Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ?

म
माहितगार
Mon, 11/30/2015 - 12:03
🗣 322 प्रतिसाद
प्रतिसाद टंकण्यापुर्वी क्षणभर थांबा ! शीर्षकात प्रश्नचिन्हा (?) एवजी कृपया स्मायली वाचा (:)). शीर्षकाची रचना धोका देऊन मिपाकरांना (स्त्री आणि पुरुष दोन्हीही) धागालेख उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी केली आहे. हे सांगूनही तुम्ही या धागा लेखातील विवीध कडबोळे प्रश्न आणि कडबोळे विचारांचे अनाकलनीय काहुर वाचण्यास थांबत असल्यास, 'शनी शिंगणापूर येथील मंदीरात एका स्त्रीने जाऊन चक्क दर्शन घेतले, आणि गावातल्या लोकांनी (कदाचित त्यांच्या भावना दुखावल्यामुळे) बंदपाळल्याची बातमी', हि ह्या धागा लेखाची खरी सुरवात आहे. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न तसा दिसतो तेवढा सोपा नसावा, नाहीतर मंदिर प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर येऊन ८५व्या वर्षानंतर कदाचित या प्रश्नाची चर्चा करण्याचे प्रयोजन उरले नसते. स्त्रीयांच्या मंदिर प्रवेशाचा प्रश्न चर्चेस घेतला तर पहिला आक्षेप हा येऊ शकेल की तुम्ही केवळ हिंदुधर्मीय प्रार्थनास्थळातील असमानतेचीच चर्चा का करता आणि इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्रीयांना दिल्या जाणार्‍या असमान वागणूकीची चर्चा का करत नाही ? हा प्रश्न येतो, या प्रश्नाचे काहुर येथवरच थांबत नाही, कारण: १) हा असमानतेचा प्रश्न त्यांना धार्मीक गुरु पुजारी (येथे त्या त्या धर्मातील शब्द कल्पावेत) इत्यादी संधी समानपणे का मिळत नाही हा प्रश्न एक्स्टेंड होतो; मग असे का होते कारण प्रेषित, विदुषी, तत्त्वज्ञ या जागी अपवादात्मक स्त्रीयांचे दाखले सोडल्यास त्यांचे अस्तीत्व विरळ असल्यामुळे असे होते का ? एखादा प्रेषित असो वा प्रार्थनास्थळात प्रवेश अथवा धर्मगुरुपद नाकारणारा पुरुषवर्ग शेवटी स्त्रीयांच्या पोटीच जन्माला येतो माता पत्नी कन्या बहीण या रोलचा प्रभाव इतरवेळी बर्‍याचदा दिसून येतो तर प्रार्थनास्थळातील समानतेचे तत्त्वज्ञान आपापल्या पातळीवर रेटण्यात या स्त्रीया कुठे कमी पडताहेत का ? मुलतः त्यांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो का ? :) आता हा प्रश्न म्हणजे जरासे व्हिक्टीम ब्लेमींग केल्यासारखे आहे जे व्यक्तीशः मलाही मान्य नाही (शिवाय मी स्वतःही खोडू शकेन असा यात तर्कदोष आहे) तरीही असा प्रश्न उपस्थीत करण्या मागे उद्देश केवळ चर्चेस तोंड फोडणे एवढाच आहे. २) शनि शिंगणापुरचा स्त्री प्रवेशाचा प्रश्न कदाचित कायद्याच्या मार्गाने सोडवता येईल पण इतर धर्मीयांच्या प्रार्थना स्थळातील स्त्री प्रवेश आणि धर्मगुरुपदावरील समानतेचा प्रश्न विचारला तरी प्रश्न विचारणारे असहिष्णू ठरतील ? स्त्रीयांना समानता नाकारण्यासाठी आपापल्या धर्मग्रंथाची शब्दपुजा रचत उत्पातमुल्य दाखवणारे असहिष्णू ठरणार नाहीत. मग इथे राजकीय शांतता साधण्याच्या व्यावहारीक गरजांसाठी केलेली धर्मग्रंथांना पुढेकरत उत्पातमुल्य दाखवणार्‍यांशी विवीध धर्मियांची उत्पातमुल्यावर आधारीत एक तडजोड अस्तीत्वात आहे का? असे उत्पात मुल्य दर्शवणारे असोत अथवा लोकसभेत केवळ असहिष्णूतेवर चर्चा करणार पण तेही गोंधळ करून हा कायदेमंडळांमधे घातला जाणारा गोंधळ ही सुद्धा असहिष्णूता नाही का ? ३) किंवा बर्‍याचदा असा विचार समोर ठेवला जातो की समाजसुधारणा त्या त्या समाजातूनच पुढे येऊ द्याव्यात अंशतः हे खरेही आहे की शनि शिंगणापुर असो वा इतर धर्मीय प्रार्थनास्थळे समाजसुधारणेचे विचार त्या त्या समाजातून पुढे यावयास हवेत पण समाज हेच एक युनीट आहे का ? त्या गावापुरता शनि शिंगणापुरचाही एक समाज अस्तीत्वात नाही का आणि समाज सुधारणेची सुरवात त्याच गावातील व्यक्ती कडून होणे अधिक श्रेयस्कर असणार नाही का ? मग शनि शिंगणापूर गावातील समाजाची मते बदले पर्यंत उर्वरीत समाजाने थांबले पाहीजे का ? अंदमानात इतर जगातील मानवाचे संबंध नाकारणार्‍या अदिवासींचा अधिकार आपण स्विकारतोच ना मग शनि शिंगणापुर सारख्या विवीध गावातील जाती जमातीतील परंपरा आतून बदले पर्यंत थांबले पाहीजे का ? असे कुठ पर्यंत थांबणे सयुक्तीक ठरेल. रविंद्रनाथ टागोरांच्या शांती निकेतनापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर काही आदीवासी जमातीत अगदी अलिकडे पर्यंत विच हंटींगची जातपंचायतीकडून बलात्काराच्या आदेशाची उदाहरणे पुढे येतात शनि शिंगणापुर असो वा बंगाल मधील वस्ती वा इतर धर्मीय लोकशाहीत सर्वांचाच सहभाग आहे, प्रागतिक विचारांचे प्रतिनिधी अशा मागे पडलेल्या समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधून प्रबोधनाचे मार्ग प्रशस्त करण्यात नेमके कुठे कमी पडतात ? ४) ज्या मिथककथांवर आधारीत अंधविश्वास अस्तीत्वात आहेत ती केवळ मिथके आहेत, आपापल्या संस्कृती जपताना काळानुरुप परिवर्तनांच्या आड ह्या मिथककथा येऊ नयेत यासाठी लागणारे प्रबोधन करण्यात आमचे विवीध महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे अभ्यासकमंडळी कमी पडत आहेत का ? आतापर्यंतच्या चर्चेचा रोख तुम्ही पाहीलात तर शीर्षक आणि लेखाचा उद्देश स्त्री विरोधी नाही आणि कोणत्याही विशीष्ट धर्म अथवा संस्कृतीस लक्ष्य करणेही या धागा लेखाचा उद्देश नाही, मी परिवर्तनांसाठी क्रांतीचा पक्षधर नाही पण परिवर्तनासाठी लागणार्‍या उत्क्रांतीसाठी प्रबोधनासाठी सदैव आग्रही असावे असे वाटते, हे वाचकांनी लक्षात घेतले असेलच. मी माझ्या या धागा लेखातील माझे सर्वच प्रश्न आणि विचारांचे काहुराचे निटसे विश्लेषण केले आहे असेही नाही. इतरांचे विचार समजून घेऊन माझ्या साशंकता कमी करण्यास साहाय्य व्हावे म्हणून हा धागा लेख लिहिला आहे. बाकी चुभूदेघे. चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी धन्यवाद
वर्गीकरण
स्त्री
तत्त्वज्ञान
धर्मसंस्था
राजकारण
समाजमन

प्रतिक्रिया द्या
74579 वाचन

💬 प्रतिसाद (322)
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 12/02/2015 - 04:12 नवीन
बायका अतिशय प्रॅक्टिकल असल्याने
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ट
टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 05:31 नवीन
+११११११११११११२२२२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अजया Wed, 12/02/2015 - 05:50 नवीन
बालिश आणि बाष्कळ वर्तनाचे प्रदर्शन कोणत्या तत्त्वज्ञानात येतं? ते कोळून प्यायलेले महाभाग सर्वत्र सांडताना दिसतात हे तत्त्वज्ञान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 08:07 नवीन
हे गुर्जींना की मला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
म
माहितगार Wed, 12/02/2015 - 06:14 नवीन
@ अजया तै धागा लेखाच्या संदर्भाने एक गंभीर प्रश्न, पुरुषकेंद्रीत धर्मसंस्थेच्या तत्वज्ञानांशी स्त्रीया त्यांना ते तत्वज्ञान समानतेचे नसतानाही कुटूंबसंस्थेसाठी प्रॅक्टिकल आहे म्हणून जुळवून घेत असतात का ? बाकी हा धागा उद्देश केवळ संस्थळांवरील स्त्री सहभाग एवढा मर्यादीत नाही. धर्मसंस्थांच्या स्थापनेपासून आजतागायत स्त्री सहभागाबद्दल प्रश्न उपस्तीत करून स्त्री समानतेचेच्या प्रतिपादनार्थ अजून काय करू शकेल ? असाही आहे. बाकीची इतर चर्चा चालुद्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Wed, 12/02/2015 - 08:27 नवीन
आज खूप कामात आहे.पण लिहिल्याशिवाय राहवत नाही. म्हणून धागा वाचून डोक्यात आलेले विचार म्हणून हा प्रतिसाद वाचावा.विस्कळीत असू शकेल. तत्त्वज्ञान शब्द आलाय म्हणून.तत्त्वज्ञान माझ्यासाठी काय आहे एक व्यक्ती म्हणून? ते कदाचित जगण्याचे शास्त्र म्हणता येईल.मग जी गोष्ट मला तार्किक सुसंगतता दाखवते,जिला विज्ञानाची जोड आहे ती गोष्ट माझे तत्त्वज्ञान होऊ शकते.म्हणजे तत्त्वज्ञान ही वैयक्तिक गोष्ट आहे.जी माझ्या वाचनाने,विचार करण्याने,जडणघडणीतून बनत आलेली असू शकते.त्यामुळे अर्थातच सर्व स्त्रियांना मंदिर प्रवेश इ बाबत का खटकले नाही.मला एक स्त्री म्हणून या अशा धार्मिक नियमांचा त्रास होतो का ,हे माझ्या तत्त्वज्ञानात बसते का? मग स्त्रिया याबाबत बोलत का नाहीत असे आपले तार्किक वाटले. मी वर उल्लेख केलाय प्रॅक्टिकल आहे म्हणून मी असमानता चालवून घेते का तर नाही.पण एखाद्या उथळ कृतीचे मी केवळ स्त्रीवादाकरीता समर्थन करु इच्छित नाही.कारण मला हे असे ग्रह तारे देवच मान्य नाहीत.तसेच देवाची भिती दाखवून केले जाणारे धार्मिक भांडवल जिथे आहे तिथे देवच नसतो हे माझे ठाम मत आहे.त्यामुळे मुळात मी अशा कोणत्याही ठिकाणी निव्वळ उत्सुकता म्हणूनही जात नाही.ज्या देवापुढे सर्व मनुष्य प्राणी समान असावेत तो असे नियम बनवणार नाही.केवळ स्त्रीला दबावात ठेवण्याकरीता पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये तयार झालेले हे नियम मोडणे नाहीतर त्यांच्या अस्तित्वाची दखलही न घेता स्त्रीने आपला धर्म पाळणे हे तिचे तत्वज्ञान असावे. पण विचार करणे ही पुरषाची मक्तेदारी स्त्रीने केवळ पुरुषाच्या अधिपत्याखाली रहावे अशा विचारसरणीत वाढलेल्या अनेक स्त्रीया असतात. त्या देवाधर्माची भिती,धार्मिक कौटुंबिक दबाव यासर्वात येऊन त्यांना ही असमानता पण बरोबर वाटू शकते.इथे तत्त्वज्ञान तिला कळणे हा इश्यू नसून ते कळण्याच्या परिस्थिती पर्यंत तिचे न पोचणे किंवा तिश्रा न पोचवणे आहे. यात पण मग काहीतरी चुकीचे आहे वाटणारा स्त्री वर्ग असतो.तो आपसात निषेध करेल.पण या गोष्टीवरून टोकाला जाणारे कौटुंबिक वाद स्त्री जाऊ दे ना नंतर कटकट नको म्हणून टाळू पाहील तर ती त्या त्या परिस्थितीत कदाचित बरोबर असू शकेल. बर्याचदा स्त्रीवर सर्व कुटुंबाची करिअरची जबाबदारी असते. तिथे दर क्षणाला एक प्रॅक्टिकल इश्यू तिच्यासमोर जर उभा असेल तर ती शनि देवा पेक्षा कामवालीचा आधी धावा करेल अशा स्थितीत असते.याला मी तिला तत्त्वज्ञान कळत नाही नाही म्हणू शकणार.आपली मतं किती धारदार आहेत या विषयावर त्याचप्रमाणात ती व्यक्त होईल.आणि हे व्यक्ती सापेक्ष असेल.म्हणूनच स्त्रीला तत्त्वज्ञान विषय अवघड जातो नाही म्हणू शकणार मी.परंतु तिच्या जीवनानुभवाने आलेल्या तत्त्वज्ञानाला ती शरण जाते म्हणू शकते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ब
बॅटमॅन Wed, 12/02/2015 - 08:30 नवीन
प्रतिसाद आवडला! सहमत हेवेसांनल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ट
टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 08:47 नवीन
अग्दी अग्दी....जोर्दार अणूमोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अभ्या.. Wed, 12/02/2015 - 08:56 नवीन
स्वतःच्या आयुष्याचे तत्वज्ञान सांगणे म्हणजे फेसबुक प्रोफाईल क्रिऐशन झालेय आजकाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Wed, 12/02/2015 - 09:00 नवीन
व्यक्तीसापेक्ष गोष्टीबद्दल खुलासा हा स्वतःचे तत्त्वज्ञान सांगुनच करतात.दुसर्याचे ऐकून नाही.किंबहुना दुसर्याचे सांगण्यावरून स्वतःचे मत बनविणारे मूर्ख असतात असेही आमचे एक फेसबुकी तत्त्वज्ञान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Wed, 12/02/2015 - 09:11 नवीन
Image removed. ह्याप्रमाणेच त्या फेसबुकी तत्वज्ञानाची पण अवस्था असेल तर लखलाभ. लेखनसीमा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
म
माहितगार Wed, 12/02/2015 - 08:59 नवीन
वाचतोय , इतरांची अजून काही ओपीनीयन्स ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
क
कविता१९७८ Wed, 12/02/2015 - 09:11 नवीन
छान प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ब
बॅटमॅन Wed, 12/02/2015 - 07:43 नवीन
हो मग! पण हल्ली स्त्रीपुरूष समानतेच्या युगात पुरुषही हे काम करण्यात कुठे मागे दिसत नाहीत हे वारंवार सर्व धाग्यांवर मिपावरदेखील दिसतेच आहे ;)
पण काही विशिष्ट कंपूबाज स्त्रियांची बरोबरी या बाबतीत कोणीच करू शकत नाही. =))
बाकी बायका अतिशय प्रॅक्टिकल असल्याने त्या संस्थळावर बाष्कळ बडबड करुन स्वतःच्या तत्त्वज्ञानाचे प्रदर्शन मांडत नसाव्यात!
बरोबर, अलीकडे नवीन गाभारा झाल्यापासून ते प्रदर्शन इतरांना दिसत नाही इतकेच. नाहीतर अगोदर पाहिलेलेच आहे सर्वांनी "प्रॅक्टिकल बाष्कळ प्रदर्शन" =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
प
प्रमोद देर्देकर Wed, 12/02/2015 - 11:28 नवीन
@ स्त्रीपुरूष समानतेच्या युगात खी s क मग ही स्त्री पुरुष समानता इथे मिपावरच का बरे नको. चला टाकली काडी. पम्या कळ(ला)वेकर. जल्ल सगला काय नावातच हाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
प
प्रमोद देर्देकर Wed, 12/02/2015 - 11:33 नवीन
@ स्त्रीपुरूष समानतेच्या युगात खी s क मग ही स्त्री पुरुष समानता इथे मिपावरच का बरे नको. चला टाकली काडी. पम्या कळ(ला)वेकर. जल्ल सगला काय नावातच हाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Wed, 12/02/2015 - 04:24 नवीन
तुम्हाला फार हसू येतंय का गुरुजी? कारण कळु द्या.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 12/02/2015 - 04:31 नवीन
नसतातही प्रॅक्टीकल.......... हे त्या विधानात येत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Wed, 12/02/2015 - 04:56 नवीन
मग हे विधान बरोबर होईल ना? का स्त्रीविषयकबाष्कळदांभिककंपूवर्धकपाचकळविधान संघटनेत तुम्हीही सहभागी झाले आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 12/02/2015 - 09:42 नवीन
ओ...मी कुठच्याही संघटनेत सामील नस्तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अभिजितमोहोळकर Wed, 12/02/2015 - 04:28 नवीन
हा एक महत्वाचा मुद्दा असावा असं मला वाटतं. म्हणजे आपण कुठेही (फक्त देवळातच असं नाही) अनेक चुकीच्या गोष्टी बघतो. शक्य असेल तिथे आपण वैयक्तीक बदल घडवून आणतो आणि सामुहीक स्तरावर आपलं मत नोंदवायचा प्रयत्न करतो.बरेचदा प्रवाह पतित होऊन अथवा आपल्या हातात फार काही अथवा काहीच नाही ही वस्तुस्थिती जाणवून आपण तटस्थ रहातो आणि वस्तुस्थिती स्वीकारतो.व्यक्तीनुसार त्याची संवेदनाशीलता ही वेगवेगळ्या मुद्यांबाबत वेगवेगळ्या तीव्रतेची असते. व्यक्तीशः मला अस वाटतं की देवाचे भक्त असतात त्यातल्या अनेकांना सुद्धा हे पटत नसेल, पण त्यांच्या मनात देवाचं अणि परंपरांचं पारड जड असतं, त्यामुळे त्यांच्याकडून कृती होत नाही. ह्यात रूढीप्रिय लोक आणि देवाला शरण गेलेले लोक असावेत असा माझा अंदाज आहे. ह्यांच्या मनात देवाबद्दल कसलीही शंका नाही.त्यामुळे जे आहे ते चालू ह्या भावनेने ते वागतात. ते स्वतः ह्यात भरडले जाणारे असले तरी त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. दुसरा वर्ग म्हणजे "माझं भलं व्हावं" ह्या एकाच भावनेने देवाचा भक्त झालेला वर्ग. हा वर्ग नियमीत देवळात येतो पण त्याला बाकीच्या गोष्टींशी देणं घेणं असतच असं नाही. बरेचदा नसतच!!! हा वर्ग म्हणजे "आपल्याला काय कराय्चंय" ही भावना बाळगणारा वर्ग. तिसरा वर्ग, जो देवाला मानतो पण त्याला हे भेदभाव सहन होत नाहीत म्हणून देवळात जाणं टाळतो. तो डोळस भक्त असतो. चौथा वर्ग जो कायम भडकून असतो आणि मूळ भावना चांगली असली तरी ईतका टोकाची भूमिका घेतो की बाकीचे मुद्दा बरोबर असला तरी ह्या थय्थयाटाला कंटाळून वेगळे होतात आणि हा वर्ग एकटा पडतो. शेवटी जसे भक्त तसाच देव!!! माझ्या अनुभवात मला ह्या गोष्टी जाणवल्या.
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 12/02/2015 - 05:24 नवीन
प्रतिसाद आवडला. प्रवाहपतित म्हणून चार लोक करतात ते बरावाईट विचार न करता चालू ठेवणारा एक मोठा वर्ग सगळीकडे असतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजितमोहोळकर
क
कंजूस Wed, 12/02/2015 - 05:09 नवीन
बाकी बायका अतिशय प्रॅक्टिकल असल्याने ;; नसतातही प्रॅक्टीकल.......... हे त्या विधानात येत नाही.. आयुष्यात एकदा जाम ढीगभर प्रॅक्टिकल होतात याची आयुष्यभर प्रचिती ---------ढीगभर तत्वज्ञानात रूपांतर करण्याची नामी संधी!!!! TMC चे सभासदत्व घेतलेला -आपला नम्र वगैरे कंजूस. ( TMC : ताटाखालचे मांजर क्लब )
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 12/02/2015 - 05:13 नवीन
:)
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Wed, 12/02/2015 - 05:55 नवीन
इत्ता बडा बडा परतिसाद कैसे टाइपते रे तुम लोगां ?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 12/02/2015 - 06:01 नवीन
आमच्या बायका तिकडे पोरं सांभाळता, भाकरी थापता, कामावर जाता, पैसे कमावता, कपडे धुता, आम्हाला बसल्याजागी ताट आणून देता, आम्ही कीबोर्ड बडवत असतो म्हणून त्यांच्या हाताने तोंडात घास भरवता. इतकी सगळी सोय असतांना मोठे मोठे प्रतिसाद द्यायला आणखी काय पायजेल? मोठे प्रतिसाद द्यायला अक्कल थोडीच लागते, वेळ आणि आराम असला की बास... अबी सम्ज्या...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
त
तुडतुडी Wed, 12/02/2015 - 07:26 नवीन
@ डांगे - समाजासाठी , धर्मासाठी , देशासाठी काही करणं हि आपलीही जबाबदारी असते . आपण समाजाकडून , देशाकडून , धर्माकडून अपेक्षा करतो तेव्हा आपण त्यासाठी काय दिलं हा प्रश्न स्वताला विचारून बघा .समाजात , देशात , धर्मात सुधारणा करण्यासाठी , सुसह्य करण्यासाठी आपलं किती योगदान आहे ? फुकटात तुमचं दुख दूर करायला , तुम्हाला मान सन्मान द्यायला , तुम्हाला जवळ करायला कोणी तुमचं नोकर नसतं. कधी कधी मन विषन्न करणाऱ्या घटना घडतात म्हणून लगेच देशाला , धर्माला लाथ बीथ मारणं हा करंटेपणा आहे . असो. लेखाच्या content चा आणि लेखाच्या शीर्षकाचा काय संबंध आहे कोणी सांगेल का ? कोण म्हंत आणि कशावरून म्हणतंय 'स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो' म्हणून ?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 12/02/2015 - 07:33 नवीन
तुडतुडी, विषय भलतीकडे नेऊ नका. सर्व चर्चा वाचून प्रतिक्रिया द्यावी ही विनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
अ
अभ्या.. Wed, 12/02/2015 - 07:37 नवीन
कोण म्हंत आणि कशावरून म्हणतंय 'स्त्रीयांना तत्त्वज्ञान विषय अवघड जातो' म्हणून ?
ते . ते माहीतगार साहेब म्हणतेत. ह्या गल्लीत लास्टचे डाव्या हाताचे घर. घरावर तुकड्यातुकड्याची पृथ्वी आहे बघा. तेच. त्यांना भांडा जाऊन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
त
तुडतुडी Wed, 12/02/2015 - 07:46 नवीन
हे कुठल्या धर्मग्रंथात लिहिलं आहे हे तुम्ही सांगाल का ? शिवाय जरी तुम्ही सांगू शकलात, तरी तुम्हीच वर म्हटल्याप्रमाणे 'xxx वर्षांची परंपरा आहे म्हणून ती पुढे पाळलीच गेली पाहिजे असं काही नाही .'
हे मी गुरुचरित्र , दत्त महात्म्य ह्या ग्रंथांमध्ये वाचलं आहे . गजानन महाराजांनी सुधा एके ठिकाणी असं म्हणलं आहे . आणि ह्यामागच कारण वाचण्यात आलं ते असं - ह्या दिवसांमध्ये स्त्रीच्या शरीरात खूप हार्मोनल चेंजेस होतात . ह्या दिवसांमध्ये स्त्री शरीरामध्ये पूर्णता : रजोगुण असतो . देवाच्या जवळ जाण्यासाठी सात्विक भावाची गरज असल्यामुळे ह्या दिवसांमध्ये देवाच्या जवळ येवू नये . मला हे कारण पटल आणि फक्त ४ दिवसांचा तर प्रश्न आहे म्हणून मी ते पाळते .पण ज्यांना पटत नाही त्यांनी पाळाव असा माझा मुळीच आग्रह नाही . इथे दुसरा प्रश्न असा आहे कि दारुडे , व्यभिचारी , संतापी , विश्वासघातकी म्हणजे तमोगुणी पुरुष मात्र देवाच्या जवळ जातात हे मात्र चालतं. अर्थात अर्धवट लोकांनी निर्माण केलेल्या प्रथा परंपरा काहीही असल्या तरी 'कर्म तशी फलं' हेच सत्य आहे .
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Wed, 12/02/2015 - 08:03 नवीन
हे मी गुरुचरित्र , दत्त महात्म्य ह्या ग्रंथांमध्ये वाचलं आहे .
लेखक कोण ? त्यांचा विषयातला अभ्यास काय ?
गजानन महाराजांनी सुधा एके ठिकाणी असं म्हणलं आहे .
संदर्भ ?
अर्थात अर्धवट लोकांनी निर्माण केलेल्या प्रथा परंपरा काहीही असल्या तरी 'कर्म तशी फलं' हेच सत्य आहे .
करेक्ट, गुरुचरित्र , दत्त महात्म्य च्या परंपरा सुद्धा …
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
म
माहितगार Wed, 12/02/2015 - 08:52 नवीन
ह्या दिवसांमध्ये स्त्रीच्या शरीरात खूप हार्मोनल चेंजेस होतात . ह्या दिवसांमध्ये स्त्री शरीरामध्ये पूर्णता : रजोगुण असतो . देवाच्या जवळ जाण्यासाठी सात्विक भावाची गरज असल्यामुळे ह्या दिवसांमध्ये देवाच्या जवळ येवू नये .
क्षमा असावी हे मला माहित असू शकत नाही. 'त्या चार दिवसात हार्मोनल चेंजेसमुळे स्त्रीयांमध्ये सात्विक भावाचा अभाव असतो' याच समर्थन/दुजोरा इतर स्त्रीवर्ग, मानसशास्त्र आणि वैद्यकशास्त्र करतात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी
म
माहितगार Wed, 12/02/2015 - 08:57 नवीन
अजून एक (तत्वज्ञान) प्रश्न तुडतुडी म्हणतात तसे तो वेळ त्यांच्यासाठी कठीण असेल त्यावेळी त्यांचे श्रद्धास्थान अधीक जवळ असावयास आणि त्या श्रद्धेतून त्यानां फुल न फुलाची पाकळी साहाय्य व्हावयास नको का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
स
संदीप डांगे Wed, 12/02/2015 - 09:08 नवीन
रजस्वला स्त्रीने धार्मिक कार्यात, म्हणजे देवाच्या जवळ जाऊ नये याचे कारण तांत्रिक विद्येत आहे. आता आठवत नाही. बघून सांगतो. तिथून ही मान्यता सगळीकडे पसरली आहे. काही विहिरींवर रजस्वला स्त्रीने पाणी आणण्यास जाऊ नये अन्यथा तिला बाधा होते असे अनुभव ऐकले आहेत. काही वाईट घटनांच्या पार्श्वभूमीवर रजस्वला स्त्रीने विवक्षित ठिकाणी वावरू नये अशा मान्यता आहेत. विटाळ होणे, गालबोट लागणे, इत्यादी वाकप्रचार रुढ आहेत. त्याबद्दल सविस्तर नंतर टंकतो. (लक्षात घ्या, ह्या समाजमान्यता आहेत, वैज्ञानिक मान्यता नाहीत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
अ
अजया Wed, 12/02/2015 - 09:17 नवीन
नाहीयासाठी देवाजवळ न जाणे इ शुध्द भंपकपणा आहे. रजोगुण तमोगुण हे स्वभाव विकार आहेत.त्याबद्दल देव काय करु शकणार आहे ? दगडाला तसेही काय कळते समोर बाई आली का बुवा,तिची पाळी सुरु आहे की नाही. यात काही तथ्य असेल तर या नाजूक काळात देव तिच्या सोबत हवा की दूर? जी एक सरळ स्वाभाविक शारीरिक स्थिती आहे,तिची देवाचे नाव मध्ये टाकून गूढ भिती तयार करणे आहे हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
इ
इस्पिक राजा Wed, 12/02/2015 - 09:42 नवीन
दगडाला तसेही काय कळते समोर बाई आली का बुवा,तिची पाळी सुरु आहे की नाही. एक मिनिट. हाच जर विचार असेल तर मग त्या दगडाची पूजा कशाला करायची? त्याच्या जवळ जायचेच कशाला? आणि मग जायचेच नसेल तर मग ही फुकाची चर्चा कशाला? त्या पाच दिवसात बाईने देवासमोर जाउच नये असे माझे काही म्हणणे नाही. पण ते पाच दिवस काय आणि इतर दिवस काय या भावनेने जाणार असतील तर गोष्ट वेगळी. जर देव किंवा मुर्तीतला देव या संकल्पनेवरच विश्वास नसेल तर मग उगाच शोबाजी कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
स
संदीप डांगे Wed, 12/02/2015 - 09:52 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इस्पिक राजा
म
माहितगार Wed, 12/02/2015 - 10:00 नवीन
माझ्याकडून उपस्थीत प्रश्न तत्वज्ञानाच्या अंगाने आहे. माझा संत एकनाथांचा दृष्टीकोण विषयक धागा आठवला. व्यक्तीलक्ष्य तर्कदोषचा अभ्यास वाढावयास हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इस्पिक राजा
अ
अजया Wed, 12/02/2015 - 10:08 नवीन
नकोच शोबाजी.हेच तर म्हणणे आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इस्पिक राजा
स
संदीप डांगे Wed, 12/02/2015 - 07:58 नवीन
गजानन महाराजांनी सुधा एके ठिकाणी असं म्हणलं आहे .
ह्याबद्दल काही पुरावा द्याल का?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/02/2015 - 09:44 नवीन
५०० करायचे ठरलेत का ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 12/02/2015 - 09:52 नवीन
धागालेखाचा पूर्ण आवाका कव्हर करावयाचा झाल्यास जास्तच व्हावयास हवेत, पण धागा लेखाच्या पुर्ण आवाक्याकडे अद्याप म्हणावे तसे लक्ष जात नसावे. उदाहरणार्थ हा धागा केवळ हिंदू धर्मासाठी मर्यादीत नाही, तसेच धार्मीक संस्थांच्या ट्रस्टीमंडळीत स्त्रीयांचा सहभाग वगैरे असे मुद्दे उपस्थीत करताना अद्याप तरी फारसे कुणी दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/02/2015 - 10:56 नवीन
माहीतगार आपला धागे काढण्याचा उद्देश नेहमीच पुर्वग्रह विरहित असतो हे आम्हाला फार अवडते :)
हा धागा केवळ हिंदू धर्मासाठी मर्यादीत नाही,
इतर धर्मांविषयी बोलायची कोणाची टाप नाही हो इथे ! कारण इतर धर्मांवर टीका करणे चणे खाण्याइतके सोप्पे नाही !
तसेच धार्मीक संस्थांच्या ट्रस्टीमंडळीत स्त्रीयांचा सहभाग वगैरे
माझा ह्या विषयाव्रर जास्त अभ्यास नाही , पण समर्थ संप्रदायात कायमच स्त्रीयांना अधिकार होते , समर्थांच्या नंतर गडाचा कारभार अक्का स्वामी ( की वेणु स्वामी ?) पहात होत्या कित्येक वर्षे ! त्यांना किर्तनाचाही अधिकार होता ! ३०० वर्षांपुर्वी बालविधवांना अधिकराचे इतके स्थान क्वचितच अन्यत्र कोठे मिळाले असावे ! आजही संस्थानच्या ट्रस्टींमधे कोणीतरी महिला आहेतच ( नाव आठवत नाही , शोधुन पहावे लागेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ब
बॅटमॅन Wed, 12/02/2015 - 11:05 नवीन
माझा ह्या विषयाव्रर जास्त अभ्यास नाही , पण समर्थ संप्रदायात कायमच स्त्रीयांना अधिकार होते , समर्थांच्या नंतर गडाचा कारभार अक्का स्वामी ( की वेणु स्वामी ?) पहात होत्या कित्येक वर्षे ! त्यांना किर्तनाचाही अधिकार होता ! ३०० वर्षांपुर्वी बालविधवांना अधिकराचे इतके स्थान क्वचितच अन्यत्र कोठे मिळाले असावे ! आजही संस्थानच्या ट्रस्टींमधे कोणीतरी महिला आहेतच ( नाव आठवत नाही , शोधुन पहावे लागेल.)
हो, पण रामदासी संप्रदाय हा एकमेव संप्रदाय नाहीये हिंदू धर्मात. हजारो संप्रदाय आहेत. पैकी मुख्यमुख्य संप्रदायांची यादी करून पाहिले पाहिजे. शिवाय रामदासी संप्रदायाचीच सध्याची स्थिती काय आहे या बाबतीत तेही पाहिले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/02/2015 - 11:12 नवीन
हो ना म्हणुन तर म्हणले की माझा ह्या विषयाव्रर जास्त अभ्यास नाही. बाकी कोणत्याही अध्यात्मिक संस्थानच्या कमीटीवर किमान ३३% स्त्रीया असाव्यात हे आमचे वैयक्तिक मत आहे , बायकांचे इन जनरल मॅनेजमेन्ट आणि सस्टेनस्न प्लॅनिंग , बीजीनेस कंटीन्युटी मॅनेजमेंट पुरुषांपेक्षा जास्त चांगले असते असा आमचा अपला एक पुर्वग्रह आहे ! तर ते असो . अवांतर : आमच्या आवडत्या राधे मा बरेच दिवस न्युज मधे नसल्याने आमचा जीव वर खाली होत आहे Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
पगला गजोधर Wed, 12/02/2015 - 11:26 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ट
टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 11:34 नवीन
खिक्क...तुम्ही खास भक्त झालात तर कडेवर उचलून नाचायलापण मिळेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/02/2015 - 11:37 नवीन
हाय ... क्युं जले पे नमक छिडकते हो गजोधर भैय्या ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ट
टवाळ कार्टा Wed, 12/02/2015 - 11:39 नवीन
आम्ही तर सन्नीबै कधी अध्यात्म जॉईन करतात त्याची वाट बघ्तोय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ब
बॅटमॅन Wed, 12/02/2015 - 11:44 नवीन
आमचे मते तर त्या अध्यात्मिकच आहेत- महाभारतातला धर्मव्याध अठवावा. त्याजपेक्षा सन्नीताई आजिबात कमी नाहीत. आपले काम इमानेइतबारे करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा