Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी : सप्टेंबर '१७

त
तुषार काळभोर
Wed, 08/30/2017 - 04:44
🗣 168 प्रतिसाद
१) राज्याच्या बहुतेक भागाला पावसाने झोडपले असून, विशेषतः मुंबईत परिस्थिती चिंताजनकझाली आहे. पावसाचे पाणी ट्रॅकवर साठून राहिल्याने कित्येक तास लोकलसेवा बँड असल्याने तसेच पाणी साठलेल्या रस्त्यांमुळे सार्वजनिक वाहतूक कोलमडली होती. आता पावसाचा जोर कमी झाल्याने परिस्थिती हळू हळू सुधारतेय. २) डोकलाम प्रश्न तूर्तास सुटल्याचे दिसतेय. पंतप्रधानांच्या ब्रिक्स परिषदेसाठी चीन दौऱ्याआधी हे झालेय. मात्र भारत व चीनच्या बाजूने वेगवेगळ्या अर्थाच्या बातम्या आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमांतसुद्धा याविषयी मतांतरे आहेत. दोन्ही देशांनी सैन्य माघारी घेतल्याचे भारताने म्हटलेय, तर भारताने घुसवलेले सैन्य माघारी घेतल्याचे चीनने म्हटलेय. अ) भारताने सैन्य मागे घेणे: भारतासहित सर्वजण असेच म्हणतात. ब) चीनने सैन्य मागे घेणे: असे फक्त भारत म्हणतोय. काही ठिकाणी चीन तिथे गस्त सुरू ठेवणार असल्याच्या बातम्या आहेत. क) डोकलाम प्रश्नाच्या मुळाशी असलेला चीनने बांधलेला रस्ता: चीन हे काम सोडून देणार की चालू ठेवणार, यावर कुठेच स्पष्टीकरण दिसले नाही. BBC सहित बऱ्याच ठिकाणी डोकलाम प्रकरणी चीनचा विजय झालाय, अशा अर्थाच्या बातम्या आहेत.
वर्गीकरण
घडामोडी

प्रतिक्रिया द्या
49380 वाचन

💬 प्रतिसाद (168)
ज
जेम्स वांड Sun, 09/10/2017 - 09:15 नवीन
म्हणजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेशीवरचा म्हसोबा
व
विशुमित Mon, 09/11/2017 - 13:01 नवीन
दुसऱ्यांनी कोणी लिहण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा कृपया तुम्हाला "त्या" प्रकरणाबद्दल काय वाटले ते लिहा. ---------- समाज माध्यमामध्ये वावरताना एक समजले आहे की अशा गोष्टींची दखल घेतली तर खोलेंसारख्या कोत्या मनाच्या उच्चशिक्षित जातीवादी लोकांना नको तितके महत्त्व दिल्यासारखे होते. वरून ब्रिगेडी म्हणून शिक्का सुद्धा बसतो. दुटप्पी, फुरोगामी, सराजमशाही असेही सहज संबोधले जाते. पण होते काय की "आपला तो बाबा" असे वाटायला वाव मिळतो. प्रत्येक प्रसंगी प्रत्येकाने प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असा बिलकुल अट्टाहास नाही आहे. अशी कोणाची सक्ती मी सुद्धा कधी मान्य करणार नाही. असो..!! ----------- समाजामध्ये अजून ही अशी मध्ययुगीन विचारसरणी असणारे लोक आहेत हे खूप कमी लोक मान्य करतात. विरोध व्यक्ति/जातीसाक्षेप नसून विचारसरणीला आहे. उदाहरण माझ्या घरातील देतो(सत्य कथन आहे). माझी सखी चुलत बहीण आणि तिचे संपूर्ण कुटुंब सनातन संस्थेचे पाईक आहेत. आमच्या भावजींनी तर चांगली अधिकारी दर्जाची सरकारी नोकरी धर्मकारणासाठी सोडून दिली आहे. मध्यंतरी पंढरपूर मधील पुजारी बदल्याप्रकरणी आणि परीक्षा घेऊन प्रशिक्षित ब्राह्मणेत्तर पुजारी नेमल्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया खूप बोलकी होती. 'पांडुरंगाची पूजा ही ब्राह्मणानेच केली पाहिजे. ब्राह्मणेत्तर पुजाऱ्यांकडून सोवळे पाळल्या न गेल्यामुळे पांडुरंग बाटला आहे' असे तिचे मत होते. वरून मला सल्ला पण देण्यात आला की दर्शन घेण्यासाठी जाऊ नकोस कारण तुला त्या दर्शनातून कोणतीच अध्यात्मिक अनुभूती मिळणार नाही. ---------- खोले बाईंच्या धार्मिक श्रद्धे बाबत मला आदर आहे पण त्यांनी प्रकरण एवढे ताणायची गरज नव्हती. आपला धर्म घराच्या भिंती आड झाकून, प्रश्न सोडवला असता तर बरे झाले असते. त्यामुळे असा विचार करणारे इतर बरेच जण नाहक जनतेसमोर आले. त्यात घर काम करण्यासाठी ब्राह्मण उरलेत तरी किती म्हणा. त्यांना एवढे समजायला हवे होते. हवामान खात्याचा अनुभव कामी येईला पाहिजे होता. जाऊ द्यात.. ---------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
A
arunjoshi123 Mon, 09/11/2017 - 14:58 नवीन
खोले बाईंच्या धार्मिक श्रद्धे बाबत मला आदर आहे
कशाला? का म्हणून?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
वेशीवरचा म्हसोबा Sun, 09/10/2017 - 08:45 नवीन
या धाग्यावरील प्रतिसाद वाचून एक लक्षात येते काँग्रेसच्या सत्ताकाळात अतिरेकी भ्रष्टाचार, सेक्युलॅरिझमच्या नावाखाली आपल्या अल्पसंख्यांक व्होट बँकेचे लांगुलचालन इत्यांदीमुळे एका टोकाला गेलेला लंबक भाजपा समर्थक (यांना त्यांचे विरोधक भक्त म्हणतात) "आपल्या" सरकारचे समर्थन करताना दुसर्‍या टोकाला नेत आहेत. आधीच्या सरकारांनी समाजातील एका विशिष्ट घटकाची कायम उपेक्षा केल्याने तो समाज घटक आता "आपल्या" सरकारचे हिरिरीने समर्थन करत आहे.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Sun, 09/10/2017 - 09:19 नवीन
तटस्थ वृत्तीने राजकारणाकडे बघतो, पण आता जर आवाज नाही केला तर डोक्यावर मिरे वाटतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेशीवरचा म्हसोबा
ज
जेम्स वांड Sun, 09/10/2017 - 09:30 नवीन
हिंदूंना साईडलाईन केलं, हे जरी मला बऱ्यापैकी मान्य असलं तरी त्याकरता दुसरे टोक गाठणे मला मंजूर नाही. सत्य स्थिर असावं, त्यांचं सत्य भडकपणे रंगवलेलं खोटं होतं म्हणून आम्हीही तितकाच भडकपणा करणार हे मला तू गाढवाची लीद खाल्लीस तर मी हत्तीची खाणार पण खाणार लीदच इतकं विचित्र वाटतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
च
चष्मेबद्दूर Tue, 09/19/2017 - 11:42 नवीन
मी पण असेच म्हणेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड
ग
गामा पैलवान Sun, 09/10/2017 - 09:50 नवीन
भंकस बाबा,
तटस्थ वृत्तीने राजकारणाकडे बघतो, पण आता जर आवाज नाही केला तर डोक्यावर मिरे वाटतील
वरील विधानात दोन गंभीर त्रुटी आहेत. १. उत्तरार्ध : आता आवाज केला नाही तर डोक्यावर मिरे वाटतील म्हणजे नक्की काय? काँग्रेस डोक्यावर मिरे वाटंत होती तेव्हा तुम्ही काय करंत होतात? आवाज तरी उठवलात का? आम्हांस (म्हणजे मोदीभक्तांना बरंका) ऐकू आला नाही. अंगी ताकद नसतांना नुसता आवाज केल्याने मिरे वाटणे थांबणार आहे, हे स्वप्नरंजनच नव्हे काय? ही एक गंभीर त्रुटी आहे. १. पूर्वार्ध : पण हिच्यापेक्षाही गंभीर त्रुटी विधानाच्या पूर्वार्धात आहे. तुम्ही तटस्थ वृत्तीने राजकारणाकडे बघंत आहात. ही तटस्थता हळूहळू संपुष्टात येते हे याकडे तुमचं लक्ष आहे का? मोदी ही धृवीकारक शक्ती आहे, हे तुम्हांस जाणवलं आहे का? दोनपैकी कुठल्यातरी एका कंपूत दाखल व्हावं लागेल अशी परिस्थिती उत्पन्न होते आहे. तुमच्या मूळ तटस्थ भूमिकेस हरताळ फसला जाण्याची शक्यता उत्तरोत्तर वाढंत आहे. Ignorence is NOT strength. तेव्हा सावधान. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
भ
भंकस बाबा Sun, 09/10/2017 - 10:41 नवीन
काँग्रेस सरकार असताना आम्ही सामान्यजन हेच गृहीत धरून चाललो होतो की असेच चालणार, आपण मतदानाने परिस्थिती बदलू, नवीन आलेले सरकार नक्कीच काहीतरी चांगले करेल. पण आता आलेले सरकार कट्टर हिंदुत्ववादी आहे, कट्टरता कुठेही वाईटच! नशीब आपले की होणारे रेल्वे अपघात , हॉस्पिटलमध्ये बालमृत्यू हे काँग्रेसप्रणित आहे असे हे बोलत नाही , अगदी छत्तीस गुण जुळवून शेजाऱ्यांपाजाऱ्याकडे चोकशी करून लग्न जमवावे आणि बायको गुण उधळणारी निघावी तर अपेक्षाभंग होणारच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
A
arunjoshi123 Mon, 09/11/2017 - 15:10 नवीन
तुम्ही समर्थक इ इ कोणाचेही असा. त्यात काही विशेष नाही. पण विधान करताना, खास करून निगेटिव विधान करताना, इतरांची मते प्रभावित करताना मोघमपणा नको. =================
आधीच्या सरकारांनी समाजातील एका विशिष्ट घटकाची कायम उपेक्षा केल्याने तो समाज घटक आता "आपल्या" सरकारचे हिरिरीने समर्थन करत आहे.
आधीचं सरकार सेक्यूलर होतं. असले फालतू प्रकार करायचं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेशीवरचा म्हसोबा
ट
ट्रेड मार्क Mon, 09/11/2017 - 22:09 नवीन
काँग्रेसच्या सत्ताकाळात अतिरेकी भ्रष्टाचार, सेक्युलॅरिझमच्या नावाखाली आपल्या अल्पसंख्यांक व्होट बँकेचे लांगुलचालन इत्यांदीमुळे एका टोकाला गेलेला लंबक भाजपा समर्थक (यांना त्यांचे विरोधक भक्त म्हणतात) "आपल्या" सरकारचे समर्थन करताना दुसर्या टोकाला नेत आहेत. तुम्ही जे काँग्रेसच्या काळाच्या विरुद्ध टोक म्हणताय ते म्हणजे संपुष्टात आलेला भ्रष्टाचार, अल्पसंख्यांक व्होट बँकेचे लांगुलचालन आता होत नाही हेच ना? आता यावर म्हणाल की अजूनही कनिष्ठ सरकारी कर्मचारी, पोलीस ई भ्रष्टाचार करतात. तर तो आपल्याच मानसिकतेचा प्रॉब्लेम आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात जसे २जी, कोळसा, संरक्षण सामग्री आणि इतर हजारो लाखो कोटींचे घोटाळे झाले तसे गेल्या ३ वर्षात झाले का? काही लोक नोटबंदी हा सगळ्यात मोठा घोटाळा असल्याची बोंब ठोकतात पण तो घोटाळा कसा म्हणायचा? सगळे पैसे बँकेत जमा झाले ना? सत्ताधारी पक्षातील लोकांनी आधीच पैसे बदलून घेतल्याचा पण आरोप झाला, पण पुरावा सापडत नाही. बँकांची एनपीए झालेली कर्ज माफ करण्यावरून आरोप होतात पण कर्ज एनपीए काही ३ वर्षात झालेली नाहीत. ही कर्ज आधीच कधीतरी वाटली गेली होती. जी वसूल करण्यासाठी जगातले महान अर्थशात्रज्ञ भारताचे पंतप्रधान असूनही आणि सगळ्यांचे लाडके रघुराम राजन आरबीआयचे गव्हर्नर असूनही काही करू शकले नाहीत. ती एनपीए write-off केली म्हणजेच माफ करून टाकली असा चुकीचा समज सामान्य जनतेचा कोणी करून दिला? अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करण्याचं म्हणाल तर काँग्रेसने त्यांना पण उल्लू बनवलंय. कुठल्या मुस्लिमांची काँग्रेसच्या काळात भरभराट झाली किंवा सुधारणा झाली ते सांगा. तोंडी तीन तलाक सारख्या प्रथा अगदी कट्टर मुस्लिम असलेल्या देशात सुद्धा नाहीत त्या आपल्या देशात रुजू करून घेण्यासाठी राजीव गांधींनी कायदा बदलला. स्त्रियांचं सबलीकरण करणार म्हणून डांगोरा पिटणाऱ्या काँग्रेसने अल्पसंख्यांक महिलांना आयुष्यभर त्रास सहन करायला लागेल याची कायदेशीर व्यवस्था करून ठेवली. त्यातून मुक्तता करायला "मुस्लिमविरोधी" आणि "कट्टर हिंदू" अशी बिरुदावली मिळालेल्या मोदींना प्रयत्न करायला लागले आणि ते यशस्वीसुद्धा झाले. काँग्रेस सत्तेवर असताना बऱ्याच धार्मिक दंगली झाल्या. २००२ च्या एका दंगलीवरून मोदींना एवढं धारेवर धरलं गेलं, पण त्यावेळेला ते नुकतेच सत्तेवर आले होते आणि नंतर १२ वर्षात एकही धार्मिक दंगल झाली नाही हे मात्र सोयीस्करपणे विसरलं जातं. त्यामुळे लंबक जितका तिकडे गेला होता तितका तो इकडे येणारच पण ते टेम्पररी असेल. हिंदू मुळातच एवढे क्रूर आणि दुसऱ्या धर्मातील लोकांच्या कत्तली उगाचच कराव्या या वृत्तीचे नाहीत. मुसलमानांनी कट्टरपणा सोडला आणि हिंदूंच्या कुरापती काढणं बंद केलं तर हिंदू स्वतःहून आपला कट्टरपणा दाखवायला जाणार नाहीत. हिंदू दहशतवाद ही उगाच पसरवलेली अफवा होती, पण अजूनही काही सामान्य (राजकारणी नसलेल्या) हिंदूंचाच त्यावर विश्वास आहे असं वाटतंय. हिंदूंना राहण्यासाठी भारत हाच एक हक्काचा देश आहे, त्यामुळे हिंदूंनी एकत्र येण्यात/ असण्यात काहीच चुकीचं नाहीये. हिंदू असण्याचा अभिमान बाळगायला हवा कारण आपला धर्म प्रार्थना पद्धतीवरून आणि कुठला देव मानता यावरून त्यांच्या कत्तली कराव्या हे सांगत नाही. कट्टर हिंदू फार फार तर रोज मंदिरात जाईल, ३ वेळा पूजा करेल. पण आमच्या धर्मात सांगितलंय म्हणून मशिदी पाडा, मुस्लिमांना मारा आणि मुस्लिम स्त्रियांवर बलात्कार करा हे करणार नाही. पण जर मुस्लिम, त्यांच्या धर्मात सांगितलंय म्हणून, हिंदूंना त्रास द्यायला लागले तर हिंदूंनी का शांत बसावं? आणि प्रॉब्लेम असा आहे की हिंदूंनी प्रतिकार करायला सुरुवात केली की आपल्यातलेच "सेक्युलर" मुस्लिमांनी केलेल्या कुरापती विसरून कट्टर हिंदू कसे धोकादायक आहेत हे सांगत फिरतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेशीवरचा म्हसोबा
स
सही रे सई Wed, 09/13/2017 - 17:03 नवीन
+१११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
श
शलभ Sun, 09/10/2017 - 11:38 नवीन
अमितदादा ह्यांच्या मतांशी सहमत..सुरुवातीला नॉटबंदीचा फायदा होईल असा वाटलं होतं, पण आता जो डेटा समोर आलाय त्यात फायद्यांपेक्षा तोटे जास्त आहेत असं दिसतं आहे. अजून पुढे कदाचित फायदे जास्त झालेत असा डेटा समोर येऊ शकतो. पण आताचे अमितदादा यांचे विश्लेषण बरोबर वाटत आहे. उगाच फक्त समर्थन करायच्या नादात जे समोर दिसतंय ते नाकारण्यात अर्थ नाही.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sun, 09/10/2017 - 15:22 नवीन
वैदिक ब्राह्मण समाजाला धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारने चाचपणी सुरू केली आहे. ही बातमी :
  • Log in or register to post comments
थ
थिटे मास्तर Sun, 09/10/2017 - 17:59 नवीन
लोकसत्तातल्या मधु कांबळेंची बातमि तर वाचली. आपले मत वाचायला आवडेल ह्या बातमि संदर्भात. वैदिक ब्राह्मण समाजाला म्हणजे नेमका कुठला समाज ?
  • Log in or register to post comments
थ
थिटे मास्तर Sun, 09/10/2017 - 18:01 नवीन
समाज म्हणजे काय वग्रै वग्रै.
  • Log in or register to post comments
थ
थिटे मास्तर Sun, 09/10/2017 - 18:17 नवीन
आणि हि ऐक फक्त जात आहे हिंदु धर्मात. वैदिक ब्राह्मण समाज / अवैदिक ब्राम्हण समाज ह्याविषयी प्लस ह्यांना कधिपासुन आणि का अल्पसंख्याक असल्याचि भावना आलिय हे ऐकायला / वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
थ
थिटे मास्तर Sun, 09/10/2017 - 18:20 नवीन
लिंका चिकटवण्यापेक्षा आपण थेट चर्चा कराल.
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Sun, 09/10/2017 - 18:56 नवीन
@शलभ जी
उगाच फक्त समर्थन करायच्या नादात जे समोर दिसतंय ते नाकारण्यात अर्थ नाही.
अगदी बरोबर. लोक आर्थिक निर्णयाचं राजकीय समर्थन करतायत त्यामुळं हा घोळ होतोय, त्यापेक्षा लोकांनी आर्थिक निर्णयाचं आर्थिक विवेचन करून समर्थन किंवा विरोध करावा ते हि पुढे असलेला डेटा पाहून. @श्री गुरुजी आता तुमचा अभ्यासू प्रतिसाद आला त्याच उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आता.
While this is likely a side-effect of demonetisation, more research is needed to unpack how India’s unemployment rate fell in January-April 2017. याचा सरळ अर्थ असा की या लेखातील निष्कर्ष पुरेशा संशोधनावर आधारीत नाहीत.
याचा अर्थ असा हि होतो कि आमच्या संशोधनास बळकटी मिळण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे, त्याचवेळी आमचं संशोधन योग्य कारण न देता फेटाळता येणार नाही.
एकंदरीत या लेखातील निष्कर्षांना कोणताही ठोस आधार दिसत नाही. स्वतःच्या समजूतीनुसार निष्कर्ष काढले आहेत. काही दावे परस्परविरोधी आहेत
मला अजिबात असे वाटत नाही, मुळात गोंधळ टाळण्यासाठी आपण दोन्ही लेखात दिलेली मूळ लिंक किंवा मूळ संशोधन पाहू मूळ संशोधन १. These are all-India household surveys over a sample size of 161,167 households that included 519,285 adults. २. We estimated the employed force at 401 million then. This grew to 403 million during May-August 2016 and then to 406.5 million in September-December 2016. Then, it fell to 405 million. (साध्य सिम्पल भाषेत १५ लाख जॉब गेले कुठही गोंधळ नाही कि परस्परविरोधाभास नाही )
म्हणजे जानेवारी-एप्रिल २०१७ या काळात बेकारांची संख्या २ कोटी ९६ लाखांवरून कमी होऊन २ कोटींवर आली. एकीकडे म्हणतात की या काळात बेकारी वाढून १५ लाख नोकर्‍या गेल्या आणि दुसरीकडे लिहितात की बेकारी ९६ लाखांनी कमी झाली.
याच उत्तर खाली तुम्हाला गणित समजत अशी आशा करतो. While the number of employed persons has dropped, the unemployment rate has also fallen. This is odd and it merits an explanation. The unemployment rate is the ratio of the unemployed to the labour force where the labour force is the sum of the employed and the unemployed. While the number of persons employed fell by 1.5 million, the number of people who declared themselves unemployed fell much more - by 9.6 million. As a result, the labour force fell by 11 million. This substantial fall in the denominator is responsible for the fall in the unemployment rate. वरील लेखातील पहिली आकृती पहा तुम्हाला लेबर पार्टीसिपेशन फोर्स nov -april पर्यंत कमी झालेला दिसेल हा आहे नोटबंदीचा परिणाम. मूळ संशोधन लेखात कुठेही विरोधाभास नाही, असला तर तो आहे समजवून न घेणाऱयांच्या मनात. आता शेती कर्ज माफी संधर्भात तुमचं जे मत आहे त्याच्याशी मी सहमत नाही, मुळात नोटबंदी हे शेती कर्ज माफी साठी एकमेव कारण नाही तर एक catalist आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात काही लगेच निवडणूक न्हवती परंतु तरीही राज्य सरकारे झुकली आणि कर्जमाफी दिली, याला अनेक कारणाबरोबर नोटबंदी जबाबदार आहे हे आपण नाकारू शकत नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 09/11/2017 - 11:26 नवीन
While this is likely a side-effect of demonetisation, more research is needed to unpack how India’s unemployment rate fell in January-April 2017. याचा सरळ अर्थ असा की या लेखातील निष्कर्ष पुरेशा संशोधनावर आधारीत नाहीत. याचा अर्थ असा हि होतो कि आमच्या संशोधनास बळकटी मिळण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे, त्याचवेळी आमचं संशोधन योग्य कारण न देता फेटाळता येणार नाही. याचा असाही अर्थ होऊ शकतो की आमच्या संशोधनास बळकटी मिळण्यासाठी आणखी संशोधनाची गरज आहे आणि ते केलं तर आमचं संशोधन फेटाळता सुद्धा येऊ शकतं. वरील वाक्यातून आपण आपल्याला हवा तसा अर्थ काढू शकतो. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की या संस्थेने ज्या संशोधनावर व आकडेवारीवर आपले निष्कर्ष काढले आहेत ते संशोधन व आकडेवारी पुरेशी नाही व त्यामुळे आता या क्षणी अपुर्‍या संशोधनावर आणि आकडेवारीवर कोणताही ठाम निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. याच उत्तर खाली तुम्हाला गणित समजत अशी आशा करतो. While the number of employed persons has dropped, the unemployment rate has also fallen. This is odd and it merits an explanation. The unemployment rate is the ratio of the unemployed to the labour force where the labour force is the sum of the employed and the unemployed. While the number of persons employed fell by 1.5 million, the number of people who declared themselves unemployed fell much more - by 9.6 million. As a result, the labour force fell by 11 million. This substantial fall in the denominator is responsible for the fall in the unemployment rate. वरील लेखातील पहिली आकृती पहा तुम्हाला लेबर पार्टीसिपेशन फोर्स nov -april पर्यंत कमी झालेला दिसेल हा आहे नोटबंदीचा परिणाम. मूळ संशोधन लेखात कुठेही विरोधाभास नाही, असला तर तो आहे समजवून न घेणाऱयांच्या मनात. एखादे गुणोत्तर किंवा टक्केवारी योग्य चित्र उभे करू शकत नाही. उदाहरणार्थ एखादा फलंदाज एका डावात ५ धावांवर बाद झाला व दुसर्‍या डावात त्याने १० धावा केल्या तर निव्वळ गुणोत्तर किंवा टक्केवारीचा विचार केला तर असे म्हणता येईल की दुसर्‍या डावात त्याने प्रचंड प्रगती केली असून पहिल्या डावाच्या तुलनेत दुप्पट धावा केल्या आणि त्यावर समाधान मानता येईल. परंतु प्रत्यक्ष धावांचा आकडा पाहिला तर दोन्ही डावात तो अपयशी ठरलेला आहे हे दिसून येईल. म्हणजेच कोणत्याही गोष्टीवर निष्कर्ष काढण्याआधी गुणोत्तर किंवा टक्केवारीपेक्षा प्रत्यक्ष आकडे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. वरील उदाहरणात तसेच आहे. गुणोत्तर किंवा टक्केवारीपेक्षा बेकारीचे प्रत्यक्ष आकडे पाहिले तर जानेवारी ते एप्रिल २०१७ या काळात बेकारांची संख्या ९६ लाखांनी कमी झाली असे वृत्तांतात लिहिले आहे. आता कसेही गुणोत्तर मांडले किंवा टक्केवारीची तुलना केली तरी बेकारांची संख्या ९६ लाखांनी घटलेली आहे ही वस्तुस्थिती लपत नाही आणि त्यामुळेच या काळात ३५% लोकांनी नोकर्‍या गमाविल्या अशासारखे निष्कर्ष अविश्वसनीय वाटतात. त्याला अजून एक आधार म्हणजे २०१६-१७ या वर्षात झालेले करसंकलन. केंद्रीय सीमाशुल्क, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, सेवा कर अशा सर्व करांच्या संकलनामध्ये या वर्षात मोठी वाढ झाली आहे. जर भारतात या वर्षात ३५% लोकांनी नोकर्‍या गमाविलेल्या असतील व कंपन्यांच्या महसूलात ५०% घट झाली असेल तर करसंकलनात मोठ्या प्रमाणात घट व्हायला हवी. त्यामुळे या वृत्तांतात दिलेल्या आकड्यांवर विश्वास ठेवणे अवघड आहे कारण वृत्तांतातील आकडे व निष्कर्ष प्रत्यक्ष वस्तुस्थितीशी विसंगत आहेत. या संस्थेन अंदाजे १,६१,००० कुटुंबांचे सर्वेक्षण करून आपले निष्कर्ष काढले असे लिहिले आहे. भारतात २६ कोटींपेक्षा अधिक कुटुंबे आहेत. त्यापैकी जेमतेम १,६१,००० कुटुंबे म्हणजे हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या जेमतेम ०.०६% लोकसंख्येचे (म्हणजेच प्रत्येक ५००० नागरिकांमागे ३ नागरिक) सर्वेक्षण केलेले आहे. हे सॅम्पल खूपच कमी आहे आणि त्यामुळेच यांचे निष्कर्ष चुकलेले दिसतात. आता शेती कर्ज माफी संधर्भात तुमचं जे मत आहे त्याच्याशी मी सहमत नाही, मुळात नोटबंदी हे शेती कर्ज माफी साठी एकमेव कारण नाही तर एक catalist आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात काही लगेच निवडणूक न्हवती परंतु तरीही राज्य सरकारे झुकली आणि कर्जमाफी दिली, याला अनेक कारणाबरोबर नोटबंदी जबाबदार आहे हे आपण नाकारू शकत नाही. महाराष्ट्रात लगेच निवडणुक नसली तरी उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफी जाहीर केल्यामुळे महाराष्ट्राला कर्जमाफी नाकारता आली नाही. राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे फडणविसांनी खूपच कठोर निकष लावून कमीतकमी शेतकर्‍यांना थोडीशी कर्जमाफी मिळेल अशी योजना आणली आहे. कर्नाटकमध्ये कर्जमाफी दिली आहे का नाही हे मला माहिती नाही. परंतु अजून ६ महिन्यांनी कर्नाटक विधानसभेची निवडणुक आहे. जर तिथे कर्जमाफी दिली तर त्यासाठी निवडणुक हे एकमेव कारण असेल. तामिळनाडूत अजून कर्जमाफी दिलेली नाही. ३-४ महिन्यांपूर्वी तिथल्या शेतकर्‍यांनी दिल्लीत बरेच दिवस आंदोलन केले होते. बर्‍याच दिवसानंतर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत शेतकर्‍यांची भेट घेऊन काहीतरी थातुरमातुर आश्वासन दिल्यावर शेतकर्‍यांनी आंदोलन थांबविले. परंतु तिथे कर्जमाफीचा निर्णय झाल्याचे ऐकिवात नाही. एकंदरीत कर्जमाफीसाठी नोटबंदी, शेतकर्‍यांची हलाखीची स्थिती इ. कारणे जबाबदार नसून निवडणुक किंवा राजकीय अपरिहार्यता हेच कारण त्यामागे असते. अन्यथा भारतातील यच्चयावत सर्व राज्यांनी कर्जमाफी जाहीर केली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
थ
थिटे मास्तर Sun, 09/10/2017 - 19:06 नवीन
लोक आर्थिक निर्णयाचं राजकीय समर्थन करतायत त्यामुळं हा घोळ होतोय, त्यापेक्षा लोकांनी आर्थिक निर्णयाचं आर्थिक विवेचन करून समर्थन किंवा विरोध करावा आर्थिक विवेचन... लोक ( सामान्य माणुस ).... बाकि चालुद्या.
  • Log in or register to post comments
थ
थिटे मास्तर Sun, 09/10/2017 - 19:22 नवीन
आर्थिक विवेचन... लोक ( सामान्य माणुस )....अच्छो अच्छो के पल्ले नहि पडा सर सामान्य माणसाला काय समजणार. आताशा लोक ( सामान्य माणुस ) मते देतो तेंव्हा त्याला हे समजायला लागल आहे कि what is optimism? ते लोक ( सामान्य माणुस ) ज्या गाडित बसलेत ति गाडि कोणि डोळस माणुस आंधळा बनुन ऐका अश्या व्यक्तिच्या ईशार्यावर चालवतोय कि ज्याला मुळात गाडि काय आहे हेच माहित नाहि. आणि आता ति गाडि अशि व्यक्ति चालवतेय ज्याने सगळ्या भारतिय गाड्या चालवल्यात आणि आता लेफ्ट हँड ड्रिव्हन अँटोमँटिक हातात आलिय. बाळबोध उदाहरण आहे आय नो.
  • Log in or register to post comments
थ
थिटे मास्तर Sun, 09/10/2017 - 19:31 नवीन
तुम्हाला नाहि कळाल्यास आमच्या बौध्दिकात प्रॉब्लेम आहे हे आम्हि लोकांनी (सामान्य लोक ) पहिलेहि त्यांना जिंकवुन मान्य केलच आहे. तुम्हि विवेचन चालु ठेवावे. लोक ( अतिसामान्य) घंटा ( देवळाचा किंवा चर्च कुठलाहि... नाहि चिदंबरम मस्जिद मध्ये घंटा नसते )
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 09/12/2017 - 07:37 नवीन
राहुलजी दोन आठवड्यांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. Rahul Gandhi is on his two-week visit to the US during which he will interact with global thinkers and political leaders, and address overseas Indians as part of an outreach initiative by his party. In his first engagement, Gandhi today addressed students of the prestigious University of California, Berkeley on India at 70: Reflections on the Path Forward, in which he will offer his reflections on contemporary India and the path forward for the world's largest democracy. राहुवजींचे हे भाषण एक सुखद धक्का होता. या अवघड विषयावरील त्यांचे अभ्यासू विचार ऐकल्यानंतर भारताचे भवितव्य या बुद्धिमान, दूरदर्शी युवा नेत्याच्या हातात सुखरूप राहील याची खात्री पटली. "७० वर्षानंतरचा भारत - वर्तमान व भवितव्य" या महत्त्वाच्या विषयावरील राहुलजींच्या या अभ्यासू व मुद्देसूद भाषणाचा सारांश - नोटाबंदी, वाढता हिंसाचार, जीएसटी यासह अनेक मुद्द्यांवरुन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ‘हिंसा, द्वेष आणि ध्रुवीकरणाचे राजकारण यांनी भारतात डोके वर काढले आहे. हे मुद्दे देशासाठी नवे असून, हाच ‘न्यू इंडिया’ आहे,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींवर शरसंधान साधले. ते अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील बर्कलेमध्ये बोलत होते. नोटाबंदीचा निर्णय, कथित गोरक्षकांकडून सुरु असलेला हिंसाचार, द्वेषाचे राजकारण अशा अनेक मुद्यांवरुन राहुल गांधींनी मोदी सरकारला लक्ष्य केले. ‘राजकारणातील ध्रुवीकरण अतिशय धोकादायक आहे. द्वेष, राग आणि हिंसा सगळ्यांनाच उद्ध्वस्त करेल. देशातील उदारमतवादी पत्रकारांच्या हत्या होत आहेत. सामान्य लोकांवर हल्ले केले जात असून दलितांना गायींची तस्करी केल्याच्या केवळ संशयावरुन संपवले जात आहे. गोमांस सेवन केल्याच्या संशयावरुन मुस्लिमांच्या हत्या सुरु आहेत. हे सर्वकाही ‘न्यू इंडिया’मध्ये सुरू आहे,’ अशा शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींच्या ‘न्यू इंडिया’ अभियानावर निशाणा साधला. हिंसाचाराच्या घटना आता मुख्य प्रवाहाचा भाग झाल्या आहेत आणि हा प्रकार अतिशय भयंकर आहे. अहिंसेच्या विचारांवरच हल्ले सुरु आहेत. अहिंसेमुळेच मानवता जिवंत राहू शकते. मात्र त्याच विचारधारेला लक्ष्य केले जात आहे,’ असा शब्दांमध्ये त्यांनी देशातील स्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर टीकेची झोड उठवली. ‘मोदींनी संसद, मुख्य आर्थिक सल्लागार यापैकी कोणाचाही सल्ला न घेता, त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता नोटाबंदीचा निर्णय घेतला. मोदींच्या या निर्णयाची किंमत देशाला चुकवावी लागली. सकल राष्ट्रीय उत्पादनात २ टक्यांची घट झाली. लोकांसोबतच संवाद कमी होत गेल्यानेच काँग्रेसला पराभव पत्करावा लागला, असे मतही राहुल गांधींनी व्यक्त केले. ‘२०१२ च्या सुमारास पक्षात अहंकार निर्माण झाला. त्यामुळे आम्ही लोकांसोबत संवाद साधणेच बंद केले,’ असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. देशातील तरुणांना रोजगाराची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले. रोजगार निर्मितीत केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली. http://www.loksatta.com/desh-videsh-news/violence-and-politics-of-polarisation-raised-their-ugly-head-in-india-says-rahul-gandhi-in-his-us-speech-slams-pm-modi-1549154/ भाजप ही एक मशीन आहे. या मशीनशी संबंधित हजारो लोक सतत कम्युटरसमोर बसलेले असतात आणि माझ्याबद्दल अपप्रचार करतात. एका सभ्य माणसाच्या इशाऱ्यावर हे सगळं चालतं आणि हाच सभ्य माणूस सध्या देश चालवत आहे,' असा आरोपही त्यांनी केला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात आम्ही काश्मीरमधील दहशतवाद मोडून काढण्यात यश मिळवलं होतं. मात्र, तिथं पुन्हा एकदा दहशतवादानं डोकं वर काढलंय. मोदी सरकारची धोरणंच यासाठी जबाबदार असल्याचं ते म्हणाले. 'मुफ्तींचा पीडीपी हा पक्ष काश्मिरी तरुणांना राजकारणात आणण्यासाठी पुढाकार घ्यायचा. मात्र, भाजपशी युती झाल्यापासून मोदींनी हा पक्ष बरबाद करून टाकला,' असं त्यांनी सांगितलं. http://m.maharashtratimes.com/international/international-news/what-rahul-said-on-bjp-machine-his-stupidity/articleshow/60473274.cms
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 09/12/2017 - 08:57 नवीन
श्रीगुरुजी, बर्कले एव्हढी पप्पूमय झालेली पाहून संतोष झाला. एकंदरीत पप्पूस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षच बनवला पाहिजे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ग
गामा पैलवान Tue, 09/12/2017 - 08:20 नवीन
बस! एव्हढंच वाचायचं राहिलं होतं माझ्या आयुष्यात. धन्य जाहलो अजि मी या जीवनी :
सुज्ञ मनुष्य विचार करायला लागतो, तेव्हा तो आपसूकच डावीकडे झुकत असतो.
-गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Tue, 09/12/2017 - 11:46 नवीन
नोटबंदीचे समर्थन करणारे किंवा विरोध खोडून काढणारे प्रतिसाद आलेत हे उत्तम चर्चेचं लक्षण आहे. हा शेवटचा प्रतिसाद देतो ह्या विषयावरचा कारण मला जे म्हणायचं आहे ते मी मांडलेलं आहे. @श्रीगुरुजी
वरील उदाहरणात तसेच आहे. गुणोत्तर किंवा टक्केवारीपेक्षा बेकारीचे प्रत्यक्ष आकडे पाहिले तर जानेवारी ते एप्रिल २०१७ या काळात बेकारांची संख्या ९६ लाखांनी कमी झाली असे वृत्तांतात लिहिले आहे. आता कसेही गुणोत्तर मांडले किंवा टक्केवारीची तुलना केली तरी बेकारांची संख्या ९६ लाखांनी घटलेली आहे ही वस्तुस्थिती लपत नाही.
the number of people who declared themselves unemployed fell much more - by 9.6 million. या वाक्याचा अर्थ बेकारी कमी झाली असा होत नाही असे मला वाटते, याचा अर्थशास्त्रात नेमका काय अर्थ होतो हे मी सांगू शकत नाही, परंतु बेकारी जवळजवळ १ कोटी ने ४ महिन्यात कमी झाली असा अर्थ होणार नाही, याच कारण क्र १. हे संशोधन करणारे एवढी साधी/बावळट चूक करतील असे वाटत नाही याचा अर्थ त्यांना वेगळे म्हणणे अभिप्रेत आहे अन्यथा त्यांनी ९६ लाख लोकांना नोकऱ्या लागल्या असे सरळ लिहलं असतं . २. एवढ्या मोठ्या संख्येने बेकारी कमी झाली असती तर मोदी सरकार ने रोजगार निर्मितीचे ढोल बडवले असते.
हे सॅम्पल खूपच कमी आहे आणि त्यामुळेच यांचे निष्कर्ष चुकलेले दिसतात.
मला अजिबात असे वाटत नाही, पोलिंग सर्वे येतात किती असते हो सॅम्पल size ? १००००-२०००० इथे सॅम्पल size चांगली मोठी आहे.
अन्यथा भारतातील यच्चयावत सर्व राज्यांनी कर्जमाफी जाहीर केली असती.
मुळात देशात कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून (कमी/अधिक प्रमाणात ) असणारी राज्ये म्हणजे तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि बिहार. यातील ५ राज्यांनी कर्जमाफी /व्याजमाफी जाहीर केली आहे. नोटबंदी हे यामागचे कॅटॅलीस्ट आहे एकमेवे कारण नाहीये असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तेच मी फक्त मांडतोय. @ट्रेडमार्क तुमच्या मताशी सहमत नाही, त्याचा प्रतिवाद करत नाही. फक्त एक जनरल प्रतिसाद देतो, सगळा प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नाही.
नोटबंदी कशी चांगल्या पद्धतीने राबवता आली असती याचा प्लॅन काही मिपाकर जानेवारी २०१७ च्या आधी देणार होते, तो काही अजून मिळाला नाही. तुम्ही पण सांगा काय उपाय करता आले असते ते. आणि हो जे सांगाल ते सर्वच्या सर्व लोकांना फायद्याचे आणि फुलप्रूफ असावे. म्हणजे एक प्लॅन द्यायचा, जो इतका फुलप्रूफ असेल की ज्याने फक्त सर्वच्या सर्व अप्रामाणिक भारतीयांना तास झाला पाहिजे पण एकाही प्रामाणिक भारतीयास त्रास व्हायला नको. तसेच प्लॅन/ नियम एकदा केले की परत बदलता येणार नाहीत. बोला कधी देताय.
मुळात हा प्लॅन देणे हे माझे काम हि नाही आणि कुवत हि नाही. सरकारच्या (मग ते भाजप असो नाहीतर काँग्रेस ) निर्णयावर टीका केली कि त्यांचे पाठीराखे मुद्यावर बोलायचं सोडून मग तुम्हीच का नाही सुचवत चांगला प्लॅन ? मग तुम्हीच चांगला उपाय सुचवा? तुम्हीच का नाही सीमेवर जाऊन लढत? तुम्ही अर्थतज्ञ् आहात का ? तुम्ही जास्त हुशार आहात का ? असले निरुपयोगी प्रश्न विचारतात हा अनुभव आहे. तुम्ही काँग्रेस च्या आर्थिक आणि संरक्षण धोरणास विरोध करता त्यावेळी तुम्ही कोणते प्लॅन सादर करता ? किंवा कोणते प्लॅन तुमच्याकडे रेडी असतात जे सरकार पेक्षा चांगले आहेत? त्यावेळी तुम्ही कसे अर्थतज्ञ् किंवा संरक्षण क्षेत्रातील जाणकार होता ? मुळात मिसळपाव हे संस्थळ सामान्य आणि सुज्ञ वाचकांसाठी आहे असे माझे मत आहे, येथे विचार मांडायला तुम्हाला जाणकार व्हायायची गरज नाही जोपर्यन्त तुम्ही असबंद बोलत नाही तोपर्यंत. @पिज तुम्ही दिलेला लेख अर्धा वाचला तो फक्त डाळींच्या संधर्भात आहे असे दिसून येते. मुळात अन्नधान्याच्या किमती अनेक घटकावर अवलंबून आहेत हे मान्यच आहे, पंरतू जेंव्हा नोटबंदी मुळे अर्थव्यवस्था काही काळासाठी ठप्प होते किंवा मंदावते (तुम्ही तुमच्या प्रतिसादात हे मान्य केलंय ), तेंव्हा त्याचा शेती अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही असे आपण कसे म्हणू शकतो ? मुळात कधी कांदे, टोमॅटो, साखर यांच्या भावातील चढउतार आपण काही वेळा पाहतो मात्र एकाचवेळी वेगवेगळ्या अन्नधान्याच्या भावात उतार होताना दिसत नाही जे नोटबंदी च्या काळात घडलेलं आहे, हा मुद्दा कृपया तुम्ही लक्षात घ्या. हेच त्या लेखकाने मांडले आहे. @चिनार
हे जर खरे असेल तर, बँकेत कितीही पैसा वापस आला तरी चार लाख कोटींचे चलन सरळ सरळ बाद झाले असं म्हणता येऊ शकतं का? या चार लाख कोटींपैकी अर्धा जरी काळा पैसा असेल तरी चांगलेच नाही का ?
माझ्या मताप्रमाणे अजिबात नाही, याचा अर्थ फक्त बाजारात कमी नोटा आल्या एवढाच होतो. @अजो तुम्ही खूप सारे प्रतिसाद दिलेत, तुमच्या काही प्रश्नाची उत्तरे माझ्या प्रतिसादात सापडतील, काही नाहीत सापडणार. तुम्ही प्रश्न विचारण्यापेक्षा तुमची मते मांडावीत किंवा माझी खोडून काढावीत हि विनंती. सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही कारण १. माझं तोकडं अर्थ ज्ञान २. मर्यादित वेळ. शेवटी माझं मत: नोटबंदी चे फक्त तोटेच आहेत आणि काही फायदे नाहीत असे माझे म्हणणे नाही, माझे असे म्हणणे आहे कि जे फायदे सांगितले जातायत त्यासाठी नोटबंदी करायची आवश्यकता न्हवती आणि नोटबंदीचे मूळ उद्देश असफल झालेत. नोटबंदी मधून भविष्यात जे काही फायदे होतील त्यातून आता जे नुकसान झालं आहे ते भरून निघेल असे मला वाटत नाही. आणि समजा उद्या मोदींनी ३ ते ४ लाख कोटी रुपये काळा पैसा नोटबंदी मुळे पकडला असे दाखवून दिले तर मी मत बदलेन ना शेवटी मी काही मोदींचा कट्टर विरोधक नाही जो पुढे असलेला डेटा अमान्य करून फक्त विरोधच करेन ते.
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 09/12/2017 - 15:18 नवीन
सरकारच्या (मग ते भाजप असो नाहीतर काँग्रेस ) निर्णयावर टीका केली कि त्यांचे पाठीराखे मुद्यावर बोलायचं सोडून मग तुम्हीच का नाही सुचवत.... असले निरुपयोगी प्रश्न विचारतात हा अनुभव आहे यावर काही लोक "तुमच्या मताशी सहमत नाही, त्याचा प्रतिवाद करत नाही" किंवा प्रतिवाद करायला मला वेळ नाही हे पण उत्तर देतात असा अनुभव आहे. असो. प्रश्न निरुपयोगी नव्हता कारण तुम्ही म्हणालात की नोटबंदी न करतासुद्धा हे साध्य करता आलं असतं, म्हणून आपलं विचारलं की प्लॅन द्या. अगदी प्लॅन नसेल तर निदान पॉइंटर्स तरी देऊच शकता. पण तुम्ही हा शेवटचा प्रतिसाद आणि वेळ नाही असं म्हणून पळवाट आधीच काढून ठेवली आहे. काँग्रेसच्या काळात बाकी कशाहीपेक्षा भ्रष्टाचार (ते स्वतः करत होते तो) कमी करा हाच सगळ्यात मोठा मुद्दा होता. बाकी त्यांनी फारसं काही केलं असं वाटत नाही. ज्या काही योजना आणल्या त्यात फक्त स्वतःचे खिसे कसे भारत येतील हे बघितलं गेलं. अगदी शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना बघा, त्यातही खऱ्या शेतकऱ्याला भरपाई मिळालीच नाही, पण पैसे मात्र वाटले गेले. येथे विचार मांडायला तुम्हाला जाणकार व्हायायची गरज नाही बरोब्बर. विचार म्हणजे दुसऱ्या कोणीतरी दाखवलेली आकडेवारी नव्हे. आकडेवारी तर दोन्ही बाजूची लोक दाखवत आहेत. मग दोन्ही बाजू अभ्यासून (जेवढं कळेल तेवढं) आपलं मत तयार करता आलं पाहिजे. तुम्ही म्हणताय की "नोटबंदी चे फक्त तोटेच आहेत आणि काही फायदे नाहीत असे माझे म्हणणे नाही". पण जशी इतरांनी दिलेली आकडेवारी दाखवून नोटबंदी अपयशी आहे म्हणताय, तसेच इतरांनी दिलेले (किंवा तुम्हाला वाटलेले) फायदे कुठे लिहिले नाहीत. हे सर्व फक्त तुम्हाला उद्देशून नाही तर जनरल स्टेटमेंट आहे - मी तटस्थ आहे असं नुसतं म्हणून भागत नाही तर दोन्ही बाजू सुसंगतपणे मांडता यायला पाहिजेत. बहुतांशी लोक आपल्या विचारांशी सुसंगत असेल तेवढेच वाचतात किंवा घेतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
अ
अमितदादा Tue, 09/12/2017 - 20:35 नवीन
ठीक आहे आता तुम्ही असंबद प्रतिसाद दिला आहे तर प्रतिवाद करतोच.
आकडेवारी तर दोन्ही बाजूची लोक दाखवत आहेत. मग दोन्ही बाजू अभ्यासून (जेवढं कळेल तेवढं) आपलं मत तयार करता आलं पाहिजे. तुम्ही म्हणताय की "नोटबंदी चे फक्त तोटेच आहेत आणि काही फायदे नाहीत असे माझे म्हणणे नाही". पण जशी इतरांनी दिलेली आकडेवारी दाखवून नोटबंदी अपयशी आहे म्हणताय, तसेच इतरांनी दिलेले (किंवा तुम्हाला वाटलेले) फायदे कुठे लिहिले नाहीत.
मुळात तुम्ही माझा पहिला प्रतिसाद वाचला का ? हा पहा http://www.misalpav.com/comment/959658#comment-959658 यातील पहिले ७ पॉईंट हे मी नोटबंदी चे तोटे सांगितले आहेत आणि उरलेले ३ पॉईंट हे नोटबंदीच्या समर्थनार्थ आहेत जे नोटबंदीच्या एका समर्थक लेखकाने मांडले आहेत, ज्यातील लूपहोल मी दाखवून दिले आहेत. मी टोटल ६-७ रेफररेन्स (संधर्भ) दिलेले आहेत आणि त्यातील डेटा प्रेसेंट करून मांडलेला आहे. तुम्ही काय केलेय ? एक हि संदर्भ नाही , डेटा दिलेला नाही, तुम्ही फक्त "काही लोक नोटबंदी अयशस्वी करतायत " हेच टेप लावलीय, आता अश्या प्रतिसादांना काय उत्तर द्यायचं ? काय प्रतिवाद करायचा ? म्हणून मी सरळ म्हंटल कि तुमच्या मताशी असहमत आहे, त्याचा प्रतिवाद करत नाही. मुळात तुमच्या प्रतिसादात तुम्ही नोटबंदी ला लोकांना जबाबदार ठरवून (जे साफ चुकीचं आहे ) नोटबंदी अयशस्वी जालीय हे मान्य केलंय. तुमचे सगळे प्रतिसाद हे माझे मुद्दे खोडून काढण्यासाठी आहेत (त्यात काही अयोग्य नाही), परंतु एक हि मुद्दा नोटबंदीचे समर्थन सांगणारा नाही, हे हि नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. कि त्याचे समर्थन करण्याचे काम हि मीच करू. मुळात तुम्हाला माझे मुद्दे खोडून काढायचे होते तर दिलेलं संधर्भ वाचून मुद्दे खोडून काढायला हवे होते यासाठी श्री गुरुजींचे प्रतिसाद वाचा. तुम्ही फक्त लोक कशी जबाबदार आहेत हेच बोलताय. मुळात कमीत कमी लूपहोल असणारा प्लॅन बनवणं आणि त्याची अंमलबजावणी करण हे सरकार आणि अजस्त्र अश्या सरकारी यंत्रणेचं काम आहे, यात जर अपयश आलं आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार असेल तर एक नागरिक म्हणून आपल्याला टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे. यावेळी सरकारच्या पाठीराख्यानी "तुम्ही प्लॅन तयार करा " असे म्हणणे म्हणजे पराभूत मानसिकतेचं लक्षण आहे याच कारण १. त्याचा प्लॅन अयशस्वी झाला हे त्यांना मान्य आहे २. सरकार विरोधी योग्य प्रश्न विचारणाऱ्याला असे प्रतिप्रश्न विचारून गप्प करण्याचा त्यांची एक जुनी सवय आहे. तुम्ही काँग्रेस विरोधी मत मांडता तेंव्हा किती प्लॅन तयार ठेवता ? मांडा इथे तुमचे काही प्लॅन ? बरं काँग्रेस चे राहूदे नोटबंदी यशस्वी होण्यासाठी काय कराय हवं होत किंवा भविष्यात काळा पैसा कसा वसूल करायचा यापैकी कोणताही विषय निवडून इथे डिटेल प्लॅन द्या.
प्रतिवाद करायला मला वेळ नाही
मुळात माझे शब्द आहेत "मर्यादित वेळ " आणि ते हि फक्त अरुणजोशी यांच्यासाठी आहेत कारण त्यांनी १७६० प्रश्न विचारलेत स्वतःच कोणतंही मत न मांडता, मी काही इथे बसून त्यांच्या प्रत्येक प्रश्नास उत्तर देऊ शकत नाही म्हणून हे कारण त्यांना सांगितलं. बाकी ज्यांचे मुद्देसूद प्रतिसाद आहेत त्यांना मी उत्तरे दिली आहेत. असो हि वैयक्तिक व्हायला नको म्हणून इथेच थांबतो, तुमचा प्रतिसाद याला येणार याची अपेक्षा आहे त्याचा प्रतिवाद करणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Tue, 09/12/2017 - 21:49 नवीन
आकडेवारी गुरुजींनी दिलीच आहे परत तीच द्यायची गरज आहे असं मला वाटलं नाही. मुळात नोटबंदी फेलच झाली आहे याच दृष्टिकोनातून तुम्ही आकडेवारी बघताय आणि प्रतिसाद देताय. गुरुजींनी पण आकडेवारी कशी दोन्ही बाजूने इंटरप्रिट करता येते तेही दाखवलंय. पण तुम्ही दृष्टिकोन फायनल केला असल्याने तसंही चर्चा करून काही उपयोग नाही. तुम्ही प्रतिसाद देणार नाही म्हणताय म्हणून अधिक काही न लिहिता मी तुमची अपेक्षा पूर्ण करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
श
श्रीगुरुजी Wed, 09/13/2017 - 17:26 नवीन
@श्रीगुरुजी वरील उदाहरणात तसेच आहे. गुणोत्तर किंवा टक्केवारीपेक्षा बेकारीचे प्रत्यक्ष आकडे पाहिले तर जानेवारी ते एप्रिल २०१७ या काळात बेकारांची संख्या ९६ लाखांनी कमी झाली असे वृत्तांतात लिहिले आहे. आता कसेही गुणोत्तर मांडले किंवा टक्केवारीची तुलना केली तरी बेकारांची संख्या ९६ लाखांनी घटलेली आहे ही वस्तुस्थिती लपत नाही. the number of people who declared themselves unemployed fell much more - by 9.6 million. या वाक्याचा अर्थ बेकारी कमी झाली असा होत नाही असे मला वाटते, याचा अर्थशास्त्रात नेमका काय अर्थ होतो हे मी सांगू शकत नाही, परंतु बेकारी जवळजवळ १ कोटी ने ४ महिन्यात कमी झाली असा अर्थ होणार नाही, याच कारण क्र १. हे संशोधन करणारे एवढी साधी/बावळट चूक करतील असे वाटत नाही याचा अर्थ त्यांना वेगळे म्हणणे अभिप्रेत आहे अन्यथा त्यांनी ९६ लाख लोकांना नोकऱ्या लागल्या असे सरळ लिहलं असतं . २. एवढ्या मोठ्या संख्येने बेकारी कमी झाली असती तर मोदी सरकार ने रोजगार निर्मितीचे ढोल बडवले असते. the number of people who declared themselves unemployed fell much more - by 9.6 million. या वाक्याचा अर्थ बेकारी वाढली असा तर नक्कीच होत नाही. मूळ लेखात १५ लाख नोकर्‍या गेल्या, ३५% कर्मचार्‍यांनी नोकर्‍या गमाविल्या असे दावे आहेत. परंतु वरील वाक्य हे त्या दाव्यांशी पूर्णपणे विसंगत आहे. त्यामुळेच निदान या लेखांवर तरी विसंबून निश्चलीकरणामुळे नोकर्‍या गेल्या, बेकारी वाढली इ. दाव्यांवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. मोदी सरकार ने रोजगार निर्मितीचे ढोल बडवले नाहीत याचा अर्थ असा होत नाही की रोजगार निर्मिती झालेलीच नाही. त्यामुळे मोदी सरकारने ढोल बडविले नाहीत म्हणजेच रोजगार निर्मिती झालेली नाही असा सोयिस्कर निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही. एकंदरीत निश्चलीकरणामुळे बेकारी वाढली, नोकर्‍या गेल्या किंवा बेकारी कमी झाली, रोजगार निर्मिती वाढली असे कोणतेही ठोस निष्कर्ष वरील लेखातून काढता येणार नाही. हे सॅम्पल खूपच कमी आहे आणि त्यामुळेच यांचे निष्कर्ष चुकलेले दिसतात. मला अजिबात असे वाटत नाही, पोलिंग सर्वे येतात किती असते हो सॅम्पल size ? १००००-२०००० इथे सॅम्पल size चांगली मोठी आहे. निवडणुक सर्वेक्षण आणि रोजगार संबंधी सर्वेक्षण यात बराच फरक आहे. अगदी डेटाचा आकार बघितला तरी मतदार हे किमान १८ वर्षांचे असतात तर वरील सर्वेक्षण हे किमान १४ वर्षांवरील व्यक्ती रोजगारक्षम आहे या गृहितकावर आधारीत आहे. म्हणजेच हे सर्वेक्षण जास्त लोकसंख्येसाठी आहे. त्यामुळे अर्थातच या सर्वेक्षणासाठी निवडणुक सर्वेक्षणापेक्षा जास्त सॅम्पल हवे. अन्यथा भारतातील यच्चयावत सर्व राज्यांनी कर्जमाफी जाहीर केली असती. मुळात देशात कृषी अर्थव्यवस्थेवर अवलंबून (कमी/अधिक प्रमाणात ) असणारी राज्ये म्हणजे तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि बिहार. यातील ५ राज्यांनी कर्जमाफी /व्याजमाफी जाहीर केली आहे. नोटबंदी हे यामागचे कॅटॅलीस्ट आहे एकमेवे कारण नाहीये असे या तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तेच मी फक्त मांडतोय. यातील फक्त महाराष्ट्र व उत्तर प्रदेशने कर्जमाफी जाहीर केली आहे. पंजाबचा त्याबाबतीत विचार सुरू आहे. इतर राज्यांनी कर्जमाफी जाहीर केल्याचे वाचनात आले नाही. मी पूर्वीच सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी ही राजकीय मागणी असते व कर्जमाफी जाहीर करणे हा राजकीय निर्णय असतो. सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्ष कर्जमाफीची मागणी करून ब्राऊनी पॉईंट्स स्कोअर करण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः जेव्हा निवडणुक जवळ आलेली असते तेव्हा मतपेढीची सोय करण्यासाठी ही मागणी केली जाते. सत्ताधारी पक्ष हे ओळखून असतो. त्यामुळे कर्जमाफी देण्याचे श्रेय विरोधकांना मिळू नये यासाठी सत्ताधारी पक्ष वेगवेगळे प्रयत्न करून शेवटी आपल्याला राजकीयदृष्ट्या सोयीच्या वेळी कर्जमाफी जाहीर केली जाते. निश्चलीकरण, दुष्काळ, उत्पादनाला कमी भाव, शेतीत नुकसान, शेतकर्‍यांची हलाखीची परिस्थिती इ. कोणतेही कारण कर्जमाफी मागण्यामागे व देण्यामागे नसते. अर्थात हे उघडपणे कोणीच सांगत नाही. ही कारणे पुढे केली जातात, परंतु त्यामागचे एकमेव कारण राजकीय फायदा हेच असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
ग
गामा पैलवान Tue, 09/12/2017 - 14:32 नवीन
मोहन भागवतांना झोपेतनं जाग आली आहे. हिंदू हाच खरा धर्म असून बाकी संप्रदाय आहेत असं वक्तव्य श्री. भागवतांनी केलं. अस्मादिक कधीपास्नं हेच बोंबलंत आहेत. शेवटी भागवतांना पटले म्हणायचे. अधिक माहिती : http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/hinduism-only-true-religion-in-world-says-mohan-bhagwat/articleshow/60475075.cms -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 09/12/2017 - 15:35 नवीन
अरे वा ! पप्पू पंतप्रधान बनणार तर !
पक्षाने जबाबदारी सोपवली तर मी पंतप्रधानपदाचा उमेदवार बनण्यास तयार आहे.
पप्पूची एकंदरीत समज पाहता त्याने अमेरिकेचा पंतप्रधान बनणं इष्टं. मी आजपासून त्याचा तसाच उल्लेख करणार! -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 09/13/2017 - 13:22 नवीन
'कोणी काय खावं आणि कोणी कोणता पेहराव करावा याच्याशी हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही. दुसऱ्या व्यक्तीला आहे त्या स्वरूपात स्वीकारणं हे हिंदुत्व आहे,
उत्तम.. याचा अधिकाधिक प्रचार- प्रसार हिंदूत्ववाद्यांनी करावा..
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 09/13/2017 - 14:32 नवीन
.... कारण की तो अगोदरच झालेला आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ग
गामा पैलवान Sat, 09/16/2017 - 14:40 नवीन
लोकहो, पश्चिम बंगालात भाजप कार्यकर्ते सौमित्र घोषाल या तरुणाची निर्घृण हत्या झाली आहे. सारे विचारवंत आपापली थोबाडं गच्च बंद करून बसली आहेत. जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहणे सोडून द्यावे इतकीच माफक अपेक्षा आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा Sat, 09/16/2017 - 22:05 नवीन
या मोहिमेमागच्या तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ आणि अनेक सहभागी लोकांच्या कष्टाचे, बुद्धिमत्तेचे, जिद्दीचे आणि प्लॅनिंग चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खालील लेखात Cassini च्या मोहीमेचे यश, शोध, त्याचबरोबर ते क्रॅश करण्यामागची कारणे दिली आहेत, याबरोबरच Huygens ह्या टायटन (शनी चा चंद्र) वर उतरलेल्या आणि Cassini बरोबर गेलेल्या प्रोब ची हि थोडक्यात माहिती दिली आहे. लेख जास्त टेकनिकल नसल्याने आपल्यासारख्याना समजण्यास सोपा आहे. अधिक माहितीसाठी विकिपीडिया आहेच. Cassini, NASA's 13-year Saturn mission, has ended
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 09/18/2017 - 14:37 नवीन
रोहिंग्या मुसलमान हे देशासाठी धोकादायक आहेत. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांशी त्यांचे संबंध असून कोणत्याही परिस्थितीत त्यांना भारतात राहू दिलं जाणार नाही,' अशी स्पष्ट भूमिका केंद्र सरकारनं घेतली आहे. तसं प्रतिज्ञापत्रच केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सादर केलं आहे. इतकी स्पष्ट व नि:संदिग्ध भूमिका यापूर्वी कोणत्याही सरकारने घेतल्याचे ऐकिवात नाही. http://m.maharashtratimes.com/india-news/some-militant-rohingya-active-in-india-govt-to-sc/articleshow/60730706.cms
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Mon, 09/18/2017 - 18:12 नवीन
सरकारची भूमिका एकदम योग्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
त
तुषार काळभोर Mon, 09/18/2017 - 18:23 नवीन
राणेंच्या ऐतिहासिक घोषणेला घटस्थापनेचा मुहूर्त! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसमधून बाहेर पडणे निश्चित केले आहे. ते बहुधा भाजपमध्ये प्रवेश करतील. अतिशय कमी शक्यता असलेला दुसरा मार्ग म्हणजे स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन करणे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेर राणे यांना पुरेसा बेस नसल्याने स्वतंत्र पक्ष स्थापन केला तरी जसा शेकाप रायगडपुरता मर्यादित आहे तसा राणेंचा पक्ष स्थानिक पातळीवर मर्यादित राहील. शिवाय पक्ष सोडताना त्यांच्या मुलांनाही पदे सोडावी लागतील. शिवाय राणेंना सोबत करणाऱ्या नगरसेवक व आमदारांना पुन्हा निवडणूक लढवावी लागेल. 1998 नंतर शिवसेनेत मुख्यमंत्री होता येणार नाही, हे पाहून तेवढ्यासाठी ते सत्तेत असलेल्या काँग्रेसमध्ये गेले. पण तिथे सुद्धा त्यांना फार काही मिळाले नाही. (महसूलमंत्री म्हणून राजकीय ताकद/ आर्थिक मिळकत किती असते माहिती नाही). आता इथून पुढे काँग्रेसमध्ये राहून हाती काहीच येणार नसल्याने त्यांनी सत्तेत असणाऱ्या भाजपशी जवळीक केलीय. अर्थात भाजप मध्ये त्यांना कितपत मोठेपणा मिळेल, याविषयी शंका आहे. अर्थात, राणे पिता-पुत्रांचे उपद्रव मूल्य खूप जास्त आहे, त्यामुळे त्यांना सांभाळणे ही मा. मुख्यमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्यासाठी नाजूक कसरतच असेल.
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 09/19/2017 - 12:42 नवीन
उर्जा मत्रालयानं श्री. पियुष गोयल यांच्या कारकिर्दीत मागील ३ वर्षात चांगले काम केलेले दिसते - - पारंपारिक उर्जा स्त्रोतांत ६०,००० MW ने उत्पादन क्षमता वाढलेली आहे. २०१४-१५ मधे ८.४३%, २०१५-१६ मधे ५.४६% आणि २०१६-१७ मधे ४.७२% वाढ. - २०१६-१७ मधे नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमार ला केली जाणारी वीज निर्यात २१३ मिलियन युनिट्स ने वाढलेली आहे. - पं. दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत [DDUGJY] [गुजरातच्या ज्योती ग्राम योजनेवर आधारीत], एप्रील २०१५ मधे १८४५२ गावे वीजेविना होतीत त्यापैकी १३५११ गावांपर्यंत वीज पोचली आहे. याच योजनेअंतर्गत, Rural Feeder Monitoring Scheme सुरू करण्यात आलेली आहे, ज्यातून आलेली माहिती National Power Portal (NPP) वर मिळते. - अपारंपारिक उर्जा स्त्रोतांत २०१५-१६ मधे पवनचक्क्यांच्या माध्यमातून ३,४२३MW आणि सौरौर्जेतून ३०१९MW वाढ झालेली आहे. २०१६-१७ मधे अपारंपारिक उर्जास्त्रोतांच्या माध्यमातून झालेली एकूण वाढ ही पारंपारिक उर्जास्त्रोतांच्या माध्यमातून होणार्‍या वाढीपेक्षा प्रथमच जास्त आहे. Renewable Energy साठीचे २०१७ चे बजेट १५०० कोटी वरून ९००० कोटी पर्यंत वाढवण्यात आलेले आहे. => डेटा Central Electricity Authority (CEA) वरून.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 09/19/2017 - 13:06 नवीन
लोकहो, इक्बाल कासकर या दाऊद इब्राहीमच्या भावास खंडणीप्रकरणी अटक. बातमी इथे आहे : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/iquabal-kasakar-arrested/articleshow/60739684.cms इक्बाल कधीच गुन्हेगार नव्हता (संदर्भ : एस. हुसेन झैदी यांचं डोंगरी ते दुबई या पुस्तकातलं द व्हाईट कासकर हे प्रकरण). मुंबई बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात दाऊद नेहमी स्वत:ला निर्दोष समजत आला आहे. १९९४ साली प्रथम याकूब मेमनला मुंबईस पाठवून त्याने कानोसा घेतला. त्यातून दाऊदला कळलं की आपण परत मुंबईस गेलो तर आपली गत त्याच्यासारखीच होईल. म्हणून काही वर्षे दाऊद गप्प बसला. पुढे २००३ साली त्याने इक्बाल नावाच्या आपल्या एका भावाला मुंबईस जाण्यास उद्युक्त केलं. (काही जण म्हणतात की इक्बाल स्वत:हून गेला. खखोदाजा.). हेतू अर्थात आपल्याविरुद्ध जनमत चाचपून बघण्याचा होता. इक्बालला मुंबई पोलिसांनी कुठलीशी केस उकरून कडून मोक्का लावला आणि चार वर्षे आत सडवला. सोबत पोलीस दलातला प्रामाणिक आणि कर्तव्यतत्पर अधिकारी अस्लम मोमीन याच्या कारकिर्दीची आणि आयुष्याची मुंबई पोलिसांनी वाट लावली. त्याचा गुन्हा इतकाच की इक्बालची चकमकहत्या (=एनकाउंटर) होणार नाही म्हणून दिलासा दिला. पुढे बाहेर आल्यावर इक्बालने निवडणुका लढवायची तयारी सुरू केली. अरुण गवळीचं उदाहरण होतं समोर. अस्लम मात्र बहुतेक आजूनही अन्यायाविरुद्ध लढतोच आहे. इक्बालने अर्ज भरल्यावर कोण्या आयपीएस अधिकाऱ्याने त्याला 'समजावलं' की मुंबई पोलीस तुला 'सोडणार' नाहीत. त्याने निमूटपणे उमेदवारी मागे घेतली. एकंदरीत इक्बालला इतर टोळ्यांकडून अजिबात धोका नसून मुंबई पोलिसांकडून आहे. मुंबई पोलिसांना दाऊद आजिबात परत यायला नकोय. त्यासाठी त्यांची कोणत्याही थराला जाण्याची तयारी आहे. अस्लम आणि इक्बाल तर केव्हाही चिरडले जाऊ शकतात. या पार्श्वभूमीवर वरील बातमी महत्त्वाची आहे. पहिली गोष्ट म्हणजे इक्बालला मुंबई पोलिसांनी अटक केली नसून ठाणे पोलिसांनी केली आहे. तसेच त्याच्यावरचे आरोप व खंडणीचा पीडित वगरे माहिती बाहेर फोडली नाही. त्याला खंडणीविरोधी कार्यालयात आणल्यावर वास्तूस सुरक्षारक्षकांनी गराडा घातला होता. इक्बाल खतरनाक सोडा, साधा गुन्हेगारही कधीच नव्हता. मग गराडा कशासाठी? त्याच्या बचावासाठीच ना? पाकिस्तानात लपलेल्या दाऊदला केवळ एकंच व्यक्ती हत्येपासून वाचवू शकते. ती म्हणजे नरेंद्र दामोदरदास मोदी. दाऊद परत यायला बघतोय का? काहीतरी हालचाली नक्कीच चालल्या असणार. असं आपलं माझं मत. नुकतीच एक बातमी ऐकली. पाकिस्तानी माध्यम नियामक मंडळाने भारताविरुद्ध खोट्या बातम्या दिल्याबद्दल अनेक वाहिन्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. हे कधीही ऐकलं नव्हतं. मोदी नावाची जादू दिसते आहे. अशीच जादू दाऊद इब्राहीमवरही चालली असेल. खखोदाजा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 09/19/2017 - 16:25 नवीन
>>सोबत पोलीस दलातला प्रामाणिक आणि कर्तव्यतत्पर अधिकारी अस्लम मोमीन याच्या कारकिर्दीची आणि आयुष्याची मुंबई पोलिसांनी वाट लावली. म्हणजे काय? आणि अस्लम मोमीन प्रकरण काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Tue, 09/19/2017 - 16:56 नवीन
आनंदयात्री, अस्लम मोमीन प्रकरण थोडक्यात सांगतो. २००२/०३ साली दाऊद त्याचा इक्बालला मुंबईत पाठवू पहात होता. तेंव्हा मुंबई पोलीस इक्बालचं एनकाउंटर करतील अशी भीती होती. म्हणून इक्बालने अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी व नेत्यांशी संपर्क साधला. त्यापैकी एक अस्लम मोमीन. त्याने इक्बालला त्याची चकमकहत्या होणार नाही असा दिलासा दिला. कारण अस्लम पोलिसांत प्रामाणिक आणि कर्तव्यतत्पर म्हणून प्रसिद्ध होता. प्रतिष्ठितांना मध्यस्थ घेतात तसा तो होता. मात्र मुंबई पोलिसांना आणि अनेक नेत्यांना इक्बाल परत यायला नको होता. कारण उघड आहे. म्हणून मुंबई पोलिसांनी इक्बालला तर आत घेतलाच, शिवाय अस्लमवर गुन्हेगारांशी संबंध ठेवल्याचे खोटे आरोप लावले. आता पोलीस म्हंटला की गुन्हेगारांशी नाहीतर काय संतमहात्म्यांशी संबंध येणार का! पण हा मुद्दा इथे अप्रस्तुत आहे. केवळ अनधिकृत हत्या होणार नाही असा दिलासा देणं हा काही गंभीर गुन्हा नव्हे. ही सर्व कथा एस. हुसेन झैदी यांच्या डोंगरी ते दुबई या इंग्रजी पुस्तकातल्या The White Kaskar या प्रकरणात आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Tue, 09/19/2017 - 17:16 नवीन
धन्यवाद गामा. अस्लम मोमीन यांच्यावरचा अन्यायाची कथा खंतावणारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ट
ट्रेड मार्क Tue, 09/19/2017 - 16:05 नवीन
'गेल्या वर्षभरापासून म्यानमारमध्ये होत असलेल्या हिंसाचाराला रोहिंग्या मुसलमानच जबाबदार आहेत. दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा हात आहे. देशहित डोळ्यासमोर ठेवूनच त्यांच्यावर कारवाई होत आहे. म्यानमारमध्ये कायदा-सुव्यवस्था व स्थैर्य राखण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. जगाच्या निंदेला आम्ही घाबरत नाही,' अशी ठाम भूमिका म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आँग सान स्यू की यांनी मांडली आहे. संपूर्ण बातमी इथे. त्यांनी जागतिक मानवाधिकारवाल्यांना सुद्धा फटकारलं आहे. अशी कणखर भूमिका घेतल्याबद्दल कौतुक आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य गुरुवार, 09/21/2017 - 10:55 नवीन
स्यू की यांच्या रोहिंग्यविरुद्धच्या धोरणाचे इतक्या घाईने घुमजाव होईल असे वाटले नव्हते. म्यांमारच्या आधी अगदी कडक आणि मग जागतिक दबावानंतर नरम पडलेल्या भूमिकेमुळे रोहिंग्या मुद्द्यावर भारतीय नीतीला शीर्षासन करावं लागलं आहे. हा दबाव मुख्यतः अमेरिका आणि जापान कडून आहे, चीनचा अपवाद सोडला तर तेच म्यांमारमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणारे देश आहेत सध्या. अगदी परवापर्यंत पाकिस्तानचे हस्तक, अरब आतंकवाद्यांशी संबंध वगैरे असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांसाठी (संदर्भ - सर्वोच्च न्यायालयात भारत सरकारतर्फे दाखल करण्यात आलेले शपथपत्र आणि सरकारी वकिलाने केलेले भाष्य) सध्या युनोच्या बैठकांसाठी न्यूयॉर्क दौऱ्यावर असलेल्या सुषमाजी बांग्लादेशच्या पंतप्रधानांना अगत्याने भेटल्या. ह्या भेटीनंतर काही तासातच ढाका स्थित भारतीय दूतावासाने बांगलादेशातील सुमारे ४ लाख रोहिंग्या आश्रयाला असलेल्या शरणार्थी शिवीरांना तातडीने मदतीचा ओघ सुरु केला आहे. माझ्या मते बांगलादेशला ही 'मदत' पुढील काही वर्षे नक्कीच सुरु राहील - त्यातच सर्वांचे हित आहे. - अनिंद्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क गुरुवार, 09/21/2017 - 17:22 नवीन
स्यू की यांनी काय रोहिंग्यांना बिनशर्त परत घेऊ असं जाहीर केलं की काय? अशी बातमी कुठे दिसत नाहीये. नक्की काय म्हणायचंय ते इस्कटून सांगता का? भारताने रेफ्युजींसाठी बांगलादेशला मदत पाठवली आणि पाठवत राहणार म्हणजे शीर्षासन केलं? तुमची अपेक्षा काय आहे की भारताने बांग्लादेशाबरोबर संबंध तोडून टाकावेत? अशांतता माजवणारे लोक आमच्या देशात नको हा म्यानमार आणि भारताचा पवित्रा असूनही बांगलादेशला ते रेफ्युजी सामावून घेण्यासाठी मदत करणार हे मात्र घुमजाव वाटतंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य
आ
आनंदयात्री Tue, 09/19/2017 - 16:18 नवीन
सरकारचे २०३० पर्यंत भारतीय वाहन उद्योगाला आमूलाग्र बदलण्याचे उद्दिष्ट्य आहे. पेट्रोल डिझेल वर चालणारी वाहने कालबाह्य होऊन भारतात फक्त इलेक्ट्रिक कार्सची विक्री होईल असे या बदलाचे स्वरूप आहे. हि बातमी वाचून पडलेले हे दोन प्रश्न, १. भारताचा पेट्रोलियम इम्पोर्ट वर होणार खर्च ६० बिलियन डॉलर्सने कमी होईल. लेखात म्हटल्याप्रमाणे पुढच्यावर्षी भारत सुमारे ८२ बिलियन डॉलर्स पेट्रोलियम इम्पोर्टवर खर्च करेल. म्हणजे २०३० नंतर ६० बिलियन डॉलर्स दरवर्षी वाचतील असेच ना? २. २०१५ मध्ये सुरु झालेली Faster Adoption and Manufacturing of Hybrid and Electric Vehicles (FAME) हि स्कीम का फसली?
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 09/19/2017 - 19:18 नवीन
१. होय, ते दरवर्षीप्रमाणेच म्हणताहेत. पण हा डेटा किती ऑथोरेटीव्ह ते माहित नाही. २. लेखात म्हटल्याप्रमाणे ही स्कीम पूर्णपणे फसली असे मला वाटत नाही. हां, उशीर मात्र नक्कीच झाला आहे. - ह्या स्कीमची फेजेस मधे ६ वर्षांत अंमलबजावणी होणार होती. फेज १ दोन वर्षांसाठी प्लॅन केलेली होती. त्यासाठी दरवर्षी बजेटमधे तरतूद केलेली आहे. खालील दुव्यावर काही माहिती दिलेली आहे - लिंक - या योजनेअंतर्गत सरकार या वाहनांसाठी प्रोत्साहनपर सब्सिडी देवून त्यांचा खप वाढवू पाहते आहे कारण. मुख्य अडचण बॅटरीच्या किंमतीची आहे, तसेच बाकीचे इन्फ्रा कमी पडत असल्याने सर्वसाधारण किंमत जास्त आहे. अर्थात् हा केवळ एक उपाय आहे, पण सर्वसाधारण किंमत कमी झाल्याशिवाय या वाहनांचा खप वाढणार नाही. - ईस्रो या योजनेच्या अनुषंगानेच गडकरींच्या विनंतीवरून बॅटरी तयार करत होते, जी त्यांनी तयार केल्याची घोषणा झालेली आहे. लिंक१, - आता या बॅटरीचे भारतात व्यावसायिक स्तरावर उत्पादन केल्यास, बॅटरीची किंमत आवाक्यात येऊ शकेल. असे झाल्यास सर्वसाधारण किंमत बर्‍यापैकी कमी होणं अपेक्षीत आहे. काही कंपन्या यासाठी प्रयत्नशील आहेत, तसेच इस्रोनेही ह्या बॅटरीची टेक्नॉलॉजी देण्यास तयारी दाखवली आहे. लिंक२ - सध्या २०२० पर्यंतची तरतूद सरकारला या योजनेसाठी करायची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा