ललित मोदी आणि सुषमा स्वराज
राम्राम मंडळी! तीन दिवस झाले. अर्णव गोस्वामीचा धुमाकूळ सुरू आहे. याबद्दलच्या बातम्या पेपरात दुसर्या तिसर्या पानावर येऊन गेल्या. पण मिपावर काही गडबड झाली नाही म्हणून काथ्याकुटाच्या प्रांतात घुसखोरी करत आहे.
ललित मोदीवर गंभीर आरोप असताना सुषमा स्वराज यांनी त्याला पोर्तुगालला जायला मदत केल्याचा आरोप आहे. स्वराज यांनी तसे कबूल केले. कालपासून वसुंधरा राजे यांचेही नाव येत आहे. भाजप सत्तेत आल्यावर ललित मोदी खूप खुश झाल्याची बातमी वाचली. ते एक असो.
मात्र मूळ आरोप सुषमा स्वराज यंना काही खाजगी बाबीत मदत ललित मोदी याने केली आणि त्याबदल्यात स्वराज यांनी ही मदत केली असे सकृद्दर्शनी दिसते. सुषमा यांची कन्या ललित मोदीची वकील असल्याचेही समजते.
या सगळ्या प्रकरणात आयपी एल आणि गुंडगिरी, बेकायदेशीर व्यवहार यांचा परस्पर संबंध, पैशासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला चुना लावणे हे स्पष्ट दिसत आहे. आमचे श्रीपादभाऊ नाईक कधीच असल्या प्रकरणात दिसणार नाहीत पण ते काम करत नाहीत म्हणून पंप्र त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. नक्की कोणावर विश्वास ठेवावा? की थोडेफार काम करणार्या एफिशियंट लोकांना असे काही प्रकार कम्पल्सरी करावेच लागतात?
(डिस्क्लेमरः मला फक्त शतकी प्रतिसादांचा धागा काढायचा आहे. तेव्हा या चर्चेत माझा सहभाग नसला तरी धागाकर्ते गायब झाले वगैरे टिप्पण्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. =)) )
उदा: प्रश्नकर्ता : सध्या मिपावर राजकारण धाग्यांनी पातळी ओलांडली आहे असे तुम्हाला वाटते का नाही ? मिपाकरः नाही लगेच असं सांगता येणार नाही ते धाग्या-धाग्यावर... (मध्येच तोडत) पुन्हा प्रश्नकर्ता : हो का नाही तेव्हढेच सांगा. मिपाकरःनाही प्रश्नकर्ता :पहा याचा अर्थ असा होतो की पूर्वी मिपावर राजकारण धाग्यांनी पातळी ओलांडली होती आणि अगदी सवंग, उथळ आणि बिनडोक धागे निघत होते असे सिद्ध होते. मिपाकरः अहो मी असे कुठे म्हटलो.(नेहमी प्रमाणे मध्येच तोडत) प्रश्नकर्ता :नाही आप्ल्याकडे इतका वेळ नाही पुढचा प्रश्न तुम्हाला एकूणच मिपाकरांचा भारतीय राजकारणाविषयीचा दृष्टीकोण कसा वाटतो आश्वासक की निराशाजनक? मिपाकरःअहो हे एका वाक्यात कसे सांगता येईल कारण वेग्वेगळ्या प्रसंगानुरूप ,विरोधी मत्-मतांतरे असतात..(नेहमी प्रमाणे मध्येच तोडत) प्रश्नकर्ता :नाही आप्ल्याकडे इतका वेळ नाही कसा आहे ते सांगा. मिपाकरःअलिकडच्या दिल्ली राज्यातील घटना आणि केंद्रातील काही अप्रिय घटना पाहिल्याकी त्या त्या पक्ष विचारधारेला मानणार्या लोकांनाही...(नेहमी प्रमाणे मध्येच तोडत) प्रश्नकर्ता:पहा याचा अर्थ असा होतो की:सध्या एकूणच राजकारणाविषयी मिपावर अगदी निराशाजनक आणि कमालीची उदासीनता आली आहे आणि सर्वांना आता दिल्लीचेच काय भारताचेही कसे होईल याची काळजी वाटत आहे सारे अंध:कारमय आहे. मिपाकरः अहो मी असे कुठे म्हटलो.(नेहमी प्रमाणे मध्येच तोडत) प्रश्नकर्ता:तुमच्म मत पाहू आपण विश्रांती नंतर (जाहीरात सपट लोशन्+आज कुछ तूफानी करते है+भू$$$$क बस दो मिनिट) वगैरे.