Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल

स
संदीप डांगे
Sat, 01/10/2015 - 23:32
🗣 358 प्रतिसाद
फ्रेन्च कार्टूनिस्ट हत्याकान्डाबद्दल सगळीकडे गदारोळ सुरु आहे. हजारो लोक रस्त्यांवर आले आहेत "अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला", "आम्ही सगळे चार्ल्स हेब्डो", वैगेरे वैगेरे. आणि त्यातल्याच काही अतिउत्साही महाभागांनी परिसरातल्या मस्जीदी उध्वस्त करून आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क बजावला. मृतांबद्दल सहानुभूती असणे योग्यच आहे पण ती किती योग्य ते जरा तपासून बघायला हवी. मी स्वतः एक कलाकार असून कट्टरवाद्यांच्या भूमिकेतून मी ह्या हल्ल्याचे समर्थन केले कारण कुणीतरी हा वेगळा दृष्टीकोन मांडणे आवश्यक आहे, जो काही धाडसी वार्तापत्रे मांडत आहेतच. जेणे करून ह्या हत्याकांडाच्या इतर बाबींवर प्रकाश पडावा व मुस्लिमांची जी एकच एक प्रतिमा रंगवली जात आहे तो प्रयत्न हाणून पाडवा. पण काही मित्रांना माझा हा पवित्रा खटकला आणि त्याचे चेपू वर पडसाद उमटले. तिथे उदधृत काही विचार माझ्यापेक्षा जास्त चांगला,व्यवस्थित आणि माहितीपूर्ण विचार करणाऱ्या जाणकार मिपाकारांसमोर ठेवत आहे. चर्चा अपेक्षित आहे. "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने केलेल्या खोडसाळपणाबद्दल आज कुणीही बोलत नाही कारण कुणाची हत्या होणे म्हणजेच फार भयंकर एवढेच सामान्यपणे लोक समजतात. ज्याची हत्या झाली तो भारी निष्पाप आणि मारणारा क्रूर अविचारी नराधम. त्याच वेळेस गोडसेच कसे बरोबर, गांधी कसे मारण्याच्याच लायकीचे होते हे गेली साठ वर्षे आपण चघळत आहोत. म्हणजेच काय तर मारणारा आणि मरणारा ह्यापैकी जो आपला त्याचीच बाजू बरोबर. ह्यासंदर्भात आपण दोन अतिशय वेगळ्या गोष्टी लक्ष्यात घेतल्या पाहिजेत, एक म्हणजे, "चार्ल्स हेब्दो" ह्या साप्ताहिकाने फार खवचट आणि असंस्कृत अश्या व्यंगचित्रातून पैगंबरांचा अपमान केला. त्या साप्ताहिकाचा असे करण्यामागचा हेतू जाणून बुजून भावना दुखावून उचकवणे (provocative) असाच होता. माझा आक्षेप हा हत्याकांडाच्या पूर्वी झालेल्या बेजबाबदारपणाबद्दल आहे. लोक आज म्हणत आहेत कि "साधे एक चित्र काढले तर थेट गोळ्या घालायची काय गरज होती?" ते चित्र इतरांसाठी साधे असेल मुस्लिमांसाठी नाही हा एक मुद्दा, त्यातल्या एका व्यंगचित्रकाराचे मत असे होते "माझ्यासाठी पैगंबर पवित्र वैगेरे काही नाही, मी काही कुराणाचा कायदा मानत नाही, मी फ्रेंच कायदा मानतो." म्हणजेच इतरांच्या श्रद्धास्थानाला घाणेरड्या पद्धतीने चितारणार, त्यांचा अपमान करणार, वरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गळे काढणार. म्हणजे त्याला ज्या पद्दतीने इतरांच्या आत्मसन्मानाची हिंसा करता येणार ते तो करणार, त्याच्यावर इतरांनी त्यांच्या पद्दतीने प्रतिकार केला तर चूक. हा काय तर्क आहे? शब्द आणि चित्रांचे वार जास्त घातक असतात. बंदुकीपेक्षा लेखणी ताकतवान ते उगाच नाही म्हणत. एक गोळी एका वेळेस एकाला मारते. एकच चित्र लाखोंना लाखो वेळा आणि आयुष्यभर मारते. त्यामुळे लेखणी चालवताना हजारदा विचार करावा लागतो. दुसरी गोष्ट अशी कि जाणून बुजून केल्या जाणाऱ्या अपमानाचा बदला घेण्याची त्यांची ती रीत असेल, चांगली आहे कि वाईट आहे ह्यावर "आपण" कितीही काथ्याकुट केला तरी ते लोक बदलणार नाही. "हम करे सो कायदा" असाच सगळा प्रकार आहे तिकडे. जे काही बदलायचे आहे ते हेच बदलायचे आहे. जगातल्या सर्व मुस्लिमांना हे जाणवून देणे आवश्यक आहे कि "हम करे सो कायदा" हा प्रकार त्यांच्या जीवावर इतर मुठभर लोक करत आहेत. आणि आज तो शांतीप्रिय मुस्लिमांना व जगाला त्रासदायक ठरत आहे. ते करायचे सोडून तुम्ही जर पैगंबर आक्षेपार्ह स्थितीत दाखवले तर शांतीप्रिय मुस्लिम सुद्धा भडकून उठतील आणि जो उद्देश आहे तो उरणारच नाही. माझा मुद्दा फार साधा आहे. दहशतवाद (कोणताही, कारण जगात मुस्लिम दहशतवाद सोडून इतर अनेक धर्माचे, देशाचे, समाजाचे दहशतवादी आहेत. मिडिया त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो हा भाग वेगळा) व त्याबद्दल लिहिताना किंवा चित्र काढताना किमान एक लक्ष्यात घेतले पाहिजे कि कुठल्याही दहशतवादाला केवळ एकच एक बाजू नसते. हजारो कारणे आहेत. एक कलाकार म्हणून तुम्हाला सर्वांगीण विचार किंवा समजूतदारपणा दाखवता येत नसेल तर तुम्ही मरण्याच्या लायकीचेच असाल. हुसैनला आपण हिंदुनी का भारताबाहेर घालवले मग? पिके विरुद्ध का आंदोलन चालू आहे? जे चूक आहे त्याबद्दल जरूर लिहावे. लिहायला, छापायला मिळते म्हणून मर्यादा ओलांडू नये. साधीशी गोष्ट आहे. माझ्या-तुमच्या हातून काही गुन्हा घडला तर मला -तुम्हाला शिक्षा व्हावी किंवा ज्याने कुणी पाणउतारा करायचा त्याने माझा-तुमचा करावा. पण कुणी चारचौघात त्या गुन्ह्याला धरून आपल्या आई-बापावर अतिशय वाह्यात टीका केली तर ते तुम्ही किंवा मी सहन करू शकू काय? मुस्काट नाही का फोडणार त्याचे? बाकी राज्यघटना आणि कोर्टस याबद्दल, तर खूप दिवसांपासून चारली हेब्दो ला त्याचे धंधे बंद करण्यास सांगितले होते, त्याने ऐकले नाही. त्याच्याविरुद्ध केस म्हणजे "अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी" म्हणून केस होत नव्हती. त्याचवेळेस स्वेच्छेने बुरखा घालणाऱ्या स्त्रियांवर बुरखा न घालण्याची सक्ती करून फ्रेंच सरकार एक वेगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत होते. (बहुतेक मुस्लिम स्त्रियांना बुरखा घालणे आवडते असे साधारणपणे वाचनात आले आहे, किंवा त्यांना ते त्यांचे दमन वैगेरे वाटतच नसेल कदाचित.) आंतरराष्ट्रीय स्तरावर मुस्लिम समाजाबद्दल फार दुटप्पी कारभार आहे. प्रत्येक कट्टरवादी आपलेच तेच खरे म्हणत असतो. तो धार्मिक असो वा कुठलाही. दोन घटना सांगतो. माझ्या ओळखीतले एक वयस्कर दलित पोलिस इन्स्पेक्टर होते, ते मला म्हणाले तू एक चित्र प्रदर्शन भरव, तुला काय पैसा लागेल तो मी पुरवतो. पण चित्रे माझ्या संकल्पनेनुसार असली पाहिजेत. श्रीराम आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया याबद्दल अतिशय गलिच्छ प्रकारे त्यांनी वर्णन केले व म्हणाले हाच खरा इतिहास आहे. शबरी काही म्हातारी नव्हती तर ती एक तरणीताठी युवती होती, त्यांच्यात प्रेमालाप दाखव इत्यादी इत्यादी. त्यावेळेस मीसुद्धा देव वैगेरे मानणारा नव्हतो आणि रामायणातल्या असंख्य विसंगती मलाही दिसत होत्या. पण त्यांचे उद्दिष्ट वेगळे होते, त्यांना रामाचे जनमानसात असलेले पूज्यस्वरूप मलिन करायचे होते. कारण काय तर हिंदू धर्म कसा फालतू आहे हे सिद्ध करायचे. आणि "त्यांनी" स्वीकारलेला बौद्ध धर्म कसा श्रेष्ठ असे मिरवायचे. मी त्यांना सरळ नकार दिला कारण हे सगळेच बेसलेस आहे. मुद्दलातच चुकीचे आहे. एखाद्या धर्मात काही चुकीचे चाललेले असेल तर ते बदलण्याऐवजी त्यांच्या पुज्यस्थानावर हल्ला करा ते डळमळीत करा, हेच केले जाते. म्हणजे जे चुकीचे आहे ते तर चालू राहते, लोक मूर्ख राहतात आणि फ्रेममधला राम जाऊन बुद्ध किंवा जीजस येतो. कारण लोक शहाणे झाले तर सगळ्याच फ्रेम्स फेकून देतील, मग ह्या तमाम धर्मगुरुंचे कसे चालणार? पु ल देशपांडे यांचा एक अतिशय सुंदर वैचारिक लेख आहे यावर. त्यात त्यांनी धर्मश्रद्धांवरील आक्रमण आणि त्याचे माणसाच्या मनावर होणारे परिणाम याबद्दल लिहिले आहे. दुसरी घटना. एकदा एका मित्राशी वाद झाला होता "भारतीय मुस्लिम शाळांमधून वन्दे मातरम म्हणत नाहीत" यावरून. त्यावेळी तो जो पेटला होता आणि त्याच्या डोळ्यांतून अक्षरश आग बरसत होती. मी म्हणालो कि त्यांना म्हणायचे कि नाही त्यांचे त्यांना ठरवू दे आपण त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत. त्यावर तू फारच चिडला होता. तेव्हा ते त्याचे वन्दे मातरम "लादणे" असेच होते. स्वतंत्र भारतात प्रत्येकाला आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. कुणी एक त्यांच्यावर जबरदस्ती नाही करू शकत, हिंदू संघटना मुस्लिम शाळेतल्या वन्दे मातरम बद्दल फार संवेदनशील आहेत. जणू काही त्यांनी वन्दे मातरम नाही म्हटले म्हणजे ते देशद्रोही. मग आपले हिंदू धड राष्ट्रगीत ना म्हणू दे ना, तिकडे लक्ष नाही देणार. हा एक प्रकारचा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोन आहे. मोठ्या संख्येने मुस्लिम सैन्यात आहेत, शहीद होतात, देशात इतरही क्षेत्रात देशाचे नाव मोठे करतात, तरी त्यांच्यावर संशय घेतोच. दोन धर्मात कुणीतरी दंगली घडवून आणतो, आपण एकमेकांची डोकी फोडतो. आणि दोघेही आयुष्यभर त्यांनी असे केले म्हणून आम्ही तसे केले म्हणत असतो. फायदा घेणारा फायदा घेऊन मोकळा. आपले बरेच मुस्लिम मित्र असतील. कधी त्यांना फेस टू फेस विचारून बघा. त्यांना काय वाटते ते. ते काहीही बोलले तरी "ते आपल्याशी कधीच खरे बोलणार नाहीत" हाच गंड सर्वसामान्य हिंदू बाळगून असतो. दुर्दैवाने तो खरा कि खोटा हे कुणीच कधी सांगू शकणार नाही. समाजसुधारणेचा आव आणणाऱ्या सर्वाना परिस्थितीचे पूर्ण भान आवश्यक आहे. समाजात सुधारणा करण्याची खरीच अपेक्षा व तळमळ असणारे कुणाची खिल्ली उडवत नाहीत. नाहीतर प्रकाश आमटे आदिवासींना नुसते "तुम्ही किती बावळट आणि मागासलेले आहात" असेच म्हणत राहिले असते कि झाली असती त्यांच्यात सुधारणा. आणि राजा राम मोहन राय यांनी घाणेरडी व्यंगचित्रे काढली असती तर सतीप्रथा बंद झाली असती. महात्मा फुले लोक मुलीना शिकवत नाहीत म्हणून लोकांना वाकुल्या दाखवत राहिले असते. इतरही अनेक उदाहरणे आहेत. याउपरही हाच आणि असाच मार्ग असेल तर शेवटही असाच होईल. मुस्लिमांच्या शरिया ची भीती घातली जाते. इतर लोक छुप्या मार्गाने तेच करतात ते मात्र नामानिराळे. दुतोंडी जे म्हणतो मी ते हेच. सगळीकडेच हे होत आहे. आपणच काहीतरी करायला पाहिजे दरी मिटवायला. नाही का? जाता जाता: ज्या जगात अमेरिका सारखा देश आहे, त्याने कधीही शांततेने जगता येईल असा विचार करू नये. अमेरिका फार कुटीलतेने दोन राष्ट्र, दोन समूह, दोन समाजामध्ये तेढ व अविश्वास निर्माण करण्यासाठी व त्यातून आपला फायदा आणि वर्चस्व मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे. गेल्या दोन महिन्यात तेल-जगतात काय चालले आहे ते बघावे आणि आस्ट्रेलिया व फ्रांस मध्ये झालेल्या हल्ल्यांचा संबंध जोडता येतो का ते पाहावे. घटना फार सरळ आणि उघड जरी असल्या तरी त्या तितक्या सरळ कधीच नसतात. माझे मत तर असे आहे कि नेहमीप्रमाणे मुस्लिम जगताविरुध्द जनमत तापवण्याचा हा प्रकार अमेरिका करत आहे. सदर दोन्ही हल्ले अमेरिका पुरुस्कृत आहेत. कारण दोन्ही हल्ल्यांच्या कार्यपद्धतीत फारच विसंगती आहेत. ज्या साधारणपणे आढळत नाहीत.

प्रतिक्रिया द्या
123231 वाचन

💬 प्रतिसाद (358)
इ
इरसाल Sat, 01/17/2015 - 11:02 नवीन
आपले टेबल मेनर हे जगात सर्वोत्तम असून ते जगात सर्वांनी पाळले पाहिजे , ते न पाळता जपानी चीनी व भारतीय तोंड उघडे ठेवून अन्नाचे तोंडात चर्वण करतात , ढेकर मोठ्याने देतात म्हणून त्यांना असंस्कृत ठरवून त्यांची खिल्ली उडवणारे व आपलाच धर्म आपलीच संस्कृती श्रेष्ठ म्हणणारे धर्मांध उन्नीस बीस फरकाने सारखेच
आपल्याला ह्याबद्द्ल नावे ठेवणारे ते नालायक कारमधे "ढुम्म" करुन गरम हवेचा झोका सोडतात तेव्हा कुठे जातात ह्यांचे मेनर्स. प्रत्येक देशाच्या आपापल्या मॅनर्स बद्दल काही सीमारेषा आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
म
माहितगार Wed, 01/14/2015 - 07:35 नवीन
न्यूयॉर्क टाईम्स मध्ये मुस्तफा अक्योल यांचा एक चांगला लेख आला आहे, जिज्ञासूंनी जरूर वाचावा.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 01/14/2015 - 08:00 नवीन
हे पण वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
श
श्रीगुरुजी Wed, 01/14/2015 - 08:44 नवीन
>>> हे पण वाचावे. याच लेखातील खालील परिच्छेद वाचा. One of Egypt’s highest Islamic authorities warned that the cartoon would exacerbate tensions between the secular West and observant Muslims, while death threats circulated online against staff members. A preacher, Anjem Choudary, the former leader of a radical group that was banned in Britain, was quoted by a British newspaper, The Independent, as saying that the image was “an act of war” that would be punishable by death if judged in a Shariah court. हा अंजेम चौधरी नावाचा मुल्ला राहतो इंग्लंडमध्ये. पण याला इंग्लंडमध्ये राहून देशाचे कायदे न पाळता शरियाचे कायदे पाळायचेत. मुस्लिमांचा दुटप्पीपणा तो हाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
विनोद१८ Wed, 01/14/2015 - 09:57 नवीन
.....या सेक्युलर लोकांचे, आपल्या देशात तर हे असले 'वेड पांघरून पेडगावला जाणारे' बरेच 'विचारजंत' आहेत, यांच्या ढुंगणाखाली बॉम्ब फुटले तरी ते शहाणे होणार नाहीत. यांच्या द्रुष्टीने तसे घडविणारे हे नेहमीच निर्दोष असतात व तसे करण्याचा त्यांना अधिकारच असतो, आपण त्यात काही ढवळाढवळ करु नये. कोणत्याही देशाचे कायदे-कानून, त्याची घटना, त्याचे सार्वभॉमत्व हे सगळे आमच्या धर्मवेडापुढे अगदीच क्षुद्र आहेत, आमची धर्माज्ञाच काय ती सर्वश्रेश्ठ असाच त्याचा अर्थ होतो नाही का ?? आम्ही आमच्या मनास येइल तसेच वागणार, इतर गोष्टींशी आम्हांला काही घेणे देणे नाही. एक तर आमचे म्हणणे मान्य करा किंवा मरायला तयार व्हा. अशी ही टोकाची भूमिका घेणारी 'वाळ्वंटी विचारसरणीची' माणसे, याच्याकडून जगाने वेगळी अपेक्षा ती कसली करायची ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे Wed, 01/14/2015 - 11:05 नवीन
हिंदू धर्म व हिंदू धर्म हा बेस असलेले धर्म सोडून जगात सगळ्या धर्मांनी, पंथांनी क्रूरता केली आहे. बाकी हिंदू धर्मही काही फार सोवळा राहिला आहे असे नाही. चातुर्वर्ण व स्त्री-दमन, जाती-पातीवरून चाललेल्या सद्यस्थितीतल्या हत्या हे त्याचेच उदाहरण आहे. त्यामुळे कुठल्याही धर्माला त्याच्या बळींच्या संख्येवरून किती क्रूर आणि किती मवाळ हा निकष लावायचा तर कठीण आहे कारण सगळी सांख्यिकी कुठून मिळवणार? बलात्कार वैगेरे तत्सम गंभीर गुन्हे झाल्यावर आपल्या कडे मध्यपुर्वेचे हात-पाय छाटण्याचे, लिंग छाटण्याचे कायदे करावे अशी जनमानसात मागणी होते. ह्या अघोरी प्रथा तिकडून उचलण्यास आपला समाज फारच उत्सुक आहे. पण तोच न्याय कट्टरवाद्यांनी स्वतः लावला कि त्रास होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८
व
विनोद१८ Wed, 01/14/2015 - 11:36 नवीन
बलात्कार वैगेरे तत्सम गंभीर गुन्हे झाल्यावर आपल्या कडे मध्यपुर्वेचे हात-पाय छाटण्याचे, लिंग छाटण्याचे कायदे करावे अशी जनमानसात मागणी होते. ह्या अघोरी प्रथा तिकडून उचलण्यास आपला समाज फारच उत्सुक आहे. पण तोच न्याय कट्टरवाद्यांनी स्वतः लावला कि त्रास होतो.
..काय, वाळ्वंटी विचारसरणीच्या कट्टरवाद्यांना जगात कुठेही जाउन आपल्या प्राणप्रीय 'वाळ्वंटी विचारसरणी' प्रमाणे जगाचा न्यायनिवाडा करण्याचा अधिकार आहे ?? असेल तर तुम्हाला तो मान्य आहे का ?? बाकी, ते बलात्कार वैगेरे तत्सम गंभीर गुन्ह्यांबददल त्या अघोरी शिक्षा आपल्याकडेही कायद्याने असाव्यात असे मलासुद्धा वाटते, त्याबाबतीत सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
माहितगार Wed, 01/14/2015 - 14:07 नवीन
हा अल जझिरावरील खालेद दिआब यांचा लेख देखील जिज्ञासूंनी जरूर वाचावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
H
hitesh Wed, 01/14/2015 - 09:11 नवीन
अतिरेक्याम्चा हिम्दु पुराणांचा अब्यास दांडगा दिस्तोय.. १०० वेळा साम्गुनही न ऐकलेल्या शिसुपालाला मारणार्‍या भगवंतांचा आदर्श त्यान्नी घेतला. .. श्रीकृष्णार्पणमस्तु
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Wed, 01/14/2015 - 10:51 नवीन
हा पण एक चार्ली हेब्डॉ http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Tamil-author-announces-his-death/articleshow/45884850.cms
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 01/14/2015 - 12:14 नवीन
या धाग्यावरुन मिपावर रणकंदन माजवणार्‍या केजरीवाल साहेबांवरील धाग्यांची आठवण झाली.भ्रष्टाचारी हि पदवी कोणि कोणास द्यावी, नैतिकतेचे पाठ देण्याचा अधिकार कोणाचा, आंदोलनं कोणि आणि कोणत्या स्वरुपात करावी, आंदलोनांचा उद्देश राजकारण आहे कि समाजकारण इ. अनेक बौद्धिकं झडली मिपावर. फेब्रुवारी नजीक आलाय मित्रांनो... :) बाकि फ्रांन्स मधील हत्याकांड हे धार्मीक, सामाजीक, राजकीय आणि व्यक्तीगत दुटप्पीपणाचा परिणाम आहे एव्हढं कळतय...आणि हे दोन्हि बाजुंना लागु पडतय. आता मुद्दा असा कि हा वडवानल पुढे आणखी कोणाची राखरांगोळी करणार... दुसरं महायुद्ध संपुन अजुन शतक देखील ओसरलं नाहि. मध्यंतरी महायुद्धचे रिपल इफेक्ट्स जाणवतच राहिले. त्याची परत त्सुनामी बनणार कि काय आता :(
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Wed, 01/14/2015 - 12:29 नवीन
भिकार** लेख आहे. आणि लेखकाचा उद्देश नापाक ( हा शब्द आवडेल लेखकाला ) आहे. सौदीतुन अमेरिकेत जाउन भारतात आलेल्या पैश्यावर चालणार्‍या NGO वर लेखकाचे पोट अवलंबुन असावे असे दिसतय.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 01/14/2015 - 12:42 नवीन
तुमचे पोट कशावर अवलंबून आहे ते आधी कळवा इथे. इतर लोकांच्या पोटापाण्याची चिंता वाहायची काय गरज? तुम्हाला आवडेल, पटेल, रुचेल, गोड गोड वाटेल असेच लिहायचे असा काही नियम आहे का मिपाचा ? तुमच्या पोटात अमेरिकेचे मीठ पडत असेल म्हणून खाल्ल्या मिठाला जागताय का? जरा आपली दिव्यदृष्टी कार्यान्वित करून लेखकाचे पोटापाण्याचा उद्योगही बघून घ्या आणि असले भिकारचोट आरोप करण्याआधी शंभर वेळ विचार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
H
hitesh Wed, 01/14/2015 - 16:36 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
H
hitesh Wed, 01/14/2015 - 16:38 नवीन
मारणारे मुसलमान . मरणारे ख्रिश्चन .. हिंदु बिच्चारे त्यांच्यावर वाद घालत बसलेत गंमत आहे नै !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
स
संदीप डांगे Wed, 01/14/2015 - 17:00 नवीन
वाद घालणे सुसंस्कृत समाजाचे लक्षण आहे, गोळ्या घालणे असंस्कृत समाजाचे. आणि सुसंस्कृत समाजाने असंस्कृत समाजाशी कसा वाद घालावा याचाच वादविवाद सुरु आहे. बाकी कै नी तसं …!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
अ
अर्धवटराव Wed, 01/14/2015 - 17:50 नवीन
आर यु शुअर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 01/15/2015 - 01:49 नवीन
जर्मनीत सध्या मुस्लिम विचारवंताना इस्लाम टेरेरिझम वर प्रश्न विचारला असता त्याने जे उत्तर दिले त्याचे इंग्रजीत भाषांतर करून अजून एका ठिकाणी टंकले तेच येथे अडकवत आहे. German Muslim scholar replies on TERRORISM. I liked the answer of this German Muslim scholar when he was asked about terrorism and Islam. He said. "Who started the first world war? Not Muslims!! Who started the second world war? Not Muslims!! Who killed about 20 millions of Aborigines in Australia ? Not Muslims!! Who sent the nuclear bombs of Hiroshima and Nagasaki? Not Muslims!! Who killed more than 100 millions of Indians in North America? Not Muslims!! Who killed more than 50 million of Indians in south America? Not Muslims!! Who took about 180 millions of African people as slaves and 88% of them died and were thrown overboard into Atlantic ocean? Not Muslims!! No, NOT Muslims!! First of all, You will have to define terrorism properly. If a non-Muslim does something bad. It is crime. But if a Muslim commits the same. He is a Terrorist. So first remove this double standards. Then come to the point. I am proud to be a MUSLIM !! ARE YOU?? SPREAD THIS Message & don't BREAK THE CHAIN!! आपल्याला अनेक गोष्टी मुळापासून तपासून पहिल्या पाहिजे. भारतात आज कितीतरी कोटी मुसलमान आहेत सगळ्याची घर वापसी शक्य नाही तेव्हा त्यांना मुख्य प्रवाहात आणणे किंबहुना मी म्हणतो भांडवलशाही व त्याने येणाऱ्या चंगळवादाची चटक लावावी भारत एक बाजारपेठ म्हणून स्वदेशी व विदेशी लोकांना आकर्षित करतो ह्या बाजारपेठेला मुस्लिम समूह हातभार लावू शकतो किंवा सिमी सारख्या संघटना निर्माण करून सुरुंग तरी लावू शकतो , ह्या घटनेमुळे जर्मनीत सॉलिड राडा झाला , तीन दिवस लोक प्रचंड तणावाखाली होते. आता जर्मन असो वा तुर्की किंवा अन्य मुस्लिम दोन्ही बाजूच्या सामान्य माणसाच्या मनात क्रुसेड सुरु झाले आहेत , अश्यावेळी भारतीय म्हणून मोदींना विशेष धन्यवाद मला द्यावेसे वाटतात , योग्य वेळी त्यांनी गांधी ह्यांचे महात्म्याचा उदो उदो केला , आता गांधी ह्यांचे सर्व विचार पटो अथवा न पटो त्यांचे नाव घेऊन एक भारतीय म्हणून आंतरराष्ट्रीय समुदायात उपदेशाचे डोस वाफाळलेल्या कॉफीचे घोट वाफाळलेल्या चर्चेत पाजता येतात . जगभरातील मिडियाचा ची पण गंमत पहा विविध स्तरावर हिंसक गुन्हे होण्यात आघाडीवर असलेला भारत त्याच्या लेखी गांधीचा देश आहे तर ह्याबाबतीत भारताच्या पासंगाला न पुरणारा गुन्हे हिंसा आटोक्यात ठेवणारा जर्मनी म्हटले की त्यांना हिटलर आठवतो .
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव गुरुवार, 01/15/2015 - 03:43 नवीन
या सो कॉल्ड विचारवंताला एकदम साधं उत्तर देता येतं. जेव्हढं काहि त्याने नॉट मुस्लीम्स म्हणुन मोजलं तेव्हढ्या मुस्लीम शासीत राज्यांच्या लढाया देखील दाखवता येतात. इतरांनी केला तर गुन्हा आणि मुस्लीम करतात तो आतंकवाद असं का? तर तो आतंकवादच आहे म्हणुन. ज्याला आपण इस्लाम म्हणतो ते आहे तरी काय? इस्लाम एक धर्म आहे (रिलीजन या अर्थाने), संस्कृती आहे, फिलॉसॉफी आहे आणि इस्लाम एक राज्य/राजकारण देखील आहे. त्यातल्या रिलीजन, संस्कृती, फिऑसॉफी वगैरे भागात जगाला देण्यासारखं खुप चांगलं काहि आहे आणि त्यात सुधारणांचा स्कोप देखील आहे (हे इतर सर्वच धर्मांना, संस्कृतींना लागु होतं). पण राज्य/राजकारण इस्लाम अजीबात कालसुसंगत नाहि. आजवर मानवी इतिहासात अनेक प्रकारच्या शाह्या अस्तित्वात आल्या. टोळ्या, गोपालक, गणराज्ये ते अगदी आजचं कॅपिटलीझम, कम्युनीझम, लोकशाही वगैरे ( यातलं प्रत्येक उदाहरण एखाद्या शाहीचं नाहि... पण त्यात राज्यकारणाचे अंग दाखवले आहेत ). या सर्व राज्यव्यवस्था माणसाच्या तत्कालीन परिस्थितीतुन अस्तिवात आल्या व त्यात मानवाच्या उदात्ततचं प्रतिबिंब पडलं. तसच त्यामध्ये मुलभूत स्खलनशीलता देखील होती व म्हणुन या सर्व राज्यपद्धती एक विशिष्ट काळपर्यंत टिकल्या व आपल्या मरणाने मेल्या/मरतील. हे आयु:चक्र प्रत्येक सिस्टीमधे आढळतं कारण ते मानवी असतं. इस्लाम नावाचं जे राज्य/राजकारण आहे त्यात या मानवीपणाचा अभाव आहे. ते सेक्रेड समजल्या जातं , सोवळ्यात राहतं. नॉन इस्लामीस्टला त्याची कालविसंगतता अगदी ठळकपणे दिसत असते पण इस्लामीस्ट ते स्पष्टपणे नाकारतो. पॅन इस्लाम अशी ओळख निर्माण करायची. त्यात अस्मितेचा स्फुल्लींग ओतायचा. त्याला डिव्हाइन पर्सेप्शन द्यायचं. त्यातुन अगदी कौटुबीक पातळीवर योद्धे निर्माण करायचे. व या पॅन इस्लाम झेंड्याखाली जमलेलं राज्य रक्षण करायला प्रत्येकाने जिथे असाल तिथुन, जमेल त्या मार्गाने लढायचं, असं काहिसं स्वरुप आहे याचं. अशा राज्याचं अस्तित्व प्रत्याक्षात लवकर दिसत नाहि, पण त्याचं अस्तित्व जाणावतं. या अस्तित्वाच्या भितीचं नाव म्हणाजे दहशतवाद. इस्लामी जगातल्या अनेक विचारवंतांनी देखील असल्या राज्य/राजकारणातला पोकळपणा ओळखला व त्याविरुद्ध आवाज बुलंद करायचा प्रयत्न देखील केला. पण काहि ना काहि कारणाने त्यांचा आवाज कमि पडला व आज हे गुप्त स्वरुपातलं पॅन इस्लाम राज्य सगळ्या जगाला आव्हान देण्या इतपत सशक्त झाल्यासारखं वाटतय. भारतात इंग्रजांनी हिंदु-मुस्लीम संघर्ष पेटवला अन्यथा इथे फार धार्मीक सौदार्ह्य होतं असा प्रचार केला जातो. तसच अमेरीका-रशीया वगैरे सांडांच्या भांडणात मुस्लीम मूलतत्ववादाचं मूळ दाखवल्या जातं. पण ते तितकसं बरोबर नाहि. माणसाच्या रक्ताचा देखील व्यापार करणार्‍या युरोप, अमेरीकेने या आगीत तेल ओतलं हे अगदी खरं आहे. अन्यथा २१व्या शतकातल्या वैज्ञानीक वातावरणात हि आग विझली असती असाही तर्क केल्या जातो. पंण शेवटी हा एक तर्कच आहे, आणि पॅन इस्लामने सुरु केलेला दहशतवाद नावाचा युद्धप्रकार हे एक वास्तव आहे. या युद्धाचा पहिला बळी नैतीक मुल्यांची भलावण करणारा इस्लाम धर्म, खान-पान, संगीत शास्त्रादी अमृताने ओथंबलेली इस्लामी संस्कृती व शांकर अद्वैतवादाच्या गाभ्याची इस्लामी फिलॉसॉफी असणार आहे... इट्स बॅड, रिअली बॅड. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
ज
जेपी गुरुवार, 01/15/2015 - 06:04 नवीन
आपल्याला अनेक गोष्टी मुळापासून तपासून पहिल्या पाहिजे. भारतात आज कितीतरी कोटी मुसलमान आहेत सगळ्याची घर वापसी शक्य नाही तेव्हा त्यांना मुख्य प्रवाहात आणणे किंबहुना मी म्हणतो भांडवलशाही व त्याने येणाऱ्या चंगळवादाची चटक लावावी भारत एक बाजारपेठ म्हणून स्वदेशी व विदेशी लोकांना आकर्षित करतो ह्या बाजारपेठेला मुस्लिम समूह हातभार लावू शकतो किंवा सिमी सारख्या संघटना निर्माण करून सुरुंग तरी लावू शकतो , ह्या घटनेमुळे जर्मनीत सॉलिड राडा झाला , तीन दिवस लोक प्रचंड तणावाखाली होते. आता जर्मन असो वा तुर्की किंवा अन्य मुस्लिम दोन्ही बाजूच्या सामान्य माणसाच्या मनात क्रुसेड सुरु झाले आहेत , अश्यावेळी भारतीय म्हणून मोदींना विशेष धन्यवाद मला द्यावेसे वाटतात , योग्य वेळी त्यांनी गांधी ह्यांचे महात्म्याचा उदो उदो केला , आता गांधी ह्यांचे सर्व विचार पटो अथवा न पटो त्यांचे नाव घेऊन एक भारतीय म्हणून आंतरराष्ट्रीय समुदायात उपदेशाचे डोस वाफाळलेल्या कॉफीचे घोट वाफाळलेल्या चर्चेत पाजता येतात . जगभरातील मिडियाचा ची पण गंमत पहा विविध स्तरावर हिंसक गुन्हे होण्यात आघाडीवर असलेला भारत त्याच्या लेखी गांधीचा देश आहे तर ह्याबाबतीत भारताच्या पासंगाला न पुरणारा गुन्हे हिंसा आटोक्यात ठेवणारा जर्मनी म्हटले की त्यांना हिटलर आठवतो . +१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
ह
हुप्प्या गुरुवार, 01/15/2015 - 06:25 नवीन
खरे कारण काय? ६०-७० वर्षापूर्वी बुडाखाली पेट्रोल सापडण्याच्या पूर्वी सौदी अरेबिया व अन्य अमिराती म्हणजे वाळवंटातील रानटी टोळ्या होत्या. त्यामुळे महायुद्ध सुरू करणे वा त्यात सहभागी होणे शक्यच नव्हते. ज्या काळात वसाहतवाद फोफावला त्या काळात युरोप हे बाकी जगाच्या कितीतरी पुढे होते म्हणून ते अन्य जागी जाऊन जुलूम करू शकले. ह्या काळात कुठल्याही मुस्लिम राजवटीकडे इतकी ताकदच नव्हती की हजारो मैल दूर जाऊन राज्य करायचे. पण जेव्हा शक्य होते तेव्हा त्यांनी ते केले. इराणमधून पर्शियन साम्राज्य नष्ट केले. तेव्हा किती लोक मारले असतील? अफगाणिस्तानात हिंदू व बुद्ध मारले. इतके की हिंदूकुश पर्वत हे हिंदूंची कत्तल ह्या अर्थी आहे. गुलामगिरीविषयी बोलायचे तर कुराणापासून अरेबियन नाईटपर्यंत सगळीकडे गुलाम ही कल्पना आहे. त्यातही काळे गुलाम गोर्‍यांपेक्षा कनिष्ठ असे साफ लिहिलेले आहे. तेव्हा त्याही बाबतीत अरब लोक मागे नाहीत. धर्माचा आधार घेऊन, देशाच्या, भाषेच्या सीमा पार करून केला जाणारा दहशतवाद, आजच्या घडीला ह्या प्रकारात नि:संशय मुस्लिमच आघाडीवर आहेत. उगाच ७०, ९०, २००, ३०० वर्षे मागे काय झाले त्याच्या नावाने गळे काढून ही वस्तुस्थिती बदलत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
च
चिऊकाऊ गुरुवार, 01/15/2015 - 16:00 नवीन
Whatever the European and Americans have done was the past. And in fact the reason for the wars those days was never the religion only. They saw the other regions as their colonies. So do you think that because the Europeans and Americans have killed millions of people in past so now it is Islam's turn or right to kill? Europeans and Americans have contributed many scientific and technological advances also. What is Islam's contribution to the modern science for human life? And even if some scientists are Islamic it is not the Islamic land where they work. All such scientists have to migrate to Europe and america to do any kind of constructive research. Even the terrorist who claim to follow 1500 years old Islam use the latest weapons and not swords. To make image is banned and they use the videos. They use modern communication means. This is 2015 and the whole world (at least a common man all over the world) is now looking forward to peace. Instead of changing your lifestyle and beliefs to date you are imposing the whole world to follow your 1500 years old rules? We are free to express our own views. We don't want just to follow blindly because it is written 1500 years ago. And what the hell that German Islamic so called philosopher doing in the Europe? if he really thinks the Europeans and Americans are that bad and his Islamic terrorists' killing is not terrorism, he, that Anjem Choudary and all such should ENJOY his pure obsolete Islamic life in Syria or Afghanistan.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
च
चित्रेचा तारा गुरुवार, 01/15/2015 - 08:22 नवीन
आपण इंग्लंड मध्ये राहत असे दिसते. तुम्हाला माहित आहे का एका व्यंग चित्रकाराने असे म्हटले होते कि - ज्याचे चित्र आहे त्याचेच व्यंग चित्र काढता येते. आता मोहमद साहेबांचे चित्र नाही तर व्यंगचित्र आले कोठून?
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Fri, 01/16/2015 - 01:43 नवीन
मोहमद साहेबांचे चित्र नाही तर व्यंगचित्र आले कोठून? हे माहिती असून उगाच खाजून खरुज काढण्याचा प्रकार होतो नुकतेच पोप ने त्यांना कानपिचक्या दिल्या , खुद ख्रिस्ती धर्मावर अशी व्यंग चित्र काढल्याने त्यांनी ह्या वृत्त पत्रावर अनेक खटले ठोकले आहेत अर्थात आम्ही ख्रिस्ती धर्मावर ताशेरे ओढले मग हिंदू व मुस्लिम धर्मावर ओढले तर कुठे बिघडले हे म्हणजे एखादा टवाळ पोरग म्हणेन मी माझ्या एरिया मधील मुलींना छेडतो, मग बाजूच्या एरियातील मुलींना सुद्धा छेडले तर कुठे बिघडले. व्यक्ती स्वातंत्र्यांचा गैरवापर टाळला पाहिजे, मिपा ला एक राष्ट्र मानले तर निलीकांत सारखा खमका राष्ट्रप्रमुख व त्यांचे कर्तबगार दक्ष संपादक येथे अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा गैर वावर होणार नाही ह्यासाठी धागा त्यावरील प्रतिसाद ह्यावर लक्ष ठेवून असतात प्रसंगी कारवाई करतात असे अलर्ट कायदेशीर फ्रेमवर्क प्रगत देशात हवेत , भारतात व जगात प्रसार माध्यमांना मोकळे रान देऊ नये
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Fri, 01/16/2015 - 04:12 नवीन
मुलीला छेडणे आणि व्यंगचित्र प्रकाशित करणे सारखे? काय वाट्टेल ते बेलगाम बोलायचे का? मुलीला छेडणे हे थेट त्या मुलीला उद्देशून असते. एखाद्या पेपरात व्यंगचित्र काढले तर आग्रहाने हे चित्र बघाच असे म्हणून संपादक मंडळी तो अंक मुस्लिमांच्या गळ्यात मारतात का? ज्यांना अशा गोष्टीची घृणा वाटते त्यांना तो पेपर विकत न घेणे, संपादकाला खरमरीत पत्र लिहिणे शक्य आहे. पण बेछूट गोळीबार? कुठल्याही सुसंस्कृत देश असे स्वीकारणार नाही. एकदा का अशा गोष्टींना बंदी घालायचा पायंडा पडला की कुठल्याही खटकणार्‍या गोष्टीला तितकीच निषिद्ध बनवणे आणि त्यावर बंदी घालणे सुरु होते. कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या की नाही हे ठरवणे अत्यंत व्यक्तीसापेक्ष आहे. आणि बंदी घालणे हा उपाय नाही. फ्रान्ससारख्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या कैवार्याला तर नाहीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
ट
टवाळ कार्टा Fri, 01/16/2015 - 07:45 नवीन
तुमच्या प्रतिसादाने माझ्या भावना दुखावल्या आहेत पुढची भारतवारी कधी करणार ते कळवावे मग मी गोळ्यांचा बंदोबस्त करतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 01/16/2015 - 08:14 नवीन
ते येण्याअगोदर त्यांना लिमलेटच्या गोळ्या आवडतात की चॉकलेट इक्लेर्स हे नीट विचारून ठेवा... नायतर तुमच्या गोळ्या फुकट जातील. +D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 01/16/2015 - 08:15 नवीन
जेम्सच्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ह
हाडक्या गुरुवार, 01/22/2015 - 11:36 नवीन
हा जेम्स कोण आणि त्याच्या गोळ्या त्यालाच मागा की मग.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
न
निनाद मुक्काम … Fri, 01/16/2015 - 22:06 नवीन
नक्की करा येथे बाळासाहेब वारले तेव्हा एका मुलीने चेपू वर एक पोस्ट टाकले तेव्हा तिच्या जीवाला धोका नको व नसता राडा नको म्हणून तिला पोलिसांनी अटक केली, मुली व व्यंग चित्र ह्यांचा संबंध नाही संबंध आहे आमच्यात चालते म्हणून तुमच्यात पण तुम्ही चालवून घ्या असे वर्तन करणे पैगंबर ह्यांचे चित्र काढणे ह्यावरून डेन्मार्क हॉलंड येथे राडे झाले होते हे माहिती असून मुद्दाहून परत परत ती गोष्ट फक्त मुस्लिम ह्यांना भडकावणे मग त्यातून दोन समाजात दुही त्यातून महत्वाचे म्हणजे सामन्य मुस्लिम कट्टरते कडे ढकलणे सुरु झाले ह्याद्धी ९ एकेवन नंतर ब्रिटन मध्ये तेथील लोकांनी मुस्लिमांना टार्गेट केले व त्यातून वृत्तीने ब्रिटीश असलेले अनेक मुस्लिम कट्टरवादाकडे झुकले. पण तेव्हा फ्रांस मध्ये असे मोठ्या प्रमाणात झाले नव्हते , आता ते जर्मनी मध्ये सुरु झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
श
श्रीगुरुजी Fri, 01/16/2015 - 08:24 नवीन
आपल्या धर्माशी संबंधित कोणत्याही स्वरूपातील चित्रे/व्यंगचित्रे काढू नयेत असे मुस्लिमांना वाटत असेल तर त्यांनी इतर धर्माशी संबंधित कोणाचीही कोणत्याही स्वरूपातील चित्रे/व्यंगचित्रे/बीभत्स चित्रे काढता नयेत. जर आपल्या धर्माबद्दल इतर धर्मियांनी आदरभाव बाळगावा असे वाटत असेल तर मुस्लिमांनी इतर धर्माबद्दल आदर बाळगला पाहिजे. आपल्या धर्मात मूर्तीपूजेला विरोध आहे म्हणून इतर कोणत्याच धर्मातल्या लोकांनी मूर्तीपूजा करायची नाही व जिथे संधी मिळेल तिथे आम्ही मूर्ती, देवळे वगैरे तोडून टाकणार असे वर्तन केले तर इतर धर्मीय सुद्धा संधी मिळताच तसाच प्रतिसाद देतील. सौदी अरेबिया, मालदीव इ. देशातले मुस्लिम इतर कोणत्याही देशात गेले तरी तिथल्या स्थानिक मशिदीत जाऊन नमाज, ईद वगैरे करतात. परंतु त्यांच्या स्वतःच्या देशात इतर कोणत्याही धर्माच्या लोकांना आपल्या धर्माचे पालन करायची बंदी आहे. हा दुटप्पीपणा किती दिवस चालणार? आपल्याशी इतर धर्मियांनी जसे वागावे अशी मुस्लिमांची इच्छा असेल तसेच वर्तन त्यांनी इतर धर्मियांशी केले पाहिजे. अन्यथा इतर धर्मीय संधी मिळताच यांच्याविरूद्ध वागतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
न
निनाद मुक्काम … Fri, 01/16/2015 - 22:11 नवीन
माझ्या बायकोने हा प्रश्न आबू धाबी मध्ये एका शेखला विचारला आमच्या देशात तुम्ही तुमचे धार्मिक स्वातंत्र्य मागतात तुमच्या देशात का देत नाही ह्यावर त्याचे उत्तर होते तुमच्या देशातील लोकशाही आम्हाला आमच्या मागण्या मागायच्या हक्क देते तो आम्ही का सोडू आमच्या देशात लोकशाही नाही शरियत कायदा आहे तेव्हा बंधने घालणे हा आमचा हक्क आहे लोकशाही व सेक्युलर असल्याचे दुष्परिणाम भारताने हिंदू समजणे भोगले आहेत आता वेस्टन वल्ड भोगत आहे पेरिस मध्ये बुरखा बंदी केली तशी भारतात मोदी मनात असून आणू शकत नाही तुमची आणि माझी इच्छा असली तरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
स्पंदना Sat, 01/17/2015 - 03:09 नवीन
चला निदान एक मुद्दा तरी मान्य आहे तुम्हाला. मग आता मी विचारते, १० वर्षापुर्वी ऑस्ट्रीलियात सिडनी येथील एका बीचजवळ या लोकांची वस्ती वाढली. मग त्यांनी हळुहळु त्या बीचवर येणार्‍अ‍ॅया ऑस्सीजना हटकायला सुरवात केली.येथे स्त्रीयांनी पूर्ण कपडे घालुन फिरल पाहिजे, या बिचवर तुमच वर्तन इस्लाम विरोधी नसल पाहिजे. आमच्या धार्मिक भावना दुखावताहेत वगैरे वगैरे. या बातमिचे मेसेजेस सगळीकडे फिरले आणि हजारोने ऑस्सीज एका दिवशी तेथे जमले. अर्थात तरुण पोरं. राडा झाला. कोण जबाबदार? तुमच्या देशात तुम्हाला खायला प्यायला नाही, सुरक्षा नाही म्हणुन तुम्ही बोटी भरुन भरुन येथे निर्वासित म्हणुन येता. य्थले सरकार तुम्हाला इंग्लीश शिकवण्यापासून घरादारातल्या सगळ्या गोष्ती देउन तुमच पुनर्वसन करते आणि मग तुम्ही तुमचा धर्म काढता..काय म्हणायच? अगदी हीच परिस्थीती एका डोक्युमेंट्रीत मी इंग्लंड जवळच्या गावात पाहिली. हे लोक तेथे रहायला गेले. यांची जनसंख्या वाढली. आणि आज अशी परिस्थीती आहे की इंग्लीश बायकांना "यु आर अलमोस्ट नेकेड, मला तुझी लाज वाटते" अस सुनावल जाऊ लागलं. प्रसंगी बळाचा वापर सुरु झाला. जी मुलगी ही डॉक्युमेंटरी तयार करत होती, ती स्व्तः या गावात जन्मलेली. तू येथे आलीसच कशी असा प्रश्न तीला विचारला गेला. येथे यायच असेल तर माझ्या धर्माचा आदर राख अस सुनावलं गेलं. काय म्हणन आहे तुमच यावर? आणि आता या सगळ्यावर कडी म्हणजे कालची सौदी मधुन आलेली भारतिय आणि पाकिस्तानी मुस्लिमांना "स्वतःला उगा अरब समजू नका" अशी खडसावणी!! ब्राव्हो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
स
संदीप डांगे Sat, 01/17/2015 - 05:28 नवीन
चला, आत्ता या क्षणी मी तुमची बाजू, तुमचे मत शंभर टक्के मान्य करतो. चर्चा या वळणावर आली आहे कि मुस्लिमधर्मीय शांतीप्रिय नाहीत हे सिद्ध होत आहे. पुढे काय? नक्की काय करायचं या लोकांचं? रवांडा जिनोसाईड किंवा गेलाबाजार गुजरात? काय करून प्रश्न सुटेल नेमका? प्रश्न जर एवढा गंभीर आहे तर नुसत्या त्यांच्या खोड्या काढून किंवा बोटचेपं समाजप्रबोधन करून काही सकारात्मक आणि परिणामकारक होणार तर नाहीच. उलट ते लोक अजून वाईट पद्धतीने एकवटत जातील. एक सामान्य नागरिक किंवा काहीही, एक मुस्लिमेतर माणूस म्हणून मी काय करावे? माझे काही हिंदू मित्र आहेत जहालमतवादी पक्षातले. मुसलमान म्हटले कि त्यांची तळपायाची आग मस्तकात जाते. मुस्लिमांबद्दल बोलताना तावातावाने, खाऊ का गिळू असे करून बोलतात, त्यांच्याशी भविष्यात कधीतरी लढावे लागेल म्हणून कुठेतरी जाउन लाठ्याकाठ्या दांडपट्टा खेळतात. मी त्यांना म्हणतो कि बाबानो एवढाच तुमचा राग आहे तर का नाही अवघा हिंदुस्थान म्लेञ्छमुक्त केलात आता पर्यंत? कशाची वाट बघताय? कुणाला घाबरताय? हि आपलीच मातृभूमी आहे मग कशाने तुम्हाला रोखून धरले आहे? त्यांच्याकडे याची उत्तरे नसतात. किंवा जी असतात ती फार शेपूटघाल्या वृत्तीची असतात. मग ते इकडे तिकडे बोट दाखवायला सुरुवात करतात. सेकुलर-सुडो सेकुलारांना फाट्यावर मारण्याची भाषा करणारांकडे याचे काय उत्तर आहे? जरा कुणी मुस्लिमांबद्दल काही चांगले बोलत आहे असे कळले रे कळले कि हे लगेच त्यांना थेट पाकिस्तानात निघून जा वैगेरे सांगतात. प्रत्यक्षात एकाही मुस्लीमास तोंड वर करून बोलायची हिम्मत नसते. गुजरात मध्ये जे झाले ते देशात इतरत्र का नाही झाले? हिंदुस्थान इस्लाममुक्त करण्यासाठी तथाकथित हिंदुत्ववादी लोकांनी तोंडातून गरम गरम हवा दवडण्याखेरीज काय केले? कोण कुठल्या बांगलादेशी मुस्लिमांसाठी मुंबईत गोंधळ घातला, आपण माजघरात बसून तावातावाने बोलाण्याखेरीज खरेच तोडीस तोड असे काय केले? मेणबत्ती मोर्चे आणि चर्चाविनिमय यांतून खरेच काही साध्य होत नाही. पाकिस्तानात मारलेल्या मुलांसाठी आपल्या देशातली मुले मेणबत्त्या घेऊन मौनात बसवल्या गेली. एवढा मूर्खपणा मी आयुष्यात कधी पहिला नाही. माझ्या देशातल्या मुलांना कणखर आणि निडर बनवण्याएवजी त्यांना असे नेभळट आणि लाचार का बनवले जात आहे? ६-१६ वर्ष वयोगटातल्या संस्कारक्षम मनांवर आपण भयाचे आणि अगतिकतेचे संस्कार करत आहोत. लोक बंदुका घेऊन येणार, आपल्याला मारणार, आपण मरून जाणार, मग मेणबत्त्या घेऊन बसायचे असते. मरण ही संकल्पनाही नीट माहित नसलेल्या कोवळ्या मनांमध्ये हे भीतीचे रोप का पेरावे? दहशतवादाला चेहरा नसतो पण धर्म आहे. मग त्या धर्माशी नेमके कसे वागायचे हे ठरलेच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
श
श्रीगुरुजी Sat, 01/17/2015 - 09:24 नवीन
>>> नक्की काय करायचं या लोकांचं? रवांडा जिनोसाईड किंवा गेलाबाजार गुजरात? काय करून प्रश्न सुटेल नेमका? या लोकांच्या कालबाह्य व बेकायदेशीर रूढींना विरोध करायचा (उदा. ३ वेळा तलाक म्हणून दिलेला घटस्फोट, एकापेक्षा जास्त लग्ने, महिलांची सुंता इ.) व त्यांचे फाजील लाड बंद करायचे. बहुतेक अमुस्लिम देशात हे असले फाजील लाड केले जात नाहीत. मुस्लिमांना तिथल्या कायद्यानुसारच वागावे लागते. आमचा शरियतचा वेगळा कायदा असले चाळे तिथे खपवून घेतले जात नाहीत. दुर्दैवाने भारतात निधर्मांध यांच्या असल्या कृत्यांना पाठिंबा देतात आणि तुमच्यासारखे देखील त्यांच्या दहशतीचे समर्थन करतात. >>> प्रश्न जर एवढा गंभीर आहे तर नुसत्या त्यांच्या खोड्या काढून किंवा बोटचेपं समाजप्रबोधन करून काही सकारात्मक आणि परिणामकारक होणार तर नाहीच. उलट ते लोक अजून वाईट पद्धतीने एकवटत जातील. एक सामान्य नागरिक किंवा काहीही, एक मुस्लिमेतर माणूस म्हणून मी काय करावे? धर्मातील वाईट चालीरीतींना विरोध करणे म्हणजे खोड्या काढणे नव्हे. >>> माझे काही हिंदू मित्र आहेत जहालमतवादी पक्षातले. मुसलमान म्हटले कि त्यांची तळपायाची आग मस्तकात जाते. मुस्लिमांबद्दल बोलताना तावातावाने, खाऊ का गिळू असे करून बोलतात, त्यांच्याशी भविष्यात कधीतरी लढावे लागेल म्हणून कुठेतरी जाउन लाठ्याकाठ्या दांडपट्टा खेळतात. मी त्यांना म्हणतो कि बाबानो एवढाच तुमचा राग आहे तर का नाही अवघा हिंदुस्थान म्लेञ्छमुक्त केलात आता पर्यंत? कशाची वाट बघताय? कुणाला घाबरताय? हि आपलीच मातृभूमी आहे मग कशाने तुम्हाला रोखून धरले आहे? हाच तो निधर्मांधांचा प्रोपागंडा. आजवर निधर्मांध हाच प्रोपागंडा करून मिरवत आले आहेत. >>> त्यांच्याकडे याची उत्तरे नसतात. किंवा जी असतात ती फार शेपूटघाल्या वृत्तीची असतात. मग ते इकडे तिकडे बोट दाखवायला सुरुवात करतात. सेकुलर-सुडो सेकुलारांना फाट्यावर मारण्याची भाषा करणारांकडे याचे काय उत्तर आहे? जरा कुणी मुस्लिमांबद्दल काही चांगले बोलत आहे असे कळले रे कळले कि हे लगेच त्यांना थेट पाकिस्तानात निघून जा वैगेरे सांगतात. प्रत्यक्षात एकाही मुस्लीमास तोंड वर करून बोलायची हिम्मत नसते. पुन्हा एकदा प्रोपागंडा >>> गुजरात मध्ये जे झाले ते देशात इतरत्र का नाही झाले? ट्रेनचा डबा फक्त गुजरातमध्येच जाळला गेला. इतरत्र नाही. नाही तर तिथेही नागरिकांचा असाच प्रक्षोभ झाला असता. >>> हिंदुस्थान इस्लाममुक्त करण्यासाठी तथाकथित हिंदुत्ववादी लोकांनी तोंडातून गरम गरम हवा दवडण्याखेरीज काय केले? कोण कुठल्या बांगलादेशी मुस्लिमांसाठी मुंबईत गोंधळ घातला, आपण माजघरात बसून तावातावाने बोलाण्याखेरीज खरेच तोडीस तोड असे काय केले? त्यांनी काय करायला हवे? >>> मेणबत्ती मोर्चे आणि चर्चाविनिमय यांतून खरेच काही साध्य होत नाही. पाकिस्तानात मारलेल्या मुलांसाठी आपल्या देशातली मुले मेणबत्त्या घेऊन मौनात बसवल्या गेली. एवढा मूर्खपणा मी आयुष्यात कधी पहिला नाही. त्यात काय मूर्खपणा आहे? मुले ही मुलेच असतात. ती कोणत्याही देशातील असली तरी ती मुलेच असतात. दुर्दैवाने तुम्हाला इस्लामी अतिरेक्यांनी केलेल्या हत्या योग्य वाटतात आणि तुमच्या आणि इस्लामी अतिरेक्यांच्या दृष्टीने धर्म हा निष्पापांच्या जीवापेक्षा जास्त मोठा आहे. त्यामुळे तुम्हाला ही भावना कळणार नाही. >>> माझ्या देशातल्या मुलांना कणखर आणि निडर बनवण्याएवजी त्यांना असे नेभळट आणि लाचार का बनवले जात आहे? ६-१६ वर्ष वयोगटातल्या संस्कारक्षम मनांवर आपण भयाचे आणि अगतिकतेचे संस्कार करत आहोत. लोक बंदुका घेऊन येणार, आपल्याला मारणार, आपण मरून जाणार, मग मेणबत्त्या घेऊन बसायचे असते. मरण ही संकल्पनाही नीट माहित नसलेल्या कोवळ्या मनांमध्ये हे भीतीचे रोप का पेरावे? अत्यंत हास्यास्पद वाक्ये! >>> दहशतवादाला चेहरा नसतो पण धर्म आहे. मग त्या धर्माशी नेमके कसे वागायचे हे ठरलेच पाहिजे. तुम्हाला या धर्माचे व त्यांच्या दहशतवादाचे कौतुक आहे. तुम्ही जसे वागता तसे इतर वागतीलच असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 01/18/2015 - 14:02 नवीन
>>> गुजरात मध्ये जे झाले ते देशात इतरत्र का नाही झाले? ट्रेनचा डबा फक्त गुजरातमध्येच जाळला गेला. इतरत्र नाही. नाही तर तिथेही नागरिकांचा असाच प्रक्षोभ झाला असता.
आता तुमच्या प्रतिक्रियेवरून असे दिसतंय कि गुजरात दंगलीला तुमचे समर्थन आहे. गुजरात दंगलींमध्ये जे काय झाले त्याबद्दल तुमचे काय मत आहे? ट्रेनचा डबा तर गोध्रात जाळला मग सगळ्या गुजरात मध्ये निष्पाप मुसलमानांचे शिरकाण का झाले? नागरिकांचा प्रक्षोभ… ओ के. चांगली पळवाट आहे म्हणजे नागरिकांचा प्रक्षोभ हा न्यायसंमत आहे असे मानायचे काय? बाबू बजरंगी यांचे कृत्य कोठल्या प्रेरणेतून झाले असावे? आता बाबू बजरंगी स्वत:च सांगत आहेत म्हणून बरे नाहीतर असे काही झालेच नाही असे तुम्ही म्हणाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 01/19/2015 - 10:31 नवीन
>>> आता तुमच्या प्रतिक्रियेवरून असे दिसतंय कि गुजरात दंगलीला तुमचे समर्थन आहे. गुजरात दंगलींमध्ये जे काय झाले त्याबद्दल तुमचे काय मत आहे? ट्रेनचा डबा तर गोध्रात जाळला मग सगळ्या गुजरात मध्ये निष्पाप मुसलमानांचे शिरकाण का झाले? गुजरातमध्ये जे झाले ते इतरत्र का नाही झाले या तुमच्या प्रश्नावर मी कारणमीमांसा दिलेली होती. त्यावरून लगेच गुजरात दंगलीला माझे समर्थन आहे हा स्वतःला सोयिस्कर निष्कर्ष काढून मोकळे पण झालात! >>> ट्रेनचा डबा तर गोध्रात जाळला मग सगळ्या गुजरात मध्ये निष्पाप मुसलमानांचे शिरकाण का झाले? तुमचा इतर सर्व गोष्टींप्रमाणे इतिहासाचा अभ्यास सुद्धा खूप कच्चा आहे. गुजरात दंगलीत जे गेले त्यात अनेक हिंदू सुद्धा होते. गुजरात दंगलीत दोन प्रकारे माणसे गेली. काही जण जमावाच्या दंग्यात मारले गेले तर काही जण दंगा करणार्‍या जमावाला थोपविण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिस व लष्कराच्या गोळीबारात मारले गेले. दोन्ही प्रकारे मारले गेलेल्यांमध्ये जसे मुस्लिम होते तसेच हिंदू सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. हिंदू-मुस्लीम दंगली भारतात गेली अनेक शतके सुरू आहेत. १९९२-९३ च्या मुंबईतील दंगलीतील मृतांची संख्या २००२ मधील गुजरातमधील मृतांच्या संख्येपेक्षा कितीतरी जास्त होती. त्यामुळे "निष्पाप मुस्लिमांचे शिरकाण का झाले" असा चुकीचा प्रश्न विचारण्याऐवजी निष्पाप नागरिकांचे शिरकाण का झाले असा प्रश्न विचारणे जास्त योग्य होईल. आणि मुख्य म्हणजे रेल्वेच्या डब्यातील ६० निष्पाप महिला व मुले यांना का जिवंत जाळण्यात आले हा प्रश्नच तुम्हाला पडलेला दिसत नाही. >>> नागरिकांचा प्रक्षोभ… ओ के. चांगली पळवाट आहे तुम्ही नाही का पॅरिसमधील निष्पाप नागरिकांच्या हत्येचे समर्थन करण्यासाठी व्यंगचित्राची पळवाट शोधली. आठवतंय ना? बादवे, व्यंगचित्र काढण्याच्या तुलनेत रेल्वेच्या डब्यातील ६० निष्पाप महिला व मुले जिवंत जाळण्याचे कृत्य खूपच जास्त भयंकर आहे ना? >>> म्हणजे नागरिकांचा प्रक्षोभ हा न्यायसंमत आहे असे मानायचे काय? असं कोण म्हणालं? म्हणजे तुम्हाला पॅरिसमधील अतिरेक्यांचा हल्ला हा न्यायसंमत वाटतोय, पण गुजरातमधील नागरिकांचा प्रक्षोभ मात्र बेकायदेशीर वाटतोय. >>> बाबू बजरंगी यांचे कृत्य कोठल्या प्रेरणेतून झाले असावे? पेशावरमध्ये १३२ मुलांना मारण्याची जी प्रेरणा तीच ही प्रेरणा, पॅरिसमध्ये १७ निष्पाप नागरिकांना मारून टाकण्यामागे जी प्रेरणा होती तीच ही प्रेरणा आणि पेशावर, पॅरिस इ. ठिकाणच्या हत्याकांडाचे समर्थन करण्याची जी प्रेरणा होती ती ही प्रेरणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ट
टवाळ कार्टा Mon, 01/19/2015 - 10:38 नवीन
रेल्वेच्या डब्यातील ६० निष्पाप महिला व मुले यांना का जिवंत जाळण्यात आले
याचे कारण तर मी अजूनपर्यंत मिपावर वाचलेले नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
अ
अर्धवटराव Sun, 01/18/2015 - 20:31 नवीन
अच्छा... म्हणजे फ्रेंच हत्याकंडाच्या समर्थनाचं मूळ इथे आहे तर... तरिच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 01/18/2015 - 21:24 नवीन
"तरीच…" म्हणजे काय? गुजरात दंगल ही एक विशिष्ट घटनेची प्रतिक्रिया होती. शारली हेब्दो सुद्धा कुठल्यातरी घटनेची प्रतिक्रिया आहे. मी या दोन्ही घटना चांगल्या किंवा वाईट म्हणत नाही. माझ्यासाठी यात एकच गोष्ट सत्य आणि समान आहे ती म्हणजे एका कट्टरतेला दुसऱ्या कट्टरतेने उत्तर दिले. बाकी आदर्शांच्या आणि सुसंस्कृतपणाच्या गप्पा फक्त गप्पा असतात. वेळ आणि परिस्थितीप्रमाणे साळसूद नराधम होतात आणि नराधम साळसूदपणाचा आव आणतात. २००७ पासून मी ह्या पैगंबर चित्रप्रकरणाबद्दल वाचत आहे. हा हल्ला कधी ना कधी होणारच होता आणि हे त्या संपादकासह सगळ्यांनाच माहिती होते. इस्लामीच नाही तर इतरही कट्टर धर्मीय त्यांच्या जीवावर उठले होते. यात पेन्सिल विरुद्ध बंदूक असा संघर्ष दिसत असला तरी तो कट्टर विरुद्ध कट्टर असाच आहे. अश्या लढाईत कुणीच जिंकत नाही. हेच सत्य आहे आणि ती स्वीकारून प्राप्त परिस्थितीवर निश्चित आचरता येणारी आणि परिणाम देणारी कृती अपेक्षित असते. म्हणून भरमसाठ संख्येने वाढून सुसंस्कृत समाजाला शांततेत जगायला अडचण करणाऱ्या ह्या मुस्लिम धर्माचा गुजरात करणे हाच एक योग्य मार्ग आहे का असे विचारले इथे. तुम्ही भलताच अर्थ काढला. अजून काही ठोस परिणामकारक मार्ग असेल तर सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Sun, 01/18/2015 - 22:17 नवीन
म्हणून भरमसाठ संख्येने वाढून सुसंस्कृत समाजाला शांततेत जगायला अडचण करणाऱ्या ह्या मुस्लिम धर्माचा गुजरात करणे हाच एक योग्य मार्ग आहे का असे विचारले इथे
म्हणजे 'गुजरात करणे' हा एक 'उपाय' आहे इथपर्यंत तुमचे विचार प्रगल्भ आहेत तर. व्हेरी गुड. देन आय एम नॉट सर्प्राइझ्ड मि. संदीप. तुम्ही ऑलरेडी ठोस आणि परिणामकारक मार्गावरुन चालत आहात. त्याची फळं तुम्ही आरामात सहन करु शकाल, किंबहुना एंजोय कराल याबद्दलही काहिच शंका नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 01/19/2015 - 00:31 नवीन
आतापर्यंत झालेल्या चर्चेतून फक्त एवढेच कळले कि काहीजणांनी मला मुस्लिमांचा कसा पुळका आलाय, मी कसा सुडोसेकुलरवादी आहे असा ठाम निर्णय आपल्यावतीने घेऊन टाकला आहे. त्यामुळे त्यांना आपण कसे कायदेप्रिय, न्यायप्रिय, सुसंस्कृत नागरिक आहोत ह्याचा दंभ मिरवता आला असेल. असो. कुणाला कशात आनंद वाटेल सांगता येत नाही. "भरमसाठ संख्येने वाढून सुसंस्कृत समाजाला शांततेत जगायला अडचण करतात" हा माझा नाही तर माझ्या मताच्या विरोधात मत मांडणाऱ्याचा दावा आहे. त्याच वेळेस "प्रत्येक मुस्लिम दहशतवादी नाही" हा पण त्यांचा दावा आहे. एकाच बाजूने केल्या जाणाऱ्या परस्परविरोधी विधानांमुळे गोंधळलो आहे त्यामुळेच मी आता नेमके कसे वागायचे हे विचारलं आहे. २ पर्याय समोर आले आहेत. एक म्हणजे श्रीगुरुजींनी दिलेला सल्ला कि त्यांच्या कालबाह्य व चुकीच्या चालीरीतींना विरोध करा. आता घटनेने त्यांना त्यांच्या चालीरीती व मला माझ्या चालीरीती पाळायची मुभा दिली आहे, त्यामुळे त्यांच्या चालीरीतींचा किंवा कालबाह्य रुढींचा (उदा. ३ वेळा तलाक म्हणून दिलेला घटस्फोट, एकापेक्षा जास्त लग्ने, महिलांची सुंता, कोण कशी आंघोळ करतो, गाय खातो कि बैल खातो, वैगेरे वैगेरे) मला काही त्रास होत नाही तर मी का विरोध करायचा? तो त्यांच्या धार्मिक सुधारणेचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांचे सुधारक बघतील काय करायचे ते. आमच्यातल्या सुधारणा करायला आम्ही काही आउटसोर्सिंग नव्हते केले. दुसरा उपाय म्हणजे नागरिकांचा प्रक्षोभ वैगेरे: त्यांच्याविरोधात मिळेल तेवढा राग, द्वेष गोळा करत जायचे. एखादी गोधरासारखी घटना घडली कि सगळा संताप मोकळा करून त्याचे गुजरात करायचे. माझ्यामते दोन्हीही पर्याय पूर्ण चुकीचे आहेत. तुमच्याकडे काही पर्याय असेल तर द्या. उगाच माझ्यावर कसला ठप्पा मारायचा प्रयत्न करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Mon, 01/19/2015 - 03:54 नवीन
काहीजणांनी मला मुस्लिमांचा कसा पुळका आलाय,
उगाच माझ्यावर कसला ठप्पा मारायचा प्रयत्न करू नका
संस्थळावर काहि आठवड्यांची सदस्यसता असणार्‍या व वैयक्तीक रित्या कुणि ओळखण्याची शक्यता कमि असणार्‍या एका आयडीला इथे कुणि काहि मुद्दाम लेबलं लावायचा प्रयत्न करतोय असं वाटणं हे प्रचंड हास्यास्पद आहे. असो. तुमच्या या गैरसमजाला उगाळण्यात काहि पॉइण्ट नाहि.
२ पर्याय समोर आले आहेत.
कुणिही काहिही पर्याय वगैरे दिलेले नाहित. तुम्ही स्वतःला कलाकार म्हणवता. व त्या चश्म्यातुन मानवी हत्याकांडाबद्द्लचे आपले उदात्त विचार तुम्ही प्रकट केलेत. इतरांनी त्यावर आपली प्रतिक्रीया दिली फक्त. शिवाय ज्यापद्धतीने तुम्हाला गुजरात पॅटर्न वगैरे दिसतात त्यावरुन तुम्हाला उपाय वगैरेशी काहिही घेणं देणं दिसत नाहि. उपाय तुमच्या डोक्यात ठाम आहेत व त्याचे परिणाम तुम्ही नक्की एंजोय करु शकाल याची मला खात्री आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Mon, 01/19/2015 - 10:40 नवीन
>>> त्यामुळे त्यांच्या चालीरीतींचा किंवा कालबाह्य रुढींचा (उदा. ३ वेळा तलाक म्हणून दिलेला घटस्फोट, एकापेक्षा जास्त लग्ने, महिलांची सुंता, कोण कशी आंघोळ करतो, गाय खातो कि बैल खातो, वैगेरे वैगेरे) मला काही त्रास होत नाही तर मी का विरोध करायचा? वा! काय तर्कशास्त्र आहे. धन्य आहे. पलिकडच्या घरातील कोणी स्त्री सती गेली तर मला काहीच त्रास नसतो. मग कशाला सतीबंदीचा कायदा आला? बादवे, चार्ली हेब्दोने काढलेल्या व्यंगचित्राचा तसा तुम्हाला व्यक्तिशः काहीच त्रास नव्हता. पण मग त्यांच्याविरूद्ध एवढी आदळआपट कशासाठी केलीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 01/19/2015 - 12:45 नवीन
वा! काय तर्कशास्त्र आहे. धन्य आहे. पलिकडच्या घरातील कोणी स्त्री सती गेली तर मला काहीच त्रास नसतो. मग कशाला सतीबंदीचा कायदा आला?
तुमचे पण तर्कशास्त्र बरेच चांगले आहेकी. मी जर हिंदू आहे आणि हिंदूंमध्ये सतीची प्रथा आहे तर ती माझ्या घरातही लागू होतेच की. त्याचा विरोध तर हिंदू धर्माचा एक सुधारणावादी म्हणून करणारच. दुसऱ्यांच्या धर्मात आपण का लुडबुड करावी? ओवेसी किंवा झाकीर नाईक सारखी टुकार लोकं हिंदू धर्मातल्या चालीरीतींबद्दल वाईट बोलतात तेंव्हा आपण हेच म्हणतो ना कि तू तुझ्या धर्मातले बघ आधी, आमच्या धर्माचं आम्ही बघू.
बादवे, चार्ली हेब्दोने काढलेल्या व्यंगचित्राचा तसा तुम्हाला व्यक्तिशः काहीच त्रास नव्हता. पण मग त्यांच्याविरूद्ध एवढी आदळआपट कशासाठी केलीत?
दोन वेगवेगळ्या घटनांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो इतकेच म्हणायचे होते. "कसे आहे" ह्यापेक्षा "कसे असले पाहिजे" ह्यावरच समाजाचा काथ्याकुट चालू आहे. कसे आहे ह्यावर पुर्वग्रहरहित दृष्टीकोनातून चर्चा केल्यावरच काय केले पाहिजे ह्याचे उत्तर मला हवे होते. मला काय म्हणायचे ते लेखात स्पष्ट केले आहे. सगळे जग जर मुस्लिमांना एकजात Not eligible to live in Humans ठरवत असेल तर त्यांच्याबाबतीत माझी भूमिका काय असावी. माझीच मते ठाम असती तर इथे लेख टाकायच्या फंदात पडलो नसतो. मी हल्ल्याचे समर्थन केले, जगात अनेक विचारवंत, पत्रकार तेच म्हणत आहेत फक्त ते हल्ल्याचे समर्थन करत नाहीत. पोपट मेला आहे हे कोण सांगणार? बायदवे, शर्ली च्या एका जुन्या सदस्याने ह्या हत्याकांडाचे समर्थन केले व हे एका दुसऱ्या नियतकालिकाने छापले. तर शर्ली च्या वकिलाने त्यावर प्रतिक्रिया देत म्हटले कि त्यांचे जरी बरोबर असले तर सद्यपरिस्थितीचे भान ठेवून त्यांनी असे छापायला नको होते. हाच तो दुटप्पीपणा. स्वत:चे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर बिनघोर हवे, दुसऱ्यांनी मात्र विचार करून बोलावे. त्याला तुम्ही आदळआपट म्हणताय तर तोही तुमच्या एका दृष्टिकोनाचाच भाग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 01/19/2015 - 14:42 नवीन
>>> तुमचे पण तर्कशास्त्र बरेच चांगले आहेकी. मी जर हिंदू आहे आणि हिंदूंमध्ये सतीची प्रथा आहे तर ती माझ्या घरातही लागू होतेच की. त्याचा विरोध तर हिंदू धर्माचा एक सुधारणावादी म्हणून करणारच. दुसऱ्यांच्या धर्मात आपण का लुडबुड करावी? ओवेसी किंवा झाकीर नाईक सारखी टुकार लोकं हिंदू धर्मातल्या चालीरीतींबद्दल वाईट बोलतात तेंव्हा आपण हेच म्हणतो ना कि तू तुझ्या धर्मातले बघ आधी, आमच्या धर्माचं आम्ही बघू. सतीची चाल हिंदू धर्मात सक्तीची नव्हती हो. फारच थोड्या भागातील थोड्या कुटुंबात सती गेल्याची उदाहरणे आहेत. तरीसुद्धा समाजसुधारकांनी स्वतःच्या घरात ही चाल नसताना आणि स्वतःला याचा त्रास होत नसताना यावर बंदी आणलीच कारण ही चाल समाजविघातक होती. दुसर्‍याच्या धर्मात आपण का लुडबूड करावी ही मानसिकता अत्यंत घातक आहे. दुसर्‍या धर्मात याऐवजी हळूहळू दुसर्‍या गावात, नंतर दुसर्‍या गल्लीत, नंतर दुसर्‍या घरात अशी कक्षा अरूंद होऊ शकते. दुसर्‍या धर्मात घातक गोष्टींची परंपरा असेल तर त्याला विरोध करायलाच हवा. दुर्दैवाने अल्पसंख्याक या गोंडस नावाखाली मुस्लिमांच्या वाईट चालीरीतींकडे दुर्लक्ष करून या चालीरीतींना कायदेशीर पाठबळ देण्याचे काम काँग्रेसने केले व निधर्मांधांनी तीच तळी उचलली. >>> दोन वेगवेगळ्या घटनांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो इतकेच म्हणायचे होते. "कसे आहे" ह्यापेक्षा "कसे असले पाहिजे" ह्यावरच समाजाचा काथ्याकुट चालू आहे. कसे आहे ह्यावर पुर्वग्रहरहित दृष्टीकोनातून चर्चा केल्यावरच काय केले पाहिजे ह्याचे उत्तर मला हवे होते. मला काय म्हणायचे ते लेखात स्पष्ट केले आहे. सगळे जग जर मुस्लिमांना एकजात Not eligible to live in Humans ठरवत असेल तर त्यांच्याबाबतीत माझी भूमिका काय असावी. माझीच मते ठाम असती तर इथे लेख टाकायच्या फंदात पडलो नसतो. मी हल्ल्याचे समर्थन केले, जगात अनेक विचारवंत, पत्रकार तेच म्हणत आहेत फक्त ते हल्ल्याचे समर्थन करत नाहीत. पोपट मेला आहे हे कोण सांगणार? आता तुम्ही विचारवंत झालात तर. अभिनंदन! तसंही भारतात हिंदूविरोधी व मुस्लिमांच्या बाजूने बोलणार्‍याला विचारवंत समजले जातेच. वेलकम टू विचारवंत क्लब! >>> बायदवे, शर्ली च्या एका जुन्या सदस्याने ह्या हत्याकांडाचे समर्थन केले व हे एका दुसऱ्या नियतकालिकाने छापले. तर शर्ली च्या वकिलाने त्यावर प्रतिक्रिया देत म्हटले कि त्यांचे जरी बरोबर असले तर सद्यपरिस्थितीचे भान ठेवून त्यांनी असे छापायला नको होते. बरं मग? >>> त्याला तुम्ही आदळआपट म्हणताय तर तोही तुमच्या एका दृष्टिकोनाचाच भाग आहे. तुमचा पण तोच दृष्टीकोन आहे, पण जास्त तीव्र स्वरूपात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 01/19/2015 - 16:09 नवीन
हाच तो दुटप्पीपणा. स्वत:चे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर बिनघोर हवे, दुसऱ्यांनी मात्र विचार करून बोलावे.
हे वाक्य कुठे गेले? तुमचे हे कसलेल्या पत्रकारांसारखे सोयीस्कर शब्द काढणे-घालणे, वाक्य उडवणे, त्यावर असंबद्ध प्रतिक्रिया देणे, बिनामुद्द्यांची चर्चा करणे, नुसते लाजवाब. गुरुजी, मानलं बा तुमच्या चिकाटीला. लगे रहो. निखिलराव वागळ्यांच्या तोडीस तोड आहात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे Mon, 01/19/2015 - 16:16 नवीन
आता तुम्ही विचारवंत झालात तर. अभिनंदन! तसंही भारतात हिंदूविरोधी व मुस्लिमांच्या बाजूने बोलणार्‍याला विचारवंत समजले जातेच. वेलकम टू विचारवंत क्लब!
मी हिंदुविरोधी आणि मुस्लिमप्रेमी आहे या श्रीगुरुजींनी लावलेल्या अप्रतिम शोधाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक घोषित करण्यात येत आहे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 01/19/2015 - 10:36 नवीन
>>> गुजरात दंगल ही एक विशिष्ट घटनेची प्रतिक्रिया होती. शारली हेब्दो सुद्धा कुठल्यातरी घटनेची प्रतिक्रिया आहे. मी या दोन्ही घटना चांगल्या किंवा वाईट म्हणत नाही. किती साळसूदपणा हा. तुमच्या मूळ लेखात तर पॅरिस हत्याकांडाचं जोरदार समर्थन आहे. बादवे, गोध्रा हत्याकांड विसरलात वाटतं? गोध्रा हत्याकांड काय, गुजरात दंगल काय, पॅरिस हत्याकांड काय, पेशावर हत्याकांड काय ... सर्व हत्याकांडे निंदनीय आहेत. तुम्ही मात्र सेलेक्टिव्हली कोणती हत्याकांडे वाईट व कोणती चांगली हे ठरवत आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Sat, 01/17/2015 - 09:31 नवीन
>>> आमच्या देशात लोकशाही नाही शरियत कायदा आहे तेव्हा बंधने घालणे हा आमचा हक्क आहे याच धर्तीवर अशी फ्रान्सची भूमिका आहे की आमच्याकडे शरियत कायदा नसून लोकशाही व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणाचीही व्यंगचित्रे काढणे हा आमचा हक्क आहे. >>> लोकशाही व सेक्युलर असल्याचे दुष्परिणाम भारताने हिंदू समजणे भोगले आहेत आता वेस्टन वल्ड भोगत आहे भारतातील सेक्यूलॅरिझमची अंमलबजावणी व पाश्चिमात्य जगातील सेक्यूलॅरिझमची अंमलबजावणी यात जमीनअस्मानाचा फरक आहे. भारतात सेक्यूलॅरिझम म्हणजे सेक्यूलॅरिझमच्या नावाखाली मुस्लिमातल्या अत्यंत अन्यायकारक गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष करून अन्यायकारक गोष्टींना कायदेशीर संरक्षण देणे व आम्ही इतर धर्मात हस्तक्षेप करत नाही अशी पाठ थोपटून घेणे असा होतो. याउलट पाश्चिमात्य देशात सेक्यूलॅरिझम म्हणजे सर्वधर्मियांना सर्व समान कायदे असणे व कोणत्याही विशिष्ट धर्माला झुकते माप ने देणे असा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा