहे की दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण कमी होत आहे. हे प्रमाण निव्वळ संख्येत मोजणे चूक आहे. रस्त्यावर धावणार्‍या वहानांच्या प्रमाणाचा विचार केला तर ते कमी होते आहे असेच सिद्ध होईल. दुभाजक झाल्यापासून ते कमी होताना दिसते आहे. पुणेकर नागरिक म्हणावे तितके जागरूक नाहीत. कायद्यातील या " सक्ती" ला कायमची हाकलून लावण्यासाठी त्यानी निवडणुकीपूर्वीच राजकीय पक्षांवर दबाव ठेवावयास हवा होता. निवडणुकी संपताच पद्धतशीरपणे हे अस्त्र बाहेर काढण्यात आले आहे. व जो पर्यंत आपण मोटर व्हीकल कायद्यात बदल करण्याचे यशस्वी आंदोलन करीत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. मधून मधून हे मांजर तुम्हाला आडवे जाणारच . कोणतेही कोर्ट याला स्थगिती वगैरे देण्याची शक्यता नाही कारण हा कायदा आहे वटहुकूम नव्हे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 11/14/2014 - 09:39 नवीन
दुसरे असे की अपघातांचे बद्द्ल माझे असे निरिक्षण आहे की दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण कमी होत आहे. हे प्रमाण निव्वळ संख्येत मोजणे चूक आहे. रस्त्यावर धावणार्‍या वहानांच्या प्रमाणाचा विचार केला तर ते कमी होते आहे असेच सिद्ध होईल. दुभाजक झाल्यापासून ते कमी होताना दिसते आहे. सर्वसाधारणपणे जेथे कायद्याचे राज्य आहे तेथे लोक अपघात टाळण्यासाठी जमिनीवर आखलेल्या दुभाजक रेषांनाही योग्य तो मान देतात. तर, इथे जनावरेही उड्या मारून पलिकडे जाऊ शकणार नाही असे रस्तादुभाजक लागतात (आता तसल्या दुभाजकांवरूनही उडी मारणारेही इथे सर्रास दिसतात ही गोष्ट अलाहिदा). यावरून इथे जरा जास्त कडक कायद्यांची आणि तेवढ्याच कडक अंमलबजावणीची गरज आहे असे वाटत नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा Fri, 11/14/2014 - 11:17 नवीन
दुभाजक ओलांडून देखील अभ्य़ंकर वा पेंडसे यांच्या सारख्याना उडवले गेले पण दुभाजक बरेच काम करून जातात. चिंचवड येथील बिग बझार समोर शक्य असताना पादचारी बिनदिक्कतपणे महामार्ग ओलांडून दुचाकी व चारचाकी यांच्या चालकांच्या उरात धडकी भरत असत. आता इथे इतके उंच कुंपण करण्यात आले आहे की पादचारी भुयारी मार्गाचा वापर झक मारीत करतात. आजही दंड करण्यापेक्षा वहातुक पोलिसानी मनात आणल्यास झेब्रा क्रॉसिंगवर लोक गाड्या आणणार नाहीत. पण आपल्याकडे दंड ही एक अर्थव्यवस्था झाली आहे. विशेषत: १५ जानेवारी नंतर ३१ मार्व पर्यंत दंड उद्दीष्ट ठरविण्यात येते. हे एक ओपन सिक्रेट आहे. लोकाना चौकात मार्गदर्शन करण्यात वहातुक पोलिसाना काडी इतका रस नाही. त्यांना दंडाचे राज्य हवे आहे .मी अनेक पोलिसांशी बोलून पाहिले पण " काय करायचंय ...लोक कधी सुधारणार नाहीत !" असे संवाद होतात.पोलिसाना खरेच इतका हेलमेट या विषयात रस असेल तर ही मोहिम दोन तीन वर्षे त्यानी लावून धरली पाहिजे पण ती मुळातच कायद्याचे भूत नाचवत कोणाच्या तरी " आदेशाने" गाजते आहे. सध्या तरी हेलमेट विक्रीत काही फरक नाही असे विक्रेते म्हणत असले तरी त्यात फरक आजमावला जाईल. ते इप्सित साध्य झाले की पोलिसांच्या उत्साह परत मालवाहू गाड्याकडे वळेल. ये जो पब्लिक है वो सब जानती है ! आपले स्वयंशिस्तीचे स्वप्न भारतातही पुरे होईल. शास्ता तत्र दुर्लभः
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
श
श्रीगुरुजी Fri, 11/14/2014 - 10:11 नवीन
सहमत हेल्मेटसक्ती ऐवजी वाहतूक नियम पाळण्याची, खड्डेविरहीत रस्ते असण्याची, रस्ते पुरेसे रूंद व समपातळीत असण्याची सक्ती हवी. पुण्यातील पोलिसांनी दुचाकीचालकांच्या डोक्याकडे लक्ष देण्यात वेळ फुकट घालविण्यापेक्षा तोच किंमती वेळ दाभोलकरांचे खुनी शोधण्यात, साखळीचोरांचा तपास लावण्यात, पुण्यातले खुनांचे प्रमाण कमी करण्यात (गेले काही महिने पुण्यात सातत्याने खून पडत आहेत) आणि वाहतुकीचे नियम सक्तीचे करण्यात वेळ सत्कारणी लावावा. दुचाकीचालक आधीच खड्ड्यांमुळे व अरूंद आणि उंचसखल रस्त्यांमुळे त्रासलेले आहेत आणि त्याच्यात आता हेल्मेटसक्तीची भर. बुरे दिन आ गये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ट
टवाळ कार्टा Fri, 11/14/2014 - 10:38 नवीन
पुण्यातील पोलिसांनी दुचाकीचालकांच्या डोक्याकडे लक्ष देण्यात वेळ फुकट घालविण्यापेक्षा तोच किंमती वेळ दाभोलकरांचे खुनी शोधण्यात, साखळीचोरांचा तपास लावण्यात, पुण्यातले खुनांचे प्रमाण कमी करण्यात (गेले काही महिने पुण्यात सातत्याने खून पडत आहेत) आणि वाहतुकीचे नियम सक्तीचे करण्यात वेळ सत्कारणी लावावा. दुचाकीचालक आधीच खड्ड्यांमुळे व अरूंद आणि उंचसखल रस्त्यांमुळे त्रासलेले आहेत आणि त्याच्यात आता हेल्मेटसक्तीची भर. बुरे दिन आ गये!
समजा असे झालेच...तरी पुणे तर मग पुणेकर दुचाकी (की "गाडी"??) नियमांनुसार चालवायला सुरु करतील?? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अजया Sat, 11/15/2014 - 12:08 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ह
हुकुमीएक्का Sat, 11/15/2014 - 17:13 नवीन
पुण्यातील पोलिसांनी दुचाकीचालकांच्या डोक्याकडे लक्ष देण्यात वेळ फुकट घालविण्यापेक्षा तोच किंमती वेळ दाभोलकरांचे खुनी शोधण्यात, साखळीचोरांचा तपास लावण्यात, पुण्यातले खुनांचे प्रमाण कमी करण्यात (गेले काही महिने पुण्यात सातत्याने खून पडत आहेत) आणि वाहतुकीचे नियम सक्तीचे करण्यात वेळ सत्कारणी लावावा.
श्रीगुरुजी यांच्या या प्रतिसादाला +१ *good*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विजुभाऊ Fri, 11/14/2014 - 08:26 नवीन
पुणेकर हे पुणेकर आहेत. त्याना फक्त त्यानीच स्वयंप्रेरणेने लागुकेलेले नियमच लागु होतात. उदा: सवाईला वडापाव खायचा असतो , दगडूशेठ हे हलवायाचे नाव नसून गणपतीचे नाव आहे.
  • Log in or register to post comments
H
hitesh Fri, 11/14/2014 - 10:05 नवीन
दुसरे असे की अपघातांचे बद्द्ल माझे असे निरिक्षण आहे की दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण कमी होत आहे. हे प्रमाण निव्वळ संख्येत मोजणे चूक आहे ...... :) तुमचे निरिक्षण म्हणजे नेमके कोणते निरिक्षण ? अआणि त्याच्यावर विसंबुन कायदा बदलायचा ?
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 11/14/2014 - 11:28 नवीन
चिंचवड ते शिवाजीनगर या मार्गावर बसने मी २२ वर्षे प्रवास केला आहे. त्या मार्गाची अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. दुभाजक नव्हते तेंव्हा जवळ जवळ रोज एक दुचाकीवाला सापडत असे अपघातात. आता ते प्रमाण नगण्य आहे. या रत्यावरून वहान चालवणे हा एक आनंद झालेला आहे. अपघाताची तीन मूल कारणे अशी त्यावर डोकटरेट केलेल्या दं सिं, पसरेचा यानी सांगितली आहेत. एस टी ओ म्हणजे स्पीड , टर्न व ओव्हरटेक. स्पीडब्रेकर ( नीट केलेले), टर्न इंडीकेटर्स व दुभाजक या तीन साधनानी अपघाताचे प्रमाण कमी झालेले आहे. आमच्या निरिक्षणावर विसंबून कायदा करावा असा दुराग्रह आमचा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Sat, 11/15/2014 - 07:17 नवीन
आमच्या एमबी बी एस च्या पुस्तकातही अपघात कारणे प्रतिबंध इ बाबत चार गोष्टी दिल्या आहेत. अपघात टाळायला चार उपाययोजना कराव्या लागतात. १. एनविरॉनमेंट ... इथे या शब्दात रस्ते वगैरे गोष्टी येतात. २. टेक्नॉलॉजी ... म्हणजे वाहन सुस्थितीत असणे वगैरे ३. पर्सनल प्रॉटेक्शन डिवाइस .. बेल्ट , हेल्मेट इ ४. लिगल कंट्रोल .... कायदे इ या चारही गोष्टी वेगवेगळ्या फ्याक्टरकडुन केल्या जातात.. त्या एकमेकांवर अवलंबुन ठेउन करायच्या नसतात. म्हणजे सरकार रस्ते करत नाही व टाटा मोटर टायरची क्वालिटी बदलत नाही , तर ते लोक त्यांचे काम करत नाहीत म्हणुन मीही माझे काम करणार नाही , हे हेल्मेट न वापरण्याचे कारण होऊ शकत नाही. डिवायडर वगैरे क्र १ मध्ये सुधारणा केल्याने आले हे लक्षात आले असेलच.. म्हणजे सरकार या घटकाने काहीतरी सकारात्मक काम केले हेच तुम्ही मान्य करताय ना ? मग तुमची ड्युटी क्र. ३ ला विरोध का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा Sun, 11/16/2014 - 11:52 नवीन
अनेकांचा हेलमेट ला विरोध नाहीच . ते वापरायचे कधी याचे स्वातंत्र्य चालकाला असले पाहिजे. आता एक उदाहरण वेगळे देतो.ते " निरोध " वापरण्याचे. निरोध वापरा म्हणजे एडस होण्यास प्रतिबंध होईल असा प्रचार सरकार करू शकते ते वापरण्याची सक्ती करू शकत नाही. कायद्याने अशा कित्येक गोष्टी सक्तीने करता येणारच नाहीत. उदा विमा उतरवणे हे कायद्याने बंधनकारक करता येणार नाही. आयुर्विम्याला पर्याय नाही अशी जाहिरात करता येईल. गायी extinct झाल्या तरच गोवध बम्दी करता येईल . माझ्या हेलमेट घालण्याने माझे रक्षण होणे महत्वाचे नाही ते माझ्या मागे बसलेल्या " दुसर्‍या" चे रक्षण करू शकते की नाही हे महत्वाचे. यासाठी तर एस टी च्या ड्रायव्हरची मद्य चाचणी घाट सुरू होताना करतात. प्रवाशांची नाही. थोड्क्यात आतला मेंदू त्याची प्रवृती बदलण्याची ताकद हेल्मेट मधे नाही. ती फारशी कायद्यातही नसते ती संस्कारातच असते. माझी एक खात्री आहे की एरवी हेल्मेट टाळणारे हायवे वर बर्‍याच वेळा हेल्मेट वापरीत असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा