Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ललित मोदी आणि सुषमा स्वराज

प
पैसा
Wed, 06/17/2015 - 07:07
🗣 289 प्रतिसाद
राम्राम मंडळी! तीन दिवस झाले. अर्णव गोस्वामीचा धुमाकूळ सुरू आहे. याबद्दलच्या बातम्या पेपरात दुसर्‍या तिसर्‍या पानावर येऊन गेल्या. पण मिपावर काही गडबड झाली नाही म्हणून काथ्याकुटाच्या प्रांतात घुसखोरी करत आहे. ललित मोदीवर गंभीर आरोप असताना सुषमा स्वराज यांनी त्याला पोर्तुगालला जायला मदत केल्याचा आरोप आहे. स्वराज यांनी तसे कबूल केले. कालपासून वसुंधरा राजे यांचेही नाव येत आहे. भाजप सत्तेत आल्यावर ललित मोदी खूप खुश झाल्याची बातमी वाचली. ते एक असो. मात्र मूळ आरोप सुषमा स्वराज यंना काही खाजगी बाबीत मदत ललित मोदी याने केली आणि त्याबदल्यात स्वराज यांनी ही मदत केली असे सकृद्दर्शनी दिसते. सुषमा यांची कन्या ललित मोदीची वकील असल्याचेही समजते. या सगळ्या प्रकरणात आयपी एल आणि गुंडगिरी, बेकायदेशीर व्यवहार यांचा परस्पर संबंध, पैशासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला चुना लावणे हे स्पष्ट दिसत आहे. आमचे श्रीपादभाऊ नाईक कधीच असल्या प्रकरणात दिसणार नाहीत पण ते काम करत नाहीत म्हणून पंप्र त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. नक्की कोणावर विश्वास ठेवावा? की थोडेफार काम करणार्‍या एफिशियंट लोकांना असे काही प्रकार कम्पल्सरी करावेच लागतात? (डिस्क्लेमरः मला फक्त शतकी प्रतिसादांचा धागा काढायचा आहे. तेव्हा या चर्चेत माझा सहभाग नसला तरी धागाकर्ते गायब झाले वगैरे टिप्पण्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. =)) )
वर्गीकरण
राजकीय चर्चा

प्रतिक्रिया द्या
47965 वाचन

💬 प्रतिसाद (289)
ट
टवाळ कार्टा Wed, 06/17/2015 - 09:31 नवीन
अश्या छोट्या आणि क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष नस्ते द्यायचे हो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
क
काळा पहाड Wed, 06/17/2015 - 10:28 नवीन
नाही या बाबतीत मला खरोखरच काही माहिती नाही. कारण मी हे सगळं तो इंटर्व्ह्यू बघून सांगतोय. एक चुकीची दुरुस्ती, इंटर्व्ह्यू श्री. राजदीप सरदेसाईनी इंडिया टुडे साठी घेतला होता. आणि ज्या प्रकारे ते श्री.मोदींची वाक्यं तोडून किंवा ते बोलत असतानाच मधेच दुसरे प्रश्न विचारत होते, त्यामुळे हे सगळं ऐकून समजून घेणं अवघड होतं. कदाचित ते चुकीचं ही असेल पण श्री. मोदींनी मला सरकारच्या परवानगीची गरज नव्हती हे विधान तसंच युके कोर्टाने त्यांच्यावरच्या केसेस फेटाळून लावल्या असं विधान केल्याचं मी ऐकलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
स
सव्यसाची Wed, 06/17/2015 - 10:37 नवीन
इंटर्व्ह्यू श्री. राजदीप सरदेसाईनी इंडिया टुडे साठी घेतला होता. आणि ज्या प्रकारे ते श्री.मोदींची वाक्यं तोडून किंवा ते बोलत असतानाच मधेच दुसरे प्रश्न विचारत होते, त्यामुळे हे सगळं ऐकून समजून घेणं अवघड होतं.
मलाही हेच वाटले. राजदीप सरदेसाई बोलूच देत नव्हता. बाकी ललित मोदी यांना रेसिडेन्सी मिळाली आहे कि सिटीझनशिप?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
न
नाखु Wed, 06/17/2015 - 11:23 नवीन
श्री. राजदीप सरदेसाईनी ही प्रथा पहिल्यांदा आणली आणि ती वागळे प्रभुतींनी आप्लया कु-मगदूराप्रमाणे पुढे चालिवली आणि आता प्रघात्+पायंडा+अनिवार्यता बनली आहे.

सतत सापळा प्रश्न विचारून पुरते न बोलू देता आपल्याला हवे तेच मुलाखतकर्त्याचे तोंडून वदवून घेणे किंवा वाक्ये/संदर्भ तोडून सोयीस्कर अर्थ काढणे.

उदा: प्रश्नकर्ता : सध्या मिपावर राजकारण धाग्यांनी पातळी ओलांडली आहे असे तुम्हाला वाटते का नाही ? मिपाकरः नाही लगेच असं सांगता येणार नाही ते धाग्या-धाग्यावर... (मध्येच तोडत) पुन्हा प्रश्नकर्ता : हो का नाही तेव्हढेच सांगा. मिपाकरःनाही प्रश्नकर्ता :पहा याचा अर्थ असा होतो की पूर्वी मिपावर राजकारण धाग्यांनी पातळी ओलांडली होती आणि अगदी सवंग, उथळ आणि बिनडोक धागे निघत होते असे सिद्ध होते. मिपाकरः अहो मी असे कुठे म्हटलो.(नेहमी प्रमाणे मध्येच तोडत) प्रश्नकर्ता :नाही आप्ल्याकडे इतका वेळ नाही पुढचा प्रश्न तुम्हाला एकूणच मिपाकरांचा भारतीय राजकारणाविषयीचा दृष्टीकोण कसा वाटतो आश्वासक की निराशाजनक? मिपाकरःअहो हे एका वाक्यात कसे सांगता येईल कारण वेग्वेगळ्या प्रसंगानुरूप ,विरोधी मत्-मतांतरे असतात..(नेहमी प्रमाणे मध्येच तोडत) प्रश्नकर्ता :नाही आप्ल्याकडे इतका वेळ नाही कसा आहे ते सांगा. मिपाकरःअलिकडच्या दिल्ली राज्यातील घटना आणि केंद्रातील काही अप्रिय घटना पाहिल्याकी त्या त्या पक्ष विचारधारेला मानणार्या लोकांनाही...(नेहमी प्रमाणे मध्येच तोडत) प्रश्नकर्ता:पहा याचा अर्थ असा होतो की:सध्या एकूणच राजकारणाविषयी मिपावर अगदी निराशाजनक आणि कमालीची उदासीनता आली आहे आणि सर्वांना आता दिल्लीचेच काय भारताचेही कसे होईल याची काळजी वाटत आहे सारे अंध:कारमय आहे. मिपाकरः अहो मी असे कुठे म्हटलो.(नेहमी प्रमाणे मध्येच तोडत) प्रश्नकर्ता:तुमच्म मत पाहू आपण विश्रांती नंतर (जाहीरात सपट लोशन्+आज कुछ तूफानी करते है+भू$$$$क बस दो मिनिट) वगैरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
क
काळा पहाड Wed, 06/17/2015 - 11:31 नवीन
बाकी श्री. ललित मोदींनी जी मुलाखत दिली ती पहाता त्यांचीही पट्टी उच्चारवाचीच होती. म्हणजे दोघेही एकमेकांना तोडत होते. फरक इतकाच की श्री. सरदेसाई क्वीक बाईट आणि भाजप सरकारला गोवता यावं अशी वाक्य मिळावीत म्हणून धडपडत होते तर श्री. मोदींना त्यांचा मुद्दा समजला जात नाहीये हे जाणवून अस्वस्थ होवून ते सरदेसाईंना तोडत होते. बाकी जर मोदींनी असं करण्याऐवजी प्रत्येक वाक्य शांतपणे पण ठामपणे उच्चारलं असतं तर सरदेसाईंना त्यांना तोडणं कठीण गेलं असतं. पण त्यांना बहुधा त्याचा सराव नसावा. ही क्लृप्ती वापरायचं राज ठाकरेंना चांगलंच माहीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
म
मृत्युन्जय Wed, 06/17/2015 - 11:47 नवीन
ही क्लृप्ती वापरायचं राज ठाकरेंना चांगलंच माहीत आहे. एक्झॅक्टली. राज ठाकरेंनी एकदा कुठल्यातरी अँकरला असाच झापला होता. बहुधा अर्णब गोस्वामी होता तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
व
विनोद१८ Wed, 06/17/2015 - 14:02 नवीन
एक्झॅक्टली. राज ठाकरेंनी एकदा कुठल्यातरी अँकरला असाच झापला होता. बहुधा अर्णब गोस्वामी होता तो.
नाही, तो अर्णब गोस्वामी नव्हता 'राजदीप सरदेसाई' होता. पोपट केला होता त्याचा, सगळी मिजास उतरवली होती त्याची. नंतर अगदी आज्ञाधारक मुलाप्रमाणे प्रश्ण विचारत होता, तुनळीवर सापडेल ती मुलाखत, बघण्यासारखी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
न
निनाद मुक्काम … Sun, 06/21/2015 - 11:26 नवीन
काही दिवसांपूर्वी सरदेसाई चे पुस्तक प्रकाशित झाले व वागळे त्यांची मुलाखत घेतली तेव्हा प्रत्येक राजकारण्यांचे अनुभव सांगतांना त्याने राज चा मुलाखतीचा किस्सा सांगितला त्यात सुरवतीला राज ने ह्यावेळी तुला मी टी र पी मळवून देतो असे सांगू मुलाखत सुरु झाल्यावर सरदेसाई वर तोंड सुख घेतले व ब्रेक दरम्यान विचारले किती झाला टी र पी असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनोद१८
श
श्रीगुरुजी Wed, 06/17/2015 - 11:07 नवीन
>>> ललित मोदी हे युकेचे नागरिक आहेत हे नक्की का? तसे असेल तर सुषमा स्वराज या ट्रॅव्हेल डॉक्युमेन्टसाठी मध्ये पडायचा प्रश्नच येणार नाही. आपल्या नागरिकाला ट्रॅव्हेल डॉक्युमेन्ट द्यावे की नाही हे इंग्लंडचे सरकार भारत सरकारला थोडीच विचारणार आहे? भारताने मोदीचा पासपोर्ट रद्द केल्यावर इंग्लंडने त्याला इंग्लंडचे नागरिकत्व बहाल केले होते. ट्रॅव्हल डॉक्युमेंटसाठी इंग्लंड भारताचे मत जाणून घ्यायचा प्रयत्न करीत होता त्याचे कारण युपीएच्या काळात भारताने "ललित मोदीला इंग्लंडबाहेर जाऊन दिले तर भारत व इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय संबंधांवर परीणाम होईल" असे हास्यास्पद पत्र दिलेले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
क
कपिलमुनी Wed, 07/01/2015 - 14:18 नवीन
इंग्लंडने त्याला इंग्लंडचे नागरिकत्व बहाल केले होते
हे कुठे वाचलेत गुरुजी ? अजून ललीत मोदी ब्रिटिश नागरीक नाहीये .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 07/01/2015 - 19:23 नवीन
भारताने त्याचे पारपत्र रद्द केल्यावर तो तिथे कोणत्या देशाचा नागरिक म्हणून राहतोय? इंग्लंडचा का कोणत्यातरी दुसर्‍या देशाचा? तो तिथे कायदेशीररित्या राहतोय का बेकायदेशीर घुसखोर म्हणून राहतोय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
D
dadadarekar Wed, 07/01/2015 - 19:34 नवीन
तर स्वराज बैचे किंवा भारतीय दूतावासाचे रिकमांडेशन त्याला का हवे होते ? पारपत्र रद्द करण्याची शिक्षा दिली गेली आहे म्हणजे तो सकृतदर्शनी मोठा गुन्हेगार असणार हे नक्की ... मग स्वराजबाइ व वसुंधराराजे अशा गुन्हेगाराला का मदत करत होत्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
सव्यसाची Wed, 07/01/2015 - 22:53 नवीन
जेव्हा ललित मोदी इथून गेले तेव्हा त्यांचे पारपत्र शाबूत होते. नंतर युपीए सरकारने ते रद्द केले. त्याच्याविरुद्ध उच्च न्यायालयात केस सुरु होती. पण पारपत्र अशा पद्धतीने रद्द होऊ शकत नाही असा कोर्टाने निर्णय दिला. तोपर्यंत तिथल्या सरकारकडे अर्ज देऊन तिथे राहण्याचा काही परवाना मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ती केस तिथल्या कोर्टात पण गेल्याचे समजले. ते तिथले नागरिक अजून झालेत असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे गुरुवार, 07/02/2015 - 00:14 नवीन
खरंच या प्रकरणात एवढा सावळा गोंधळ आहे ना की कोणत्याच पार्टीला नक्की काय चाललंय ते माहीत नाही. किंवा सगळ्यांना सगळं माहित आहे पण पब्लिकसमोर तारांबळ उडत आहे. सत्ताधारी, विरोधी, आतले बाहेरचे सगळ्यांना एकत्र गोवणार्‍या घोटाळ्याचा हा एकमेव नमुना असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
स
सव्यसाची गुरुवार, 07/02/2015 - 09:56 नवीन
नक्कीच. खुपच गोंधळ झाला आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे कि ललित मोदी हे कोर्टाने घोषित केलेले फरारी नाहीत. उलट त्यांचा काढुन घेतलेला पासपोर्ट कोर्टाने परत दिला आहे. काँग्रेसचा हल्ला आता थोडासा भरकटल्यासारखा वाटत आहे. ललित मोदी प्रकरणांवरुन ते आता राजवाड्यावर गेले आहेत. सुषमा स्वराज यांच्या पतीला ललित मोदी बोर्ड वरती घेणार अशी इमेल होती पण कौशल यांनी स्वत:च यासाठी नकार दिला आहे. मग हे प्रकरण तरी आता किती लांबणार कुणास ठाउक? या पद्धतीच्या हल्ल्यावरुन काँग्रेस मध्ये पण थोडीशी कुरुबुर आहे असे दिसते. त्यांच्या मते, ललित मोदी यांच्यावर कॉंग्रेसने लक्ष केंद्रित करायला हवे. त्यामुळे फक्त सामान्य लोकच गोंधळले नाहीत तर मीडिया आणि विरोधी पक्षही नेमका काय मुद्दा प्रेस करावा याबद्दल गोंधळात आहेत असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कपिलमुनी गुरुवार, 07/02/2015 - 03:33 नवीन
पारपत्र रद्द केल्यावर नागरीकत्व रद्द होते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/02/2015 - 09:58 नवीन
पारपत्र रद्द केल्यावर नागरिकत्व रद्द होत नाही. वपरंतु परदेश प्रवास शक्य नसतो. तसेच पारपत्रावरील व्हिसा स्टँपिंग रद्द होते. नवीन पारपत्र मिळाल्यास नव्याने व्हिसा घ्यावा लागतो. पारपत्राची मुदत संपल्यावर नवीन पारपत्र घेतले तर मुदत संपलेल्या जुन्या पारपत्रावरील व्हिसा चालू शकतो असं दिसतंय (२ दिवसांपूर्वी फडणविसांचे सचिव प्रवीण परदेशी यांच्या बाबतीत हाच घोळ झाला होता). परंतु पारपत्र रद्द झाल्यावर नवीन पारपत्र मिळाले तर रद्द झालेल्या पारपत्रावरील व्हिसा नव्याने घ्यावा लागतो. (या माहितीतील चूभूदेघे). ललित मोदींचे पारपत्र रद्द केल्यावर त्यांना ब्रिटनने नागरिकत्व बहाल केले होते असे मी सुरवातीच्या काही लेखात वाचले. ललित मोदींनी मोठ्या प्रमाणावर ब्रिटनमध्ये पैसे गुंतवायचे मान्य केल्याने त्यांना नागरिकत्व बहाल केले होते असे त्या लेखात लिहिले होते. प्रचंड गुंतवणुकीच्या मोबदल्यात इंग्लंड नागरिकत्व देते. भारताने काढलेल्या ब्ल्यू कॉर्नर नोटिसमुळे त्यांना इंग्लंडबाहेर जाता येत नव्हते. जर मोदींचे पारपत्र भारताने रद्द केले असेल व इंग्लंडने नागरिकत्व किंवा कायमस्वरूपी वास्तव्याचा परवाना दिला नसेल, तर नक्की कोणत्या व्हिसाच्या आधारे ते अजून इंग्लंडमध्ये तळ ठोकून आहेत हे एक गूढच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
व
विकास Fri, 07/03/2015 - 06:40 नवीन
त्याला 'leave to remain in UK' status. असे म्हणतात! ललित मोदींंअ आधी युकेत जाऊन बसले. मग युपिए ने त्यांचा पासपोर्ट रद्द केल्यावर त्यांनी हामार्ग स्विकारला. अर्थात त्यांनी एक मिलियन पाउंड तेथे गुंतवलेले आहेत. त्यामुळे त्यांना लवकरच युके नागरीकत्व देण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
D
dadadarekar Fri, 07/03/2015 - 06:48 नवीन
इस्ट इंडिया कंपनी गाढव होती. दुसर्‍या देशात जा , युद्ध करा , राज्य करा , पैसा मिळवा .... किती ते श्रम. त्यापेक्षा परक्या देशातील भ्रष्ट लोकाना तिथला काळा पैसाइंग्ल्लंडात गुंतवायला सांगून नागरिकत्व देणे हा किती सोपा उपाय आहे. बायद वे , पाकिस्य्तानात ५५ कोटी घातले म्हणुन बापूजीना ठार मारले ते योग्यच आहे , असे गर्वाने मिरवणारा पक्ष भारतातील भ्रष्ट मनुष्य करोडो रुपये इंग्लंडात गुंतवणूक करुन देत असताना मुकाट्याने गप्प बसतो , शिवाय त्यालाच मदतही करतो, हे आश्चर्यजनक नाही का ? कुठे नेऊन ठेवलाय नथुराम माझा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Fri, 07/03/2015 - 14:10 नवीन
काही जमलं नाही की काढा नथुरामचे भूत वर.... आणि बोला काहीच्या काही. कुठल्या पक्षाने गांधीवधाचे समर्थन केले ते सांगू शकाल का? भारतातील भ्रष्ट मनुष्य करोडो रुपये इंग्लंडात गुंतवणूक करुन देत असताना मुकाट्याने गप्प बसतो त्याने करदात्याचे पैसे दिले (पक्षी: देशाच्या अर्थसंकल्पिय गंगाजळीतून दिले) का स्वतःच्या खिशातून दिले? जर स्वतःच्या खिशातून कुठे देयचे हे सरकारने ठरवायचे असेल तर तुम्हाला कम्युनिझम हवा आहे असे सरळ म्हणाना. (यात ललित मोदींचे समर्थन करण्याचा प्रश्न नाही. त्याच्या जागी केजरीवाल असले तरी तेच म्हणेन. पण तुम्हाला कम्युनिझम हवा आहे का हा प्रश्न आहे). (बाय द वे, आता राष्ट्रवादी काँग्रेसपक्षात असलेल्या छगन भूजबळांनी गांधीजींच्या ऐवजी नथुरामचे पुतळे उभारायला हवेत असे म्हणून खळबळ उडवली होती. तरी त्यांना आधी काँग्रेसने आणि नंतर राष्ट्रवादीने जवळ केले. त्यावरून काय ते समजून घ्या).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
L
lakhu risbud Fri, 07/03/2015 - 20:16 नवीन
मला एक कळत नाही, संपादक मंडळ या अशा ट्रोल आयडींना मिपावरून तत्काळ उडवून का टाकत नाही ? अनेक उत्तम धाग्यांवर हे ट्रोल आयडीं कारण नसतांना धुमाकूळ घालत असतात. काही ठराविक सदस्यच परत परत हे घाणेरडे प्रकार करत असतील (त्यांच्या IP Addres वरून हे कळत असेलच) उदा.माईसाहेब, टॉपगीअर्ड,हितेस,नानासाहेब आणि आता हे दरेकर ! तरीही अशा आयडींना तत्काळ का उडवले जात नाही ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Sat, 07/04/2015 - 02:34 नवीन
केवळ आमचे विचार तुम्हाला पटत नाहीत म्हणून ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: lakhu risbud
D
dadadarekar Sat, 07/04/2015 - 03:24 नवीन
On 16 April 2010, the representatives of the Kochi franchise complained to BCCI that Lalit Modi had threatened them to give up the franchise. A day after the IPL final on 24 April, BCCI suspended Modi on 22 charges, including bypassing the governing council while taking decisions, not following proper processes, bid rigging, awarding contracts to his friends, accepting kickbacks on a broadcast deal, selling franchises to members of his family, betting and money laundering. Soon after his suspension, Modi moved to London,. .......... ....... त्यानंतर काँग्रेसच्या काळात आरोप निस्चित करून कारवाईची सुरुवात झाली. आपल्या पदाचा गैरवापर कर्रुन पैसा मिळवला आहे हे नक्की. अन्रेक आरोप ठेवले गेले त्यातील किमान आठ आरोपात तथ्य आढळले. इतका पैसा मिळवलेला आहे की साक्षात दाउद खंडणीसाठी धमक्या देऊ लागला ! पोलिसांच्या इन्फॉर्मेशनवर किती का विश्वास नसेना , पण दाउदवर तरी विश्वास ठेवा की राव ! .. :). दाऊद उगाच मागे लागतो काय त्या ललित मोदीच्या ? पोलिसांची कारवाई व दाउद या दोन्ही कारणाने मोदी लंडनला पळाला. ........... मोदीविरुद्ध जी कमिटी नेमली त्यात काँग्रेस व भाजपाचाही खासदार होता. त्यात मोदी दोषी आढळलेला आहे.. मग आता भाजपाचेच अनेक खासदार मोदीला का सपोर्ट करत आहेत ? ......... मोदी इंग्लंडात जो पैसा घालणार आहे तो तुमचाआमचा पैसा आहे. त्याचा पगाराचा पैसा नाही. https://en.m.wikipedia.org/wiki/Lalit_Modi
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
स
संदीप डांगे Sat, 07/04/2015 - 05:04 नवीन
Typing from mobile: sorry for english BCCI is a private club. Not a public limited company. Modi's money is not government's money. Get your facts right before posting. Don't make a clown of yourself.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Sat, 07/04/2015 - 05:24 नवीन
BCCI had avoided taxes on its income, claiming exemption as a charitable organization. सरकार एखाद्या संस्थेला चारिटेबल हा दर्जा देते तेंव्हा त्या संस्थेने मिळणार्‍या पैशाचा विनियोग लोकांच्या व देशाच्या भल्यासाठी करणे अपेक्षित असते. निदान काँग्रेसच्या काळात तरी असेच अपेक्षित होते. मोदीभक्तानी स्वतःचा विदूषक करुन घेणे थांबवावे ! https://en.m.wikipedia.org/wiki/Board_of_Control_for_Cricket_in_India
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
D
dadadarekar Sat, 07/04/2015 - 06:01 नवीन
http://m.timesofindia.com/sports/india-in-bangladesh/top-stories/BCCI-no-private-club-its-accountable-SC/articleshow/45985007.cms ..... The Supreme Court on Thursday said as the Board for Control of Cricket in India (BCCI) enjoys a unique monopoly over the passionately followed game of cricket with the government's tacit understanding, it is discharging public functions and hence comes under the ambit of strict standards of judicial scrutiny. Busting the myth that BCCI is a private body registered as a society under the Tamil Nadu Societies Registration Act, a bench of Justices T S Thakur and F M I Kalifulla just stopped short of declaring BCCI a government body but said it is answerable to the writ jurisdiction of the high courts.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
श
श्रीगुरुजी Wed, 06/17/2015 - 09:23 नवीन
पैसाताई, शतकी धागे काढण्याची तुमची मनीषा पूर्ण होण्यासाठी मी भरपूर मदत करायला तयार आहे. ________________________________________________________________ हा पहिला प्रतिसाद. This is a non-issue. हा फुसका बार आहे. यातून काहीही निष्पन्न होणार नाही कारण मुळातच या प्रकरणात काहीही दम नाही. _________________________________________________________________ अजून सविस्तर प्रतिसाद हवा असल्यास सांगा. तेवढीच शतकाकडे वाटचाल सुकर होईल.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 06/17/2015 - 09:30 नवीन
पण विनोद बाजूला ठेवू. वर सव्यसाची, मृत्युंजय, काळा पहाड यांच्या प्रतिसादासारखे काही माहिती देणारे जरूर लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे Wed, 06/17/2015 - 09:37 नवीन
सिग्नल तोडण्याइतका गंभीर गुन्ह्याबद्दल चीरीमीरी घेतली म्हणून पोलीस हवलदाराला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करणे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 06/17/2015 - 09:44 नवीन
जरा सविस्तर माहिती देतो. ___________________________________________________________________________ भारतात व इतरत्र अतिरेकी कारवाया करणार्‍या अनेक व्यक्तींना, संघटनांना तसेच भारतात हव्या असलेल्या अनेक गुन्हेगारांना इंग्लंड अनेक वर्षांपासून आश्रय देत आहे. जम्मू-काश्मिर लिबरेशन फ्रंट या देशद्रोही व अतिरेकी संघटनेचा म्होरक्या अमानुल्ला खान अनेक वर्षे इंग्लंड मध्ये आरामात राहत होता. याच संघटनेने १९८३ मध्ये इंग्लंडमधील भारताचे उपायुक्त रविंद्र म्हात्रे यांचा हत्या केली होती. त्यांच्या स्मरणार्थ नळस्टॉपजवळील पुलाला कै. रविंद्र म्हात्रे पूल असे नाव दिले आहे. अमानुल्ला खानला इंग्लंडने कधीही भारताच्या ताब्यात दिले नव्हते. खलिस्तान या फुटीरतावादी चळवळीचा संस्थापक डॉ. जगजितसिंग चौहान हा देखील अनेक वर्षे इंग्लंड मध्ये आरामात राहत होता. खलिस्तानवाद्यांनी १९७०,८० आणि ९० च्या दशकात अनेक हत्या केल्या होत्या. चौहानला इंग्लंडने कधीही भारताच्या ताब्यात दिले नव्हते. लिट्टे या श्रीलंकेतील दहशतवादी संघटनेचे मुख्यालय अनेक वर्षे लंडनमध्ये होते. भारत व श्रीलंकेत या संघटनेवर बंदी असूनसुद्धा लिट्टेचे नेते अनेक वर्षे इंग्लंडमध्ये सुखात राहत होते. कॅसेट किंग गुलशनकुमारच्या खुनातील मुख्य आरोपी नदीम याला इंग्लंडने आश्रय दिला होता व प्रत्यार्पणास नकार दिला होता. हा भारतात अजूनही वाँटेड आहे. आयपीएल घोटाळ्यातील प्रमुख आरोप ललित मोदी याला देखील इंग्लंडने आश्रय देऊन नागरिकत्व दिलेले आहे. याला देखील इंग्लंडने भारताच्या ताब्यात दिलेले नाही. भारत व इंग्लंड यांच्यामध्ये गुन्हेगार प्रत्यार्पणाचा करार नाही. त्यामुळे भारतातील अनेक वाँटेड गुन्हेगार इंग्लंडच्या आश्रयास जातात व इंग्लंड त्यांना कायदेशीर आश्रय देते. ललित मोदीविरूद्ध भारताने ब्ल्यू कॉर्नर नोटिस जारी केली आहे. त्यामुळे जगातील कोणत्याही विमानतळावर तो आढळला तर तो देश त्याला स्थानबद्ध करू शकतो. त्यामुळे मोदी इंग्लंडबाहेर प्रवास करू शकत नाही. मनमोहन सिंगांच्या काळात भारताने इंग्लंडला असे पत्र लिहिले होते की जर इंग्लंडने मोदीला इंग्लंडबाहेर जाऊन दिले तर भारत व इंग्लंड यांच्या द्विपक्षीय संबंधांवर परीणाम होऊ शकेल. हे पत्र अत्यंत हास्यास्पद आहे. ललित मोदीपेक्षा खतरनाक गुन्हेगार, अतिरेकी इ. इंग्लंडमध्ये सुखाने राहून इकडेतिकडे आरामात फिरत होते तेव्हा या दोन देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर कधीही परीणाम झाला नाही. मग फक्त ललित मोदीला इंग्लंडमधून बाहेर जाऊन दिल्याने या दोन देशांमधील संबंध कसे बिघडतील? दोन देशातील संबंध हे कधीच एका व्यक्तीवर अवलंबून नसतात. असे पत्र देणे हे अत्यंत हास्यास्पद होते. मागील वर्षी ललित मोदीच्या पत्नीचा उपचारासाठी मोदीला पोर्तुगालला जाणे आवश्यक होते तेव्हा त्याने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजांशी संपर्क केला. सुषमा स्वराजांनी त्याला कोणतीही प्रत्यक्ष मदत न करता इंग्लंडला एवढेच कळविले की, मोदीला इंग्लंडबाहेर जाऊन देण्यासाठी तुमचे कायदे, नियम इ. नुसार परवानगीचा निर्णय घ्या. परंतु तुमच्या निर्णयामुळे भारत व इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय संबंधावर परीणाम होणार नाही. इतकेच घडले. म्हणूनच या प्रकरणात फारसा दम नाही. हा फुसका बार आहे. बादवे - बोफोर्स लाच प्रकरणातील लाभार्थी क्वाट्रोकी याच्याविरूद्ध सुद्धा ब्ल्यू कॉर्नर नोटीस होती. २००६ मध्ये त्याला अर्जेंटिना विमानतळावर स्थानबद्ध करण्यात आले तेव्हा भारतात त्याच्याविरूद्ध न्यायालयात खटला सुरू असूनसुद्धा भारत सरकारने त्याच्या स्थानबद्धतेविषयी न्यायालयाला कळविले नव्हते. उलत युपीए सरकारमधील एका वरीष्ठ मंत्र्याने गुपचुप अर्जेंटीनाला जाऊन त्याच्या सुटकेची खटपट केली होती. भारताने आक्षेप न घेतल्याने यथावकाश तो सुटला. भविष्यात तो अडकू नये म्हणून युपीए सरकारने त्याच्यावरील खटला बंद केला व इंग्लंडमधील त्याच्या बँक खात्यातील गोठविलेले ४० लाख डॉलर्स मोकळे करून त्याला मोठा दिलासा दिला होता.
  • Log in or register to post comments
स
सव्यसाची Wed, 06/17/2015 - 10:01 नवीन
ललित मोदीविरूद्ध भारताने ब्ल्यू कॉर्नर नोटिस जारी केली आहे. त्यामुळे जगातील कोणत्याही विमानतळावर तो आढळला तर तो देश त्याला स्थानबद्ध करू शकतो. त्यामुळे मोदी इंग्लंडबाहेर प्रवास करू शकत नाही.
श्रीगुरुजी, १. माझ्या माहितीप्रमाणे ब्ल्यू कॉर्नर नोटीस इंटरपोल जारी करते. पण इंटरपोल च्या म्हणण्यानुसार अशी नोटीस त्यांनी जारी केली नाही. भारत सरकारने जी नोटीस जारी केली आहे ती 'लाईट ब्ल्यू कॉर्नर नोटीस' आहे. २. स्थानबद्धतेसाठी रेड कॉर्नर नोटीस असते असे मला वाटते. संदर्भ: https://en.wikipedia.org/wiki/Interpol_notice
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 06/17/2015 - 11:01 नवीन
या बाबतीत माझी माहिती कदाचित पूर्ण बरोबर नसावी. परंतु एक प्रश्न उरतोच. जर मोदीविरूद्ध रेड कॉर्नर नोटीस नव्हती तर त्याला इंग्लंडबाहेर जाण्यासाठी परवानगी का व कोणाची हवी? मुख्य म्हणजे इंग्लंडने त्याला नागरिकत्व बहाल केल्यावर इंग्लंड किंवा भारताच्या परवानगीची गरजच नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सव्यसाची
अ
अनुप ढेरे Wed, 06/17/2015 - 11:08 नवीन
तेव्हा तो भारतीय नागरिक होता आणि त्याचा पासपोर्ट रद्द केलेला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ख
खटपट्या Wed, 06/17/2015 - 10:04 नवीन
अत्यंत माहीतीपूर्ण प्रतिसाद, (पैसातैंचा धागा म्हणजे घरचं कार्य. त्यामुळे विषयाची अजिबात माहीती नसताना अशा छोट्या मोठ्या प्रतिक्रीयांनी हातभार लावला जाईल) जय कोकण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे Wed, 06/17/2015 - 10:10 नवीन
अगदी योग्य माहिती. श्रीगुरुजींशी (बहुधा) पहिल्यांदाच बाय डीफाल्ट सहमत. ललित मोदीला आंतरराष्ट्रीय पातळीवरचा भयंकर गुन्हेगार समजणार्‍या आणि दाऊदच्या पातळीवर बसवून ठेवणार्‍या क्षुद्र लोकांची कीव वाटते. -(ललीत मोदींसोबत प्रत्यक्ष काम केलेला) एक कॅपिटालीस्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 06/17/2015 - 10:56 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ट
टवाळ कार्टा Wed, 06/17/2015 - 09:58 नवीन
धाग्याची पन्नाशी झाल्यानिमित्त काजूतैंचा सत्कार एक १ पैशाचे नाणे, कमळाचे फूल व क्रिकेटची बॅट देउन करण्यात येत आहे. शुभेच्छुक - समस्त आयपियेल-बापपियेल संघटना
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 06/17/2015 - 11:03 नवीन
@आयपियेल-बापपियेल>> :-D :-D :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 06/17/2015 - 11:24 नवीन
:D :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ब
बॅटमॅन Wed, 06/17/2015 - 11:31 नवीन
बापपियेल =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 06/17/2015 - 12:48 नवीन
आयपियेल-बापपियेल
ढिस्क्लेमर - हा पीजे माझा नाही, टीव्हीवरच्या एका र ला ट जोडून एक्स्प्रेस्स कॉमेडी करणार्या प्रोग्राममधला आहे...कधीकाळी चुकुन तो प्रोग्राम जबरदस्तीने घरात बघावा लागायचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ख
खटपट्या Wed, 06/17/2015 - 13:07 नवीन
हो बरोबर, अभिजीत चव्हाण याच्या तोंडी होते हे वाक्य...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
काळा पहाड Wed, 06/17/2015 - 11:45 नवीन
NEW DELHI: External affairs minister Sushma Swaraj on Wednesday reacted angrily to a tweet suggesting she took favours to get her daughter a seat in a medical college through the northeast quota. "My daughter is a barrister and Oxford graduate. What you say in absolutely false," she replied to the tweet. The twitter handle 'Soch @pakoed' had insinuated that "Sushma is no stranger to taking and giving favours! Her daughter studied through NorthEast quota in medical college." Twitterati immediately reacted, wondering at Sushma's impulsive response to a stray tweet. The handle @pakoed was deleted, though its tweet was retweeted by others. Sushma's twitter supporters urged her not to be hassled by a "dog that barks" and keep up her good work.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 06/17/2015 - 11:47 नवीन
अवांतर - "मोदीला इंग्लंडबाहेर जाऊन देण्यासाठी तुमचे कायदे, नियम इ. नुसार परवानगीचा निर्णय घ्या. परंतु तुमच्या निर्णयामुळे भारत व इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय संबंधावर परीणाम होणार नाही." असे सुषमा स्वराजांनी मोदीला कोणतीही प्रत्यक्ष मदत न करता इंग्लंडला कळविणे, आणि "(नरेंद्र) मोदींना व्हिसा देऊ नये" असे सत्ताधारी व काही विरोधी पक्षातील ६५ खासदारांनी अमेरिकेला काही वर्षांपूर्वी पत्र लिहिणे, या दोन्हीत काही साम्य वाटते का?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 06/17/2015 - 11:56 नवीन
आता ३०० होणार .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 06/17/2015 - 11:58 नवीन
नक्कीच. पैसाताईंकडून पार्टी लागू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Wed, 06/17/2015 - 12:16 नवीन
हा शुद्ध मूर्खपणा होता. घरचे भांडण चव्हाट्यावर नेउ नये इतका कॉमन सेन्स नसलेल्या लोकांचा ! बाकी घरचे भांडण चव्हाट्यावर नेउ नये हा सेन्स त्यांनीही दाखवला नाही आणि यांनीही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ख
खटपट्या Wed, 06/17/2015 - 12:27 नवीन
याला बोलतात रामबाण काडी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कपिलमुनी Wed, 06/17/2015 - 12:33 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
श
श्रीगुरुजी Wed, 06/17/2015 - 19:58 नवीन
भारी! आवडलं. अजून एक-दोन काड्या टाकतो. ललित मोदी प्रकरणात जितका दम आहे तितकाच या काड्यात आहे. २०१३ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान/अध्यक्ष भारताच्या पूर्ण खाजगी दौर्‍यावर आले होते. हा दौरा अधिकृत/राजनैतिक नसून पूर्ण खाजगी होता. त्यांना अजमेर दर्ग्याला भेट द्यायची होती. दौरा पूर्ण खाजगी असताना सुद्धा परराष्ट्रमंत्री खुर्शिद यांनी त्यांचे जोरदार स्वागत करून अजमेर येथे त्यांची खास व्यवस्था करून मेजवानी दिली होती. आपल्या शत्रूंवर इतकी मेहेरबानी कशासाठी? २०१३ मध्येच भारताने पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला दौर्‍यावर बोलाविले होते. त्यातील शेवटचा सामना बघण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या जावेद मियांदादला खास आमंत्रण देऊन लोकांच्या विरोधाला न जुमानता व्हिसा दिला होता. जावेद मियांदाद आणि भारतात मोस्ट वाँटेड असलेला अतिरेकी दाऊद इब्राहीम हे एकमेकांचे व्याही असताना सुद्धा दाऊदशी संबंधित असलेल्या जावेदला भारताचा व्हिसा देऊन त्याला खास आमंत्रण देण्यात आले होते. त्याला भारतात येण्यास विरोध असूनसुद्धा खुर्शिद यांनी त्याला बोलाविण्याचे जोरदार समर्थन केले होते. परंतु भारतातील विरोधाच्या बातम्या ऐकून तो शेवटी आलाच नाही. ही दोन प्रकरणे आणि सुषमा स्वराज - ललित मोदी प्रकरण यात काही साम्य आढळते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा