कार्ड पेमेंटचे २ % , दुकानदार आणि आपण
नमस्कार,
गेले काही दिवस वारंवार कार्ड पेमेंटच्या २ टक्क्यांबद्दल काही प्रतिक्रिया वाचत आहे. हे पैसे सरकारने द्यावेत, ते सबसिडाईज व्हावेत पासून पेमेंट बँकांच्या २ % कमिशनसाठी नोटा बंद झाल्या वगैरे प्रतिसाद वाचले. एका धाग्यावर मोदकशी चर्चा करताना यासंदर्भात १-२ प्रतिसाद दिले होते. ते कॉपी -पेस्ट करुन इथे चिकटवत आहे. सविस्तर लिहिण्यासाठी तूर्तास वेळ नाही त्याबद्दल दिलगीर आहे. माझी माहिती अपूर्ण असू शकते. त्यात कोणी भर घातल्यास आवडेल.
या धाग्याचा 'माहिती' यापलीकडे अन्य कोणताही उद्देश नाही.
हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत.
नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.
१. जयंत कुलकर्णी - Mon, 28/11/2016 - 16:52
आत्ताच गॅससाठी क्रेडीटकार्डने पैसे भरले. जवळजवळ १ % जास्त भरावे लागले. ट्रान्झॅक्शन चार्जेस म्हणून १ %. म्हणजे एचपी गॅस डिलिव्हरीच्या अगोदर पैसे घेणार व त्यासाठी जास्त पैसे घेणार. कॅशलेस हा माझ्यासाठी आतबट्याचा व्यवहार आहे... :-(
२. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:05
८०० रूपयांचा सिलेंडर असेल तर १% पैसे म्हणजे ८ रूपये जास्त जातील.
सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल. असा माझा अंदाज आहे.
३. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:43
सुधारणांचा भाग आणि प्लॅस्टिक मनीला प्रोत्साहन म्हणून सरकार बहुदा हे ही चार्जेस कमी किंवा शून्य करेल.
हे चार्जेस शून्य करता येत नाहीत. कारण ते सरकारकडे जात नाहीत.
नेटवर्क कंपनीने फुकटात सेवा द्यावी अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.
४. मोदक - Mon, 28/11/2016 - 17:54
आप्पा.. सरकार असे मार्ग वापरणार्याला सबसिडी देईल.. किंवा खर्चाच्या रकमेची आणखी काहीतरी सवलत देईल.
बरोबर..?
५. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 18:15
नाही. तसे वाटत नाही. देत असल्यास देऊ नये. सबसिडी घेऊन धंदा करणे मला तत्वतः चूक वाटते.
पेमेंट बँकिंगचे बिझनेस प्रिन्सिपल 'माझ्या मते तरी उधार मिळते म्हटल्यावर लोक पटकन खरेदी करतात' या ग्रूहीतकावर अवलंबून आहे. म्हणून जगातले पहिले पेमेंट बँकिंग डायनर्स क्लब आणि अमेरिकन एक्स्प्रेस च्या क्रेडीट कार्डांपासून सुरु झाले. हे ग्रूहीतक शॉपिंग मॉल्/डीपार्टमेंटल स्तोअर येथे य्शस्वीपणे चालताना आपण पाहतोच. नंतर 'क्रेडीट कार्ड' साठी नेटवर्क अव्हेलेबल आहे आणि सोय म्हणून डेबिट कार्ड साठी सुद्धा पेमेंट बँकिंग सुरू झाले असावे असे वाटते.
आमचे नेटवर्क तुम्ही वापरा (का वापरा तर धंदा वाढेल) आणि नेटवर्कची फी द्या असे हे गणित आहे.
शिवाय चेक पेमेंट मधे चेक बाउन्स होऊ शकतो. पेमेंट बँकेत कस्टमरने डिफॉल्ट केले तरी मर्चंटचे पैसे बँकेला द्यावेच लागतात. (बहुधा व्याजासकट. तो वेगळा फायदा.)
आपण एखाद्या बँकेचे एटीम वापरतो तेव्हादेखील नेटवर्कची फी द्यावी लागते. दुसर्या बँकेचे एटीएम असेल आणि ५ + ट्रान्जाकश्नस असतील तर चार्ज पडतो.
पेमेंट बँकिंग वर बहुधा आरबीआय ची रेगुलेशन असावीत असे वाटते.
या सगळ्यात सरकार आलेच कुठे ? येऊ नये. देशात पेमेंट बँकिंग वाढावे असे सरकारला वाटत असेल तर असले निर्बंध किंवा सबसिडी देऊ नयेत.
६. डॉ सुहास म्हात्रे - Mon, 28/11/2016 - 20:35
सबसिडी हा शब्द तितकासा बरोबर नाही असे वाटते व कोणत्याही सबळ आणि चांगल्या अर्थव्यवस्थेत सबसिडी एक तात्पुरती तडजोड म्हणूनच वापरलेली असते, काही काळाने ती नष्ट व्हावी हाच उद्येश असला पाहिजे.
पण, ट्रांझॅक्शन्सची संख्या मोठा प्रमाणावर वाढली की, इंफ्रास्ट्रक्चरवरील खर्च त्याच्या समप्रमाणात वाढत नसल्याने, दर ट्रांझॅक्शनमागचा खर्च कमी होईल (इकॉनॉमी ऑफ स्केल) आणि ती बचत पूर्ण किंवा त्यातला काही भाग ग्राहकापर्यंत पोचेल.
७. अप्पा जोगळेकर - Mon, 28/11/2016 - 17:40
काका, हा जो काही वाढीव टक्का आहे तो गॅसवाल्याने भरला पाहिजे. उगाच सरकारच्या नावे टाहो फोडून काय होणार मर्चंट (गॅसवाला) --> अक्वायरर कंपनी (अक्सिस बँक वगैरे) --> नेटवर्क कंपनी (विसा/मास्टर कार्ड्/अमेक्स वगैरे) --> कार्ड इश्युअर बँक (आय्सीआय्सीआय वगैरे).
उद्या गाळ्याचे भाडे वाढले म्हणून गॅसवाल्याने अडिशनल पैसे घेतले तर तुम्ही द्याल का ?
असे वाढीव पैसे देणे चूक आहे. यापेक्षा चेकने पेमेंट करू शकता.
८ रुपये हा मामुली दर आहे हा वेगळा भाग आहे.
मी तर माझ्या पुरता कॅशलेस ना होण्याचा निर्णय घेतला आहे !!उत्तम, तो पर्याय सद्याही आहे आणि काही ठराविक रकमेपर्यंत तरी भविष्यातही राहीलच याची खात्री आहेच !हे जे लूपहोल दाखवले अाहे, ते बुजविण्याचा सरकार काही प्रयत्न करत अाहे काय? असल्यास माहीती द्यावी.हा प्रकार मॉरिशस, मालदीव, सिंगापूर, इत्यादी येथिल कंपन्यांना बेनामी व्यवहार करण्यास नवीन कायदे करून परवानगी देऊन केलेला होता. आताच्या सरकारने त्यातील सर्व देशांशी केलेले करार बदलले आहेत. त्यामुळे बेनामी व्यवहारंना चाप बसणार आहे. फक्त सिंगापूरने मार्च २०१७ च्या पुढेपर्यंत सूट मागितली होती, तीही फेटाळली गेली आहे. हे माध्यमांत आले आहे. आताच्या काळ्या पैश्याविरुद्धच्या कारवायांविरुद्ध गदारोळ करणारे, ज्यांचे "बाबा वाक्य प्रमाणम" किंवा सोईचे मानून भांडत आहेत, ते पूर्वी देशाला कसे खास कायदे करून फसवत होते याबद्दल अज्ञानी आहेत किंवा तिकडे दुर्लक्ष करत आहेत, हे सांगण्यासाठी ती फीत दिली आहे. जर ती सर्व फीत बघितली असल्यास तर त्यातल्या लोकांनी स्पष्ट नावे घेऊन केलेली कागदी कारवाई सांगितली आहे व ती कशि दडपली गेली हे पण सांगितले आहे. हे सगळे आजचे २% असा विषय नसून, सर्व कारवायांचा एकत्रित परिणाम म्हणून सर्वसामान्य जनतेला किती फायदा-तोटा होईल असे पाहणे जरूरीचे आहे. शिवाय या सर्वात, "अनेक दशके वेगवेगळ्या क्लृप्त्या देशाला कुटण्यात चलाख असणार्यांच्या वचनावर विश्वास ठेवायचा" की "स्वतःच्या मतदारपेटीलाही धक्का लावायला न घाबरणार्यांवर विश्वास ठेवायचा" हे कमीत कमी सुजाण नागरिकांना ठरवायला सोपे जावू नये. त्यासाठी, केवळ २% नव्हे तर सर्वंकश विचार करायला शिकले पाहिजे. सद्या इ-ट्रांझॅक्शन्स कमी लोक वापरतात, त्यामुळे आता त्यांच्यावरचा "पर युज" खर्च जास्त आहे. इ-ट्रांझॅक्शन्सची संख्या थोड्या काळात अनेक पटींनी वाढणे अपेक्षित आहे, त्यासाठीच्या संसाधनांचा खर्च त्याप्रमाणात वाढणार नाही व "पर युज" खर्च खूप कमी होईल (इकॉनॉमी ऑफ स्केल), त्यातली काही बचत ग्राहकांपर्यंत पोचेल. त्याशिवाय मोठया युजर बेससाठी होण्यार्या स्पर्धेचा फायदाही ग्राहकाला होईल, जसा आता टेलिफोन व ब्रॉडबँड सेवेसंबधात दिसत आहे. विरोध करावा, पण तो वैयक्तिक हितंसंबंधांच्या वर उठून केला तरच तो अंतिमतः देशाला फायद्याचा ठरेल असे मला वाटते... तसे झाले तरच तो आपल्याला आणि पुढच्या पिढ्यांना भरीव प्रगती देऊ शकेल. नाहीतर, भूतकाळाप्रमाणे राजकीय चलाखी वापरून उल्लू बनवणे आणि बनणे चालू राहील... त्या बाबतीतल्या तज्ज्ञांची गेल्या काही दशकांत भारतात मोठी फौज तयार झालेली आहेच.