Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

परदेस मत जैय्यो...! (बट व्हाय नॉट?)

प
पिलीयन रायडर
Wed, 02/15/2017 - 17:16
🗣 340 प्रतिसाद
बर्‍याच दिवसांपासून मनात एक प्रश्न आहे. अनेक लोक त्याला झैरात किंवा हुच्चभ्रु किंवा हिरव्या लोकांचे हिरवे प्रश्न (अ‍ॅज इन डॉलर्सवाल्यांचे प्रश्न!) म्हणुन उडवुन लावतीलही. पण हा आयुष्यातला महत्वाचा प्रश्न होऊन बसलाय आणि मला एक ठाम उत्तर मिळत नाहीये. माझं स्वतःचं अमेरिकेत जावं असं काही स्वप्नं नव्हतं. मी मूळात फार मोठी स्वप्नं बघणारी, महत्वाकांक्षी व्यक्ति नाही. माझा नवराही काम उत्तम आणि मनापासुन करणारा माणुस आहे, पण करियर ओरियंटेड वगैरे नाही. आयटी मधले बहुतांश लोक वारी करुन येतातच तसे आम्ही अमेरिकेत पोहचलो. पासपोर्टवर शिक्का बसला ह्याहुन जास्त आम्हाला फार काही वाटले नाही. पण २ महिन्यासाठी आलो ते गेले २ वर्ष झाले इथेच आहोत. पुढचं काही नक्की नाही. आम्ही स्वतःहुन काही प्रयत्नही करत नाही आहोत. सुरूवातीला आलो तेव्हा परत जायचेच आहे ह्याच मनस्थितीत होतो. त्यामूळे हॉटेलात राहिल्यासारखं बॅगांमम्ध्येच निम्मं सामान ठेवुन संसार चालु केला. आजही परत जाण्याचीच तीव्र इच्छा आहे. पण आताशा मनात गोंधळ उडायला सुरुवात झाली आहे. खास करुन जेव्हा पासून मुलगा इथल्या शाळेत जायला लागला. पहिले २ महिने काही विषेश घडतय असं वाटत नव्हतं. पण हळूहळू त्याच्या वागण्या बोलण्यातला बदल, शाळेत शिकवण्याच्या पद्धतीतला फरक इ गोष्टी ठळक व्हायला लागल्या. मला व्यक्तिशः इथली पद्धत जास्त आवडली. इथे लिखाणावर किवा पुस्तकातून शिकण्यावर भर दिला जात नाही. खरं तर मूळाक्षरं किंवा अंक ह्यापेक्षाही वागण्या बोलण्याची पद्धत, इतरांना समजुन घेणे, शेअर करणे इ. वर भर आहे. जे काही शिकवले जाते ते खेळांमधुन किंवा प्रोजेक्ट्स मधुन. पुस्तकं नाहीचे, वही नाही, घरचा अभ्यास नाही. शाळेत वर्गात १५ मुलं आणि २ शिक्षिका. वर्गाचे आर्ट-सायन्स-सॅण्ड-वॉटर-टॉय-बुक-कॉम्प्युटर असे भाग केलेले आहेत. आणि मुलं गट करुन त्यात काही तरी शिकत असतात. पहिल्या दिवशी मुलाला सोडलं तेव्हा दोन गट करुन मुलं भिंगातुन दगडं बघत बसली होती. आणि शिक्षिका त्यांना प्रश्न विचारत होत्या की हात लावुन सांगा, रंग काय आहे सांगा इ. आधी मला वाटलं की हा निव्वळ टाईमपास असणारे. ह्यातून काही आपलं पोरगं फार शिकणार नाहीये. उगाच ४ तास खेळायला सोडल्यासारखं आहे. पण झालंय उलट. गेल्या ४-५ महिन्यात उलट तो फारच वेगवेगळ्या गोष्टी शिकलाय. ह्यात एबीसीडी वगैरे अजिबात नसून आपल्या आजुबाजुच्या वस्तुंचा, पदार्थांचा, घटनांचा आणि माणसांचा समावेश आहे. शाळेभोवती पडलेले दगड पासून ते डोनाल्ड ट्रंप पर्यंत बरंच काही. इथे माझ्यामधली आई गडबडली आहे. पुण्यात असताना माझा शाळेचा अनुभव काही विषेश नव्हता. रोज २-३ पानांचा लिखाणाचा अभ्यास असायचा, ज्याचं नाव काढलं की घरात भयानक रडापड सुरु व्हायची. इथे मात्र कोणताही अभ्यास न करता मुलगा जास्त शिकतोय असं का कोण जाणे वाटत रहातंय. एक जण तर म्हणते की पुढे जाऊन प्रेमात पडावं इतका चांगला अभ्यासक्रम असतो. मला स्वतःला आयुष्यात वारेमाप पैसा असावा, मोठं घर असावं असं काही वाटत नाही. मला उलट भारतात रहावं वाटतं. पण आता मुलाला पाहताना वाटतं की माझ्या संकुचित आकांक्षांपायी मी त्याचे अनुभव तर हिरावुन घेत नाहीये ना? माझे वडील मराठवाडा सोडुन पुण्यात आले म्हणुन आम्हाला आमच्या मावस-चुलत भावंडांपेक्षा काही गोष्टी जास्त मिळाल्या. आज मी मुलाला भारतातुन अमेरिकेत आणुन अजुन जास्त संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करतेय. इथे मिळणारे अनुभव जास्त व्यापक असतील. समजणार्‍या गोष्टी अनेकविविध असतील. पुण्यातल्या शाळेत त्याच्या आजुबाजुला साधारण त्याच्याच सारखी मुलं होती. "माझ्या ग्रुपमध्ये मोहमद-मसाया-चार्ली आणि मी आहोत" हे वाक्य मला पुण्यात ऐकु येणं जरा अवघडच आहे. पण दुसर्‍या बाजुने असंही वाटतं की तो स्वतःच्या देशापासून , संस्कॄतीपासुन दूर आहे. हळूहळू त्याची ही ओढ मारली जाईल. आजी-आजोबा-काका-मावशी ही नाती जशी आमच्या आयुष्यात होती, त्याच्या असतील का? तिकडे त्याला कितीतरी भावंडं मिळतील.. इकडे फक्त मित्रच.. शिवाय भारतातही आता अमेरिकेच्या तोडीस तोड उपलब्धता आहे. वस्तु तर आपल्याकडे सगळ्या मिळतातच, पण सुविधाही हळूहळू येत आहेत. अमेरिकेतल्या सोयी आणि भारतातली संस्कॄती (मोठे कुटूंब, जवळपास भरपुर माणसे, त्यांचे येणे जाणे) असे दुहेरी फायदे पुण्यात राहुनही मिळु शकतात. मग अनुभवविश्व जरा सीमीत राहील, पण भावनिकदृष्ट्या तुम्ही जास्त सुरक्षित वातावरणात असाल. हा प्रश्न बराचसा वैयक्तिक आहे ह्याची मला कल्पना आहे. पण काही जणांशी बोलताना जाणवतं की आपण बरेचदा आपल्या वयाला असणार्‍या लिमिटेड व्हिजिबीलीटेने निर्णय घेतो. पण त्याहीपेक्षा वेगळे आणि गुंतागुंतीचे मुद्दे आयुष्यात असतात. किंवा काही काही गोष्टींचा आपण बाऊ करतो, ते तेवढं काही वर्षांनी महत्वाचं रहात नाही. त्यामूळे असे निर्णय घेताना जितके वेगवेगळे विचार ऐकु, दृष्टीकोन समजुन घेऊ, तितकं चांगलं. जशी इथे कर्जाबाबतीत बदललेल्या दॄष्टीकोनाची चर्चा झाली, तसंच आपला देश सोडणे, आपली संस्कॄती-पद्धती दुसर्‍या देशात रुजवणे किंवा नव्या पद्धती सामावुन घेणे ह्या बद्दलही मत बदलत चाललेले दिसते. आपल्या देशात राहुन काम करणे ही देशभक्तीची व्याख्यासुद्धा आता जरा शिथिल झालेली दिसते. परदेशात असणार्‍यांनी, जाऊन आलेल्यांनी, अनेक वर्ष राहुन परत आलेल्यांनी, कायमचं रहाण्याचा निर्णय घेतलेल्यांनी, परदेशाची संधी नाकारुन भारताला निवडणार्‍यांनी.. तुमची तुमच्या निर्णयामागची भुमिका सांगितलीत, तर अनेकांना ह्या महत्वाच्या निर्णयात बराच फायदा होऊ शकतो. किंवा किमान निर्णय घेताना कोण कोणत्या मुद्द्यांचा विचार व्हावा ह्याला तरी दिशा मिळु शकते.
वर्गीकरण
परदेश अनुभव

प्रतिक्रिया द्या
118041 वाचन

💬 प्रतिसाद (340)
फ
फेरफटका Mon, 02/20/2017 - 16:57 नवीन
"भारतीय संस्कृती महान, त्यांच्याकडे फक्त पैसा आणि साधन संपत्ती " हा भारतीयांनी करुन घेतलेला गोंडस गैरसमज आहे - अहंकार कुरवळायला बरं पडतं मग !" - बुल्स आय!! हा धागा सुरू झाल्यापासून हेच डोक्यात येत होतं. पु. लं. च्या 'नागपूरकर' सारखं, 'तुम्हाला अस्सल नागपूरी खाक्या दाखवायचा असेल तर तुम्हाला खुद्द नागपूरात राहून चालणार नाही' ह्या धर्तीवर 'सत्य, निर्भयता, प्रामाणिकपणा, कुतूहल' ई. गुणधर्मांनी नटलेली 'भारतीय संस्कृती' जपायची असेल, तर तुम्हाला भारताबाहेर, प्रगत देशात राहून ती अधिक चांगल्या प्रकारे जपता येते. बाकी पुढच्या पिढीचं काय होईल वगैरे गोष्टींना एकच सांगता येईल, की झाडाची फळं झाडापासून फार लांब पडत नाहीत. त्यामुळे आई-वडील, सद्गुणी, सदाचारी असतील, तर मुलं काही वाईट मार्गानं जात नाहीत. बाकी संस्कृती, मुल्यं ही कालानुरूप बदलणार्या गोष्टी आहेत आणी ते बदलणारच. आपल्या स्वतःच्या आयुष्यात कित्येक गोष्टी आपण बदलत असतो, मग त्या पिढीनुरूप बदलल्या तर आश्चर्य ते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/20/2017 - 17:18 नवीन
समाजातल्या प्रत्येक घटकाला - अगदी बाहेरून आलेल्याला पण - एका ठराविक सन्मानाने जगता येईल अशा प्रकारची जीवनशैली ऑफर करण्याची ताकद त्या देशांमध्ये आहे - आपण आपल्या महान संस्कृतीमध्ये आपल्याच लोकांना तो सन्मान जेंव्हा देऊ तेंव्हाच यातुन बाहेर येऊ. +१,००,०००. लाखाची गोष्ट ! "कोणती गोष्ट कोठे किती प्रमाणांत आहे" आणि "हे जग केवळ काळ्या किंवा पांढर्‍या रंगाने बनलेले नसून, एकाच ठिकाणी एकाच जनसमुदायातसुद्धा ते रंग कुटुंब/व्यक्तीपरत्वे (सरसकटीपणा टाळून) कमीजास्त प्रमाणात आस्तित्वात असतात"; ही तथ्ये संस्कृतीच्या गोष्टी आल्या की, सहजपणे विसरल्या जातात आणि "आम्ही विरुद्ध ते" असा सामना सुरू होतो. अगदी "भले उसकी कमीज मेरे कमीज से अधिक सफेद कैसी हो सकती है ।" या तालावर :) गम्मत म्हणजे "अशी (किंवा कोणतिही) तुलना करण्यासाठी दोन्ही बाजूंच्या विश्वासू तथ्यांचा अभ्यास किंवा स्वानुभव" याची किमान गरज आहे हे विसरले जाते... मुद्दा स्प्ष्ट करण्यासाठी जरासे टोकाचे पण त्याच पठडीतले उदाहरण द्यायचे झाले तर... हिंदू/मुस्लीम/ख्रिश्चन धर्मांबद्दल (दुर्)अभिमानाने बोलताना वेद-उपनिषद-पुराणे/कुराण/बायबल यांचे सार समजण्याइतका अभ्यास सोडाच पण वाचनही केलेले नसले तरी हरकत नसते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
न
निशदे Mon, 02/20/2017 - 19:10 नवीन
उत्तम प्रतिसाद आहे. पिरा, तुम्हाला संदेशातून जे सांगितले होते ते जास्त योग्य स्रुजांनी सांगितले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
म
मराठी_माणूस Tue, 02/21/2017 - 06:33 नवीन
त्या देशांनी जे करुन दाखवलंय त्यासाठी प्रचंड प्रमाणात सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती लागते. आपला देश साफ राहिला पाहिजे, इथे इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं पाहिजे हे तिथल्या प्रत्येकाला मनापासून वाटलं आणि आज ४ पिढ्या झाल्या तरी ते लोकं ती मुल्यं मनापासून जपतात.
हे इतके सगळे छान छान असेल तर गोंधळुन जायचे काहीच कारण नाही. तरीही निर्णय घ्यायला एव्हढा का त्रास होतो ते समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
र
रेवती Mon, 02/20/2017 - 16:46 नवीन
आपण त्या ठिकाणी न राहता, तेथील आयुष्य न अनुभवता केवळ कुठल्यातरी स्टडीजवर विसंबून स्वत:च्या लेखनात, प्रतिसादात त्याचे सरसकटीकरण करणं व ज्या मुलांचा व तुमचा काडीमात्र संबंध नाही त्यांच्यावर आरोप करणं यासाठी मला भारतीय पालकांचे सरसकटीकरण करण्याची गरज नाही कारण तसे ते नसतेच. माफी तर तुम्ही मागणे लागू होतेच. पुन्हा असे बोलणे, न बोलणे हा तुमचा हक्क असल्याने तुमच्यावर सोडते. आमच्या मुलांचे तुमच्यावर कसलेही ओझे नसताना व त्यांनी तुमच्यावर कसलेही आरोप न करता तुम्ही बोलावेत हे अजिबात आवडलेले नाही, तो तुमचा अधिकारही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Mon, 02/20/2017 - 16:53 नवीन
वरील स्रुजा यांच्या प्रतिसादाने आणि तुमच्या या प्रतिसादाने अमेरिकेविषयी माझे असलेले प्रचंड गैरसमज दूर झाले. तिथल्या मूल्यांविषयी का कोण जाणे पण जगभर चुकीचे समज आहेत हे मान्य करावं लागेल. कोणा एकाला व्यक्तिगत उद्देशून काहीच नव्हतं. दोन्ही बाजूंनी सरसकटीकरण होणं चुकीचंच. तेव्हा पुन्हा एकदा क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ब
बॅटमॅन Wed, 02/22/2017 - 19:05 नवीन
माफी , अधिकार वगैरे वाचून फारच मनोरंजन झाले. जालीय कमेंटींना किती सीरियस घ्यायचे हे नेटावर इतकी वर्षे काढूनही कळत नसावे किंवा कसे, याबद्दल शंका उत्पन्न होते खरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ट
ट्रेड मार्क Mon, 02/20/2017 - 20:38 नवीन
तुम्ही अमेरिकेत किती राहिलात ते मला माहित नाही, परंतु बाहेरून बहुतांशी लोकांचा, अगदी माझ्यासकट, असाच गैरसमज असतो की अमेरिकेत अगदी फ्री सेक्स चालतो. नुसता मुलीला इशारा करायचा अवकाश की काम फत्ते झालंच समजा. मी पहिल्यांदा अमेरिकेत आल्यावर काही दिवसांनी टीव्हीवर एक मुलाखत ऐकली ज्यात बऱ्याच माता आपल्या ९-१० वर्षांच्या मुली/ मुलांबद्दल काळजीत असलेल्या दाखवलेल्या होत्या. त्यांना त्यांच्या मुलांसाठी एवढ्या लहान वयात STD वर ट्रीटमेंट घ्यायला लागली होती. ते ऐकून माझा असाच समज झाला होता की इथे फारच वाईट परिस्थिती आहे. पण नंतर इतरांच्या व स्वतःच्या अनुभवांती समजलं की अगदी फ्री सेक्स म्हणजे कोणी पण कधी पण कुठेही इच्छा झाली की चालू होतात असं अजिबात नाहीये. पीअर प्रेशर वगैरे प्रकार सगळीकडेच असतात. पण इथे शाळेत वयात येत असलेल्या मुलामुलींना अगदी डिटेलवार सेक्स एजुकेशन देतात. नकळत्या वयात संबंध आल्याने कुठले शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक परिणाम होतात ते समजावलं जातं. मी तर म्हणतो की भारतापेक्षा अमेरिकेत बरी परिस्थिती आहे. कारण - मुलगी कसे कपडे घालते यावर तिचं चारित्र्य ठरवलं जात नाही. - तसेच तोकडे कपडे घातलेत म्हणून, भारतात जसे अगदी १२-१३ वर्षाच्या मुलांपासून ते ७० वर्षाच्या आजोबांपर्यंत सगळे त्या मुलीला वरपासून खालपर्यंत स्कॅन करतात, तसे अमेरिकेत कोणी करत नाही. - मुलाने विचारूनही मुलीने नाही म्हणल्यावर परत तो मुलगा त्रास देत नाही. - जरी अगदी पौगंडावस्थेतल्या मुलाचा / मुलीचा संबंध आलाच तरी इथे लोक त्या मुलीला घाण चारित्र्याची म्हणून जगणे अशक्य करत नाहीत. - अश्या संबंधातून त्या मुलीला जरी गर्भधारणा झालीच तर गर्भ ठेवायचा की नाही हे त्या मुलीच्या इच्छेवर असते. ती मुलगी असे मूल जन्माला घालून नंतर व्यवस्थित वाढवू शकते. कुमारी माता म्हणून समाजात तिला वेगळी वागणूक मिळत नाही. मुळात सेक्सकडे एखादी लपून छपून करायची घाण गोष्ट म्हणून इथे पाहत नाहीत. पण म्हणून सार्वजनिक जागेत सरसकट सगळे चालते असे नाही. भारतातून नवीन आलेल्याला इथे सांस्कृतिक धक्के बसतात नाही असं नाही. पण म्हणून बडगा दिसतो हे खरं नाही. उलट माझ्या अनुभवावरून मला असं वाटतंय की इथे मुलींपेक्षा मुलं शामळू असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
संदीप डांगे Mon, 02/20/2017 - 23:51 नवीन
बाकी, मी तर कधी अमेरिकेत गेलो नाही हे आधीच कबूल करतो. जे काही समजु शकतं ते तुमच्यासारख्या तिथे प्रत्यक्ष जाऊन आयुष्य जगणार्‍या लोकांकडूनच. पण आपल्या ह्या प्रतिसादात विसंगती आढळत आहेत.
१. टीव्हीवर एक मुलाखत ऐकली ज्यात बऱ्याच माता आपल्या ९-१० वर्षांच्या मुली/ मुलांबद्दल काळजीत असलेल्या दाखवलेल्या होत्या. त्यांना त्यांच्या मुलांसाठी एवढ्या लहान वयात STD वर ट्रीटमेंट घ्यायला लागली होती. ते ऐकून माझा असाच समज झाला होता की इथे फारच वाईट परिस्थिती आहे. २. नंतर इतरांच्या व स्वतःच्या अनुभवांती समजलं की अगदी फ्री सेक्स म्हणजे कोणी पण कधी पण कुठेही इच्छा झाली की चालू होतात असं अजिबात नाहीये.
दुसर्‍या विधानातल्या एन्लायटनमेन्टमुळे पहिल्या विधानातले मुलाखतीचे प्रकरण खोटे ठरते काय? ९-१० वर्षांच्या मुला-मुलींना एसटीडीवर ट्रीटमेंट घ्यायला लागणे आणि फ्री-सेक्सची तुमची (स्वरचित) व्याख्या ह्यात तुम्ही जो संबंध लावत आहात तो विषय एक असला तरी कार्यकारणभाव एक नाही. कोणी-पण-कधी-पण-कोठेही- चालू होणे आणि विचारपूर्वक-ठरवून चालू होणे ह्याचा एसटीडीबाधित होण्यावर फरक पडू शकतो का असा मला प्रश्न पडला.
इथे शाळेत वयात येत असलेल्या मुलामुलींना अगदी डिटेलवार सेक्स एजुकेशन देतात. नकळत्या वयात संबंध आल्याने कुठले शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक परिणाम होतात ते समजावलं जातं.
>> असे असूनही टिव्हीवरच्या मुलाखतीत जे दाखवलं जातं तेही होतच आहे ना? की ती मुलाखत एक फिक्शन आहे? मुलाखतीतल्या मुला-मुलींना शिकवलं-समजवलं गेलं नाही? आता तुम्ही सांगितलेली परिस्थिती बघूया. मुलगी कसे कपडे घालते यावर तिचं चारित्र्य ठरवलं जात नाही. >> मग कशावरून ठरते? की ठरतंच नाही? मी जरा गुगलून पाहिलं 'मुलगी कसे कपडे घालते' ह्यावर अमेरिकनांमध्ये काही विचार असतात की नसतात. खालील ब्लॉग, लेख, दुवे हे अमेरिकन लोकांचे आहेत, ते म्हणतायत, डिस्कस करतायत ते खरं समजायचं की खोटं? https://www.bustle.com/articles/83035-7-reasons-to-stop-shaming-women-who-wear-revealing-clothing-your-ideas-of-propriety-aside http://fashion.allwomenstalk.com/this-is-why-its-time-to-stop-judging-women-based-on-their-clothes/2 http://www.popsugar.com/fashion/Judging-Women-Clothes-Campaign-37122437#photo-37122437 आत्ता तीनच दिलेत.. अनेक दुवे आहेत जालावर. इच्छुकांनी लाभ घ्यावा. - तसेच तोकडे कपडे घातलेत म्हणून, भारतात जसे अगदी १२-१३ वर्षाच्या मुलांपासून ते ७० वर्षाच्या आजोबांपर्यंत सगळे त्या मुलीला वरपासून खालपर्यंत स्कॅन करतात, तसे अमेरिकेत कोणी करत नाही. >> भारतात तसे करतात, नाकारणार नाहीच कोणी. कारण तोकडे कपडे घालणे शक्यतो बहुसंख्य घरांमध्ये मान्य नसतं. ही आपली (म्हणजे इथेच राहिलेल्या बहुसंख्य भारतीयांची) विचारसरणी आहे. आता वेगळं काही (तोकडे कपडेच नाही, काहीही घातलं तरी) दिसलं की ते न्याहाळलं जातंच. त्याचे कारण आपल्याला शेकडो वर्षांच्या सामाजिक ठेवणीत झालेले फिजिकल (म्हणजे शारिरीक नाही) बदल हे मानसिक बदलापेक्षा तुफान वेगाने झालेले आहेत. अशी स्कॅनिंग होणे अचानक एका रात्रीत जाणार नाही. तुम्हाला आता ते जाणवतं कारण तुम्ही नवीन वेगळी संस्कृती बघितली आहे. (तरी वरच्या लिण्कांमध्ये तीही फार वेगळी नाही असं दिसतंच आहे) इकडच्यांना आपण काहीतरी चूक करतोय हे जाणवत देखील नाही. स्त्रियांनी प्रचंड संख्येने उंबरा ओलांडून मुक्तपणे फिरणे हे इथल्या पुरुषी वर्चस्वाला अजून पचनी पडलेले नाही, 'उच्छृंखल स्त्रिया अशीच वेषभूषा करतात' अशी विचारसरणी इथे जनमानसात (अगदी स्त्रियांत्+पुरुषांत+शिक्षित इ. सर्वांत) बहुतेक करुन आहेच. हे चित्र बदलत जाणार आहेच. अजून पन्नास-शंभर वर्षाने भारताबद्दल कोणाला वरचे विधान उच्चारायची गरज पडणार नाही अशा पद्धतीने ह्या आणि येणार्‍या पिढ्यांना घडवणे होण्यासारखी गोष्ट आहे. ते इथे राहणार्‍यांनाच करायला लागेल. इथून परदेशात कायमस्वरुपी स्थाईक होणारे तिकडून भरमसाठ पैसे पाठवून कसे करतील ह्याबद्दल जरा शंका आहे. 'इट्स इजी टू ब्लेम' का काय म्हणतात ते आठवलं. - मुलाने विचारूनही मुलीने नाही म्हणल्यावर परत तो मुलगा त्रास देत नाही. >> असं भारतात होत नाही? नक्की? इतरांचं माहित नाही पण मी कॉलेजात ९ वर्षे काढलीत (२+३+४) शेकडो प्रेमप्रकरणे पाहिलीत. शेकडो नकारही बघितलेत, पण मुलीने नाही म्हटल्यावर त्रास देणारा मुलगा मला तरी नाही दिसला. पेप्रातल्या ठराविक बातम्यांवरुन भारतीय जनसामान्यांच्या जीवनाचे सरसकटीकरण करण्याचा अधिकार अमेरिकेची भलामण करणार्‍यांनाही नसावा असे वाटते. - जरी अगदी पौगंडावस्थेतल्या मुलाचा / मुलीचा संबंध आलाच तरी इथे लोक त्या मुलीला घाण चारित्र्याची म्हणून जगणे अशक्य करत नाहीत. >> खर्‍या समाजजीवनाशी नाळ तुटली की असे गैरसमज घट्ट होत जातात असे वाटते. मला माहित असलेल्या असे संबंध आलेल्या (व उघडकीस आलेल्या) अनेक मुला-मुलींचे (काही मित्र-मैत्रिणी-शेजारी) जगणे अशक्य झालेले मला तरी निदर्शनास आले नाही. छान लग्नबिग्न (पण त्याच मुला-मुलीशी नाही) करुन सुखाने संसार करत आहेत सगळे. आई-बाप बरोबर काळजी घेतात. आणि हे अनेकजण वेगवेगळ्या जाती-धर्म-वर्गातले आहेत. वरिल विधान खरेतर इथल्या आईबापांच्या मनातली भीती आहे की "असे होईल, होऊ शकते" म्हणजे असे घडतेच-घडते असे नाही. लोक तेवढ्यापुरती आप-आपसात उपद्रवहीन गॉसिप करतात, जगणे वैगेरे अशक्य करण्याच्या मध्ययुगीन काळात नाही राहत आपण आता. खाप-पंचायत सारखे प्रकार आहेत, नाही असे नाही. पण सरसकटीकरणासाठी त्यांचे उदाहरण पुरेसे नाही. अजून एक बावळट प्रकार बघितला तो म्हणजे कोण्यातरी दूरच्या चुलतबहिणीने प्रेमविवाह केला म्हणून नकार दिला गेला एका मुलीला. तेही कारण बहुतेक शोधून काढलेले असावे आधीच ठरलेला नकार द्यायला. एक म्हण आहे हिंदीत, 'सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग?' तो आपल्याकडे भरपूर आहे. बाकी कोणी काही म्हणत नसतं, काही नसतं. एक प्रश्नः गेल्या वीसतीस वर्षांत जातीय-आंतरजातीय प्रेमविवाहांची संख्या बरीच वाढली आहे, प्रेमविवाह केलेल्यांच्या बहिण/भावांचे लग्न त्यामुळे होऊच शकले नाही असे प्रकरण बघितले आहे काय कुणी? - अश्या संबंधातून त्या मुलीला जरी गर्भधारणा झालीच तर गर्भ ठेवायचा की नाही हे त्या मुलीच्या इच्छेवर असते. ती मुलगी असे मूल जन्माला घालून नंतर व्यवस्थित वाढवू शकते. कुमारी माता म्हणून समाजात तिला वेगळी वागणूक मिळत नाही. >> नक्कीच! अमेरिकेचे ह्याबाबतीत कौतुकच आहे. पण सरकारचे टीन-प्रेग्नंसी कमी करण्यासाठीचे युद्धपातळीवरचे प्रयत्न बघता (सरकारी म्हणजेच अमेरिकननांच्या मतानुसार स्थापित) सरकारला हे प्रकार लवकरात लवकर बंद व्हावेत असे वाटते आहे. भारतीयांसारखे गॉसिप नसतील करत पण ते कुमारी मातांचे मनापासून स्वागत करतात असं म्हणणे घाईचे ठरेल. कुमारी मातांना शैक्षणिक सवलती व इतर सुविधा उत्तम दिल्यात अमेरिकन सरकारने पण त्यास ते समस्याही संबोधत आहेत हे इथे नोंदवावे वाटते. १९९० च्या सुमारास ६० असलेला दर आता २४ च्या आसपास आहे. ह्यात अमेरिकन लोकांनी सेक्सएजुकेशनवर बराच जोर दिल्याने परिणाम झालेला दिसत आहे. मला वाटतं कुमारी मातांचे मनापासून स्वागत करणार्‍या काही आदिवासी जमातीच असतील फक्त जगात. माझ्या ओळखीत वा संपर्कात कुमारी माता प्रकरण आजवर आलेले नाही त्यामुळे भारतातले त्याबाबतचे समाजाचे वर्तन प्रत्यक्ष बघितलेले नाही. कोणी भारतीय सदस्यांनी बघितले असेल (चित्रपटात नव्हे) तर जरुर कळवा.
मुळात सेक्सकडे एखादी लपून छपून करायची घाण गोष्ट म्हणून इथे पाहत नाहीत. पण म्हणून सार्वजनिक जागेत सरसकट सगळे चालते असे नाही. भारतातून नवीन आलेल्याला इथे सांस्कृतिक धक्के बसतात नाही असं नाही. पण म्हणून बडगा दिसतो हे खरं नाही. उलट माझ्या अनुभवावरून मला असं वाटतंय की इथे मुलींपेक्षा मुलं शामळू असतात.
ह्या वाक्यांतून तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे ते कळले नाही. माझ्या मते भारतात आणि अमेरिकेत प्री-मॅरिटल सेक्सुअल अफेअर्स मध्ये 'अन्डिस्क्लोज्ड व डिस्क्लोज्ड' इतकाच काय तो फरक आहे. बाकी 'अंडर द स्किन' जगात सगळी माणसे सारखीच असे वरच कोणीतरी म्हटले आहे. तिकडेही खुलेआम रस्त्यावर सेक्स करत नाहीत, इकडेही नाही. जिथे करायचे तिथे बरोबर करतात. बाकी देश कोणताही असो, मुली शामळू की मुले शामळू ह्याबद्दल वैयक्तिक अनुभव वेगवेगळे असू शकतात. :) ----------------------- स्त्रियांशी संबंधित गुन्हे व प्रेमविवाहामुळे झालेले गुन्हे हा अतिशय वेगळा विषय आहे त्यामुळे तो या चर्चेत आता तरी गैरलागू असेल हे आधीच नोंदवून ठेवतो. ------------------------- आयटीत नोकरी-व्यवसाय करायला अमेरिकेत जाणारे भारतीय 'कुमारीमाता समस्येने गांजलेल्या वर्गातील' असतील असे वाटत नाही. मुलींची लग्ने लवकर उरकून टाका असा भुंगा लावणार्‍यात पुण्या-मुंबैची मध्यमवर्गीय लोकं नसतात, तशीही हे लोक अजिबात इतरांच्या फाटक्यात पाय घालत नाहीत, नाकं खूपसत नाहीत. शक्यतो अर्बन-मेट्रो-कॉस्मोपालिटन मेन्टॅलिटी असलेल्या मध्यमवर्गीय पुणे-मुंबैवासी भारतीयांना गावाखेड्यातले-निम्नवर्गीय-गतिगरिब-अशिक्षित समाजातल्या समस्यांचे चटके प्रकर्षाने असहनीय पातळीवर जाणवावेत व त्यांच्या अमेरिकास्थायिक होण्याच्या निर्णयात हेही सामिल असावे हे जरा आश्चर्यजनक वाटले आहे. -------------------------- सगळं जग फिरुनही आपल्यात 'उरतं ते भारतीयत्व' म्हणजे काय आणि ज्याच्या प्रत्येक बाबतीत समस्या दिसतात ते 'भारतीयत्व' म्हणजे कोणतं असाही एक प्रश्न पडलाय. खैर, धाग्यावरचे वातावरण बरेच तापलंय. काही बोलावं, ते कोणाला रुतावं आणि मग त्याने आपल्याला काहीतरी म्हणावे हा प्रकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माझी वरची कोणतीच वाक्ये कोणी अंगावर घेऊ नका लोकहो. ह्या धाग्यावर अति-वैयक्तिक ते समग्र सामाजिक-राष्ट्रीय ह्या रेंजमध्ये बराच गोंधळ चाललेला आहे. अमेरिकन भारतीय वर्सेस द्राक्षलेस भारतीय असा नेहमीचा चुरशीचा सामना होतोय की काय असे वाटत आहे. देशप्रेम म्हणजे नेमकं काय असतं हा एक नवीनच प्रश्न मला आतापर्यंतच्या चर्चा वाचून पडला आहे. असो. ---------------------- अवांतरः पैसे पाठवण्यावरुन आठवलं, ज्या कायमस्वरुपी-अमेरिकास्थायिक भारतीयांचे आईवडील अमेरिकेत, मुलंही अमेरिकेत, इकडे कोणंच नाही, ते लोक भारतात पैसे पाठवतात काय, पाठवत असतील तर कोणाला, कशाला? बाकीचे जे पैसे पाठवतात वगैरे आहे ते जीवावर खेळून कमाई करतात मग खास बचत करुन, पोटाला चिमटा काढून खास देशाच्या खजिन्यात दान म्हणून पाठवतात काय? जस्ट रॅन्डम क्वेश्चन्स... 'आम्ही भारतास परकिय चलन पाठवतो' चा उपकारकर्पूरादि दर्प बरेचदा जाणवला वेगवेगळ्या ठिकाणी म्हणून..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
स
स्रुजा Tue, 02/21/2017 - 00:54 नवीन
मेरिकन भारतीय वर्सेस द्राक्षलेस भारतीय असा नेहमीचा चुरशीचा सामना होतोय की काय असे वाटत आहे
अहो, असं काही नाही. विषय भरकटत चाललाय हे खरंय. चर्चा करत कशाला बसायच्या यावर उत्तर होतं ते. बाय चॉईस भारतात थांबणारे द्राक्षलेस भारतीय नसतात ! तुम्ही हे जे काही दुवे देताय ना, ते खरे ही असतील नव्हे हे प्रमाण आहेच अमेरिकेत. कुमारी माता ही समस्याच आहे, कुठे ही असा मग तुम्ही. पण टीन प्रेग्नन्सी वेगळी समस्या आहे. त्यात आरोग्य विषयक पण अनेक धोके असतात - आई मुल दोघांना. लग्न न करता सिंगल राहुन मुलं वाढवणार्‍या कॉर्पोरेट बायका पण असतात - तांत्रिक अर्थाने कुमारी माता - पण त्या समस्या नाहीयेत. मुद्दा व्यक्ति च्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर राखण्याचा आहे. दुर्दैवाने , आज ही, आपल्याकडे ते प्रमाण कमी आहे. आधी म्हणलं तसं आपली ती संस्कृती आणि त्यांची ती साधन संपत्ती ही खुप सोयीस्कर विचारधारणा आहे , त्याने अनेक दोषांकडे आपण डोळेझाक करतो. आमचे सुरुवातीपासून चे प्रतिसाद पाहिले तर भारतात परत येण्याची आम्ही कारणं शोधतोय, आणि ते करताना येणार्‍या प्रश्नांचा अंदाज यावा याचा प्रयत्न चालू आहे. मात्र काही बाबतीत नंतर सरसकटीकरण झालं म्हणुन विषय पुढे "रंगला", बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 02/21/2017 - 09:13 नवीन
आमचे सुरुवातीपासून चे प्रतिसाद पाहिले तर भारतात परत येण्याची आम्ही कारणं शोधतोय, आणि ते करताना येणार्‍या प्रश्नांचा अंदाज यावा याचा प्रयत्न चालू आहे. >>> नक्कीच. तुमच्या प्रयत्नांमागच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका नाहीच. त्याविषयी माझे वैयक्तिक मत सांगतो. जिथे जमते-आवडते तिथे राहावं-आपल्या राहण्याच्या निर्णयामागचे तेच कारण-मग प्रश्न कसेही कोणतेही उभे राहिले तरी मार्ग-उपाय काढले जातात, कायमस्वरुपी राहावं असे जेव्हा आपण ठरवतो तेव्हाही अनेक तडजोडी केल्या जातातच. मी परदेशात गेलो नाही पण अकोला ते मुंबै नंतर मुंबै ते नाशिक हा लाइफ-ट्रान्सफॉर्मिन्ग प्रकार माझ्याही आयुष्यात घडला. तीनही ठिकाणी डिस्टीन्क्टीवली डिफरंट लाइफस्टाईल-संधी-शिक्षण-समाज असे फरक आहेत. आता मला मुंबईत राहायचे वैयक्तिक आवडत नाही, ती कारणे वैयक्तिक आहेत त्यामुळे अनेक बाबतीत रिस्क घेऊन व काही प्राथमिकता ठरवून मी मुंबै कायमची सोडली. तेव्हा अनेक बाबतीत तडजोडी केल्या आहेतच. शेवटी 'वैयक्तिक प्राथमिकता' महत्त्वाच्या. ह्या बाबतीत निर्णय घेतांना माझा राज्यपातळीवर अनुभव तर तुमचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अनुभव असला तरी अति-वैयक्तिक प्राथमिकतांमध्ये फार फरक नाही असे वाटत आहे. दुसरं असं की आय डोन्ट गेट अटॅच्ड टू थिंग्स, प्लेसेस, पीपल, सिच्युएशन्स. ना मला अकोल्याबाबत नॉस्टेल्जिया आहे ना मुंबैबद्दल चुटपुट, नाशिक मला आज आवडतं-उद्या अजून चांगलं कुठे आयुष्य मिळत असेल तर निर्विकार भावनेने इथूनही निघून जाईल. हा माझ्या स्वभावाचा भाग असल्याने सोपं जातं, अनेकांना ते शक्यच होत नाही हे बघितलं आहे. --------------- हा एक वेगळा अवांतर विषय आहे. माझा एक नातेवाईक नेव्हीत कुलाबा-मुंबैला आहे, कल्याणला राहतो, रोजच्य प्रवासात दमून जातो, महागाईने पिचला आहे, त्याचा भाऊ एस्टी महामंडळात आहे, पगार खास नाही पण मुंबईच्या महागाईमुळे पुरत नाही. दोघांनाही नाशिकमध्ये बदली करुन आयुष्य आरामात्-सुखात घालवता येईल, इतर छंद जोपासता येतील, हे त्यांनाही १००% पटलेले-आवडलेले आहे, बदल सहज शक्य आहे. पण तो निर्णय घेणे त्यांना जमतच नाही. व त्यासाठी ते अगदी क्षुल्लक, बिनमहत्त्वाची कारणे देत बसतात, काय तर इकडे सगळे नातेवाईक जवळ आहेत, मित्रमंडळी आहेत, अमुक आहे तमुक आहे. जे सर्व रोजच्या दगदगी-महागाईच्या त्रासापुढे किती महत्त्वाचे आहे ते आपण समजू शकतो. पण निर्णय घेण्याची इच्छा नसल्याने ती कारणे त्यांना मोठी वाटत आहेत, असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
ग
गवि Tue, 02/21/2017 - 01:01 नवीन
बाकी, मी तर कधी अमेरिकेत गेलो नाही हे आधीच कबूल करतो.
या धाग्यावर प्रतिकूल मत व्यक्त करण्यासाठी, आय मीन, व्यक्त करण्याचा हक्क असण्यासाठी, खुद्द अमेरिकेत राहून अनुभव घेणं आवश्यक आहे. वाचन, आपले वीसतीस जवळचे मित्रमैत्रिणी यांचे अनुभव शून्यवत् आहेत. या पूर्वअटीमुळे कोणत्याही मताला काहीच अर्थ उरत नाही. जनरल स्टेटमेंट व्यक्तिगत घेतलं जाण्याचा दुर्दैवी प्रकारही दिसतोच आहे. तेव्हा आता अमेरिकेत न गेलेल्यांनी उगीच मतं आणि सल्ले देऊ नयेत ही जाणीव झालेली आहे. ते मात्र भारतात अधेमधे येत असल्याने दोन्ही बाजूंवर पूर्ण भाष्य करु शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पिलीयन रायडर Tue, 02/21/2017 - 01:10 नवीन
मला नाही वाटत असं कुणीही म्हणलंय की अमेरिकेत न गेलेल्यांनी मत देऊच नकात. तुम्ही तुमचे वाचन आणि ऐकीव अनुभव ह्यांच्या बाबतीत एवढे सिन्सिटीव्ह आहात. पण जे पालक इथे राहुन आपल्या मुलांना उत्तम पद्धतीने घडवत आहेत त्यांना तुम्ही "बडगा दिसतो" असे शब्द वापरल्यावर त्यावर कुणी रीअ‍ॅक्ट होऊ नये असं म्हणणं असेल तर अवघडच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ट
ट्रेड मार्क Tue, 02/21/2017 - 21:53 नवीन
आम्ही भारतात राहत नाही म्हणजे अगदी देशद्रोह केल्यासारखं वाटायला लागलंय. भारतीय संस्कृतीला काळिमा वगैरे फासला आणि अश्या अनिवासी भारतीयांची मुलं पार वाया गेली, या मुली सतत बॉयफ्रेंड बदलतात आणि मुलं ड्रग्स घेतात असं या भारतात राहणाऱ्या भारतीयांना का वाटतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ट
ट्रेड मार्क Tue, 02/21/2017 - 20:57 नवीन
त्यामुळे कदाचित प्रतिसादही तुकड्यातुकड्याने असेल. दुसर्या विधानातल्या एन्लायटनमेन्टमुळे पहिल्या विधानातले मुलाखतीचे प्रकरण खोटे ठरते काय? खरं खोटं माहित नाही. पण मला तरी असं कुठे दिसलं नाही. एक मुलाखत आहे म्हणून अमेरिकेतल्या सर्वच मुली अश्या आहेत का? हे म्हणजे निर्भया प्रकरणावरून समस्त भारतीय पुरुष बलात्कारी आहेत असं म्हणणं झालं. माझ्या अगदी घरासमोर एक शाळा आहे. पण शाळेची वेळ संपली की काळं कुत्रं पण दिसत नाही. शाळेत रात्रंदिवस दिवे चालू असतात, पोलिसांची गाडी फेऱ्या मारून जाते त्यामुळे लपून काही करणं शक्य नाही. माझी मुलगी टीन एजर आहे. त्यांना शाळेत ५ मिनिटं पण मोकळा वेळ नसतो आणि घरी प्रोजेक्ट्स व इतर अभ्यास एवढा असतो की गोष्टींना वेळच मिळत नाही. आई वडील दोघेही काम करत असतील तर आफ्टरस्कूल क्लासमध्ये मुलं राहतात पण ते रूम्स Supervised CCTV वर असतात, ज्याचे फीड आईच्या किंवा वडिलांच्या मोबाईलवर दिसते. हे प्रत्येक शाळेत आहे. आता याची तुलना भारतातल्या शाळांबरोबर करा. 'इट्स इजी टू ब्लेम' का काय म्हणतात ते आठवलं. ब्लेम करत नाहीये पण वस्तुस्थिती सांगतोय. मी नेहमी म्हणतो की मनोवृत्तीमध्ये फरक पडणे आवश्यक आहे जो तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पुढील काही दशकात व्हावा अशी अपेक्षा. इथून लोक भरमसाठ पैसे पाठवून मनोवृत्तीमध्ये फरक पडणार नाही हे खरंच.. पण तशी अपेक्षा करणं हे पण चुकीचं आहे. खर्या समाजजीवनाशी नाळ तुटली की असे गैरसमज घट्ट होत जातात असे वाटते. म्हणजे आम्ही भारतीय समाजजीवन बघितलंच नाही काय? छान लग्नबिग्न (पण त्याच मुला-मुलीशी नाही) करुन सुखाने संसार करत आहेत सगळे. गुड फॉर देम. त्या मुलीने आणि मुलाने आपापल्या जोडीदाराला सगळं खरं सांगितलं असेल अशी अशा करतो. 'आम्ही भारतास परकिय चलन पाठवतो' चा उपकारकर्पूरादि दर्प बरेचदा जाणवला वेगवेगळ्या ठिकाणी म्हणून. अशी फारच थोडी उदाहरणं असावीत. ज्यांचे भारतात आता कोणीच नाही ते पैसे पाठवत नसावेत. बादवे, आम्ही पैसे पाठवतो ते दान म्हणून नक्कीच नाही. त्यामुळे कोणाचा असा गैरसमज असेल तर तो मूर्खपणा आहे. सगळं जग फिरुनही आपल्यात 'उरतं ते भारतीयत्व' म्हणजे काय आणि ज्याच्या प्रत्येक बाबतीत समस्या दिसतात ते 'भारतीयत्व' म्हणजे कोणतं असाही एक प्रश्न पडलाय. उदाहरण देऊन पटकन समजेल बहुतेक - आपण अगदी कितीही मोठं आणि सर्व सोयींनीयुक्त घर जरी घेतलं तरी आपलं बालपण जिथे गेलं असतं ते घर आपल्याला जास्त प्रिय असतं. एवढंच काय ते जुनं घर सोडायचा विचारसुद्धा जसा क्लेशदायक असतो आणि जरी आपण नवीन ठिकाणी राहायला गेलो तरी आपले आईवडील मात्र जुनं घर सोडायला तयार नसतात. आपलं गाव सोडून एखाया शहरात एकदा नवीन घरात काही वर्ष राहिल्यावर परत जेव्हा आपण गावात जातो तेव्हा सगळं कसं बदललेलं दिसतं. आपण सहजासहजी जुळवून घेऊ शकत नाही. अमेरिकेतून परत भारतात येतानाचं तेच फीलिंग आहे. साध्यासाध्या गोष्टींत भांबावून जायला होतं. मी बरेच वर्ष भारतात २ व ४ चाकी गाडी चालवली आहे, पण मध्यंतरी भारतात आल्यावर गाडी चालवायची म्हणजे पोटात गोळा आला होता. प्रचंड ट्रॅफिक, वेड्यावाकड्या जाणाऱ्या गाड्या, हॉर्न्स, नियम तोडणारे लोक, त्यात मॅन्युअल गियर हे बघून भांबावून जायला होतं. ह्या प्रॅक्टिकल समस्या आहेत यात उगाच कोणाकडे बोट दाखवायचा, आरोप करायचा, भारतातल्या लोकांना नावं ठेवायचा किंवा बडेजाव दाखवायचा प्रयत्न नाही. पण एवढं असूनही आपण भारतीयच राहतो. घरात देव असतात, जमेल तेव्हा देवळात जातो, घरात फोडणीचे वास दरवळत असतात, मित्रमंडळी जमवून कट्टा करतो, गुढीपाडवा, होळी, शिवजयंती, गणपती, दसरा दिवाळी साजरी केली जाते. त्यानिमित्त त्या त्या सणाचे पक्वान्न केले जातात. एवढंच काय अगदी संक्रांतीचे हळदीकुंकू पण केलं जातं. अमेरिकेतल्या इतक्याच भारतातल्या पण बातम्या वाचल्या/ बघितल्या जातात. मराठी/ हिंदी सिरिअल्स नेमाने बघितल्या जातात. एवढ्या की चला हवा येऊ द्या, चूकभूल द्यावी घ्यावी, माझ्या नवऱ्याची बायको, नकटीचं लग्न या सिरिअल्स माझ्या दोन्ही मुली आवडीने बघतात. ISRO ने केलेल्या कामगिरीचं कौतुक आम्हालाही असतं आणि ते इथल्या लोकांना सांगताना अभिमानही वाटतो. पण याच अनिवासी भारतीयांना मात्र भारतातल्या त्यांच्याच नातेवाईकांकडून व मित्रांकडून बाहेरच्या देशात राहण्यावर चित्रविचित्र कमेंट्स ऐकायला लागतात. भारताच्या बाजूने बोललं तरी प्रॉब्लेम असतो आणि विरुद्ध बोललं तर विचारूच नका. कशी गम्मत असते ना, भारतात राहून मग परदेशात आलेल्या भारतीयांनी भारताबद्दल तुलनात्मक गोष्टी सांगितल्या तर त्या मानल्या जात नाहीत. पण परदेशात कधीही न गेलेल्या भारतीयाने ऐकीव माहितीवर परदेशाबद्दल केलेलं भाष्य म्हणजे एकदम सत्य असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुबोध खरे गुरुवार, 02/23/2017 - 06:38 नवीन
मी बरेच वर्ष भारतात २ व ४ चाकी गाडी चालवली आहे, पण मध्यंतरी भारतात आल्यावर गाडी चालवायची म्हणजे पोटात गोळा आला होता. हि वस्तुस्थिती आहे. मी भारतातच राहत आहे परंतु आता मला चार चाकी चालवावीशी वाटत नाही याचे कारण रस्त्यावरील प्रचंड वाढलेली रहदारी आणि बेशिस्त माणसे आणि वाहनचालक. पुण्यात ११ वर्षे काढली असली तरीही आता पुण्यात चारचाकी चालवणे हे शस्त्र चालवण्यासारखे झालेले आहे असे वाटते. ओला किंवा उबेरमध्ये बसणे हे मी जास्त पसंत करतो. घर ते दवाखाना हे अंतर तर मी मोटारसायकलनेच जातो. मी "एन आर आय" किंवा आर एन आय ( रेसिडेंट नॉन इंडियन-- निवासी अभारतीय) नसल्याने मला कोणी अतिशहाणा किंवा अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला म्हणत नाही एवढेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
स
संदीप डांगे Fri, 02/24/2017 - 20:40 नवीन
टेराबायटीला टेराबायटीन उत्तर दिलंत, आता माझ्या प्रतिसादाला काळजीपूर्वक वाचावं लागेल... लांबीबद्दल क्षमस्व... १.खरं खोटं माहित नाही----तुलना भारतातल्या शाळांबरोबर करा. >> तुम्ही प्रत्येक शाळेत हीच सुरक्षा व्यवस्था आहे असे सांगितलेत... आणि अमेरिकेत प्रत्येक मूल अशाच शाळेत जाते असे गृहित धरतो आहे.. तरी अमेरिकन गवर्नमेण्टची वेबसाईट काय म्हणते... In 2014, a total of 249,078 babies were born to women aged 15–19 years, for a birth rate of 24.2 per 1,000 women in this age group. This is another historic low for U.S. teens and a drop of 9% from 2013. Birth rates fell 11% for women aged 15–17 years and 7% for women aged 18–19 years. Although reasons for the declines are not clear, more teens may be delaying or reducing sexual activity, and more of the teens who are sexually active may be using birth control than in previous years. ह्याचा भारतातल्या शाळांसोबत कसा तुलनात्मक अभ्यास करावा त्याबद्दल सांगा... ---------------------------------------------- २. ब्लेम करत नाहीये पण वस्तुस्थिती सांगतोय. मी नेहमी म्हणतो की मनोवृत्तीमध्ये फरक पडणे आवश्यक आहे जो तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पुढील काही दशकात व्हावा अशी अपेक्षा. इथून लोक भरमसाठ पैसे पाठवून मनोवृत्तीमध्ये फरक पडणार नाही हे खरंच.. पण तशी अपेक्षा करणं हे पण चुकीचं आहे. >> वस्तुस्थिती सांगितली, धन्यवाद! जगावेगळा शोध लावल्याबद्द्ल अभिनंदन. बरं, आता या मनोवृत्तीत फरक पडायला आपण काय करत आहात? तर परदेशात जाऊन बसलात.. आणि तिथून शेळ्या हाकलत आहात, अमूक आवश्यक, तमूक आवश्यक... कायमस्वरुपी देश सोडून जाणार्‍यांकडून कोरड्या उपदेशांची गरज नाही. काही फरक पडावा असे वाटत असेल तर इथे जमिनीवर उतरुन काम करा, मग बोला.. नाही जमत ना? मग आपल्या सर्वगुणसंपन्न देशात सुखी राहायचं, भारतात बघा हे चुकीचं ते चुकीचं करत मानभावीपणा गरजेचा नाही. ------------------------------------------- ३. म्हणजे आम्ही भारतीय समाजजीवन बघितलंच नाही काय? >> असतं तर असे सरसकट ब्लॅंकेट विधानं केली नसती आपण.. ४. गुड फॉर देम. त्या मुलीने आणि मुलाने आपापल्या जोडीदाराला सगळं खरं सांगितलं असेल अशी अशा करतो. >> मुद्दा खोडला की चिडून तिसरा पाय काढायचा त्यातला हा प्रकार... तुमच्या वरच्या विधानात जो दिसतोय तो अस्सल भारतीय खोचक-भोचकपणा आहे, हाम्रिकेत जाऊनही गेला नाही तो. तुमचे विधान जगणे अशक्य करतात असे फारफेच्ड होते... ते खोडले तर तुम्ही असा भोचकपणा करत आहात. म्हणजे भारतात काही चांगले घडत असेल तरी त्यात भोकं शोधायचीच हे तुम्ही ठरवूनच ठेवले आहे. तुमच्या भारताबद्दलच्या दिखावू कळवळ्याचा मुखवटा गळून पडतोय की काय? ----------------------------------------------- ५.पण याच अनिवासी भारतीयांना मात्र भारतातल्या त्यांच्याच नातेवाईकांकडून व मित्रांकडून बाहेरच्या देशात राहण्यावर चित्रविचित्र कमेंट्स ऐकायला लागतात. भारताच्या बाजूने बोललं तरी प्रॉब्लेम असतो आणि विरुद्ध बोललं तर विचारूच नका. >> तुमचा खरा कळीचा मुद्दा हाच आहे... तुमच्या नातेवाईक मित्रांकडून झालेल्या शेरेबाजीमुळे तुम्ही विचलित झाला आहात आणि भारत-बॅशिंग (प्रत्यक्षात त्या शेरेबाजी करणार्‍यांना चितपट करण्याचा प्रयत्न) करत आहात. तुम्ही त्यांच्या शेरेबाजीला उत्तर म्हणून हे तुलनात्मक लिहित बसताय... नका मनाला लावून घेऊ एवढं.. शेरेबाजी करणार्‍यांची लायकी तेवढीच असते. ते अनिवासी भारतीयांवरच काय तर नवीन गाडी घेतलेल्या समोरच्या शेजार्‍यावरही तशीच शेरेबाजी करतत. अशी लोकं जगभरात असतात. तुम्ही त्यांना महत्त्व देऊन, विचलित होऊन त्यांच्यासारखेच बिहेव करायला लागलात... त्यांच्या शेरेबाजीने व्यथित होऊन तुम्हीच तुम्हाला भा.वि.अ. तुलना करुन माझा अमेरिकेचा निर्णय कसा योग्य हे सतत पटवून देत राहण्याचा मानसिकतेत ढललंय.. म्हणजे कुठेतरी ते बरोबर आहेत असंच तुम्हालाही वाटतंय.. पण तुमचे वेस्टेड इन्टरेस्ट कॉन्फ्लिक्ट होत असल्याने हे अंतर्द्वंव्द तुमच्याच मनात सुरु झालंय.. ती जळाऊ लाकडं मस्त मजेत झोपलीत आणि तुम्ही इथे भेटेल त्याला पटवत बसताय काहीबाही... मी खाली भरत जाधव च्या मुलाखतीबद्दल लिहिलंय ते ध्यानात घ्या.. आगावू सल्ला पण मनापासून प्रामाणिकपणे देतोय, 'जस्ट मूव ऑन'. वैयक्तिक प्राथमिकतेसमोर असल्या चिल्लर लोकांना भाव द्यायचा नाही... आपल्यालाच त्रास होतो. फर्स्ट हॅन्ड अनुभव आहे. अनुभवातून जे शिकलोय तेच तुम्हाला सांगतो. ---------------------------------------- ६. कशी गम्मत असते ना, भारतात राहून मग परदेशात आलेल्या भारतीयांनी भारताबद्दल तुलनात्मक गोष्टी सांगितल्या तर त्या मानल्या जात नाहीत. पण परदेशात कधीही न गेलेल्या भारतीयाने ऐकीव माहितीवर परदेशाबद्दल केलेलं भाष्य म्हणजे एकदम सत्य असतं. >> कशी गम्मत असते ना, परदेशात गेलेल्या काही भारतीयांना न गेलेल्या भारतीयांपेक्षा आपण लै शाणे झालो असा उगाचच लै दर्प असतो, त्यामुळे आपल्यापेक्षा कोणी अधिकारवाणीने बोलूच शकत नाही असा काहीसा दंभ असतो. मी मुंबईत आलो, पहिल्या सहा महिने-एक वर्षात जेव्हढी मुंबै मला माहित होती तेवढीही आयुष्य मुंबईत गेलेल्या माझ्या वर्गमित्रांना नव्हती... त्यांची आयुष्य घर ते शाळा-क्लास-स्टेशन-कॉलेज इतकंच मर्यादित होतं, त्यांचे जग तेवढेच-तितक्याच परिघातले, मला हसायला यायचं, लेको अक्खि लैफ मुंबईत राहताय, तुम्हाला एवढं साधं माहित नाही.. असो. कोणी कुठे गेल्याने किंवा घरात बसून असल्याने फार ज्ञान मिळतं किंवा अज्ञानी राहतं असं नसतं, किमान आजच्या जगात तरी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/22/2017 - 14:54 नवीन
प्रतिसाद चांगला लिहिलाय. लगे रहो...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पिलीयन रायडर Sun, 02/19/2017 - 21:32 नवीन
नाही हो काका. उपमर्द वगैरे काय. तुम्ही हक्कानी लिहीलंत हे महत्वाचं. तुमच्या नजरेला ह्यातला फोलपणा जाणवत असेल पण आम्हाला जेन्युइनली प्रश्न पडतात, गोंधळ उडतो. मुलं नीट वाढली पाहिजेत - आपण कमी पडायला नको वगैरेही वाटतं. ती आपल्या हातात नाहीत किंवा आपण फक्त ट्र्स्टी वगैरे जाणवायला अजून काही वर्ष जावी लागतील मला तरी. कडेवर गळ्याभोवती हात टाकून झोपणारं लेकरु जोवर घेऊन फिरतेय तोवर काही तसं वाटणार नाही! शेवटी माणुस अनुभवांमधुन चुकत माकतच शिकत जातो. ज्यांना आयुष्यात नक्की काय हवंय हे अगदी अचूक माहिती असतं, ज्यांचा कधीही गोंधळ वगैरे उडत नाही त्यांचा हेवा वाटतो. ते जमत नाही म्हणून तर सल्ला मागतेय इथे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
प
पिलीयन रायडर Mon, 02/20/2017 - 06:28 नवीन
अवांतरः- आजच एक वेगळीच माहिती मिळाली. मला काही हा नियम माहिती नव्हता. सहज इथे कुणाला उपयोग होईल म्हणुन देऊन ठेवते. जी मुलं अमेरिकेत जन्मली आहेत, त्यांचे आई वडील जर भारतात परत जाऊन मुलांचे अमेरिकन नागरिकत्व सोडुन देऊन भारतीय पासपोर्ट घेणार असतील, तर त्या मुलांना पुढे जाऊन अमेरिकेन व्हिजा मिळत नाही म्हणे. अमेरिकेत येण्यासाठी मुलांना परत भारतीय पासपोर्ट सरेंडर करुन अमेरिकन पासपोर्ट घ्यावा लागतो. असा नियम कशासाठी बनवला आहे ते माहिती नाही. https://www.quora.com/If-my-child-was-born-in-the-US-and-has-an-Indian-passport-would-the-US-embassy-never-give-her-a-US-Visa-on-her-Indian-passport-Would-she-be-required-to-get-a-US-passport-to-travel-to-the-US
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 02/20/2017 - 07:25 नवीन
वरती पिराताईने जे मुद्दे: धूळ, प्रदूषण, स्वच्छ हवा-पाणी वगैरेंविषयी मांडले आहेत-- म्हणजे ज्या कुणासाठी या गोष्टी महत्वाच्या असतील, त्यांनी त्यासाठी परदेशी रहाणे पसंत केले तर काय चूक आहे वगैरे ..... याच्याशी मी अत्यंत सहमत आहे. माझे स्वतःचे बालपण पन्नासच्या दशकात इन्दौरमधे गेले. तेंव्हाचे आणि आजचे इन्दौर यात जमीनास्मानाचा फरक आहे. हीच स्थिती भारतात इतरत्र आहे. मी दिल्लीत गेली चाळीस वर्षे राहिलो पण आता नकोसे वाटते. प्रदूषण, धूळ, भेसळ, लाऊडस्पीकर, महागाई, घरोघरी चाललेले टीव्ही, जो तो मोबाईलमधे मग्न, लोकांची बदलेली मनोवृत्ती, जो पहावे तो नाना व्याधींनी ग्रस्त, अपुरा पगार, कामाच्या भलत्या वेळा.. यातून बिघडलेले कौटुंबिक जीवन, लहान मुलांमधे झपाट्याने वाढणारा लठ्ठपणा आणि चष्मे, नर्सरीपासूनचे अतिशय महागडे शिक्षण .... आपण कुठे चालले आहोत हेच कळेनासे झालेले आहे. माझी दोन्ही मुले परदेशात असल्याने दर वर्षी आम्ही तिकडे जात असतो. तिकडे तब्येत उत्तम रहाते, चित्रकला, सुतारकाम, जंगलात फिरणे, संग्रहालये बघणे, उत्तम लायब्रर्‍यात जाणे, वाचन, लेखन, व्यायाम-आहारासंबंधीचे प्रयोग हे सर्व निवांतपणे करता येते. मुलांना भरपूर मराठी आणि अन्य भारतीय मित्रमंडळी लाभलेली आहे. (कालच बावीस मराठी मुलांची क्रिकेट-मॅच झाली) भारतात मिळत होता त्यापेक्षा कितीतरी पट अधिक पैसा भारतात पाठवून कुटुंबियांना, भारताच्या अर्थव्यवस्थेला सहाय्य करता येते. या सर्वात वाईट काय आहे ?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 02/20/2017 - 08:39 नवीन
व्हय रं? कसं करु मग? बघती बघ कशी. न्हाई रं, दुसरीकडंच बघती ती. आँ. नीट बघ माझ्याकडंच बघती ती. हा लका, तुझ्याकडंच बघती ती. मग.. म्हणत होतो कनाय. काल तर लै वेळ तुझ्या घरावरुन चकरा मारताना दिसली. आँ. तरी मला दिसल्यासारखी वाटलीच लका. आता फिक्सच पण ते नित्यामागं हाय म्हणं नाय रे. ते येडंय. त्याच्यामागं कोन जाणार? पण नित्यापेक्षा तू भारी हायेस लका मग.. म्हणत होतो कनाय. पण स्कॉलर हाय लका ती आपण बी करु की अभ्यास, त्यात काय आसतंय बाप पैसेवालाय लका तिचा काय नसतंय रं तसलं, होतंय सगळं येवस्थित पण ती आन तू दिसताव भारी. मग.. म्हणत होतो कनाय. पण..जर्रा चाबरी हाय लका ती व्हय रं? कसं करु मग? बाप बी डॉन हाय. हानंल कुत्र्यागत व्हय रं? कसं करु मग? भिडायचं आपुन हांगाश्शी. कसं करु मग? ........... ........... ........... मतं बदलत राहतेत, परिस्थिती बदलत राहती, एकूण काय नाय, बरं असतंय असं बोलत राह्यलेलं. ;)
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 02/20/2017 - 15:23 नवीन
=)) मला एक प्रश्न पडलाय. ट्रम्प काका जे काय बोलत आणि करत आहेत ते बघता ज्यांना हामेरिकन नागरिकत्व मिळालेले नाही त्यांचा जाऊ की राहू निर्णय त्यांच्या हातात आहे का ट्रम्प काकाच्या हातात आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सतिश गावडे Mon, 02/20/2017 - 16:44 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पद्माक्षी Tue, 02/21/2017 - 12:01 नवीन
ती तर वेगळीच काळजी आहे. ट्रम्पने खरंच काही घोळ केला तर परत आलेलया लोकांची किती गर्दी होईल इथे, वर आणि रोज किरकिर करत बसणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/22/2017 - 17:40 नवीन
हा अजून एक गैरसमज ! ट्रंप सरसकट सगळ्या परदेशी लोकांना परत पाठवा असे म्हणत नाही... तर बेकायदेशीररित्या अमेरिकेत राहत असलेयांना परत पाठवा असे म्हणतोय... आपण बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवा असे म्हणतो त्यापेक्षा हे फार वेगळे नाही. अश्या लोकांची संख्या १ ते २ कोटीमध्ये आहे आणि इतक्या लोकांवर तातडीने कारवाई करण्याइतके मनुष्यबळ संबंधीत सरकारी विभागांकडे सद्या नाही. त्यामुळे, "बेकायदेशीर पणे अमेरिकेत राहणार्‍यांपैकी ज्यांच्यावरचे गुन्हेगारीचे आरोप सिद्ध झाले आहेत अश्यांवर प्राथमिकतेने कारवाई करा" असे त्याचे म्हणणे आहे. तेव्हा, सिरियातून निर्वासितांचे लोंढे बाहेर पडतात तसे अमेरिकेतून भारतीयांचे लोंढे भारतात येत आहेत/येतील असे मिडियात रंगवले जाणारे अतिशयोक्त चित्र हा विनोदी प्रकार आहे :) भारत आणि भारतियांची मुख्य चिंता, भविष्यातल्या H1B / L1 (नोकरीसंबंधीच्या ) व्हिसांसंबधी आहे : अ) व्हिसांची संख्या कमी होईल का ? आ) व्हिसा मिळणार्‍याला दिल्या जाणार्‍या न्यूनतम वेतनाची सीमा सद्याच्या सालाना $६०,००० वरून वाढून $११०,००० होणार का ? हे झाल्यास भारतिय कंपन्यांना आपले अमेरिकेतले काम करवून घेण्यासाठी भारतातून स्वस्त मानवसंसाधन अमेरिकेत नेले तर त्यांच्या खर्चात वाढ व फायद्यात घट होईल. अमेरिकन मानवसंसाधन वापरून काम केले तर ते महाग असल्याने त्यामुळेही खर्चात वाढ व फायद्यात घट होईल. अमेरिकेत आवश्यक तेवढ्या प्रमाणात, हव्या त्या कौशल्याच्या प्रतीचे मानवसंसाधन उपलब्ध नाही, हे पण अमेरिकन सरकार व उद्योगधंद्यांना पुरेपूर माहित आहे. त्यामुळे यासंबंधीचे कायदे/कायदेसुधारणा सहजासहजी पास होण्याजोगे नाही... कमीत कमी वरच्याइतक्या कडक तरतूदींसह पास होणे फार कठीण आहे. यापैकी काही तरतूदी कमीजास्त प्रमाणात पास झाल्या तरी त्यावर काय उपाय करावे याचा विचार भारतिय व अमेरिकन कंपन्यांत आधीपासूनच सुरू झाले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्माक्षी
स
स्रुजा Wed, 02/22/2017 - 18:03 नवीन
अगदी नेमके ! =)) मेडिया काहीही रंगवो, खोचक प्रश्न आणि विधानं करण्याईतकीच जर आपण माहिती गोळा करणार असू तर मेडियाला दोष देण्यात काही अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मराठी_माणूस गुरुवार, 02/23/2017 - 06:14 नवीन
ह्या बातमीत असे म्हटले आहे की "अंदाजित आकडेवारीनुसार, अमेरिकेत जवळपास ३ लाख भारतीय अनिवासी वास्तव्यास असून, त्यांच्याकडे वैध दस्तावेज नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांच्यावरही ट्रम्प सरकारच्या आदेशामुळे कारवाईची टांगती तलवार असणार आहे." http://www.loksatta.com/desh-videsh-news/donald-trump-immigration-plan-impact-3-lakh-indian-americans-1416176/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/23/2017 - 07:59 नवीन
जे भारतिय (आणि इतर कोणत्याही देशाचे नागरिक) अमेरिकेत बेकायदेशीरपणे (व्हिसा न काढता जाऊन किंवा व्हिसा संपल्यावरही न परतल्यामुळे) तेथे राहत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली तर त्यात अवैध असे काही नाही... तसे करण्याचा त्या (किंवा कोणत्याही) देशाला हक्क आहेच. लेखाप्रमाणे, अश्या प्रकारे बेकायदेशीरपणे राहणारे ३ लाख भारतिय अमेरिकेत आहेत. हा अंदाज कसा काढला ते माहित नाही . चर्चेसाठी तो खरा धरला तरी त्यांच्यात आयटी, फिनान्स, कायदा, इत्यादी उच्च वेतन असलेल्या व्यवसायामध्ये काम करणारे लोक नगण्य असावेत, कारण अमेरिकेत भारतिय वंशांच्या लोकांचे कौतुंबिक उत्पन्न (युरोपियन वंशाचे अमेरिकन धरून) इतर कोणत्याही वंशांच्या लोकांपेक्षा अधिक आहे *. कारण, या व्यवसायांतले न्यूनतम पगार न्यूनतम वेतनाच्यापेक्षा वर आहेत आणि अश्या नोकर्‍या करताना बरेच कायदेशीर सोपस्कार करावे लागत असल्याने त्या बेकायदेशीरपणे करणे (असलेच तर) अपवादात्मक असेल. या प्रकारातल्या मंडळीत, अवैध मार्गांनी अमेरिकेत शिरलेले लोक; किंवा पर्यटक / शिक्षण व्हिसावर जाऊन व्हिसा संपण्यागोदर/संपल्यानंतर बेकायदेशीरपणे तेथे काम करत असणारे लोक असावेत. अश्या अवैध प्रकारे तेथे राहणार्‍या लोकांना, त्यातही वर म्हटल्याप्रमाणे प्राथमिकतेने त्यातल्या गुन्हे सिद्ध झालेल्या लोकांना (ज्या प्रकारात भारतियांचा टक्का कमी असा सर्वसाधारण समज आहे) परत पाठवावे असे त्यांचे म्हणणे आहे, म्हणजे बहुतेक भारतिय लोकांचा नंबर बराच नंतर लागण्याची शक्यता आहे. (घुसखोर बांगलादेशियांना परत पाठवा म्हणताना त्यांच्या बाबतीत असा फरक करावा असे कोणी म्हटल्याचे पाहण्यात नाही.) हे सगळे खरे असले तरीही, मुख्य मुद्दा असा आहे की, अवैध प्रकारे राहणार्‍या लोकांना परत पाठविले तर त्याबाबत तक्रार का असावी ? कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या आकड्याबाबतचा मुद्दा गौण आहे, नाही का ? ====================================== * : अमेरिकेतिल कौटुंबिक उत्पन्न : सरासरी : $५१,९३९ Indian American : $101,591 Taiwanese American : $85,566 Filipino American : $82,389 Australian American : $81,452 Israeli American : $79,736 European American : $77,440 Russian American : $77,349 Greek American : $77,342 Chinese American: $68,672 संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/List_of_ethnic_groups_in_the_United_States_by_household_income
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस गुरुवार, 02/23/2017 - 10:12 नवीन
हे सगळे खरे असले तरीही, मुख्य मुद्दा असा आहे की, अवैध प्रकारे राहणार्‍या लोकांना परत पाठविले तर त्याबाबत तक्रार का असावी ?
तक्रार नाहीच चर्चेच्या विषया संबंधी बातमी असल्याने लिंक दीली एव्हढेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पद्माक्षी Sat, 02/25/2017 - 02:42 नवीन
सगळ्या प्रतिक्रिया एवढ्या सिरियसली घेऊ नका हो. :) १. ट्रम्प करायचे तर बरंच काही करू शकतो. मुळात तो राजकारणी नाही आहे. तो सणकी आहे. त्याला चूक काय बरोबर काय याचा काही फरक पडत नाही. हि आजची बातमी बघा. http://timesofindia.indiatimes.com/world/us/trump-hits-nativist-buttons-in-red-blooded-speech-to-conservatives/articleshow/57338327.cms २. H १ विसा कमी करणे किंवा H १चे किमान वेतन वाढवणे यात तरी चूक काय आहे. भारताने चिनी मालांवरचा आयात कर दुप्पट/तिप्पट करणे (हे फक्त उदाहरण आहे) आणि ट्रम्पने H १ वालयांचा किमान वेतन वाढवणे यात तत्वतः काय फरक आहे ? ३. तिथे मनुष्यबळ नाहीच हे पूर्णपणे खरे नाही. आपण त्या लोकांचे जॉब घेऊन त्यांना बेकार केले हे सत्य आहे. आता तिथले शिक्षण महाग आहे हे जर याचे कारण असेल तर शिक्षण स्वस्त करायला त्याला किती वेळ लागेल. ४. मुळात तिथले शिक्षण एवढे उत्तम असेल तर हा खालचा मुद्दा सारखा सारखा का येतो काळात नाही :) "अमेरिकेत आवश्यक तेवढ्या प्रमाणात, हव्या त्या कौशल्याच्या प्रतीचे मानवसंसाधन उपलब्ध नाही, हे पण अमेरिकन सरकार व उद्योगधंद्यांना पुरेपूर माहित आहे."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
स्रुजा Mon, 02/20/2017 - 18:29 नवीन
मोठा प्रश्न आहे पण थोडा सोपा करुन सांगायचा प्रयत्न करते. कसं असतं ना तिकडे प्रेसिडेंट ला एक ठराविक व्हेटो पॉवर असते - पण ती कशात? कायद्यामध्ये आधीच प्रोव्हिजन असलेल्या गोष्टी कधी अवलंबायच्या यात ! नवीन कायदा बनवायचा असेल तर त्याला ही लायनीपर्मानं च जावं लागतं. मेक्सिकोच्या हद्दीवर भिंत बांधायची प्रोव्हिजन आहेच, इस्लामिक देशातील ( देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक देशातील - इथे इस्लामिक फक्त ताजा संदर्भ आहे) नागरिकांना प्रवेश नाकाराय्ची प्रोव्हिजन पण असतेच - तो त्यासाठी कुठल्याही क्षणी एक्झिक्युटिव ऑर्डर काढू शकतो - पण ज्या क्षणी त्याने ग्रीन कार्ड होल्डर्स ना यात गोवलं - तिथे न्यायव्यवस्था मध्ये पडली. आता या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक ना शत्रु राष्ट्राचे ना धोकादायक. खरं तर नवीन उभारत्या अर्थव्यवस्थेचे, नवीन मैत्रीचे प्रतिनिधी. कायदेशीर तिकडे गेलेले , तेदेखील " तिकडच्या कंपन्यांना गरज पडली" म्हणुन. अशा कायदेशीर कॅटेगरीतील, इथे काम करणार्‍या १० लोकांमध्ये सर्वार्थाने लायक उमेदवार ( व्हिसा असणे, स्किलसेट असणे, तिकडे स्थलांतरीत होण्याजोगी कौटुंबिक परिस्थिती असणे अशा सर्व घटकांवर आधारीत ) जेंव्हा तिकडे जातात तेंव्हा उद्या उठुन "चल सुट" म्हणायची त्यांच्या कायद्यात मुळातच प्रोव्हिजन नाही ! ट्रंप असो नाही तर ब्रह्मदेवाचा बाप. शिवाय कसं असतं की राजकारण हा येऊन जाऊन सोयीचा भाग ! काल पर्यंत एखाद्याने हुं म्हणलं की थयथयाट करणारे आणि सोयीचं असतं तेंव्ह्या त्याच एखाद्याच्या प्रतिसादावर जाऊन त्याच्या तळ्या उचलणारे लोकं तर इथे सुद्धा जाता येता दिसतात. पिंडी ते ब्रम्हांडी ! आंतरराष्ट्रीय राजकारण करणारी पण माणसंच असतात शेवटी. तेंव्हा ऑस्ट्रेलिया सारख्या जुन्या मित्राची देखील पत्रास न बाळगणार्‍या ट्रंपचं डोकं भरतीयांवरुन पण फिरु शकतंच पण ते त्याला सहजासहजी अमलात आणता येत नाही हा मुद्दा आहे ! ते कधी जा म्हणू शकतात? जर कंपनीची गरज संपली तर ! ती गरज संपलेली नसताना, जेंव्हा इकडे किंवा समृद्ध अमेरिका असा चॉईस असतो ना तेंव्हा खरी चर्चा सुरू होते. द्राक्षं आंबट असलेले कशाला चर्चा करत बसतील , नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 02/20/2017 - 19:30 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
ट
ट्रेड मार्क Mon, 02/20/2017 - 20:54 नवीन
भारतीय न्यूज पेपर्स सगळ्या गोष्टी फारच वाढवून सांगतात. त्यामुळे ते वाचून खरी परिस्थिती कळत नाही. शेवटी ट्रम्प सुद्धा एक बिझनेसमन आहे. त्यामुळे पैश्यांची भाषा त्याला बरोब्बर कळते. जर त्याने भारतीयांना त्रास द्यायला सुरुवात केली तर त्याचे अमेरिकेच्या इकोनॉमीवर वाईट परिणाम होतील. मी सध्या राहतो तिथे ५०% तरी भारतीय राहत असतील. त्यामुळे इथे घरांची संख्या वाढली, कार्स चा खप वाढला त्या अनुषंगाने बाकीचे बिझनेस वाढले. जर यातले २५% लोक परत गेले तर काय होईल विचार करा. बरं भारतीय लोक स्किलड आहेत त्यामुळे त्या स्किलचं काम करणारे तेवढे अमेरिकन लोक उपलब्ध तर असायला पाहिजेत. सध्या ट्रम्पला सपोर्ट मिळतोय तो मुख्यतः सेंट्रल अमेरिकेतल्या राज्यांमधून आहे. जिथे ब्लू कॉलर जॉब करणारे लोक बरेच आहेत. या श्रेणीमध्ये अमेरिकनांना मेक्सिकन लोकांची खूपच स्पर्धा आहे. कारण मेक्सिकन लोक कमी पैश्यात भरपूर काम करून देतात. वर अमेरिकनांसारखे चोचले नसतात. पण बौद्धिक क्षेत्रात मात्र भारतीयांना रिप्लेस करणं बरंच अवघड काम आहे. ट्रम्पने अगदी सुरुवात केली तरी एकतर कंपन्या करू देणार नाहीत आणि अगदी ट्रम्पने केलंच तरी ते सध्या व्हायला बराच वेळ लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा
श
शब्दबम्बाळ Tue, 02/21/2017 - 14:35 नवीन
"भारतीय न्यूज पेपर्स सगळ्या गोष्टी फारच वाढवून सांगतात" का कोणास ठाऊक पण तुमचे भारताबद्दलचे सगळे विचार जनरलाईस वाटतात. वेस्टर्न मीडिया वार्तांकन कसे करतो बाकीच्या देशांबद्दल हे आपणाला माहित असेलच अशी अपेक्षा आहे. मीडिया इन जनरल असाच आहे सगळीकडचा! पण तुम्हाला इकडचेच सगळे वाईट दिसतेय असे वाटतंय. "अमेरिकेत वाईट मुले बाकीच्या मुलांना त्रास देत नाहीत किंवा मग त्यांपासून लांब राहता येत. शाळेत हत्यार आणायचे किंवा गोळीबाराचे प्रकार ही टोकाची उदाहरणे आहेत. (भारतातली सगळीच उदाहरणे मात्र देशपातळीवर "सत्य" असतात का?) तिकडची मुलं नकार ग्रेसफुली वगैरे स्वीकारतात, अर्थात काही अपवाद असतात! (पण भारतात मात्र अपवाद नसतातच, नाही का? इकडची सगळी इथून तिथून ऍसिड हल्ले करणारी जमात आहे!)" अजून ढीगभर काहींच्या काही विधान वाटली. ज्याला जिथे राहायचं त्याने तिथे राहावे स्वतःच्या सोयीनुसार. पण, मी बरोबर निर्णय घेतलाय हे पटवून द्यायला दुसऱ्या ठिकाणच्या सगळ्याच गोष्टी कशा खराब आहेत हे सांगायची गरज का पडावी? खासकरून तिथूनच शिकून सवरून बाहेर पडल्यावर? उद्या अमेरिकेतले गुन्हेगार पण इतके काही वाईट नसतात ते फक्त गरजेपुरतंच चोरतात/मारतात आणि त्यांपासून लांब राहता येत असेही ऐकू येऊ शकत वाटतंय! वरती कुणीतरी लिहिलंय की "अमेरिकेतून काम करून आलेल्या लोकांच्या स्किलला सूट होण्यासारखं काम वगैरे मिळू शकत का?" खरं तर IT मध्ये भारतातून अमेरिकेत पाठवल्या जाणाऱ्या लोकांकडे असे काहीही महान स्पेशल स्किल नसते! कटू असले तरी सत्य आहे. काही काही वेळा तर टीममधला कोणी सोम्या गोम्या पण जातो. जसे IT मधले इतर भारतीय लोक असतात तसेच हे Onsite अमेरिकेला गेलेले लोक असतात. काही फरक नाही. जर IT मधल्या इतर भारतीय लोकांच्या पातळीचे काम कोण्या शहरात असले तर त्या शहरात "हे" लोक देखील काम करू शकतात. (जबरदस्ती अर्थातच नाही! "इच्छा" असली तरच) तुम्ही कुठेही राहा पण उगाच त्यासाठी लुटुपुटुची करणे नकोत. मला इथे राहणे आवडते आणि मी इथे राहणारच! असे तुम्ही म्हणू शकताच... अर्थात जोपर्यंत तिकडच्या सरकारला त्यावर आक्षेप नाही तोपर्यंत नाहीतर अडचणीच्या काळात आहेच "मेरा भारत महान!" कोणाला दुखावण्याचा हेतू नाही पण एकंदरीत बरेच प्रतिसाद भारत कसा वाईट यावर येऊ लागले म्हणून हे लिहिलं आहे. असेही मिपावर पुण्या-मुंबईच्या बाहेरचे लोक किती आहेत हा प्रश्न आहे त्यामुळे त्या अनुभववावरून एकंदर भारतावर टिप्पणी करणे थोडं कठीण वाटत. गम्मत म्हणजे आत्ता इथेच कोणी "फक्त पुण्यावर" टीका करा, मग अचानक तिथल्या चांगल्या गोष्टींची लिस्ट मिळेल सध्या पुण्याबाहेर अथवा भारताबाहेर असलेल्या लोकांकडून पण! :) बाकी अमेरिकेत पब्लिक ट्रान्सपोर्ट कसे आहे म्हणायचे? पुण्यासारखे कि त्यापेक्षा उत्तम?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
प
पुष्करिणी Tue, 02/21/2017 - 14:39 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
आ
आजानुकर्ण Tue, 02/21/2017 - 14:58 नवीन
जब्रा प्रतिसाद.
उद्या अमेरिकेतले गुन्हेगार पण इतके काही वाईट नसतात ते फक्त गरजेपुरतंच चोरतात/मारतात आणि त्यांपासून लांब राहता येत असेही ऐकू येऊ शकत वाटतंय!
हे बाकी आवडलं. ;) अरे राहायचं तर राहा ना भाऊ पण इतकी कारणं कशाला देता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/21/2017 - 15:02 नवीन
द्या अमेरिकेतले गुन्हेगार पण इतके काही वाईट नसतात ते फक्त गरजेपुरतंच चोरतात/मारतात आणि त्यांपासून लांब राहता येत असेही ऐकू येऊ शकत वाटतंय!
डोळे भरुन आले. =))
अरे राहायचं तर राहा ना भाऊ पण इतकी कारणं कशाला देता!
प्रचंड सहमत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
प
पिलीयन रायडर Tue, 02/21/2017 - 15:14 नवीन
"अमेरिकेतून काम करून आलेल्या लोकांच्या स्किलला सूट होण्यासारखं काम वगैरे मिळू शकत का?"
तर ते वाक्य मीच लिहीलं आहे आणि तुम्ही मस्तपैकी विपर्यास करुन वापरलंय. त्यातही पुन्हा जे माझे म्हणणेच नाही त्यावर शालजोडीतलेही मारलेत मला! मस्तच! तर दादा, डांगेअण्णांचा मुद्दा होता की शांत जीवन आणि स्वच्छ वातावरण शहरात नाही पण गावाकडे मिळू शकतं. पुण्या मुंबईतच राहिलं पाहिजे असं काही नाही. त्याला उत्तर देताना मी म्हणलंय की अमेरिकेत काम करणारी बहुतांश मंडळी आयटी मध्ये आहेत. ह्या स्किलसेटच्या लोकांनी गावाकडे काय करायचं? त्यांच्या नोकर्‍याच शहरांमध्ये आहेत. आता मी काय म्हणलंय... तुम्ही काय वाचलंय.... तुम्हीच विचार करा! इथे किंवा आक्ख्या मिपावर कुठेही मी कधीही "अमेरिकेतच काम करणारे लोक भारीच!" असं लिहीलं असेल तर सांगा. आम्ही जे विचार बाळगतच नाही त्यावर आमची विधाने कोट करुन उगाच सुनावण्याचे कारण कळाले नाही. असू बाबा आम्ही सोम्यागोम्या. पण आम्हाला ते मान्यच आहे ना. "स्वतःला लई शहाणं समजायचं नाही!" वाला सुर तुम्ही का लावताय? बाकी विपर्यास तर सगळीकडूनच होतोय.. तेव्हा चालु द्या!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
श
शब्दबम्बाळ Tue, 02/21/2017 - 18:43 नवीन
मला वाटलं होत ट्रेड मार्क भाऊ चिडतील म्हणून दोन दा लिहिलं कि दुखावण्याचा हेतू नाही. तुम्हाला राग आला याच आश्चर्य वाटलं! आता आपण पाहूया हा विपर्यास वगैरे. पार्श्वभूमी: २-३ दिवसांनी आज धागा उघडला. बरेच प्रतिसाद आले होते आणि काहींचा टोन वर म्हटल्याप्रमाणे होता. अर्थात, वाचत वाचत पान २ वर आलो, इथे हा प्रतिसाद होता म्हटलं जे काही लिहायचं ते याच्याच खाली लिहावं आता. प्रत्येकाच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद देण्यापेक्षा! मागच्या पानावर कुठला प्रतिसाद कोणी दिला हे सगळे लक्षात राहणे थोडे अवघड आहे नाही का? ट्रेड मार्क भाऊंच्या प्रतिसादातले काही मुद्दे घेऊन आणि तुमच्या प्रतिसादातले देखील काही मुद्दे घेऊन लिहिला गेला. कोणी लिहिला आहे हे आठवून लिहिणं महत्वाचं वाटलं नाही फार, म्हणून "कोणीतरी" असे लिहिले. इथेच चुकलो बहुतेक! :P जसे मी ट्रेड मार्क भाऊंच्या मुद्द्यांवर सरळ सरळ मत प्रदर्शन केलं आहे तसाच तुमच्या मुद्द्यांवर देखील करू शकलो असतोच! खास करून तुमचे नाव न घेता "तुम्हाला" शाल जोडीतले मारण्याची काही गरज नाही वाटत मला तरी! तुम्ही ते ओढवून घेताय असे वाटतंय. कसे ते पाहूया... डांगेंच वाक्य: "वरील मुद्दे मला मुंबई च्या वास्तव्यात जाणवले तेव्हा मी नाशिकला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. सॉफ्टवेर इंडस्त्रीतल्या लोकांसाठी इथेही संधी आहेत," (नाशिक हे शहर आहे हे तुम्हाला देखील मान्य आहे. डांगे नाशिक मधल्या IT नोकऱ्या विषयी बोलले) माझे वाक्य: "जर IT मधल्या इतर भारतीय लोकांच्या पातळीचे काम कोण्या शहरात असले तर त्या शहरात "हे" लोक देखील काम करू शकतात." "शहर" हे मी प्रतिसादामध्ये नमूद केले आहे कारण रेफेरंस नाशिक चा होता. विपर्यास कोणी केला? आता मुद्दा दुसरा: तुमचे वाक्य : "इथे किंवा आक्ख्या मिपावर कुठेही मी कधीही "अमेरिकेतच काम करणारे लोक भारीच!" असं लिहीलं असेल तर सांगा" --इथे किंवा आक्ख्या मिपावर कुठेही मी कधीही "अमेरिकेत काम करणारे लोक निकृष्टच!" असं लिहीलं असेल तर सांगा तुमचे वाक्य : "आम्ही जे विचार बाळगतच नाही त्यावर आमची विधाने कोट करुन उगाच सुनावण्याचे कारण कळाले नाही. असू बाबा आम्ही सोम्यागोम्या. पण आम्हाला ते मान्यच आहे ना. "स्वतःला लई शहाणं समजायचं नाही!" वाला सुर तुम्ही का लावताय?" --इथे आम्ही म्हणजे कोण कळले नाही पण तरीही तुम्हाला असे का वाटले कळले नाही. मी लिहिले होते "काही काही वेळा तर टीममधला कोणी सोम्या गोम्या पण जातो. जसे IT मधले इतर भारतीय लोक असतात तसेच हे Onsite अमेरिकेला गेलेले लोक असतात. काही फरक नाही." पुन्हा एकदा लिहितो "काही फरक नाही!" या वाक्याचा अर्थ असा होतो कि भारतात IT मध्ये काम करणारे लोक आणि तसेच काम अमेरिकेत जाऊन करणारे लोक यामध्ये काही फरक नाही. मी केवळ अपवाद म्हणून लिहिलेल्या एका वाक्याला तुम्ही स्वतःवर अक्षरशः ओढून घेतलेत! कारण तुम्हालाच ठाऊक! बाकी IT मधून अमेरिकेला गेलेल्या लोकांनी स्वतःला इतर भारतीयांपेक्षा "लै शहाणं समजू नये" हे मात्र खरंच! :) पण तरीही अमेरिकेत काम करणाऱ्या "काही" भारतीय लोकांवर टीका झाली कि राग का यावा? जसा भारतावर टीका करण्याचा हक्क आहे तसाच हा देखील असायला हवा ना? असो, मी न दिलेल्या शालजोडी बद्दल म्हणून इतका मोठा प्रतिसाद द्यावा लागला! नाहीतर बाण अचूक लागला म्हणून खुश झालो नसतो का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Tue, 02/21/2017 - 19:11 नवीन
प्रश्न असाय दादा:- माझं मुळ वाक्य हे कोणत्या संदर्भात आहे? तुम्ही कोणत्या संदर्भात वापरताय? तुम्ही मला टारगेट करताय.. नाही करताय.. मला फरक पडत नाही. मला माझं वाक्य चुकीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरल्याचा राग आहे. तुम्हाला ते मी लिहीलंय हे लक्षात नव्हतं हे मला का माहिती असेल ना?! बाकी तुम्ही "काही" भारतीयांवर टिका करा किंवा सगळ्याच.. तुम्हाला अमेरिकेत जाणारे लोक हुषार वाटोत वा मुर्ख.. मला काय करायचंय? पण तुम्ही हा मुद्दा आणलाच ह्या जोरावर की मी म्हणतेय "अमेरिकेतल्या लोकांनी काय करावं भारतात येऊन?" असं ह्या संपुर्ण धाग्यात कुणी म्हणलंच नाहीये! लक्षात येतंय का? तुम्ही जे काही मत व्यक्त केलंय... ते ज्या वाक्यावरुन केलंय... ते वाक्य तसं नाहीचे.. तुम्ही माझं वाक्य, तुमच्या सोयीने उचलताय आणि वर मला विचारताय की मी का ओढवुन घेतेय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
व
वीणा३ Mon, 02/20/2017 - 19:26 नवीन
संस्कार : मुलं / मुली बिघडणं - मी माझ्या आयुष्याची तिशी भारतात पार केलेली आहे. नातेवाईक पुणे - नागपूर - कोल्हापूर - नाशिक - कोकण इथे आहेत. सगळ्यांकडून वाया गेलेल्या शेजार पाजारच्या मुलांची भरपूर उदाहरणं ऐकलेली आहेत. माझ्याच नात्यात एकाच घरातला मोठा मुलगा वकील होऊन चांगली प्रॅक्टिस करतोय आणि छोटा मुलगा दारू पिऊन वाया गेलाय. नात्यात २ मुली वेगळ्या जातीच्या मुलांबरोबर पळून गेल्या आहेत त्यांचे संसार सुखात चालू आहेत. कमीत कमी १० ओळखीच्या मुलीची लग्नाअगोदर अफेयर्स होती, आणि आता संसार सुखात चालू आहेत. त्यातल्या २ जणींचा ऍबॉर्शन झालं होत. त्यांचेही संसार सुखात चालू आहेत. हे सगळं सांगायचं कारण अस कि तुमचं मुलं भारतात राहून पण बिघडू शकतात, आणि कधी कधी तुम्ही कितीही जागरूक उत्तम पालक असाल तरी नशीब - संगत नावाचा प्रकार असतो. स्वतःच्या ओळखीत आठवून बघा, एकाच घरातली दोन मुलं अतिशय वेगळी असलेलं उदाहरण नक्की आठवेल. कुठलेही नॉर्मल पालक (मुलाचे / मुलीचे - अमेरिकेतले / भारतातले ) आपल्या मुलांना अडनिड्या वयात सेक्स करू नका असाच सांगतात. फक्त अमेरिकेत त्यांचं वयात येणं समजून घ्यायचा, बोलायचा प्रयत्न करतात. ती पण विचार करू शकतात, त्यांच्या आवडी निवडी असतात हे मान्य करतात. भारतात बरेच पालक खाणं -पिणं, कपडे यांचे भरपूर लाड करतात, स्वतःचे हाल करून मुलांना चांगलं द्यायचा प्रयत्न करतात, फक्त त्यांचे स्वतंत्र विचार, व्यक्तिमत्व मान्य करायची बऱ्याच जणांची तयारी नसते. अगदी कमावणाऱ्या - लग्न झालेल्या मुला -मुलींबाबत पण "तुला काहीही कळत नाही" हे वाक्य बऱ्याच घरामध्ये ऐकू येत. शिक्षण - स्पर्धा => मुलाला स्पर्धेत ढकलायचा कि निवांत राहू द्यायचा हे भरपूर प्रमाणात पालकांवर अवलंबून असता. अमेरिकेत सुद्द्धा मुलाला १०० वेग-वेगळे क्लास लावणारे बरेच भारतीय माहित आहेत. काही मुलं पण माहित आहेत ज्यांना ह्या क्लास ना जायला आवडता. (गमतीची गोष्ट म्हणजे या प्रकारच्या (मुलांना सतत तणावात ठेवणे - मागे लागणे) विरोधात असलेल्या पालकांना सुद्द्धा दंगल अतिशय आवडला. :प ) अमेरिकेत - भारतात राहण्याबद्दल - खरं सांगू, आपल्याला ग्लोबल व्हिलेज मध्ये राहायला लागणार आहे याची मनाशी तयारी करून घ्या. आजोबांची पिढी, ज्या घरात जन्मली त्याच घरात निवर्तली, बाबांची पिढी ज्या शहरात जन्मली त्यातच आयुष्यभर राहिली. आपल्याला ते मिळणं शक्य नाही. आयटी मध्ये तर नाहीच नाही, भारतात सुद्धा शहर बदलत राहणार. जिथे चांगलं काम तिथे आपल घर (विंचवाचे घर) हे मनाशी ठरवलं तर त्रास होणार नाही. पण त्या बदल्यात "हे विश्वाची माझे घर" हि संकल्पना अनुभवायला मिळेल, वेग-वेगळे प्रदेश, माणसं, पद्धती बघायला मिळतील. कुठेही गेलं, कुठलाही रंग, देश असला तरी माणूस सारखाच असतो हे नीट समजेल. काही लोकांना सतत आपल्याकडे काय नाही त्याबद्दल दुखी आवडतं. भारतात सुद्धा पुणे-मुंबई मध्ये राहणारी लोकं गावासाठी हळहळतात, बंगलोर -चेन्नई मध्ये राहणारी लोक महाराष्ट्र साठी हळहळतात, बाहेर राहून भारतासाठी हळहळतात :P. देश - देशाबद्दल अभिमान म्हणजे तुमच्यासाठी नक्की काय याचा विचार करा. निम्म्याहून जास्त लोक फेसबुकवर पोस्ट टाकण्याव्यतिरिक्त देशासाठी फारसं काही करत नाहीत. ज्यांना देशाबद्दल काही करावंसं वाटत ते कुठूनही करतात, करायचा प्रयत्न करतात. बाकीचे देशाला मेडल मिळालं कि खुश होतात, क्रिकेट मध्ये हरले कि दुख्खी होतात, सर्जिकल स्ट्राईक केली कि खुश होतात, चालू राहतं. तुम्ही भारतबाहेर राहून भारतातल्या लोकांसाठी काम केलंत, किमान इथलं राजकारण - कला -चित्रपट - समाज - चांगल्या वाईट (हो वाईट सुद्धा ) गोष्टी मुलांसमोर बोलत राहिलात तर त्यांना नक्कीच या देशाबद्दल आपुलकी वाटेल. तो मोठा झाल्यावर भारताविरुद्ध काम करेल का हा फार - फार लांबचा विचार वाटतो, जर तुम्ही "त्याला त्याचे विचार, व्यक्तिमत्व, आवडीनिवडी" आहेत हे मान्य केलात तर बरेच निर्णय सोपे जातील, रादर ते तुमचे निर्णय नाहीत, त्याचे आहेत हे नीट कळेल. सध्यातरी ट्रम्प साहेबाच्या कृपादृष्टीमुळे पुढची ४ वर्ष तरी रोजचा विचार करा :P. आणि हो, वेग-वेगळे इंडियन पदार्थ करायला शिका, माझा मुलगा इतर गोष्टी बरोबरच फूड-ट्रिप च्या आकर्षणामुळे भारतात यायला उत्सुक असतो. स्वयंपाक करायची कटकट वाटते, पण आपली आणि मुलाची जेवणाची आवड सारखी झाली तर खरंच करायाला खूप मजा येते. बऱ्याच लोकांना भारताची अतिशय - प्रकर्षाने आठवण येण्यामागे "तिथले आठवणीतले वेग-वेगळे अन्नपदार्थ" हा फार मोठा भाग असतो.
  • Log in or register to post comments
र
रुपी Tue, 02/21/2017 - 01:50 नवीन
'काय ठरलं मग?' विचारायची वेळ आली का? ;) ऑन अ सिरियस नोट, चित्रगुप्त काकांचा हा प्रतिसाद फारच आवडला. शेवटी भारतात असो, अमेरिकेत की जगाच्या पाठीवर आणखी कुठे राहायचे असो, तो निर्णय तेव्हाच्या परिस्थितीनुसार आणि प्राधान्यानुसार घेतलेला बरा. एखाद्याचा प्राधान्यक्रम आपल्याला कळेलच असे नाही. पण जिथे राहायचे ठरवले आहे, तिथे मात्र समाधानात राहता आले पाहिजे बुवा. नाहीतर अमेरिकेत राहायचा निर्णय घेतला आणि दर उन्हाळ्यात 'आम्हांला हापूस आंबा खायला मिळत नाही' म्हणून गळे काढून काय उपयोग? तिथे जी इतर पन्नास फळे मिळत आहेत, त्याचा आनंद घ्यावा.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 02/21/2017 - 05:37 नवीन
+100, सहमत. मी सुरुवातीपासून म्हणतोय तो मुद्दा हाच कि कुठे राहायचं हे वैयक्तिक चॉईस आहे, तो स्वतःच्या प्रयोरोटीनुसार असतो. उगाच गिल्ट लपवण्यासाठी अमेरिका किती ग्रेट आणि भारत किती मागास अशी मांडणी करायची अजिबात गरज नसते. तरी लोक परत तीच कारणे देत असतात. जिथे राहायचं तिथे बिंदास राहावे, नाही जमले उठून चालू पडावे... जस्टीफिकेशन शोधण्यास जाऊ नये आपल्यालाच त्रास होतो. दोन दिसाची वस्ती, कोठे तरी करावी.... जय जय रघुवीर समर्थ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुपी
स
स्रुजा Tue, 02/21/2017 - 15:05 नवीन
अशी कुणी ही मांडणी करत नाहीये. पण काय झालंय की अचानक डीफेन्स सुरु झालाय. गळे काढणं काय आणि काय काय. आता येता जाता आपण शाळेत हस्तलिखितावर काम करत होतो हा जर नॉस्टेल्जिया असेल तर हापुस चे आंबे गळे काढणे कसा काय असू शकतो. एक एक फेज संपते , दुसरी फेज सुरु होते पण जुन्या रम्य आठवणी असतातच. शिवाय वैयक्तिक प्राधान्य हा मुद्दा सुरुवातीपासून सतत येतोय. मुळात धागा निघाला मुलांच्या शिक्षणावरुन. तो भरकटत अमेरिकेपेक्षा भारत वाईट कसा यावर पोहोचल्याचं काही लोकांचं धन्य मत झालंय. जस्टिफिकेशन देण्याचा काही प्रश्नच नसतो. प्रश्न आहे तो सांगोपांग चर्चेचा. आणि गिल्ट कसलं? कुणी भारतात राहत असेल कुणी परदेशी? कुठे राहतोय याचा कसला आलाय गिल्ट? खाली कुणी तरी म्हणतंय की आय टी वाल्याना आपापल्या स्किल चं काम मिळेल का? हा प्रश्न कधीच नव्हता. वर्किंग स्टाईल आपल्याकडची व्यावसायिक नाहीये, पटो नाही तर न पटो. मी भारतात ६ वर्षं काम केलंय, प्रमोशन घेतलंय आणि आता इथे ४ वर्स्।अं काम करते आहे. आपल्याकडे एकुणच बाँड्री इशुज सगळ्यांना असतात, आपण ही त्याचाच एक हिस्स असतो पण बाहेर गेल्यावर काही सवयी बदलतात आणि मग परत आल्यावर जुळेल का हा प्रश्न पडतो. आजानुकर्ण आणि ट्रेड मार्क ने याचं उत्तर वर दिलेलं आहे पण आता चावून चोथा व्हायच्या मार्गावर आलेलं आहे सगळं त्यामुळे आता इथुन पुढे निकोप चर्चा काही शक्य नाही. खाली खरे काकांनी खुप ऑब्जेक्टीव उत्तर दिलेलं आहे, अशा काही प्रतिसादांमुळे ९०% चर्चा अतिशय निरोगी पद्धतीने झाली .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/21/2017 - 15:07 नवीन
जिथे राहायचं तिथे बिंदास राहावे, नाही जमले उठून चालू पडावे... जस्टीफिकेशन शोधण्यास जाऊ नये आपल्यालाच त्रास होतो. दोन दिसाची वस्ती, कोठे तरी करावी....
अगदी मन की बाते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ध
धर्मराजमुटके Tue, 02/21/2017 - 07:32 नवीन
शिक्षणाच्या दर्जावरुन मी थोडासा संभ्रमात आहे ! अमेरीकेतील शिक्षण इथल्यापेक्षा चांगले आहे तर भारतातून शिकून गेलेल्यांना इतक्या प्रचंड प्रमाणात तिकडे नोकर्‍या कशाकाय मिळतात ? त्या अगदी निम्न दर्जाच्या असतात म्हणावे तर अनेक भारतीय मोठमोठया कंपन्यांमधे मोठया पदावर दिसतात. अमेरीकेतले शिक्षण चांगले असेलच, पण मग तिकडे राहिले, तिकडे शिकले तर मग अमुक पगाराचीच नोकरी मिळाली तर करायची असा काही स्टँड असतो काय ? १. अमेरीकेच्या नागरिकांना प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात नोकर्‍या उपलब्ध आहेत ? २. जर स्वस्तात मनुष्यबळ हवे असेल तरी अमेरीकेत शिकलेल्यापेक्षा इतर देशातील मनुष्यबळाला प्राधान्य दिले जाईल काय ? ३. जर ट्रम्प ने स्थानिकांनाच रोजगार द्यायचे धोरण अवलंबले आणी पुढील राष्ट्राध्यक्षाने तेच धोरण कायम ठेवले तर आपण इथे ज्या स्पर्धेला घाबरतो तीच स्पर्धा उद्या तेथे निर्माण होईल काय ?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 02/21/2017 - 07:52 नवीन
धर्मराजा, प्रतिसाद आणि शंका आवडल्या. ह्याच शंका मला पण आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
अ
अनुप ढेरे Tue, 02/21/2017 - 09:40 नवीन
तिथल्या शिकलेल्या लोकांना नोकर्‍या न मिळणं ही समस्य नसून पगार कमी मिळणं ही आहे असं ऐकलं आहे काही जवळच्या व्यक्तिंकडून. भारतीय (किंवा इतर पाहुणे) हे कमी पगारात काम करायला तयार होतात आणि त्यामुळे तेच काम नेटिव्हाला करायचं असेल तर कमी पगार घ्यावा लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
स
सुबोध खरे Tue, 02/21/2017 - 14:41 नवीन
शिक्षणाच्या दर्जावरुन मी थोडासा संभ्रमात आहे मुटके साहेब मला हि असाच संभ्रम होता जेंव्हा माझ्या मुलाच्या अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळेस.तेंव्हा मी माझ्या मित्राला जो अभियंता आहे व्ही जे टी आय मधून बी इ झाला मुंबई आय आय टी मधून एम टेक झाला आणि अमेरिकेत पी एच डी झाला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे मुलांना आपल्या विषया पेक्षा अधिक जास्त शिकवणे हे "चांगल्या संस्थां"मध्येच होते. अमेरिकेत साधनांची सुबत्ता असल्याने साधारण संस्थांमध्ये सुद्धा आपल्याला उच्चं शिक्षणासाठी आवश्यक असणारी साधन सामग्री उपलब्ध आहे. उदा सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये आपल्याला काँक्रीट च्या चाचणीसाठी जी प्रयोगशाळा लागते त्यासाठी मुंबईत दत्त मेघे कॉलेजात २५ टनाचा ठोकळ्याच्या चाचणी ची सामग्री आहे. व्हीजेटीआय मध्ये ५० ताणाची आणि आय आय टी मध्ये १०० टन. अमेरिकेत सर्रास सगळ्या संस्थांमध्ये १००-१५० टन ठोकळ्याची चाचणी शक्य आहे. भारतात आपल्या पुस्तकी शिक्षणाच्या बाहेर काही करायचे असेल तर त्याला विद्यार्थ्याला "कष्ट" करावे लागतात आपल्या कडे शिक्षण "झापडबंद' आहे यात शंका नाही. माझ्या पुतणीला CAT मध्ये ९९.३ पर्सेन्टाइल आले पण IIM अहमदाबाद बंगलोर आणि लखनौ मधून बोलावणे आले नाही कारण ते दहावी, बारावी आणि अभियांत्रिकीच्या चारही वर्षाचे गुण गृहीत धरूनच मुलांना बोलावतात. म्हणजे तुम्हाला डोळ्याला झापडे लावून १५ व्य वर्षांपासून अभ्यास करणारीच मुले हवीत. वैद्यकीय शिक्षणात अशीच परिस्थिती आहे हे मी गेली कित्येक वर्षे डोळ्याने पाहत आलो आहे. पुस्तकाबाहेरचे काही शिकण्याचा प्रयत्न केला तर आधी "आहेत ती पुस्तके नीट वाचा" असाच सल्ला दिला जातो. भारतात केवळ "चांगल्या" संस्थामध्ये चतुरस्त्र शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाते हि वस्तुस्थिती आहे. सुदैवाने हि परिस्थिती बदलत आहे पण हा बदल फार हळू आहे. तिथे गेलेले बहुसंख्य भारतीय विद्यार्थी हे "मुळात हुशार आणि कष्टाळू" असल्याने ते तिथे "यशस्वी" झाले हि वस्तुस्थिती दुर्लक्ष करून चालणार नाही.त्याच्या शिक्षण संस्थांचा किती भाग होता(यात आय आय टी सारख्या अग्रगण्य संस्था सुद्धा मी गणतो) हा एक संशोधनाच विषय आहे. माझे हे विचार बऱ्याच लोकांना पटणार नाहीत पण त्याला माझा नाईलाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा