Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी व निकाल

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 03/09/2017 - 15:58
🗣 158 प्रतिसाद
५ राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी ११ मार्च रोजी आहेत. मतमोजणी व निकालांसाठी हा धागा आहे. तत्पूर्वी आज वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष जाहीर होत आहेत. प्रत्यक्ष निकाल व मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष यांची तुलना करण्यासाठी धाग्यातच वेगवेगळ्या वृत्तसंस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचणीचे निष्कर्ष देत आहे. ________________________________________________________________________________________________

१) उत्तर प्रदेश

अ) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी भाजप+ (१८५), सप+काँग्रेस (१२०), बसप (९०) ब) टाईम्स नाऊ भाजप+ (१९०-२१०), सप+काँग्रेस (११०-१३०), बसप (५७-७४) क) एबीपी न्यूज भाजप+ (१६४-१७६), सप+काँग्रेस (१५६-१६९), बसप (६०-७२) ड) सीएनएन-न्यूज १८ भाजप+ (१६४), सप+काँग्रेस (१२०-१४७), बसप (८१) ई) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस भाजप+ (२५१-२७९), सप+काँग्रेस (८८-११२), बसप (२८-४२) ________________________________________________________________________________________________

२) उत्तराखंड

अ) इंडीया टीव्ही-सी व्होटर भाजप+ (२९-३५), काँग्रेस (२९-३५) ब) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी भाजप+ (३८), काँग्रेस (३०) क) न्यूज-२४ भाजप+ (४६-६०), काँग्रेस (८-२२) ड) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस भाजप+ (४६-५३), काँग्रेस (१२-२१) ई) टुडेज चाणक्य भाजप+ (५३), काँग्रेस (१५) फ) सीएनएन-न्यूज १८ भाजप+ (३८), काँग्रेस (२६) ________________________________________________________________________________________________

३) पंजाब

अ) इंडीया टुडे-अ‍ॅक्सिस अकाली दल+भाजप (४-७), काँग्रेस (६२-७१), आआप (४२-५१) ब) एनडीटीव्ही, इंडिया न्यूज, एमआरसी अकाली दल+भाजप (७), काँग्रेस (५५), आआप (५५) क) न्यूज-२४ अकाली दल+भाजप (४-१४), काँग्रेस (४५-६३), आआप (४५-६३) ड) इंडिया टीव्ही-सी व्होटर अकाली दल+भाजप (५-७), काँग्रेस (४१-४९), आआप (५९-६७) ई) सीएनएन-न्यूज १८ अकाली दल+भाजप (७), काँग्रेस (५३), आआप (५७), इतर (१) ________________________________________________________________________________________________

४) गोवा

अ) इंडिया टीव्ही-सी व्होटर भाजप (१५-२१), काँग्रेस (१२-१८), आआप (०-४) ब) इंडिया न्यूज- एमआरसी भाजप (१५), काँग्रेस (१०), आआप (७), इतर (८) क) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस भाजप (१८-२२), काँग्रेस (९-१३), आआप (०-२), इतर (४-९) ड) सीएनएन-न्यूज १८ भाजप (१९), काँग्रेस (१४), आआप (६), इतर (१)

५) मणिपूर

अ) इंडिया टीव्ही-सी व्होटर भाजप (२५-३१), काँग्रेस (१७-२३), इतर (९-१५) ब) इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस भाजप (१६-३२), काँग्रेस (३०-३६), इतर (३-५) ________________________________________________________________________________________________ इंडियन एक्स्प्रेसचे सुरजित भल्ला यांनी स्वतःचा वेगळा अंदाज दिला आहे. २०१५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भल्ला यांनी भाजप+ (६०) व संजद+ (१७५) असा अंदाज दिला होता. तो अत्यंत अचूक ठरला होता. त्यांच्या अंदाजानुसार खालील चित्र असेल. http://indianexpress.com/article/opinion/columns/uttar-pradesh-assembly-elections-2017-samajwadi-party-bjp-congress-no-proof-required-seeking-redemption-in-up-2017-4560884/
वर्गीकरण
विधानसभा निवडणुक मतमोजणी निकाल २०१७

प्रतिक्रिया द्या
29836 वाचन

💬 प्रतिसाद (158)
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 13:35 नवीन
तसेच राम जेठमलानी अरूण जेटलींना कसे प्रश्न विचारत आहेत हे केजरीवाल आणि राघव चढ्ढासारखे फालतू लोक ट्विटरवर पोस्ट करत होतेच पण आआपचे समर्थकही शेअर करत होते. गंमत म्हणजे राम जेठमलानीसारखा माणूस एकेकाळी भाजपमध्ये असताना असा माणूस भाजपला कसा चालतो हे विचारणारेच लोक राम जेठमलानी कसा केजरीवालांचा बचाव करत आहेत याचे गुणगान करत आहेत. म्हणजे असे करण्यात काही विसंगती आहे हे त्यांच्या गावीही नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 03/11/2017 - 11:17 नवीन
ताजी स्थिती - १) गोवा - काँग्रेस १६, भाजप १५, मगोप+ ३, इतर ४ २) मणिपूर - काँग्रेस २३, भाजप २२, इतर ८ ३) पंजाब - कॉंग्रेस ७८, अकाली दल १४ + भाजप ३, आआप २० ४) उत्तराखंड - कॉंग्रेस ११, भाजप ५७ ५) उत्तर प्रदेश - भाजप ३२२, सप + कॉंग्रेस ५५, बसप २१
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/11/2017 - 11:22 नवीन
काँग्रेस १०५ जागा लढवून फक्त ६ जागांवर पुढे आहे. २०१२ मध्ये सर्व ४०३ जागा लढवून काँग्रेसला २८ जागा मिळाल्या होत्या. २००७ मध्ये २२ तर २००२ मध्ये २५ जागांवर काँगेसला विजय मिळाला होता. एकंदरीत उ. प्र. मध्ये काँगेस संपल्यातच जमा आहे. सपने काँगेसला लायकीपेक्षा खूप जास्त जागा दिल्या हे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेसची लायकी जास्तीत जास्त ४०-५० जागांची असताना अखिलेशने तब्बल १०५ जागा देऊन घोडचूक केली होती. उ.प्र. च्या इतिहासात ३००+ जागा कोणत्याही पक्षाला मिळाल्या असतील का याविषयी शंका आहे.
  • Log in or register to post comments
र
रॉजरमूर Sat, 03/11/2017 - 17:30 नवीन
घ्या तुमच्या शंकेचे निरसन करा ............ ३०० च्या वर जागा मिळालेल्या आहेत की नाहीत आजवर कोणाला . source : आजचा दि.११ मार्च दै. लोकमत Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 03/11/2017 - 11:30 नवीन
गोव्यात आता काँग्रेस १७, भाजप १४, मगोप+ ३ व इतर ४ अशी स्थिती आहे. भाजपने हे राज्य गमावले आहे असे चित्र आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व मगोपचे तगडे नेत दीपक ढवळीकर पराभूत झाले. सुभाष वेलिंगकरांनी कॉन्व्हेंट शाळांना दिल्या जाणार्‍या अनुदानाच्या विरूद्ध भूमिका घेऊन रा. स्व. संघ व भाजपविरूद्ध बंड करून स्वतःचा वेगळा पक्ष निर्माण करून त्यात मगोप व शिवसेनेला सामील करून भाजपची मतपेटी फोडण्याचे काम केले. यात त्यांना पराभव पत्करावा लागलाच पण भाजपचाही पराभव करण्यात ते यशस्वी झाले. आता भाजपऐवजी काँग्रेस सत्तेवर आली तरी हे अनुदान बंद होण्याची सुतराम शक्यता नाही. उलट ख्रिश्चन मतदारांना चुचकारण्यासाथी ख्रिश्चन मतदारांना अजून जास्त प्रलोभने दाखविली जातील. भाजपविरूद्ध बंड करून वेलिंगकरांनी काय मिळविले याचा आता त्यांनी विचार करावा. केजरीवालांप्रमाणे उधोजींना मोदी जळीस्थळीकाष्ठीपाषाणी दिसतात. त्यामुळे त्यांनी लगेच गोव्यात उडी घेऊन भाजपविरूद्ध निवडणुक लढविली. २०१५ मध्ये बिहारमध्येही सेनेने ५० उमेदवार उभे केले होते. शिवसेना हा शरद पवारांप्रमाणेच अत्यंत विश्वासघातकी पक्ष आहे. या निवडणुकीच्या अनुभवावरून निदान आता तरी भाजपने महाराष्ट्रात शिवसेनेची व पंजाबात अकाली दलाची साथ पूर्ण सोडून स्वबळावर वाटचाल करावी.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 03/11/2017 - 11:52 नवीन
भाजपाचे अभिनंदन. चांगलीच बाजी मारली म्हणायची.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/11/2017 - 13:19 नवीन
'हे' कोठे असतात हल्ली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
न
निष्पक्ष सदस्य Sat, 03/11/2017 - 14:15 नवीन
ब्रेकिंग न्यूज : 105 पैकि 63 प्रतिसाद देवून गॅरी ट्रुमन यांचा दणदणीत विजय,गुरूजींच्या बालेकिल्याला खिंडार!
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 03/11/2017 - 14:33 नवीन
ह्याह्याह्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निष्पक्ष सदस्य
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/11/2017 - 14:48 नवीन
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निष्पक्ष सदस्य
द
दुर्गविहारी Sat, 03/11/2017 - 14:22 नवीन
राज्यसभेत विधेयके पास होण्यात आता अड्चण येणार नाही. भाजप राज्यसभेत मजबूत, राष्ट्रपतीपदही सोपे
  • Log in or register to post comments
न
निष्पक्ष सदस्य Sat, 03/11/2017 - 14:51 नवीन
पाच राज्यांपैकि तीन राज्यांत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे,पंजाबमध्ये स्पष्ट बहुमत तर गोवा आणि मणिपूर मध्ये सरकार बनवण्याची संधी आहे. पण उत्तर प्रदेश ही सर्वात मोठी विधानसभा असल्याने आणि तिथे भाजपने तीनशेच्या पार मजल मारल्याने इतर ठिकाणचे काँग्रेसचे यश झाकोळले गेले आहे.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 03/11/2017 - 14:51 नवीन
गॅरी ट्रुमन यांचे हार्दिक आभार! टीव्हीवरच्या आकड्यांपेक्षा फास्ट तुमचे आकडे अपडेट होत होते! उत्तरप्रदेशच्या निर्णयाने एक गोष्ट स्पष्ट आहे, यापुढे कुठल्याही निवडणूकीत पक्षांनी मतदारांना गृहीत धरू नये. पंजाबमध्ये आआपचा उडालेला धुव्वा आवडल्या गेलेला आहे. उत्तराखंडात अपेक्षित निकाल! गोवा - तुला न मला घाल काँग्रेसला असा प्रकार! मणिपूर, अजून थोडा जोर लावला असता तर भाजपला जमलं असतं पण बहुदा ऊत्तरप्रदेशवर लक्ष केंद्रित केल्यामुळे असेल. असो भाजपचं आणि काँग्रेसचं अभिनंदन!
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Sun, 03/12/2017 - 10:56 नवीन
अहं, गोव्यातही मतदारांना गृहीत धरू नये हेच सांगितले लोकांनी :) (गोवन) प्रीमो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
स
सचु कुळकर्णी Sat, 03/11/2017 - 16:08 नवीन
त्सुनामि नाहि हो हे त्यापेक्षा जबरदस्त काहि तरी आहे,. आज ईतनि मयस्सर भि नहि मयखाने मे.....जितनि हम छोड दिया करते थे पैमाने मे.... १०५ जागा काँग्रेस साठि सोडुनहि सपा + काँग्रेस ६० चा आकडा पार नाहि करु शकले. प्रतिक्रिया तर बहनजी ह्यांचि पाहण्यासारखि होति..... अखिलेश ने त्यामानाने बरिच परिपक्वता दाखवली पत्रकार परिषदेत.
पण आस्मादिकास आज सगळ्यात जास्त आनंद दिला तो पंजाब विधान सभा निकालाने. १) पुर्ण बहुमताच सरकार तयार होतय आणि २) युगपुरुष आणि मंडळिना पंजाबि जनतेने ठेंगा दाखवुन जबरदस्त तोंडघशी पाडलय. आसुरी आनंद म्हणा हव तर... पण बेक्कार हलकलानछाप्पु केलय आपटार्ड ना. ह्या सुरक्षेच्या द्रुष्टिने संवेदनशिल राज्यात जर युगपुरुष आणि मंडळिं सारखे थोर विचारवंत (जंत ?) आले असते तर ह्यानि काय धिंगाणा घातला असता कल्पनाही करवत नाहि.
लोकशाहित जसे कठिण निर्णय घ्यायला सरकार कडे डिसिजिव्ह मेजॉरिटि आवश्यक असते तसाच एक सक्षम विरोधि पक्ष हि आवश्यक असतो पण सध्यातरी असा कोणि दावेदार दिसत नाहि आहे. काँग्रेस आपल्या रा.रा. राहुल प्रेमामुळे ते पोटेंशियल कधिच गमावुन बसलिय, आणि आज जसे काँग्रेस चे थोर विचारवंत श्रियुत दिग्विजय सिंग म्हणाले कि आता राहुल गांधि ह्यांनि पक्षाचे अध्यक्षपद स्विकारुन पक्षाला दिशा दाखवावि तेव्हा NDTV वर रविश आणि ते पाहताना आणि ऐकताना मि फक्त बेशुध्द व्हायच बाकि होतो. रा.रा. राहुल गांधि म्हणजे लिमिट है यार ...माणसाने किति हस करुन घ्याव ह्याला काहि मर्यादा असतात :))
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 03/13/2017 - 10:42 नवीन
पण आस्मादिकास आज सगळ्यात जास्त आनंद दिला तो पंजाब विधान सभा निकालाने.
पूर्ण सहमत आहे. मलाही उत्तर प्रदेशइतकाच पंजाबचाही आनंद झाला आहे. मिपावर दोनेक महिन्यांपूर्वीच पंजाबमध्ये काँग्रेसचा विजय व्हावा असे मला वाटते असे लिहिले होते. माझ्यासारखे वाटणारे कित्येक लोक होते/आहेत. या सगळ्यांवरच आपटर्ड्स टिका करायला लागले आहेत. कसे असते, बिहारमध्ये भाजपचा पराभव झाला याचा या पुरोगाम्यांना आणि आपटर्ड्सना आनंद झाला नव्हता का? लालूसारख्या तद्दन फालतू माणसाला यांच्याच युगपुरूषांनी जाहिरपणे मिठी मारली होती त्याचे काय? मग यांचीच दवा यांना कोणीतरी कधीतरी खिलवणारच. मग तक्रार करून चालायची नाही. पंजाबमध्ये आपचा पराभव का झाला यामागे आपल्यासारखे वाटणारे अनेक लोक सामील आहेत. अकाली दलाचा विजय होणे जवळपास अशक्य होते हे पंजाबी हिंदू मतदारांना समजले नव्हते असे नक्कीच नाही.अशावेळी काँग्रेस आणि आआप हे दोन पर्याय यापूर्वी भाजपला मते देणार्‍या पंजाबी हिंदू मतदारांपुढे होते. केजरीवाल कट्टर खलिस्तानवाद्यांविषयी सहानुभूती बाळगून आहेत असे चित्र उभे राहिलेच होते. प्रचारादरम्यान एका खलिस्तानी दहशतवाद्याच्या घरी त्यांनी रात्रभर मुक्काम ठोकला होता हे पण सगळ्यांना समजले. तसेच मतदानाच्या ४-५ दिवस आधी बठिंडाजवळ बॉम्बस्फोट झाला. १९८० च्या दशकात खलिस्तानी दहशतवादाचे चटके पंजाबी हिंदूंनीच सोसले होते. त्यामुळे तसे काही परत व्हायची थोडीशीही शक्यता निर्माण झाली आहे हे बघता पंजाबी हिंदूंनी मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला मते दिली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
अ
अनन्त अवधुत Mon, 03/13/2017 - 18:27 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
स
सचु कुळकर्णी Sat, 03/11/2017 - 16:14 नवीन
आणि हो लवकरच युगपुरुष "बद्रिनाथ कि दुल्हनिया" ह्यावर आपले अमुल्य समिक्षण ....ओके ओके रसग्रहण म्हणा हव तर...तेच ते देणारा आहेत :))
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 03/11/2017 - 16:37 नवीन
कॉंग्रेसचा अमेठीतील सर्व ५ जागांवर व रायबरेलीतील ५ पैकी ३ जागांवर पराभव. १० पैकी ६ भाजपने, २ जागा कॉंग्रेसने व २ सप ने जिंकल्या.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sun, 03/12/2017 - 15:13 नवीन
मायवतींची राज्यसभा टर्म संपतिये फुडल्या वर्षी. परत निवडून येण्याइतके आमदार नाहीत त्यांच्याकडे.
  • Log in or register to post comments
द
दुश्यन्त Sun, 03/12/2017 - 15:48 नवीन
गोव्यात काँग्रेस मोठा पक्ष ठरून पण भाजप सत्तेत येईल असं दिसतंय. पर्रीकर गोव्यात परत येणार आणि त्यांना मगोप / फॉरवर्ड आदी पक्ष पाठिंबा देणार. माझ्या मते भाजपने काही काळ तरी विरोधात बसायला हवे होते. काँग्रेस कडे पण स्पष्ट बहुमत नाही आणि अंतर्गत गटबाजी आहे तेव्हा काँग्रेस ने सरकार बनवले असते तरी ते ५ वर्ष टिकेल याची शाश्वती नव्हतीच. केंद्रात सरंक्षण मंत्री (कॅबिनेट) हे केव्हाही गोव्या सारख्या लहान राज्याच्या मुख्यमंत्री पदापेक्षा मोठे पद आहे मात्र खुद्द पर्रीकरच गोव्यात परंतु इच्छितात तर कोण काय करणार ? त्यांना परत आमदार होणे हेही आलेच. २०१४ मध्ये मोदी सरकार आल्यावर बरेच दिवस फुल टाइम सरंक्षण मंत्री नव्हता (जेटलींकडे अतिरिक्त पदभार होता). आता पर्रीकर गेले तर लवकर नवीन मंत्री नेमावा.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 03/12/2017 - 15:53 नवीन
लहान पक्ष पर्रीकरांच्या नावावर अडून बसले असणार हे एक. आणि हे सरकार पाच वर्षे रहाणार नाही. लोकसभेसोबत गोव्यात पुन्हा विधानसभा निवडणुका घेतल्या जातील. ही तात्पुरती व्यवस्था वाटते आहे. या लोकांनी पुन्हा निवडणुका होईपर्यंत सरकार भाजपचे असावे हा विचार केलेला असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
द
दुश्यन्त Sun, 03/12/2017 - 16:02 नवीन
हे जे लहान पक्ष आहेत ते लोकसभेबरोबर निवडणूक घ्यायला तयार होतील का? समजा बीजेपीने २०१९ ला राजीनामा दिला तर हे पक्ष काँग्रेसला पाठिंबा देऊन नवीन सरकार कशावरून आणणार नाहीत? आता काही ठिकाणी पर्रीकरांनी अजून राजीनामा दिलाच नाही अशी पण बातमी आहे. भाजपने उत्तराखंड /अरुणाचल मध्ये केली तशी घाई इथे करू नये. ४० आमदार असणाऱ्या सभागृहात कधी कुठले सरकार येईल हे खरे नसते. गोव्याला तर मोठा इतिहास आहे अल्पावधी सरकारांचा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sun, 03/12/2017 - 16:12 नवीन
आतातरी येणार्‍या बातम्यांवरून हा माझा प्राथमिक अंदाज आहे. अजून एक शक्यता म्हणजे काँग्रेसच्या निवडून आलेल्या मंडळीत किती माजी मुख्यमंत्री आहेत याचा विचार केला तर काँग्रेसमधल्याच काहीजणांना सरकार बनवण्यात किंवा टिकवण्यात स्वारस्य नसावे अशी शंका येत आहे. कारण कोणा एकाला मुख्यमंत्री केले तर दुसरे कोणीतरी पक्ष फोडतील ही शक्यता काँग्रेसच्या बाबतीतही आहे. त्यामुळे हा सगळ्यांनाच सोयीचा पर्याय दिसतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
श
श्रीगुरुजी Sun, 03/12/2017 - 16:07 नवीन
गोव्यातील मतदारांनी स्पष्टपणे भाजपच्या विरूद्ध कौल दिलेला आहे. मतदारांनी भाजपच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांबरोबर इतर ४ मंत्री व एकूण ८ आमदारांना घरी पाठविले आहे. जरी काँग्रेसच्या बाजूने स्पष्ट कौल नसला तरी भाजपच्या विरूद्ध स्पष्ट कौल आहे. त्यामुळे गोव्यात भाजपने विरोधी पक्षातच बसणे योग्य ठरेल. सत्तेसाठी धडपड करणे ही चूक ठरेलच, परंतु मुख्यमंत्रीपदासाठी पर्रीरकरांना केंद्रातून परत बोलाविणे ही घोडचूक ठरेल. पर्रीकर संरक्षण मंत्रीपदावर चांगले काम करीत आहेत (फक्त त्यांनी आपले तोंड बंद ठेवायला हवे कारण गेल्या काही महिन्यात ते अनेक वादग्रस्त विधाने करीत आहेत). जॉर्ज फर्नांडिस यांच्या नंतर तब्बल १० वर्षांच्या कालावधीनंतर भारताला एक कार्यक्षम संरक्षणमंत्री लाभला आहे. मोदी सरकारमध्ये जे काही मोजके कार्यक्षम मंत्री आहेत त्यात पर्रीकरांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना केंद्रातून परत पाठवून गोव्यासारख्या अत्यंत लहान राज्यात सीमित करणे योग्य होणार नाही. गोव्याप्रमाणे मणिपूरमध्ये देखील भाजपने विरोधी पक्षातच बसणे योग्य ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
द
दुश्यन्त Sun, 03/12/2017 - 19:23 नवीन
गोव्याप्रमाणे मणिपूरमध्ये देखील भाजपने विरोधी पक्षातच बसणे योग्य ठरेल.+१ सहमत. बाकी पर्रीकर खूप धडाडीचे नेते आहेत ,आयआयटीयन आहेत पण काही वेळेस नाही ते बरळून टीकेचे धनी झाले आहेत. त्यांनी गडकरींचा आदर्श ठेवावा ते पण बोलायला मोकळे ढाकळे आहेत पण केंद्रात गेल्यापासून तोंडावर कंट्रोल आहे आणि कामाला वाघ तर आधीपासूनच आहेत. कदाचित पर्रीकरांना कुणाच्या हाताखाली काम करायला नको वाटत असेल.पण जोडतोड सरकारमध्ये त्यांना मागच्या टर्म सारखे स्वातंत्र्य असणार नाही. मुळात देशाचा सरंक्षण मंत्री ते २०-२२ आमदार घेऊन मुख्यमंत्री ही पदावनतीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 03/12/2017 - 16:11 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 03/12/2017 - 16:22 नवीन
गोव्यात भाजपला ४० पैकी फक्त १३ जागा मिळाल्या तर काँग्रेसला १७ मिळाल्या. परंतु काँग्रेसला एकूण मतांपैकी २८.४% मते मिळाली असून भाजपला काँग्रेसपेक्षा तब्बल ४.१% जास्त मते मिळाली आहेत (३२.५%). तरीसुद्धा भाजपला काँग्रेसपेक्षा ४ जागा का कमी मिळाल्या हे समजत नाही. २०१२ च्या तुलनेत काँग्रेसने २.४% मते गमाविली तर भाजपने २.२% मते गमाविली. मगोपने २०१२ मध्ये ६.७% मते मिळविली होती, परंतु २०१७ मध्ये ११.३% मते मिळविली. परंतु २०१२ प्रमाणे २०१७ मध्ये सुद्धा मगोपचे फक्त ३ आमदार निवडून आले. वेलिंगकरांचा गोवा सुरक्षा मंच व शिवसेना यांच्याबरोबर युती असूनसुद्धा व मतांमध्ये ४.६% वाढ करूनसुद्धा मगोपला आपल्या आमदारांच्या संख्येत अजिबात वाढ करता आली नाही. एका बातमीनुसार शिवसेनेने ४ जागा लढवून एकूण ७०० पेक्षा कमी मते मिळविली. हे जर खरे असेल तर शिवसेनेने विनाकारण गोव्यात भाजपच्या विरूद्ध लढून काय मिळविले हे समजत नाही. सुभाष वेलिंगकरांनी मुद्दाम गोवा सुरक्षा मंच स्थापन करून भाजपविरूद्ध निवडणुक लढवून भाजपला पाडण्याचे काम केले. त्यांचा स्वतःचा एकही आमदार निवडून आला नाही. आता तर त्यांनी आपला पक्ष विसर्जित केल्याचे वाचले. मग इतका अट्टाहास करून काय मिळविले? इंग्लिश माध्यमांच्या शाळांना दिले जाणारे अनुदान थांबवावे या मागणीसाठी त्यांनी संघातून बाहेर पडून भाजपविरूद्ध निवडणुक लढवून 'न तुला न मला घाल काँग्रेसला' अशी स्थिती निर्माण केली. नवीन येणारे सरकार काँग्रेसचे असले तरी त्यांची मागणी मान्य होण्याची सुतराम शक्यता नाही. एकंदरीत सुभाष वेलिंगकर, मगोप आणि महाराष्ट्राचे केजरीवाल/पप्पू यांनी गोव्यात भाजपचे पाय ओढण्यातच धन्यता मानली.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sun, 03/12/2017 - 16:29 नवीन
शिवसेना ही भाजपाची एमायएम आहे. एमायएम काँग्रेस/सपाची मुस्लिम मतं फोडते असा समज आहे. सेना तेच काम भाजपाविरुद्ध करते. उत्तर प्रदेशातपण सेनेने निवडणुका लढवल्या आहेत. एका ठिकाणी हजारहून जास्तं मतं घेतली हे पाहिलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 03/12/2017 - 16:45 नवीन
बरोबर. बिहारमध्येही सेनेने ५० जागा लढवून एका जागेवर दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवून भाजप उमेदवाराच्या पराभवाला हातभार लावला होता. भाजपने महाराष्ट्रात शिवसेना व पंजाबमध्ये अकाली दलाच्या जोखडातून मान सोडवून घेऊन पूर्णपणे स्वतंत्र उभे राहिले पाहिजे. शिवसेना जुलै २०१७ मधील राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपबरोबर दगाबाजी करून भाजपविरोधी उमेदवाराला मते देणार हे निश्चित आहे. २०१९ मध्ये सुद्धा लोकसभा व विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार हे नक्की. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राचे पप्पू व केजरीवाल (उधोजी आणि राऊत) 'सामना'तून भाजपविरूद्ध विखारी प्रचार सुरू ठेवणार हे नक्की. काँगेस व राष्ट्रवादीचा बाहेरून पाठिंबा घेऊन शिवसेना महाराष्ट्रात स्वत:चे सरकार स्थापन करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण या तीनही पक्षांचे एकत्रित १४६ आमदार आहेत. अशा पक्षाला तातडीने ठोकर मारून गरज पडल्यास महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकीला सामोरे जायची तयारी भाजपने ठेवली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
द
दुश्यन्त Sun, 03/12/2017 - 19:33 नवीन
महाराष्ट्रात सेनेला बरोबर घेणे हि भाजपची मजबुरी आहे. सेनेला वगळून सुरुवातीला सरकार चालवून पाहिले पण लोकांच्या रोषाला सामोरे गेल्यावर फडावणीसांनी सेनेला सरकारमध्ये घेणे गरजेचे आहे हे दिल्लीला पटवून दिले. आतापण सेनेला जास्त डिवचायला नको म्हणून मुंबई मधून भाजपने माघार कशासाठी घेतली ? मध्यावधी लागल्या तर भाजपला पण सोप्या नाहीत. नगरपालिका महानगरपालिका वगैरे मध्ये सत्तारूढ पक्षाला अनुकूल मतदान झाले पण झेडपी मध्ये काँग्रेस -एनसीपीची कामगिरी इतकी पण वाईट नाही. २०१४ ला भाजप एनसीपीच्या सेटिंग मुळे सगळे वेगळे लढले आता काँग्रेस -एनसीपी एकत्र लढतील तर भाजप (+ छोटे पक्ष) आणि शिवसेना (कदाचित सेना मनसे ) वेगवेगळे लढतील यात भाजपला आहे त्या जागा राखणे अवघड होईल . सरकार मध्ये परत भाजप सेनाच येईल.भाजप एवढी रिस्क घेणार नाही . दुसरीकडे सेनेला खरेतर विरोधी पक्षात राहणे जास्त फायद्याचे होते मात्र सलग १५ वर्ष सरकार बाहेर आणि आमदार एकजूट ठेवण्यासाठी उद्धवना सरकारमध्ये जावे लागले. एकत्र राहणे भाजप आणि शिवसेनेची मजबुरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
क
कपिलमुनी Tue, 03/14/2017 - 08:34 नवीन
तुमच्या एवढा विखार इतर कोणाच्याही प्रचारात पाहिला नाहीये .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 03/14/2017 - 09:55 नवीन
काय सांगताय! अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
मोदक Tue, 03/14/2017 - 10:29 नवीन
काय मुनी.. असे एकदम ठरवून दिल्यासारखे का प्रतिसाद येत आहेत..? मोघम आरोप करण्याची पद्धत जुनी झाली आता. विखारी प्रचाराची व्याख्या काय..? गुरुजी कोणत्याही परिस्थीतीमध्ये भाजपाचे समर्थन करत असले तरी त्यांनी पातळी सोडली आहे किंवा शिवीगाळ केली आहे असे दिसून आले आहे का..? वाट्टेल ते लॉजिक लाऊन निष्कर्ष काढणे, त्याच लॉजिकने निघालेले पण स्वतःला अडचणीत असणारे निष्कर्ष नाकारणे, शिवीगाळ करणे, खोटी माहिती देवून मुद्दाम दिशाभूल करणे वगैरे प्रकार मिपावर झाले आहेत. स्वत:ला न आवडणारी पार्टी जिंकल्यावर हवेत आरोप करायचे आणि पुरावे मागितले की वैयक्तीक हल्ले करून पळून जायचे असलेही प्रकार झाले आहेत. हे तुमच्यालेखी विखारी प्रचारात येत नाहीत का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Tue, 03/14/2017 - 10:42 नवीन
मागे एका धाग्यात केजरीवालांचे जोरदार समर्थन करताना त्यांनी किमान १०-१२ वेगवेगळ्या प्रतिसादात माझा "खोटारडा" असा सातत्याने उल्लेख केला होता. मला कावीळ झाली आहे असादेखील त्यांनी निष्कर्ष काढला होता. अर्थातच त्यांच्या दृष्टीने यात विखारी काहीही नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ग
गॅरी ट्रुमन Mon, 03/13/2017 - 12:06 नवीन
गोव्यात भाजपला ४० पैकी फक्त १३ जागा मिळाल्या तर काँग्रेसला १७ मिळाल्या. परंतु काँग्रेसला एकूण मतांपैकी २८.४% मते मिळाली असून भाजपला काँग्रेसपेक्षा तब्बल ४.१% जास्त मते मिळाली आहेत (३२.५%). तरीसुद्धा भाजपला काँग्रेसपेक्षा ४ जागा का कमी मिळाल्या हे समजत नाही.
सर्वात जास्त मते मिळणारा उमेदवार विजयी होतो या पध्दतीमध्ये अनेकदा हे बघायला मिळते. एखाद्या पक्षाची मते थोड्या प्रदेशात एकत्रित झाली असतील तर त्या पक्षाला कमी मते मिळूनही जास्त जागा मिळू शकतात. पण त्याउलटे मते अधिक प्रमाणात विखुरलेल्या पक्षाला जास्त मते मिळूनही कमी जागा मिळू शकतात. २००९ मध्ये लोकसभेत भाजपला देशात १८% मते पण जागा ११६ पण २०१४ मध्ये काँग्रेसला देशात १९% मते तरी जागा ४४ च मिळाल्या. याचे कारण भाजपची मते काही राज्यांमध्ये एकवटली आहेत तर काँग्रेसची मते बर्‍याच राज्यांमध्ये विखुरलेली आहेत. उत्तर प्रदेशातही सपा पेक्षा बसपाला एक टक्का मते जास्त आहेत तरी जागा बर्‍याच कमी आहेत कारण बसपाची मते विखुरलेली आहेत. गोव्याचा विचार केला तर असे का झाले हे समजून येईल. भाजपला काँग्रेसपेक्षा ४% मते जास्त दिसत असली तरी गोवा हे लहान राज्य आहे हे लक्षात घेता या दोन पक्षांमधील मतांमध्ये अंतर ३७,८३० मते आहे. त्यापैकी भाजपने काँग्रेसपेक्षा सुमारे ८,४०० मते एकाच मतदारसंघात-- कुंभारजुआ मतदारसंघात घेतली आहेत (एकूण ४१% चे मताधिक्य). एकंदरीतच भाजपचे उमेदवार जिंकले आहेत ते बर्‍याच मताधिक्याने जिंकले आहेत (अल्डोनामध्ये सुमारे २१% नी, कळंगूटमध्ये १९% नी, कुडचाडेमध्ये ४२% नी, मये मध्ये २०%, म्हापसामध्ये ३५% नी वगैरे). भाजपचा पराभव झाला आहे त्या मतदारसंघांमध्ये इतक्या मताधिक्याने पराभव झालेला नाही (काणकोणमध्ये साडेसात टक्क्यांनी, कुंकोळीमध्ये ६% नी, फातोर्ड्यात ६% नी वगैरे). नाही म्हणायला भाजपचा मुरगावमध्ये विजय १% पेक्षा कमी मतांनी झाला तर मान्द्रेमध्ये २५% नी पराभव झाला. पण अशा मतदारसंघांची संख्या त्यामानाने कमी. त्यामुळे जिथे जास्त मताधिक्याने विजय मिळाला तिथे तेवढी जास्त मतांची टक्केवारी वाढली. पण जिथे पराभव झाला तिथे काँग्रेसला थोड्याच अधिक मताधिक्यामुळे एक जागा पदरात पडली.
सुभाष वेलिंगकरांनी मुद्दाम गोवा सुरक्षा मंच स्थापन करून भाजपविरूद्ध निवडणुक लढवून भाजपला पाडण्याचे काम केले.
गोवा सुरक्षा मंचाचा भाजपला त्रास होईल असे वाटले होते. पण तसे निकालात दिसत नाही. गोवा सुरक्षा मंच किंवा शिवसेनेमुळे भाजपला एकही जागा गमावावी लागलेली नाही. म.गो.पक्षाने मात्र आपली मते लक्षणीय प्रमाणात वाढवली आहेत. इतकी वर्षे म.गो.पक्ष उतरणीला लागलेला पक्ष होता आणि गेली काही वर्षे ढवळीकर बंधूंवरच त्यांची भिस्त होती. यावेळी प्रियोळमधून दीपक ढवळीकरांचा पराभव झाला तरीही मडकईमधून सुदीन मडकईकरांनी आपला गड राखला. इतकेच नव्हे तर पेडणे आणि सावर्डे या दोन आणखी जागाही त्यांनी जिंकल्या. या दोन जागांवर १९९४ नंतर प्रथमच म.गो.पक्षाने विजय मिळवला आहे. १३% मते मिळाल्यास फार जागा मिळत नाहीत. तिरंगी लढतीत बर्‍यापैकी जागा मिळवायच्या असतील तर किमान २५% ते २७% मते हवीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 03/12/2017 - 16:39 नवीन
उ.प्र. मध्ये २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने फक्त १५% मते मिळवून फक्त ४७ जागा जिंकल्या होत्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तब्बल ४२% मते व ८० पैकी ७३ जागा मिळाल्या होत्या. २०१७ मध्ये भाजपने ३९.८% मते मिळवून तब्बल ३२४ जागा जिंकल्या आहेत. भाजपची अंदाजे २.२% मते घटली. बसपने २०१४ च्या तुलनेत २% मते जास्त मिळविली. सपने सुद्धा २% मते जास्त मिळविली, परंतु काँग्रेसने २०१२ च्या तुलनेत (७.५%) दीड टक्का मते गमाविली (६%). सप + काँग्रेसने एकूण एकत्रित २८% मते मिळविली तर बसपने २२% मते मिळविली. परंतु भाजपने सप-काँग्रेसच्या तुलनेत तब्बल १२% मते जास्त मिळविल्याने त्यांना तब्बल ८०% जागा जिंकता आल्या. २०१९ मध्ये विधानसभेची व मुख्यमंत्रीपदासाठी मारामारी नसल्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उ. प्र. मध्ये सप व बसप यांची युती होईल असे मला वाटते. काँग्रेस अर्थातच त्यांच्यात सामील होईल. सप व बसप या दोघांसाठीही आता अस्तित्वाची लढाई आहे. दोन्ही पक्षांच्या नाकापर्यंत पाणी आलेले आहे. दोघे विरूद्ध लढले तर पुन्हा एकदा २०१४ ची पुनरावृत्ती होऊ शकेल या भीतिने दोन्ही पक्ष राजद व संजद प्रमाणे लोकसभेसाठी मतभेद विसरून एकत्र येऊ शकतील. कदाचित २०१८ मध्ये मायावतीच्या राज्यसभेच्या खासदारकीची मुदत संपल्यानंतर युतीची पूर्वतयारी म्हणून सप आपल्याकडील जास्तीची मते बसपला देऊन मायावतीला राज्यसभेवर निवडून यायला मदत करेल. २०१८ मध्ये उ. प्र. चे राज्यसभेतील १० खासदार मुदत संपल्यामुळे निवृत्त होत आहेत. त्यात मायावतीचा समावेश आहे. राज्यसभेवर पुन्हा एकदा निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला विधानसभेतील किमान ३७ खासदारांची मते मिळवावी लागतील. सपकडे ४७ व काँग्रेसकडे ७ आमदार असून मायावतीकडे १९ आमदार आहेत. या तिघांची एकूण संख्या ७३ असून त्यांचे जास्तीत जास्त २ खासदार निवडून येऊ शकतात. सप व काँग्रेसचा एकत्रित एकच खासदार निवडून येऊ शकतो. जर हे तीन पक्ष एकत्र आले नाहीत तर दुसरा खासदार भाजपचा असेल. ते टाळण्यासाठी सप मायावतीला मते देऊन निवडून आणू शकतो. मायावतीचे खरे शत्रुत्व मुलायम सिंहशी आहे. अखिलेशबरोबर तिचे तेवढे शत्रुत्व नाही. त्यामुळे अखिलेश व मायावती आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात व तसे झाले तर भाजपला २०१४ ची पुनरावृत्ती करणे अत्यंत अवघड असेल कारण या तिघांची एकत्रित मते ५०% हून अधिक आहेत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 03/12/2017 - 19:30 नवीन
पर्रीकर मुख्यमंत्री होणार. http://indianexpress.com/elections/election-results-2017-live-updates-bjp-congress-uttar-pradesh-punjab-goa-manipur-uttarakhand-pm-modi-amit-shah-amarinder-singh-manohar-parrikar-4566428/ माझ्या मते हे अयोग्य आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 03/14/2017 - 08:14 नवीन
मला देखील पहिले धक्का बसला होता, पण आता मला फार काही अयोग्य वाटत नाही. मझ्या मते ती परिस्थिती अशी होती. १. मगोप हे तसेही भाजपाचे भागीदार होते. यावेळी त्यांनी युती मोडली, पण ते तसेही सत्तेतील भागीदारच होते, त्यामुळे त्यांचा पाठिंबा अपेक्षित होताच. त्यामुळे भाजपा मुळातच १३ + ३ =१६ होताच. २. गोवा फोरवर्ड वगैरे पक्षांना भाजपाबरोबर जाणे तसे हिताचे होते. त्यामुळे त्यांनी जर स्वतःहून भाजपाला संपर्क करून पाठिंबा देऊ केला असेल तर तो भाजपाने नाकारणे किंवा आडमुठी भूमिका घेणे (केवळ आम्ही फार नैतिक आहोत म्हणून) हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरला असता. त्यामुळे भाजपाने केले त्यात फार काही चुकीचे केले असे वाटत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
द
दुश्यन्त Tue, 03/14/2017 - 09:08 नवीन
दोन्ही बाजू आहेत. काँग्रेसवाले पण वेळेत नेता निवड /आघाडी करू शकले नाहीत ती त्यांची चूक आहेच. बाकी भाजपने पण कुणाला फोडले नाही. छोटे पक्ष स्वतः येतात कोण काय करणार पण ते नंतर वाटेल तेव्हा कोलांटी पण मारू शकतात. प्रतिष्ठा आणि काहीहीकरून जास्तीत जास्त राज्ये काबीज करायची हा भाजपचा प्लान असू शकतो म्हणून पर्रीकर फौजदारकी सोडून हवालदार होत आहेत. पर्रीकर गोवा फॉरवर्ड पार्टीच्या विजय सरदेसाईना 'फिक्सर' म्हणतात त्यांनीच हे सरकार पण फिक्स केले असेल तर नैतिकता वगैरे गप्पा मारू नयेत. नाहीतरी महाराष्ट्रात पण प्रचारात 'एनसीपी - न्याचुरली करप्ट पार्टी' म्हणत सेटिंग केलेलेच होते आता गोव्यात पण 'फिक्सर'ला बरोबर घेतलेच आहे, शिवसेना-भाजप प्रचारात एकमेकांना दूषणे देताना काही हातचे ठेवत नाहीत मात्र नंतर एक होतात. थोडक्यात सब घोडे बारा टक्के!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
श
श्रीगुरुजी Tue, 03/14/2017 - 10:09 नवीन
१) गोव्याच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या मंत्रीमंडळातील ६ मंत्र्यांना मतदारांनी पराभूत केले आहे. २) भाजपला दुसर्‍या क्रमांकाच्या म्हणजे १३ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला त्यापेक्षा अधिक म्हणजे १७ जागा आहेत. ३) काँग्रेसला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिले नसले तरी मतदारांनी अतिशय स्पष्टपणे भाजपला नाकारले आहे. भाजपने सत्ताधारी पक्ष न होता विरोधातच बसावे असा मतदारांनी स्पष्ट कौल दिला आहे. ४) ज्या गोवा फॉरवर्ड पक्षाचा पाठिंबा भाजपने मिळविला आहे त्याच पक्षाने 'भाजप हटाव' अशी मोहीम उघडून भाजपविरोधात निवडणुक लढविली होती. नैतिकदृष्ट्या अशा पक्षाबरोबर सरकार स्थापन करणे योग्य नाही. ५) केंद्रातील संरक्षण खात्याचे मंत्री हे अत्यंत महत्त्वाचे व मोठे पद सोडून गोव्यासारख्या अत्यंत छोट्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून परत येणे ही पर्रीकरांची पदावनती आहे. ६) फडणविसांना महाराष्ट्रातून केंद्रात आणून त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री करणार असल्याच्या बातम्या पसरत आहेत. फडणविस महाराष्ट्रात उत्तम काम करीत आहेत. त्यांना हलविणे चुकीचे ठरेल. त्यांनी शिवसेनेला नेस्तनाबूत करत आणले असून मुंबई-ठाणे या दोन शहरांच्या आत शिवसेनेला बंदिस्त करून टाकले आहे. तसेच चंद्रकांत पाटील, गडकरी, दानवे, मुनगंटीवार इ. नेत्यांना शिवसेनेबद्दल सॉफ्ट कॉर्नर असल्यामुळे ते उद्धव ठाकर्‍यांसमोर दबून राहतील व शिवसेनेला भाजपपेक्षा वरचढ होऊन देतील. उद्धव त्यांच्यासमोर प्रचंड माज करून दबाव आणेल. पर्रीकरांना गोव्यात आणणे ही चू़क ठरेल. तसेच फडणविसांना दिल्लीत नेणे ही देखील चूकच ठरेल. ७) मुंबईत शिवसेनेसमोर उभे राहून संघर्ष करण्याची आवश्यकता होती. जमल्यास फोडाफोडी करून आपला महापौर निवडून आणायला पाहिजे होता. परंतु भाजपने तिथे शेपूट घातली आणि गोव्यात फोडाफोड करणे अयोग्य असताना तिथे व मणिपूरमध्ये जनादेशाचा अवमान करून स्वतःचे सरकार आणण्याची निषेधार्ह धडपड सुरू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
म
मोदक Tue, 03/14/2017 - 10:20 नवीन
गुरुजी.. शिवसेनेमुळे फडणवीस आणखी १० वर्षे कुठे जात नाहीत. काळजी करू नका. तसेच तुमचीच विधाने बघा.. ३) काँग्रेसला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिले नसले तरी मतदारांनी अतिशय स्पष्टपणे भाजपला नाकारले आहे. भाजपने सत्ताधारी पक्ष न होता विरोधातच बसावे असा मतदारांनी स्पष्ट कौल दिला आहे. ४) ज्या गोवा फॉरवर्ड पक्षाचा पाठिंबा भाजपने मिळविला आहे त्याच पक्षाने 'भाजप हटाव' अशी मोहीम उघडून भाजपविरोधात निवडणुक लढविली होती. नैतिकदृष्ट्या अशा पक्षाबरोबर सरकार स्थापन करणे योग्य नाही. (i) मुंबईत शिवसेनेसमोर उभे राहून संघर्ष करण्याची आवश्यकता होती. जमल्यास फोडाफोडी करून आपला महापौर निवडून आणायला पाहिजे होता. (ii) गोव्यात फोडाफोड करणे अयोग्य असताना तिथे व मणिपूरमध्ये जनादेशाचा अवमान करून स्वतःचे सरकार आणण्याची निषेधार्ह धडपड सुरू आहे. पहिली दोन आणि नंतरची दोन विधाने परस्पर विरोधी नाहीत का..? फोडाफोडी निषेधार्ह असेल तर सगळीकडेच निषेधार्ह असली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 03/14/2017 - 10:51 नवीन
१) गोव्यात भाजप सत्ताधारी पक्ष होता. मुंबईत भाजप शिवसेनेबरोबर सत्तेत असला तरी भाजपची भूमिका दुय्यम होती. त्यामुळे मुंबईत मतदारांनी भाजपला नाकारले असे अंशतः म्हणता येईल. अर्थात मोठा भागीदार असलेल्या शिवसेनेबद्दल हे जास्त प्रमाणात म्हणता येईल. २) गोव्यात एकूण फक्त ४० आमदार आहेत. ४० आमदारांच्या तुलनेत भाजप व काँग्रेसमधील असलेला ४ आमदारांचा फरक बर्‍यापैकी मोठा आहे (एकूण आमदार संख्येच्या १०%). त्या तुलनेत मुंबईत २२७ नगरसेवक असून भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांच्या एकूण संख्येत फक्त २ इतकाच फरक आहे. २२७ च्या तुलनेत २ हा फरक खूप कमी आहे. भाजप व शिवसेनेला जवळपास समान जागी विजय मिळालेला आहे व त्यांच्यातील फरक अत्यल्प आहे (एकूण नगरसेवकांच्या १% पेक्षाही कमी). त्यामुळे खरं तर मतदारांनी दोघांना जवळपास समान कौल दिला आहे. एकतर दोघांनाही नाकारले आहे किंवा दोघांनाही स्वीकारले आहे असे म्हणता येईल. गोव्यात भाजपला मतदारांनी स्पष्ट्पणे नाकारले आहे हे नक्की. ३) शिवसेनेने भाजपविरूद्ध प्रचाराची अत्यंत खालची पातळी गाठली होती. शिवसेना हा सातत्याने राज्य सरकारच्या कामात अडथळे आणत आहे. अशा पक्षाला पूर्ण नेस्तनाबूत करणे आवश्यक आहे. गोव्यात भाजप व काँग्रेसमधील वैरभावना इतक्या टोकाला गेलेली नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 03/14/2017 - 16:27 नवीन
हे लॉजिक मला पटले नाही. पण असो, यावर आपले एकमत होणार नाही. अशा पक्षाला पूर्ण नेस्तनाबूत करणे आवश्यक आहे याला किमान दोन पिढ्या लागतील, एकवेळ १० - २० वर्षात क्रमाने उतरत जाऊन निष्प्रभ होतील पण इतक्या लवकर नेस्तनाबूत होणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गॅरी ट्रुमन Tue, 03/14/2017 - 11:00 नवीन
यात काय नैतिक आहे आणि काय अनैतिक आहे यावर भाष्य करत नाही. कारण कोणाही राजकारण्याची नैतिकतेच्या मुद्द्यावरून बाजू घेऊन वादावादी करणे म्हणजे तोंडघशी पडायची रेसिपी आहे. राजकारणात कोणी नैतिक असेल असे वाटत नाही. अगदी अटलबिहारी वाजपेयींनीही कल्याणसिंगांच्या मंत्रीमंडळात राजाभय्यासारखे लोक होते त्याचे 'ते आमदार म्हणून निवडून गेले आहेत तेव्हा त्यांना मंत्री होण्यापासून कोणी रोखू शकत नाही' असे म्हणत एका अर्थी समर्थन केले होते. तेव्हा भाष्य राजकीय आणि कायदेशीर बाजूंवर करतो. पर्रीकरांना सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी आमंत्रण देण बेकायदेशीर नाही हे आजच न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापुढील प्रतिसाद राजकीय बाजूंवरच करत आहे. सर्वात मोठ्या पक्षाला सत्तेबाहेर ठेऊन इतर पक्षांनी हातमिळवणी करून सरकार स्थापन करायचे प्रकार यापूर्वीही कित्येकवेळा झाले आहेत. देवेगौडा आणि गुजराल यांची संयुक्त मोर्च्याची सरकारे हे त्याचे मोठे उदाहरण आहे. आताही उत्तर प्रदेशात जर मतदारांनी त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आणली असती तर परत सपा-बसपा-काँग्रेस यांचे सरकार आलेच असते. म्हणजे त्यावेळी अस्पष्ट जनादेशाचा या पक्षांनी आपल्या सोयीप्रमाणे अर्थ लावलाच असता. प्रत्येकवेळी इतर पक्षांनी असे करून भाजप मात्र 'रिसिव्हिंग एन्डला' का? कधीतरी काँग्रेसलाही तीच दवा खिलवायला हवी या उद्देशाने हा निर्णय घेतला असेल ही शक्यता आहेच. दुसरे म्हणजे २०१४ मध्ये लोकसभेत काँग्रेसने सपाटून मार खाल्ल्यानंतर महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, आसाम, केरळ या राज्यांमध्ये जोरदार मार खाल्ला होता. आताही उत्तराखंडमध्ये असाच मार खाल्ला आहे. अशावेळी जर पंजाबबरोबरच गोवा आणि मणीपूर ही दोन राज्ये ताब्यात आली असती तर ते बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने काँग्रेससाठी मोठे मानसिक समाधान झाले असते. ते पण मिळवू द्यायचे नाही असे भाजपने ठरविलेले दिसत आहे. त्यातूनही या दोन राज्यांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले असते तर काहीच प्रश्न नव्हता.पण यावेळी त्रिशंकू विधानसभा आली आहे आणि भाजपच्या पाठीशी बहुमत उभे राहू शकत आहे. मणीपूरमध्ये तर एन.पी.एफ हा पक्ष शेजारच्या नागालँड राज्यात भाजपचा मित्रपक्षच आहे. त्या पक्षाचे चार आमदार भाजपला पाठिंबा द्यायला तयार आहेत. काही कारणांनी पासवानांच्या लोकजनशक्तीनेही मणीपूरमध्ये विधानसभेची एक जागा जिंकली आहे. तो पक्ष भाजपचा मित्रपक्षच आहे. तो पक्षही पाठिंबा द्यायला तयार आहे. असे करून बहुमत बनू शकत असताना काँग्रेसला तडाखा द्यायचा असे भाजपने ठरविले आहे असे दिसत आहे. याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतील? कदाचित या दोन्ही राज्यात भाजपची सरकारे अस्थिर राहतील. जर का ही सरकारे पडली तर त्याचा काँग्रेसला फायदा होऊ शकेल. पण ही राज्ये लहान असल्यामुळे तिथे काहीही झाले तरी राष्ट्रीय पातळीवर भाजपवर फार परिणाम होऊ नये. पण काँग्रेसची अवस्था सध्या इतकी वाईट आहे की ही दोन सरकारे ताब्यात असणेही मोठी दिलासादायक स्थिती असती. भरपूर पैसे राखून असलेल्याला हजार रूपये गेले तर त्याचा फार परिणाम होणार नाही पण तेच हजार रूपये फार पैसे नसलेल्याला खूप महत्वाचे असतील. काँग्रेसची अवस्था सध्या तशा फार पैसे नसलेल्यासारखी झाली आहे. त्यातूनच काँग्रेसमध्ये या प्रकारामुळे स्थानिक नेते नाराज आहेत अशा बातम्या आल्या आहेत. म्हणजे इतर राज्यांमध्ये निवडणुका होतील तेव्हा केंद्रीय नेतृत्व आपल्याकडे पाहिजे तितके लक्ष देईल की नाही हा किडा त्यातून इतर राज्यांमधील काँग्रेस नेत्यांमध्ये सोडता येऊ शकतो. त्यातून ते निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरतीलच असे नाही. हा प्रकार बॅकफायर झाला तर फार तर या दोन राज्यात काँग्रेस परत सत्तेत येऊ शकेल. पण जर का ही खेळी सफल झाली तर काँग्रेसला आणखी दणका मिळू शकेल. तेवढी राजकीय जोखीम उचलायची भाजपने ठरवलेले दिसते. आणि मोदी हा नेता अशा जोखमी घ्यायला तयार असतो हे वेळोवेळी दिसून आले आहेच. या निर्णयाचे केंद्र सरकारच्या कामावर काही प्रमाणात परिणाम नक्कीच होतील. ती पण जोखीम भाजपने घ्यायची ठरविलेले दिसते. एकूणच या निर्णयाचे राजकीय पैलू बघायला हवेत आणि ती जोखीम पक्ष घ्यायला तयार आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
आ
आनन्दा Tue, 03/14/2017 - 16:13 नवीन
सहमत आहे. तसेही माझ्या मते गोव्यात भाजपाला मतदारांनी नाकारले वगैरे नाहीये. हे सगळे अंतर्गत दुफळीचे परिणाम अहेत. विशेषतः वेलिंगकरांचा फत़आ भाजपाला बर्‍यापैकी बसला असे ऐकून आहे. त्यामुळे पर्रीकर जर परत येणार असतील तर गोव्याचे लोक पण त्यांचे स्वागतच करतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
द
दुश्यन्त Tue, 03/14/2017 - 13:34 नवीन
मुंबईमध्ये सेना आणि भाजपला जवळपास समान संधी होती मात्र भाजपने राज्य सरकारवर संकट येऊ नये म्हणूनच शेपूट घातले. पारदर्शी पहारेकरी वगैरे बोलायच्या गोष्टी असतात. सिंचन घोटाळ्याचे ढीगभर पुरावे (सोमय्या ,फडणवीस, गिरीश महाजन यांच्या मते) असून पण अजित पवार आणि तटकरेवर कारवाई होत नाही तर मग ज्या मुंबई पालिकेमध्ये मिळून सत्ता भोगली तिथली प्रकरण कशाला भाजप बाहेर काढेल हे सेनेला माहीत आहे. फडणवीसांनी राज्य सरकार स्थिर राहावे म्हणून मुंबईच्या लढाईमधून माघार घेतली यात खरी गोची झाली ती सोमय्या, आशिष शेलार वगैरेंची!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
वरुण मोहिते Mon, 03/13/2017 - 10:50 नवीन
चिक्कार उदाहरणं आहेत कि पक्ष आणि त्यासाठी त्याग करायची . पर्रीकर का अयोग्य . सरंक्षण मंत्र्याच्या हातातून राज्य जात कामा नये . केंद्रात परत येणार ते नक्की .
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 03/13/2017 - 12:12 नवीन
गोव्यात आम आदमी पक्षाचा पूर्ण बोर्‍या वाजला आहे. राणा भीमदेवी थाटात आपला पक्ष गोव्यातील ४० पैकी ३५ जागा जिंकेल असे केजरीवालांनी जाहिर केले होते. प्रत्यक्षात त्यांना अवघी ६.४% मते मिळाली आहेत. केवळ बाणावली मतदारसंघात त्यांचा उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर राहिला आहे. इतर सर्व मतदारसंघात आआपच्या उमेदवारांनी आपले डिपॉझिट गमावले आहे. यात कुंकोळीतून निवडणुक लढविणार्‍या आआपच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार एल्विस गोम्स यांचाही समावेश होतो. तिथे ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होऊन तो चौथ्या क्रमांकावर फेकला जाणे ही कोणत्याही पक्षासाठी फार उत्साहवर्धक गोष्ट नाही :) दिल्लीत एकदा अभूतपूर्व यश मिळाले म्हणजे आपण जाऊ तिथे सगळीकडे तसेच यश मिळेल असा त्यांचा गैरसमज झाला होता. मग त्यातून विविध इंटर्नल सर्व्हे प्रसिध्द केले जात होते. अशाच एका सर्व्हेमध्ये पंजाबमध्ये ११७ पैकी १०० जागा आआप जिंकणार तर गोव्यात तब्बल ४१% मते मिळणार असे इंटर्नल सर्व्हेंचे आकडे त्यांनी प्रसिध्द केले होते. या दणक्यानंतर थोडा तरी डोक्यात प्रकाश पडायला हवा.
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 03/13/2017 - 14:29 नवीन
या दणक्यानंतर थोडा तरी डोक्यात प्रकाश पडायला हवा. कुणाच्या डोक्यात प्रकाश पडायला हवा? केजरीवालांच्या? ते तर "स्वयंप्रकाशी तू तारा, चैतन्याचा गाभारा" ! ;) वास्तवीक प्रकाश पडायलाच हवा असेल तर तमाम आपसमर्थकांच्या डोक्यात पडला पाहीजे आणि जे अगदी आपसमर्थक नसतील पण "स्वयंप्रेरीत बुद्धीवादी" असतील त्यांच्या देखील डोक्यात प्रकाश पडला पाहीजे. त्याचा अर्थ असा देखील नाही की त्यांनी मोदीसमर्थक व्हावे. पण नुसती बदनामी करून, दुसर्‍या बाजूस तुच्छ लेखून, सामान्यांना चिथावून तुम्ही टिआरपी मिळवू शकाल पण मते नाही...आता, अल्पसंख्य, जातीय वगैरेचे राज-समाजकारण खूप झाले. नौटंकी मुख्यंत्र्यांचा हवाला देणे तर अतिच झाले आहे. हे जेंव्हा समजेल तेंव्हा कुठे एक नजिकच्या काळात एखादा सशक्त विरोधीपक्ष म्हणून आणि खूप पुढच्या भविष्यात समर्थ पर्याय म्हणून उदयाला येऊ शकेल , ज्याची लोकशाहीत गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा