Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी: भाग ६

ग
गॅरी ट्रुमन
Fri, 06/16/2017 - 17:28
🗣 309 प्रतिसाद
यापूर्वीच्या भागात ३०० प्रतिसाद आल्यामुळे नवा भाग काढत आहे. स्विस बँकांमध्ये दडविलेला 'काळा पैसा' हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा चर्चेचा विषय राहिला आहे. स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये पैसे ठेवले तर ठेवीदाराची माहिती गोपनीय ठेवली जात असल्यामुळे 'काळा पैसा' वाल्यांचे स्वित्झर्लंड हे नंदनवन होते असे नेहमीच म्हटले जाते. स्वित्झर्लंडने भारत आणि इतर काही देशांबरोबर आतापर्यंत गोपनीय असलेली माहितीची देवाणघेवाण करायच्या कराराला मान्यता दिली आहे. आणि २०१९ पासून भारताबरोबर या माहितीची देवाणघेवाण सुरू होईल असे म्हटले जात आहे. या माहितीची खरोखरच उपयुक्तता किती असेल हे बघायचे आणि उपयुक्त माहितीच स्वित्झर्लंडकडून दिली जाईल अशी अपेक्षा करू.

प्रतिक्रिया द्या
75991 वाचन

💬 प्रतिसाद (309)
अ
अमितदादा Sat, 07/01/2017 - 07:24 नवीन
चूक झाली मंगोलिया नाही ताजिकिस्तान. (खूप दिवसापूर्वी बातमी वाचलेली ). link "such as Tajikistan’s 2011 agreement to settle a land demarcation issue with China, in which the latter gained 1,000 sq km. This has been described as an ‘unofficial debt writing-off agreement’, although there is no documentary evidence of such deals."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
श
श्रीगुरुजी Sat, 07/01/2017 - 05:16 नवीन
.>>> सप्टेंबर-ऑक्टोबर १९६७ मध्ये नथु ला खिंडीच्या ठिकाणी भारतीय सैन्याने चीन्यांना ठोकले होते याविष याविषयी मी ओझरते वाचले आहे. १९६७ मध्ये चीनने पुन्हा एकदा हल्ला केला होता. त्यावेळी भारतीय सैन्याने १९६२ च्या तुलनेत खूपच प्रखर प्रतिकार केला होता. त्यावेळच्या चकमकीत भारतीय सैन्याच्या तुलनेत चिनी सैन्याचे जास्त नुकसान झाले होते. शेवटी काही दिवसानंतर चिनी सैन्याने माघार घेतली होती.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sat, 07/01/2017 - 05:35 नवीन
हो. भारताचे ५० जवान मेले. चीनचे १५० बहुधा. टेरिटरी कोणतीही गेली नाही चीनकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 07/01/2017 - 11:52 नवीन
१९६७ व २०१७ प्रमाणे १९८६ मध्ये देखील चीनने चावटपणा केला होता व भारतीय सैन्याच्या तयारीमुळे चीनचा कुटील हेतू उधळला गेला होता. http://www.idsa.in/idsacomments/CurrentChineseincursionLessonsfromSomdurongChuIncident_msingh_260413
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 07/01/2017 - 13:32 नवीन
चीन भारतावर आता हल्ला करेल तर / करेल का? या प्रशनाची उत्तरे या लेखात आहेत, आवश्य वाचावा असा लेख.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 07/01/2017 - 20:08 नवीन
केंद्रीय मंत्रीमंडळाने ऐअर इंडिया व AI Engineering Services Ltd, ground handling arm AI Transport Services Ltd, Alliance Air and the lowcost AI Express या ४ उपकंपन्यांचे खाजगीकरण करण्याला मान्यता दिली आहे. या कंपन्यांमधील सरकारचे १००% किंवा ७४% किंवा ५१% भांडवल विकून टाकले जाईल. हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. एअर इंडिया ही सरकारी विमान वाहतूक कंपनी बहुतेक वेळा तोट्यातच होती. या कंपनीवर ५२००० कोटी रूपयांहून अधिक कर्ज आहे. १९९१ नंतर खाजगी विमान कंपन्यांशी स्पर्धा सुरू झाल्यानंतर एअर इंडियाची अवस्था खूपच वाईट झाली होती. तरीसुद्धा आजवर कोणत्याही सरकारने एअर इंडिया विकून टाकण्याचे धाडस केले नव्हते. रालोआ सरकारने धाडस दाखवून हा निर्णय घेतला आहे. http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/cabinet-clears-privatisation-of-debt-ridden-air-india/articleshow/59361206.cms
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 07/01/2017 - 20:59 नवीन
बेस्ट झाले. नाहीतरी सुखासुखी धंदा सोडून फालतू राजकारणी नखऱ्यात लक्ष घातल्यावर दुसरे काय होणार. काढा मोडीत तिज्यायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गामा पैलवान Sat, 07/01/2017 - 21:03 नवीन
लोकहो, कविराजांनी शेवटी मागणी केलीच : http://www.esakal.com/desh/union-minister-bats-quota-indian-cricket-team-24354 माझ्यासारख्या द्रष्ट्या महापुरुषांस याची चाहूल लागली होतीच आधीपास्नं : http://www.misalpav.com/comment/901301#comment-901301 आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 07/02/2017 - 15:09 नवीन
तणाव अजून वाढला आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 07/02/2017 - 15:52 नवीन
अभिनेता मधुकर तोडरमल गेले.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Sun, 07/02/2017 - 18:28 नवीन
मनःपूर्वक श्रद्धांजली_/\_. अष्टपैलू व्यक्तिमत्व, सहज सुंदर अभिनय! चांदणे शिंपीत जा या चित्रपटातील गंभीर भूमिका असो कि तरुण तुर्क म्हातारे अर्क मधील विनोदी भूमिका असो, अत्यंत जिवंत अभिनय आणि तितकेच सुंदर लिखाण! (आडनाव तोरडमल असे आहे).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गामा पैलवान Sun, 07/02/2017 - 19:24 नवीन
श्रद्धांजली! -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
द
दशानन Sun, 07/02/2017 - 19:54 नवीन
मधुकर तोरडमल आज गेले, अनेक नाटके, चित्रपट व त्यांचे लेखन मागे राहिले.. श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/05/2017 - 17:32 नवीन
बंगाल मध्ये जातीय दंगल http://indianexpress.com/article/india/west-bengal-communal-clashes-baduria-basirhat-mamata-banerjee-bjp-hindu-muslim-president-rule-cpm-north-parganas-all-that-you-should-know-737377/
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 07/08/2017 - 08:33 नवीन
याविषयी भाऊ तोरसेकरांनी 'जमाते पुरोगामी' बेपत्ता? हा लेख लिहून पुरोगाम्यांचे ढोंग अगदी पूर्णपणे उघड पाडले आहे. एकूणच या पुरोगाम्यांचा---Hindu lives don't matter हा एक प्रचंड डोक्यात जाणारा दृष्टीकोन असतो. त्यातूनच हिंदू कट्टरतावादाला अधिकाधिक समर्थन मिळत जाते/गेले आहे हे काही यांना समजत नाही. अयोध्या प्रकरणापासून हिंदू कट्टरतावाद वाढला असे म्हणतात.पण तो का वाढला? मुळात अयोध्येत रामाचे मंदिर पाडून बाबराने मशीद बांधली ही अनेकांच्या मनात भळभळणारी जखम होती. अशावेळी आम्हाला मंदिर बांधायचे आहे ही मागणी पुढे आल्यावर या पुरोगाम्यांपैकी एकही माईचा लाल मशीद दुसरीकडे हलवा असे म्हणत पुढे आला नाही.तसे जर खरोखर झाले असते तर पुढचे सगळे 'रामायण' झालेच नसते आणि तोगाडिया एट ऑल अगदी पूर्णपणे निष्प्रभ ठरले असते. पण त्यांनी तसे केले नाही. आपसूकच हिंदू कट्टरतावाद्यांना मोकळे रान मिळाले. आजही गोरक्षकांनी केलेल्या हिंसाचाराविरूध्द हे मोठा आवाज उठवतात पण त्याचवेळी बंगालमधल्या घटनांविषयी अगदी पूर्ण शांतता बाळगतात. कालपरवाच लग्नाची मागणी पूर्ण करायला नकार दिलेल्या एका हिंदू मुलीला (एअर होस्टेस व्हायचे होते तिला) ठार मारले गेले. जर का अशा कृत्यांमध्ये आरोपी आणि व्हिक्टिम जर उलट्या क्रमाने असते तर या पुरोगाम्यांनी अगदी आकाशपाताळ एक केले असते. पण व्हिक्टिम हिंदू होती ना? मग कोण पर्वा करतो? ही पुरोगामी ही किड कायमची नष्ट व्हायला हवी. अन्यथा यापुढील काळात कट्टरतावाद अधिकाधिक वाढत जाणार आहे. आणि त्याबद्दल सामान्य लोकांना दोष तरी कोणत्या तोंडाने द्यायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 07/06/2017 - 13:08 नवीन
पंतप्रधान मोदी सध्या एस्राएलच्या ऐतिहासिक दौर्‍यावर आहेत. मोदींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीच्या अगदी सुरवातीपासून मोदी आणि इस्राएलचे पंतप्रधान बिन्यामीन नेतान्याहू एकमेकांचा उल्लेख "My friend" म्हणूनच करत आले आहेत. मागच्या वर्षी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी इस्राएलला भेट दिली तसेच इस्राएलच्या अध्यक्षांनीही भारताला भेट दिली. त्यानंतर ही भेट होणे अपेक्षित होते.या भेटीत दोन देशांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये सामंजस्यासाठी करार करण्यात आले आहेत. अगदी रोमन लोकांनी जेरूसलेम जिंकून घेतल्यानंतर ज्यू देशोधडीला लागले ते जवळपास २ हजार वर्षे अनेक देशांमध्ये भटकत होते. युरोपातील बहुतेक देशांमध्ये त्यांना दुय्यम स्थान मिळाले. त्याकाळी भारतात फार ज्यू आले अशातला भाग नाही.पण जितकेकितके ज्यू आले त्यांना भारतात कुठलाही त्रास देण्यात आला नाही. ज्यूंना अजिबात त्रास न देणारा भारत हा एकमेव देश असावा. तसेच दुसर्‍या महायुध्दाच्या काळात पोलंडमधून कोल्हापूरजवळच्या हातकणंगले येथे आणि गुजरातमध्ये जामनगर येथे काही ज्यू आले होते. त्यांची काळजी भारतात घेण्यात आली तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्थाही भारतात करण्यात आली होती.या कारणांमुळे इस्राएलमध्ये भारताविषयी थोडा आपलेपणा होताच. पण इतकी वर्षे पॅलेस्टाईन प्रश्नामुळे आणि अर्थातच शीतयुध्दामुळे भारत आणि इस्राएल यांच्यात तसा दुरावाच होता. १९९२ साली नरसिंह रावांच्या सरकारने इस्राएलबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित करून महत्वाचे पाऊल टाकले. त्यानंतर कारगील युद्धातही इस्राएलने भारताला मदत केली. आजही काश्मीरमध्ये घुसखोरीविरूध्द वगैरे बर्‍याच प्रमाणावर इस्राएली उपकरणांचा वापर आपण करतोच. सप्टेंबर २००३ मध्ये इस्राएलचे पंतप्रधान अरिएल शेरॉन यांची ऐतिहासिक भारत भेट झाली. नंतरच्या काळात मंत्री पातळीवर भेटी होत राहिल्या.पण पंतप्रधानांची ही पहिलीच भेट असल्यामुळे या भेटीचे महत्व आहेच. इस्राएलकडून संरक्षणसिध्दता, कृषी, जलसिंचन इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे. पूर्वी इस्राएलमध्ये बॉम्बस्फोट झाल्याच्या बातम्या अगदी एकादिवसाआड यायच्या. किंबहुना अशाच एका हल्ल्यानंतर अरिएल शेरॉन भारत दौर्‍यावरून लवकर परत गेले होते. आता तसे होताना दिसत नाही. इस्राएलने त्यासाठी नक्की काय केले हे आपल्याला शिकता येईलच. त्या दृष्टीने भारत आणि एस्राएल यांच्यात मैत्री वाढणे गरजेचे आहे. मोदींची ही भेट केवळ इस्राएलपुरती मर्यादित आहे. ते रमाल्लाला जाऊन पॅलेस्टिनी नेत्यांची भेट घेणार नाहीत हे विशेष महत्वाचे आहे. पॅलेस्टिनी ऑथोरीटीचे अध्यक्ष दोन महिन्यांपूर्वीच भारत भेटीवर आले असल्यामुळे ही 'रिटर्न व्हिजिट' होईल असे वाटले होते. पण तसे होताना दिसत नाही. भारताच्या एकूणच धोरणात हा मोठा बदल म्हणायला हवा. २०१४ मध्ये इस्राएलने गाझावर हल्ला केल्यावर भारतातील डावे विचारवंत मागणी करू लागले होते की भारताने इस्राएलकडून काहीही आयात करू नये आणि त्या देशावर पूर्ण बहिष्कार टाकावा. चीनने मसूद अझरला संरक्षण दिले किंवा आपली एन.एस.जी ची वाट रोखल्यावर चीनी मालावर बहिष्कार टाकावा अशी मागणी केल्यावर त्या मागणीची टिंगल करण्यात हेच विचारवंत सगळ्यात पुढे असतात. इस्राएलने पॅलेस्टिनींवर अन्याय-अत्याचार केले आहेत का? नक्कीच. त्याबद्दल आपण इतकी वर्षे पॅलेस्टिनींना समर्थन देत आलोच आहोत. पण त्यांनी आपल्याला किती वेळा काश्मीर प्रश्नावर ओ.आय.सी मध्ये समर्थन दिले? किती वेळा भारताच्या बाजूने आवाज उठवला? एकदाही नाही. इतकेच नव्हे तर १९९८ मध्ये पाकिस्तानने अणुचाचण्या केल्यानंतर त्या अणुचाचण्यांचे यासर अराफात यांनी समर्थन केले होते. http://www.rediff.com/news/1998/jul/14bomb1.htm . तसेच यासर अराफात यांनी---There was a very positive and strong reaction from the Muslim world to Pakistan's nuclear tests असेही म्हटले होते. अराफात तर गेलेच. सध्याचे पॅलेस्टिनी नेतृत्व अराफातपेक्षा जास्त कट्टर आहे. असल्या लोकांवर इस्राएल अन्याय करतो म्हणून आपण त्या देशाकडून महत्वाची संरक्षणविषयक उपकरणे घ्यायची नाहीत आणि पर्यायाने भारतीय नागरिकांचा बळी द्यायचा!! ही असली बौध्दिक दिवाळखोरी डावे विचारवंत सोडून इतर कोणाला जमेल असे वाटत नाही. असो. मोदींच्या या भेटीनंतर नेतान्याहू भारतात येणार आहेत. त्यांना २०१८ च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणूनच बोलावावे. आणि भारत-इस्राएल मैत्री अधिकाधिक घट्ट होत जावी ही सदिच्छा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 07/08/2017 - 19:49 नवीन
मोदी इस्राईल व नंतर ग-२० परीषदेसाठी जर्मनीच्या दौर्‍यावर असताना, "मोदी चीनच्या आक्रमणावर गप्प का?" असे ट्विट राहुल गांधीने केले आहे. राहुल १६-१७ जूनपासून भारताबाहेर होता. २-३ जुलैला तो परत आला. त्याच्या परदेशवारीच्या दरम्यान भारतात व भारताबाहेर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. भारतात राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्ष प्रयत्न करीत होते. परंतु या महत्त्वाच्या घडामोडीत राहुलचा सहभाग नव्हता. याच काळात वस्तू आणि सेवाकर विधेयक १ जुलैपासून देशात लागू झाले. त्यानिमित्त झालेल्या समारंभावर काँग्रेसने बहिष्कार टाकला. याच काळात मोदी आधी अमेरिका दौर्‍यावर होते व नंतर ते इस्राईल दौर्‍यावर जाऊन शेवटी ग-२० परीषदेसाठी जर्मनीला गेले. याच काळात भूतानच्या सीमावर्ती भागात चीनने नेहमीप्रमाणे दांडगाई करून रस्ते बांधायला सुरूवात केल्यानंतर त्यावर भारतीय सैन्याने आक्षेप घेतल्याने तणावाची व युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून ती अजून टिकून आहे. अशा काळात सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचा नेता, जो त्या पक्षाचा भावी पंतप्रधानपदाचा उमेदवार आहे, तो देशाबाहेर पर्यटनासाठी गेला होता. या काळातील कोणत्याही महत्त्वाच्या घडामोडीत त्याचा सहभाग नव्हता, परंतु परत आल्यानंतर त्याने जी मुक्ताफळे उधळायला सुरूवात केली आहे त्यामुळे त्याच्या अपरिपक्वतेची पुन्हा एकदा खात्री झाली. परदेशातून परत आल्यावर लगेचच त्याने "जी एस टी म्हणजे गयी तुम्हारी सेव्हिंग" असे बाष्कळ ट्विट केले. हे वस्तू आणि सेवा कर विधेयक आपल्याच पक्षाचे अपत्य आहे असा खोटा दावा तो आणि त्याचा पक्ष करीत असतो. याच विधेयकाला त्याच्या पक्षाने संसदेत पाठिंबा दिला आहे. जर हे विधेयक म्हणजे गयी तुम्हारी सेव्हिंग असेल तर अशा विधेयकाचे हे पालक का होते व अशा विधेयकाला यांनी पाठिंबा का दिला हा प्रश्न लगेच पडतो. मोदी इस्राईलच्या दौर्‍यावर असतानाच याने "भारताला एक दुर्बल पंतप्रधान लाभला आहे" असे ट्विट करून आपली अपरिपक्वता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली. देशाचा पंतप्रधान दुसर्‍या देशाच्या अधिकृत दौर्‍यावर असताना सर्वात मोठ्या विरोधी पक्षाने अत्यंच चुकीच्या वेळी अशी टीका करणे हे हानिकारक ठरू शकते. आपल्या देशाची बाजू समोरच्या देशाच्या तुलनेत एकदम कमजोर होऊ शकते याचा या व्यक्तीला गंधच नाही. २०१३ मध्ये मनमोहन सिंग संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक अधिवेशनाला अमेरिकेत असताना यानेच त्यांच्या सरकारने काढलेल्या अध्यादेशाची नॉनसेन्स अशी संभावना करून तो अध्यादेश फाडून कचर्‍यात टाकण्याच्या लायकीचा आहे असे सांगितले होते. गंमत म्हणजे त्याच्याच पक्षाचे अजय माकन अध्यादेशाच्या समर्थनार्थ पत्रकार परीषद घेत असताना याने मध्ये घुसून अध्यादेशावर कडक टीका करून काँग्रेसची व परदेशात असलेल्या मनमोहन सिंगांची अडचण करून टाकली होती. आता मोदी इस्राईल व नंतर ग-२० परीषदेसाठी जर्मनीच्या दौर्‍यावर असताना, "मोदी चीनच्या आक्रमणावर गप्प का?" असे अत्यंत चुकीचे ट्विट राहुलने केले आहे. हा प्रश्न दोन्ही देशातील लष्कर हाताळत असताना यात राजकीय नेत्यांनी पडण्याची अजूनतरी आवश्यकता अजिबात नाही. किंबहुना पंतप्रधानांनी यात जाहीररित्या लक्ष घालणे म्हणजे या प्रश्नाला अवास्तव महत्त्व देण्यासारखे आहे. भारतीय लष्कर हा प्रश्न अत्यंत योग्य रितीने हाताळत आहे. चीनच्या एकही धमकीला न जुमानता भारताने खंबीर भूमिका घेऊन चीनची अडचण केली आहे. त्यामुळे बिथरून जाऊन चीन रोज एक नवीन धमकी देत आहे. यावर अरूण जेटलींनी अत्यंत समर्पकपणे "चीनने हे लक्षात घ्यावयास हवे की २०१७ मधील भारत हा १९६२ मधील भारत नाही" अशी अत्यंत अर्थपूर्ण प्रतिक्रिया देऊन भारताची भूमिका स्पष्ट केली होती. चीनचे पंतप्रधानही अजून गप्प आहेत. कोणत्या प्रसंगी बोलायचे व कोणत्या प्रसंगी गप्प रहायचे हे परिपक्व नेत्यांना चांगले माहिती असते. दुर्दैवाने परिपक्वता व राहुल यांचा ३६ चा आकडा असल्याने तो सातत्याने अशी मुक्ताफळे उधळून स्वतःचे हसू करून घेत असतो. २०१९ मधील मोदींचे संभाव्य प्रतिस्पर्धी पाहिले तर ती निवडणुक मोदींना किती सोपी ठरणार आहे हे लक्षात येते. केजरीवाल, मोदी, अखिलेश, राहुल इ. नेते मोदींच्या पासंगालाही पुरत नाहीत. मुलायम व मायावती यांची सद्दी संपुष्टात आली आहे. नितीशकुमार इतर पक्षांच्या मदतीशिवाय काहीही करू शकत नाहीत व तसेही बिहारच्या बाहेर त्यांना स्थान नाही. मोदींच्या तोडीचा एकही नेता आज भारतात नाही ही निदान आजतरी वस्तुस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 07/06/2017 - 13:43 नवीन
हे खरे तर "ताज्या घडामोडी" या धाग्यात फिट नाही पण अन्य कुठला योग्य धागा न मिळाल्यामुळे इथेच लिहित आहे. मनोहर पर्रिकरांनी १४ मार्चला गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची तर योगी आदित्यनाथ यांनी १९ मार्चला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच १९ मार्चलाच केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांनी उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घ्यायच्या वेळी या चौघांपैकी कोणीही गोवा किंवा उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेलेले नव्हते. मनोहर पर्रिकर राज्यसभेचे सदस्य आहेत तर योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे आणि केशवप्रसाद मौर्य उत्तर प्रदेशातीलच फूलपूरचे लोकसभा खासदार आहेत. दिनेश शर्मा कुठल्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. राज्यघटनेतील तरतुदींप्रमाणे मनोहर पर्रिकरांना १४ सप्टेंबरपूर्वी गोवा विधानसभेचे तर योगी आदित्यनाथ, केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांना १९ सप्टेंबरपूर्वी उत्तर प्रदेश विधानसभा/विधानपरिषदेचे सदस्य व्हावे लागेल. तसेच मोहसीन राझांसारखे इतर काही मंत्रीही उत्तर प्रदेश विधीमंडळाचे सदस्य नाहीत.त्यांना १९ सप्टेंबरपूर्वी सदस्य व्हावे लागेल. या दृष्टीने अजून पर्यंत कोणतीही हालचाल सुरू झालेली दिसत नाही. बहुदा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांचे मतदान पार पडले की मग मनोहर पर्रिकर राज्यसभेतून आणि आदित्यनाथ-केशवप्रसाद मौर्य लोकसभेतून राजीनामे देतील. काँग्रेसच्या विश्वजीत राणेंना भाजपने फोडले आहे. त्यांची इच्छा असल्यास त्यांना राज्यसभेवर आणि त्यांच्या वाळपोई या जागेवरून पर्रिकर विधानसभेची निवडणुक लढवतील. अन्यथा दुसर्‍या कोणा भाजप आमदाराला राजीनामा द्यावा लागेल आणि त्या जागेवरून पर्रिकर पोटनिवडणुक लढवतील आणि संबंधित आमदाराला राज्यसभेवर पाठविले जाईल. साधारणपणे असेच उत्तर प्रदेशात होईल. आदित्यनाथ आणि केशवप्रसाद मौर्यांना विधानसभेवर जायचे असेल त्यांच्या अनुक्रमे गोरखपूर आणि फूलपूर लोकसभा मतदारसंघातील एखाद्या विधानसभा मतदारसंघातून उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेलेला एखादा आमदार राजीनामा देईल. हे आमदार लोकसभेची तर आदित्यनाथ-मौर्य विधानसभेची पोटनिवडणुक लढवतील. प्रश्न हा की हे सगळे करायला आता पुरेसा वेळ उरला आहे का? कारण जरी सभागृहाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला तरी विधानसभा/लोकसभा अध्यक्षांनी जागा रिकामी झाली हे नोटिफिकेशन निवडणुक आयोगाकडे पाठविणे, मग पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करणे, त्यानंतर नियमानुसार अधिसूचना जारी करून प्रचारासाठी १४ दिवस देणे या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील. त्यात पाऊस लक्षात घेता निवडणुक आयोगाने ऑगस्टमध्ये पोटनिवडणुक घेतली तरी ती महिन्याचा अगदी शेवटी किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल. म्हणजे अगदीच कट टू कट प्रकार असेल हा. या दृष्टीने अजून तरी काहीही हालचाल दिसत नाही. तसेच संबंधित सदस्यांनी आपल्या आमदारकीचा/खासदारकीचा राजीनामा दिल्याशिवाय निवडणुक आयोग पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करू शकत नाही. त्यातच काही कारणाने (कुणा उमेदवाराचे निधन वगैरे) पोटनिवडणुक पुढे ढकलायला लागली तर मात्र अडचण येईल. नरसिंह राव जून १९९१ मध्ये पंतप्रधान झाले त्यावेळी ते संसदेचे सदस्य नव्हते. त्यांनी नोव्हेंबर १९९१ मध्ये आंध्र प्रदेशातील नंद्यालमधून लोकसभेची पोटनिवडणुक लढवली होती. त्याबरोबरच महाराष्ट्रात बारामती (संरक्षणमंत्री शरद पवार तिथून निवडून गेले), नवी दिल्ली आणि इतर काही लोकसभा मतदारसंघांमध्येही पोटनिवडणुक जाहिर झाली होती. नवी दिल्लीमध्ये काँग्रेसचे राजेश खन्ना विरूध्द भाजपचे शत्रुघ्न सिन्हा हा बॉलिवूड सामना होता. मतदानापूर्वी काही दिवस मुकेशकुमार गर्ग या अपक्ष उमेदवाराचे निधन झाले आणि नवी दिल्लीतील पोटनिवडणुक पुढे ढकलावी लागली होती. ती नंतर जून १९९२ मध्ये झाली. त्यावेळी नंद्यालमध्येही कुणा उमेदवाराचे निधन वगैरे झाल्यास काय होईल या चिंतेने सरकारी यंत्रणेची झोप उडली होती. नशीबाने तसे काही झाले नाही. पण अगदी कट टू कट टाईमलाईन्स ठेवल्यास ही टांगती तलवार मात्र लटकत राहिलच.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 07/08/2017 - 16:14 नवीन
नेमकं व समर्पक निरीक्षण आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ख
खेडूत Sat, 07/08/2017 - 17:29 नवीन
राज्यसभा आणि विधानपरिषदेचा टप्पा त्याआधी येत असेल कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Sun, 07/09/2017 - 12:39 नवीन
विधानपरिषदेवर काही सदस्य विधानसभेतून निवडून जातात तर काही स्थानिक स्वराज्यसंस्था, शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ इत्यादीतून निवडून जातात. त्यापैकी विधानसभेतून विधानपरिषदेवर निवडून जाणार्‍या सदस्यांच्या निवडणुका दर सम वर्षी होतात. त्या आता २०१८ मध्ये होतील. स्थानिक स्वराज्यसंस्था, शिक्षक, पदवीधर इत्यादी जागांच्या विधानपरिषदेच्या निवडणुका कदाचित होणार असतीलही. पण तरीही कुठलीही निवडणुक असली तरी टाईमलाईन्स साधारण सारख्याच असतात. अरूणाचल प्रदेशात 'पक्के केसांग' या विधानसभा जागेवर पोटनिवडणुक होणार आहे. त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे : अधिसूचना जारी: ५ जुलै उमेदवार अर्ज भरायचा शेवटचा दिवसः १२ जुलै उमेदवारी अर्जांची छाननी: १३ जुलै उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवसः १५ जुलै मतदानः २९ जुलै मतमोजणी: ३ ऑगस्ट विधानपरिषदेसाठी मतदान असले तरी त्याच्या टाईमलाईन्स साधारण अशाच असतात. समजा मतमोजणी ३ ऑगस्टला न ठेवता ३१ जुलैला ठेवली असती तरी अधिसूचना जारी केल्यापासून किमान २६ दिवस निवडणुक प्रक्रीयेला लागतील. तसेच निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर केल्यापासून किती दिवसांनी अधिसूचना जारी केली जाते हे पण बघायला हवे. मधल्या काळात पाऊस असल्यामुळे निवडणुक आयोग पावसाच्या काळात कधी निवडणुक घेत नाही (१९९९ मध्ये लोकसभा एप्रिल १९९९ च्या शेवटच्या आठवड्यात बरखास्त झाली तरी प्रत्यक्ष मतदान सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झाले होते याच कारणामुळे). पर्रीकरांना १४ सप्टेंबरपर्यंतच वेळ आहे तर आदित्यनाथ-केशवप्रसाद मौर्य-दिनेश शर्मांना १९ सप्टेंबरपर्यंत वेळ आहे. त्यामुळे थोडा कट-टू-कट प्रकार होणार असे वाटत आहे. अर्थातच हे लक्षात न घेण्याइतके भाजपवाले कच्चे नक्कीच नाहीत. पण तरीही कुणा उमेदवाराचे निधन वगैरे होणे या गोष्टी कोणाच्याही हातात नसतात हे पण तितकेच खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
ग
गॅरी ट्रुमन Sun, 07/09/2017 - 12:43 नवीन
आजच बातमी आली आहे की माओवादी-नक्षलवादी हिंसाचाराने गेल्या २० वर्षात १२ हजार बळी घेतले आहेत. http://timesofindia.indiatimes.com/india/maoists-violence-claim-12000-lives-in-2-decades/articleshow/59513547.cms एकीकडे जनेयुसारख्या फालतू ठिकाणी बसून नक्षलवाद्यांचे समर्थन करायचे, त्यांना 'बंदुका घेतलेले गांधीवादी' म्हणायचे आणि त्याचवेळी गेल्या २ वर्षात गोरक्षकांमुळे २४ लोक मारले गेल्यानंतर भारत 'लिंच रिपब्लिक' कसा झाला (आणि त्याचवेळी त्यापेक्षा कितीतरी जास्त हिंदू लोक अशा लिंचिंगचे बळी पडले आहेत याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे) आहे याचे आकांडतांडव करणारे लोक बघितले की खरोखरच तळपायाची आग मस्तकात जाते. सर्जिकल स्ट्राईक्स पी.ओ.के मध्ये नाही तर इथेच दिल्लीमध्ये जनेयु किंवा इंडिया इंटरनॅशनल सेंटर यासारख्या ठिकाणी करायला हवेत असे फार फार वाटते.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Sun, 07/09/2017 - 16:24 नवीन
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या मार्गावर http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/radhakrushan-patil-indicate-to-joining-bjp/articleshow/59506794.cms
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 07/09/2017 - 19:03 नवीन
करून करून भागले अन देवपूजेला लागले. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया
ग
गॅरी ट्रुमन Mon, 07/10/2017 - 13:43 नवीन
आज सकाळपासून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे भारतातील चीन आणि भूतानच्या वकिलांना भेटले याविषयी उलटसुलट बातम्या येत होत्या. पण ही बातमी आता काँग्रेस पक्षाने मान्य केली आहे असे दिसते. http://www.ndtv.com/india-news/chinese-embassy-claims-then-deletes-that-rahul-gandhi-met-ambassador-1722875 कोणाही संसदसदस्याला किंवा राजकीय पक्षाच्या नेत्याला परराष्ट्रमंत्रालयाला अंधारात ठेऊन परस्पर परदेशी वकिलाला भेटता येते का? हा प्रकार संशयास्पद वाटत आहे. विशेषतः चीनशी सीमेवर तणाव असताना.
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 07/10/2017 - 13:55 नवीन
हे कधी घडले??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Mon, 07/10/2017 - 16:45 नवीन
राहुल गांधी म्हणे ८ तारखेला या वकिलांना भेटले. आज चीनी वकिलातीच्या वेबसाईटवर अशी भेट झाली अशी बातमी झळकली पण नंतर ती काढून टाकण्यात आली. त्यावर गदारोळ उडायला सुरवात झाल्यावर काँग्रेसने सुरवातीला त्या बातमीचे खंडन केले. रणदीप सुरजेवालांनी नेहमीप्रमाणे आपल्या पध्दतीने अशी कोणती भेट झालीच नाही असे म्हटले. पण नंतर काँग्रेसने अशी भेट झाल्याचे मान्य केले. राहुल गांधींनी पुढील टिवटिवाट करून आपण 'माहिती मिळवायला' भेटलो होतो असे म्हटले.

It is my job to be informed on critical issues. I met the Chinese Ambassador, Ex-NSA, Congress leaders from NE & the Bhutanese Ambassador

— Office of RG (@OfficeOfRG) July 10, 2017
जर का माहिती घ्यायची होती तर भारत सरकारमधील सूत्रे सोडून डायरेक्ट चीनी वकिलाला भेटायचे काय काम? आणि जर का यांना भेटीमध्ये काहीही लपविण्यासारखे नव्हते तर भेट झाल्याची बातमीच २ दिवस बाहेर न आणणे, मग भेट झाल्याचेच नाकारणे इत्यादी नाटके कशाकरता? हे प्रकरण वाटते तितके साधे दिसत नाही. मोदींना विरोध करायला कोणत्याही थराला जातील हे लोक. मुळातच कोणाही राजकीय पक्षाच्या नेत्याने भारत सरकारच्या परराष्ट्रमंत्रालयाला बायपास करून सीमेवर तणाव असताना चीनच्या वकिलाची परस्पर भेट घेणे सर्वार्थाने गैर आहे. यावर काँग्रेस समर्थक काहीही बोलले तर खरोखरच आश्चर्य वाटेल. आणि असलेच लोक इतरांना 'भक्त' वगैरे म्हणत असतात. अनेक लोक प्रश्न विचारतात की मोदींनी 'काहीही केले नाही' तरीही मोदींना इतका पाठिंबा कसा मिळतो. त्याला उत्तर हे असले विरोधक आहेत. देशाचे तुकडेतुकडे व्हावेत अशी इच्छा धरणार्‍याला अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून हे डोक्यावर घेतात, पाकिस्तानात जाऊन मणीशंकर अय्यरसारखे लोक 'मोदींना हटविले पाहिजे' असे म्हणतात. सामान्य जनता सूज्ञ आहे. ती काही सुशिक्षित नाही. त्यामुळे असले प्रकार करणे हा शुध्द शब्दात देशद्रोह आहे हे सुशिक्षितांना कळले नाही तरी सामान्य लोकांना व्यवस्थित कळते. मोदी विरोधात असले विरोधक हा सामना असेल तर कोणाच्या बाजूला उभे राहायचे हा प्रश्न सुशिक्षितांना पडला तरी सामान्यांना पडत नाही हेच देशाचे सुदैव म्हणायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
म
मोदक Mon, 07/10/2017 - 17:31 नवीन
नितीन थत्तेंच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अभ्या.. Mon, 07/10/2017 - 17:44 नवीन
भारतातल्या कुणा नागरिकाने परकीय देशाच्या वकीलाची गाठभेट घेऊच नये असा नियम असला तर राहुलजींचे चुकलेच, पण... काय फरक पडणारे असा? अशा गाठेभेटीने काही होत असले तर आज गेलाबाजार युपीचे तरी शीयेम असते ते. ;) खरेतर चीनी वकीलालाच कळायला पाह्यजे हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Tue, 07/11/2017 - 06:47 नवीन
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार आज जाहिर केला जाईल अशा बातम्या आहेत. गेल्या ३ वर्षातले चित्र असे आहे की मोदी पहिल्यांदा काहीतरी पाऊल उचलणार आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून विरोधी पक्ष काहीतरी करणार. विरोधी पक्षांनी पुढाकार घेऊन पहिले पाऊल उचलले आणि त्याला काय प्रत्युत्तर द्यायचे यावरून मोदींची तारांबळ उडली आणि नक्की काय प्रत्युत्तर द्यावे हे मोदींना समजेनासे झाले असे गेल्या तीन वर्षात एकदाही झालेले नाही. जर एन.डी.ए चा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहिर व्हायच्या आत विरोधी पक्षांनी आपला उमेदवार जाहिर केला तर गेल्या तीन वर्षात प्रथमच विरोधी पक्षांनी पहिल्यांदा कुठलेतरी पाऊल उचलले असे म्हणायला हवे. त्यातही अण्णा द्रमुक आणि/किंवा बिजू जनता दलाचा पाठिंबा मिळाल्यास एन.डी.ए ला उपराष्ट्रपतीपदावर आपला उमेदवार निवडून आणता येणे खूपच सोपे जाईल. या निवडणुकांमध्ये केवळ लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य मतदान करतात. लोकसभेत आधीच ३३५ तर राज्यसभेत ७५ च्या आसपास सदस्य एन.डी.ए चे आहेतच (म्हणजे एकूण ४१०). शिवसेनेचे लोकसभेतील १८ आणि राज्यसभेतील ३ सदस्य जमेस धरले नाहीत तर ३८९ सदस्य एन.डी.ए कडे आहेत. ती भरपाई अण्णा द्रमुक आणि/किंवा बिजू जनता दलाचे सदस्य करू शकतील. लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य मिळून एकूण ७९५ सदस्य आहेत. म्हणजेच या निवडणुकांमध्येही एन.डी.ए चे पारडे जड आहे. विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकीत नितीशकुमार जाणार नाहीत अशाही बातम्या आहेत. त्यातूनच मुळातच विरोधी पक्षांची एकजूट तकलादू आहे हे पण चित्र मतदारांपुढे आतापासूनच जात आहे. विरोधी पक्षांसाठी हे चांगले संकेत नाहीत.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Tue, 07/11/2017 - 07:13 नवीन
नि. कु. हे केवळ हूल देत आहेत विरोधी पक्षांना, विशेषतः लालुप्रसादांना. ते परत भाजपा गटात परतले तर राजकीय कारकिर्द धोक्यात येऊ शकते. हा बनाव केवळ बिहार सरकारमध्ये शिरजोर होऊ पहाणार्‍या लालू पुत्रांचे/लालुचे पंख कापणासाठी आहे.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Tue, 07/11/2017 - 07:13 नवीन
http://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/state-wants-centres-nod-for-a-noisier-ganeshotsav/articleshow/59536293.cms समान्यांनी कर्कश्य आवाज ऐकण्याची तयारी करावी
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 07/11/2017 - 08:17 नवीन
लोकहो, काश्मीर भारतात आहे की पाकिस्तानात असा प्रश्न पडला आहे. अमरनाथ यात्रेवर हल्ला होऊन सात भाविकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यात पालघरच्या दोन स्त्रियांचा समावेश आहे. त्यांची नावं निर्मालाबेन ठाकोर व उषा सोनकर अशी आहेत. अधिक माहिती : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/amarnath-attack-two-women-killed-in-palghar-7-injured/articleshow/59540439.cms http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/terror-attack-on-amarnath-pilgrims-carried-out-by-let-masterminded-by-pakistani-terrorist-ismail/articleshow/59540024.cms यावर उपाय म्हणून हजसाठी मुंबईतून एकही प्रवासी जाता कामा नये. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 07/11/2017 - 12:44 नवीन
यावर उपाय म्हणून हजसाठी मुंबईतून एकही प्रवासी जाता कामा नये. पूर्वी बाळ ठाकरे मातोश्रीवर वातानुकुलीत खोलीत बसून श्वेत वाईनचे घुटके घेत "मुंबईतून एकही प्रवासी हाजला जाऊन देणार नाही" अशा धमक्या 'सामना'तून द्यायचे. आता अशा धमक्या इंग्लंडहूनही यायला लागल्या आहेत असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गॅरी ट्रुमन Tue, 07/11/2017 - 09:37 नवीन
पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार असतील अशी बातमी आली आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 07/11/2017 - 12:31 नवीन
राहुल गांधीने ३ दिवसांपूर्वी चीनच्या राजदूतांची गुपचुप भेट घेतल्याचे बाहेर आले आहे. काल चीनच्या संकेतस्थळावर या भेटीचे वृत्त व प्रकाशचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर हे उघड झाले. या भेटीचे वृत्त वृत्तवाहिन्यांवरून प्रसिद्ध झाल्यानंतर काही पत्रकारांनी कॉंग्रेस प्रवक्ते रणजित सुरजेवाला यांना या भेटीबद्दल विचारल्यावर त्यांनी अशी भेट झाल्याचे नाकारले व त्याचबरोबर या बातमीची 'फेक न्यूज' अशी संभावना करून काही भक्त वाहिन्या खोट्या बातम्या पसरवित असल्याचा आरोप केला. दरम्यानच्या काळात चीनच्या संकेतस्थळावरून या भेटीचे वृत्त व राहुलचे चीनच्या राजदूताबरोबर असलेले प्रकाशचित्र हटविण्यात आल्यामुळे या भेटीत एकंदरीत काहीतरी काळेबरे आहे असा संशय येऊ लागला. नंतर संध्याकाळी अचानक रणजित सुरजेवालाने अशी भेट झाल्याचे कबूल केले व अशी भेट घेण्यात चुकीचे काय असा प्रश्न विचारला. भेट घेतली असताना अशी लपवाछपवी करण्याचे काय कारण होते? नक्कीच काहीतरी गडबड आहे. नंतर राहुलने ट्विटरवर अशी भेट झाल्याचे कबूल करून त्याचे समर्थन केले. ग-२० परीषदेत मोदी सुद्धा चीनच्या पंतप्रधानांना भेटले. भारताचे तीन मंत्री नुकतेच चीनला जाऊन आले. मग मी काय चुकीचे केले? घडत असलेल्या घटनांची माहिती मिळविणे हा माझा हक्क आहे. म्हणून मी चीनच्या राजदूताला भेटलो. माझ्याबरोबर माजी संरक्षण सचिव शिवशंकर मेनन सुद्धा होते असाही खुलासा त्याने केला. हे करीत असतानाचा त्याने शी जिनपिंग २०१४ मध्ये भारत दौर्‍यावर आले असताना त्यांचा व मोदींचा झोपाळ्यावर बसलेला एकत्रित फोटो प्रसिद्ध करून "देशाच्या सीमेवरून १ हजार चिनी सैनिक भारतात घुसलेले असताना मी असा झोपाळ्यावर बसत नाही" अशी उपरोधिक पण अत्यंत मूर्खपणाची कॉमेंट त्याने टाकली. हा सर्व प्रकार अत्यंत संशयास्पद आहे. राहुल हा कोणत्याही अधिकृत सरकारी पदावर नाही. तो विरोधी पक्षनेता नाही. त्याचा पक्ष हा अधिकृत विरोधी पक्ष नाही. तो त्याच्या पक्षाचा प्रमुख नाही. असे असताना तो कोणत्या अधिकाराने एका परदेशी राजदूताला भेटला? त्यांचे नक्की काय बोलणे झाले? त्याने आपल्या भेटीची माहिती परराष्ट्र मंत्रालयाला का दिली नाही? भेटीत काय बोलणे झाले त्याची माहिती त्याने परराष्ट्र मंत्रालयाला का दिली नाही? मुळात चीनच्या राजदूताला तो असा गुपचूप का भेटला व नंतर भेटीची माहिती प्रसिद्ध झाल्यावर का लपवाछपवी सुरू होती? यापेक्षाही धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याच्याबरोबर माजी संरक्षण सचिव शिवशंकर मेनन सुद्धा होते. या व्यक्तीने चीनच्या राजदूताला का भेटावे? मागील ३-४ आठवड्यांपासून भारत-चीन सीमेवर तणाव आहे. दोन्ही देशांनी आपल्या सैन्याच्या तुकड्या सीमेवर उभ्या केलेल्या आहेत. चीन रोज एक नवीन युद्धाची धमकी देत आहे. अशा परिस्थितीत माजी संरक्षन सचिवाने चीनच्या राजदूताला भेटणे ही अत्यंत गंभीर घटना आहे. माजी संरक्षण सचिव या नात्याने शिवशंकर मेनन यांना अनेक संरक्षण गुपिते माहित असणार आहेत. सीमेवर सैन्य समोरासमोर असताना अशा महत्त्वाच्या पदावरील माणूस चीनच्या राजदूताला नक्की कशासाठी भेटतो हे समजणे अत्यावश्यक आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शिवशंकर मेनन यांना तातडीने ताब्यात घेऊन भेटीत नक्की काय झाले ही संपूर्ण माहिती मिळविली पाहिजे. गरज पडल्यास सीबीआयच्या ताब्यात देऊन, नार्को चाचणी वगैरे करून त्यांनी चीनच्या राजदूताला नक्की काय सांगितले हे शोधून काढले पाहिजे. या सर्व प्रकारात कॉंग्रेसची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे. मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर काँग्रेस अत्यंत हतबल अवस्थेत आहे. सत्तेवर परत येण्याची सुतराम शक्यता नाही. मोदींनी अतिशय चतुराईने काँगेस संपवित आणली आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे सत्तापिपासू नेते अस्वस्थ आहे. मोदींना घालवून सत्तेवर येण्यासाठी काहीही करण्याची, वेळ पडली देशहिताचा बळी देण्याची त्यांची तयारी आहे. २०१६ मध्ये कॉंग्रेसचे सलमान खुर्शिद व मणी शंकर अय्यर पाकिस्तानमध्ये गेले होते. शांतत चर्चा परत सुरू करायची असेल तर मोदींना घालवा असे त्यांनी जाहीरपणे पाकिस्तानमध्ये सांगितले. राहुलने चीनच्या राजदूताला असेच काहीतरी सांगितले असावे का? तुम्ही मोदींना घालवा, म्हणजे सिक्कीम, अरूणाचल प्रदेश, भूतान इ. भाग तुम्हाला विनासायास घशात घालता येतील असा तो संदेश असेल का? किंवा तुम्ही भारतावर हल्ला करा, म्हणजे मोदींना घालविणे सोपे जाईल अशी ऑफर होती का? कदाचित चीनच्या राजदूताने असे सांगितले असेल की 'राहुलबाबा, तुझ्या पणजोबांच्या काळात आमचं बरं चाललं होतं. ते आम्हाला घाबरून होते. आम्ही गुपचुप काय करतोय ते तुझ्या पणजोबांना कळलंच नाही आणि कळल्यानंतर सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला तुमचा ९०००० चौ. किमी चा प्रदेश घशात घालता आला. पण आता हा मोदीबाबा आल्यामुळे आम्हाला काहीच करता येत नाही. तो आम्हाला घाबरतच नाही. आता तूच काहीतरी कर म्हणजे आम्हाला भूतान घशात घालता येईल'. राहुलच्या हालचाली एकंदरीत संशयास्पद आहेत. तो नियमितपणे वर्षातील अनेक दिवस देशाबाहेर असतो. तो नक्की कोठे जातो, जाऊन नक्की काय करतो हे एक गूढच आहे. त्याचा बाहेरच्या देशात एखादा व्यवसाय आहे का, बाहेरच्या देशात त्याने कोणाबरोबर तरी लग्न करून आपला संसार थाटला आहे का, हा परदेशात जाऊन नक्की कोणाला भेटतो इ. गोष्टी कोणालाच माहिती नाहीत. चीनच्या राजदूताला तो ज्या तर्‍हेने गुपचुप भेटला त्यावरून असा संशय येतोय की हा बाहेरच्या देशातही अशाच कोणालातरी गुपचुप भेटत असावा व काहीतरी गुपचुप करीत असावा. मोदी-जिनपिंग यांच्यातील २०१४ च्या भेटीचा उल्लेख करणे हे तर अत्यंत संतापजनक आहे. दोन्ही देशात सीमेवर तणाव असताना देशाच्या पंतप्रधानावर असे जाहीर कोरडे ओढून अप्रत्यक्षपणे ते दुर्बल/बेपर्वा असल्याचे सूचित करणे हे अतिशय अपरिपक्वतेचे लक्षण आहे. चीन युद्धाच्या तयारीत असताना भारतीय जनतेत व विशेषतः सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये या विषयावर एकी नाही असा अत्यंत चुकीचा संदेश या ट्विटमुळे गेला आहे याची या मूर्खाला कल्पना असेल असे वाटत नाही. अर्थात यात फारसे आश्चर्य वाटण्यासारखे नाही. स्वहितासाठी व पक्षहितासाठी देशहिताचा बळी देणे हे काँग्रेसचे व विशेषतः नेहरू-गांधी घराण्याचे सुरवातीपासूनचे धोरण आहे. नेहरूंच्या कार्कीर्दीतच भारताने दोन वेळा मोठा भूभाग गमाविला होता. आजचे अनेक प्रश्न हे नेहरूंच्या गंभीर घोडचुकांमुळे निर्माण झाले आहेत. आपल्या मूर्खपणामुळे आपण देशहिताला बाधा आणत आहोत याची यांनी कधीच पर्वा केली नाही व पुढेही करणार नाहीत.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Tue, 07/11/2017 - 12:44 नवीन
२०१६ मध्ये कॉंग्रेसचे सलमान खुर्शिद व मणी शंकर अय्यर पाकिस्तानमध्ये गेले होते. शांतत चर्चा परत सुरू करायची असेल तर मोदींना घालवा असे त्यांनी जाहीरपणे पाकिस्तानमध्ये सांगितले. राहुलने चीनच्या राजदूताला असेच काहीतरी सांगितले असावे का? तुम्ही मोदींना घालवा, म्हणजे सिक्कीम, अरूणाचल प्रदेश, भूतान इ. भाग तुम्हाला विनासायास घशात घालता येतील असा तो संदेश असेल का?
राहुल गांधी चीनी वकिलाला भेटला ही बातमी आल्यावर नेमकी हिच शंका आली. वास्तविकपणे कोणाही विरोधी पक्षाच्या नेत्याविषयी अशी शंका येऊ नये. अशी शंका येणे म्हणजेच संबंधित नेत्यांच्या देशाविषयीच्या लॉयल्टीवर प्रश्नचिन्ह उभे करण्यासारखे झाले-- म्हणजे या संबंधित नेत्यांना 'देशद्रोही' म्हटल्यासारखे झाले. पण ज्या निर्लज्जपणे मणीशंकर अय्यरने पाकिस्तानात जाऊन 'मोदींना हटवा' अशी मागणी केली त्यानंतर काँग्रेस (किंबहुना विरोधी पक्ष आणि कदाचित भाजपमधलेही ओल्ड ब्रासचे लोक) मोदींना हटवायला कोणत्याही थराला जाईल ही खात्री पटली.
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 07/11/2017 - 13:06 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
विशुमित Tue, 07/11/2017 - 14:12 नवीन
काल काश्मीर मध्ये अमरनाथ यात्री बस वर भ्याड दहशतवादी हल्ला झाला.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 07/11/2017 - 15:30 नवीन
जीपला पुढे बांधलेल्या दहशतवाद्याला मानवी हक्काचे उल्लंघन झाल्याबद्दल १० लाख रुपये द्या असे राज्य मानवीहक्क आयोगाने सांगितले आहे. मग अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्यांचे प्राण गेल्याबद्दल एक कोटी द्यायला मानवी हक्क आयोग सांगणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
थ
थॉर माणूस Wed, 07/12/2017 - 20:35 नवीन
या घटनेचे मेगाबायटी विश्लेषण नाही करणार का कुणी? जाणकारांच्या प्रतिसादांची वाट पाहिली काही नवी माहिती मिळेल म्हणून, पण अजून तरी काही वाचायला मिळलेलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
त
तेजस आठवले Tue, 07/11/2017 - 18:38 नवीन
केजरीवाल कुठे आहेत सध्या. बरेच दिवसात काही कानावर आले नाही. आत्ता खालील बातमी वाचली. राहुल गांधींच्या वैचारिक बैठकीत त्यांना एकटे पडू न देण्याचा चंगच बांधलाय जणू. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/amarnath-yatra-attack-shivsena-chief-uddhav-thackeray-slams-gorakshak-and-modi-sarkar/articleshow/59549050.cms "अमरनाथ यात्रेवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशातील स्वयंघोषित गोरक्षकांना चांगलेच फैलावर घेतले आहे. गोरक्षा वगैरे सगळं थोतांड आहे. गोरक्षकांमध्ये खरंच हिंमत असेल तर त्यांनी दहशतवाद्यांशी सामना करावा, असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिले. "
  • Log in or register to post comments
द
दशानन Tue, 07/11/2017 - 18:56 नवीन
कतरचा विषय नक्की काय आहे? हा लेख आवर्जून वाचा! 30-40 लाखात लोकसंख्या असलेला हा देश अरबी देशा च्या डोळ्यात का खूपतो ते समजेल.
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Tue, 07/11/2017 - 19:24 नवीन
प्लॅनेट मनी चा पॉडकास्ट पण छान आहे याच विषयावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
ग
गामा पैलवान Tue, 07/11/2017 - 19:45 नवीन
श्रीगुरुजी,
पूर्वी बाळ ठाकरे मातोश्रीवर वातानुकुलीत खोलीत बसून श्वेत वाईनचे घुटके घेत "मुंबईतून एकही प्रवासी हाजला जाऊन देणार नाही" अशा धमक्या 'सामना'तून द्यायचे. आता अशा धमक्या इंग्लंडहूनही यायला लागल्या आहेत असं दिसतंय.
त्याचं काये की तुमच्या घरातलं कोणी मरेपर्यंत तुम्हाला बसून राहायचं असेल तर माझी ना नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 07/13/2017 - 07:23 नवीन
http://abpmajha.abplive.in/maharashtra/incremental-bills-sent-to-33-lakh-farmers-for-load-shedding-free-maharashtra-big-scam-reveals-latest-update-430389 शहरी भागात वीज बिले नियमीत पणे भरली जातात त्यामुळे तिथे भार नियमन होत नाही ह्या मागील सत्य उघड करणारी माहीती.
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 07/13/2017 - 14:17 नवीन
ह्या धाग्यावर प्रतिसाद लिहिणे बंद करून नवा धागा सुरू करण्यात यावा.
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा गुरुवार, 07/13/2017 - 22:36 नवीन
गेल्या काही दिवसातील प्रशासनातील अधिकाऱ्यांची मुजोरी आणि भ्रष्टाचार पहिला तर राजकारणी देखील लाजतील. काही उच्चपदस्थ आणि भ्रष्ट अधिकारी एवढे ताकतवर आहेत कि ते मंत्र्यांना हि भीक घालत नाहीत. गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांना प्रशासन ऐकत नाही म्हणून तक्रार करावी लागली होती, तेंव्हा मुख्य सचिवांनी त्याची दखल घेऊन अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. मुख्यमंत्र्यांची हि बात तर बाकीच्या मंत्र्यांचं विचारायला नको. १. नुकतीच विश्वास पाटील यांनी केलेले कारनामे वाचनात आले, पाच दिवसात काही शे फायलींचा निपटारा , एव्हडी प्रचंड गतिमानता तेही निवृत्तीचा जवळ असताना. असे असून सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊन शिक्षा होईल असे अजिबात वाटत नाही. लोकसत्ता ने अग्रलेख लिहून त्यांची लायकी काडली हे नसे थोडके. दुसऱ्या दिवशी आमदार विद्या चव्हाण (कि ठाकूर ) यांनी हि विश्वास पाटील यांचा झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भातील अनुभव लोकसत्तामध्ये कथन केला होता. २. शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांना त्यांनी घोषित केलेल्या योजनेसाठी स्वतः पाठपुरवठा करून हि यश हाती लागत नसल्याचे वाचले. ३. मंत्री विनोद तावडे यांनी निलंबित केलेल्या शिक्षण उपाधीक्षकास अधिकारी निलंबित करण्यास टाळाटाळ करतायत. विनोद तावडे यांनी विधानसभेत आश्वासन देऊन हि अधिकारी विचारेनासे झालेत हे स्पष्ट दिसत आहे. आता हा मामला मुख्यमंत्र्यांकडे पोहचला आहे. ४. कोकणात गोव्यातून यांत्रिक बोटी घेऊन येणारे मच्छिमार छोट्या होल चे जाळे (नाव विसरलो जाळ्याच ) वापरून मोठ्या प्रमाणात मच्छिमारी करतायत आणि प्रशासनाला मोठ्या प्रमाणात हप्ता पोच होतो हा हि आरोप होतायत . यावर वेगवेगळ्या पक्षाच्या राजकारण्यांनी तक्रार करून सुद्धा अधिकारी ऐकत नाही, अखेरीस नितेश राणे यांनी अधिकाऱ्याचा अंगावर मासे फेकून मारले (त्यांनी केलेली कृती च मी समर्थन करत नाही ). यावरून हे सिद्ध होतंय कि पैशासाठी अधिकारी राजकारण्यांना हि जुमानेनात ५. गेल्या वर्षी प्रभाकर देशमुख ह्या उचपदस्त अधिकारीबद्दल काही मीडिया मध्ये अमाप संपत्ती बद्दल बातम्या छापून आल्या होत्या , काही दिवसात गायब झाल्या, कोणतीही कारवाई झाली नाही. ६. मुंबई तील ट्रॅफिक पोलिसांच्या भ्रष्टाचाराबाबत एका पोलीस हवालदाराने दाखल केलेल्या याचिकेवर कारवाई करताना acb ने मुंबई ट्रॅफिक पोलीस स्वच्छ असल्याचा निर्वाळा दिला , यांवरून उच्च न्यायालयाने तीव्र ताशेरे ओढलेत तरी ACB ढिम्म. ७. मुबई मध्ये जेल मध्ये मंजुळा शेट्टे हत्येप्रकरणी एक पोलीस अधिकारी साठे ह्या आरोपींची बाजू घेत होत्या असा आरोप होतोय, आता त्या अधिकाऱ्याने चौकशीतून अंग काडून घेतलं आहे. ८. राज्यभर चालेल्या वाळू आणि मुरूम उपश्यात अधिकारी कसे हप्ते खातात हे जगजाहीर आहे, तरीही शासन काहीच करू शकत नाही . काहीच कारवाई होत नाही. अश्या अनेक गोष्टी किस्से सांगता येतील आणि हे काँग्रेस चे सरकार होते तेंव्हा असेच होते. राज्याचे खरे सत्ताधारी राजकारणी नसून प्रशासन आहे , तेच खरे सत्ताकेंद्र आहे . कोणतंही सरकार आणलं तरी काही बदल होईल असे वाटेनासे झालेय, तरीही थोडी आशा कायम आहे बगूया काही बदलतंय का.
  • Log in or register to post comments
थ
थॉर माणूस गुरुवार, 07/13/2017 - 23:16 नवीन
>>> छोट्या होल चे जाळे पर्सिन (Purse seine) नेट? महाराष्ट्राच्या हद्दीत या प्रकारच्या जाळ्यांवर बंदी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
म
मराठी_माणूस Fri, 07/14/2017 - 06:48 नवीन
सहमत. पण ह्या अधिकार्‍यांना भ्रष्टाचार कोणी शिकवला त्यांचे 'आदर्श' कोण आहेत ?
मुंबई तील ट्रॅफिक पोलिसांच्या भ्रष्टाचाराबाबत एका पोलीस हवालदाराने दाखल केलेल्या याचिकेवर कारवाई करताना acb ने मुंबई ट्रॅफिक पोलीस स्वच्छ असल्याचा निर्वाळा दिला , यांवरून उच्च न्यायालयाने तीव्र ताशेरे ओढलेत तरी ACB ढिम्म.
त्या मधे जवळजवळ ३०/४० क्लिप्स होत्या आणि तरीही क्लिन चिट मिळाली. एकही क्लिप दखल घेण्याजोगी नव्हती हे आश्चर्यच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा