ताज्या घडामोडी : सप्टेंबर '१७
१) राज्याच्या बहुतेक भागाला पावसाने झोडपले असून, विशेषतः मुंबईत परिस्थिती चिंताजनकझाली आहे. पावसाचे पाणी ट्रॅकवर साठून राहिल्याने कित्येक तास लोकलसेवा बँड असल्याने तसेच पाणी साठलेल्या रस्त्यांमुळे सार्वजनिक वाहतूक कोलमडली होती.
आता पावसाचा जोर कमी झाल्याने परिस्थिती हळू हळू सुधारतेय.
२) डोकलाम प्रश्न तूर्तास सुटल्याचे दिसतेय. पंतप्रधानांच्या ब्रिक्स परिषदेसाठी चीन दौऱ्याआधी हे झालेय. मात्र भारत व चीनच्या बाजूने वेगवेगळ्या अर्थाच्या बातम्या आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांतसुद्धा याविषयी मतांतरे आहेत. दोन्ही देशांनी सैन्य माघारी घेतल्याचे भारताने म्हटलेय, तर भारताने घुसवलेले सैन्य माघारी घेतल्याचे चीनने म्हटलेय.
अ) भारताने सैन्य मागे घेणे: भारतासहित सर्वजण असेच म्हणतात.
ब) चीनने सैन्य मागे घेणे: असे फक्त भारत म्हणतोय. काही ठिकाणी चीन तिथे गस्त सुरू ठेवणार असल्याच्या बातम्या आहेत.
क) डोकलाम प्रश्नाच्या मुळाशी असलेला चीनने बांधलेला रस्ता: चीन हे काम सोडून देणार की चालू ठेवणार, यावर कुठेच स्पष्टीकरण दिसले नाही.
BBC सहित बऱ्याच ठिकाणी डोकलाम प्रकरणी चीनचा विजय झालाय, अशा अर्थाच्या बातम्या आहेत.
३. GDP २ टक्यांनी गडगडला, एका इकॉनॉमिक सर्वे नुसार गेल्या ४ कि ६ महिन्यात १५ लाख जॉब गेलेत, शेती आणि असंघटित क्षेत्राला मोठा तोटा झाला. याच श्रेय कोणाचं ?GDP २ टक्क्यांनी गडगडलेला नसून एका तिमाहीकरता १.४ टक्क्यांनी कमी झाला आहे. कोणत्या इकॉनॉमिक सर्वे नुसार गेल्या ४ कि ६ महिन्यात १५ लाख जॉब गेलेत व शेती आणि असंघटित क्षेत्राला मोठा तोटा झाला?कोणताही दुष्काळ नसताना शेत मालाचे भाव कसे पडले हे काही तज्ज्ञांनी दाखवून दिल आहेयाच्याशी नोटाबंदीचा संबंध नाही. भूतकाळात नोटाबंदी नसतानाही व दुष्काळही नसताना अनेकदा भाव पडलेले आहेत. भाव कमीजास्त होण्याचा संबंध फक्त मागणी व पुरवठा यांच्याशीच असतो. मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढला की भाव पडतातच.मुळात नोटबंदी च्या काळात बाजारातील पैसा काढून घेतल्यामुळे ग्राहकांना आपल्या दैनंदिन गरजावरती नियंत्रण आणावं लागलं विशेतः रोखीने होणाऱ्या व्यहवारावरतीम्हणजे नोटाबंदीच्या काळात लोकांनी खाणंपिणं कमी केलं होतं आणि ते अर्धपोटी रहात होते?बरं नोटबंदी चा परिणाम नाही तर गेल्यावर्षी दुष्काळ न पडता विविध राज्यातील शेतकरी एकाचवेळी कर्जमाफी साठी का मागे लागलेत? त्यांच्यातील सुप्त मागणीला कशामुळे बळ मिळाले.शेतकरी कायमच कर्जमाफी मागतात व पुढेही मागत राहतील. कर्जमाफीच्या मागणीचा व नोटाबंदीचा संबंध नाही.ग्रामीण भागात शेती व्यवहार हे ९०%टक्के रोखीत च होतातजनधन खात्यांचा आग्रह धरून आता बराच काळ लोटला. सरकारने प्रयत्न करून आणि सोय उपलब्ध करून देऊनसुद्धा जर त्याचा फायदा लोक घेऊ शकत नसतील तर काय करावे? त्यापुढे जाऊनही, नैसर्गिक असो वा मानवनिर्मित, प्रत्येक अडचणीत स्वतःची तुंबडी भरून घ्यायची वृत्ती कधी जाणार? शेतकऱ्यांचे बँक खाते नाही हे एकवेळ मानले तरी दलालांचे पण नव्हते? मला फारशी कल्पना नाही पण छोटे शेतकरी रोजच्या रोज असा किती हजारांचा माल विकतात? दलालांनी ही संधी समजून शेतकऱ्यांना नाडलेच ना?हा निर्णय घेतला तेंव्हा मला हि वाटलं होत कि काही तरी क्रांतिकारी बदल घडेल परंतु हळूहळू यातील फोलपणा लक्ष्यात आला.खरंच हे खेदाने म्हणावं लागतंय की नोटबंदी "सफल" व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्यांपेक्षा ती "असफल" कशी होईल हे बघणारे बरेच जास्त होते/ आहेत. असफल होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये मुद्दामून करणारे होते तसेच अनावधानाने किंवा स्वतःच्या तात्कालिक फायद्यासाठी करणारे लोकही होते. साध्या १० लोकांच्या प्रोजेक्टमध्ये अगदी १ जरी मेम्बर प्रोजेक्ट सफल होऊ नये यासाठी प्रयत्न करणारा असेल आणि २/३ लोक चुकार असतील तर प्रोजेक्ट फेल होतो. इथे तर जवळपास १ कोटी लोकांचा प्रोजेक्ट होता. बदल घडवून आणायला सगळ्यांचा सपोर्ट आवश्यक असतो जो कदाचित कमी पडला.परंतु आता आलेल्या आकडेवारी नुसार आणि तज्ज्ञांच्या लेखानुसार माझे मत बदलले आहेआकडेवारीचं म्हणाल तर ती दोन्ही प्रकारे दाखवता येते. तज्ज्ञांचं म्हणाल तर नोटबंदी सफल आणि असफल दोन्ही म्हणणारे तज्ज्ञ आहेत.नोटबंदी चे फक्त तोटेच आहेत आणि काही फायदे नाहीत असे माझे म्हणणे नाही, माझे असे म्हणणे आहे कि जे फायदे सांगितले जातायत त्यासाठी नोटबंदी करायची आवश्यकता न्हवतीनोटबंदी कशी चांगल्या पद्धतीने राबवता आली असती याचा प्लॅन काही मिपाकर जानेवारी २०१७ च्या आधी देणार होते, तो काही अजून मिळाला नाही. तुम्ही पण सांगा काय उपाय करता आले असते ते. आणि हो जे सांगाल ते सर्वच्या सर्व लोकांना फायद्याचे आणि फुलप्रूफ असावे. म्हणजे एक प्लॅन द्यायचा, जो इतका फुलप्रूफ असेल की ज्याने फक्त सर्वच्या सर्व अप्रामाणिक भारतीयांना तास झाला पाहिजे पण एकाही प्रामाणिक भारतीयास त्रास व्हायला नको. तसेच प्लॅन/ नियम एकदा केले की परत बदलता येणार नाहीत. बोला कधी देताय.