Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विज्ञाननिष्ठ म्हणून रहाणे फार कठीण

त
तिमा
गुरुवार, 08/04/2016 - 08:32
🗣 169 प्रतिसाद
एखाद्या भ्रष्टाचारात बुडालेल्या देशांत, विज्ञाननिष्ठ म्हणून रहाणे, हे फार कठीण आहे. उदाहरणे देऊनच ह्या वाक्याचे स्पष्टीकरण देतो. समजा, तुम्हाला तातडीने दुसर्‍या गांवी जायचे आहे. वाटेत अनेक पूल आहेत. ते सरकारी यंत्रणांनी तपासून वाहतुकीला खुले ठेवले आहेत. सामान्यतः तुम्ही ठरवल्याप्रमाणे इच्छित स्थळी पोचणारच. पण भ्रष्टाचारी देशात अनेक प्रश्न उदभवतात. आता ते तपासणार्‍या यंत्रणांमधील इंजिनियर्स हे खरोखरच ज्ञानी आहेत की कुठल्यातरी कोट्यातून अ‍ॅडमिशन मिळून पास झालेले आहेत ? तसेच ते ज्ञानी असले तरी कामाशी प्रामाणिक आहेत का नाही ? त्यांच्यावर वरुन दबाव आला आहे का ? या सर्व शक्यतांवर तुमचा प्रवास सुरक्षित आहे का नाही हे ठरते. पावलोपावली भ्र्ष्टाचाराचा अनुभव असल्यामुळे, तुम्ही जास्तीतजास्त काय काळजी घेणार ? म्हणजे शेवटी देवावर्/दैवावर भरवसा ठेवूनच तुम्ही प्रवासाला निघणार! हाच प्रवास रेल्वेने करायचा झाला तरी वरीलप्रमाणेच प्रश्न उदभवतात. आरोग्यासाठी हिरव्या भाज्या, ताजी फळे खावी असे सांगतात. त्याप्रमाणे तुम्ही आहारात बदल केलेत. तुमच्या खाण्यात शुद्धच भाज्या फळे येतील की रंगवलेली, मेण लावलेली येतील याची काय खात्री ? म्हणजे पुन्हा देवावर, नशिबावर भरवसा ठेवणे आले. तुम्हाला चर्चगेटहून बांद्रयाला जायचे आहे, वेळ कमी आहे म्हणून तुम्ही विरार फास्ट पकडली आहे. पण दरवाज्यातल्या टोळक्याने तुम्हाला उतरुनच दिले नाही किंवा वाद घातल्याबद्दल चालत्या गाडीतून ढकलून दिले तर तुम्ही इच्छित स्थळी, वेळेत पोचाल याची खात्री काय ? पुन्हा नशिबावर भरवसा. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. अशा परिस्थितीत नास्तिक किंवा विज्ञाननिष्ठ कसे रहावे बरे ?

प्रतिक्रिया द्या
26618 वाचन

💬 प्रतिसाद (169)
क
कंजूस गुरुवार, 08/04/2016 - 08:48 नवीन
केविलवाणा चेहरा ठेवायचा.हुशारी मारायची नाही. #बस थांबवली आरटाओने थांबवली.ड्राइवर म्हणाला इकडचे परमिट नाहीये या बसला.काय करायचे? म्हटलं चला .खपचिप पंधरा मिनिटे बाजूला उभे राहिलो.जरा वेळाने सायबाने विचारपूस केली."ऐनवेळी परमिटवाली बस डौन झाली.ही काढली.मिस्टेक झाली सायेब,चलन फाडा.उद्या पैसे भरून येतील मालक." " जाऊ दे ,पुढच्या वेळेला लक्षात ठेवा." एक तात्पुरते परमिट देऊन टाकले त्याने.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/04/2016 - 08:57 नवीन
तुम्हाला जे प्रश्र्न पडले तेच मला पडलेले होते. मागच्या जन्मी आपण काही तरी वेडे-वाकडे पाप केले म्हणून ह्या देशांत जन्म झाला, असे माझे मत. आता ह्यातून सुटका हवी असेल तर, त्यामुळे जसे जमेल तसे पुण्य गोळा करा. फार साधे उपाय आहेत. जे उपाय मी केले तेच सांगत आहे. १. अभ्यास करून परदेशी शिक्षणासाठी जा आणि तिथेच स्थाईक व्हा. (हे मला जमले नाही.) २. आपल्या कामात कुशलता मिळवा आणि भरपूर पैसे जोडून मुलांना परदेशी पाठवा. (हे जमेल असे वाटत आहे.) आणि ३. एखाद्या शांत अशा खेडेगावात स्थाइक व्हा. (हे पण जमले.सुदैवाने मी जिथे स्थाईक व्हायचे ठरवले आहे, तिथे नविन पुलांचे बांधकाम दोन्ही दिशेने चालू असल्याने, पुढील ७-८ वर्षे तरी चिंता नाही.) असो, ह्या ३ही गोष्टी जमत नसतील तर, भरपूर पैसे गोळा करा आणि एखाद्या वृद्धाश्रमात रहायला जा.(शेती नसती घेतली, तर मी पण "वृद्धाश्रम" हाच पर्याय निवडला होता.)
  • Log in or register to post comments
स
सुमीत गुरुवार, 08/04/2016 - 09:02 नवीन
विचार माझे पण, ++++
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
क
कपिलमुनी गुरुवार, 08/04/2016 - 09:15 नवीन
वाचून वाईट वाटले! नो कॉमेंटस्
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अभ्या.. गुरुवार, 08/04/2016 - 09:22 नवीन
जननि जन्मभुमिश्च स्वर्गादपि गरियसी. मला पण वाईट वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/04/2016 - 09:24 नवीन
सकाळी उठल्या उठल्या होणारा वाहनांच्या आवाजाचा त्रास, अरुंद रस्ते, वाहनांनी सोडलेल्या धुराचे प्रदूषण, लोकांच्या संख्येनुसार नसलेली मैदाने, माणसांनी भरून वाहणारी सार्वजनिक वाहने, जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ, बुद्धीपेक्षा जाती किंवा सत्ता किंवा पैसा आधारीत शिक्षण पद्धती, फुटपाथवर धंदा करणारे फेरीवाले, मीटर नसलेल्या रिक्षा, वृद्धांसाठी नसलेली सार्वजनिक, भरवशाची आणि सुयोग्य साधने व्यवस्थित रित्या चालत असलेली आरोग्य व्यवस्था, सणाच्या निमित्ताने वाढणारे ध्वनी प्रदूषण. यादी बरीच मोठी आहे, आता ह्या गोष्टी ह्या ठिकाणी आहेत, त्याला जर तुम्ही स्वर्ग म्हणत असाल तर, तुमच्या मताचा आदर आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
अ
अभ्या.. गुरुवार, 08/04/2016 - 09:28 नवीन
गतजन्म पाप वगैरे संकल्पनाबाबत काही नाही म्हणणे पण तुमच्या "ऑल्वेज थिंक पॉझिटीव्ह" विचारसरणीत १८० अंशाचा फरक पडला म्हणून अंमळ आश्चर्य वाटले. बाकी कै नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/04/2016 - 09:39 नवीन
अशा देशात मी एकटा काहीच करू शकत नाही, ही वस्तूस्थिती. पण इथून सुटका करून घेवू शकतो किंवा किमान त्यातल्या त्यात स्वतःला जास्त त्रास होणार नाही, ह्या जागेत तरी जावू शकतो. "ऑल्वेज थिंक पॉझिटीव्ह" ह्याच बरोबर "ऑल्वेज अ‍ॅक्सेप्ट द थिंग्स" हे पण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
च
चंपाबाई गुरुवार, 08/04/2016 - 09:31 नवीन
आमीरची बायकू असेच बोलली तर ती देशद्रोही ? आता तुम्ही कोण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
स
सुबोध खरे गुरुवार, 08/04/2016 - 09:34 नवीन
आम्ही शांताबाई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
न
नावातकायआहे Fri, 08/05/2016 - 02:58 नवीन
ख्विक...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/04/2016 - 09:49 नवीन
तिला असुरक्षित वाटत असेल तर तिचा तिने उपाय शोधावा, जसा मी शोधला. आता तुम्ही कोण? आम्ही कुणीही का असेना? पण तुमच्या सारखा लोचट तर नकीच नाही. (आत्ता पर्यंत मायबोली आणि मिपातून ३-४ वेळा हकालपट्टी झालेल्या आय.डी.ला लोचटच म्हणावे लागते.दुसरा कुठला सुयोग्य शब्द अशा गुणांना असल्यास, मला माहित नाही.) आणि परत-परत तेच तेच मुद्दे घेवून, तुम्ही मला प्रतिसाद करणार असाल तर, माझ्याकडून एकही प्रतिसाद दिल्या जाणार नाही.तुमच्या भंपक आणि मुळ मुद्दा सोडून भलतीकडेच नेणार्‍या प्रतिसादांना उत्तर द्यायला आज मला वेळ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
म
मोदक गुरुवार, 08/04/2016 - 11:57 नवीन
वाईट वाटले याला हजारवेळा सहमत. अनेक आफ्रिकेतले मागासलेले देश किंवा मध्यपूर्वेतले देश किंवा अगदी भारतातल्याच बिहार हरियाणातल्या खेड्यातल्या गरीब माणसाची परिस्थिती आणि आपली तुलना करा. बरेच सकारात्मक मुद्दे सापडतील. "आपले दु:ख मोजायचे असेल तर आपल्यापेक्षा जास्त त्रासात असणार्‍या व्यक्तीकडे पहा" वगैरे विचार मागासलेले वाटले तरी ते सार्वकालीन सत्य प्रकारात मोडतात. एक मेल / ढकलपत्र वाचले होते ते आठवले... तुम्ही जर हल्ला न होता किंवा न लुटले जाता घरी पोहोचत असाल तर जगातील अमुक अमुक व्यक्तींपेक्षा भाग्यवान आहात, तुमच्याकडे राहण्यासाठी किमान स्वतःची किंवा भाड्याची जागा असेल तर जगातील अमुक अमुक व्यक्तींपेक्षा भाग्यवान आहात असे बरेच काही होते. ते कोणाकडे असले तर प्लीज द्या येथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/04/2016 - 12:26 नवीन
तुलनाच करायची तर ती, आपण राहतो तो प्रदेश दिवसेंदिवस उत्तम होत चालला आहे की अधिकाधिक बकाल, ह्याची केली तर उत्तम. पुर्वीचे पुणेच नाही तर पुर्वीची कुठलीच शहरे, आज तरी आधीच्या १०-१२ वर्षांपेक्षा उत्तम म्हणता येतील अशी झालेली नाहीत. "आपले दु:ख मोजायचे असेल तर आपल्यापेक्षा जास्त त्रासात असणार्‍या व्यक्तीकडे पहा." ह्याचा वैयक्तिक फायदा झालेला आहे. पण एखाद्या देशा बाबत असे म्हणणे योग्य नाही.किंबहूना अशी विचारसरणी एखाद्या देशाबाबतीत योग्य पण नाही. हे म्हणजे एखाद्या देशाने, आमच्याकडे फक्त चोर्‍याच होतात, आतंकवादी हल्ले होत नाहीत, ह्यातच समाधान माना.असे म्हणण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 08/04/2016 - 13:06 नवीन
तुलनाच करायची तर ती, आपण राहतो तो प्रदेश दिवसेंदिवस उत्तम होत चालला आहे की अधिकाधिक बकाल, ह्याची केली तर उत्तम. मान्य. पण एखाद्या प्रदेशाची एकाच दिशेने वाटचाल होत नाही. ज्या चांगल्या गोष्टी येतात त्याबरोबर कांही वाईट गोष्टीही येतातच. पुर्वीचे पुणेच नाही तर पुर्वीची कुठलीच शहरे, आज तरी आधीच्या १०-१२ वर्षांपेक्षा उत्तम म्हणता येतील अशी झालेली नाहीत. सरसकटीकरण वाटत असल्याने पास. पण एखाद्या देशा बाबत असे म्हणणे योग्य नाही.किंबहूना अशी विचारसरणी एखाद्या देशाबाबतीत योग्य पण नाही. नाही हो मुवि, फक्त दु:खाची तुलना करून थांबायचे नाही. सुखाची तुलना करताना आपल्यापेक्षा वरच्या लोकांशी तुलना करून कुठे प्रगती करायची आहे त्याचे मूल्यमापन करायचे. खूपच भाबडे विचार वाटत आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/04/2016 - 13:25 नवीन
पण त्या यायलाच नकोत... हा भले आदर्शवाद असेल...किंबहूना आहेच....पण निदान त्या दिशेने प्रयत्न तर व्हायला हवेत. "सरसकटीकरण वाटत असल्याने पास." हे सरसकटीकरण नाही. तुम्ही महाराष्ट्रातील कुठलेही एखादे शहर निवडा.आपण दोघेही जावू या.तिथल्या वयस्कर व्यक्तींना विचारून बघू या. "सुखाची तुलना करताना आपल्यापेक्षा वरच्या लोकांशी तुलना करून कुठे प्रगती करायची आहे त्याचे मूल्यमापन करायचे." मग मी पण तेच केले. "खूपच भाबडे विचार वाटत आहेत का?" जिथे विचारांची आदानप्रदान होवू शकते (आणि मी जर चुकीच्या मार्गाने जात असेल तर ती चूक दुरुस्त करण्यात मला कमी पणा वाटत नाही.) तिथेच मी साद-प्रतिसाद देत राहतो. प्रत्येक जण आपापल्या परीने एखाद्या घटनेकडे पहात असतो.कुणी डोळस पणे तर कुणी दुसर्‍याच्या सल्ल्याने तर कुणी एक-रंगी चष्मे वापरून. तुमचे विचार भाबडे ठरवण्याचा मला अधिकार नाही आणि तितकी माझी योग्यता पण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
आ
आदूबाळ गुरुवार, 08/04/2016 - 13:03 नवीन
माझा वैयक्तिक अनुभवः एका येमेनमधल्या माणसाशी कामानिमित्त बोलत होतो. सगळी चर्चा झाली - त्याने मला काही अ‍ॅनालिसीस करून द्यायचं होतं. मी विचारलं कधीपर्यंत देशील? तो म्हणाला, "थोड्या वेळाने बॉम्बहल्ल्याला सुरुवात होईल. उद्या ऑफिसला यायला जमेल की नाही माहीत नाही. रविवारपर्यंत देतो, चालेल ना?" ...यावर मी काय बोलणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/04/2016 - 13:28 नवीन
उद्या कदाचित ते भारताच्या बाबतीत पण होवू शकेल, अशी मला शक्यता वाटते. इथे रोजचा लोकलचा प्रवास पण तसाच बेभरवशी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अभ्या.. गुरुवार, 08/04/2016 - 13:33 नवीन
बघा मुवि, मला स्वप्ने पडत होती ते नॉर्मल होते की नै. . नॉर्मल आहे हो मी. ;) . (मृत्यो, हल्के घे रे बाबा. मी खरच धसका घेतलाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/04/2016 - 13:42 नवीन
रोजचा लोकलचा प्रवास करणे वेगळे. १९८० मधला लोकल प्रवास जितका सुखावह होता, तितका आज नाही, ही वस्तूस्थिती. गेल्या ७-८ वर्षात स्थिती खूपच बिघडली आहे. मग ती दिव्यातली दंगल असो किंवा लोकलमधून झालेला अपघात आणि त्याचे चित्रण असो. जर तुम्ही झुंडीत सामील झालेले नसाल, तर इथे जगणे कठीण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. गुरुवार, 08/04/2016 - 13:51 नवीन
जर तुम्ही झुंडीत सामील झालेले नसाल, तर इथे जगणे कठीण आहे.
अगदी परफेक्ट वाक्य. प्रत्येक ठिकाणी लागू. . असल्या कठीणपणाचीच लै हौस दांडगी मला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मृत्युन्जय Wed, 08/10/2016 - 06:11 नवीन
नॉर्मल आहे हो मी. ;) . (मृत्यो, हल्के घे रे बाबा. मी खरच धसका घेतलाय) हाहाहा. *** तु खरेच नॉर्मल आहेस :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/07/2016 - 08:58 नवीन
आवडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/07/2016 - 08:56 नवीन
देश जसा आहे, तसा आहे, आवडतो आम्हाला आमचा देश. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 08/04/2016 - 09:40 नवीन
मागच्या जन्मी आपण काही तरी वेडे-वाकडे पाप केले म्हणून ह्या देशांत जन्म झाला
हे वाचून अतिशय वाईट वाटले, माझा देश इतकाही वाईट नाही की कोणाला पापकृत्याचे परिणाम म्हणुन इथे जन्म घ्यावा लागावा. हे असे वाचायला लागणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
य
यशोधरा गुरुवार, 08/04/2016 - 09:49 नवीन
अगदीच. आणि डोंबोलीत असून असे?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/04/2016 - 10:01 नवीन
जे डोंबोलीत तेच इतर शहरांत पण आहे. मग ते सोलापूर असो की नागपूर की औरंगाबाद किंवा लातूर. फूटपाथ वरून व्यवस्थित चालता येणे आणि झेब्रा क्रॉसिंग वरून व्यवस्थित रस्ता क्रॉस करणे, हा सामान्य अधिकारच जिथे डावलला जातो, त्या देशाबद्दल काय बोलणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा गुरुवार, 08/04/2016 - 10:02 नवीन
आपल्या आजूबाजूची जी व्यवस्था आपल्याला पटत नाही, ती बदलायचा आपण कितीसा प्रयत्न करतो? तुम्ही असे काही प्रयत्न केले असल्यास मला वाचायला खरंच आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/04/2016 - 10:26 नवीन
असा प्रयत्न केला होता. १. आमच्याच एका गृपने त्यावेळी डोंबिवलीत लोकांना प्लॅस्टिकच्या सोडून कापडी पिशव्या बाळगण्याचा एक प्रयत्न रस्त्यावर केला होता. आज निदान मी आणि माझ्या घरचे, शक्यतो पिशवी घेवूनच बाहेर पडतो. (लोकांना जसे हवे तसे वागू देत.) २. डोंबिवलीतल्या चौकांत होणार्‍या दुर्दशेची तक्रार दिल्लीला पण करून झाली. ३. धार्मिक कार्या निमित्ताने होणार्‍या ध्वनी-प्रदूषणाची तक्रार न करण्यातच शहाणपण असते, सत्तेपुढे आणि झुंडीपुढे सामान्य माणसाचे, मग ते कितीही योग्य असले तरी, चालत नाही, हा धडा पण शिकलो. थोडक्यात काय तर, गृप जमवून किंवा वैयक्तिक, किंचित प्रयत्न करून पाहिला आणि ह्या कामासाठी आपला जन्म झालेला नाही, हे उमगले. मी खरे तर ह्या गोष्टी सांगीतल्याही नसत्या, पण तुम्ही पोटतिडिकेने विचारलेत म्हणून लिहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा गुरुवार, 08/04/2016 - 10:30 नवीन
पण हे सतत करावे लागते मुवि. एक दोनदाच करुन जमत नाही. अथक प्रयत्न सुरु ठेवावेच लागतात. त्याला उपाय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/04/2016 - 11:35 नवीन
+१ आणि त्याच बरोबर आमच्या बरोबर एखादा उत्तम मार्गदर्शक पण न्हवता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/04/2016 - 09:56 नवीन
मला ही ते लिहितांना फार काही आनंद झालेला नाही....पण इतर देशांची तुलना केल्यानंतर हे असे वाटणे मला तरी साहजिकच वाटते. १. सुयोग्य नियोजित रस्ते, २. गर्दी नसलेला आणि आवाज नसलेला फुटपाथ. ३. आरामात झेब्रा क्रॉसिंगवर रस्ता ओलांडता येणे ४. अनावश्यक हॉर्न न वाजवता सुरळीत जात असलेली वाहने. ५. जीवनावश्य वस्तूंच्या भाववाढीवर नियंत्रण ६. २४ तास लाईट आणि पाणी. ह्या आणि इतर बर्‍याच गोष्टी, भारता नंतर स्वतंत्र झालेल्या देशात पण पहायला मिळतात. सामान्य माणसांना अद्यापही ह्या गोष्टी दुरापास्तच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 08/04/2016 - 10:30 नवीन
मुविकाका, तुम्ही म्हणत आहात त्या सगळ्या सुविधा झाल्या असे गृहित धरले तरी त्यामुळे माणसाच्या समस्या संपणार आहेत का? ही नाहीतर दुसरी समस्या निर्माण होईलच. तुम्हाला पाहिजे आहेत त्यापैकी बर्‍याचशा सुविधा युरोप, अमेरीका, ऑस्ट्रेलिया इत्यादी ठिकाणी झालेल्या आहेत.पण तिथल्या लोकांच्या समस्या या नसतात तर वेगळ्या स्वरूपाच्या असतात. उदाहरणार्थ ड्रग्स, ओबेसिटी इत्यादी. एकूण काय तर समर्थ म्हणाले आहेत त्याप्रमाणे जगी सर्वसुखी असा कोणीच नाही.एक समस्या सुटली की दुसरी समस्या आ वासून उभी राहणार आहे---या नाहीतर त्या स्वरूपात.म्हणजे आपण रस्त्यावरच्या खड्ड्यांविषयी तक्रार करत असू तर अमेरीकेतील लोक कधीही जाणार्‍या नोकर्‍यांविषयी, कुठेही होणार्‍या गोळीबाराविषयी तक्रार करतात. अर्थात याचा अर्थ रस्त्यावर खड्डे तसेच राहूदेत किंवा २४ तास लाईट आणि पाणी नको असा नक्कीच नाही. पण या समस्या आहेत म्हणून भारतात पूर्वजन्मीचे पाप म्हणून जन्म मिळाला असे का म्हणावे? कदाचित वेगळ्या कुठल्यातरी समस्यांमुळे युरोप-अमेरीकेतील लोकही असेच म्हणत असतील (जर का त्यांचा पूर्वजन्मावर विश्वास असेल तर).म्हणजे सर्वच ठिकाणचे लोक कुठच्या ना कुठच्या कारणावरून हेच म्हणत असतील. तसे असेल तर जन्माला आलो हेच मागच्या जन्मीचे पाप म्हणायचे का? मुविकाका, मागच्या जन्मीचे पाप म्हणून भारतात जन्माला आलो हे तुमचे वाक्य केवळ उद्विग्नतेतून आलेले असावे ही आशा आणि बर्‍याच अंशी खात्री आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अमितदादा गुरुवार, 08/04/2016 - 10:41 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/04/2016 - 11:23 नवीन
त्यातूनच आले आहे.... कारण, गेली २५-३० वर्षे ह्या ना त्या निमित्ताने भारत बघणे आणि थोडे भारता बाहेरील देश बघणे झाले होते आणि ह्यापुढेही चालू राहिल. समस्या २ प्रकारच्या असतात. १ वैयक्तिक (अन्न, वस्त्र, निवारा,) तर २. सामाजिक (दळणवळण, समाजाची शारिरीक आणि मानसिक वाढ,बेकारी इ.) ह्या सारख्या. मुळात वैयक्तिक मागण्याच जर पूर्ण होत नसतील तर मग सामाजिक गोष्टी तर फार दूर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
आ
आजानुकर्ण गुरुवार, 08/04/2016 - 15:17 नवीन
गॅरी साहेबांशी सहमत. सर्वच ठिकाणचे लोक हेच म्हणत असतात. भारतात जन्माला आल्याचे कारण एखादे पूर्वजन्मीचे पाप असावे असे किमान अच्छे दिननंतरतरी वाटू नये असे मोदी साहेब म्हणतात ब्वॉ. (http://www.news18.com/news/buzz/modi-insults-india-993961.html) चंपाबाईशीही सहमत. आमीरखानच्या बायकोनेही असेच काहीतरी म्हटले होते ना? बिचाऱ्याला अतुलनीय भारतपासून स्नॅपडील पर्यंत सगळ्यांनी झोडले. मात्र गॅरी साहेबांशी पुन्हा सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
सुबोध खरे गुरुवार, 08/04/2016 - 16:01 नवीन
कुठलाही विषय शेवटी मोदी साहेबांशी आणून चिकटवल्याशिवाय चैनच पडत नाही काही लोकांना. या सर्व लेखात राजकारणाचा काय संबंध?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण गुरुवार, 08/04/2016 - 16:05 नवीन
हा विषय मोदी साहेबांशी आणून चिकटवला असे का वाटले आपल्याला? तुमचा वरील 'शांताबाई' हा प्रतिसाद चर्चेच्या मुद्द्याशी कितपत सुसंगत आहे? मग मी काय घोडं मारलंय? बाकी माझा प्रतिसाद पटत नसेल तर दुर्लक्ष करा ही विनंती. भारतात जन्माला आल्याची लाज वाटते या संदर्भातील असेच वाक्य मोदी यांचे आहे असे आठवले. म्हणून लिहिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे गुरुवार, 08/04/2016 - 16:55 नवीन
चंपाबाई बद्दल बोलू नका जिथे तिथे पिंक टाकायची सवयच आहे. इथे एखादा माणूस उद्विग्न झाल्यामुळे देश सोडायचे बोलत आहे. त्यात कोणताही पक्षीय हेतू नाही ("काँग्रेस" मुळे "आप" मुळे किंवा "भाजप"मुळे नव्हे). अमीर खानच्या बायको ने असुरक्षिततेमुळे देश सोडायचे म्हटले होते.( तरी बरं हि बाई अगोदरची हिंदूच होती). ते आमीरखानने "सार्वजनिक" करण्याचे कारण नव्हते. चंपाबाईनी हे उदाहरण राजकीय स्वार्थातून( कि मोदी द्वेषातून) दिले आहे. चंपाबाई( कि हितेश बुवा, मोगाखान जामोप्या इ )सुद्धा जिथे तिथे राजकारण आणल्याशिवाय राहत नाही आणि तुम्ही तिचीच( का त्याचीच) री ओढता आहात. मुविच्या प्रतिसादाशी मी सहमत नाही परंतु तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपल्या एकंदर प्रतिसादाची पातळी चंपाबाई पेक्षा किती तरी उच्च असते ती अशी खाली आणू नका एवढी विनंती आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आनंदी गोपाळ गुरुवार, 08/04/2016 - 19:51 नवीन
संपूर्ण युक्तिवाद प्रिजुडिस्ड वाटतो. तस्मात, असहमत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आजानुकर्ण गुरुवार, 08/04/2016 - 22:06 नवीन
मुविंशी माझे वैयक्तिक काहीही वैर नाही. परंतु त्यांच्या प्रतिसादाने ही उपचर्चा सुरु झाल्याने त्याचा संदर्भ घेतो.
अमीर खानच्या बायको ने असुरक्षिततेमुळे देश सोडायचे म्हटले होते.( तरी बरं हि बाई अगोदरची हिंदूच होती). ते आमीरखानने "सार्वजनिक" करण्याचे कारण नव्हते. चंपाबाईनी हे उदाहरण राजकीय स्वार्थातून( कि मोदी द्वेषातून) दिले आहे. चंपाबाई( कि हितेश बुवा, मोगाखान जामोप्या इ )सुद्धा जिथे तिथे राजकारण आणल्याशिवाय राहत नाही आणि तुम्ही तिचीच( का त्याचीच) री ओढता आहात. मुविच्या प्रतिसादाशी मी सहमत नाही परंतु तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
मुवि आणि तिमा यांनीही रस्त्यांची स्थिती, बेभान चालक यामुळे असुरक्षितता वाटते असेच म्हटले आहे. आमीरच्या बायकोने मुलांसाठी देश सोडावा असे वाटते असे म्हटले होते. येथेही मुविंनी मुलाचे शिक्षण (व पुढे वास्तव्य) परदेशात झालेले चांगले असे मत व्यक्त केले आहे. मुविंचे मत आणि सौ. आमीर खान यांचे मत दोन्हीही वैयक्तिक प्रश्न असूनही आमीरने ते सार्वजनिक करण्याचे कारण नव्हते असे तुम्हाला वाटते. पण मुविंनी त्यांचे मत सार्वजनिक केले तर त्याबाबत तुम्हाला आक्षेप दिसला नाही. हे थोडेसे विसंगत वाटले. कुणी कुठं राहावे हा वैयक्तिक प्रश्न आहे. मिपावर नियमितपणे येणारे अनेक अनिवासी सदस्य मुलांचे भविष्य, आर्थिक दृष्टिकोण, स्टँडर्ड ऑफ लिविंग, सुरक्षितता, वगैरे अनेक मुद्द्यांमुळे भारताऐवजी परदेशात स्थायिक झाले आहेत. मुलांबाबतचा हाच दृष्टिकोण सौ. आमीर खान यांचा असणे योग्य नाही की काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 08/05/2016 - 02:16 नवीन
मुवि आणि तिमा यांनीही रस्त्यांची स्थिती, बेभान चालक यामुळे असुरक्षितता वाटते असेच म्हटले आहे. आमीरच्या बायकोने मुलांसाठी देश सोडावा असे वाटते असे म्हटले होते... १. अ) मुवि आणि तिमा यांनी त्यांचा प्रामाणिक उद्वेग व्यक्त केला आहे असे वाटते. आ) शिवाय, त्या दोघांनी कधी दोन पैसे घेऊन अथवा न घेऊन देशप्रेम आणि नैतिकता यांचे व्यावसायिक प्रदर्शन केले असे माहितीत नाही. २. अ) आमीरच्या देश सोडण्याच्या विधानासंबंधी त्याने त्याच्या बायकोच्या खांद्याचा आधार घेत दुसरीकडे शरसंधान केले असा सर्वसाधारण समज आहे (खखो आमीर आणि त्याची पत्नी जाणो). आ) कमीत कमी, समतोल विचार करणार्‍याला, "इन्क्रेडिबल इंडिया" ची जाहिरात करत असलेल्या व्यक्तीने केलेले "इन्टॉलरंट इंडिया" हे विधान विरोधाभासी व अगम्य वाटायला हरकत नसावी ! शिवाय, पैसे घेऊन (अथवा न घेऊनही) देशप्रेम आणि नैतिकता यांचे व्यावसायिक प्रदर्शन करणार्‍याने असे विधान सार्वजनिक व्यासपिठावर केले तर त्याचे काय परिणाम असू शकतात याचा विचार आमीरने केला नसेल असे म्हणणे म्हणजे बहुश्रुत असलेल्या त्याच्या बुद्धीमत्तेचा अपमान होईल... तेव्हा, प्रत्यक्षातला परिणाम आमीरला अपेक्षित असलेल्या परिणामापेक्षा वेगळा झाला हा विचार जास्त संयुक्तिक वाटतो. वरचे मुद्दे ध्यानात घेतले तर मुवि/तिमा आणि आमीर यांच्या विधानांमागचे वेगवेगळे अर्थ स्पष्ट व्हायला मदत होईल असे वाटते. जरा अजून इस्काटून... "(बर्‍याचदा फक्त सोयीच्या वाटणार्‍या का होईना, पण) अनेक सामाजिक विचारांना सार्वजनिक माध्यमांतून नैतीक विरोध करणार्‍या" आणि ते करताना "सामाजीक-राजकीय मते परखडपणे मांडणारी, समतोल, विचारवंत व्यक्ती अशी आपली छबी निर्माण करणार्‍या" व्यक्तीने आपण (कमीत कमी सार्वजनिक पटलावर तरी, आणि कांगावाखोर नसल्यास खाजगीतही) आपल्या वागण्या-बोलण्यावर ताबा ठेवणे आणि त्यांत विरोधाभास होऊ नये, ही काळजी घ्यावीच... जनांसाठी नाही तर मनासाठी तरी :) आपले म्हणणे तार्किकरित्या सुस्पष्टपणे मांडणे कठीण असले आणि/किंवा लोकप्रिय सार्वजनिक व्यासपिठावर व्यक्त होण्याची संधी मिळणे कठीण असले तरी; "दालमे कुछ काला है।" हे चटकन समजण्याइतकी बुद्धी सर्वसामान्यपणे जनतेत जरूर असते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
च
चंपाबाई गुरुवार, 08/04/2016 - 20:40 नवीन
मोदी / भाजपा हे मी लिहिलेही नव्हते. खरेबुवाना कुठुन दिसले ? उद्विग्नता कुणाला कोणत्या कारणाने यावी हेही यांच्या मताप्रमाणेच ठरले पाहिजे , हे वाचुनकरमणुक जाहली. माझ्या प्रत्येक पोस्टला खरेबुवा पिंक असे हे संबोधतात , पण तिची चव घ्यायलाही हेच महोदय वारंवार पुढे येत असतात, ही तर अजुन मोठी गंमत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 08/05/2016 - 07:10 नवीन
पिंक असे हे संबोधतात , पण तिची चव घ्यायलाही काय प्रतिसाद आहे? आजानुकर्ण साहेब आता कळलं का मी काय म्हणत होतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
म
मुक्त विहारि Fri, 08/05/2016 - 08:39 नवीन
डू.आय.डीं बद्दल काय बोलणार? ह्या अशा लोचटपणा हा गूण असलेल्या व्यक्तींना प्रतिसाद देण्याच्या भानगडीत पडू नये, असे मला बर्‍याच जणांनी सांगीतले आणि मला ते पटले देखील. उगाच आपला वेळ जातो. वरील प्रतिसाद हा "सुबोध खरे" ह्यांनाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अर्धवटराव गुरुवार, 08/04/2016 - 19:47 नवीन
आमीरच्या बाबतीत कॉन्टेक्स्ट अगदी वेगळा होता. तेंव्हा सो कॉल्ड पुरस्कारवापसी वगैरे प्रकरणं सुरु होती व त्यातच आमीरची मुलाखत आली. अन्यथा सत्यमेव जयते मधे आमीरने व्य्वस्थेची पिसं काढली व त्याचं सर्वत्र कौतुकच झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 08/05/2016 - 02:49 नवीन
हे सगळे सर्व कर भरून व सगळ्या कायद्यांचे पालन करूनही भेटत नसेल तर काय करावे? माफी असावी, पण मी फारच वैयक्तिकरीत्या बोलतोय! इतरांना सुधारावयाची माझी कॅपॅसिटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/04/2016 - 09:54 नवीन
मागच्या जन्मी आपण काही तरी वेडे-वाकडे पाप केले म्हणून ह्या देशांत जन्म झाला
मुवी , एकदम मन की बात बोललात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
स
स्पा गुरुवार, 08/04/2016 - 10:22 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अभिजित - १ गुरुवार, 08/04/2016 - 18:20 नवीन
" मागच्या जन्मी आपण काही तरी वेडे-वाकडे पाप केले म्हणून ह्या देशांत जन्म झाला, असे माझे मत. " > >> सहमत आहे मुवि यांच्याशी .. एक addition .. जे लोक मुक्ती कडे जाऊ इच्छितात ते पण इथेच जन्म घेतात !! अमेरिका - सर्वसामान्य माणसाचे आयुष्य अतिशय सेफ आहे. कसलीही डोक्याला त्रास नाही. रोज जॉब , वीकएंड ला छोटी पिकनिक . सोमवारी परत जॉब . महिन्यातून 2/4 वेळा हॉटेल , सिनेमा . पिझा / बिअर / चीज / भाज्या / गॅस ( आपले पेट्रोल हो ) एकदम स्वस्त .. पण त्या मुळे देवाचे नाव घ्यायची , देवाला आठवायची वेळ फारशी येत नाही !! इथे भारतात ते सतत करावे लागते . हो कि नाही ? कोण तुम्हाला कसा अडकवले सांगता येत नाही. दुसऱ्याला त्रास देयायची इच्छा असलेले लोक खूप . स्वानुभव आहे. तुमचा पण असेल. ( डोक्टर खरे तुम्ही अपवाद आहात , तुमचे आयुष्य एकदम छान आहे .. तसेच असू दे !! ) अमेरिका मध्ये असे फालतू लोक नसतात. जे इथे आहेत. त्या मुळे सतत देवाचे नाव ओठी. आणि काही भाग्यवान त्या मुळे मुक्ती पण मिळवतात. जे अमेरिका / युरोप मध्ये होत नाही. कारण सतत देवाला आठवावे लागत नाही !! मी पण हाच विचार मध्ये मांडला होता. पण एक अर्धवट राव लगेच आडवे आले. इथे बघा .. http://www.misalpav.com/comment/831641#comment-831641
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा